वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आजकाल संतुलित आहाराचा बोलबाला आहे. याचवेळी अंगावर चरबी वाढण्याची समस्याही साधारण बाब बनली आहे. आरोग्याची योग्य जाण नसल्याने ही समस्या गंभीर बनत चाललीय आणि लठ्ठपणाही वाढतोय.
लठ्ठपणामुळे आपल्याला अनेक घातक आजार होऊ शकतात. लठ्ठपणा कमी करण्यासाठी योगाचा आधार घेणे चांगले. योगशास्त्रातील एक विधी आहे कपालभाती प्राणायाम. या प्राणायामाने लठ्ठपणावर नियंत्रण मिळविणे सहजशक्य आहे. तुम्हाला अद्यापही कपालभाती कसे करावे माहित नसेल तर पुढील विधी पाहा.
चटईवर बसा. बसल्यानंतर पोट सैल सोडा. आता जोरात श्वास बाहेर सोडा आणि पोटाला हिसका देऊन आत खेचा. श्वास बाहेर सोडणे आणि पोट आत खेचणे या दोन्ही गोष्टी एकाच वेळी होणे अपेक्षित आहे. सुरुवातीला ही क्रिया 10 ते 15 वेळा करा. हळू हळू 60 पर्यंत ही क्रिया वाढवू शकता. मधून मधून थोडी विश्रांती घेऊ शकता. या क्रियेमुळे फुफ्फुसाच्या खालील भागातीय हवा आणि कार्बन डाय ऑक्साईड बाहेर निघेल. विज्ञानाने सिद्ध झाले आहे की कपालभातीने शरीरावरील अनावश्यक चरबी नष्ट होते.
श्वाससंबंधी आजार असणार-यांनी कपालभाती करू नये. कपालभाती केवळ रिकाम्या पोटीच करावे. अनुभवी व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली कपालभाती केल्यास अधिक चांगले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
नायटे निरनिराळ्या प्रकारचे असतात. नेहमी दिसणारा प्रकार म्हणजे अंगावर, जांघेत, कमरेवर दगडफूलासारखा दिसणारा व पसरणारा नायटा. यात त्वचा काळवंडते आणि खूप खाज सुटते. हा आजार बुरशीमुळे होतो. याची मुख्य करणे अस्वच्छता, दमटपणा, पाण्याची टंचाई, एकमेकांचे कपडे वापरणे इ. अनेक घरांमध्ये आंघोळीसाठी आडोसा पुरेसा नसतो. यामुळे कंबरेच्या कपड्याखाली नीट स्वच्छता राहत नाही. याठिकाणी खरुज, नायटा वाढतात. कडा असलेल्या गोलाकार स्वरुपात त्वचेवर उठणारा नायटा हा एक प्रकारच्या बुरशी, आळब्यासारख्या सुक्ष्म शेवाळामुळे होणारा रोग आहे. चामडीच्या कोणत्याही भागावर गोलाकार चट्टे उठतात. पण विशेषतः काखा, जांघा, बोटांच्या मधील भाग इ. नेहमी ओलसर राहणाऱ्या जागांमध्ये याचे प्रमाण जास्त असते. आपल्याकडे डोक्यामध्ये होणाऱ्या नायटाचे प्रमाण त्यामानाने कमीच आहे. कंबर व जननेन्द्रियाजवळील भागाला सुद्धा नायटा होतो. हे चट्टे गोलाकार असल्यामुळे त्यांना रिंग वर्म म्हणतात. त्यांना कमालीची खाज सुटते. जर हा चट्टा केसात झाला तर केस जावून तेवढया ठिकाणी टक्कल पडते आणि नखांवर झाला ते नखे वर उचलली जाऊन खरखरीत व वाकडी होता.
नायटाची लक्षणे
•हा आजार कंबर, पोट, मांड्या, जांघा इ. भागात जास्त करून होतात.
•खूप खाज सुटते व नायटाची वाढ वेगाने होते.
•पण कातडीवर बधीरता मात्र नसते.
नायटावर उपाय
•नखे कापावीत.
•नायटा झालेला भाग साबण व स्वच्छ पाण्याने रोज धुतला तर हा रोग बरा होतो.
•हेक्झाक्लेरोफिन असलेल्या साबणाचा जास्त उपयोग होतो.
•घामाने भिजलेले सगळे कपडे नेहमी बदलावेत व स्वच्छ धुवून कोरडे असतांना वापरावे.
•नायटा झालेली जागा नेहमी स्वच्छ ठेवून ती सुर्यप्रकाशात राहील असा प्रयत्न करावा. १ भाग सल्फर व १० भाग तेल यांचे मिश्रण करून नायटा झालेल्या जागी लावावे.
•बाजारात मिळणारी नायटा, गजकर्ण विरोधी मलमे आणि औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.
•डोक्यात खवडे झाले असल्यास बाजारात मिळणारी मलमे आणि औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरावीत.
•डोक्यातील नायटा पाण्याचा शेक देऊन तेथील केस उपटून वरील औषधांचा उपयोग करावा.
वनस्पती औषधी - कडूनिंब तेल अथवा करंज तेल चोळून लावावे
नायटा कसा टाळावा?
नायटा व त्यासारखे चामडीचे बुरशीजन्य इतर विकार सांसर्गिक असल्यामुळे एकाकडून दुसऱ्याला चटकन होतात, ते टाळण्यासाठी पुढील गोष्टी कराव्यात.
•नायटा झालेल्या रुग्णाला वेगळे झोपवावे.
•एकच फणी व एकमेकांचे कपडे ( स्वच्छ धुऊन वाळविल्याशिवाय) वापरू नयेत.
•नायटा झालेल्या रुग्णांवर डॉक्टरांच्या सल्ल्याने लवकरात लवकर उपचार करावेत.
•बाह्य उपचारांबरोबरच पोट सुद्धा साफ असणे गरजेचे आहे. त्वचा नेहमी कोरडी राहील याची काळजी घेणे आवश्यक आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
अगस्त्यच्या बियांची पूड तीन ग्रॅम ते दहा ग्रॅम पर्यंत गाईच्या धरोष्ण २५0 ग्रॅम दुधासोबत सकाळ-संध्याकाळ काही दिवसापर्यंत घेतल्याने स्मरणशक्तीत वाढ होते.
शंखपुष्पीची ३-६ ग्रॅम पूड मधात घालून चाटावी आणि वरून दूध प्यावे. याच्या सेवनाने बुद्धीचा योग्य विकास होतो.
३-६ ग्रॅम शंखपुष्पी पूड साखर आणि दुधाबरोबर नेहमी सकाळी घेतल्याने स्मरणशक्ती वाढते.
शंखपुष्पी २-४ ग्रॅम आणि वचा १ ग्रॅम पूड मुलांना दिल्याने खूपच बुद्धिमान आणि शहाणे होतात.
सकाळी शंखपुष्पीचे थोडे पाणी घालून रस काढता येते. शुद्ध रस १0-२0 मिलिग्रॅम किंवा २-४ ग्रॅम पूड मध, तूप आणि साखरेबरोबर सहा महिन्यांपयर्ंत सेवन करीत राहिल्याने स्मरणशक्ती आणि बुद्धीत वाढ होते.
दूध, तूप किंवा पाण्यासोबत वचाच्या खोडीची पूड २५0 मिलिग्रॅमच्या प्रमाणात दिवसातून दोन-तीन वेळा एका वर्षापयर्ंत किंवा किमान एक महिन्यापयर्ंत घेतल्याने स्मरणशक्तीत वाढ होते.
१0 ग्रॅम वचा पूड २५0 ग्रॅम खांडसरीसोबत पाक करून रोज १0 ग्रॅम सकाळ-संध्याकाळ खाण्याने विसरण्याची सवय दूर होते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
बांगलादेशमधून घुसखोरी करुन भारतात आलेल्या विस्थापितांची संख्या आता 2 कोटींवर पोहचली आहे, अशी माहिती केंद्र शासनाने राज्यसभेत ०१/१२/२०१६ ला दिली. ही संख्या ऑस्ट्रेलियाच्या लोकसंख्ये एवढी आहे.मात्र ही संख्या ५-६ कोटी असावी.
जन्मावेळी आपल्या चंद्र ज्या राशीत असतो ती आपली राशी समजली जाते. त्या त्या राशीतील हा चंद्र व चंद्राचं इतर विविध ग्रहांशी होणारं चांगलं-वाईट साटं –लोटं चांगली-वाईट फळ देतात, राशी कधीही फळ देत नाही. कोणत्याही राशीतील ग्रह फळ देत असतात. ग्रह ही व्यक्ती आहे असं समजल्यास राशी हे त्याचे कपडे असतात.
राहू व केतू हे खरंतर ग्रह नसून पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा आणि चंद्राची पृथ्वीभोवती फिरण्याची कक्षा एकमेकांना ज्या दोन ठिकाणी छेदतात, ते दोन छेदन बिंदू आहेत. परंतू ज्योतिष शास्त्रात या छेदन बिंदूंना ग्रहांचा दर्जा दिला आहे. शनी खालोखाल राहू आणि केतू हे पापग्रह मानले गेले आहेत.
काल मी शनीची ‘साडेसाती’ या विषयावर लिहिलेल्या एका छोट्याश्या लेखामुळे मला अनेकांचे फोन आले. बहुतांश फोन मुख्यतः स्वत:च्या राशीबद्दल विचारणा करणारे होते. आता प्रत्येकाच्या राशीबद्दल अशी माहिती देणं शक्य असलं तरी केवळ एका राशीवरून कोणताही अंदाज वर्तवणं शक्य होत नाही हे मी त्या सर्वाना सांगितले.
उद्या सरत्या वर्षाचा शेवटचा दिवस. जाणार वर्ष कसं गेलं याच्या सिंहावलोकनाचा दिवस. वर्ष जातच असतात आणि नवीन येतच असतात..जाणारं वर्ष बऱ्याच, म्हणजे सर्वांनाच, संमिश्र गेलं असं वैयक्तिकरित्या म्हणण्याचा प्रघात आहे..आणि ते तसंच गेलेलंही असतं..फार चांगलं नाही आणि फार वाईटही नाही.
स्वातंत्र्यानंतर गावखेडी बदलत गेली. गुलामगिरी संपली. स्वराज्य आणि सुराज्य बहरू लागले.पाश्चात्य गेले. जुलमी राजवट संपली.इंग्रज गेले . भारतात सुरू झाला तो स्वातंत्र्याचा उपभोग. देशाने लोकशाही स्वीकारली. गुलामीत वास्तव्य केलेल्या खेड्यात नवी पहाट उगवली. स्वातंत्र्स संग्रामासाठी केलेला त्याग पाठीशी होता. देश बदलतो आहे. प्रजासत्ताक प्रशासन प्रणाली, लोकशाही जीवनव्यवस्थेचा स्वीकार झाला. देशात शहरे बदलत गेली तसा खेड्यातही बदल होतो आहे. मातीच्या भिंतीला सिमेंट चिटकून बसले. घरावर छपराऐवजी सिमेंटचे छत आले. शेतीत अवजारांची संख्या वाढली. पीकांवरील औषधी वाढली. नवीन वाण आले. रासायनिक खताचा वापर होऊ लागला. कलमी झाडं वाढू लागली. एकाऐवजी दोन तीन हंगामी पिके घेता येवू लागली. ठिबक, तुषारांमुळे मुळाशी पाणी जाऊ लागले. घराला रेडीमेड तोरणं येवू लागली.वाहने वाढली.सायकल जाऊन मोटारसायकल आली. त्याही एकेका घरात दोन- तीन. रेडिओच्या ऐवजी रंगीत दूरदर्शन संच आले. त्यातही अत्याधुनिक पातळ,चपटे आकाराचे संच अवतरले. हाती मोबाईल आले. अगोदर साधे होते. तेअँन्ड्रॉईड झाले.टच स्क्रीनवर बोटे फिरू लागली. कुठे कुठे डांबरी पक्के रस्ते आले. बदल होत गेला.सुख-वस्तू सहज मिळू लागल्या. कामे झटपट होऊ लागली.
ही व्याप्ती वरचेवर वाढतच जात आहे. बैलांची संख्या कमी आणि ट्रॅक्टरची आणि अवजारांची संख्या वाढत चालली. जेसीबीचे एक खोरे दहा माणसांच काम करू लागले.लग्नकार्यासाठी मंगल कार्यालय उपलब्ध झाले. लोकं मनसोक्त खर्च करू लागली. आरोग्य सुविधा वाढल्या. अत्याधुनिक यंत्रणा आली. लिंगपरीक्षण होऊ लागले. स्त्री - पुरुष भेदाची जाणीव होऊ लागली. शिक्षण प्रगत होत आहे. मराठी की इंग्रजी याचे स्वातंत्र्य मिळू लागले.
पैसा दिला की सुविधा मिळू लागल्या. निर्जीव मशीन पैसा मोजू लागले.खात्रीशीर देऊ लागले.घेऊ लागले.पासबुक हिशोब ठेऊ लागले.कॅशलेश की अभी बात चल रही है. पीकविम्यासाठी बँकासमोर गर्दी आहे. संगणक नावाचा पडदा अवतरला.यंत्र अवतरले.सॉप्टवेअर, हार्डवेअर संकल्पना झपाट्याने पसरली. व्हाऊचर संस्कृती आली. डिजीटल युग अवतरले. क्षणात देश- परदेशात समोरासमोर पाहत संवाद होऊ लागला. छपाईचे तंत्र बदलले. बॅनर्स युध्द उभे राहिले. रेडिमेड कपडे पाहिजे तसे मिळू लागले. काळ बदलतो तसे जग बदलते.
अशा परिस्थितीत ग्रामसंस्कृतीची दिशा तपासायला हवी.गावगाडा होता. पाटील, पटवारी, परंपरा, रूढी यांची ठेवण कुठे आहे? प्रस्थापितांचा तो दरारा. ती हुकूमशाही आज नेस्तनाबूत झाली आहे.जी थोडीफार आहे ती कालोघात कमी होईल. बारा बलुतेदारी संपण्याकडे चालली आहे.आसामी हा प्रकार इतिहास जमा होतोय.रोखीचे व्यवहार वाढताहेत. जुनी छप्पर घरे कमी झाली. ज्या घरी शिक्षणाचा प्रसार झाला.ती घरं पुढे गेली.ज्यांना जगण्याची किल्ली मिळाली त्यांना कोठार मिळाले. आपोआप माणसं गतीमान झाली.चाक फिरावेत तशी गरागरा फिरताहेत. जगण्याचा नवा संघर्ष उभा आहे. नवीन तंत्रज्ञानाचा आधार घेऊ लागली. जुनी बुरूज संस्कृती ढासळली . नवीन सिमेंटची वन- टू बीएचके प्रणाली उभी राहतेय. मायेच्या मातीचा पापुद्रा कठीण सिमेंटच्या कवचात रूपांतरीत होतो आहे. चिखलमातीच्या कुडाच्या भिंती माणसांना उन्हाळय़ात गारवा, पावसाळय़ात निवारा आणि हिवाळय़ात ऊब देत होती.ती सिमेंटने मिळत नाही. तात्पर्य हे की गावामध्ये जी आपुलकी प्रेम जिव्हाळा होता तो व्यवहारी जगताकडे झुकू लागला आहे. परिणामस्वरूप नातेसंबंध मैत्री या बाबींची व्याख्या बदलू पाहते आहे. गाव ओस पडत आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे युवावर्ग शहरांकडे स्थलांतरीत होतो आहे. तिथेही नित्य नवनवीन समस्या उभ्या राहत आहेत. उर्वरीत शेतीवर अवलंबून असणारा वर्ग शेतीच्या सोयीने रानोमाळ पांगला. वस्ती बांधुन निवास करू लागला आहे. शेताच्या बाजूला, रस्त्याच्या कडेला , पाण्याच्या सोयीनुसार रहीवास करू लागला आहे. वस्ती वाढते आहे. देवदेवता स्थापण्याची संख्या ही दिवसेंदिवस वाढते आहे. हा नवा बदल आहे. जिथे पूर्वी जायला घाबरत तिथे वस्ती झाली. गुरांढोरांची सोय लागते. पाणी, वैरणकाडी, चारा मिळतो. कुठे वीटभट्टी , गुर्हाळं , रस्त्याची कामे, ऊसतोड, खदाण, खाणीचा दगड काढण्याच्या कारणामुळेही वस्ती होते. जगण्याचा नवा संघर्ष उभा राहतोय.
गावातील जुने वाडे, खांडादांडाची म्हणजे माळवदाची. जिथे चारपाच भावंडाच कुटुंब एकत्र नांदायच.तिथे एक भाऊ आपल्या कुटुंबासह मोठय़ा शहरात . तर दुसरा दुसरीक.डेएखादा गावीच अशी अवस्था. विभक्त कुटुंब व्यवस्था. तशीच अवस्था पूर्वीच्या एकोप्याची झाली आहे. लोकशाही आली. निवडणूक आली.पक्ष आला. आरक्षण आले.शह-काटशह आलाच. मतदान आले. पैसावाटप आले.जातीभेद आला.मतभेद आले.मनभेद होऊ लागले . जवळचे नातेसंबंध तुटू लागला. दुरावा निर्माण होऊ लागला. सामाजिक ध्रुवीकरण होऊ लागले.एकसंघपणात विसंगती निर्माण होऊ पाहते आहे. एकल संक्रमणाचाच हा काळ आहे.अजुनही काहींना अन्न , वस्त्र , निवारा नाही. तो व्यवस्थेने द्यावा.
पडकी वाडे, ढासळलेले बुरूज आणि पांगलेली वस्ती जरी असली तरी जगरहाटी चालत असते .थोडा माणूसकीचा ओलावा शिल्ल्लक राहावा.तो युवावर्ग जोपासतो आहे. हे बरे आहे.नवी पिढी प्रगल्भ विचाराची आहे.हा युवक जुन्याचा आदर करतो तसे नव्याचा स्वीकार करतो आहे.तो ओलावा पुरेसा आहे. भविष्यासाठी आशादायी आहे..
पुण्यनगरी
विठ्ठल जाधव
शिरूरकासार जि.बीड
मो.9421442995
आपल्या आहारातील काही अत्यंत महत्वाच्या पदार्थाविषयी किंवा प्रमुख सूत्राविषयी आपण आता चर्चा करूया.
आहार हेच औषध आहे. हा आहार जर युक्ती वापरून बनवला तर वेगळ्या औषधांची आपल्याला गरजच पडू नये. शास्त्रीय स्पष्टीकरण देण्यापेक्षा जास्तीतजास्त व्यावहारिक स्तरावरून आहार अभ्यासला पाहिजे.
देशानुसार आहार विचार करावा. म्हणजे आपण ज्या प्रदेशात राहातो, त्या प्रदेशात उगवणारे अन्नधान्य आपल्याला हितकर असते. उगाचच कोणत्या तरी कंपनीच्या अहवालानुसार, कोणत्या तरी प्रयोगशाळेचा दाखला देऊन, काही अन्न पदार्थ आपल्या पोटी मारले जातात. आपणही कोणताही विचार न करता ते पदार्थ जणुकाही आपल्यासाठीच बनवले आहेत, अशारितीने त्यांना अंगिकारतो.
एवढं सांगताहेत, ते आधी वापरून तर बघू, पासून सुरू होत जाणारी आमची गुलामगिरी आमच्या रक्तात एवढी भिनते की नंतर ते आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनून जातात, मग त्या पदार्थातील दोष दिसेनासे होतात. पण ते पदार्थ मात्र आपला प्रभाव आतून दाखवतच असतात.
जसे सोयाबीन. मुळात डुकरांना माजवण्यासाठी पाश्चात्य देशात या सोयाचा वापर केला जायचा. याची तशी काही आवश्यकता आहे, असे अजिबात नाही. पण भ्रष्टाचार कोणत्याही स्तरावरून केला जाऊ लागला. आणि भारतातील मोठ्या प्रमाणात असलेल्या कुपोषितांच्या सोईसाठी या सोयाची आयात केली गेली. त्याच्या शेतीसाठी अनुदान देणे सुरू झाले. जिथे सोयाची शेती केली जाते, तिथे अन्य पिके कुपोषित राहातात. तेथील जमिनीतील पाण्याचा स्तर इतर जमिनीपेक्षा अधिक खाली जातो. पण लक्षात घेतो कोण ?
मुळात अभारतीय असलेला हा धान्य प्रकार आमच्या स्वयंपाकघरात असा काही घुसवला गेला आहे, की आमचे पूर्वजांनी हे सोयाबीन आम्हाला न दिल्यामुळे आमचे अतोनात नुकसान झाले आहे, असे काही वेळा वाटते. नेहमीच्या पोळीच्या पीठात एक मुठ करता करता सोयाच्या दुधापर्यंत, आणि चंक्सच्या रूपात, गरीबांचे चिकन इथपर्यंत त्याची घुसखोरी झालेली आहे.
त्याला सक्षमपणे पर्याय असणारे उडीद, मसूर, चवळी, राजमा सारखे भारतीय पर्याय उपलब्ध असताना या सोयाचे मिडीयाने एवढे कौतुक केले की, स्वतःच्या पोटच्या गोळ्यापेक्षा, सवतीचे पोर आम्हाला आमचेच वाटू लागले.
सोयाबीन हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. अश्या कितीतरी अभारतीय गोष्टी आम्ही सहजपणे स्विकारल्या आहेत.
मुळात मेकाॅलेच्या विचारसरणीचा आमच्यावर एवढा प्रभाव पडत चालला आहे, की भल्या भल्यांना देखील आपण दिवसेंदिवस अभारतीय होत चाललो आहोत, हे लक्षातही येत नाही. आमच्या मनातील भारतीयत्व पद्धतशीरपणे विसरायला भाग पाडणारा तो दुष्ट मेकाॅले आमच्या शिक्षणपद्धतीतून अजुनही जिवंत आहे.
स्वत्व गमावल्यामुळे सर्वस्व जाण्याची वेळ लवकरच येते, या न्यायाने आपण जर वेळीच जागे होऊन भारतीय पद्धतीने विचार करणे सुरू केले नाही तर आपण कृतीच्या स्तरावर पण अभारतीय होत जाऊ, अशी प्रामाणिक भीती वाटते.
वैद्य सुविनय दामले,
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
17.01.2017
Copyright © 2025 | Marathisrushti