(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ५२

    …. अशा शब्दात या स्तोत्राची फलश्रुती वर्णन करून आचार्य श्री आपल्या वाणीला विश्रांती देतात.

      January 24, 2021


  • अध्यात्म की बाजार…

    गेल्या काही दिवसात अध्यात्म याच्याशी संबंधीत आपल्या देशात जी काही प्रकरणे उगड झाली आहेत त्यामुळे अध्यात्म या विषयावर एक प्रश्न चिन्ह निर्माण झालेले आहे. आजही आपल्या देशात स्वतःला अध्यात्मिक गुरू म्ह्णवून घेणार्‍यां भोंदूंची कमी नाही. सर्वच अध्यात्मिक गुरू भोंदू असतात असं नाही म्ह्णता येणार आणि खर्‍या अध्यात्मिक गुरूंची समाजाला गरज ही आहेच. फक्त गुरू मंत्र देण्याच्या नावाखाली शिक्षांचा गोतावळा तयार करून आपल्या देशात चहाच्या टपर्‍यासारखी जी मठे उभारली गेलेली आहेत तेथे दिल्या गेलेल्या मंत्रात किती ताकद असेल ते त्या देवालाच ठावूक ! याच मठांच्या जागेवर अनेक गुन्हे घडल्याचेही कित्येकदा निदर्शनास येत असते. पुर्वी या बाबा, बुवा आणि भोंदू अध्यात्मिक गुरूंच्या नांदी फक्त अशिक्षीत लोकच लागत असत पण आता स्वतःला उच्च शिक्षीत म्ह्णवून घेणारे ही या बाबा – बुवांच्या पायावर पडलेले दिसतात. गरीब श्रीमंतीच स्वप्न पाहत आणि श्रीमंत मोक्षाच स्वप्न पाहत या बाबा-बुवांच्या नादी लागतो. गुरूला साक्षात त्रीदेवांपेक्षा मोठ मानणारी आपली संस्कृती त्यामुळे ही संस्कृती मानणारे आपलं सर्वस्व ही गुरूच्या चरणी अपर्ण करायला मागे पुढे पाहत नाहीत. प्रसंगी आपल्या अध्यात्मिक गुरूंसाठी आपले प्राणही देण्याची शिक्षांची तयारी असते. मागच्या काही वर्षात आपल्या देशात खर्‍या अध्यात्मिक गुरूंचे दर्शन सर्वसामान्यांना नशिबानेच होते पण त्याउलट भोंदू बाबांची अनेक प्रकरणे एका मागून एक उगडी होत आहेत. सध्याच्या अध्यात्मिक गुरूंकडे असलेल्या संपत्तीचे आकडे पाहिल्यावर देशातीलच नव्हे तर जगभरातील उद्योगपतींनाही घाम आल्यावाचून राहत नसेल. एकीकडे आपला देश मंगळावर जाण्याची तयारी करतोय आणि याच आपल्या देशातील राजकीय मंडळी जर बाबा- बुवांच्या पायावर लोटांगण घालतात अस चित्र भविष्यात दिसल तर ते आपल्या देशाचच दुदैव म्ह्णावं लागेल दुसर काय ?

    आपल्या देशातील बहूसंख्य लोक अध्यात्मिक गुरूंच्या मागे लागतात ते मोक्ष प्राप्तीसाठी मुळात मोक्ष ही संकल्पना गृहीत धरावी की नाही याबद्दल ठाम मत व्यक्त करावं की नाही इतकी माहिती उपलब्ध नाही. ढोबळ्मानाने या बाबतीत असेही म्ह्णता येईल की अस्तित्वाच नसलेली गोष्ट मिळविण्यासाठी सार्‍यांचा अट्टहास सुरू आहे. आपल्या देशातील एखाद्या कुटूंबातील कुटूंब प्रमुखाने गुरू केला की तो आपल्या कुटूंबातील सर्वांनाच त्या गुरूच्या चरणी लोटंगण घालायला भाग पाडतो. पुर्वी फक्त ईश्वर हाच आपला एकमेव संरक्षण कर्ता आहे अशी सर्वसाधारणतः लोकांची समजूत होती पण हल्ली सर्व संकटातून, दुःखातून मुक्ती मिळवून मोक्षाच्या मार्गावर मार्गस्थ होणाचा एक मेव मार्ग म्हणजे गुरूमंत्र आणि तो देणारा अध्यात्मिक गुरू असा गैरसमज समाजात जाणिव पूर्वक पसरविला गेला आहे. आपल्या देशातील वाढ॑ती लोकसंख्या ,मुळभूत गरजांचा अभाव, वाढती बेकारी आणि वाढत्या सामाजिक समस्या यामुळे त्रस्त झालेल्या आजारी पडलेल्या प्रत्येकाला एक मानसिक आधार हवा असतो नेमका तो आधार हे अध्यात्मिक गुरू योग्य वेळी देतात आणि लोकांच्या गळ्यातील ताईत होतात. समाजात संस्कृती, संस्कार आणि नैतिकता टिकून राहावी म्ह्णून समाजाला ईश्वर या संकल्पनेची आणि अध्यात्मिक गुरूंची आवश्यकता आहेच पण ती फक्त खर्‍या अध्यात्मिक गुरूंची भोंदूंची नाही. आता या भोंदू बाबा, बुवा आणि अध्यात्मिक गुरूंचे पितळ उगडे पाडण्यासाठी खर्‍या अध्यात्मिक गुरूंनीच पुढाकार घ्यायला हवा. आपल्या देशात अध्यात्माच्या नावावर प्रचंड बाजार मांडलेला दिसतो ज्यात लाखो लोक आपला स्वार्थ साधताना दिसतात. आपल्या देशातील शिक्षणपध्दतीत एक त्रूटी आहे ती म्ह्णजे आध्यात्म या विषयाचा शाळेय शिक्षणात समावेश केला गेला नाही ते होण गरजेचे आहे. आपल्या देशातील स्वतःला स प्रसिध्द म्ह्णवून घेणार्‍यांचे आपल्या संस्कृती बाबतचे ज्ञान नव्हे अज्ञान किव येण्यासारखे असल्याचे बर्‍याचदा दिसते. आपल्या देशात अध्यात्माच्या नावावर जमा झालेला बराचचा पैसा लोकहिताच्याच कामी आला असता तर देशाची बर्‍यापैकी प्रगती झाली असती. सर्वच अध्यात्मिक गारूंचे आर्थिक व्यव्हार अधिक पारदर्शी करण्याबाबत सरकारणे विचार करायला हवा. अध्यात्म हे लोकांना ज्ञानाचा मार्ग दाखविण्यास कारणीभूत ठरायला हवे पण आज अध्यात्माचा बाजार मांडून ते लोकांना लुबाडण्याचा अड्डा होत आहे...हे कोठे तरी थांबायला नको का ?

    लेखक – निलेश बामणे
    गोरेगांव ( पूर्व ) मुंबई
    मो. 9029338268

      December 20, 2014


  • वजन कमी करताना येणारे अडथळे

    आजकालच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे वजन वाढीची समस्या बऱ्याच लोकांमध्ये आढळून येत आहे. ह्यासाठी बरेच प्रयत्न देखील केले जातात पण काही वेळा असाही अनुभव येतो की खूप प्रयत्न करूनही वजन कमी करणे कठीण होते.

      July 7, 2019


  • कापूसखेड नाका, स्टाफ क्वार्टर नं ३/४

    आजवर मी केलेल्या नोकऱ्यांमध्ये सगळ्यात जास्त कालावधी मी इस्लामपूरच्या “कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक, साखराळे (CEPS) किंवा CEPR(राजारामनगर) मध्ये व्यतीत केलेला आहे.

      August 31, 2022


  • बाळक्रीडा अभंग क्र.५

    संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.

      August 16, 2018


  • आरवाईन ते फ्रीमाँट : एक प्रवास

    सर्वसामान्य भारतीयांना असते तसे अमेरिकेचे आकर्षण मलाही होते. पण आजवरचा सारा प्रवास विमानाने झालेला होता. आंतरराष्ट्रीय प्रवास करणारी विमाने सर्वसाधारणपणे जमिनीपासून तेहतीस ते छत्तीस हजार फूट उंचीवरून जात असतात. त्यामुळे ‘टेकऑफ’ किंवा ‘लँडिंग’ करताना काही मिनिटे खालचा, आजुबाजूचा निसर्ग आणि परिसर काय तो आपल्याला दिसतो. डोमेस्टिक ओअर लाईनने अमेरिकेतील दोन शहरांमध्ये प्रवास केला तर हे विमान जमिनीपासून बारा ते सोळा हजार फूट उंचीवरून जाते.

      December 30, 2023


  • नेत्याने अपयशावर कशी मात करावयाची?

    श्री. कलाम म्हणतात, त्या दिवशी त्यांनी आपल्या आयुष्यातील एक मोठा धडा घेतला. ज्यावेळेस अपयश आले त्यावेळेस संस्थेचा अध्यक्ष म्हणून अध्यक्षांनी ते आपल्या शिरावर घेतले. परंतु ज्यावेळेस, यश पदरात पडले त्यावेळेस ते त्यांनी ते न घेता आपल्या संपूर्ण गटाला दिले. यावरून हे दिसून येते की, व्यवस्थापनाचे धडे हे पुस्तकात वाचून मिळत नसतात, तर ते अनुभवातून येत असतात.

      August 16, 2011


  • सुलम उद्योगासाठी “ अच्छे दिन ” सुपर फास्ट….

    केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र सरकार आले आणि “मेक इन इंडिया ” च्या गीतात मिले सुर मेरा तुम्हारा झाले. 2030 साली लोकसंख्येचा भारतीय भस्मासुर चीनच्या ड्रॅगनासूराला मात देत १४६ कोटीची उड्डाणे करणार. यातील 100 कोटी हात “ कार्यासज्ज ” म्हणजे 16 ते 59 वयोगटातील असतील. म्हणजे भारत उत्पादनाचे जागतिक केंद्र बनेल. प्रगत राष्ट्रांच्या गुंतवणुकीचा धबधबा भारतावर कोसळू लागेल. अशी स्वप्ने पण पडू लागलीत.भारतात गुंतवणुकीसाठी आव्हान करण्यासाठी मोदीजीचे परदेश दौर्‍यांची मालिका सुरू झाली॰

    एवढ्यात एक कटू सत्य ध्यानात आले एसेस्सी “ड्रॉप आऊट ” चा दर बघता यातील 60 कोटी हात “अल्पशिक्षित” आणि “कौशल्य हीन” असतील. यावर उतारा शोधण्यासाठी नीती आयोगाचे विचार मंथन झाले आणि दोन स्तरांवर अॅक्शन घेण्याचा निर्णय झाला. एक कौशल्य विकासासाठी “स्कीलिंग इंडिया” आणि उद्योगांच्या वाढी साठी पोषक वातावरण तयार व्हावे म्हणून ब्रिटिश काळच्या कायद्यांचे सुलभीकरण म्हणजे “ ईझ ऑफ डूइंग बिझिनेस ”.

    कौशल्य विकासाठी गरज आहे औद्योगिक प्रशिक्षण सौंस्थांची – त्यासाठी लागणार जमीन, यंत्रसामुग्री, प्रशिक्षक आणि या सर्वांसाठी लागणारे भांडवल.भांडवल आणले तरी यातील कुठलीच गोष्ट एका रात्रीत आणता येण्यासारखी नाही.

    मात्र हे प्रशिक्षणाचे अकुशलाला “ रोजगार योग्य ” बनविण्याचे “राष्ट्रकार्य ”लघु उद्योजक सहज करीत आहेत. कुठलेही ITI प्रशिक्षित तरुण लघु उद्योगाकडे येत नाहीत. त्यामुळे आठवी नापास, तिसरी नापास अशा तरुणांना अकुशल कामगार म्हणून घ्यायचे, प्रशिक्षित करायचे, अनुभव द्यायचा आणि शेवटी अशा कुशल कामगाराच्या वेतन वाढीच्या अपेक्षा परवडत नाही सोडून गेला की पुनश्च हरी ओम. पुन्हा नवीन चौथी नापास तरुणाला कामावर घ्यायचे..... हा “ प्रशिक्षण यज्ञ ” वर्षानुवर्षे अव्याहत चालू आहे.

    आज सुलम मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सुमारे 5 कोटी लघु उद्योजक 11.5 कोटी हातांना रोजगार देत आहेत.तसेच यापैकी फक्त 3.6 लाख उद्योग EMII नोंदणी घेणारे आहेत. म्हणजे सुमारे 4.95 कोटी उद्योगातून काम करणारे सुमारे 10 कोटी कामगार केवळ “ व्हाउचर ” वर रोजगार घेऊन काम करतात व त्यांना कुठलेही कायद्याचे किंवा अपघातपासून विमा संरक्षण नाही. याचे मुख्य कारण सुलम उद्योगांना जाचणारी “इन्स्पेक्टर राज” ची साधार भीती.

    केंद्राने लहान लहान अधिसूचना काढून बरेच सुलभीकरण केले पण कामगार ब्रिटिश काळच्या कायद्यात करावयाचे आमुलाग्र बदल केल्या शिवाय “इन्स्पेक्टर राज” पासून मुक्ति मिळणे शक्य नाही. केंद्रीय कामगार मंत्री मा. बंडारू लक्ष्मण यांनी रजिस्टर्स आणि रिटर्न्स सुलभीकरण कायदा 2011 ची अधिसूचना, व स्माल फॅक्टरीज बिल 2014, वेज कोड, कामगार संबंध कोड अशी तीन कायदे सुधार त्रिसूत्रिची प्रारूपे सर्व भागधारकांसमोर म्हणजे कामगार संघटना, व्यवस्थापन संघटना व सरकार अशा त्रिपक्षीय चर्चेला आणली. आपल्या कामगार चळवळीची धार बोथट होईल या भीती पोटी, भाजप प्रणीत भारतीय मजदूर संघा समवेत सर्व कामगार संघटनांनी कुठल्याही बदलाला सरसकट आणि तीव्र विरोध दर्शविला॰ त्यामुळे सुलभीकरणाच्या प्रक्रियेला खीळ बसली.

    मात्र महाराष्ट्र सरकारने राजस्थानच्या धरतीवर कुठलेही आमुलाग्र बदल न करता कायद्याच्या चौकटीत राहून अनेक लहान अधिसूचना काढून सुलभी कारण जोरात पुढे नेले.कारखाना बंद करण्यासाठी परवानगीची मर्यादा 300 वरुन 100 वर आणणे,सुलम उद्योगांना जाचक माथाडी कायद्यातून मुक्ति, पर्यावरण विषयक अडसरांचे सुलभीकरण, काल मर्यादेत परवानगी, एकंदर परवानग्यांची संख्या 76 वरुन 40 वर आणणे, स्वप्रमाणित विवरणपत्रे इ. अनेक बदल अधिसूचित करून “मैत्री” या संकेत स्थळावर पारदर्शक पद्धतीने टाकलेत हे खरोखरी स्तुत्य आहे.तसेच या निर्णयांचे परिणाम जमिनीवर दिसू लागले आहेत.

    परंतु कौशल्य विकास व सुलभी करण यांची सांगड घालण्यासाठी एक अत्यंत प्रभावी पण सोपा उपाय म्हणजे – सुलम उद्योगाला प्रशिक्षण संस्थेचा दर्जा देत त्यांच्यातील सुप्त विभवाचा वापर करणे. या साठी 15 ते 20 वर्षे वयाच्या अकुशल – अल्पशिक्षित ( एसएससी ड्रॉप आऊट ) तरुणांची आधार कार्डा वरून “प्रशिक्षणार्थी” म्हणून नोंदणी करणे. सुलम उद्योगांना त्यांच्या कर्मचारी संख्येच्या 30 % नोंदणीकृत प्रशिक्षणार्थीना तीन वर्षासाठी, किमान वेतनाच्या अनुक्रमे 70, 80 व 90 टक्के स्टायपेंड व अपघात विमा करून कामावर घेण्याची मुभा देणे. या शिवाय शिकण्याची इच्छा असलेल्या प्रशिक्षणार्थीना “नरेगा” योजनेतून महिना रु. 3000 शिष्यवृत्ती देऊन औद्योगिक संघटनांच्या मदतीने त्यांच्या आवडीच्या व्यवसायाचे संबंधित व्यवसायचे तंत्रशुद्ध शिक्षण द्यावे व एनसीटीव्हीटी परीक्षेला बसवावे. तीन वर्षा नंतर व्यवस्थापनाला प्रशिक्षणार्थीना कायमस्वरूपी कामावर घेणे बंधनकारक नसावे. यामुळे सुलम उद्योगाची, कामगार संख्या वाढून फॅक्टरी अॅक्ट लागू होण्याची व प्रशिक्षणार्थी कसाही असला तरी त्यास कामावर कायम करावे लागण्याची अनामिक भीती नाहीशी होईल. तसेच अनेक असंघटित सुलम उद्योगात अकुशल तरुण कामगारांना अपघात विमा संरक्षण,व्यावसायिक प्रशिक्षण, औद्योगिक अनुभव व NCTVT प्रमाणपत्राची खात्री अशी बहुआयामी संधि उपलब्ध होईल.

    सर्वघटकीय लाभ असणारी ही सूचना अमलात आणल्यास अच्छे दिन “ सुपरफास्ट ” ची “हायपर फास्ट ” होण्यास वेळ लागणार नाही हे निश्चित.

    पुरुषोत्तम आगवण
    राष्ट्रीय उपाध्यक्ष
    चेंबर ऑफ स्माल इंडस्ट्री असोसिएशन्स
    भ्र.ध्व. ९८२००८९३११

      December 9, 2015


  • श्री मीनाक्षीस्तोत्रम् – ६

    नादे नारदतुम्बुराद्यविनुते नादान्तनादात्मिके
    नित्ये नीललतात्मिके निरुपमे नीवारशूकोपमे ।
    कान्ते कामकले कदम्बनिलये कामेश्वराङ्कस्थिते
    मद्विद्ये मदभीष्टकल्पलतिके मां पाहि मीनाम्बिके ॥ ६ ॥

    आई जगदंबेच्या वैभवाचे नवनवीन पैलू उलगडून दाखवताना जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
    नादे- नाद अर्थात ओंकार स्वरूप असलेली. नारदतुम्बुराद्यविनुते- नारद, तुबरू इ. देवर्षी, गंधर्व इत्यादींच्याद्वारे वंदन केल्या गेलेली.
    नादान्तनादात्मिके- शास्त्रांमध्ये ओंकाराला नाद असे म्हणतात. त्यामध्ये अ,ऊ आणि म अशा तीन मात्र आहेत. त्यातही शेवटी म् चा जो नाद घुमत राहतो त्या अर्ध्या मात्रेला नादान्तनाद असे म्हणतात. ती त्रिगुणातीत निर्गुण स्वरूप असणारी अर्धमात्रा हे जिचे स्वरूप आहे अशी.
    नित्ये - भूत वर्तमान आणि भविष्य या तीनही काळात अविचल असणाऱ्या तत्वाला शास्त्रात नित्य असे म्हणतात. अशी नित्य स्वरूप असणारी.
    नीललतात्मिके- नीलकमलाच्या लते प्रमाणे नाजुक असणारी.
    निरुपमे- जिला कोणत्याच प्रकारची उपमा देता येत नाही अशी. अनुपमेय. एकमेवाद्वितीय.
    नीवारशूकोपमे - निवार म्हणजे भगरीच्या दांड्या प्रमाणे असणारी.
    वर आचार्य म्हणतात आई जगदंबा निरुपम आहे. तर ताबडतोब एक उपमा देतात. हे अजब नाही का ?तर नाही. त्या उपमेतून देखील आई जगदंबेचे स्वयंसिद्धत्वच मांडलेले आहे.
    भगर हे कोणत्याही प्रयत्नाशिवाय येणारे धान्य. अर्थात जिला कोणी निर्माण करत नाही अशी.
    साधू संत महंत अधिकाधिक काळ भगरच भक्षण करतात. अर्थात अशा सगळ्यांच्या उदरभरणाची काळजी घेणारी.
    कान्ते- अतीव प्रिय.
    कामकले- सर्व इच्छांचा स्वरूपाची. कदम्बनिलये- कदंब वनात निवास करणारी. कामेश्वराङ्कस्थिते- कामेश्वर भगवान शंकरांच्या मांडीवर बसलेली.
    मद्विद्ये- माझ्या ज्ञानस्वरूप असणारी. मदभीष्टकल्पलतिके- माझ्या सर्व कामना पूर्ण करणाऱ्या कल्पनेप्रमाणे असणाऱ्या,
    मां पाहि मीनाम्बिके - ही आई जगदंबे मीनाक्षी माझे रक्षण कर.

    - प्रा. स्वानंद गजानन पुंड

      May 30, 2020


  • भूलोकीचे वैकुंठ म्हणून नावाजलेले शेगांव.

    प्रेमभक्तीचा प्रचंड महापूर शेगांव रस्त्यावर धो-धो वाहत होता. समुद्राला जणू भरती आली आणि लाटावर लाटा किनाऱ्यावर येऊन धज्ञकत होत्य, त्या लाटातील अमृतमयी सिंचनाने सारे भक्तगण न्हावून निघाले होते. टाळमृदंगाच्या गजरातील तो अनुपम सोहळा भावभरल्या अश्रुपूर्ण नंत्रांनी बघताना क्षण्काल काळाचे भान हरपले. कितीतरी वेळ रस्त्याच्या मधोमध असलेल्या उंच डिव्हायडरवर निश्चल शरीराने भावपूर्ण अंत:करणाने सारे प्राण डोळ्यात साठवून घेताना मनात आल खरच देव अशा साध्या भाळ्या भाविकांच्या हृदयातच निश्चितपणे नांदतो.

    अंगाची लाही-लाही करणाऱ्या उन्हातून, डोक्यावर खांदयावर स्वतःचा बोजा सावरीत दिंडीत सामील झालेले वारकरी आपल देहभान विसरून टाळ मृदंगाच्या लयदार गजरात नाचतांना पाहून मन तृप्त झाल्याशिवाय राहात नाही. प्रत्यक्ष प्रेमभक्ती काय असते याचा अनुभव घ्यायचा असेल तर रामनवमीला शेगावी होणारा दिंडी सोहळा याची देही याची डोळा अवश्य बघावा. तो बघायला मिळणे अनुभवणे खरोखरीच महद्भाग्याचं लक्षण आहे. ते महद्भाग्य सर्व भक्तगणांना आज शेगांवी निश्चितच मिळाले.

    आज हजारो दिंड्या शेगांव रस्त्यावरून टाळमृदंगाच्या लयीत भजने म्हणत एकाच ओढीने चालत होत्या. लोहचुंबकाच्या कक्षेत येणाऱ्या लोखंडाला लोहचुंबक जसा आपल्याकडे ओढून घेतो तसे सर्व वारकरी श्री महाराजांच्या कक्षेत येताच ओढल्याप्रमाणे जावू लागले.

    श्री महाराजांच्या पादकांच्या परिस स्पर्शाने आपल्या जिवाचं सोन करण्यासाठी लागलेली ओढ मनाला लागलेला ध्यास सर्व वारकऱ्यांच्या डोळ्यातून स्पष्टपणे जाणवत होता. हे सर्व दृश्य पाहून सांग पुलकीत होत होतं. दिंडीत घुसून मनसोक्त नाचावसं वाटत होत, परंतु श्री महाराजांनी दिंडीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवल्याने, वाहवून जाण योग्य नव्हतं, आणि शेगाव संस्थानच्या शिस्तबद्ध नियोजनाचा माझ्या भावनिक उर्मीने अजाणतेपणाने का होईना अपमान झाला असता. संस्थानचा आदर्श नजरेसमोर ठेवून वागणारा मी, मला असं करून कस चालेल? स्वतःच्या मनाला समजावीत जडअंतकरणाने सर्व विहंगम दृष्ये डोळ्यात साठवून मुक्कामाचा रस्ता धरला.

    आजचा दिवस माझ्यासाठी खरोखरीच सुवर्णदिन म्हणावा लागेल. श्री गजानन महाराज संस्थानकडून प्रसादरूपाने टाळ-मृदुंग मिळावेत ही बरीच वर्षे अतृप्त राहिलेली इच्छा श्री महाराजांनी आज पूर्ण केली. जणुकाही आमच्या सेवेला, भक्तीला पुर्णरूप प्रदान केलं. आता आणखी काही मिळवायची इच्छा राहिली नाही. मनात आलेल्या सर्व गोष्टींची महाराज लीलया पुर्तता करतात हे पदोपदी अनुभवतांना जीवन धन्य झाल्यासारखे वाटते. जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत श्री महाराजांची सेवा ह्या पामराकडून घडो ती त्यांनी करवून घेण व श्रीचरणाजवळ स्थान मिळो एवढीच इच्छा ! साधे आचरण, निर्मळ अंतःकरण आणि निष्ठायुक्त भक्ती भगवंताला प्रिय असते असे सर्व संताच्या शिकवणीचे सार आहे. दांभिकता आणि कर्मठपणाबरोबरच भोंदुगिरी वर संतांना चौफेर हल्ले केले. जगद्गुरु तुकारामांच्या अभंगगाथेत, संत एकनाथांच्या भारुडात, असे कितीतरी दाखले मिळतात ज्यात बुवाबाजी, अंधश्रद्धा, अनिष्ट चालीरिती यावर कडाडून हल्ला केलेला दिसून येतो.

    आजही धर्माच्या नावाखाली भोळ्याभाबड्या भाविकांना लुटण्याचे काम स्वतःला मठाधिपती, महाराज, संत म्हणवणारे लोक करीत आहेत. भोळ्या भाविकांनी अशा दांभिक गुरुंपासून सावध राहिले पाहिजे. श्री गजानन महाराजांकडे अनन्य भावानं शरण गेल्यास निश्चितच आजही ते योग्य मार्ग दाखवतात. भक्त पुंडलीकाला जसे सावध केले तसे आपणालाही करतील यात शंका नाही. त्या साठी आपली भक्ती पुंडलिकाप्रमाणे खरी व दृढ असणे गरजेचे आहे. वारी पुर्ण होऊ दे मग खुशाल ज्वर येऊ दे! नाहीतर मरण ते मी आनंदाने स्विकारीन असे म्हणणाऱ्या पुंडलिकाची पायदळ वारीवर किती प्रेम, किती निष्ठा होती. हे समजण्याकिरता पायदळ वारीच केली पाहिजे त्यात काय सुख असते हे आम्ही सलग दहा पदयात्रेत अनुभवलं आहे.

    शेगावं संस्थानच्या श्रीरामनवमी उत्सवाला शेंगावी जाण्याचा योग मात्र अनेक वर्षांनी आज आला. उत्सवातील आनंद सोहळा बघून मन तृप्त झाले. रीरामनवमीला दुथडी भरून वाणाऱ्या नदीसारखा वारकऱ्यांचा दिंडीसमूह दरवर्षी श्री गजाननाच्या जयघोषात टाळ-मृदंगाच्या गजरात लाखोच्या संखेनी शेगांवी येतो हे केवळ ऐकून माहित होतं. त्याचा प्रत्यक्ष अनुभव मात्र आज होत होता.

    प्रत्येक वारीत सहभागी असलेल्या दिंडीत २ ते ३ महिला डोक्यावर तुळस पाण्याची कळशी घेवून चालत असतात. आपले वय विसरून तुळाशीवृंदावन सावरत त्या आपल्या लाडक्या "गजानन बाबाला" भेटायला अधीर होऊन पळत असतात.

    चालण्यचा थकवा असला तरी वरकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तृप्ततेचा आनंद दिसतो. कडक उन्हा तडाखा सोसत दिंडीमध्ये चालणाऱ्या वारकऱ्यांच्या अंगी असलेल्या सहनशीलतेचे आणि निरामय भक्तीचे आपणाला दर्शन घडते.

    अतिशय शिस्तबद्धरितीने हजारो दिंड्या आपल्या वारकऱ्यांना घेऊन नगरप्रदक्षिणा करत असतात. ते सार दृश्ये इतकं लोभसवाणं असतं, इतकं मनोहारी असतं की त्यावरून जराही नजर ठळू नये.

    संध्याकाळच्या श्री महाराजांच्या पालखी सोहळ्याच वर्णन करण हे लेखनीचं काम नव्हे. तो सोहळा प्रत्यक्ष बघणे भाग्यात आले तर त्यासारखा अत्यूच्च आनंदाचा क्षण नाही. प्रत्येक भक्ताने हा अनुभव घ्यावाच. साखर गोड असते हे सत्य असलं तरी त्याची गोडी ती खाल्याशिवाय कळत नाही.

    हजारो दिड्यांचं शिस्तबद्ध नियोजन करताना कुठेही गडबड नाही, गोंधळ नाही, अस्वच्छता नाही. भव्य अशा अनेक शामीयान्यात हजारो दिंड्यांची राहण्याची, जेवणाची चोख व्यवस्था संस्थानाचे सेवेकरी अतिशय श्रद्धेने, काटेकोरपणे डोळ्यात तेल घालून सांभाळत असतात. महाराजांच्य सेवेबरोबरच त्यांच्य भक्तांची सेवा करण्यात संस्थानच्या सेवेकऱ्यांना धन्यता वाटते. एवढ्या प्रचंड गर्दीचं नियोजन अतिशय शिस्तबद्ध रितीने करणारे व ते सांभाळणारे सेवक खरोखरच धन्य होत. दिंडीच्या मार्गावर शुभ्र वेषातील सेवेकरी हजारोंच्या संखेने संस्थानला नियमित सेवा देतात.

    श्रीमहाराजांनी समाधिमूर्वी दिलेल्या वचनावर दृढ श्रद्धा ठेवून संस्थेचे कार्य अन्याहतपणे चालू असून ह्या सर्व सेवाकार्याच श्रेय श्री महाराजांना अर्पण करणारे, संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त प. पू. शिवशंकर भाऊ पाटील म्हणजे श्री महाराजांच्या चरणी वहिलेला समर्पित जीव. श्री महाराज प्रत्यक्ष भक्तांच्या हृदयात कसा नांदतो याचं मुर्तिमंत उदाहरण म्हणजे प. पू. शिवशंकर भाऊ पाटील होय.

    प्रचंड अशा कारभारावर नियंत्रण ठेवण्याची शक्ती आणि क्षमता त्यांना श्रीमहाराजांकडून भरभरून मिळाली याचं कारण त्यांची श्री महाराजांवर असलेली दृढ श्रद्धा होय. काटेकोरपणे नियमांच पालन, स्वच्छता व सुव्यवस्था असणारी भरतातील एकमेव संस्था म्हणजे श्रीगजानन महाराज संस्थान शेगांव होय.

    सायंकाळच्या नेत्रदिपक पालखीचा सहभाग असलेल्या दिंड्यांच्या पुढे गावातील सर्व बॅण्डपथके आपल्या सर्व ऐश्वर्यासह दिंडीत सामील होतात. त्या मागोमाग मानाच्या दिंड्या, मधोमध श्री महाराजांचे तीन सजवलेले अश्व लयबद्ध पावले टाकीत चालतात. त्यांना सोबत असते डौलदार भारदस्त चालीच्या दोन हत्तींची. श्री महाराजांची वैभवशाली पालखी संस्थानच्या शिस्तबद्ध वारकऱ्या सोबत निघत असते. एका लयीत चालणारे ध्वजधारी उंच असे ध्धराज सरळ रेषेत उंच धरुन चालत असतात. परिटघडीच्या पांढऱ्या शुभ्र पोषाखातील संस्थानचे वारकरी एका लयीत भजने म्हणत चालताना त्यांच्या कडक शिस्तीतून व्यवस्थानातील उत्तुंगता लक्षात आल्याशिवाय राहत नाही.

    “श्री गजानन महाराज संस्थानचे वेवेकरी" हा खरोखरीच प्रबंधाचा विषय ठरू शकेल इतकी त्यांची सेवा नियमांचे काटेकोर बंधन पाळून अविरतपणे चालू आहे कारण “मी गेलो सेसे मानू नका । भक्तीत अंतर करू नका । कदा मजलागी विसरू नका । मी आहे येथेच।।” या श्रीमहाराजांच्या वचनावर त्यांची दृढ श्रद्धा आहे. आपली प्रत्येक गोष्ट श्री महाराज बघतात हा उच्चतम भाव सर्व सेवेकऱ्यांच्या हृदयात नांदताना आपणाला पदोपदी दिसून येतो. हा उच्चतम कोटीचा भाव आपल्या कुशल व कल्पक नियोनाद्वारे शेगाव संस्थान आज वर्षानुवर्षे जोपासत आहे आणि भविष्यातही जोपासत राहील यात शंका नाही.

    “सर्वे भवन्तु सुखिन:” हे संस्थानचे घोषवाक्य असून या घोषवाक्याबरोबरच "शिवभावे जिवसेवा' आणि “सेवा हीच साधना" या व्रताचा अंगीकार करता अनेक सेवाकार्ये अविरतपणे चालू आहेत. रंजल्या गांजलेल्यंना जीवनावश्यक वस्तू आणि मोफत औषधोपचार अतिदुर्गम भागात पुरवण्याचे कार्य खरोखरीच वाखणण्यासारखे आहे. संस्थानचे कार्य अनेकांनी आदर्श घ्यावा असेच आहे. भुलोकीचे नंदनवन शोभावे असा “आनंदसागर" प्रकल्प साडेतीनशे एकर जमिनीत अतिशय कल्पकतेने साकारला आहे.

    हे सारं घडत ते कृपासागर असलेल्या श्री गजानन महाराजांच्या कृपेने आणि पेरणेने यावर संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त प. पू. श्री शिवशंकर भाऊ पाटील यांची नितांत श्रद्धा आहे. श्रीमहाराजांच्या चरणी संपुर्णतः शरणागत असलेले, संपुर्णपणे श्रीमहाराजांचे कृपापात्र असलेले भाऊ पाटील ज्यांच्या अंगी नम्रता, लिनता, कर्तव्यतत्परता यांचा सुरेख संगम पाहावयास मिळतो संपूर्ण महाराजमय झालेले प. पू. शिवशंकर भाऊ पाटील म्हणजे कार्तव्याचा, निष्ठेचा, प्रेमभक्तीचा महामेरू होय. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यांच्या विषयी लिहिण्यास लेखणी थीटी पडावी असे त्यांचे कर्तृत्व महानच नव्हे तर गगनाला गवसणी घालणारे आहे. सेवा, भक्ती, समर्पण आणि त्याग ह्य उच्च जीवन मुल्यांना १९६९ पासून आजतागायत अखंडपणे व्यवस्थापक ह्या पदावर कार्य करीत असताना जोपासले आहेत. अशा थोर विभूतीच्या केवळ दर्शनानेसुद्धा साधकाच्या हृदयात खऱ्या भक्ती प्रेमाचा उदय झाल्याशिवाय निश्चित राहणार नाही हे त्रिवार सत्य आहे. “शिवशंकर भाऊ पाटील । कारभार करी अंगे सकल । अतिप्रसन्न त्यासी भक्तवत्सल श्री गजानन महाराज ।।"

    ज्या ज्या वेळी पालखी किंवा दिंडीचा विषय चर्चिला जातो त्या त्या वेळेस पाटील घराण्यातील एका तेजस्वी व्रतस्थ वारकऱ्याची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. ते व्रतस्थ वारकरी म्हणजे पुरूषोत्तम भाऊ पाटील होय.

    श्री गोमाजी महाराज यांनी कुकाजी पाटलांना स्वप्न दृष्टांत देऊन मृत्यूपत्र करण्यास सांगितले. मृत्यूपूर्वी सर्व संपत्तीची योग्य सोय लावावी व त्या बरोबरच "पंढरीच्या वारीचे व्रत वंश परंपरागत अखंड चालवावे" असाही संकेत दिला गेला. तो ही मृत्युपत्रात नमूद केला गेला. आजतागायत ते व्रत पाटील मंडळी जोपासत आहेत.

    एक व्रतस्थ वारकरी म्हणून १९६८ ते १९८० एक तप सलगपणे श्री महाराजांच्या पालीखीसोबत श्री पुरूषोत्तम भाऊ पाटलांनी पायी वारी केली. यात कधीही खंड पडला नाही. प्रत्यक्ष द्वितीय चिरंजीव पांडूरंग पाटील यांच्या लग्न सोहळ्यास ते हजर राहू शकले नाहीत. कारण त्या वेळेस श्री गजानन महाराजांच्या पालखी सोबत ते पायी वारीत होते. आध्यात्मिक कार्यास, प्रापंचिक कर्मा ऐवजी प्रथम प्राधान्य द्यावं हा आदर्शच वरील प्रसंगातून दिसून येतो.

    श्री गजानन महाराजांच्या पालखीच्या पायदळ वारीत संस्थानच्या नियमांचे काटेकोर आणि शिस्तबद्ध पालन करीत तब्बल १२ वर्षे श्री पुरूषोत्तम भाऊ पाटील यांनी श्रींची सेवा केली, श्री महाराजंच्या लीला महात्म्याचा प्रभावीपणे प्रसार व प्रचार वारीच्या माध्यमातून केला. अनेक वारकऱ्यांना संस्थानशी कायमचे जोडले, त्यांच्यात डोळस भक्तीची ज्योत जागवली.

    तीच धुरा आज समर्थपणे श्री गजानन महाराज संस्थान अतिशय सुत्रबद्ध नियोजनाद्वारे अविरतपणे सांभाळत आहे. आजमितीला शेगांव संस्थानरच्या प्रमुख उत्सवात लाखो दिंड्या येताना आपणास दिसतात त्याचे बीज खऱ्या अर्थाने पाटील वंशानेच "गुरुआज्ञा प्रमाण मानून पेरले. " नियम, शिस्त स्वच्छता आणि कारभारातील पारदर्शकता यांचे काटेकोर पालन श्री कृपेने, श्री शिवशंकर भाऊ पाटील १९६९ पासून आजतागायत.

    सर्वेसर्वा असूनही निष्ठावानसेवक रूपाने कार्य करीत आहेत. कुठलाही डामडैल न बाळगता तब्बल ४२ वर्षे श्रीमहाराजांची सेवा निष्ठेने अविरतपणे करीत आहेत. त्यांचे पुत्र श्री निळकंठदादा पाटील यांनीही आपले जीवन श्री चरणी वाहीले आहे.

    श्री हरी पाटील ते श्री निळकंठ पाटील या प्रवासातील सर्व पाटील मंडळींनी शेगावमध्ये भक्तीप्रेमाचा सात्वीक मळा फुलवला, तो सदा टवटवीत राहील याची खबरदारी घेतली, त्याला शिस्त व नियमांचे कुंपण घातले. श्रीमहाराजांच्या सेवेबरोबरच श्रींच्या भक्तांची सेवा व्हावी हा परमोच्च विचार श्रीगजानन महाराज संस्थान करीत आहे. संस्थनच्या अनेक सेवा प्रकल्पातून आपणास ते दृश्य स्वरूपातून पहावयास मिळत आहे.

    कर्मयोगी श्री शिवशंकरभाऊ पाटील म्हणजे सात्वीकता, नम्रता आणि त्यागाचं मुर्तिमंत प्रतिक म्हणून श्री महाराजांच दर्शन घेतल्यानंतर ओढ लागते श्री शिवशंकरभाऊंच्या भेटीची. प्रत्येक वारीस त्यांची भेट घेणं शक्य नसलं तरी त्यांच्या आठवणीने माझे कर आपोआप जुळतात. निष्ठा आणि कर्माचा सागर असलेल्या भाऊंना माझा कोटी-कोटी प्रणाम !

    --श्री बाळकृष्ण कुलसंगे

    संस्थापक: श्री गजानन महाराज मंदिर
    उल्हासनगर - ३ जि. ठाणे

    मो. ९४२२६७०४४८
    साभार – गुरुतत्व मासिक, वर्ष ३ रे, अंक ३ रा (अंक २७)

      October 6, 2022