(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • नवे वर्ष,नवी परीक्षा

    सुधारक'कार आगरकरांचे 'शिष्य’ 'तुतारी'कार केशवसुत आपल्या ‘तुतारी’या कवितेत सांगतात-

    "जुने जाऊ द्या मरणालागुनि
    जाळूनी किंवा पुरुनी टाका
    सडत न एका ठायी ठाका
    सावध ऐका पुढल्या हाका
    खांद्यास चला खांदा भिडवूनी"

    असा एल्गार करणारा संदेश त्यांनी नव्या पिढीला दिला.जुन्या गोष्टींना कवटाळून न बसता काळाचे भान ठेवून तरुणांनी नवे विचार आत्मसात करावेत,असे त्यांनी सांगितले.

    क्रांतीकारी कवी ज्ञानपीठ विजेते सर्वांचे आवडते कुसुमाग्रज आपल्या 'प्रेम' या कवितेत म्हणतात-
    "उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत रहाशील फिरत
    जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत
    नंतर तुला लगिनचिठ्ठी
    आल्याशिवाय राहील काय?
    म्हणून म्हणतो जागा हो
    जाण्यापूर्वी वेळ..."

    तर मित्रांनो,आजचा जमाना हा सतत अपडेट राहण्याचा आहे.जसे आपले स्मार्टफोन तुम्ही सतत अपडेट करत असतात.तसेच तुम्हांला पण अपडेट रहावे लागणार आहे.'लोक काय म्हणतील'? हे आता जुने झाले आहे.ते आता अपडेट करुन 'दिल जो कह रहा हे सुनो' हे नवीन अपडेट तुम्हांला तुमच्या सिस्टीम मध्ये इंस्टॉल करुन घ्यावे लागणार आहे.नाहीतर तुम्ही सतत हँग होणार हे नक्की.

    मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे.समाजाने लागू केलेले नियम आपण पाळत असतो.भलेही ते आपल्या हिताचे नसो.'लोक काय म्हणतील' ही भावना आपला पिच्छा सोडत नाही.मी असं केलं तर लोक काय म्हणतील यातून कोणीही सुटत नाही.(अगदी प्रेमविवाह करायचा पण लोक काय म्हणतील?)

    थोडे स्वार्थी व्हा.सवयींचे गुलाम बनू नका.शेवटी एक तंत्र सांगतो,माणसाला गुलामगिरी सहन होत नाही.किंवा कोणी बोललेलं ही सहन होत नाही.कोणी जर म्हटलं हे तुला जमणार नाही तर आपण पेटून उठतो व ती गोष्ट करुन दाखवितो.

    मी माझ्या मनाला नेहमी म्हणतो,'हे तुला जमणार नाही'.मग माझे संपूर्ण शरीर सर्व शक्ती एकवटून बंड करुन उठते(१८५७ सारखे) व ती गोष्ट प्राप्त केल्याशिवाय शांत बसत नाही.

    -- दीपक गायकवाड

  • सोयाबीन

    आपली प्रकृती सुधारण्यात विविध पदार्थांची वेगवेगळी भूमिका असते. सोयाबीनही त्यासाठी फायद्याचे ठरते. यापासून तयार केलेले पदार्थ आपल्याला निरोगी राहण्यास मदत करतात. यामध्ये सोया सॉस, मोड आलेले सोयाबीन, सोयाबीन दूध, आटा अशा सोयाबीनच्या पदार्थांचे सेवन केले असता अनेक आजारांपासून दूर राहता येते.

    सोयाबीनपासून मिळत असलेल्या प्रथिनांमुळे (प्रोटिनमुळे) आपल्या हाडांना भरपूर कॅल्शियम मिळते. त्याचबरोबर यामध्ये असलेल्या इसोफ्लेवोन्स या घटकामुळे हाडांना पोहोचणार्यार इजांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे ऑस्टियोरोसिसच्या धोक्यापासून दूर राहण्यास मदत मिळते.

    सोयाबीनमध्ये प्रथिने व तंतूचे प्रमाण अधिक असल्याने रक्तातील शर्करेची पातळी नियंत्रित केली जाते. त्याचबरोबर आपल्या मूत्रपिंडाची गाळणक्षमता वाढवण्यासही सोयाबीनचे पदार्थ मदत करत असतात. त्यामुळे आपल्याला मधुमेह व मूत्रपिंडाशी निगडित आजार होण्याची शक्यता कमी होते.
    सोयाबीनमध्ये असलेल्या अँटिऑक्सिडंट तत्त्वामुळे प्रदूषण, उन्हाचा त्रास व वयानुसार मृत होणार्या पेशींची समस्याही थांबते. इजा पोहोचलेल्या पेशींचे पुनरुज्जीवन होण्यासही या अँटिऑक्सिडंटमुळे मदत होते. यामध्ये डायटरी फायबरही भरपूर प्रमाणात असल्याने आपले वजन घटवण्यासही सोयाबीनपासून बनवलेले पदार्थ साहाय्यकारी ठरतात.हे एक ‘लो ग्लायसेमिक इंडेक्स’ प्रकारातील खाद्य आहे. अशा प्रकारातील खाद्य आपल्या रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करते.सोयाबीनपासून तयार केलेल्या पदार्थांनी आपली भूक भागल्याचे समाधान लाभते.

    संजीव वेलणकर
    ९४२२३०१७३३

  • हृदयविकार म्हणजे काय?

    हृदय शरीराच्या वेगवेगळ्या भागांना रक्तपुरवठा करते. हृदयाला प्राणवायूयुक्त रक्तपुरवठा करणा-या शुध्द रक्तवाहिन्यांना हृदयधमन्या (कोरोनरी आर्टरी )असे म्हणतात. जर अशा धमन्यांमध्ये अडथळे येऊ लागले तर हृदयाला रक्त मिळत नाही व ते बंद पडते. यालाच हृदयविकार म्हणतात. हृदयविकारात धोक्याची पातळी हृदयाच्या स्नायूंना किती दुखापत झाली आहे यावर अवलंबून असते. मृत स्नायूंमुळे हृदयाला होणा-या रक्तपुरवठ्याचा वेग कमी होतो (कंजेस्टिव हार्ट फेल्युअर) होतो व त्यामुळे पावलांना घाम फुटून श्वसनास त्रास होतो.
    हृदयविकार का होतो ?
    आपण जसजसे मोठे होत जातो, शरीराच्या वेगवेगळ्या भागातल्या रक्तवाहिन्यांमध्ये आतून कोलेस्टेरॉलचे थर साठू लागतात, ज्यात कोरोनरी आर्टरीचा देखील समावेश असतो. त्याचा परिणाम म्हणजे रक्तपुरवठ्यात अडथळा येतो. रक्तवाहिन्यांच्या अशा पद्धतीने चिंचोळ्या होण्याला अथेरोस्क्लेरोसिस म्हणतात.
    महिलांपेक्षा पुरुषांमध्ये हृदयविकार जास्त प्रमाणात आढळतो. सामान्यत: महिला सेक्स हार्मोन इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉनमुळे सुरक्षित आहेत. याचा प्रभा कमीत कमी पाळी जाईपर्यंत तरी राहतो. भारतीयांसहित अनेक आशियाई विकसनशील देशांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढलेला दिसून येतो. ज्यात खालील कारणांचा समावेश आहे :
    - धूम्रपान करणे
    - मधुमेह
    - उच्च रक्तदाब
    - लठ्ठपणा
    - उच्च कोलेस्टेरॉल, आणि कमी एचडीएल व वाढीव कोलेस्टेरॉल
    - शारीरिक श्रमाची कमतरता
    - अनुवंशिकता
    - तणाव, रागीटपणा आणि चिंता
    - वंशानुगत मुद्दे
    काय लक्षणे असतात ?
    काही वेळा लक्षणे ओळखणे फार अवघड असते आणि अन्य लक्षणे दिसू शकतात. सामान्यत:
    - छातीच्या मध्यभागी खूप तीव्र वेदना होतात आणि श्वसनास त्रास होतो.
    - घाम येणे, मळमळ आणि चक्कर येणे हीदेखील काही लक्षणे आहेत.
    - साधारणपणे या वेदना छाती व पोटाच्या मधोमध किंवा पाठीच्या मणक्यात असतात.
    - तिथून त्या मान किंवा डाव्या हातात जाऊ शकतात.
    - इतर लक्षणे जसे मळमळ, उलट्या, अस्वस्थता, कफ, कंप अशी आहेत व या वेदना सुमारे २० मि. पेक्षा जास्त काळ टिकतात.
    - काही वेळा रुग्ण पांढरा पडलेला दिसतो, रक्तदाब एकदम कमी होऊन मृत्यू येतो.
    हृदयविकार कसा ओळखला जातो ?
    डॉक्टर रुग्णाची सूक्ष्म तपासणी करतात आणि हृदयाची स्पंदने मोजतात आणि रक्तदाब पाहतात.
    इलेक्ट्रोकार्डिओग्रॅम, ईसीजी घेतला जातो ज्याने हृदयाची विद्युतीय सक्रियता टिपली जाते.
    ईसीजीमुळे हृदय किती व कसे स्पंदन करते ते कळते, त्यात काही असामान्य लय आहे का ते दिसते आणि जर ह्रदयविकारामुळे हृदयाच्या मांसपेशींचे नुकसान झालेले असल्यास ते दिसते.
    मात्र प्रारंभिक टप्प्यातल्या सामान्य ईसीजीमुळे हृदयविकाराची संभावना होत नाही हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.
    हृदयाच्या मांसपेशींचे नुकसान झालेले असल्यास ते रक्ताच्या परीक्षणात दिसून येते.
    छातीचा एक्सरेदेखील घेतला जातो.
    हृदयाच्या माहितीसाठी इकोकार्डिओग्रॅम करता येतो. ही एक प्रकारची स्कॅन चाचणी आहे ज्यात हृदयाच्या समुचित कार्याची माहिती मिळते.
    कोरोनरी वाहिकांमध्ये अडथळे पाहण्यासाठी कोरोनरी अॅ्न्जियोग्राम हा निर्णायक साबीत होतो.
    हृदयविकाराचा झटका आल्यास रुग्णास काय प्रथमोपचार द्यावे ?
    हृदयविकारावर झटकन ऊपचार मिळाल्यास जीवन वाचवता येते. जोपर्यंत वैद्यकीय मदत मिळत नाही तोपर्यंत रुग्णाला आडवे झोपवावे व त्याचे सर्व घट्ट कपडे सैल करावे. जर ऑॅक्सिजन सिलेंडर उपलब्ध असेल तर रुग्णाला त्वरित ऑॅक्सिजन द्यावे. जर नायट्रोग्लीसरीन किंवा सॉरबिटरेटच्या गोळ्या उपलब्ध असतील तर त्वरित त्यातील एक गोळी जिभेखाली द्यावी. पाण्यात ढवळून अॅॅस्प्रीन द्यावे.
    हृदयविकारावर काय उपचार असतात ?
    हृदयविकारावर झटकन वैद्यकीय उपचार व इस्पितळात भरती करणे गरजेचे असते. पहिले काही मिनिटे आणि तास जरा संकटपूर्ण असतात. प्राथमिक काळात कोरोनरी आर्टरीमधील अडथळे विरघळवण्यासाठी औषधे दिली जातात. हृदयाच्या स्पंदनांवर लक्ष ठेवले जाते व जर काही अनपेक्षित स्पंदने आढळली तर त्यावर उपचार केले जातात. वेदना कमी करण्याची औषधे दिली जातात व रुग्णास आराम करण्यास व झोपण्यास सांगितले जाते. जर रक्तदाब जास्त असेल तर रक्तदाब कमी करण्यासाठी औषधे दिली जातात. प्रत्येक रुग्णाची व त्याला आलेल्या हृदयविकाराची गंभीरता, हृदयाचे नुकसान आणि अडथळ्यांचे प्रमाण व रुग्णाचे वय लक्षात घेऊन ऊपचार पद्धती ठरवली जाते. कित्येक वेळा अडथळे दूर करण्यासाठी काही निश्चित प्रक्रिया आवश्यक असते. यात कोरोनरी अॅेन्जियोप्लास्टी, फुग्याने वाहिकांचा अडथळा दूर करणे किंवा कोरोनरी बायपास सर्जरीचा उपयोग केला जातो.
    हृदयविकारापासून बचाव कसा करता येतो?
    हृदयविकारापासून ज्यांना धोका आहे किंवा वाचायचे आहे त्यांनी खालील नियम पाळावेत :
    जीवनशैलीत परिवर्तन :
    - आहार स्वस्थ ठेवा ज्यात चरबी आणि मीठ कमी असावे, फायबर आणि जटिल - कार्बोहायड्रेट उच्च मात्रेत असावे.
    - वजन जास्त असणा-यांनी वजन कमी करावे.
    - शारीरिक व्यायाम रोज करण्याचीदेखील फार गरज आहे.
    - धूम्रपान करू नये व करत असल्यास त्वरित बंद करावे.
    - मधुमेह, रक्तदाब किंवा जास्त कोलेस्टेरॉल असणा-यांनी त्यांची रोजची औषधे नियमित चालू ठेवून रोगास अटोक्यात ठेवावे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • ग्रह-तारे-नक्षत्रांवर विश्वास असलेल्यांसाठीच फक्त

    साडेसाती हे आपण आपल्या साडेसाती लागेपर्यंत कळत-नकळत केलेल्या बऱ्या-वाईट कर्माचं फळ मिळण्याचा कालावधी असतो. थोडक्यात, न्यायालयात एखाद्या दीर्घकाळ चाललेल्या खटल्यातील वादी-प्रतिवादी यांचे वकील, दोन्ही बाजूचे साक्षीदार यांचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायमूर्ती जसे निकाल पत्र वाचण्यास सुरुवात करतात,

  • आरोग्य नाकाचे

    नाक हेही पंचज्ञानेंद्रियांपैकी एका इंद्रियाचे राहण्याचे ठिकाण असते. गंध अर्थात वास येण्यास कारणीभूत असणारे घ्राणेंद्रिय नाकाच्या आश्रयाने राहते. याशिवाय नाक हे शिराचे प्रवेशद्वारही असते, म्हणूनच औषधाद्वारा मेंदूवर काम करायचे असेल तर नस्य हा उपचार करता येतो. चेहऱ्याच्या ठेवणीमध्ये महत्त्वाचे समजले जाणारे नाक अशा प्रकारे मेंदूपर्यंत पोचण्याचेही एक माध्यम असते. श्वाचसोच्छ्वाससुद्धा नाकामधून होत असतो. वातावरणातील अशुद्धी, धूळ-धुराचे सूक्ष्म कण श्वाीसामार्फत सरळ शरीरात जाऊ नयेत यासाठी नाक या अवयवाची रचना केलेली आहे. नाकाच्या आतील बाजूला चिकट अस्तर असते, यामध्ये हवेतील अशुद्धता, बारीक कण अडकून राहू शकतात व आत जाण्यापासून थोपविले जाऊ शकतात. नाकाच्या मध्यभागी असणाऱ्या मांसल पडद्यावर अतिसूक्ष्म व खूप मोठ्या संख्येने रक्तलवाहिन्या असतात, यामुळे श्वा्सावाटे आत जाणारी हवा किंचित दमट व उबदार बनविली जाते. वासाचे ज्ञान करविणाऱ्या विशेष ग्रंथी नाकाच्या वरच्या एक तृतीयांश भागात असतात व तेथून गंधाचे ज्ञान मेंदूपर्यंत पोचवले जाते. नाक खाली घशाशी व वर सायनसच्या मार्फत डोळ्यांशी जोडलेले असते, तसेच त्याच्याही वर मेंदूशी संबंधित असते. म्हणूनच नाकाची नीट काळजी घेणे अत्यावश्यजक असते.
    गवती चहाचा काढा

    नाकाशी संबंधित सर्वांनी कधी ना कधी अनुभवलेला त्रास म्हणजे नाक चोंदणे व सर्दी होणे. वरवर पाहता साधा वाटला तरी यामुळे व्यक्तीक बेजार होऊन जाऊ शकते. वारंवार सर्दी-पडसे होणे हे शरीराची रोगप्रतिकारशक्तीह कमी असण्याचे एक लक्षण असू शकते. अशा वेळी दीर्घ काळपर्यंत उपचार घ्यावे लागतात. साध्या सर्दीवर मात्र लवकरात लवकर सितोपलादी चूर्ण गरम पाण्यासह घेणे, गरम पाण्याचा वाफारा घेणे, गवती चहाचा काढा घेणे यासारखे उपाय करता येतात. गवती चहाचा काढा पुढीलप्रमाणे बनवता येतो.

    पाणी - दोन कप
    गवती चहा - दोन पाती
    किसलेले आले - अर्धा चमचा
    दालचिनी - एक इंच तुकडा
    तुळशीची वा पुदिन्याची पाच-सहा पाने

    हे सर्व एकत्र करून मंद आचेवर उकळण्यासाठी ठेवावे. एक कप उरल्यावर त्यात चवीपुरती साखर टाकून गरम गरम पिण्याने सर्दीची लक्षणे कमी होतात, तापासारखे वाटत असल्यासही बरे वाटते.

    नाक चोंदत असल्यास दोन-तीन थेंब पातळ केलेले साजूक तूप नाकात टाकणे चांगले. यामुळे सहसा लगेच नाक मोकळे होते व श्वा स घेणे सोपे होते.
    नाकाभोवतीच्या पोकळ्यांमध्ये सर्दीमुळे किंवा अन्य जंतुसंसर्गामुळे अवरोध तयार झाल्याने कपाळ, गालांखालचा भाग, डोळे, डोके दुखू लागणे, डोके जड होणे, खाली वाकल्यास डोके दुखणे वगैरे लक्षणे दिसू लागतात. यालाच सायनोसायटिस असे म्हटले जाते. यावर गरम पाण्याचा वाफारा घेणे, ओव्याच्या पुरचुंडीने शेकणे, रुईच्या गरम पानाने शेकणे यासारखे उपाय करता येतात. दालचिनी, लवंग, चंदन, केशर वगैरे द्रव्ये उगाळून तयार केलेला लेप सायनसवर लावण्यानेही आराम मिळू शकतो.

    घोळणा फुटला तर

    नाकातून रक्तट येणे अथवा घोळणा फुटणे हे लक्षणही बऱ्याचदा आढळते. विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत हे लक्षण अधिक प्रमाणात आढळते. मात्र उन्हाळ्यात, शरद ऋतूत, पित्त वाढले असताही नाकातून रक्ती येणाऱ्या व्यक्तीध असतात. वारंवार नाकाचा घोळणा फुटत असल्यास त्वरेने तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यायला हवे, मात्र प्राथमिक उपचारात व्यक्तीअला आडवे झोपवणे, नाकावर, कपाळावर व डोक्या वर बर्फ किंवा गार पाण्याच्या पट्ट्या ठेवणे यासारखे उपाय करावे लागतात. नियमित पादाभ्यंग करणे, गुलकंद, धात्री रसायनसारखे शीतल रसायन घेणे, नाकात साजूक तुपाचे दोन-तीन थेंब टाकणे, हे उपायही प्रभावी होत.

    आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून नाकाचा सर्वांत महत्त्वाचा उपयोग म्हणजे नाकाद्वारा करता येणारे नस्य. औषधांनी सिद्ध तेल किंवा तुपाचे नस्य हा रोज करावा असा उपचार होय. ज्यायोगे नुसते नाकाचीच नव्हे, तर मेंदू व इतर ज्ञानेंद्रियांची कार्यक्षमता टिकविण्यास, वाढण्यास मदत होते.
    घसा हासुद्धा शरीरातील एक महत्त्वाचा भाग होय. अन्न-पाणी शरीरात घेणे, बोलणे, श्वारसोच्छ्वास वगैरे अनेक क्रिया घशाशी संबंधित असतात. घसा अतिशय संवेदनशील अवयव असतो. मसालेदार पदार्थ, तिखट, थंड किंवा गरम पदार्थ, तंबाखू वगैरेंचा घशावर दुष्परिणाम होत असतो. टॉन्सिल या रोगप्रतिकारशक्तीणशी संबंधित ग्रंथीसुद्धा घशातच असतात. शरीरात जंतुसंसर्ग पसरू नये म्हणून या ग्रंथींची घशात योजना केलेली असते, मात्र टॉन्सिल्स सुजल्या की घसाही दुखू लागतो, खाणे-पिणे-बोलणे वगैरे क्रिया अवघड होत जातात. घशाचे आरोग्य टिकवायचे असेल तर टॉन्सिल्सची काळजी घेणे आवश्यंक असते.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ सकाळ

  • रक्तदाब(Blood Pressure)

    मानवी शरीरात 50 हजार अब्ज पेशी असतात. प्रत्येक पेशीला आपले अस्तित्व टिकवण्यासाठी आणि कार्य करण्यासाठी ऊर्जा लागते. ही ऊर्जा पेशीतच तयार होते. ही उत्पन्न करण्याकरता प्राणवायू आणि अन्नघटक लागतात. हे संपूर्ण शरीरभर पुरवण्याचे कार्य हृदय आणि रुधिराभिसरण संस्था करीत असतात. या संस्थांमधून रक्ताचा प्रवाह सतत चालू असतो. असा प्रवास टिकण्याकरता या संस्थेत जागोजागी कमी-जास्त दाब निर्माण केला जातो. या दाबाला रक्तदाब म्हणतात. या रक्तदाबाचा एक परिणाम म्हणजे रक्ता पुढे-पुढे ढकलले जाते. दुसरा म्हणजे, या दाबाचा परिणाम रक्त्वाहिन्यांच्या आतल्या अस्तरांवर होतो. या अस्तरावरील दाबामुळे रक्ताातील कोलेस्टेरॉल या मेणासारख्या मेद घटकाचे रेणू रक्तवाहिन्यांच्या अस्तरात जातात. तेथे कोलेस्टेरॉलच्या रेणूची ढेकळे बनतात. या ढेकळांमुळे रक्तवाहिन्या अरुंद होऊ लागतात. अरुंद आलेल्या रक्तवाहीन्यांतून रक्त जोरात वाहू लागले की अस्तराला चिरा पडतात. जेथे चीर पडते तेथे रक्त गोठते. गोठलेल्या रक्त वाहिन्यांतून रक्त अवयवाकडे जाऊ शकत नाही. हृदय, मेंदू, मूत्रपिंड, नेत्रपटल इत्यादी ठिकाणी रक्त न पोचल्यामुळे ते ते अवयव अकार्यक्षम होतात. यामुळे प्रकृती ढासळते व धोका निर्माण होतो. रक्त‍दाब वाढण्याचे एक कारण आपल्या आहारातील मीठ हे होय. आपल्या गरजेच्या मानाने मानव प्राणी खूप जास्त मीठ खातो. परिणामी रक्तीदाब वाढत जातो. रक्तदाब आटोक्यात राहावा यासाठी मिठाचे सेवन जितके कमी करता येईल तेवढे चांगले.

    संथ गतीने दीर्घ काळ चालणे किंवा संथ गतीने दीर्घ काळ सायकल चालविणे अथवा पोहणे या व्यायामप्रकारांचा रुधिराभिसरण संस्थेला खूप फायदा होतो. 40 मिनिटे दिवसातून 2 वेळा चालत राहण्याने 1 आठवड्यात 2 हजार उष्मांक वापरले जातात. 3 हजार पाचशे उष्मांक वापरले गेले की 1 पौंड मेद घटतो. हृदयाला प्रत्येक स्पंदनाबरोबर तेवढे रक्ता पुढे ढकलावे लागते. नियमाने पायी चालण्याने हळूहळू वजन कमी होईल व रक्ताभिसरणावरचा ताणही कमी होऊ लागेल. रक्तदाब वाढण्याची इतर कारणे असू शकतात. त्यात मूत्रपिंडाचे दोष महत्त्वाचे असतात. त्या दृष्टीने तपासण्या करून दोष सापडल्यास ते दुरुस्त करणे हिताचे असते. काही औषधांनीदेखील रक्तदाब वाढतो. ज्यांच्या घराण्यात रक्तदाब वाढण्याची प्रवृत्ती आहे, अशा व्यक्तीं नी कोणतेही औषध घेण्यापूर्वी त्या औषधाचा रक्तदाबावरचा संभाव्य परिणाम जाणून घेणे आवश्यक आहे.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- सकाळ / डॉ. ह. वि. सरदेसाई

  • खाज सुटणे

    नखासारख्या टणक अथवा अणकुचिदार किंवा टोकदार वस्तूने ओरखडा काढण्याची प्रबळ इच्छा निर्माण करणारी संवेदना म्हणजे खाज. त्वचेत पसरलेल्या मोकळ्या ज्ञानतंतूंच्या टोकांतून ही संवेदना निर्माण होते. शरीराच्या काही भागातील त्वचेतून अशी संवेदना अधिक सहजतेने निर्माण होते. बाह्य कर्णातील बोगद्यासारखा भाग, जननेंद्रियांवरील त्वचा, गुदद्‌वारासमीपची आणि नाकपुड्यांच्या शेजारची त्वचा, ही काही उदाहरणे आहेत. काही रासायनिक रेणू, काही विद्युत चेतना यांनी या मोकळ्या ज्ञानतंतूंची टोके चेतवली जाऊ शकतात. अशी चेतावणी शरीराच्या बाहेरून किंवा आतून मिळू शकते. या चेतावणीचा परिणाम जवळच्या त्वचेच्या किंवा रक्तवाहिन्यांच्या पेशीवर जेव्हा होतो तेव्हा दाह होतो. परिणामी, ज्ञानतंतूंना होणारी चेतावणी थांबली तरीसुद्धा कंड सुटण्याची प्रवृत्ती काही काळ चालूच राहते. अशा वेळी हलका दाब देणे किंवा दाबापासून त्वचा मुक्त करणे, अशा चेतनांनीदेखील खूप खाज सुटते. येथे जोरात खाजवण्याने पुन्हा तेथील पेशी, मोकळी ज्ञानतंतूंची टोके यात दाह निर्माण होतो. दाहामुळे खाज आणि खाजेमुळे पुन्हा दाह, असे एक दुष्टचक्र निर्माण होते. पुन्हा पुन्हा खाजवण्यामुळे त्वचेच्या वरच्या आच्छादनातील पेशींची संख्या आणि आकार वाढतो. त्वचा जाड होते. तेथे काळा रंग येतो. अशा त्वचेवर खाज सुटू लागली की ती संवेदना बराच काळ टिकते. खाजेची संवेदना ज्या ज्ञानतंतूंच्या टोकांतून निर्माण होते, तेथील संवेदनक्षमता उष्णतेने वाढते. त्या ज्ञानतंतूंच्या टोकाच्या जवळ असणाऱ्या सूक्ष्म केशवाहिन्या विस्तारित होण्याने अशी उष्णता वाढते. हा भाग थंड केला तर खाज शमते. एपिनेफ्रिन (ऍड्रिनलिन) या स्रावामुळे रक्तवाहिन्या आकुंचित होतात. त्यामुळे एपिनेफ्रिन आणि एफेड्रिन अशा रासायनिक रेणूंच्या परिणामांमुळे कंड शमते. उलटपक्षी त्वचेत फोड आले किंवा जखम भरत आली की होणाऱ्या दाहामुळे आणि दाबामुळे कंड सुटते. असा दाह कमी करण्याच्या प्रयत्नांनी (कॉर्टिसोनसारख्या औषधांनी) खाज शमते. पेशींना प्राणवायूचा पुरवठा पुरेसा न झाल्याने (नीलांमध्ये रक्त साचून राहणे, व्हेरीकोझ व्हेन्स) खाज सुटू लागते व रक्तप्रवाह सुरळीत झाल्यावर ही खाज थांबते. कोवळ्या सूर्यकिरणात असणारे अल्ट्राव्हायोलेट किरण, क्ष-किरण अथवा त्वचा बधिर करणारी द्रव्ये यांच्या वापरामुळे काही काळापुरती खाज थांबते. अशी तात्पुरती खाज थांबण्यानेसुद्धा खांजविणे, दाह होणे, खाज सुटणे हे दुष्टचक्र बंद होऊ शकते. कंड सुटणे ही एक संवेदना आहे. सर्व संवेदना अखेर मेंदूतील हायपोथॅलॅमस या भागातून निओकॉर्टेक्सेकडे नेल्या जातात. माणसात या मेंदूच्या भागावर भावना आणि विचार यांचा मोठा परिणाम होणे स्वाभाविक आहे. काही मानसिक प्रक्रियांमुळेदेखील त्रासदायक खाज सुटत राहते. हिस्टॅमिन या रेणूच्या प्रभावाने अनेक ठिकाणी खाज सुटण्याची संवेदना निर्माण होते. तथापि, गर्भवती स्त्रिया, मधुमेही रुग्ण, यकृताच्या विकाराचे रुग्ण, काही प्रकारच्या कॅन्सरसदृश आजारांत हिस्टॅमिनच्या रेणूचा प्रभाव असल्याचे दृष्टोत्पत्तीस येत नाही. अनेक वेळा हिस्टॅमिन या रेणूचे कार्य रोखणाऱ्या अँटिव्हिस्टॅमिन रेणूंचा फायदा होतो हे खरे आहे, तथापि खाज सुटताना तेथे उमटलेली त्वचेवरची लालसर रंगाची सूज (गांधी उठणे) अँटिव्हिस्टॅमिन औषधांनी लगेच कमी होत नाही. शिवाय प्रत्येक वेळी ही औषधे परिणामकारकरीत्या खाज शमवतीलच, याची खात्री देता येत नाही. खाज सुटणाऱ्या विकारात एक महत्त्वाचे कारण म्हणजे घामोळे येणे हे होय. उष्णता असणे आणि घाम सुटण्यास अटकाव येणे, या दोन्ही घटना एकाच वेळी होण्याने घामोळे येते. अर्भकांत हे विशेष होते. भाग गार केल्याने ते शमते. त्वचेतील रक्तवाहिन्यांवर ऍलर्जीचा परिणाम झाला तर "गांधी‘ उठतात. कधी कधी खाज सुटत राहण्याचे मुख्य कारण मानसिक असू शकते. असा प्रकार तरुण स्त्रियांत विशेष करून आढळतो. अशा व्यक्तींना उष्णतेमुळेसुद्धा ऍलर्जी येते. खाज सुटण्यास कारणीभूत असणाऱ्या विकारांत मधुमेह, यकृताचे विकार, काही प्रकारचे कॅन्सर आणि मूत्रपिंडांचे अकार्यक्षम होणे, ही महत्त्वाची कारणे आहेत. त्वचेचे आजार- विशेषतः खरूज कोणत्याही वयात होऊ शकते.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- डॉ. ह. वि. सरदेसाई

  • याला जीवन ऐसे नाव भाग २९

    पाणी शुद्धीकरण भाग नऊ

    या अति शुद्धिकरणाच्या भीतीमुळे काहीवेळा वाटतं आपणच आपल्या पोरांच्या पायावर धोंडा मारून घेत आहोत का ?

    ती शाळेची विहीर..विहिरीजवळ पोरांची गर्दी एकाने घागर भरुन पाणी काढायचे. बाकीच्यांनी आपल्या हाताची ओंजळ धरून रांगेत उभे रहायचे आणि त्या ओंजळीत ती घागर रिकामी व्हायची. चड्डीलाच हात पुसत, आणि खांद्याला नाक पुसत धावत वर्गात पहिले कोण पोचतो यातही स्पर्धा व्हायची, बिचारा पाणी काढणारा तसाच तहानलेला रहायचा....

    आठवतंय का शाळेतील पाण्याचे पिंप ? पी ई चा तास संपला की, धावत पळत पिंपाभोवती पाणी प्यायला धावत जाणं.... एकाने नळाखाली भांड धरलं असताना मधेच कोणीतरी नळ बंद करणे, पाणी वरून पित असताना मुद्दाम कोपरावर हात मारून पाणी त्याच्या शर्टावर सांडणे, मग रागाने भांड्याला तोंड लावूनच पाणी पिणे, खूप घाई असली तर नळाखाली पाणी पडण्याची वाट न बघता पिंपाचे झाकण काढून वरूनच भांडे बुचकळवून प्यायलेले पाणी. हातावरची सर्व शुद्धी पाण्यात उतरायची...
    गंमत होती सर्व ...
    गेली ती सारी गंमत.....
    "एवढं अशुद्ध पाणी तुम्ही पित होतात बाबा," लेकीनं प्रांजळपणे प्रश्न विचारला. तिला म्हटलं,
    " यामुळेच आमची इम्युनिटी वाढत होती. असंच पाणी पिण्याची सवय लहानपणापासून असल्यामुळे चांगलं शुद्ध पाणीच कधीतरी बाधायचं...." माझं तिरकस उत्तर.

    त्यावर ती म्हणाली,
    " आमच्या शाळेतच्या बाजुला लमाणी लोकांची वस्ती आहे. तिथली मुलं आम्ही खेळताना पाहून ग्राऊंडवर येतात आणि आमच्याबरोबर खेळतात. काय साॅलीड स्टॅमिना असतो एकेकाचा, पण अस्वच्छ दिसतात. आंघोळ नाही. वर कपडे नसतातच, सर्व अंगाला माती लागलेली, हात न धुताच खातात, पाणी पण साधेच पितात, न ऊकळलेलं."

    तेव्हा लेकीला कुलकर्ण्यांची एक चारोळी ऐकवली,
    " पिंपळाचं झाड कसं कुठेही उगवतं,
    कुठेही उगवतं,
    म्हणून त्याचं
    कसंही निभावतं "

    खरंच आहे, यानेच त्यांची प्रतिकारक्षमता वाढत असेल का ?

    जमिनीवर पडलेलं खायचं नसतं, आमच्या लहानपणी खाली पडलेली एक सुद्धा चिंच, बोर किंवा लिमलेटची गोळी वाया जाऊ देत नव्हतो. काळा झालेला आंबा, काळा भाग काढून टाकून खात होतो, पक्ष्यांनी खाऊन टाकलेले पेरू आधी खात होतो, चुकुन खाली पडलेला प्रसादाचा पेढा किंवा फुटाणा मटकावीत होतो, आता आमच्या पोरांना शाळेला जाताना रोज उकळलेलं पाणी देतोय, पण शेंबडं ते शेंबडच !
    जरा पाणी बदललं, सहलीला गेली, भेळवाल्याकडचं पाणी प्याली, मामा मावशीकडून सुट्टीवरून आली की आजारी पडलीच म्हणून समजा. असं का ?

    एवढ्या निर्जंतुक पाण्याची रोज सवय असली तर जरा कधी पाणी बदललं तर आजारी पडणारच ना !

    आजच्या भाषेत "इम्युनिटी" कशी वाढणार आणि कधी वाढणार ? जरा पिऊ देत ना साधं पाणी, बारा गावं, बारा ठिकाणचं पाणी पिऊन सगळीकडचं पाणी पचवायची सवय होते ना ! आणि एखाद्या रोगाची रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी, दंडावर, अर्धवट मारलेले रोगजंतुच टोचून भरतात ना !

    हे असं लिहिलेलं पण काही मातांच्या पचनी पडणार नाही.

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    05.01.2017

  • हर्निया

    पोटात दुखणे, गुदद्वारा (अॅनस) जवळ खाज येणे ही सामान्य लक्षण वाटू शकतात. परंतू ही सारी ‘हर्निया’ या आजाराची लक्षणं असू शकतात. वेळीच याकडे लक्ष न दिल्यास त्यातील गुंतागुंत अधिक वाढू शकते. काही शस्त्रक्रिया, लठ्ठपणा,बद्धकोष्ठता, कमजोर स्नायू यामुळे हर्निया जडू शकतो. प्रामुख्याने पुरूषांमध्ये आढळणार्या् या आजारावर शस्त्रक्रियेने वाढलेला भाग किंवा स्क्रिन काढणे हाच उपाय उपलब्ध आहे. म्हणूनच वेळीच ओळखा हर्नियाची खालील लक्षणं

    पोटाजवळ किंवा गुदद्वाराजवळ फुगवटा आल्यासारखे वाटल्यास तात्काळ डॉक्टरकडे जा.

    मांडीजवळ किंवा गुद्द्वाराजवळ खाज येणे ही हर्नियामधील सुरवातीच्या ट्प्प्यातील लक्षण आहे. त्यामुळे ही लक्षण दुर्लक्षित न करता वेळीच उपचार केल्यास हर्निया रोखण्यास मदत होते. मलविसर्जनाच्या वेळेस रक्त पडणे किंवा त्या भागाजवळ ताण येत असल्यास वेळीच लक्ष द्या. यासोबतच मळ्मळणे किंवा उलट्या होणे ही हर्नियाची लक्षण आहेत. हायएटल हर्निया ( hiatal hernia) हा पोटाच्या वरच्या बाजूला होतो. यामध्ये पित्त होणे, छातीत जळजळ होणे अशी लक्षणं आढळतात.

    बेंबी, मांडी, गुदद्वाराजवळ वेदनादायी फुगवटा जाणवत असल्यास ते हर्नियाचे लक्षण आहे.

    तीव्र बद्धकोष्ठतेच्या त्रासासोबत मलविसर्जनातून रक्त जाणे हे पोटाजवळील हर्नियाचे लक्षण आहे. अशावेळेस उठता-बसताना ताण आल्याने तेथील स्क्रीन अधिक वाढू शकते.

    झोपल्यावर पोटाजवळचा फुगवटा जाणवत नाही मात्र उभे राहिल्यावर किंवा पोटावर दाब दिसल्यास पुन्हा जाणवणे हे दुर्लक्षित करू नका. त्याचा आकार दिवसेंदिवस वाढत असल्याचे जाणवत असल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. हर्नियाचे विविध प्रकार आढळतात मात्र त्याची लक्षणं ही सारखीच असतात. फार उशीर न केल्यास वाढणारा फुगवटा कमी करणे शक्य आहे. त्यामुळे आजाराबाबत अधिक भीती बाळगून किंवा शरम वाटून हा आजार लपवू नका. यामुळे भविष्यात त्यातील गुंतागुंत अधिक वाढत जाते.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • दरवर्षी करा रेटीना तपासणी

    मधुमेहामुळे मोतीबिंदू, काचबिंदू हे आजार तर होऊ शकतातच; पण मुख्यत्वे मधुमेहामुळे रेटिनावरील रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. डायबेटिक रेटिनोपॅथीसुद्धा एक प्रकारच्या जीनवर अवलंबून असते. डायबेटिक रेटिनोपॅथी फक्त डायबेटिस नीट कंटड्ढोल न झाल्याने होते असे नाही. तो किती दिवसांपासून आहे यावरही रेटिनोपॅथी अवलंबून असते. असेही पाहण्यात आले आहे की, रेटिनोपॅथीसुद्धा एक प्रकारच्या जीनवर अवलंबून असते. त्यामुळे डायबेटिक रुग्णाने दरवर्षी रेटिनाची तपासणी केली पाहिजे. रेटिनाची तपासणी हे एक स्वतंत्र तंत्रज्ञान आहे. यामध्ये सर्वसाधारणपणे डोळ्यांत औषध टाकून डोळ्यांच्या बाहुल्या मोठ्या केल्या जातात. नंतर इनडायरेक्ट किंवा क्वचित डायरेक्ट ऑफथॅलमोस्कोपद्वारे रेटिनाची पाहणी केली जाते. रेटिनाचे फोटोग्राफ फंड्स कॅमे-याद्वारे घेता येतात. एक औषध शिरेत देऊन रेटिनाच्या रक्तवाहिन्यांची अँजिओग्राफीही केली जाऊ शकते. कशा प्रकारे तपासणी केली त्यापेक्षा तपासणीत काय दिसले हे महत्त्वाचे. आपल्या रेटिनाची रचना अशा प्रकारे केलेली असते की, त्याच्या निरनिराळ्या लेअर्स असतात. रेटिना हे डोळ्यांच्या आतील पातळ पटल आहे. यावर आर्टरीज आणि व्हेन्स (रक्तवाहिन्या) ठराविक पद्धतीने पसरलेल्या असतात. रेटिनाच्या बाहेरील बाजूस कोराईड व डोळ्यांबाहेरील आवरण म्हणजे स्कलेरा असतो. रेटिना संवेदनशील असून त्यावर पडलेल्या प्रतिमेस ज्ञानतंतूंद्वारे ऑप्टिक डिस्कमधून ऑप्टिक नव्र्हद्वारे मेंदूस माहिती दिली जाते. ती आपणास दिसते.

    लक्षणे : या रेटिनावर मॅक्यूला नावाचा अतिसंवेदनशील भाग असतो. त्याच्या मध्यास फोबिया नावाचा सर्वांत जास्त संवेदनशील भाग केवळ काही मायक्रॉनच्या साईजचा असतो. या भागावरच संपूर्ण दृष्टीची तीव्रता अवलंबून असते. मधुमेहामध्ये रेटिनाच्या रक्तवाहिन्या कमजोर होतात. त्यामुळे रेटिनावर जागोजाग रक्तवाहिन्या फुटून रक्तस्राव होतो. काही ठिकाणी पांढरा पदार्थ तयार होतो. ब-याच ठिकाणी अत्यंत बारीक नव्या रक्तवाहिन्या तयार होतात (निओ व्हॅस्क्युलॅरायझेशन). या अत्यंत नाजूक असतात. म्हणून त्या फुटतात. त्यामुळे रेटिनावर रक्तस्राव होतो. वारंवार होणारे रक्तस्राव, व्हाईट एक्झिडेट्स आणि नवीन तयार झालेल्या रक्तवाहिन्या यामुळे मेंबरेन तयार होते. हे मेंबरेन आकसून गेल्यास ते रेटिनाला ओढते. त्यामुळे रेटिना आपोआप बाजूला सरकतो. यास डिटॅचमेंट ऑफ रेटिना असे म्हणतात.

    उपचार : हे सर्व टाळता येऊ शकते. योग्य वेळी रेटिनाची तपासणी केल्यास या रक्तवाहिन्यांवर लेसर किरणोपचार करून त्यांना फुटण्यापासून थांबवता येते. तसेच जाणारी दृष्टी रोखता येते. आज जगात मोतीबिंदू नंतर अंधत्व भिंगारोपण शस्त्रक्रियेने कायमस्वरूपी दूर करता येते; पण रेटिनोपॅथीने आलेले अंधत्व पूर्णपणे दूर करता येत नाही, तर दृष्टीस येणारे नुकसान थांबवता येते. त्यामुळे डायबेटिक रेटिनोपॅथीमध्ये लेसर उपचारास फार महत्त्व आलेले आहे. ब-याच वेळेस हा उपचार वारंवार करण्याची गरज भासते. जागतिक पातळीवर व्हिजन २०२०, तर भारतात केंद्र सरकारने याला अंधत्व निवारणात खूप महत्त्व दिले आहे. यासाठी सरकारी पातळीवर बरेच कार्यक्रम राबवले जात आहेत. हा उपचार अत्यंत सुलभ आणि रुग्णास त्रास न होता करता येतो. यात कोठेही कापाकापी किंवा जखम होत नाही. योग्य उपचारांनंतर रुग्णास लवकर घरी जाता येते. डोळ्यांना पट्टी किंवा चष्मा लावण्याची गरज नसते. मात्र, डॉक्टरी सल्ल्याशिवाय कोणताही निर्णय किंवा उपचार करू नये.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट