वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
जगातल्या कोणत्याही भागातल्या स्त्री-पुरूषांचा वेष त्या त्या भागातील हवामान, संस्कृती आणि मुख्य म्हणजे लाजेच्या त्या त्या समाजातील संकल्पाना यावर अवलंबून असतो. जगभरातील महिलांचं शरीर, शरीर धर्म आणि स्त्री सुलभ स्वभाव साधारणत: सारखाच असला तरी स्त्रीकडे बघण्याचा त्या त्या समाजाच्या व स्वत: स्त्रीच्याही कल्पना भिन्न असू शकतात, नव्हे असतातच.
March 10, 2017
स्वत: अनाथ असलेला ब्रह्मचारी (शम्मीकपूर) अनेक अनाथ, असहाय मुलांचा सांभाळ करत असतो. त्याची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याने मुलांचा सांभाळ करणं त्याला अत्यंत कठीण जात असतं. पण तरीही तो हसतमुखाने त्यांना आशावादी बनविण्याचा प्रयत्न करत असतो. अशी या चित्रपटाची कथा होय.
April 26, 2022
ऑगस्टच्या मध्यरात्री ठीक बाराच्या ठोक्याला लाल किल्ल्यावर ब्रिटिशांचा युनियन जॅक उतरवून भारतीय तिरंगा फडकविण्यात आला. वास्तविक आपण सूर्यपूजक, प्रकाशाचे उपासक, उत्तररात्रीचा प्रहर कोणत्याही शुभ कार्याला आपण वर्ज्य समजतो. लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवून स्वातंत्र्याचा जयघोष आपण उगवत्या सूर्याच्या साक्षीने करायला हवा होता.
December 28, 2008
नित्यः शुद्धो निष्कल एको जगदीशः
साक्षी यस्याः सर्गविधौ संहरणे च ।
विश्वत्राणक्रीडनलोलां शिवपत्नीं
गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे ॥ ६॥
निर्गुण निराकार परब्रह्माची मूलशक्ती आदिमाया जगदंबा हीच सर्व कार्यामागे असलेले मूळचैतन्य आहे. हे स्पष्ट करताना आचार्य श्री प्रथम चरणात परब्रह्माचे वर्णन करीत आहेत. त्या परमात्म्या बद्दल ते म्हणतात,
नित्यः - परमात्मा नित्य आहे. अर्थात भूत, वर्तमान व भविष्य काळात तो आहेच आहे. शास्त्रात अशा तत्वालाच नित्य असे म्हणतात. जे काळानुसार निर्माण होते आणि नष्ट होते त्याला अनित्य म्हणतात. याच दृष्टीने सर्व जग अनित्य आहे. एकटा परमात्मा नित्य आहे.
शुद्धो- त्यात कोणत्याही पद्धतीने मायेचा लवलेश नाही. मायेच्या गुणांनी अशुद्धता येते. मायापती त्या गुणांच्या अतीत असतो. त्यामुळे त्याला शुद्ध म्हणतात.
निष्कल - त्यामध्ये कोणत्याही कला अर्थात बदल होत नाही. कमी किंवा अधिक होणे याला कला असे म्हणतात. परमात्मा परिपूर्ण आहे तो कमी किंवा अधिक होत नाही.
एको- एकमेवाद्वितीय. त्याचा सन्मान दुसरा कोणीच नसतो.
जगदीशः - या संपूर्ण विश्वाचा संचालक.
असा जो परमात्मा, तो
साक्षी यस्याः सर्गविधौ संहरणे च - जिच्या निर्मिती, विलयाचा साक्षी असतो अशी.
परमात्मा पुरुष केवळ साक्षी स्वरूपात अधिष्ठान असतो. तो स्वत: काहीच करत नाही. आदिमाया प्रकृतीच सर्व क्रीडा करते. परमात्मा तिच्या त्या क्रीडेचा साक्षी रूपात आस्वाद घेतो. त्याची योगमाया रूप ही आदिशक्ती असणाऱ्या,
विश्वत्राणक्रीडनलोलां- या सर्व विश्वाच्या पालनाची क्रीडा करीत असणाऱ्या,
शिवपत्नीं- शांत स्थाणू अशा स्वरूपातील भगवान शंकरांची पत्नी असणाऱ्या,
गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे - कमलाप्रमाणे नेत्र असणाऱ्या आई जगदंबा गौरीचे मी स्तवन करतो.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
May 4, 2020
दिवसभर काम करून थकून घरी आल्यानंतर अनेकजणी केसांचा आंबाडा बांधून घरातल्या कामाला लागतात. पण असेच केस बांधून तुम्ही रात्री झोपता का ? केस बांधून झोपल्याने केसगळतीची समस्या वाढते असे काहीजण मानतात तर केस मोकळे ठेवल्यानेही गुंता वाढतो. मग अशावेळी नेमके काय करावे ? हा प्रश्न तुम्हांला पडलाय ?
रात्री झोपताना केस मोकळे ठेवावेत की त्याची वेणी बांधावी हे व्यक्तीपरत्वे बदलते. झोपताना केस मोकळे ठेवणे त्रासदायक नाही मात्र यामूळे केस गुंतण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे सैलसर वेणी किंवा आंबाडा बांधावा. पण तुमच्या केसानुसार ते कसे सांभाळावेत हे सविस्तरपणे वाचण्यासाठी.....
स्ट्रेट केस असल्यास
तुमचे केस मोकळे आणि सरळ असतील तर रात्रीच्या वेळेस तुम्ही सैलसर पोनीटेल बांधून ठेऊ शकता. म्हणजे ते सकाळी फ्रिझी होत नाहीत. सैलसर वेणी बांधून ठेवल्यास केसांमध्ये गुंता होणार नाही. तसेच त्यांना नॅचरल टॅंग्स मिळतील. तुमचे केस लांब असतील ते बांधून ठेवणे सोयीस्कर ठरते. पण खूप वेळ आणि घट्ट बांधून ठेऊ नका. यामुळे केस तुटण्याची शक्यता अधिक आहे.
केस कुरळे असल्यास
तुमचे केस कुरळे असतील तर डोक्यावर त्याचा आंबाडा बांधा किंवा एका बाजूला बांधून ठेवा. यामुळे तुमची झोपमोड होणार नाही याची काळजी घ्या. पण तो खूप घट्ट बांधू नका.
केस ओले असताना ते मूळीच बांधून ठेऊ नका. परंतू केसांमधील गुंतागुंत कमी करण्यासाठी तुम्हांला ते बांधून ठेवणे गरजेचे वाटत असेल तर ते 80 % सुकल्यानंतरच बांधा. यामुळे ते तुटण्यापासून बचावतील. हाच नियम ब्लो ड्रायसाठीदेखील लागू होतो. शक्य असेल तर नैसर्गिकरित्याच सुकवण्याचा प्रयत्न करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- मेकअप आर्टीस्ट पायल बालसे
November 21, 2016
बालपणीच्या काही आठवणी सुप्त मनाच्या कोपऱ्यात दडलेल्या असतात आणि या स्मृती वाढत्या वयात कधीतरी तळातून उमलणाऱ्या कळीसारख्या हळुवारपणे उमलतात. बालमन जसं निरागस तसंच त्या आठवणीदेखील. जळगाव जिल्ह्यातील एका ५००० लोकवस्तीच्या गावातून मी आलेला. कुटुंबाचा परीघ मोठा. घर लहान परंतु परस्परांमधील नातं अतिशय जिव्हाळ्याचं. बालपणी गावी असलेल्या शेतकी शाळेत सातवीपर्यंतचे शिक्षण झाले.
June 26, 2022
मशरुममध्ये बरेच महत्त्वपूर्ण खनिज आणि जीवनसत्त्व असतात. यात व्हिटॅमिन बी, डी, पोटॅशियम, कॉपर, आयरन आणि सेलेनियमची भरपूर मात्रा असते. जर भाज्यांची गोष्ट करण्यात आली तर मशरुम फारच लोकप्रिय भाजी आहे, जी मुलांपासून वृद्धांच्या आवडीची भाजी आहे. यात इतर भाज्यांच्या तुलनेत अधिक पोषक तत्त्व आढळून आले आहे. त्याशिवाय मश्रुममध्ये कोलीन नावाचा एक खास पोषक तत्त्व असतो, जो स्नायूंमध्ये सक्रियता आणि स्मरणशक्ती कायम ठेवण्यासाठी फारच फायदेशीर असतो. मशरुममध्ये उपस्थित एंटी ऑक्सीडेंट आपल्या शरीराला फ्री रेडिकल्सपासून वाचवतो.
July 30, 2019
माणसाच्या जीवनात चढ-उतार हे असतातच. कोण एका वर्षांत करोडपती होतो, तर कधी कुणाच्या धंद्याचं दिवाळं निघतं. शोमन राज कपूरचं तसंच घडलं होतं. ‘मेरा नाम जोकर’च्या अपयशाने तो खचून गेला होता.
April 20, 2023
जहाजावर मुख्यता दोनच टीम असतात एक डेक किंवा नेव्हिगेशनल टीम आणि दुसरी इंजीन टीम. जहाजाचा कॅप्टन हा जहाजावरील सर्वोच्च अधिकारी तर त्याखालोखाल चीफ इंजिनियर आणि मग क्रमाक्रमाने इतर अधिकारी डेक किंवा इंजीन टीम मध्ये असतात. जहाजाचा कॅप्टन किंवा चीफ इंजिनियर होण्यासाठी सर्वात खालच्या स्तरापासून सुरवात करावी लागते.
November 10, 2019
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.
September 3, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti