वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आजची औषधी : कुमारी (कोरफड)
● कोरफड ही कडू चवीची आणि शीतवीर्य (थंड गुणात्मक) असल्यामुळे उत्तम पित्तशामक आहे.
● अम्लपित्तासारख्या त्रासात कोरफडीचा गर खाल्ल्याने पित्त मलावाटे बाहेर पडून जाते. आयुर्वेदामध्ये यालाच 'पित्त विरेचन' म्हणतात.
● बद्धकोष्ठता / पोटात मळाचे खडे होत असल्यास कोरफडीच्या गर / रसामुळे खडे फुटून पोट साफ होते. कोरफड घ्यायचे प्रमाण मात्र प्रत्येकाच्या कोठ्यानुसार बदलावे लागते.
● डोळ्यांची आग होणे , पाणी येणे अशा तक्रारींवर कोरफड उपयुक्त आहे. यासाठी कोरफडीचा गर डोळ्यांवर रोज दहा मिनिटे ठेवावा. पोटातही घ्यावा.
● पित्तासोबतच कोरफड वातशामक , विषघ्न व पाचक आहे.
● पचनक्रिया सुधारणारी असल्यामुळे रोज थोड्या प्रमाणात कोरफडीचा रस घेतल्यास शरीर बळकट बनते.
● सर्व प्रकारची पोटदुखी , विशेषतः यकृत-प्लीहा यांना सूज असेल , तर कोरफड खाल्ल्याने निश्चितच उपयोग होतो. म्हणूनच , काविळीवर कोरफड हे जालीम औषध आहे.
● जुनाट , बारीक ताप / कणकण अंगात असल्यास कोरफडीने तो ताप निघून जातो.
● चेहर्याची कांती सुधारण्यासाठी ; त्वचा कोरडी , खरखरीत झाली किंवा सुरकुत्या पडत असल्यास कोरफडीचा ओला गर लावून वाळेपर्यंत ठेवावा व नंतर धुवावा.
● त्वचा आणि रक्तातील दोषांमुळे होणारे खरूज , फोड , खाजेसारख्या सर्व त्वचारोगांमध्ये कोरफड पोटात घेतल्याने उपशय मिळतो.
● स्त्रियांमध्ये पाळी पुढे पुढे जाणे , प्रमाण कमी असणे , कंबरदुखी अशा सर्व तक्रारींमध्ये कोरफड पोटात घ्यावी.
● पोटात जंत झाल्यामुळे भूक न लागणे , अपचन , खाज , पोटदुखी अशी लक्षणे असताना लहान-मोठ्या सर्वांनीच कोरफडीचा रस घ्यावा.
● निरोगी व्यक्तीनेसुद्धा कोरफडीचा रस नियमित घेतल्यास प्रतिकारशक्ती वाढायला मदत होते.
● लहान मुलांना लागणारा दमा , धाप , खोकला व अधिक कफ झाला असल्यास कोरफडीचा रस द्यावा.
● मुका मार लागून रक्त साकळल्यावर याचा लेप लावावा.
● मात्र , जुनाट मुळव्याधीसारख्या विकारात अंग बाहेर येत असल्यास ; गर्भावस्थेमध्ये , अति वृद्ध व्यक्ती , ज्या महिलांना पाळीचे प्रमाण जास्तच असते , अशांनी कोरफडीचा वापर करू नये.
[ टीप - सर्वच आजार केवळ प्रथमोपचारांनी बरे होत नाहीत. कोणत्याही आजारासाठी कोणताही उपचार घेताना तज्ज्ञ वैद्यांकडून मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. ]
डॉ. अमेय गोखले
रत्नागिरी.
9422662772.
(05-05-2017)
(आरोग्यदूत या WhatsApp ग्रुपवरुन साभार)
August 2, 2017


सध्याची युवा पिढी भरकटली आहे, हे सगळेच मान्य करतात. या पिढीच्या भरकटण्यामागे अनेक कारणेदेखील सांगितली जातात आणि त्यातील सर्वाधिक महत्त्वाचे कारण असते ते या युवा पिढीसमोर कोणताही आदर्श नसणे. अर्थात हे कारण महत्त्वाचे आहे यात वादच नाही, परंतु याचा अर्थ समाजातील आदर्श संपलीच आहेत असाही होत नाही.
March 16, 2003
मेडिकल कॉलेज सर जे.जे. हॉस्पिटलच्या आवारात भायखळा येथे आहे. रुग्णालयाची अंथरूण क्षमता २८४४ बेड आहे आणि महाराष्ट्र व मध्य भारतातील सर्व भागातून वार्षिक रूग्ण १,२००,००० रूग्ण इथे येतात.
November 1, 2021
भगवान शंकरांच्या पंचवक्त्र स्वरूपाचे अधिक गुणवर्णन करताना आचार्यश्री म्हणतात….
August 15, 2020
हृदयाच्या बाह्य आवरणावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्याचे श्रेय डॉ विल्यम्स यांना जाते. १० जुलै १८९३ रोजी जेम्स कॉर्निश या नावाच्या कृष्णवर्णी रुग्णावर डॉ विल्यम्स यांनी शस्त्रक्रिया केली. डॉ विल्यम्स स्वतः कृष्णवर्णी होते. अमेरिकेत कृष्णवर्णी जनतेला जेव्हा समान हक्क प्राप्त झाले नव्हते तेव्हा एका कृष्णवर्णी रुग्णावर यशस्वी हृद्य शस्त्रक्रिया करून डॉ विल्यम्स यांनी इतिहास घडविला असेच म्हटले पाहिजे.
May 24, 2018
सरकारने दाखविलेल्या ‘कापूस ते कापड’ या सोनेरी स्वप्नात हरवून गेलेला विदर्भातील कापूस उत्पादक शेतकरी जेव्हा वास्तवात परतला तेव्हा फार उशीर झाला होता. त्या स्वप्नाच्या धुंदीत त्याने खूप काही गमावले होते आणि नंतर गमाविण्यासाठी काही शिल्लक राहिले नाही तेव्हा तो आपला जीव गमावू लागला. रोजच्या आत्महत्या सुरू आहेत.
May 28, 2006
आपल्या विश्व प्रसिद्ध असणाऱ्या मेघदूतम् नावाच्या काव्यात महाकवी कालिदास यांनी ज्या नगरीचे वर्णन करताना, वाट वाकडी करावी लागली तरी चालेल पण या नगरीला निश्चित जा.
September 6, 2020
हृदय हा माणसाच्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. यातील विद्युत प्रक्रियेमुळे हृदयाची धडकन चालू असते. हृदयाचे ठोके मिनिटाला साठ ते शंभर या प्रमाणात पडत असतात. याचे मापन इलेक्ट्रोकार्डिओग्राफ नावाच्या यंत्राने करता येते. यात इलेक्ट्रोड रुग्णाच्या छातीला खास जेलीच्या मदतीने लावले जातात. हे इलेक्ट्रोड हृदयाची स्पंदने टिपतात व ते इलेक्ट्रोकार्डिओग्राफकडे पाठवतात. सरकत्या स्क्रॉलपेपरवर त्याचे तरंग उमटतात, त्यालाच आपण इलेक्ट्रोकार्डिओग्राम असे म्हणतो.
October 29, 2022
हैदराबादमध्ये आमदार असलेले अकबरूद्दीन ओवेसी यांनी आमदार असूनही आपण पाकिस्तानमध्ये असल्याप्रमाणेच वक्तव्ये केली आहेत आणि त्यामुळे भारतातील लोकशाही धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोकशाहीला धोका निर्माण होईल अशी वक्तव्ये हल्ली सर्रास केली जात आहेत.
January 10, 2013
मंगळसूत्र म्हणजे काळ्या मण्यांची माळ व त्याला एक किंवा दोन वाट्या. ह्या वाट्यांना मंगळसूत्रात व स्त्रीच्या आयुष्यात फार महत्व आहे. योग्य मंगळसूत्राची लांबी अशी पाहिजे की जेणे करून ते घातल्यावर वाट्या बरगडी संपून पोट सुरु होते त्या ठिकाणी आल्या पाहिजेत. तेथे अनाहत चक्राचे स्थान असते. अनाहत चक्र मनाशी निगडीत असते. मंगळसुत्रातील वाटी ही गोलाकार घुमट (गोल पिरामिड). वाटीतून येणारी एनर्जी अनाहत चक्राला मिळते त्यामुळे अनाहत चक्राची शक्ती वाढते. त्यामुळे मन शांत राहते व स्त्रीची आत्मिक शक्ती वाढते. लग्न झाल्यावर स्त्री नवर्याचे घरी (स्वतंत्र अथवा एकत्र कुटुंबात) जाते. जेथे तिला adjust व्हायचे असते. स्त्री व्यवस्थित adjust झाली तरच संसार निट होतो अन्यथा गृहकलह वाढून संसारच मोडण्याचा धोका असतो. मंगळसूत्रातील ही वाटी अनाहत चक्रावर आल्यामुळे स्त्रीची आत्मिक शक्ती वाढते. नवीन घरात गेल्यावर स्त्रीला याची नितांत गरज असते. आत्मिक शक्ती वाढली की तिचा प्रभाव इतरांवर (नवर्यासकट) पडतो. तिच्या इच्छा न सांगताच समजून घेतल्या जातात व पूर्णही केल्या जातात. तशी इच्छा त्यांना आपोआपच होते. हे आत्मिक शक्तीचे बळ आहे. तिला अनेकदा आपल्या इच्छा सांगाव्याही लागत नाहीत.
हे आत्मिक शक्तीचे बळ स्त्रीला मिळावे म्हणून आपल्या पूर्वजांनी मंगळसूत्रात वाटीची प्रथा निर्माण केली.
हे मर्म न समजल्यामुळे हल्ली स्त्रिया मंगळसूत्र वापरत नाहीत. समाजात संसारात कलह वाढले आहेत. घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे.
ज्या स्त्रियांना मंगळसूत्र वापरायची इच्छा नाही त्यांनी आपल्या अनाहत चक्रावर एक इंची पिरामिड कायम ठेवावा. पिरामिड मधील शक्ती सुद्धा त्या स्त्रीचे आत्मिक बळ वाढवेल व संसार सुरळीत व्हायला मदत करेल.
आपल्याकडील प्रथेप्रमाणे स्त्री ही नवर्याच्या घरी जात असल्याने तिला जास्तीतजास्त adjustment करावी लागते मात्र पुरुषांना तिच्या उलट पत्नीला आपल्या घरी आणायचे असल्याने तसेच कामासाठी दिवसातील बराच वेळ घराबाहेर असल्यामुळे त्याला याची गरज स्त्री एवढी नसते.
आपल्या पूर्वजांनी मानसोपचार तज्ञ, कौन्सिलर अशी ऑफिस न थाटता, धंदा न करता, त्याचे पेटंट न घेता सामान्य माणसांचे, स्त्रीचे, तिच्या कुटुंबाचे हित बघितले. त्यामुळे सध्याच्या पैशाच्या युगात त्यांना आपण अडाणी समजतो. मात्र त्यांनी ही प्रथा पडून अनेक पिढ्या, असंख्य कुटुंबांचे कल्याण केले. आणि आपण आधुनिक शास्त्राला अनुसरताना आपले कल्याण करणाऱ्या आपल्या पूर्वजांना आणि त्यांनी निर्माण केलेल्या चांगल्या उपयुक्त प्रथांना कमी लेखतो.
(मंगळसुत्राला वाटी एेवजी पदक/पेंडल लावून वाटीचे फायदे मिळत नाहीत.
अरविंद जोशी
B.Sc.
९४२१९४८८९४
March 10, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti