वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
सर्व साधारणपणे ताक हे चवीला गोड,तुरट,आंबट,पचायलाहल्के,
कफवातनाशक ,शरीर बल वाढविणारे,संडास घट्ट करणारे,भुक वाढविणारे व हृदयाला हितकर आहे.
पण प्रत्येक पशूच्या दुधापासून बनविलेल्या ताकाचे गुणधर्म हे वेगळे असतात त्यामुळे काही जनावरांच्या दुधापासून तयार केलेल्या ताकाचे गुणधर्म आता आपण पाहूया:
१)गाईचे ताक:
भुक वाढविणारे,बुद्धिवर्धक,मुळव्याधीत गुणकारी,त्रिदोषनाशक आहे.
२)म्हशीचे ताक:
दाट,कफकर,सूज उत्पन्न करणारे किंवा असल्यास वाढविते,पचायला जड आहे.
३)शेळीचे ताक:
अतिशयस्निग्ध,पचायलाहल्के,त्रिदोषनाशक,
मुळव्याध,पांडुरोग,सुज कमी करणे ह्यात उपयुक्त.
आता ताक कोणत्या दोषामध्ये कोणत्या अनुपाना सोबत घ्यावे ते पाहू:
१)वातविकारात:
आंबट ताक सैंधव घालून प्यावे.
२)पित्तविकारात:
गोड ताक साखर घालून प्यावे.
३)कफविकारात:
लोणी काढलेले ताक सुंठ मिरी घालून प्यावे.
(क्रमश:)
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:
९९६०६९९७०४
आयुर्वेद समजून घेताना
विशाल आयुर्वेद समजून घ्यायला, वृत्तीचा दिलदारपणा, चातकाची तहान, मनाचे मोठेपण, देवावर श्रद्धा, गुरूंवर विश्वास, भिकाऱ्याजवळचा निर्लज्जपणा आणि भावना टिपणारे तरूणीचे ह्रदय हवे. हे गुण नसल्यास ते आत्मसात करावे लागतील.तरच आयुर्वेद म्हणजे काय ते समजायला लागेल. कायद्यावर बोट ठेवून आणि महाविद्यालयात शिकून तीन तासात पेपर लिहून, पाच वर्षानी हातात उत्तीर्ण असे प्रशस्तीपत्र मिळाले तरी, आयुर्वेद समजतोच असे नाही.
अभ्यासासाठी ग्रंथकारांनी याचे तीन भाग केलेत. शारीरिक आणि मानसिक आणि आध्यात्मिक. जसा रोग तसे त्याचे कारण. जसे कारण तसे औषधी उपाय योजना करणे, म्हणजे चिकित्सा करणे. रोग जर. शारीरिक कारणामुळे झाला असेल, तर उपाय देखील शरीरावर हवा, तिथे आश्वासन देऊन किंवा मानस चिकित्सा करून फरक पडणार नाही. जसे, पायात काटा गेलाय तर उपाय त्याच पायावर, तिथेच, करायला हवा, ज्या पायात काटा घुसलाय. इथे मंत्र म्हणून काटा बाहेर येणार नाही.
पायात काटा गेलाय असे सारखे वाटत रहाणे, तपासण्या केल्या तरी त्यात काहीही व्रण किंवा काटा न दिसणे अशा लक्षणामधे मानसोपचारच उपयोगी पडणारा असतो जो, शंका या रोगाचे समाधान करतो.
आणि सतत एकाच पायात, एकाच ठिकाणी, एकाच कारणानी, वारंवार काटा टोचणे आणि व्रण बरा न होणे, आणि याची सकृतदर्शनी कोणतेही कारणे लक्षात न येणे, यासारखी लक्षणे ही रोगाचे मुळ आत्मदोषापर्यंत नेऊन पोचवतात.
भुवया उंचावून बघण्याची गरज नाही. हो. हा आत्मदोष जागतिक आरोग्य संघटनेनेसुद्धा मान्य केला आहे. आज अंधश्रद्धा निर्मूलनसारख्या काही संघटनांच्या विरोधामुळे व्हावे तसे संशोधन या विषयावर होत नाही, ही खंत जरूर आहे. असे होऊ नये, आमचे शास्त्र लेबल बदलून, भाषा बदलून, 'त्यांना' ( म्हणजे पाश्चात्य लोकांना ) हवे तसे अर्थ काढून, आम्हालाच शिकावे लागणार आहे. वेदांचे पण तेच झाले आहे. मॅक्समुल्लरला समजलेला भारताचा इतिहास आज आम्हाला शिकावा लागत आहे. जो अतिशय चुकीचे अर्थ शिकवतो.
शुद्धिकरण मुळापासूनच भारतीय मानसिकतेचा, भावनांचा विचार करून व्हायला हवे. केवळ शब्दाला प्रतिशब्द देणे म्हणजे वेदांचे प्रतिसंस्करण नव्हे. हे आयुर्वेद शिकताना लक्षात घ्यायला हवे.
ही मानसिकता झाल्यावरच आयुर्वेदाचा श्रीगणेशा आरंभ होईल.
आयुर्वेद समजून घ्यायला ती विशिष्ट दृष्टी हवी. जसं भगवान श्रीकृष्णांचे विराट रूप बघण्यासाठी अर्जुनाची सामान्य दृष्टी बदलून, वेगळी विशाल दृष्टी होणे आवश्यक होते, तसे आहे. भगवंत गीतेमधे हेच सांगत आहेत. मोक्ष समजून घ्यायला, कर्तेपण लयाला जायला, मी कोण हे शोधताना ती वेगळी विशाल दृष्टी आवश्यक आहे.
भगवंताची कृपा झाल्यावर संजयाला आणि अर्जुनाला ती दृष्टी प्राप्त झाली. आपण सारे अर्जुन आहोत, या भावनेने जर भगवंताकडे ती दृष्टी मागितली तर तो निश्चितच ती दृष्टी देतो. फक्त भाव अर्जुनाचा हवा.
........आणि भक्तीदेखील !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
13.02.2017
आयुषोवेदः आयुर्वेदः
आयु विषयी ज्यात सर्व ज्ञान मिळते ते शास्त्र.
आयुर्वेद म्हणजे जीवन जगण्याचे शास्त्र.
याचाच अर्थ मृत्युविषयीचे संपूर्ण ज्ञान.
आपापल्या कर्मफलानुसार, त्याने नेमून दिलेले ( नियत) आयुष्य जगता यावे, या वेळेअगोदर मृत्यु येऊ नये, यासाठी कोणते नियम आहेत, ते जाणून घेण्यासाठी आयुर्वेद शिकावा.
जगण्यातले हे अडथळे दूर करण्यासाठी हे अडथळे ओळखता येणे महत्वाचे. यातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे रोग.
हे रोग होऊ नयेत यासाठी स्वस्थवृत्त आणि रोग झाल्यानंतर रोगापासून पूर्ण मुक्ती मिळवणे यासाठी व्याधीमोक्ष असे दोन प्रमुख अभ्यासाचे विषय आहेत. याची योग्य सांगड घालता आली पाहिजे.
या आरोग्यटीप लिहिण्याचे कारणच हे आहे, की सर्वांना हे स्वस्थवृत्त आणि व्याधीमोक्ष समजून द्यावे.
जगण्याचे छोटे छोटे नियम सांगणाऱ्या आरोग्यटीपा म्हणजे स्वस्थवृत्त.
आणि ज्याला त्याला झटपट उपाय हवा असतो. त्यांना जे घरगुती आरोग्य सल्ले दिले जातात, ते व्याधीमोक्ष. ( घरगुती सल्ले म्हणजे परिपूर्ण आयुर्वेद नव्हे हो, उगाच शब्दांचा छळ करू नका. )
नळाला पाणी खराब येते याचे कारण न शोधता, नळच बदलून बघूया असा सल्ला देणारे, आजचे अजब पाश्चात्य वैद्यकीय तंत्र.
हो आणखीन एक मोठ्ठा गैरसमज. आरोग्यटीपेमधे पाश्चात्य तंत्रज्ञानाला, त्यांच्या संशोधक वृत्तीला, काहीही किंमत नाही. असे पण नाही. जे योग्य आहे ते योग्यच ! पण जर आपले मूळ भारतीय आरोग्य शास्त्रच या पाश्चात्य विचाराने घराबाहेर काढले जात असेल आणि जाणीवपूर्वक बदनाम केले जात असेल तर
यात कोण चुक कोण बरोबर असा प्रश्नच नसतो. प्रत्येक जण आपल्या जागी योग्यच असतो. फक्त एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला की सर्वच विकृत आणि चुकीचे दिसू लागते.
आयुर्वेद हे थोतांड आहे. शास्त्रच नाही. फक्त पाळेमुळे. अंधश्रद्धा !
आयुर्वेद हा कुठलाही आजार बरा करू शकत नाही. इन्स्टंट तर नाहीच नाही. ह्यात फक्त दिनचर्या चांगली समजून सांगितली आहे. बाकी सगळं फेकू.
असा सूर येण्यामागे प्रचंड मोठे गैरसमज आहेत. एकतर पूर्वग्रह दूषित असणार किंवा आयुर्वेदात काय सांगितले आहे ह्याचा अभ्यास नसणार किंवा कुणीतरी चुकीच्या पद्धतीने आयुर्वेद समजून घेतला असणार किंवा गुरूविना ज्ञान घेण्याचा प्रयत्न झाला असणार किंवा आयुर्वेदाने यांव होते, त्यांव होते, दहा मिनीटात दमा जातो, पंथरा मिनीटात कॅन्सर गायब, असले काहीतरी 'टाॅल क्लेम' करणारे तथाकथित कुणाला तरी भेटले असणार ! स्वयंघोषीत वैद्यांची काही कमी नाही. जे पारंपारिक वैदू औषधे देतात, त्यांना शरीरशास्त्र माहिती नाही, जे योगतज्ज्ञ आहेत त्यांना औषधांची माहिती नाही. जे डाएटिशीयन आहेत, त्यांच्याकडे फक्त पुस्तकी ज्ञान.
जिच्याकडे अनुभवाचा बटवा आहे, तीला पाठवली वृध्दाश्रमात, ज्यांच्याकडे आयुर्वेदाची पदवी आहे, त्यांना अनुभव नाही.
उरलेल्या सगळ्यांकडे आहे फक्त अहंकार. मी सांगतोय तेवढंच बरोबर. बाकी सब झुठ.
आणि सगळ्यांना हवे आहे, जमाने के साथ चलनेवाला इन्स्टंट !
या सर्वांच्यात कडबोळ झालंय आयुर्वेदाचं !
कुणीही यावे, टिचकी मारून जावे,
काहीही सांगावे, काहीही बोलावे,
मनमानी लिहावे, वाॅटसप करावे,
अतिशहाणे करूनी सोडावे
सकल जन.
असं झालंय सगळं.
यामुळे गैरसमज वाढतात.
पूर्ण ग्रंथ वाचल्यावीण
उगाच ठेवी जो दूषण
तो दुरात्मा दूराभिमान
मत्सरे करी । असं समर्थांनी उगाच नाही सांगितलेलं.
आयुर्वेदाला बदनाम करण्यामधे हा झटपट दृष्टीकोन कारणीभूत आहे.
गरज आहे फक्त दृष्टीकोन बदलण्याची.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
12.02.2017
चरबी वाढणे, कोलेस्टेरॉल वाढणे आणि त्यातून उद्भवू शकणारा हृदयविकार- हा संबंध सर्वानाच माहिती असतो. परंतु कोलेस्टेरॉल वाढणे केवळ आहाराशीच संबंधित नाही. कोलेस्टेरॉल शरीरात नेमके काय करते, चांगले आणि वाईट कोलेस्टेरॉलचे कोडे काय आहे आणि वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी मानसिक स्वास्थ्य, संतुलित आहार व व्यायाम ही त्रीसूत्रीच कशी उपयोगी ठरते. आपल्या शरीरामधील जैवरासायनिक प्रक्रियांमधूनच कोलेस्टेरॉलची निर्मिती होते. रक्तामधील साखरेपासून बहुतांशी कोलेस्टेरॉल बनते. कोलेस्टेरॉलपासून अत्यंत महत्त्वाच्या संप्रेरकांची निर्मिती होत असते. म्हणूनच या गटामधील ‘हॉर्मोन्स’ना ‘स्टेरॉइड्स’ म्हणून संबोधले जाते. या स्टेरॉइड हॉर्मोन्समध्ेय टेस्टॉस्टेरोन, प्रोगेस्टेटोन, अल्डोस्टेरॉन, इस्ट्राडीऑल आणि कॉर्टिसॉल या हॉर्मोन्सचा समावेश होतो. शरीराच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या हॉर्मोन्सची निर्मिती कोलेस्टेरॉलपासून होत असल्यामुळे हा पदार्थ म्हणजे काही घातक, विषारी अथवा टाकाऊ नाही.
कोलेस्टेरॉलचे ढोबळ मानाने दोन प्रकार आहेत. हलके कोलेस्टेरॉल म्हणजे ‘एल.डी.एल.’ या कोलेस्टेरॉलचे रक्तातील प्रमाण वाढल्यास रक्त वाहिन्यांवर पुटे चढल्यामुळे त्या अरुंद होऊन उच्च रक्त दाब आणि हृदयविकाराचा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणूनच याला ‘बॅड कोलेस्टेरॉल’ म्हणतात. जड कोलेस्टेरॉल म्हणजे एच.डी.एल. हे हलक्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करून रक्त वाहिन्यांवर थर बसवण्याच्या प्रक्रियेमध्ये खीळ घालते. म्हणून त्याला ‘गुड कोलेस्टेरॉल’ म्हटले जाते. वाईट कोलेस्टेरॉलचे वाढलेले प्रमाण कमी केले तर हृदयविकारापासून प्रतिबंध होतो. म्हणूनच ‘स्टॅटिन’ प्रकारात मोडणारी औषधे खूप लोकप्रिय आहेत. आहारातील स्निघ्ध पदार्थाचे प्रमाण २५ टक्क्य़ांपेक्षा जास्त नसेल तर शरीरातील कोलेस्टेरॉलच्या प्रमाणावर विपरीत परिणाम होत नाही. सोयाबीन तेल वापरावे की शेंगदाणा तेल, खोबरेल तेल वापरावे की ऑलिव्ह तेल या संभ्रमाचा खरे तर रक्तामधील कोलेस्टेरॉलच्या प्रमाणाशी फारसा संबंध नाही. चरबीयुक्त मांसाहार टाळणे व तळलेल्या पदार्थाचे प्रमाण कमी करणे हे निश्चितपणे आरोग्यदायी असले तरीही आहार व कोलेस्टेरॉल यांचा संबंध मर्यादित आहे.
रक्तामधील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढण्यात आहारापेक्षा आपल्या शरीरामधील जैवरासायनिक प्रक्रियांचा वाटा मोठा आहे. डॉ. हेगडे यांच्या मते अगदी गवत खाऊन राहिले तरी दहा टक्क्य़ांपेक्षा कोलेस्टेरॉल कमी होणार नाही. कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी संतुलित आहार, व्यायाम आणि आरोग्यदायी जीवनशैली या सगळ्याची आवश्यकता आहे. आहारामध्ये मोठे बदल करून किंवा औषधांनी कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करून जर हृदयविकाराच्या धोक्यावर फार मोठे दूरगामी फायदे दिसत नसतील तर काय करावे, या प्रश्नाचे उत्तर आपल्या मनामध्ये मिळते. मानसिक शांतता आणि कोलेस्टेरॉल यांचा जवळचा संबंध आहे. कॉर्टीसॉल हे हॉर्मोन कोलेस्टेरॉलपासून बनते. कॉर्टीसॉल आणि मानसिक ताण यांचा जवळचा संबंध असतो. तणावाखाली असलेल्या मेंदूकडून पिटय़ुटरी ग्रंथींना संदेश जातो आणि नंतर अॅडरेनल ग्रंथींना कॉर्टीसॉल तयार करण्याचा संदेश मिळतो. मात्र अधिक कॉर्टीसॉलमुळे मानसिक ताण वाढतो की वाढलेल्या तणावामुळे कॉर्टीसॉलची निर्मिती होते, हे कोडे ‘आधी कोंबडी की आधी अंडे’ याप्रमाणेच आहे! परंतु उत्तम मानसिक स्वास्थ्य, संतुलित आहार व व्यायाम या त्रीसूत्रीमध्येच कोलेस्टेरॉल संतुलनाची गुरुकिल्ली आहे, हे मात्र निश्चित!
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
यकृत हे आपल्या शरीरातील वर्कहाऊस आहे. ते अन्नातील चरबी आणि कर्बोदकांना पचण्यायोग्य बनवते. हे एक नैसर्गिक फिल्टर आहे. यकृत शरीरातील विषारी घटकांना बाहेर काढून टाकण्याचे काम करते. शरीराला आवश्यक प्रथिने इथे तयार केली जातात आणि पचनक्रियेसाठी आवश्यक असणारा पित्तस्रावदेखील यकृतामधूनच स्रवतो. यकृताची अशी अनेक कामे असतात, म्हणूनच यकृतामधील बिघाडामुळे अनेक समस्या निर्माण होतात.
खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळेही यकृताला इजा पोहोचू शकते. यकृताशी संबंधित समस्या : यकृताच्या समस्या या पाच प्रकारच्या असतात. त्यांना ए, बी, सी, डी आणि ई अशा नावांनी ओळखले जाते. ए आणि ई यांना सामान्य भाषेत जॉन्डिस किंवा कावीळ या नावाने ओळखले जाते. दूषित पाण्यामुळे कावीळ होते. बी, सी आणि डी हे प्रकार संसर्गामुळे होऊ शकतात. यामुळे यकृतावर गंभीर परिणाम होऊ शकतात. वेळीच लक्षणे ओळखली नाही तर यकृत निकामी होण्याची शक्यता असते. याला क्रॉनिक हिपॅटायटिस म्हटले जाते. शिवाय ऑटोइम्युन डिसॉर्डर आहे, जो विशेषतः स्त्रियांमध्ये आढळतो.
कावीळ, यकृताचा कॅन्सर आणि हिपॅटायटिस हे यकृताशी संबंधित आजार आहेत. यकृताच्या समस्या ह्या बहुतांश अस्वच्छतेमुळेच उद्भवतात. हिपॅटायटिस ए आणि ई हे दूषित पाणी आणि अस्वच्छ अन्नामुळे होतात. हिपॅटायटिस बी, सी व डी हे असुरक्षित लैंगिक संबंध आणि संक्रमित रक्ताद्वारे होतो. जास्त मद्यपान यकृत आणि स्वादूपिंडाला इजा पोहोचवते. एकदा त्रास होऊनही मद्यपान बंद न केल्यास यकृत प्रत्यारोपणाची वेळ येऊ शकते.
या लक्षणांकडे बघा
* त्वचा, नखे आणि डोळे पिवळे होणेे. पित्ताचे प्रमाण वाढल्याने अशी लक्षणे दिसून येतात. कधीकधी लघवी पिवळी होणे.
* यकृत खराब झाल्याने पित्त उचंबळून तोंडात येऊ शकते. ज्यामुळे तोंड कडवट राहते.
* सतत भीती वाटणे आणि उलटी होणे. शरीरातील पित्त वाढल्याने अशी लक्षणे दिसून येतात.
* पोटामध्ये सूज येणे आणि सतत जडपणा राहणे.
* सतत गोंधळलेल्या अवस्थेत राहणे आणि वस्तू विसरणे.
* दारूच नव्हे तर अधिक मीठदेखील हानीकारक ठरते.
* मीठामुळे केवळ उच्च रक्तदाबाचा त्रास होतो, असे नव्हे. यामुळे यकृतालाही इजा पोहोचू शकते. यूएसमध्ये उंदरांवर केलेल्या एका प्रयोगानुसार मीठाच्या अतिसेवनामुळे यकृतामध्ये काही बदल झाल्याचे आढळून आले. पेशींचा प्रसार न होणे यासारखे परिणाम दिसून आले. मीठाच्या अतिरिक्त सेवनामुळे पेशींची निर्मिती होताच त्या नष्ट होतात. यातूनच लिवर फायब्रोसिस यासारखी समस्या निर्माण होते. मीठाच्या अतिरिक्त परिणामांना कमी करण्यासाठी क जीवनसत्त्वाचे भरपूर सेवन करण्यावर भर द्यायला हवा.
स्थूलपणाची समस्या मिलान विद्यापीठामध्ये 323 रुग्णांवर केलेल्या संशोधनानुसार असे आढळून आले की ज्यांच्या शरीराचा खालचा भाग जड असतो, त्यांना नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिवर डिसीजचा त्रास असतो. एनएएफएसडी ही एक अशी स्थिती आहे, ज्यामध्ये यकृताचा आकार वाढतो. ज्या व्यक्तींची कंबर ही 36 ते 40 इंच एवढी होती, त्यांच्यामध्ये फॅटी लिव्हरची समस्या दिसून आली.
जास्त वेळ बसून राहणे : एकाच ठिकाणी तासन्तास बसल्यानेही एनएएफएसडीचा त्रास होऊ शकतो. दक्षिण कोरियामध्ये एकाच ठिकाणी बसून काम करणार्या् 1,40,000 व्यक्तींचे निरीक्षण करण्यात आले. यामध्ये 40,000 व्यक्तींना लिव्हरचा त्रास होता. ब्रिटनच्या युकेमध्ये न्यू कॅस्ले विद्यापीठातील प्राध्यापक मायकल आय टर्नेल यांच्या मते आपल्या शरीराची ठेवणच अशी आहे की, शरीर निरोगी राहण्यासाठी त्याला सक्रिय ठेवणे गरजेचे आहे. आपल्या हालचाली मर्यादित असतील तर यकृताचा त्रास हमखास उद्भवणार.
जीवनशैली सुधारा : मद्यपान टाळा. नियमित मद्यपान करणार्याह एक चतुर्थांश लोकांना यकृताची समस्या भेडसावते. धूम्रपानामुळेही हा त्रास उद्भवू शकतो.
* मनाने औषधे घेणे टाळा. चुकीच्या औषधांचा यकृतावर वाईट परिणाम होतो. स्वतःहून आयबुप्रोफेन, अॅळस्परिन यासारखी औषधे घेणे टाळा.
* स्थुलतेमुळे फॅटी लिव्हरची समस्या उद्भवू शकते. वजनावर नियंत्रण ठेवा. नियमित व्यायाम करा आणि स्थूलता वाढेल, असा आहार वर्ज्य करा.
* अतिप्रमाणात मीठ आणि साखरेचे सेवन करणे टाळा.
* ३५ वर्षांनंतर एकदा यकृताची तपासणी करून घेणे फायद्याचे ठरू शकते. यकृतामध्ये एलानाईन आणि एस्पारटेट यांसारखी एंझाइम्सचा स्तर वाढणे धोक्याचे ठरू शकते.
* हिपॅटायटिस ए आणि बीच्या औषधांची पूर्ण मात्रा घ्या. हिपॅटायटिस सी आणि ई वरील औषधे अजून उपलब्ध नाहीत. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.
निरोगी यकृतासाठी योग्य आहार
यकृतामध्ये साचलेल्या मेदामुळे आतड्यांच्या आजारांचाही धोका वाढतो. शरीरातील विषद्रव्ये बाहेर फेकण्यासाठी योग्य आहार घेणे गरजेचे आहे. निरोगी यकृतासाठी आहारामध्ये ब आणि क जीवनसत्त्वयुक्त पदार्थांचा समावेश असणे अत्यंत गरजेचे आहे.
* शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर फेकण्यासाठी प्रोबायोटिक्सची जास्त मदत होते. मध, दही, योगर्ट यांसारख्या पदार्थांचा आहारात जरूर समावेश असावा. बाजारामध्ये प्रोबायोटिक्सयुक्त ब्रेड, दूध आणि दही तसेच सप्लिमेंट्सदेखील मिळतात.
* ब आणि क जीवनसत्त्वयुक्त पदार्थांचे सेवन वाढवा. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. शरीरावर विषद्रव्यांचा होणारा परिणामही कमी होतो. ब जीवनसत्त्व यकृताला सदृढ ठेवते.
* सकाळच्या नाष्ट्यामध्ये स्थूलता वाढवणारे पदार्थ खाणे टाळा आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा.
* मोड आलेल्या कडधान्यांचा आहारामध्ये समावेश करावा.
* कच्ची फळे व भाज्या खाल्ल्याने यकृताला चांगला फायदा होतो. विशेषतः हिरवे, नारंगी, पिवळे, जांभळे आणि लाल रंगांची फळे आणि भाज्या खाल्ल्याने फायदा होतो. गाजर, मुळा, चाकवत या भाज्या यकृतासाठी चांगल्या असतात.
* भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, नारळ पाणी, बेल सरबत आणि ज्यूस या पेयांचे सेवन करायला हवे. अशा पेयांमुळे यकृताची ताकद वाढते.
* यकृतामध्ये तयार होणार्याि पित्तावर नियंत्रण ठेवण्यासाठी जास्तीत जास्त कडवट चवीची पाने खाल्ली पाहिजेत. भाज्यांचे सॅलड खाऊ शकता. कारल्यामुळेही फायदा होतो.
* मासे, शेंगदाणे, सूर्यफूल, बदाम, तीळ इत्यांदीचा आहारामध्ये समावेश करा. सीताफळाच्या बिया, फळभाज्या, वाटाणे, डाळ आणि कडधान्ये यांचे आहारातील प्रमाण वाढवा.
* दररोज 5-6 ग्रॅम बडिशेप खा.
* हळदीमुळे शरीरातील विषद्रव्ये वाढवणार्याप पदार्थांचा प्रभाव कमी करण्यास मदत होते.
* काळी मिरी खाल्ल्याने अॅरसिडिटीचा त्रास कमी होतो. अॅरसिडिटीमुळे यकृतावर वाईट परिणाम होतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.डॉ. रामदास जाधव
अमुक रोगावर आयुर्वेदात काही सांगितले आहे काहो ?
नवीन नवीन रोगावर जुन्या आयुर्वेदातील औषधे कशी लागू पडतील ?
ही चौदा प्रकारची औषधे डाॅक्टरनी कायमचीच घ्यायला सांगितली आहेत. त्या औषधांबरोबर आयुर्वेदातील औषधी चालतील का ?
एखादे कायमचे घेण्यासाठी औषध सांगा हो वैद्यराज !
केमोचे साईड इफेक्ट टाळण्यासाठी आयुर्वेदात काही आहे का ?
अॅलोपॅथीमधे जसं क्रोसीन आहे तसं आयुर्वेदात काय सांगितले आहे ?
आम्हाला वैद्यांनी सांगितलेले पथ्य आणि औषध घ्यायच्या वेळा पाळता येत नाहीत, ते सोडून आयुर्वेदातील औषधे देऊ शकता का ?
बी काॅम्लेक्ससाठी आयुर्वेदात काय ?
मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करायची नाही तर आयुर्वेदात काही आहे का ?
अशा प्रकारचे असंख्य प्रश्न वैद्य मंडळींना विचारले जात असतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी वैद्याच्या शैक्षणिक आयुष्यातील निम्मी वर्षे फुकट गेलेली असतात. किंबहुना त्यासाठीच पाच वर्षाचा सिलॅबस पूर्ण करायला काहीजणांना सात आठ वर्षे पण द्यावी लागतात.
या एक मिनीटात विचारलेल्या दोन ओळीच्या प्रश्नांची उत्तरे अशी तीन चार ओळीतच कशी देता येणार ? पाच सहा दिवस विचार केल्यानंतर लक्षात येते की उत्तरे द्यायला सात तास तरी लागतील. म्हणजे आठवडा गेला. तोपर्यंत चांगलेच नाकी नऊ आलेले असतात. आणि दहा वेळा प्रश्नांची उत्तरे सांगितली तरी आणखी अकरा जण बारा प्रश्न घेऊन तयार असतात.
आजच एका गटात विचारणा झालीय. "प्रमेहाचे सर्व पंचवीस भाग वाचले. आता साखर नाॅर्मल राहण्यासाठी काय करायचे ते सांगा." म्हणजे लोकांना किती 'इन्स्टंट फाॅर्म्युले ' हवे आहेत ते बघा.
आयुर्वेद हे जीवनाचे शास्त्र आहे. ही विशिष्ट पॅथी नाही. विशिष्ट चौकट आखून त्यात औषधे आणि पथ्य कोंबायची म्हणजे आयुर्वेद नव्हे. असं जर कोणी करत असेल तर त्याला खरंतर आरोग्यच कळलेलं नाही.
समजा आपल्याकडे एखादे मशिन आणलेले आहे. तीन वर्षे वाॅरंटीचे ! काही कारणानी ते मुदतीपूर्वीच बंद पडले.
ते कसे बंद पडले, तेव्हा काय काम करीत होतो, याचे रसभरीत वर्णन ऐकवल्यानंतर तो काय म्हणतो ?
तज्ञाला दाखवल्यानंतर तो म्हणतो,
"अहो, या मशिन बरोबरचे हे 'लिफलेट' वाचले नाहीत का ? त्यावर हे बघा, स्पष्ट शब्दात लिहिले आहे, हे मशीन कसे वापरायचे ते ! तुम्ही हे मशीन तस्से वापरलेले नाही. सबब तुम्हाला या मशीनची 'वाॅरंटी' लागू होत नाही. "
आपण कपाळावर हात मारून फक्त "ओऽहोऽऽ" एवढंच म्हणू शकतो. म्हणतो. कारण तेवढंच आपल्या हातात असते. आणि ते 'लिफलेट' वाचायची वेळ निघून गेलेली असते.
जीवनाचं असच होतं. या शरीरासारखे दुसरे यंत्र नाही, असे हे दुर्लभ यंत्र जेव्हा तो शंभर वर्षाच्या वाॅरंटीसह, आपल्या हातात देतो, तेव्हाच एक 'लिफलेट' त्याने या यंत्राला जोडून पाठवलेले असते. हाऊ टु युज इट. लिहिलेलं असतं त्यावर !
पण आम्हाला हे 'लिफलेट' वाचून बघण्याची तसदी घ्यावी असे सुद्धा वाटत नाही. जेव्हा मशीन बंद पडते, तेव्हा हे मशीन का बंद पडले, कसे बंद पडले, कधी बंद पडले, हे शोधण्यासाठी, 'लिफलेट' शोधायची धावाधाव सुरू होते.
पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.
असे होऊ नये......
या 'लिफलेटचे' नाव आहे.
" आयुर्वेद "
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021
11.02.2017
लहानपणी विविध भारती , बिनाका गीतमाला व आज च्या पिढीला विविध एफ.एम. स्टेशन्स द्वारे मनोरंजन करणारा.. एकमेव अद्वितीय - रेडिओ
आपल्या लहानपणी रेडिओ हेच मनोरंजनाचे साधन होते. पण त्याचा उपयोग मनोरंजनापेक्षा घडय़ाळासारखा जास्त व्हायचा. मंगल प्रभात सुरू झाली की चला उठा आता.. वाजले किती बघा.. कामगार सभेची स्वरावली वाजली की अगं बाई.. उशीर झाला.. अजून भात व्हायचाय.. असे आवाज स्वैपाकघरातून यायचे.. वनिता मंडळ सुरू झालं की पेपर किंवा एखादं मासिक घेऊन घरातली गृहिणी जराशी कलंडत असे. मग संध्याकाळी बातम्यांच्या रूक्ष आवाजाच्या साथीने ‘परवचा’, रात्रीच्या ‘आपली आवड’च्या संगतीने डोळे मिटायचे. जरा जास्त शौकीन असलेला माणूस रेडिओ सिलोन, बिनाका गीतमाला, विविध भारती वगैरे सापडतंय का हे खुंटय़ा पिळून पहात असत. तेव्हाचे रेडिओही आवाजापेक्षा खरखराट करणारेच बनविले जात की काय कोण जाणे. पण तरीही तो ऐकायचा.. कारण रेडिओ टाईम कळला पाहिजे. मग दूरदर्शनच्या आगमनाने रेडिओ मागे पडला. समोर चित्रं पहायला मिळत असताना आवाज नुसता कोण ऐकणार. पण आता एफएमच्या आगमनानंतर रेडिओला जरासा प्राणवायू मिळाला आहे. रेडिओचा शोध १८८५ साली माकरेनी याने लावल्याचे मानले जाते. मात्र त्या आधीपासूनच जगातल्या विविध भागांत विविध बिनतारी प्रक्षेपणाचे प्रयोग सुरू होते. रेडिओचा भारतातला इतिहास तसा जुना आहे. जगदीशचंद्र बोस यांनीही अशाच एका प्रयोगाचे प्रदर्शन कोलकात्यात १८८४ साली केले होते. पुढे या रेडिओ तंत्राचा वापर सैनिकी व इतर कामांसाठी व्हायला लागला. भारतात रेडिओची सुरुवात १९२३ साली रेडिओ क्लब इथे झाली. १९३५ च्या कायद्याने राज्य सरकारांना रेडिओ केंद्रे चालविण्याची परवानगी देण्यात आली होती. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सत्याग्रह, मोर्चे, निदर्शने, चोरून पत्रके छापणे आणि वाटणे याच्यासोबत चोरटे रेडिओ केंद्र चालविणे हाही एक महत्त्वाचा भाग होता. १९४२ च्या चले जाव चळवळीच्या वेळी डॉ. राममनोहर लोहिया यांनी तीन महिने चोरटे रेडिओ केंद्र चालविले होते. इंडियन ब्रॉडकास्टींग कंपनीने मुंबई व कोलकात्यातल्या दोन रेडिओ स्टेशन्सच्या माध्यमातून प्रसारणाला सुरुवात केली होती. पुढे ही कंपनी दिवाळखोरीत गेली व रेडिओ प्रसारण सरकारने आपल्या ताब्यात घेतले. १९३६ साली त्याला ‘ऑल इंडिया रेडिओ’ हे नाव मिळाले. भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावर्षी भारतात केवळ सहाच रेडिओ स्टेशन्स होती. ‘ऑल इंडिया रेडिओ’ला ‘आकाशवाणी’ हे नाव म्हैसूरच्या एम. व्ही. गोपालस्वामी यांनी दिले. स्वातंत्र्यानंतर भारतात रेडिओची मोठी भरभराट झाली. विविध भारतीने रेडिओवरच्या मनोरंजनाला एक वेगळी उंची बहाल केली. ‘हवामहल’, ‘सितारों की महफिल’ एकाहून एक सरस गाणी, कार्यक्रम, शास्त्रीय संगीत यामुळे ‘आकाशवाणी’ अल्पावधीतच लोकप्रिय झाली. टीव्हीच्या आगमनानंतर आकाशवाणीची पीछेहाट सुरू झाली. १९८२ साली भारतात रंगीत दूरचित्रवाणी संच आले व रेडिओ मागे पडला. रेडिओतल्या बदलाबरोबरच रेडिओ संचातही अनेक बदल झाले. सुरुवातीच्या काळात केवळ काही नळ्या व वायरच्या माध्यमांतून हे रेडिओ सेट तयार केले जात असत. पुढे लाकडाच्या कॅबिनेटच्या आकाराचे रेडिओ सेट आले. बॅकेलाइट म्हणजे सुरुवातीच्या काळातल्या प्लॅस्टिकचा शोध लागल्यानंतर मग रेडिओ तयार करण्यात त्याचा वापर होऊ लागला. १९५० नंतर प्लॅस्टिकचा वापर करून वेगवेगळ्या रंगांचे रेडिओ संच तयार करायला सुरुवात झाली. १९५४ साली लहान रेडिओ संचाचा म्हणजे ट्रान्झिस्टरचा उदय झाला. हे ट्रान्झिस्टर फारच महाग असत. त्यानंतर मात्र अगदी वेगवेगळ्या पद्धतीचे लहान-मोठे रेडिओ तयार होत गेले. लहान आकाराचे रेडिओ मोठय़ा प्रमाणात क्रिकेटचे धावते वर्णन ऐकायला वापरले जाऊ लागले. त्यानंतर केवळ हेडफोनच्या आकाराचे रेडिओ आले. चीनी बनावटीचे आयपॉडच्या आकाराचे रेडिओही आले. सध्या मोबाइलमध्ये उपलब्ध असलेल्या रेडिओंमुळे एक नवीनच क्रांती झाली आहे. १९७७ साली भारतात एफएम रेडिओचे तंत्रज्ञान आले व आकाशवाणीची लोकप्रियता पुन्हा वाढू लागली. सध्या आकाशवाणीच्या अनेक रेडिओ स्टेशन्सबरोबरच खाजगी रेडिओ वाहिन्याही आपल्या कार्यक्रमाचे प्रसारण करत आहेत. खाजगी एफएम वाहिन्यांची सुरुवात १९७७ साली मद्रासपासून झाली. त्यानंतर गोवा राज्यात काही खाजगी रेडिओ वाहिन्यांना परवाने मिळाले. सध्या भारतातल्या ७२ शहरांमध्ये खाजगी एफएम वाहिन्या कार्यरत आहेत. भारतात रेडिओ स्टेशन्स दोन पातळीवर चालतात. आकाशवाणीकडे मनोरंजन कार्यक्रम व वृत्तविषयक कार्यक्रम असे दोन भाग आहेत. तर खाजगी वाहिन्या केवळ मनोरंजनाचेच कार्यक्रम प्रसारित करतात. त्यांना सरकारने अद्याप बातम्या प्रसारित करण्याचे अधिकार दिले नाहीत. त्यांना केवळ आकाशवाणीच्या बातम्या पुन:प्रसारित करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. आकाशवाणीच्या एफएम रेन्बो व गोल्ड या माध्यमातून प्रसारण केले जाते. आकाशवाणीचा वृत्तविभाग हा बातम्यांच्या क्षेत्रातला अग्रेसर विभाग समजण्यात येतो. बातम्यांची सत्यता हे त्यांचे शक्तिस्थळ बनून राहिले आहे. आकाशवाणीच्या मनोरंजनाचा भर हा अधिक प्रमाणात केवळ गाण्यांवर असतो. तरीही श्रुतिका, नभोनाटय, विविध चर्चा, क्रीडाविषयक कार्यक्रम, धावते समालोचन याद्वारेही श्रोत्यांचे मनोरंजन केले जाते. फोन इन सारख्या कार्यक्रमांमुळे आता श्रोत्यांचा सहभागही वाढला आहे. खाजगी वाहिन्याही गीतांबरोबरच इतर कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्या श्रोत्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतात. त्यातही शहरातल्या ट्रॅफिकची माहिती देणे, काही स्वयंसेवी संस्थांच्या कार्याविषयीची माहिती देणे अशा माध्यमातून ते आपला व्यवसाय जपत असलेले दिसतात. महाराष्ट्रात मुंबई-पुण्याबरोबरच इतर ठिकाणी खाजगी वाहिन्या चांगलीच लोकप्रियता मिळवत आहेत. स्थानिक कार्यक्रम व त्या त्या भागात वापरण्यात येणा-या विविध उत्पादनांसाठीच्या जाहिराती, शेतीविषयक उत्पादनांच्या जाहिरातींचाही समावेश आहे. आज ही रेडिओ हे प्रभावी माध्यम समजले जाते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
चरबी वाढणे, कोलेस्टेरॉल वाढणे आणि त्यातून उद्भवू शकणारा हृदयविकार- हा संबंध सर्वानाच माहिती असतो. परंतु कोलेस्टेरॉल वाढणे केवळ आहाराशीच संबंधित नाही. कोलेस्टेरॉल शरीरात नेमके काय करते, चांगले आणि वाईट कोलेस्टेरॉलचे कोडे काय आहे आणि वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी मानसिक स्वास्थ्य, संतुलित आहार व व्यायाम ही त्रीसूत्रीच कशी उपयोगी ठरते. आपल्या शरीरामधील जैवरासायनिक प्रक्रियांमधूनच कोलेस्टेरॉलची निर्मिती होते. रक्तामधील साखरेपासून बहुतांशी कोलेस्टेरॉल बनते. कोलेस्टेरॉलपासून अत्यंत महत्त्वाच्या संप्रेरकांची निर्मिती होत असते. म्हणूनच या गटामधील ‘हॉर्मोन्स’ना ‘स्टेरॉइड्स’ म्हणून संबोधले जाते. या स्टेरॉइड हॉर्मोन्समध्ेय टेस्टॉस्टेरोन, प्रोगेस्टेटोन, अल्डोस्टेरॉन, इस्ट्राडीऑल आणि कॉर्टिसॉल या हॉर्मोन्सचा समावेश होतो. शरीराच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या हॉर्मोन्सची निर्मिती कोलेस्टेरॉलपासून होत असल्यामुळे हा पदार्थ म्हणजे काही घातक, विषारी अथवा टाकाऊ नाही.
कोलेस्टेरॉलचे ढोबळ मानाने दोन प्रकार आहेत. हलके कोलेस्टेरॉल म्हणजे ‘एल.डी.एल.’ या कोलेस्टेरॉलचे रक्तातील प्रमाण वाढल्यास रक्त वाहिन्यांवर पुटे चढल्यामुळे त्या अरुंद होऊन उच्च रक्त दाब आणि हृदयविकाराचा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणूनच याला ‘बॅड कोलेस्टेरॉल’ म्हणतात. जड कोलेस्टेरॉल म्हणजे एच.डी.एल. हे हलक्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करून रक्त वाहिन्यांवर थर बसवण्याच्या प्रक्रियेमध्ये खीळ घालते. म्हणून त्याला ‘गुड कोलेस्टेरॉल’ म्हटले जाते. वाईट कोलेस्टेरॉलचे वाढलेले प्रमाण कमी केले तर हृदयविकारापासून प्रतिबंध होतो. म्हणूनच ‘स्टॅटिन’ प्रकारात मोडणारी औषधे खूप लोकप्रिय आहेत. आहारातील स्निघ्ध पदार्थाचे प्रमाण २५ टक्क्य़ांपेक्षा जास्त नसेल तर शरीरातील कोलेस्टेरॉलच्या प्रमाणावर विपरीत परिणाम होत नाही. सोयाबीन तेल वापरावे की शेंगदाणा तेल, खोबरेल तेल वापरावे की ऑलिव्ह तेल या संभ्रमाचा खरे तर रक्तामधील कोलेस्टेरॉलच्या प्रमाणाशी फारसा संबंध नाही. चरबीयुक्त मांसाहार टाळणे व तळलेल्या पदार्थाचे प्रमाण कमी करणे हे निश्चितपणे आरोग्यदायी असले तरीही आहार व कोलेस्टेरॉल यांचा संबंध मर्यादित आहे.
रक्तामधील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढण्यात आहारापेक्षा आपल्या शरीरामधील जैवरासायनिक प्रक्रियांचा वाटा मोठा आहे. डॉ. हेगडे यांच्या मते अगदी गवत खाऊन राहिले तरी दहा टक्क्य़ांपेक्षा कोलेस्टेरॉल कमी होणार नाही. कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी संतुलित आहार, व्यायाम आणि आरोग्यदायी जीवनशैली या सगळ्याची आवश्यकता आहे. आहारामध्ये मोठे बदल करून किंवा औषधांनी कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करून जर हृदयविकाराच्या धोक्यावर फार मोठे दूरगामी फायदे दिसत नसतील तर काय करावे, या प्रश्नाचे उत्तर आपल्या मनामध्ये मिळते. मानसिक शांतता आणि कोलेस्टेरॉल यांचा जवळचा संबंध आहे. कॉर्टीसॉल हे हॉर्मोन कोलेस्टेरॉलपासून बनते. कॉर्टीसॉल आणि मानसिक ताण यांचा जवळचा संबंध असतो. तणावाखाली असलेल्या मेंदूकडून पिटय़ुटरी ग्रंथींना संदेश जातो आणि नंतर अॅडरेनल ग्रंथींना कॉर्टीसॉल तयार करण्याचा संदेश मिळतो. मात्र अधिक कॉर्टीसॉलमुळे मानसिक ताण वाढतो की वाढलेल्या तणावामुळे कॉर्टीसॉलची निर्मिती होते, हे कोडे ‘आधी कोंबडी की आधी अंडे’ याप्रमाणेच आहे! परंतु उत्तम मानसिक स्वास्थ्य, संतुलित आहार व व्यायाम या त्रीसूत्रीमध्येच कोलेस्टेरॉल संतुलनाची गुरुकिल्ली आहे, हे मात्र निश्चित!
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
पंधरा दिवसांपूर्वी एक केरळी ख्रिश्चन जोडपं मला भेटायला आलं होते. निमित्त होतं त्यांच्या १२ वर्षाच्या मुलीची जन्म पत्रिका पाहाणं..!
आता अशा या उच्चभ्रू लोकांनी, त्यातही परधर्मीय, जन्मकुंडली पाहण्यासाठी माझ्याकडे का यावं असा पुरोगामी प्रश्न कुणालाही पडण्यासारखा.
ही घटना सत्य आहे. मुंबईच्या हायकोर्टात मी स्वत: अनुभवलेली आहे. हायकोर्ट व प्रजासत्ताक दिनासंबंधी असल्याने हायकोर्टाचा सन्मान व ‘प्रजे’च्या भावनांना या लेखामुळे अनवधनानं काही धक्का पोहोचल्यास त्याबद्दल आधीच माफी मागून ठेवतो. झालंय काय, की सन्मान व भावना या दोन गोष्टी इतक्या नाजूक झाल्यायत ती त्या कधी आणि कशामुळे तुटतील आणि दुखावतील सांगता येत नाही..
Copyright © 2025 | Marathisrushti