(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • किचन क्लिनीक – नवनीत(लोणी)

    ज्या खाद्य पदार्थाभोवती कृष्णाच्या नटखट लिला भ्रमण करतात.कृष्णावर रचलेल्या अनेक पदांमध्ये त्याचे ह्या वरचे प्रेम व ते मिळवण्यासाठी तो करत असलेल्या खोड्यांचे वर्णन केले जाते.अर्थातच मैया मोरी मैं नही माखन खायो इ सारखी अनेक पदे कृष्णाचे हे माखन प्रेम दर्शविते तसेच गोपी देखील त्याला माखन चोर म्हणून चिडवत.असे हे नंदलाल प्रिय माखन अर्थात लोणी ह्या सदरात आपण पाहूया.

    दुध,दही,ताक,लोणी असा क्रम आपण म्हंणतो पण काही मंडळी प्रत्यक्ष दुध घुसळून देखील लोणी काढतात.चला तर मग काही लोण्यांचे गुणधर्म पाहूयात:

    १)दुधापासून काढलेले लोणी:

    अतिस्निग्ध,डोळ्यांना हितकर,रक्तविकार शामक,पित्त शामक,शुक्रधातू वाढविणारे,बलकारक,संडास बांधून ठेवणारे,थंड व गोड असते.

    २)ताकापासून काढलेले लोणी:

    गोड,किंचीत तुरट,पचायलाहलके,थंड,बुद्धीवर्धक
    ,संडास घट्ट करविणारे,भुक वाढविणारे असते.

    ३)फार दिवसांचे लोणी:

    खारट,आंबट,कडवट,विशिष्ट गंध युक्त,उल्टी करविणारे,मुळव्याध त्वचा विकार वाढविणारे,पचायला जड,त्रिदोष दुषित करणारे आहे.

    (क्रमश:)

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:
    ९९६०६९९७०४

  • अपत्यमार्ग शुष्कता

    अपत्यमार्गातील कोरडेपणा या तक्रारीवर प्रणयाचा कालावधी वाढवणे हा उत्तम उपाय ठरेल. त्याने लाभ न झाल्यास वेळेत वैद्यकीय सल्ला घ्यावा. व्यतिरिक्त क्वचित प्रसंगी ल्युब्रिकंट्स चा उपयोगदेखील करता येईल; मात्र तोदेखील वैद्यकीय सल्ल्यानेच!!

  • किचन क्लिनीक – ताकाचे काही घरगुती उपचार

    १)वारंवार संडासला होत असल्यास तसेच जर संडास करताना जळजळ होत असेल तर लोणी न काढलेले ताक आहारात ठेवावे पण जर संडासला चिकट,बुळबुळीत,जड होत असेल तर लोणी काढलेले ताक आहारात ठेवावे.तसेच वैद्यांचासल्लाघेऊनत्यातसैंधव,बडीशेप,जिरे,
    ओवा,मिरी,असे काही द्रव्य त्यात घालावे.

    २)मुळव्याध झाली असता आहारामध्ये ताक वापरावे पण जर रक्त पडत असेल तर वैद्यांचा विशेष सल्ला घ्यावा.

    ३)अंगावर सुज येण्याची सवय असल्यास बिनसाईचे दही घुसळून लोणी काढावे व त्या ताकामध्ये मिरी,सुंठ,हिंग,लसूण असे पदार्थ घालून ते ताक जर सुजेवर दाबल्याने खड्डा पडत असेल तर त्या व्यक्तिला द्यावे.

    ४)तोंडला रूची नसल्यास जेवताना मध्ये मध्ये फोडणी दिलेली ताकाची कढि प्यावी.

    ताक प्यायचा अतिरेक केल्यास कफ व पित्ताचे आजार होऊ शकतात.

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:
    ९९६०६९९७०४

  • ‘स्ट्रीट माईम’च्या प्रचारासाठी..

    जनजागृतीसाठी पथनाटय़ाचा वापर करतात हे साऱ्यांनाच माहीत आहे, मात्र परदेशात प्रसिद्ध असलेला स्ट्रीट माईम हा कलाप्रकार भारतात फार कमी प्रसिद्ध आहे. माईमचा प्रचार आणि प्रसार व्हावा याकरता माईम आर्ट अॅण्ड कल्चर या संस्थेच्या तरुणांनी पाऊल उचललं आहे. नवीन वर्षाच्या पूर्वसंधेला या तरुणांनी सीएसटी, मरिनड्राईव्ह आणि कुलाबा अशा ठिकाणी स्ट्रीट माईम सादर केलं. त्यांच्या कलेविषयी थोडसं.

    lead1एकांकिका, नाटक अशा कलेतून पुढे आलेले अनेक कलाकार आपल्याला माहीत आहेत. अशाच प्रकारातला एक कलाप्रकार म्हणजे ‘माईम.’ शब्दांचा वापर न करता, चेह-याचा हावभाव करत एखादी कला लोकांपर्यंत पोहोचवणे म्हणजे माईम. युरोप, अमेरिका, सिक्कीम अशा ठिकाणी हा माईम प्रकार प्रचंड चालतो. स्ट्रीट माईमलाही परदेशात प्रचंड मागणी आहे. आपल्याकडे पटनाथ्य सादर करून जनजागृती केली जाते. भारतातही स्ट्रीट माईमचा प्रकार रुजावा याकरता काही तरुण प्रयत्न करत आहेत.

    नववर्षाच्या पूर्व संध्येला सीएसटी, मरिन ड्राईव्ह, कुलाबा अशा ठिकाणी काही तरुण स्ट्रीट माईम करताना दिसले. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी या तरुणांनी स्ट्रीट माईमचं आयोजन केलं होतं. स्वप्नील गटवे, प्रमोद गुतूकडे, कुणाल काटे, सुयोग आंब्रे, प्रणय फडतरे, सागर चव्हाण आणि दीप नाईक या तरुणांनी कुणाल मोतलिंग याच्या मार्गदर्शनाखाली या स्ट्रीट माईमला सुरुवात केली आहे. सुरुवातीला कॉमेडी अॅक्ट सादर केल्यावर मुंबई पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरता त्यांनी ‘सलाम मुंबई पोलीस’ यावर आधारित कलाकृती सादर केली.

    माईम आर्ट अॅण्ड कल्चरलचा संचालक कुणाल मोतलिंग म्हणतो की, ‘परदेशात स्ट्रीट माईमला प्रचंड मागणी आहे. मात्र आपल्या देशात स्ट्रीट माईमचा म्हणावा तेवढा प्रसार झालेला नाही. आपल्या हावभावने लोकांपर्यंत एखादा विषय नेणं फार अवघड काम असतं, जे माईममध्ये होतं. भारतातही माईम संस्कृती रुजावी, याकरता आम्ही स्ट्रीट माईम अॅक्टचा उपयोग करायचं ठरवलं.’

    एकांकिका, नाटक अशा कलेशी खरा संबंध जडतो तो महाविद्यालयातून. आज प्रत्येक महाविद्यालयात स्वंतत्र सांस्कृतिक विभाग आहे. कला क्षेत्रात पदार्पण करू पाहणा-या विद्यार्थ्यांना या सांस्कृतिक विभागाचा खूप फायदा होतो. मात्र आजही अनेक कॉलेजमध्ये माईम या क्षेत्राला हवा तेवढा वाव मिळालेला नाही. शिवाय माईमच्या स्पर्धाही खूप कमी प्रमाणात भरवल्या जातात. त्यामुळे माईम आर्ट अॅण्ड कल्चर या संस्थेतील तरुण मंडळी माईमचा प्रचार करण्यासाठी पुढे आली आहेत.

    २२ मार्च रोजी जागतिक माईम दिवस साजरा केला जातो. माईम या कलाप्रकाराचा प्रचार व्हावा याकरता माईम आर्ट अॅण्ड कल्चर या संस्थेतर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात इच्छुक कलाकारांनी सहभागी होऊन त्यांची माईम कला सादर करायची आहे. त्याचप्रमाणे दरवर्षी २२ सप्टेंबर रोजीही असाच एक कार्यक्रम आयोजित केला जातो. या दोन्ही कार्यक्रमांना अनेक इच्छुक कलाकार सहभागी होत असतात. अशाच कार्यक्रमांमुळे माईमला कलाप्रकाराला चालना मिळेल, असं या संस्थेतील तरुणांना वाटतं.

    माईम आर्टिस्ट असलेला कुणाल मोतलिंग सांगतो, एका शाळेत माईम आर्ट शिकवतो. शिवाय अनेक माईम स्पर्धामध्ये परीक्षकांचं कामही करतो. इतरांना शिकवता शिकवता त्यालाही खूप शिकायला मिळतं असं तो सांगतो. माईम आणि स्ट्रीट माईम कलाप्रकाराचा भारतभर प्रचार व्हावा यासाठी या तरुणांनी उचलेलं हे पाऊल खरंच कौतुकास्पदच म्हणावं लागेल.

    स्नेहा कोलते
    Sneha Kolte
    snehagkolte.sk@gmail.com

  • चिमणीची ‘उरलेली पूर्ण गोष्ट’

    वेळ साधारण रात्री अकरा साडेअकराची असावी, मोबाईलची रिंग वाजली. एवढ्या रात्री कोणाचा फोन म्हणून माझ्या कपाळावर आठ्या, चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आणि मनात भीती अशा संमिश्र भावना एकाच वेळी निर्माण झाल्या. मात्र स्क्रीनवर जेडींचं नाव दिसलं आणि काही क्षणातच या सगळ्या भावना उडण छु झाल्या. जेडींचा आवाज कानावर पडला ….
    झोपली होतीस का गं?
    छे छे! देवासमोर बसून पहाटेची भक्तीगीतं गात होते.
    हे काय उत्तर झालं?
    मग हा काय प्रश्न झाला? जे डी रात्रीची वेळ ही नॉर्मल माणसांची झोपण्याची वेळ असते असं मला वाटतं.
    हो का? मग झोपलेली ही नॉर्मल माणसं दुसऱ्या रिंगलाच फोन कसा काय उचलतात बुवा! हे काही कळलं नाही?
    भावना पोहोचल्या, मुद्द्याचं बोला.
    मुद्द्याचं हेच की, रात्रीचे साडे अकरा वाजलेत आणि तरी तू जागी कशी?
    आज पिल्लुने हट्टच धरला, म्हणाला की गोष्ट ऐकल्याशिवाय झोपणार नाही. मग ऐकवली त्याला गोष्ट. आताच डोळा लागलाय त्याचा.
    कोणती गोष्ट सांगितलीस?
    कोणती सांगणार जे डी? मी काही तुमच्यासारखी हुशार नाही. खूप विचार केला, काहीच आठवेना. म्हणून मग शेवटी 'चिऊ ताई, चिऊ ताई दार उघड'… ती गोष्ट सांगितली.
    अरे व्वा! छानच की. मग पुढे?
    पुढे काय? निद्रादेवीची आराधना.
    असं का, चल मग तुझी निद्रादेवी प्रसन्न होईपर्यंत मी तुला चिमणीची 'उरलेली पूर्ण गोष्ट' सांगतो.
    जे. डी. बरे आहात ना? गोष्ट काय सांगताय? मी काय लहान आहे का?
    गोष्ट लहान मुलांनीच ऐकायची असते हे तुला कोणी सांगितलं?
    आणि माझी चिमणीची गोष्ट अर्धी आहे हे तुम्हाला कोणी सांगितलं?
    हे तुला तेव्हाच कळेल नं जेव्हा तू माझी गोष्ट पूर्ण ऐकशील?
    आता ऐकण्याशिवाय दुसरा कुठला पर्यायच राहिला नाही मला.... सांगा... 'आलिया भोगाशी असावे सादर'… (मी जेडींना असं उपहासाने म्हंटल असलं तरी मला मात्र जाम उत्सुकता लागून राहिली होती … चिमणीच्या त्या अधुऱ्या गोष्टीबद्दल. मी कानात प्राण आणून ऐकायला लागले...)
    जेडींचा धीर गंभीर आवाज आला... 'ऐक मग...."
    चिमणीचे सगळे काम आटोपले, ती जरा निवांत झाली आणि तेव्हा तिच्या लक्षात आलं की अरेच्च्या! आपण अजून कावळ्यासाठी दारच उघडलेलं नाही. तिला विलक्षण अपराधी वाटलं. तिनं बंद दारामागचा कानोसा घेतला. दाराबाहेर शांतता होती. ती शांतता चिमणीला असह्य झाली. तिनं तत्परतेनं दार उघडलं. दाराबाहेर कावळा नव्हता. तिने आजू बाजूला फिरून पाहिलं, कावळा कुठेही नव्हता. 'गेला असेल कुठेतरी... येईल परत' …. तिने स्वत:च्या मनाची समजूत काढली. मात्र, रात्र मावळली... दिवस उगवला, संध्याकाळ झाली आणि परत रात्र आली तरी कावळ्याचा काही पत्ताच नव्हता. चिमणीचं मन आज कशातच रमेना … बाळाला न्हाऊ घालण्यातही नाही आणि बाळाला गंध-पावडर करण्यातही नाही … कारण एव्हाना तिला सवय झाली होती …. कावळ्याने बंद दारावर केलेल्या टकटकीची …… तो आवाज असा काही कानात साठला होता की दिवसातून अनेक वेळा तिने दारावर टकटक झालीय असं समजून दार उघडलं होतं आणि बाहेर कोणी नाही हे पाहून निराशेने बंद केलं होतं... अनेक दिवस उलटली.... चिमणीच्या मनातून काही कावळा जाईना. मग तिने कावळ्याचा शोध घ्यायचाच असं ठरवून घरट्याबाहेर पाऊल ठेवलं. मजल दरमजल करत फिरताना थकून एका झाडाच्या फांदीवर विश्रांती घेण्यासाठी ती थांबली. एवढ्यात त्याच झाडाच्या दुसऱ्या फांदीवरून चिरपरिचित आवाज तिच्या कानावर पडला... तो 'कावळ्याचा' आवाज होता. तो आवाज ऐकून चिमणीला कोण आनंद झाला. सारा थकवा, सारा शीण कुठल्या कुठे पळाला. तिने मोठ्या उत्साहाने त्या फांदीच्या दिशेने झेप घेतली. पहाते तर काय! कावळा आपल्या घरट्यात आपल्या पिल्लांसोबत आनंदाने मौज मस्ती करत होता. कावळ्याचं लक्ष चिमणीकडे गेलं. चिमणीला पाहून त्याला फार आनंद झाला. तो आनंदाने म्हणाला, 'या या चिमणाबाई. तुमचं स्वागत आहे आमच्या घरट्यात. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. बोला, काय करू तुमच्यासाठी?' कावळ्याचं ते अगत्य पाहून चिमणी खूप ओशाळली. म्हणाली,
    'तुला राग नाही आला माझा?'
    का यावा?
    मी माझ्यात विश्वात गुंग होते म्हणून?
    छे छे! प्रत्येकाचं आपलं असं स्वतंत्र विश्व असतं.. जसं तुझं होतं. तुला त्यात माझी गरज कधीच नव्हती रादर माझी ती गरज होती म्हणून मी तुझ्या दाराशी आलो. पण नंतर मला माझी चूक कळली. माझी गरज भागवण्यासाठी तू तुझ्या विश्वातून बाहेर येउन मला साथ देणं किंवा तुझ्या विश्वात मला प्रवेश देणं या दोनीही गोष्टी 'अतिक्रमणा सारख्याच' घडल्या असत्या नाही का? आणि कुणाच्याही वस्तूवर, अधिकारावर, भावविश्वावर 'अतिक्रमण' करण चूकच नाही का? म्हणून मग मी स्वत:च वजा व्हायचं ठरवलं आणि निघालो एकटाच …. तुझ्या विश्वापासून दूर.
    मला एकट करून? अरे, मला सवय झालीय आता तुझी.
    चिमणाबाई, या जगात एकट कोणीच नसतं. जेव्हा आपण एकट आहोत असं वाटतं ना तेव्हा तो एकांतच असतो आपला सोबती जो दाखवत असतो आपल्याला वाट आयुष्यातल्या पुढच्या प्रवासाची . मलाही दाखवली त्याने आणि बघ ……. आज मी किती आनंदी आहे … माझ्या 'घरट्यात'… माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या 'माझ्या माणसांमध्ये'
    चिमणी नि:शब्द होऊन तिथून निघाली तेव्हा कावळा तिला एवढंच म्हणाला -
    चिमणाबाई, माझ्या घरट्यात तू केव्हाही येऊ शकतेस हो. तुझी टकटक ऐकून मी लगेच दार उघडेल … क्षणाचाही विलंब न करता.
    चिमणीचे डोळे पाणावले... भरल्या कंठाने निरोप घेऊन तिने परतीची झेप घेतली आपल्या घरट्याकडे... पण आज तिच्या पंखात पूर्वीइतक बळ राहिलं नव्हतं....

    मी सुन्न ! इतक्यात जेडींचा आवाज आला ……
    -बाईसाहेब गोष्ट संपली.
    जे डी मला संदर्भ सांगा.
    मला वाटलंच की तू आता संदर्भ विचारणार... ऐक …. आपल्या सगळ्यांचीच अवस्था ना थोड्याफार प्रमाणात त्या चिमणाबाई सारखी झालीय.
    म्हणजे ?
    म्हणजे कुणीतरी आपलं माणूस आर्तपणे आपल्याला साद घालतंय हे आपल्या गावीच नसतं अगं. ह्या आपल्या माणसांमध्ये भाऊ, बहिण, मित्र, आई, वडील बऱ्याचदा पोटची मुलंही असू शकतात... त्यांची आर्त साद आपल्याला ऐकूच येत नाही …. म्हणजे ते पोटतिडकीने साद घालतात आणि आपण म्हणतो …'थांब मला जर करिअर करुदे.... थांब जरा मला आता घर घ्यायचय... थांब जरा मला आता कार घ्यायचीय … थांब जरा मला आता ….' आणि मग ही जंत्री वाढतच जाते.
    त्यांची सहन शक्ती संपते … ते त्यांचं वेगळं विश्व तयार करतात... त्या विश्वात आपल्याला स्थान नसतं... आपल्या ते गावीही नसतं आणि जेव्हा येतं तेव्हा …. आपण फार एकटे झालेले असतो.... !!
    आणि असं होऊ नये असं वाटत असेल तर?
    वेळीच 'टकटक ' ऐकायला शिका-
    जे डी, यु आर रिअली ग्रेट यार-
    जेडींचा फोन बंद झाला. घरातही सगळे झोपलेले होते. रात्रीच्या निरव शांततेत फक्त घड्याळाची 'टिकटिक' तेवढी ऐकू येत होती... ती 'टिकटिक' जनु जाणीव करून देत होती की कोणीतरी आहे 'आपलं' जे तिष्ठत उभं आहे दाराबाहेर …. दारावर 'टकटक' करत …. आपल्या एका सादेसाठी....!!

  • किचन क्लिनीक – ताकाचे सामान्य व विशेष गुण

    सर्व साधारणपणे ताक हे चवीला गोड,तुरट,आंबट,पचायलाहल्के, कफवातनाशक ,शरीर बल वाढविणारे,संडास घट्ट करणारे,भुक वाढविणारे व हृदयाला हितकर आहे.

    पण प्रत्येक पशूच्या दुधापासून बनविलेल्या ताकाचे गुणधर्म हे वेगळे असतात त्यामुळे काही जनावरांच्या दुधापासून तयार केलेल्या ताकाचे गुणधर्म आता आपण पाहूया:

    १)गाईचे ताक:

    भुक वाढविणारे,बुद्धिवर्धक,मुळव्याधीत गुणकारी,त्रिदोषनाशक आहे.

    २)म्हशीचे ताक:

    दाट,कफकर,सूज उत्पन्न करणारे किंवा असल्यास वाढविते,पचायला जड आहे.

    ३)शेळीचे ताक:

    अतिशयस्निग्ध,पचायलाहल्के,त्रिदोषनाशक,
    मुळव्याध,पांडुरोग,सुज कमी करणे ह्यात उपयुक्त.

    आता ताक कोणत्या दोषामध्ये कोणत्या अनुपाना सोबत घ्यावे ते पाहू:

    १)वातविकारात:

    आंबट ताक सैंधव घालून प्यावे.

    २)पित्तविकारात:

    गोड ताक साखर घालून प्यावे.

    ३)कफविकारात:

    लोणी काढलेले ताक सुंठ मिरी घालून प्यावे.

    (क्रमश:)

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:
    ९९६०६९९७०४

  • मोदी सरकार आणि सरकारी कंपन्यांची शेअर बाजारात नोंदणी

    २०१६ - १७ आणि २०१७ - १८ या लागोपाठच्या दोन वर्षांच्या अर्थसन्कल्पात केंद्रीय अर्थमंत्र्यांनी , म्हणजेच पर्यायाने मोदी सरकारने , काही सरकारी मालकिच्या कंपन्यांची आपल्या देशाच्या शेअर - बाजारात नोंदणी करण्याचा ( Stock Exchange Listing )मनोदय व्यक्त केला आहे . त्यासाठी घोषणा झालेल्या कंपन्यां आणि एकंदरीतच ही प्रक्रिया हे प्रकरण जरा शांतपणे आणि सविस्तरपणे लक्षात घेण्याजोगे आहे.

    मुळातच , शब्द - प्रयोग " नोंदणी " ( Listing ) असा आहे . निर्गुन्तवनुकिकरण ( Disinvestments ) असा नाहीये ; तसेच ते IPO असंही नाहीये आणि Strategic Sale असंही नाहीये हे आवर्जून लक्षात घेण्याजोगी गोष्ट आहे . अगदी मा . श्री . नरेंद्र मोदी आधी तेरा वर्षे गुजरात सारख्या प्रगत राज्याचे मुख्यमंत्री होते तेन्व्हाही आणि आता मे २०१४ पासून आपल्या देशाचे पंतप्रधान असतानाही सरकारी क्षेत्रातील कंपन्या खाजगी क्षेत्राला विकण्यावर त्यांचा भर नव्हता आणि नाही . होता होईल तो अशा कंपन्यांची कामगिरी सुधारण्यावर , आहे त्या पेक्षाही जास्तच सामर्थ्यशाली करण्यावर त्यांचा भर असतो . या प्रक्रियेत खाजगी क्षेत्र आणि गुंतवणूकदार यांना सहभागी करून घेण्यास त्यांची हरकत नसते ; पण त्यांची मालकी सरकारकडे ठेवण्याकडेच त्यांचा कल असतो . ही भूमिका पुढे नेणारा असाच मनोदय अलिकडच्या दोन्ही केंद्रीय अर्थसन्कल्पात दिसतो .

    हे सुतोवाच Listing असं आहे . त्यामुळे सरकारी मालकी आणि सर्वसामान्य जनतेचा सहभाग या दोन्ही गोष्टी एकाचवेळेस सहजशक्य होणार आहेत . निदान होऊ शकतील . त्यामुळे अशा बाबतीत होणारा सोयीस्कर राजकीय विरोधही टळेल आणि निधी - उभारणीही होईल . आजमितिला यावर्षीच्या तीन कंपन्या ( IRCTC , IRFC , IRCON )आणि गेल्या वर्षीच्या अर्थसन्कल्पात असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातल्या सर्वसाधारण विमा स्वरूपाच्या चार कंपन्या ( जनरल इन्शुरेन्स , ओरिएंटेल इन्शुरेन्स , युनाइटेड इन्शुरेन्स आणि न्यू इंडिया इन्शुरेन्स ) या सातही कंपन्यांच्या शेअर्सची आपल्या देशाच्या शेअर - बाजारात नोंदणी करण्याचा मनोदय या दोन अर्थसन्कल्पात व्यक्त करण्यात आला आहे . त्यापैकी गेल्या वर्षीच्या प्रस्तावावर अजून तरी काही हालचाल , पुढील कारवाई अजूनही सुरू झालेली नाही . पण ती आता लवकरच आणि वेगाने करण्यात येईल असे यंदाच्या अर्थसन्कल्पिय भाषणात सांगण्यात आले आहे . यंदाच्या अर्थसन्कल्पाबाबत तर संसदेत अजून चर्चाही सुरू झालेली नाही . अशावेळी हा प्रस्ताव योग्य तर्हेने समजून घेतला तर . . . .

    आजमितिला या सातही कंपन्या , अगदी पूर्णपणे , अगदी शंभर टक्के , सरकारी मालकिच्या आहेत . त्याच्या एकूण एक शेअर सर्टिफिकेटसवर आपल्या देशाच्या माननीय राष्ट्रपतिम्चे नाव आहे . अशा पद्धतिच्या सरकारी कंपन्यांच्या शेअर्स ची नोंदणी शेअर - बाजारात करण्यासाठी प्रचलित नियमांनुसार अगदी मोजक्या प्रमाणातले शेअर्स दुसऱ्या एखाद्या संस्थेच्या नावावर करूनही ही प्रक्रिया सुरू होऊ शकते . त्यानंतर शेअर - बाजारात रीतसर उलाढाल होत खाजगी व्यक्ति अथवा /आणि संस्था यांना ते शेअर्स मिळू शकतील . यातूनच या शेअर्सचे बाजार - भावही ठरतींल आणि किचकट प्रक्रियात्मक विलंब ही टळेल .

    या प्रस्तावांचे हे एकमेव वैशिष्ठ्य नाही . यासाठी केलेली कंपन्यांची निवड ही दाद देण्याजोगी आहे .

    यंदाच्या अर्थसन्कल्पातील अशा प्रस्तावातील एक कंपनी आहे IRCTC . निश्चलननिकरन ( DEMONITISATION ) च्या निर्णयानंतरच्या पहिल्याच अर्थान्कल्पात अशा प्रस्तावाबाबत IRCTC असणे हे मोठे सूचक , प्रातिनिधिक आहे . कारण DEMONITISATION चा जुळा भाऊ असा धोरणात्मक निर्णय म्हणजे रोकड - विरहीत अर्थव्यवस्थेकडे वाटचाल . अशा व्यवहार - पद्धतिचे अगदी निश्चलननिकरनाच्या निर्णयांच्याही आधीपासूनचे ठळक उदाहरण म्हणजे IRCTC . कारण या कंपनीच्या व्यवहारांमधे तिच्या कारभाराच्या सुरवातीपासूनच रोकड पैशात बिल चूकते करण्याची मुभा मिळतच नाही . ते सदैव एलेक्ट्रॉनिक पद्धतीनेच द्यावे लागते .त्यामुळे व्यवहारात पैसे न मिळण्याचे कारण जन्मालाच येत नाही . अशा अर्थाने या पद्धतीचा IRCTC ही कंपनी BRAND AMBASADOR ठरेल . आता शेअर - बाजारातील नोंदणीने त्याची द्रुश्यमयता ( VISIBILITY ) एका वेगळ्या तर्हेने वाढेल . मुळातच ही कंपनी आणि त्याचे सर्विस पोर्तल सर्वद्न्यात आहे . ना त्याला वयाचे बंधन आहे , ना भौगोलिक घटकांचे . ना त्याला वेळेचे बंधन आहे ; ना वाहतूक क्षेत्राचे . तसे पाहता हे पोर्तल आहे रेल्वेचे . पण त्यावर रेल्वेच्या बरोबरीने विमान आणि बस चेही तिकीट काढता येते . अगदी HOTEL ही बुक करता येते . अशा अर्थाने ते मोदी सरकारच्या CONSOLIDATION च्या धोरणाचेही प्रातिनिधिकरीत्या उदाहरण आहे . त्याव्यतिरिक्त IRCTC दर दिवशी लक्षावधी व्यवहारांचा भार लीलया सोसत असते हे लक्षात घेतले तर मोदी सरकारच्या DIGITAL INDIA चेही झळाळत उदाहरण ठरेल . या सर्वच गोष्टींचा विचार करता IRCTC च्या शेअर्सची शेअर - बाजारातील नोंदणी लाभान्श ( DIVIDEND ) आणि भांडवल - व्रुद्धी ( CAPITAL APPRECIATION ) या दोन्ही निकन्शान्वर भागधारकाना कीती लाभदायक ठरू शकते हे जरूर विचारात घेण्याजोगी बाब आहे . अशा नोंदणी नंतर सरकारच मोठा आणि महत्वाचा भागधारक असणार आहे हा पैलूही इथे तितकाच महत्वाचा आहे .

    याचं अर्थसन्कल्पातील याच मालिकेतील दुसरी कंपनी म्हणजे IRFC . सर्वसामान्य भारतीय नागरिकांना ही कंपनी तशी अपरिचित . निदान IRCTC इतकी तर नक्कीच माहीत नाहीँ . पण वित्तीय क्षेत्रात कार्यरत असनार्याना हे नाव सरावाचे आहे . विशेषतः ट्रस्ट , मोठ्या ग्रुहनिर्माण कंपन्या , ग्रुहसन्कुले , बँका , पतसंस्थां , वित्तसन्स्था यांना त्यांच्याजवळच्या पैशान्ची ज्यात गुंतवणूक करता येते अशा " ELIGIBLE SECURITIES " च्या यादितले NHAI व MHADA यांच्या पाठोपाठचे सदाबहार नाव म्हणजे IRFC . आजमितिला ही कंपनी प्रामुख्याने त्यांच्या कर्जरोख्यान्साथि प्रसिद्ध आहे . हा " ELIGIBLE SECURITY " चा शिक्का मिरवत आता या कंपनीचे समभाग ( शेअर्स ) एका अनोख्या " विश्वासार्ह्यता " च्या परिवेशासकट शेअर - बाजारात पदार्पण करतील . हे नवोदित तसेच जाणकार गुंतवणूकदारान्साठी चांगली संधी ठरू शकते . या माध्यमातून रेल्वेच्या प्रकल्पांच्या वित्त - पुरवठ्याचे चित्र चांगल्या अर्थाने बदलू शकते .
    या मालिकेतील यंदाच्या अर्थसन्कल्पातील तिसरी कंपनी म्हणजे IRCON . रेल्वेच्या उत्पादन क्षेत्राशी निगडीत अशी संस्था . MAKE IN INDIA ची प्रक्रिया पुढे नेनारा असा निर्णय .

    या तीन कंपन्यांची अशी निवड करनार्यान्च्या कल्पकतेला मनापासून दाद द्यावी लागेल . त्याची वेळ , त्याची संगती सगळेच अनोखे आहे . या तिन्ही कंपन्या जरी रेल्वे शी संबंधीत असल्या तरी त्या तीन वेगवेगळ्या प्रकारच्या कामकाजात आहेत . कारण IRCTC एक सर्विस पोर्तल , IRFC ही एक वित्तीय कंपनी तर IRCON ही एक उत्पादन क्षेत्रातील कंपनी . ही सांगड आवर्जून लक्षात घेण्याजोगी आहे .

    तसाच विचार करत असताना खरं म्हणजे गेल्या वर्षीच्या अर्थसन्कल्पात उल्लेख असूनही , आजपर्यंत त्याबाबत काहीच पुढील कार्यवाही झालेली नसल्यामुळे , या वर्षात ती पूर्ण करण्याचे सांगण्यात येत आहे , अशी गोष्ट म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील चार कंपन्यांच्या समभागान्ची ( आपल्या मराठीत सांगायचे तर शेअर्स ची ) शेअर - बाजारात नोंदणी . पुन्हा ही निवड उल्लेखनीय आहे . कारण मुळातच विमा म्हणजेच इन्शुरेन्स हा प्रकार , आणि त्यातही सर्वसाधारण विमा म्हणजेच जनरल इन्शुरन्स , हा प्रकार हवा त्या प्रमाणात आणि हवा त्या अर्थाने आपल्या देशात रुजलेला नाही . शेअर - बाजारातील नोंदणीने त्याची द्रुश्यमयता VISIBILITY वाढेल असाही त्यामागील विचार असावा . पुन्हा हा विचार आर्थिक द्रुश्त्याही आतबतात्यांचा नाही . कारण सर्वसाधारण विमा हा तरलता ( LIQUIDITY ) , नफा मिळवणयाची क्षमता ( PROFITABILITY ) या निकषांवर पूर्णपणे उतरणारा आहे . कारण अशी विमा पॉलिसी ही एका वर्षासाठीच असते . ती घटना घडो , अथवा न घडो , ही पॉलिसी दरवर्षी घ्यावीच लागते . गेल्या शंभर - सव्वाशे वर्षांचा सर्वसाधारण विमा क्षेत्राचा जागतिक इतिहास असं सांगतो की जर वर्षभरात अशा शंभर पॉलिसी दिल्या तर संबंधित वर्षात फक्त दोन पॉलिसी मधे अशी नुकसान - भरपाई द्यावी लागते . म्हणजे यांतील उत्पन्न आणि नफा याचा आणि त्याचा नोंदणी नंतर बाजारात या शेअर्सचे बाजारभाव ठरण्यात कीती सकारात्मक परिणाम होऊ शकतो याचा अंदाज सहज बांधता येईल .

    याबाबतच्या निर्णयांतून मिळणारा एक महत्वाचा संकेत हा आहे की येणाऱ्या काळातील आपल्या देशाचे अर्थकारणाचा पोत , बाज आणि नूर वेगळा असेल . ( हा एक स्वतंत्र लेख - मालेचा , पुस्तकाचा , व्याख्यान - मालेचा विषय आहे . )

    या न्यायाने गेल्या वर्षी सर्वसाधारण विमा क्षेत्रातील कंपन्या , यंदा रेल्वेशी संबंधित कंपन्या या मालिकेत येणाऱ्या काळात आयुर्विमा महामंडळ , पोस्ट यान्चीही शेअर - बाजारात नोंदणी होऊ शकते .

    आणि म्हणूनच १ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी २०१७ या १५ दिवसांत मी केलेल्या माझ्या २५ भाषणात यंदाच्या अर्थसन्कल्पाचे वर्णन असं केले आहे की " या अर्थसन्कल्पाने २०१७ - १८ या वर्षात मला काय दिले हे महत्वाचे नसून २०१७ या सालापासून आपल्या देशाचे अर्थकारण कसे असेल याबाबत हा अर्थसंकल्प काय संकेत देतो हे जास्त महत्वाचे आहे " .

    याबाबत मला फक्त एकच प्रश्न आहे की जर हे माझ्यासारख्या अतिशय सर्वसामान्य माणसाला हे जाणवते , तर मग अर्थसन्कल्पाच्या या आगळ्या - वेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण पैलू बाबत एरवी इतके बोलणारे सरकारी पक्षाचे प्रवक्ते आणि परिवारातील ज्येष्ठ - श्रेष्ठ , सर्वगामी पत्रकार याबाबत का बोलत नाहीत ? असे असेल की पक्ष - प्रवक्ते सध्या सुरू असलेल्या निवडणुक प्रचाराच्या रण - धुमाळींत , तर ज्येष्ठ - श्रेष्ठ पत्रकार महापालिकेच्या निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यायचा हे ठरवण्यात व्यस्त असावेत.

    असो.

    -चंद्रशेखर टिळक
    १५ फेब्रुवारी २०१७ .

    एमेल : tilakc@nsdl.co.in

  • अंगारकी आणि गणपती..

    आज अंगारकी चतुर्थी. मंगळवारी येणाऱ्या ‘संकष्टी’ला अंगारकी म्हणतात कारण ‘अंगारक’ हे मंगळाचे नांव आहे. ‘अंगार’ म्हणजे आग..! अग्नीप्रमाणे तेजस्वी आणि दाहक असलेल्या मंगळाला म्हणूनच ‘अंगारक’ म्हणतात.

  • प्रमुख आहारसूत्र – आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन – भाग चार

    आयुर्वेदीय चिकित्सा म्हणजे अॅलोपॅथीला पर्याय. असा जर कोणाचा समज असेल तर तो गैरसमज आहे. पॅरासीटामोलच्या ऐवजी आयुर्वेदात काय आहे असे विचारणे म्हणजे मोहोरीच्या ऐवजी बेसन आहे का असे विचारल्यासारखे आहे.

    यांची तुलना कधीही करू नये. प्रत्येक पॅथीची स्वतःची अशी खास वैशिष्ट्य असतात. प्रत्येक शास्त्राचे स्वतःचे सिद्धांत असतात. त्यांचा योग्य तो आदर राखलाच पाहिजे. बीकाॅम झालेल्या विद्यार्थ्यांनी म्हणावे, बीएस्सी करून काय होणारे, बीएस्सी करत असलेल्यांनी म्हणावे आर्टस् शिकण्याची काही आवश्यकताच नाही. हे योग्य नव्हे.

    मधुमेहा सारख्या आजारात रुग्णाला नेमकेपणाने काय होते आहे, त्याला काय हवेय हे प्रत्येकाचे निकष वेगळे असतात. भविष्यात अमुक होईल म्हणून आत्ता असे वागले पाहिजे ही भीती अवाजवी आहे.

    नखाला भविष्यात चुकुन होणारे नखुर्डे हे कॅन्सरमधे रूपांतरीत होऊ शकते, हो किंवा नाही. या दोन पर्यायांपैकी एकच पर्याय निवडायला सांगितला तर दुर्दैवाने याचे उत्तर हो असेच द्यावे लागते, असे आजचे वैद्यक शास्त्र सांगते. नियमावर बोट ठेवले तर भविष्यात होणारा नखाचा कॅन्सर टाळण्यासाठी आपण नखच काढून टाकूया, असा विचार करणे योग्य होईल का ? जे अस्तित्वातच नाही, त्याची भीती निर्माण करून आपली पोळी भाजून घ्यायची ? प्रत्येकाची आळीमिळी गुपचिळी. प्रत्येकाचा बिझनेस. प्रत्येकाला स्वतःची काळजी.

    रक्तातली साखर वाढली तर किडनी, डोळे इ. अवयवांवर विपरीत परिणाम होतात, असे एक वैद्यक शाखा म्हणते. अवयवांवर विपरीत परिणाम होतो तो, रक्तातली साखर वाढली म्हणून की, त्यासाठी कायमस्वरूपी घ्याव्या लागणाऱ्या औषधांचे ते दुष्परिणाम आहेत, यावर अजूनही संशोधन सुरूच आहे. शिवाय मनात निर्माण झालेली भीती देखील हाॅर्मोन्स मधे बदल घडवित असतेच.

    मधुमेहामधे रक्तातली साखर तपासणी, किंवा तत्सम रासायनिक तपासण्या करणे, हाच एकमेव योग्य निकष आहे, असे म्हणण्याची काहीच आवश्यकता नाही. त्या वैद्यकामधे अजूनही संशोधन सुरूच आहे. त्याचे निकष अजूनही बदलत आहेत.

    आणि रक्तातल्या साखरेचा निकष खरं सांगायचं तर आयुर्वेदात सांगितलेलाच नाही. त्यामुळे मधुमेहामधे रक्तातली साखर नाॅर्मल करणे हा आयुर्वेदीय चिकित्सेचा उद्देश असूच शकत नाही. हे वैद्यांच्याच अजून ध्यानात येत नाही तर सामान्य लोकांनी तशी अपेक्षा करणे चुक नव्हे.

    हा विचार समजून घेणे आवश्यक आहे. ज्या पद्धतीने निदान केले जाते, त्याच पद्धतीने चिकित्सा, पथ्य अपथ्य, योग, प्राणायाम यांचा विचार केला तर चिकित्सा पूर्णत्वाला जाईल. जे सिद्धांत आयुर्वेदात वर्णन केलेले आहेत, ते अन्य पॅथीमधे कसे बसवता येतील ? असे करणे म्हणजे गोल भोकात चौकोनी पाचर ठोकण्यासारखे आहे. कृपया असा विचार सुद्धा करू नये. नाहीतर जे पाहिजे ते (आरोग्य ) आपल्याला कधीही पूर्णत्वाने मिळणार नाही. आणि औषधे मात्र कायमस्वरूपी पूर्णपणे घ्यावी लागतील.

    जर आपल्याला घोडा बनवायचा असेल तर त्याचे डोके, पोट, आयाळ तोंड आणि अगदी शेपूट देखील घोड्याचीच बनवली पाहिजे. तरच त्या कलाकृतीला घोडा असे म्हणता येईल. नाहीतर तोंड करायचे घोड्याचे, आयाळ करायची सिंहाची, पोट करायचे वाघाचे, आणि शेपूट लावायचे शेळीचे. कसा दिसेल हा प्राणी ? त्याला पूर्णत्व येणार नाही.

    प्रत्येक शास्त्राची स्वतःची एक परिभाषा असते. त्याच परिभाषेत ते सिद्धांत समजून घ्यावे लागतात. तसे केले नाही तर आपल्याला जे पाहिजे ते पूर्ण स्वास्थ्य कदापि मिळणार नाही.

    निदान करायचे अॅलोपॅथीनुसार, तपासण्या करून घ्यायच्या रसायनशास्त्राप्रमाणे, चिकित्सा ठरवायची आयुर्वेदानुसार, पथ्य करायचे निसर्गोपचारानुसार, आणि औषध घ्यायचे होमियो पद्धतीनुसारच्या !
    याशिवाय पुष्पादिदिचे सल्ले, स्वामीजीनी सांगितलेले उपाय, वाॅटसप महाराजांचे नुस्खे आहेतच.

    अशा भीतीच्या पायावर उभारलेल्या विचारसरणीने रोग कसा बरा होईल ? हे रुग्णांनी लक्षात ठेवले पाहिजे.
    .....आणि वैद्यांनी सुद्धा !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    14.02.2017

  • जांभया येणे

    कंटाळा आला, झोप येऊ लागली किंवा आजूबाजूच्या व्यक्ती जांभया देऊ लागल्या, की माणसाला जांभई येते. खोकला येणे, शिंकणे, उचकी लागणे, उलटी होणे या क्रियांप्रमाणेच जांभई येणे ही एक प्रतिक्षिप्त क्रिया (reflex action)आहे. जांभई येण्याच्या क्रियेमागे मज्जासंस्थेचे काही भाग कार्यान्वित होतात. मेंदूतील "बेसल गॉंग्लिया' नावाच्या भागातील केंद्राच्या कार्याचा जांभई येण्याचा संभव असावा असे मानले जाते. जांभई घेताना अनेक स्नायूंचे कित्येक सेकंद टिकणारे आकुंचन होत राहते. परिणामी व्यक्तीचे श्व सन दीर्घ पूरक स्थितीत जाते म्हणजे श्वाचस आत घेण्याची क्रिया नेहमीच्या श्वावसोच्छ्वासापेक्षा लांबते. त्याच वेळी घशाचा आकार विस्तारतो. खालचा जबडा व जीभ खाली जाते. दीर्घ श्वासस घेण्याने फुफ्फुस व पोट यातील पडदा (डायफ्रॅम) पोटाकडे सरकतो. परिणामी छातीच्या पोकळीत ऋण भार (negative pressure) तयार होतो. शरीरातील नीलांमधील रक्त छातीकडे (हृदयाकडे) जाते. त्यामुळे हृदयाकडून शरीराकडे जाणाऱ्या रक्ताचा पुरवठा सुधारतो. दीर्घ श्वीसनाचा दुसरा मोठा फायदा म्हणजे फुफ्फुसातील बंद कोष उघडले जातात.

    आपल्या नेहमीच्या किमान 40 टक्के फुफ्फुसातील कोष कार्यान्वित होत नसतात. अशा न उघडलेल्या कोषातून प्राणवायूची देवाणघेवाण होत नाही. प्राणवायू कमी असणारे रक्त तसेच हृदयाकडे परत जाते व रक्तातील प्राणवायूचे प्रमाण घटते. मधूनच दीर्घ श्वेसन झाले तर हा दोष टळतो. अनेकदा हॉस्पिटल्समध्ये अति दक्षता भागात रुग्णांना कृत्रिम श्वा‍स होणाऱ्या "व्हेंटिलेटर' र्(ventilator) मशिनवर ठेवले जाते. या वेळी रुग्णाला जांभई येत नाही. त्यामुळे बंद असणाऱ्या कोषातील "अशुद्ध' (म्हणजे प्राणवायू कमी असणारे) रक्त फुफ्फुसाकडून हृदयाकडे जाणाऱ्या रक्तात मिसळते. परिणामी रक्तातील प्राणवायूचे प्रमाण घसरते. तसे होऊ नये म्हणून जास्त दबावाने प्राणवायू देणयाची प्रथा आहे. कधी कधी खूपच जास्त दबावाखाली प्राणवायू वापरावा लागतो. हायपर बॅरिक ऑक्सि न चेंबर(hyper baric oxygen chamber) जांभई येताना चेहऱ्यावरचे स्नायू व हाताचे स्नायूदेखील कार्यान्वित होतात.

    या क्रियांनीदेखील रुधिराभिसरणाला चालना मिळते. शिवाय स्नायूंच्या आत असणाऱ्या काही मज्जा-स्वीकारांना (sensory receptors) चालना मिळते. यांच्यामधून मज्जारज्जूत व मेंदूत जाणाऱ्या चेतनांमुळे स्नायू शिथिल होण्यास मदत होते. ही झोपेची पूर्वतयारी आहे. हाताच्या स्नायूंचे हे काम मेंदूच्या हालचाल केंद्राच्या (motor cortex) ताब्यात नाही. एखाद्या व्यक्तीला पक्षाघात (hemiplegia) झालेला असला तर ती व्यक्ती आपला (उजवा किंवा डावा) हात स्वेच्छेने हलवू शकत नाही. कारण या हालचाल केंद्राचा व हात हलविण्यास जबाबदार असणाऱ्या मज्जारज्जूतील पेशींचा संबंध दुरावलेला असतो. अशा व्यक्तीला जांभई आली तर मात्र हात उचलला जातो, ताणला जातो. हीदेखील बेसल गॉंग्लियामधून देखरेख केलेली एक प्रतिक्षिप्त क्रियाच असते. असा लुळा पडलेला हात जांभईच्या वेळी हलताना पाहून पाहणाऱ्याला नवल वाटते.

    उत्क्रांत होत असताना अनेक श्वानपदांना आपल्या संरक्षणासाठी वास घेणे महत्त्वाचे ठरते. मोठ्या प्रमाणात श्वा स घेण्याने बरीच हवा नाका -घशात जाते. या भागात नेहमी होणारी हवेची हालचाल संथ गतीने व कमी घनफळाची असते. त्यातील वाढीमुळे वास घेण्याची क्षमता वाढते. झोप येण्यापूर्वी आपल्या आसपास धोकादायक श्वावपदाचे अस्तित्व जाणणे प्राणिमात्राच्या जीवन-मरणाच्या दृष्टीने महत्त्वाचेच आहे. हा गुणधर्म सर्व प्राण्यांत दिसतो व मानवातदेखील उतरलेला आहे. झोप येण्यापूर्वी जांभया येऊ लागतात. ही क्रिया अनैच्छिक प्रतिक्षिप्त असते. कंटाळा येणे ही मानसिक प्रक्रिया झोप येणे या शारीरिक क्रियेशी संबंधित आहे.

    ज्या वातावरणात मन रमू शकत नाही (कंटाळवाणे व्याख्यान) तेव्हा मनाला तेथून दूर जावेसे वाटते. पण सांस्कृतिक आणि इतर कारणांनी शरीर तेव्हा दूर जाऊ शकत नसले तर मन त्या वातावरणातून दूर एखाद्या कोषात गेल्याप्रमाणे लक्ष काढून घेते. म्हणजेच मनाची झोप सुरू होते. मानवी भावना संसर्गजन्य असतात. एखादी व्यक्ती घाबरली तरी आजूबाजूच्या व्यक्ती भयभीत होतात. एखादी व्यक्ती हसू लागली की सोबतच्या माणसांनाही हसू फुटते. त्याचप्रमाणे जांभया देणाऱ्या व्यक्तीच्या सान्निध्यात असणाऱ्या जांभया येऊ लागतात. क्वचितच जांभया येणे हे एखाद्या मेंदूच्या विकाराचे लक्षण असते. फेफरे (epileptic fit) येणाऱ्या रुग्णाला फिट येण्यापूर्वी जांभया येऊ लागणे शक्या असते. मेंदू-ज्वर या आजारातदेखील रुग्णाला सारख्या जांभया येतात. अफू हा एक मादक पदार्थ आहे. त्याचे नियमाने सेवन करणाऱ्या व्यक्तीला अफूचे व्यसन लागते. अशा व्यक्तीला अफू मिळाली नाही किंवा मादक पदार्थांचे परिणाम नष्ट करण्याची औषधे दिली तर सतत जांभया येऊ लागतात. जांभई येणे हा जरी वैश्विणक अनुभव असला तरी त्याबद्दल संपूर्ण शास्त्रशुद्ध माहिती अजून मिळालेली नाही. व्यवहारात असे दिसते की कोणत्याही कारणाने रात्री झोप न मिळाल्यास दिवसा सारख्या जांभया येतात.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- डॉ. ह. वि. सरदेसाई