वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
गुणधर्म म्हणजे आपल्यातलीच एक विशेषता…….मानवाचा खरा गुणधर्म म्हणजे मानवता, माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे, ही मानवियता … जसे जलाचा धर्म आहे तहान भागवणे व्याकुळता दुर करणे, सुर्याचा धर्म आहे सुष्टीला प्रकाश देणे. सजीवांकरीता जीवनसत्त्व निर्माण करणे. वायुचा धर्म आहे प्राण़वायु देणे, अग्निचा धर्म आहे उष्णता देणे.
August 2, 2020
स्वामी विवेकानंद म्हणतात- प्रार्थनेपेक्षा खेळ तुम्हाला देवाच्या जास्त जवळ घेऊन जाऊ शकतो. कारण प्रार्थनेमध्ये तुमचा संपूर्ण सहभाग असेलच असे नाही परंतु खेळात तो असतोच. वरील संदर्भ लक्षात घेता येथे नमूद करू वाटते की व्यक्तिमत्व विकासामध्ये बुद्धिबळाचा सिंहाचा वाटा आहे. आणि त्यामुळेच व्यक्तिमत्व विकास करण्याकरिता बुद्धिबळ हा खेळ आत्मसात करावा, जोपासावा, व्यासंग धरावा व त्याचे अनुसरण करावे.
April 4, 2022
डाळिंबाची लागवड फार प्राचीन काळापासून म्हणजे इ.स. पुर्व 3500 वर्षापूर्वी झाल्याचा उल्लेख आढळून येतो; डाळिंबाचे उगमस्थान इराण असून इ.स. 2000 वर्षापासून डाळिंबाची लागवड केली जात होती असे आढळते. इराण प्रमाणेच स्पेन, इजिप्त, अफगाणिस्थान, मोराक्को, बलूचीस्थान, पाकीस्तान, इराक, ब्रम्हदेश चीन, जपान, अमेरिका, रशिया, भारत या देशामध्ये लागवड केली जाते. भारतात डाळिंब लागवडीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे. महाराष्ट्राचा देशाच्या उत्पादनामध्ये ६६.९० टक्के वाटा आहे.
July 17, 2021
खऱ्या जगात हे “ सर्वोत्कृष्ट मेंढरू “ फार पुढे प्रगती करू शकत नाही, हे दुर्दैवी सत्य आहे. दहावी-बारावीच्या मेरीट लिस्टमध्ये आलेल्यांच्या भावी यशाचा (?) आलेख हा संशोधनाचा विशेष झालेला आहे.
February 17, 2023
जगद्गुरू आदि शंकराचार्यांची सर्वच स्तोत्रे रसाळ व अर्थगर्भ आहेत. प्रस्तुत कृष्णाष्टक प्रामुख्याने बालकृष्णाच्या स्तुतिपर आहे. अत्यंत्त सोप्या तरीही तरल व प्रवाही अनुप्रासयुक्त अशा या स्तोत्राची गेयता वेगेवेगळ्या शब्दसमूहांच्या योजनेतून द्विगुणित होते. कठोर उच्चाराची अक्षरे त्यात क्वचितच असल्याने त्याची कोमलता अधिकच प्रत्ययास येते. डोळे मिटून चालीवर ते गायल्यास बालकृष्णाची प्रतिमा समोर उभी राहिल्याशिवाय रहाणार नाही.
November 14, 2019
मला तर वाटते कि मदन मोहन यांनी लताच्या आवाजाचा जितका सुंदर उपयोग करून घेतला तितका इतर संगीतकारांनी फार कमी करून घेतला.”कदर जाने ना “ हे गाणे ऐकून तर बेगम अख्तर सुद्धा चकित झाल्या फारसे शास्त्रीय संगीताचे ज्ञान नसून कसे रागदारीवर गाणे केले.
August 9, 2022
महाराष्ट्राच्या सीमेजवळच्या … तळकोकणातल्या रेडीचा व्दिभुजा गणेश दशक्रोशीत फार श्रद्धेचं स्थान ठेऊन आहे. रेडी प्रसिद्ध आहे ते इथल्या लोहाच्या खाणींसाठी. रेडीच्या एका बाजूला तेरेखोलचा किल्ला-खाडी तर अलीकडच्या बाजूला महाराजांचा ऐतिहासिक यशवंतगड. सावंतांचा अंमल देखील यशवंतगड आणि या परिसरावर होता. गावात माऊलीचं … नवदुर्गेचं अशी दोन देवळं देखील आहेत. रेडी-तेरेखोल ही दोन गावं महाराष्ट्राच्या गोव्याच्या सीमेवर वसली असून अरबी समुद्राच्या तटावर आहेत.
September 9, 2019
नमन्मौलिमंदारमालाभिषिक्तम् |
नमस्यामि शंभो पदांभोरुहं ते
भवांभोधिपोतं भवानी विभाव्यम् ‖ ६ ‖
स्मरणा नंतरची अवस्था असते वंदन. भगवान श्री शंकरांच्या चरणकमलांना प्रेमभराने वंदन करण्यासाठी सिद्ध भगवान जगद्गुरु आचार्यश्री त्या भगवान श्री विश्वनाथांच्या चरणकमलांचे माहात्म्य सांगताना म्हणतात,
स्वसेवासमायात- सेवा करण्यासाठी स्वतः एकत्रित आलेल्या,
देवासुरेंद्रा- देवता तथा सुरेंद्र म्हणजे देवराज इंद्र.
नमन्मौलि- त्यांनी नमन् म्हणजे झुकविलेल्या मौली म्हणजे मस्तकांवर,
मंदारमाला- धारण केलेल्या मंदार म्हणजे स्वर्गात असणाऱ्या नंदनवनातील कल्पवृक्षाच्या फुलांच्या माळांनी,
अभिषिक्तम् - ज्याच्यावर अभिषेक केला जातो असे.
कैलास पर्वतावर भगवान शंकरांच्या वंदनासाठी आलेल्या देवतांच्या मस्तकावर असणाऱ्या पुष्पमालांनी त्या चरणांवर पुष्पाभिषेक होतो. ही कल्पना किती सुंदर आहे?
वास्तविक या देवता सगळ्यांसाठी वंदनीय. मात्र भगवान विश्वनाथ या देवतांसाठी देखील वंदनीय. म्हणून तर देवांचे देव महादेव.
नमस्यामि - मी नमस्कार करतो.
शंभो ते - हे भगवान शंकरा आपल्या,
पदांभोरुहं- चरण कमलांना.
कशी आहेत हे भगवान श्री शंकराची चरणकमले? तर आचार्य श्री पुढे म्हणतात,
भवांभोधिपोतं - भव म्हणजे संसार. अंभोधी म्हणजे सागर. तर पोत म्हणजे नौका. अर्थात या संसाररुपी सागरातून तारुन नेणारी नौका असणाऱ्या, संसार मुक्तीचा मार्ग असणाऱ्या,
भवानी विभाव्यम् - भवानी म्हणजे आई जगदंबा पार्वतीने चरणसेवा रुपी सत्कार केलेल्या, त्या श्री चरणांची मी वंदना करतो.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
June 15, 2020
श्रीमंत बापाच्या पोटची वाया गेलेली 'कारटी' आपण नेहेमीच बघतो, पण......
६००० कोटींची उलाढाल आणि अब्जाधीश असणाऱ्या सावजी ढोलाकीया यांनी शिक्षण सुरु असतानाच आणि भविष्यात स्वतःचा उद्योग सांभाळायाची जबाबदारी येऊन पडणार आहे अश्या आपल्या मुलाला पाठवले कोचीनला, खडतर जगाचा अनुभव घ्यायला आणि काबाडकष्ट करून स्वतःच्या हिकमतीवर पैसे कमवून जगायला....
जगभरातल्या ७१ देशांमध्ये कारोबार असणाऱ्या सुरत येथील हरेकृष्णा डायमंड एक्सपोर्टसचे मालक असलेल्या सावजी यांनी दोनच वर्षांपूर्वी सगळ्या जगाचे लक्ष वेधून घेतले होते आणि कारण होते त्यांच्याकडे काम करणाऱ्या तब्बल १२०० लोकांना त्यांनी दिवाळी निमित्त भेट दिलेली घरे आणि कार्स. आज दोन वर्षानंतर चर्चेत आला श्री सावजी यांचा अमेरिकेत बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेत असलेला आणि भारतात एक महिन्याच्या सुट्टीवर आलेला २१ वर्षीय तरणाबांड मुलगा चि. द्रव्य.
श्री. सावजी यांच्या बिझनेस साम्राज्याची जबाबदारी आता ज्या द्रव्य या त्यांच्या मुलाच्या खांद्यावर थोड्याच दिवसांत पडणार आहे त्या मुलाला सावजी यांनी त्याची ही सुट्टी त्यांच्या कुटुंबाच्या परंपरेप्रमाणे केरळ येथील कोचीन येथे त्याच्या स्वतःच्या पायावर आणि जबाबदारीवर घालवण्यास सांगितले.
शिक्षण पूर्ण झाल्यावर स्वतःला पूर्णत: अपरिचित अश्या भारताच्या एखाद्या भागात एक महिना जावून राहणे आणि कुणालाही स्वतःची ओळख न सांगता , अत्यंत साधेपणाने कुठल्याही आलिशान जीवनाचा अंगीकार न करता स्वतःचा उदरनिर्वाह चालवणे अशी श्री सावजी यांच्या कुटुंबाची परंपरा आहे.
"एकदा बारा वर्षांपूर्वी लंडन इथल्या एका आलिशान पंचतारांकित हॉटेलमध्ये आम्ही सर्व कुटुंबीयांनी गुजराथी पारंपारिक जेवण घेतले. बिल आले होते प्रत्येकी घसघशीत १०० पौंडस. इतके जास्त बिल कसे काय आले असे हॉटेल मालकाला सहजच विचारल्यावर हॉटेल मालक म्हणाला कि तुम्ही जेवणाची किंमत न पाहताच जेवण ऑर्डर केले आहे. इथे आमच्या कुटुंबाचे डोळे उघडले. इथेच आमच्या कुटुंबाने ठरवले कि आमच्या कुटुंबातला प्रत्येक पुरुष यापुढे पैशाची किंमत जाणवण्यासाठी एक महिना खडतर आयुष्य जगेल." द्रव्य म्हणाला.
याच प्रथेस अनुसरून आणि हे आव्हान स्वीकारून २१ जून २०१६ रोजी चि. द्रव्य केरळ येथील कोचीन मध्ये वडलांनी दिलेल्या कपड्यांचे तीन सेट्स आणि ७००० रुपये यांसोबत एक महिना रहायला गेला.
"मी माझ्या मुलाला ३ अटी घातल्या," श्री सावजी टाईम्स ऑफ इंडियाला सांगत होते,"एक , तुला तुझे जगण्यासाठीचे पैसे वेगवेगळी कामे करून स्वतःला कमवायला लागतील. दोन, एका कामाच्या ठिकाणी एक आठवड्यापेक्षा जास्त वेळ काम करावयाचे नाही. आणि तीन म्हणजे , तू कुठेही माझे नाव वापरायचे नाहीस, सोबत अगदीच संकटसमयी वापरण्यासाठी दिलेले ७००० रुपये वापरणार नाहीस आणि तुझा मोबाईल फोनही वापरणार नाहीस.
माझ्या मुलाने आयुष्याचे खरे रूप पाहावे, अनुभवावे , गरीब लोकांना आयुष्यात किती खस्ता खाव्या लागतात आणि पैसे कमावण्यासाठी किती खडतर आयुष्य जगावे लागते याची त्याला पुरेपूर कल्पना यावी अशी माझी इच्छा होती. कारण जगातले कुठलेच विद्यापीठ तुम्हाला हे अनुभवांचे जिवंत शिक्षण देऊ शकतच नाही." या एका महिन्याच्या कोचीन येथील वास्तव्यामध्ये द्रव्य याला अनेकानेक आव्हानांचा सामना करावा लागला.
गुजरात मधल्या एका गरीब घरातला बारावीतला मुलगा अशी स्वतःची ओळख देऊन द्रव्य कोचीन येथे राहिला. एका संपूर्णतः अनभीज्ञ अश्या शहरात कुणाच्याही संपर्कावीना असलेला द्रव्य आणि त्यात तेथील मल्याळी भाषाही अजिबातच माहित नसण्याचेही एक मोठे आव्हान त्याच्या समोर उभे होते. "माझे कामही मलाच शोधायचे होते. पहीले पाच दिवस माझ्याकडे काम तर सोडाच राहायला निट अशी जागाही नव्हती आणि त्यामुळे मी भयंकर विमनस्क झालो होतो. काम मिळवण्यासाठी मी जोडे झिझवलेल्या तब्बल ६० ठिकाणाहून मला काम न देताच हाकलून देण्यात आले.
नकार म्हणजे काय चीज आहे आणि या आत्ताच्या दिवसात काम मिळणे आणि त्याहीपेक्षा मिळालेले काम टिकवणे ही किती अवघड गोष्ट आहे हे मला तिथे जवळून अनुभवाला आले. मी माझ्या आयुष्यात आत्तापावेतो कधीच पैशांची चिंता केली नव्हती. वस्तूची किंमत न पाहताच वस्तू खरेदी करणारा मी एका बाजूला आणि कोचीन येथील या वास्तव्यात माझ्या रोजच्या जेवणासाठी ४० रुपये सुद्धा प्रचंड कष्टपूर्वक कमावणारा मी एका बाजूला ही वस्तुस्थिती मी शब्दशः कोचीनला जगलो." अब्जाधीश चि. द्रव्य ढोलाकीया सांगत होता.
चेरनाल्लूर इथे द्रव्यला एका बेकरीमध्ये त्याची पहिली नोकरी मिळाली. पुढच्या आठवड्यात एका कॉल सेंटर मध्ये, त्याच्या पुढच्या आठवड्यात एका चपलांच्या दुकानात आणि सर्वात शेवटी एका मॅकडोनाल्ड आउटलेट मध्ये द्रव्य याने नोकरी केली. या एका महिन्यात चि. द्रव्य कोचीन येथे एका साध्याश्या हॉस्टेलमध्ये यशस्वीपणे राहिला आणि कष्टाची कामे करून त्याने तिथे चार हजार रुपये सुद्धा कमावले.
येत्या ५ ऑगस्टला चि. द्रव्य त्याच्या पुढील शिक्षणासाठी पुन्हा एकदा अमेरिकेतल्या पेस विद्यापीठात दाखल होणार आहे.
(बातमी सौजन्य - टाईम्स ऑफ इंडिया आणि )
August 2, 2016
नाना तऱ्हेचे पदार्थ पाण्यात सहजतेने विरघळतात, कारण पाणी एक उत्तम द्रावक आहे. शास्त्रीय भाषेत ज्या द्रावणात आम्लधर्मी आणि आम्लारीधर्मी असे दोन्ही पदार्थ विरघळतात त्याला (सार्वत्रिक) वैश्विक द्रावक म्हणतात. पाणी हे वैश्विक द्रावक आहे. याचे कारण पाण्याच्या रेणूत दडलेले आहे.
November 8, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti