वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
१)गाईचे तुप:
बुद्धि,कांती,स्मृती,धारणाशक्ती वाढविते,स्त्रोतसांचे शोधन करते,वातनाशक,स्वर चांगला ठेवते,पित्तनाशक,पुष्टीदायक,भुक वाढविते,वृष्य,आयुष्यकारक,गोड असून सर्व तुपांत श्रेष्ठ आहे.हे विषनाशक,डोळ्यांना हितकर,रसायन असून आरोग्यदायक आहे.
२)म्हशीचे तुप:
धारणाशक्तीवाढविणारे,सुखदायक,
कांतीवर्धक,कफवातनाशक,शक्तिवर्धक शरीरवर्ण सुधारणारे,मुळव्याध नाशक,भुक वाढविणारे व डोळ्यांसाठी हितकर आहे.
३)शेळीचे तुप:
भुक वाढविते,डोळ्यांनाहितकर,बलवर्धक,
खोकला,दमा कमी करणारे,पचायला अत्यंत हल्के असते.
(क्रमश:)
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:
९९६०६९९७०४
“आपल्या देशात पाश्चात्यांची निष्प्राण नक्कल करण्यात आपण किती पुढे गेलोत हे पाहायचे असेल तर एखादे ‘भारतीय’ काॅर्पोरेट आॅफिस बघावे..किंवा एखाद्या ‘शेट्टी’ने चालवलेले उंची हाॅटेल पाहावे..आत येणारा इंग्रजी बोलणारा असला तर (तरच) त्याच्याकडे लक्ष द्यायचे असा तीथला नियम असतो.
गेले काही दिवस चाललेल्या लोकशाहीच्या महोत्सवाची उद्या सांगता होणार. कोणत्याही उत्सवाची सांगता जशी गोड होते, तशीच परवा महाप्रसादाच्या दिवशी एकमेंकांवर केलेले भले-बुरे आरोप प्रत्यारोप विसरून पुन्हा सर्व एकत्र येणार आणि एकमेकाला पावन करून घेणार आणि पुढची पांच वर्ष पण एकत्र नांदणार.
कधीतरी, कुठेतरी वाचलेलं किंवा कोणाकडून तरी ऐकलेलं हिन्दीतलं हे वचन सकाळीच आठवलं आणि नकळत त्या पालींची साम्य माणसाशी असल्याचं जाणवलं..फरक एकच अाहे पाल कितीही लहान अथवा मोठा किडा असो, तिच्या प्राणी धर्माला जागून, भुक लागल्याशिवाय त्याला गट्टम करत नाही तर मनुष्य मात्र भुक असो वा नसो, नजरेच्या पट्टयात आलेल्या सावजाला गट्टम केल्याशिवाय राहात नाही..
लॅबची कमाल, रिपोर्ट ची धमाल भाग 7
फार बिकट अवस्था होते, रिपोर्ट अॅबनाॅर्मल आणि पेशंट नाॅर्मल असेल तर.
नेमका काय निर्णय घ्यायचा रुग्णाला कळतंच नाही. डाॅक्टर आपली जबाबदारी टाळून मोकळे झालेले असतात. आणि रुग्णाला अगतिकपणे चुकीचा निर्णय घ्यायला भाग पडते. अशी कितीतरी उदाहरणे व्यवहारात पहायला मिळतात. मुतखडे, पित्ताशयातील खडे, युटेराईन फायब्राॅईड पासून अगदी कॅन्सर च्या गाठीपर्यंत, आणि रक्तदाबापासून, ह्रदयरोगापर्यंत साऱ्या रोगाच्या निदानासाठी यंत्रावर अवलंबून रहाण्याची वेळ आली आणि आरोग्याचे आर्थिक गणितही पार कोलमडून पडले. त्यात भर पडली ती, इन्शुरन्सची. कंपन्यांकडून परतावा मिळतो आहे, मग पैशाचा प्रश्न सुटला पण आयुष्यभर औषधांचा खेळ मात्र सुरू झाला.
रोगाच्या दुष्परिणामापेक्षा, औषधांचे दुष्परिणाम जास्त दिसू लागले. आणि आहार वाटीत आणि औषधी ताटात दिसू लागली. म्हणजे आहारापेक्षा औषधांची संख्या वाढू लागली.
पूर्वीची गाणी कशी होती, गायकाला मधे श्वास घ्यायला मिळायला वेळ मिळायला हवा, म्हणून मधेच म्युझिकचा पीस वाजवला जाई. पण आता वाजंत्रीवाल्यांना थोडी विश्रांती द्यावी म्हणून गायकांना मधे मधे तेच तेच अर्थहीन शब्द आळवायला लागतात, तसं काहीसं झालंय. सतरा अठरा औषध घ्यायची. त्यानेच पोट भरते. एवढी औषधे गिळायला परत तेवढेच पाणी पण पाजवले जाते. गरज नसताना अवयवांना अनावश्यक कामाला लावले जाते. औषधे उष्ण पडू नयेत म्हणून दर दोन चार तासांनी काहीतरी खाण्याचा सल्ला शिरसावंद्य मानला जातो आणि पोटावर अत्याचार सुरू होतो.
एवढं सगळं सोसूनही मला त्याचा विशेष त्रास होत नाहीच.
कारण "तो". आपल्यापेक्षा त्याला आपली जास्त काळजी आहे.
माझं, माझ्याकडे तरी लक्ष कुठाय ? हे सगळे अत्याचार पाहिले की खरंच "तो" आहे, याची खात्री पटते. नाहीतर एवढे सगळे अत्याचार सोसूनही मी मात्र सतत धावतोच आहे. नाॅर्मल होण्यासाठी .....
तो कस्तुरी मृग कसा सैराट होऊन धावतो, कस्तुरीच्या गंधाचा ठाव घेण्यासाठी. पण शेवटपर्यंत त्याला कळत नाही. तो सुगंध माझा मीच निर्मिलेला होता. फक्त तो मला कळत नव्हता. तसं आरोग्याचं झालंय. माझं आरोग्य माझ्यातच हरवलंय, माझ्या अज्ञानामुळे हरवलंय आणि मी मात्र माझा आयुर्वेदाचा दृष्टीकोन हरवून रानोमाळ दिशाहीन भटकतोय,
सैराट होऊन....
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
21.02.2017
तेल ही गेले तुप ही गेले हाती आले धुपाटणे हि मराठी मधील एक प्रचलित म्हण आहे.अशीच काहीशी गत आपण आपल्या आरोग्याची करून घेतली आहे ती देखील तुपा बद्दल आपल्या मनात असलेल्या गैरसमजांमुळे.तुप खाणे आरोग्यास चांगले नाही,तुपा हृदयाचा आरोग्यास हानीकारक आहे,तुप खाल्ल्याने कोलेस्टेराॅल वाढते इ.त्यामुळे बरेच लोक वनस्पती तुप अर्थात डाल्डाचा सर्रास वापर आपल्या आहारात करतात.पण डाल्डा म्हणजे तेलावर प्रक्रिया करून केलेला पदार्थ तो आपल्या हृदयाच्याच नव्हे तर संपुर्ण शरीराच्याच आरोग्यास किती हानीकारक आहे ह्याची कल्पनाचा केलेली बरी.
आणी हो कोणत्याही वस्तूचा अतिरेकी वापर हा आपल्या शरीराला बाधणारच मग त्याला फक्त तूपच कसे अपवाद असू शकते.
तुप हा प्राणीज द्रव्यातील सर्वोत्तम स्नेह आहे.कारण दुधापासून तूप बनविताना त्यावर अनेक संस्कार झालेले असतात.जसे दुधतापवून त्यापासून काढलेल्या सायीला विरजण लावून त्यापासून दही बनविले जाते,ह्या दह्याचे ताक करतात व ताक घुसळून त्यापासून लोणी काढतात,व लोणी कढवून त्यापासून तूप तयार होते.अर्थात सुरूवातीला व शेवटअग्निसंस्कार,किण्व प्रक्रिया,व मंथनसंस्कार असे अनेक संस्कार ह्या तुपावर झालेले असतात.
हे साजुक तुप सामान्य तापमानात देखील मऊ रवाळच रहाते व गरम हवामानात ते पुर्ण वितळते.पण जर तुम्ही डाल्डा पाहिलात तर तो कोणत्याही तापमानात गोठलेला व घट्टच असतो.मग असा हा कायमच गोठलेल्या स्वरूपात असणारा डाल्डा तुमच्या शरीरात गेल्यावर हृदयाच्याही धमन्यांमध्ये जाऊन न गोठल्यास त्यात नवल ते काय?
तुप हे आपल्या आरोग्यास खरोखरच उपकारक आहे.ह्याचा आहारात नियमीत वापर केल्याने शरीर सुदृढ रहाते,बुध्दी तल्लख होते,रोग प्रतिकार शक्ती वाढते,व वार्धक्याकडे होणारी शरीराची वाटचाल मंदावते.
(क्रमश:)
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:
९९६०६९९७०४
लॅबची कमाल, रिपोर्ट ची धमाल भाग 6
एकदा दवाखान्यात एक जोडपे आले. बायको एकामागून एक तक्रारी सांगत होती.
माझे डोके दुखते, चक्कर आल्यासारखे वाटते, डोळ्यासमोर काळोख येतो, छातीत धडधडते, घशाला कोरड पडते, पोटात ढवळते, हात पाय वळतात, झोप लागत नाही. पायाची बोटे सुन्न होतात....... इ.इ. पायापासून डोक्यापर्यंत सर्व अवयवांच्या तक्रारी एकामागून एक सांगत गेली. म्हटलं, सर्व शरीर तपासून घेऊया. एक कागद फाडून दिला. माझं काम संपलं.
.......रुग्णांना पण हौस खूप असते, असल्या तपासण्या करून घेण्याची. आणि काहीवेळा काहीजण तर इतके अतिहुशार असतात आणि डाॅ. गुगुल यांच्याकडून मिळवून, "हे घ्या एम आर आय पर्यंतचे सर्व रिपोर्टस्." असं म्हणून टेबलावर आपटतात.
एखाद्या नवविवाहितेला तिच्या दागिन्यांचे एवढे कौतुक नसेल, तेवढे हे केलेले मेडीकलचे रिपोर्टस् दाखवण्यात काही जणांना असते.
असो.
.......तर त्या बायकोला कोण आनंद झाला, तपासणी करण्याचा. म्हणाली, "बरं झालं, एकदा कळेल, काय झालं आहे मला ते ! "
नवरा बिचारा गप्प होता. म्हणाला, "मला पण तो रिपोर्ट काढायचा कागद द्या. कंपनीकडून तपासणीसाठीचे पैसे मिळणार आहेत, घेतो तपासून !" त्याला दुसरा कागद फाडून दिला, माझं काय जात होतं ?
संध्याकाळी दोघंही परत आली, वहिनींचा चेहरा पडलेला, "काय हो झालं ? काही रिपोर्ट मधे काही गंभीर गडबड कळली का ? " मी सहजपणे (पण चेहेऱ्यावर तेवढाच गंभीर भाव आणून) विचारलं.
ती तोंड एवढंस करत म्हणाली, " कशातच दोष मिळाला नाही."
"बरं झालं ना मग."
"एवढे पैसे खर्च केले पण कुठेच दोष मिळाला नाही, असं कसं ?" आता मात्र मला हसू आले, "अहो, चांगलंच आहे. त्यात वाईट काय ? "
म्हणाली,
"मला हे एवढे ढीगानी आजार. पण रिपोर्ट सगळे नाॅर्मल. पण ह्यांना काय सुद्धा होत नाय्ये, पण यांचे सगळे रिपोर्ट अॅबनाॅर्मल. असं कसं ?"
बघितलं तर खरंच नवऱ्याचे जवळपास सर्व रिपोर्ट अॅबनाॅर्मल होते. त्रास काहीही नव्हता, सहज म्हणून रिपोर्ट केलेले, ते अॅबनाॅर्मल.
आता माझ्या समोर मोठ्ठा प्रश्न होता,
औषधे कोणाला द्यायची ?
जिला त्रास आहे पण रिपोर्ट नाॅर्मल आहेत तिला, की ज्याला काहीही त्रास नाही, पण रिपोर्ट नाॅर्मल नाहीत, त्याला ?????
शेवटी लॅबवरील रिपोर्ट वरूनच खरं उत्तर मिळाले. त्यावर तीन शब्द लिहिले होते..
Please correlate clinically.
कृपया जुळवून बघा क्लिनिकली.
म्हणजे रुग्ण सांगतोय त्या तक्रारीशी जर लॅबचा रिपोर्ट जुळला तर औषध. नाहीतर नको.
म्हणजे यंत्र काहीही सांगूदेत, जर त्याचा त्रास रुग्णाला जाणवत नसला किंवा तशी शंका नसली तर यंत्र काय सांगतेय, ते महत्त्वाचे नाही. शरीर काय सांगते ते जास्त महत्वाचे !
सुटले कोडे मिळाले उत्तर!
आणि फक्त वहिनींनाच औषध दिले.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
20.02.2017
निद्रानाश असल्यास पेरू, सफरचंद़ आणि गाजर किंवा बटाट्याचा रस पालक रसाबरोबर सायंकाळच्या पूर्वी घ्यावा.
झोपण्या पूर्वी सोसवेल ईतक्या गरम पाण्यात १०/१५ मिनिटे पाय बुडवून ठेवावेत.
रोज डोक्यास व तळपायास सावकाशपणे एरंडेल तेल चोळून जिरवावे. तळहातावरही ते लावून जिरवावे. तळपाय काशाच्या वाटीने घासावेत, गुण खात्रीने येतो. मात्र या गोष्टीत सातत्य आवश्यक आहे.
गरम दुधात दोन चमचे मध घेऊन झोपावे
गाईचे तूप व जायफळाची पावडर हातापायांना व कपाळावर घासल्याने उष्णता कमी होऊन शांत झोप लागते.
डोके व पाय यांना खोबरेल तेल किंवा गाईचे तूप काशाच्या वाटीने घासावे.
रोज रात्री खुरासनी ओव्याची पावडर चिमुटभर तोंडात टाकून त्यावर भांडेभर पाणी प्यावे त्यामुळे झोप चांगली येते. खुरासनी ओवा काष्टौपधीच्या दुकानात मिळतो. या उपायाने मानेतील आखडलेल्या शिराही मोकळ्या होतात.
शुद्ध माक्याचे ब्राह्मी तेल झोपण्यापूर्वी डोक्याला मालिश करावे
साजूक लोणकडे तूप चमच्यात घेऊन गरम करून झोपताना ३/४ थेंब प्रत्येक नाकपुडीत सोडावे.
नैवेद्याच्या अर्धी वाटी दुधात जेष्टमध उगाळून गंधासारखे दाट करावे व त्यात तितकेच खोबरेल तेल घालून हे तयार केलेले तेल झोपण्यापूर्वी डोक्यास लावावे.
दुधी भोपळ्याचा रस तीळाच्या तेलात मिसळून डोक्यास मसाज करावा.
सॅलड पत्यांचा रस गुलाब तेलात म्सळून कपाळावर चोळल्यास शांत व चांगली झोप येते.
भरपूर दही खावे व डोक्यात चोळावे. ......रात्री मात्र दही खाऊ नये.
दिर्घ श्वसन करावे त्यामुळे देखिल झोप शांत लागते.
वरील सर्व कारणांमुळे झोप लागेल अर्थात वरील सर्व उपाय सर्व प्रकारच्या तब्बेतीच्या लोकांना उपयोगी पडतीलच असे नाही. कारण प्रत्येक औषधाचे परिणाम प्रकृति-प्रकृतीनुसार बदलत असतात. अर्थात वरील पैकी कोणत्यातरी एकाद् दोन उपायांनी गुण निश्चित येईल.
झोप न येणे हे जसे शरीर स्वास्थ्याच्या दृष्टीने अपायकारक आहे तसेच झोप जास्त येणे हे देखिल अपायकारक आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
हल्ली जीवनशैली कमालीची व्यस्त बनली आहे. सतत धावपळ हा आजच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनला आहे. अशावेळी कितीही काळजी घेतली तरी काही अपघात घडतात. यामध्ये एक म्हणजे पाय मुरगळणे. काही वेळा चालताना, पायर्या उतरताना पाऊल किंचित तिरके पडते आणि पाय मुरगळतो. पाय मुरगळतो तेव्हा पायातील सांध्यांच्या दोन हाडांना जोडणार्याि उती अर्धवट फाटतात किंवा काही वेळा पूर्णही फाटतात. असे झाले तर पायाच्या घोट्याजवळ सूज येते. सूज आली असता त्या भागावर बर्फाने शेक द्यावा. बर्फाने शेकण्याचीही एक विशिष्ट पद्धत आहे. बर्फाचे खडे जाडसर पिशवीत घेऊन त्यात थोडे मीठ घालावे. पिशवीला गाठ मारावी आणि दुखत असणार्याख जागेवर ही पिशवी काही वेळ ठेवावी. वेदना तीव्र होईपर्यंत ही पिशवी तशीच ठेवावी. नंतर पुन्हा ती दुसर्याे जागेवर ठेवावी. अशा प्रकारे सलग 15 मिनिटे बर्फाने शेकावे. दिवसातून साधारणपणे दोन वेळा बर्फाचा शेक द्यावा. मुरगळल्यानंतर पायाला पूर्ण विश्रांती द्यावी. पाय शक्यतो उशांवर ठेवावा. बाजारामध्ये पायाला बांधण्यासाठीचे बँडेज मिळते. ते पायाच्या बोटांपर्यंत बांधावे जेणेकरून पायांच्या स्नायूंना आधार मिळतो आणि सूज लवकर कमी होण्यास मदत होते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. डॉ. संजय गायकवाड
ही समस्या बहुधा सर्वांनांच कधी ना कधी जाणवते. घरात एखादी जड वस्तू उचलल्यामुळे किंवा चुकीच्या पद्धतीने उभे राहिल्यास, कमरेस हिसका बसल्यास कमरेवर ताण पडून लचक भरण्याची शक्यता असते. यामध्ये कंबरेमध्ये प्रचंड वेदना होतात. कंबर लचकणे हे दोन-तीन वेगळ्या प्रकारचे असू शकते. काही वेळा कंबरेभोवतीचे स्नायू थोडेसे फाकतात किंवा लिगामेंट दुखावून फाटू शकतात. तर काही वेळा कंबरेच्या चकतीची हालचाल होऊन तिला सूज येण्याची शक्यता असते. यामुळे होणार्यान वेदना हे व्यक्तीचे वय, तिचे वजन, तिने कोणत्या प्रकारचे वजन उचलले आहे, त्या व्यक्तीला आधीपासूनच काही कंबरेचा त्रास आहे का इत्यादी गोष्टींवर अवलंबून असतात. कुठल्याही प्रकारे कंबरेमध्ये लचक भरल्यास सर्वप्रथम झोपावे आणि मांडीखाली उशी घ्यावी. यामुळे थोडासा आराम मिळतो. तसेच मज्जारज्जूवरील ताण कमी होतो. कुशीवर झोपायचे असल्यास दोन्ही गुडघ्यांमध्ये उशी ठेवावी. त्यामुळेसुद्धा मज्जारज्जूंवरील ताण कमी होतो. आपल्याला चालते आणि सहज मिळते, असे एखादे वेदनाशामक औषध घ्यावे. अर्थात औषध अधिक प्रमाणात घेऊ नये. कंबर लचकल्यानंतर पायात मुंग्या येत असतील तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणे केव्हाही योग्य ठरते. या मुंग्या पायाच्या पुढच्या आणि बाहेरच्या बाजूस पावलांपर्यंत येत असतील किंवा पायातील ताकद कमी झाल्यासारखे वाटत असेल, पायाचा अंगठा उचलता येत नसेल तर मात्र तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. डॉ. संजय गायकवाड
Copyright © 2025 | Marathisrushti