वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
ही मूळची जपानी पद्धत आहे. बोन म्हणजे लहान, साय म्हणजे झाड. छोट्या कुंडीत झाड वाढवून त्याची मुळे, फांद्या छाटून छोट्या कुंडीला शोभेल असा वेगवेगळा आकार देणे म्हणजे बोनसाय. परंतु ते लावणे, वाढवणे व त्यासाठी झाडाची निवड करणे यामागे मोठे शास्त्र आहे. त्या त्या पद्धतीने ते तयार केले तर कुणीही बोन्साय आपापल्या घरात व घराजवळच्या जागेत वाढवू शकतात व त्याला एक वेगळे असे सौंदर्य आहे. त्यासाठी मात्र विशिष्ट प्रकारचीच झाडे लागतात.
१) बहुवर्षावू असे झाड, कायम हिरवे राहणारे, पानगळ न होणारे झाड,
२) झाडाला भरपूर उपफांद्या फुटू शकतात अशी झाडं निवडावी,
३) स्टर्डी प्लँट, छाटणी ज्याला सहन होवू शकेल असे झाड, निरोगी, टवटवीत रोप, रोपाला बोन्साय करताना भरपूर मुळ्या फुटलेल्या असाव्या, तसेच बर्याच फांद्या व पाने आलेली असावी, त्याच्या फांद्या, खोड व पानं हेच याचे सौंदर्य असते. त्यामुळे बारीक, जाडसर, लुसलुशीत चमकदार पान असलेलं झाड निवडावं. झाडाचा बुंधा म्हणजे खोड भक्कम, दणकट व जाड असावे. बोन्साय मध्ये झाडाला रोगट अथवा मलूल करायचे नसते तर टवटवीत व रसरशीत करायचे असते. म्हणून पाम वर्गीय झाड नको.
खुजी झाडं आधी शोधून ती साध्या कुंडीत आधी काही दिवस सेट करावी आणि नंतर बोन्सायच्या कुंडीत लावावी. यासाठी झाडं निवडताना - गुलमोहोर, चिच, आवळा, वड, पिपळ, नारिगी, आंबा, फायकस, स्नोबुश, कुफीया, जेड, अरालिया, अॅडेनियम, ज्युनिफर, नारिगी, चायनीज, बोगनवेलिया, उंबर इत्यादी जाड बुंध्याची, भरपूर फांद्या असलेली, छोट्या पानांची झाडं यासाठी निवडावी. ती ‘पेरेनिल‘ असावी म्हणजे सिझनल नकोत. झाडांना बोनसाय रूप देण्याच्या दोन पद्धती आहेत.
१) बोनसायसाठी मुद्दाम खुजवलेले रोप घेऊन ते अरुंद व उथळ कुंडीत किवा जागेत लावावे. अरुंद जागेत लावल्यामुळे त्याची मुळं पसरणार नाहीत. आणि झाड उंच वाढणार नाही. एखाद्या रोपाची वाढ सावकाश होत असेल तर त्याच्या फांद्या आकर्षक पद्धतीने कापा. ही साधी व सोपी पद्धत.
२) या दुसर्या पद्धतीत बोनसाय तयार करताना जरा मेहनत घ्यावी लागते. आठ ते दहा इंच उंच आणि बारा ते पंधरा इंच रुंद कुंडी घ्यावी. उथळ परळ वजा कुंडी, मातीची सिरॅमिक्सची किवा बोन चायनाची कुंडी यासाठी वापरावी. कुंडीच्या बुडाला मध्यभागी दोन भोकं असावीत.
कुंडी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य
१) उथळ कुंडी, तांब्याची तार, प्लॅस्टिकची जाळी, चाळण्या चार प्रकारच्या, पकड, कटर, कात्री.
१) विटांचा चुरा चार प्रकारचा - मोठा, मध्यम, बारीक, त्यापेक्षा बारीक.
२) तशीच पोयटा माती चार चाळण्यातून चाळलेली.
३) शेणखत - तेही चार प्रकारच्या चाळण्यातून चाळलेले वेगवेगळे गंज करून ठेवावे. तांब्याचीच तार कुंडी भरताना वापरावी म्हणजे ती गंजत नाही व व्यवस्थित वाकते, पाहिजे तेवढी ताठ किवा कडक राहते. ही तार तुटत नसल्यामुळे पुन्हा पुन्हा वापरता येते.
बोनसायची कुंडी उथळ असल्यामुळे ते झाड तारेने बांधून ठेवावे लागते. शिवाय तारेमुळे झाडाला आपण हवे त्या दिशेने वाकवून त्याला योग्य असा आकार देऊ शकतो. बोनसायची कुंडी उथळच असावी. बुंधा जाड असलेले कोठलेही झाड त्यात छान दिसते. नारळ किवा पामवर्गीय झाड या प्रकारासाठी चालत नाही. बोनसायसाठी तीन प्रकारचे मिक्श्चर लागते. जाड, मध्यम आणि बारीक पोयटा माती * कुजलेले शेणखत * विटांचे तुकडे. चार प्रकारच्या चाळण्यांनी ते चाळून घ्यावे. पावसाळ्यांच्या सुरुवातीला बोन्साय शक्यतोवर करावे. चारही चाळण्यातून गाळलेले साहित्य वेगवेगळे ठेवावे. त्याप्रत्येकाचा जाड माती * जाड विटांचा चुरा * जाड शेणखत यांचा एक ढीग मध्यम माती, विटांचा चुरा, शेणखत यांचा एक ढीग त्यापेक्षा बारीक माती * शेणखत * विटांचा चुरा असे तीन ढीग नंतर एकत्र करून ठेवावे. कुंडी स्वच्छ धुवून घ्यावी तिला आतून चिमुटभर मुंग्याची पावडर शिपडावी. त्यानंतर तिला तांब्याची तार दोन्ही छिद्रातून ओवून त्याच्या दोन्ही टोकावर छोटे प्लॅस्टीकच्या जाळीचे तुकडे ओवावे. ती तार बुडाशी पकडने घट्ट बांधून घ्यावी. तारेचे एक टोक वर पर्यंत ठेवावे. तार साधारण १० ते १२ इंच लांब घ्यावी.
प्रथम कुंडीत जाड मिश्रणाचा पातळ थर द्यावा. त्यानंतर मध्यम मिश्रण चांगले दाबून भरावे. बोनसायसाठी जे झाड घ्यायचे ते पिशवीतून वाढून त्याच्या मूळ्या चांगल्या झटकून घ्यावे. जास्तीची तंतुमुळे किवा लांब मुळ कट करून घ्यावी व उरलेली मुळं कुंडीतील मिश्रणावर किवा एखाद्या छोट्या खंगर दगडावर नीट बसवून घ्यावी, त्यावर पुन्हा मध्यम मिश्रण दाबावे. त्यावर पातळसा थर बारीक गाळलेली मिश्रणाचा टाकावा व कुंडी टबात पाणी घेऊन त्यात बुडवून ठेवावी. मिश्रण बुडेल एवढे टबात पाणी नको. केशाकर्षणाने पाणी हळूहळू खालून वरपर्यंत कुंडीत येईल. कुंडी पूर्ण ओली झाली की मग ती कमी उन्हाच्या जागेत ठेवावी. साधारण आठ दिवसात झाड लागल्याचे कळून येते. दोन-तीन वर्षांनी कुंडीतील माती बदलून त्याच्या मुळांचीही काटछाट करणं बोनसायसाठी आवश्यक असते. रोपाच्या मुख्य मुळाच्या आसपासची उपमुळंही कापावी लागतात. मुख्य मुळ बरच टोकदार असेल तर त्याचा टोकदार भागही छाटून टाकावा. रोपाच्या फांद्याही मधून मधून छाटाव्या म्हणजे भरपूर उपफांद्या फुटू शकतात. यावर मॉस ठेवले तर कुंडी थंड राहते व रोप ताजं व टवटवीत राहते.
काळजी - बोनसायला थोडेच पाणी लागते. परंतु नियमित घालावे लागते. दररोज सकाळ - संध्याकाळ थोडेशे पाणी घालावेच. दिवसातून थोडा थोडा वेळ उन्हात ठेवावे. त्यामुळे रोपाची वाढ चांगली होते. रोग किडीपासून सावध राहावे. महिन्या दोन महिन्यानी एकदा रोगोरची हलकीशी फवारणी करावी (१ लिटर पाण्यात तीन थेंब याप्रमाणात) २-३ महिन्यातून एकदा लिक्वीड खत घालावे. दिवसातून दोन - तीन तास घरात उन येत असेल अशा जागी बाल्कनीत, खिडकीत, घराजवळील जागेत याची कुंडी ठेवावी. ‘बोनसाय‘ करायला आणि जोपासायला जरी अवघड असलं तरी त्याच्या सौंदर्याला तोड नाही. या कुंडीवरील बारीक बारीक फुलं, पानं, फळं फारच आकर्षक दिसतात. शिवाय एकदा छोट्या कुंडीत झाड लावले की ते १५-२० वर्षही त्यातच राहू शकते व सुंदर दिसते. किबहूना तेच त्याचे खरे सौंदर्य आहे.
ज्याच्या डोक्यात डैंड्रफ असतो त्याला बर्याचवेळा आपली मान खाली टाकावी लागते. डोक्यात पांढर्या रंगाचा कोंडा प्रत्येकाला दिसून येतो. जर तुमच्या डोक्यात कोंडा आहे आणि तुम्ही हजारो शँपू आणि तेल लावून लावून त्रस्त झाले असाल तर, एलोवेरा ट्राय करा.
एलोवेरा जेल डोक्याच्या त्वचेला नमी पोहोचवते, ज्यामुळे डोक्यातील ड्रायनेस पूर्णपणे ठीक होण्यास मदत मिळते. कोंडा एक प्रकारचा फंगस फैलवते म्हणून आम्ही तुम्हाला एलोवेरा जेलमध्ये काही वस्तू मिसळायला सांगू जे या फंगसाचा पूर्णपणे सफाया करून देईल.
एलोवेरा जेलच्या मदतीने तुम्हाला कोंड्यामुळे होणार्या खाजेेपासून सुटकारा मिळेल. तर जाणून घेऊ कोंड्याला एलोवेरा जेलच्या मदतीने कसे दूर करू शकता.
ताजे एलोवेरा जेल
याला प्रयोग करण्यासाठी एलोवेराच्या झाडापासून 3 चमचे एलोवेरा जेल काढा आणि बोटांनी आपल्या डोक्याच्या स्कलवर लावा. असे केल्याने डोक्याला नमी मिळेल. याने डोक्याची मसाज करा आणि रात्रभर तसेच ठेवा व सकाळी शँपूने डोकं धुऊन घ्या.
एलोवेरा जेल आणि टी ट्री ऑइल
जर एलोवेरासोबत टी ट्री मिसळलं तर याचे गुण दुप्पट होतात. टी ट्री ऑयलमध्ये जंतूंना मारण्याची शक्ती असते. हे तेल एंटीबॅक्टीरियल गुणांनी भरलेले असते व कोंड्यापासून मुक्ती मिळवतो. या पेस्टला बनवण्यासाठी एका लहान वाटीत 3 चमचे एलोवेरा जेलमध्ये 5-7 थेंब टी ट्री ऑइल मिक्स करा. या पेस्टला डोक्यावर लावा आणि रात्रभर सोडून द्या. त्याला सकाळी पाण्याने धुऊन घ्या.
एलोवेरा आणि कडूलिंबाचे तेल
कडू लिंबाचे तेल एंटीबॅक्टीरियल आणि एंटी फंगल गुणांनी भरलेले आहे, जे तुम्हाला कोंड्यापासून मुक्ती मिळवून देईल. जर तुम्ही आठवड्यातून दोन वेळा प्रयोग कराल तर तुमच्या डोक्यातील कोंडा नेहमीसाठी दूर होईल. या पॅकला बनवण्यासाठी 2-3 चमचे एलोवेरा जेल मध्ये 10-12थेंब लिंबाचे तेल मिसळा. मग त्याला डोक्यात रात्रभर लावून ठेवा. नंतर त्याला सकाळी पाण्याने धुऊन घ्या.
एलोवेरा आणि कापूर
सर्वात आधी कापुराची पूड करा. 3 चमचे एलोवेरामध्ये अर्धा चमचा कापूर पूड मिक्स करा. या मिश्रणाला आपल्या डोक्यात लावा आणि 2 मिनिटापर्यंत मसाज करून 1 तासासाठी सोडून द्या. या नंतर तुम्ही तुमच्या डोक्याला साद्या पाण्याने धुऊन घ्या. तुम्हाला वाटत असेल तर या पेस्टला रात्रभर लावून सोडू शकता.
एलोवेरा जेल आणि लिंबाचा रस
एक दुसरी पेस्ट म्हणजे एलोवेरा आणि लिंबाच्या रसाचे मिश्रण. लिंबू एक प्राकृतिक ऍसिड आहे जो कोंडा उत्पन्न करणार्या फंगसचा सफाया करतो. या पेस्टला तयार करण्यासाठी 3 चमचे एलोवेरा जेलमध्ये 2 चमचे लिंबाचा रस मिसळा. नंतर बोटांनी याला स्कलपर्यंत लावून मसाज करा. रात्रभर त्याला तसेच राहू द्या आणि सकाळी केस धुऊन टाका.
सुषमा मोहिते
आरोग्यदूत WhatsApp ग्रुपवरुन
खाली दिलेले सोपे नियम पाळल्यास तुमच्या पासून आजारपण आणि म्हातारपण दोन्ही लांब राहील.... स्लिम अँड फिट राहाल....
कायम तारुण्याचा अनुभव......
1. रात्री जास्तीजास्त उशीर म्हणजे 10.00 ला झोपणे.
2. सकाळी 5.00 -5.30 किंवा त्याचा आत उठणे.
3. ब्रश करायच्या आधी एक गलास गरम पाणी लिम्बु पिळून हळू हळू एकेक घोट करून पिणे.
4. 10 मिनिटे वज्रासनात बसणे.
5. कमीत कमी फक्त 10 सूर्यनमस्कार जास्तीत जास्त 25 हळुवार पणे घालणे.
5. फक्त 10 मिनिटे प्राणायाम कमीतकमी.
6. रोज न चुकता एक आवळा किंवा अवळ्याचा रस.
7. 8.30-9.00 वाजता भरपूर नाष्टा (या वेळेत जेवण केल्यास उत्तम)
8. 12.30 ला थोडे हलके जेवण.
9. ऑफिस मधेच दर 1 तासानी खुर्चीवरच हात पाय स्ट्रेचिंग करणे.
10. संध्याकाळी 7 - 7.30 ला एकदम कमी जेवण.
11. कंपल्सरी 15 मिनिटे तरी वज्रासन मध्ये बसणे.
12. 10.00 वाजता 1 ग्लास गरम पाणी पिणे आणि 10.00 ला झोप.
या खबरदारी घ्या...
*रात्रीच्या जेवणानन्तर चालायला जाणे टाळावे, किंवा थोडेच चालावे, याला शतपावली म्हणतात.... म्हणजे शंभर पावले चालणे....
लोकं 5-5 किलोमिटर घाम गाळत चालून येतात रात्री....
* जेवणाच्या अगोदर अर्धा तास आणि जेवण नंतर एक तासाने पाणी पिणे, पचन शक्ती चांगली ठेवायची असल्यास जेवताना अजिबात पाणी पिऊ नये.
* रोज कमीत कमी 3 लिटर पाणी प्यावे.
* फक्त सिजनल फळेच खावी
* सर्वाना हात जोडून विंनती अशी कि कोल्डड्रिंक पिणे टाळावे, खूप वाईट आहे.
* डाव्याकुशीवर झोपावे.
* सकाळी 5 मिनिटे तरी उन्हात उभे राहावे.
* एक लक्षात घ्या, आपले पोटाचे कार्य चांगले चालू असल्यास कुठलाही आजारपण येत नाही,
आणि
वर दिलेले सर्व च्या सर्व उपाय पोटाचे कार्य उत्तम चालण्यां साठीच आहेत.
संकलन व् प्रसारण
।।क्रीडाभारती पुणे।।
आरोग्यदूत WhatsApp ग्रुपवरुन
शिवांबु बद्दल आपल्या मनात पूर्व संस्कारामुळे घ्रूणा, शिसारी असते. त्यामुळे इच्छा असूनही मनाची तयारी होत नाही. त्यामुळे शिवाबु उपचार चटकन स्विकारला जात नाही. आजाराच्या तीव्रतेने मनाचा निश्चय झाला तरी शिवांबुने भरलेला ग्लास तोंडाशी नेल्यावर सुध्दा ते पिण्यापासून पराव्रुत्त होण्याचा संभव असतो. एक गोष्ट आपण लक्षातघेणे गरजेचे आहे ते म्हणजे शिवाम्बु हे रक्तापासून तयार होते. ते टाकाऊ नाही. ह्यासाठी पुढील प्रमाणे सुरुवात करावी.
एका ग्लासात(अंदाजे२००मि.ली.) प्रथम एक चमचा शिवांबु घाला. नंतर ग्लास पाण्याने भरा. आता ह्यात जवळ जवळ सर्व पाणीच आहे. कारण शिवांबूत ९५% पाणीच असते. आता ह्या पाण्याची चूळ भरा. चूळ भरल्याने पाण्याची चव कळेल ती पाण्यासारखीच लागेल. मग ग्लासातील उरलेले पाणी औषध म्हणून प्या.
पुढील वेळेस २ चमचे शिवांबु घेऊन पाणी घालून प्या. हे दोन चमचे शिवांबु घातलेले पाणी घेणे सोपे असते कारण पहिल्या वेळी एक चमचा शिवांबु पोटात गेलेले असते. त्यामुळे मनाची तयारी झालेली असते.
पुढील प्रत्येक वेळी शिवांबुचे प्रमाण थोडे थोडे वाढवत जावे.
निम्मा ग्लास शिवांबु व निम्मे पाणी घेऊ लागले की हे प्रमाण पुढे एक महिना तसेच ठेवावे.
नंतर नुसते शिवांबु घ्यावे.
निम्मे पाणी व निम्मे शिवाम्बु घ्ययला सुरूवात केली की लगेचच शरीर शुद्धीला सुरूवात होते.
बीपी व शुगर असणार्याना सुरूवात करताना नुसते शिवांबु घेतले तर बीपी शुगर प्रथम वाढण्याची शक्यता असते अर्थात हे फार दिवस टिकत नाही आणि प्रत्येकाचे वाढतही नाही तसेच काही दिवसांनंतर कमीही होते. पण आजार वाढला की घाबरायला होते. म्हणून पहिला महिना तरी निम्मे पाणी घालून घ्यावे. निम्मे पाणी घातले तरीही तब्बेतीत चांगला फरक जाणवतो.
अरविंद जोशी
९४२१९४८८९४
आरोग्यदूत WhatsApp ग्रुपवरुन
अपुरी झोप, तणावग्रस्त जीवनशैली , अरबट-चरबट फास्ट फूड खाणे अशा एक ना अनेक कारणांनी शरीरात पित्ताचे दोष निर्माण होतात . तीव्र डोकेदुखी , छातीत जळजळ ,उलट्या होणे ,अस्वस्थ वाटणे अशी पित्ताची लक्षणे दिसून येतात . मग पित्तावर उपाय म्हणून बाजारात उपलब्ध असलेली विविध रूपातील ‘एन्टासिड्स’(आम्लता नष्ट करणारा अल्कलाइन पदार्थ) ही निष्फळ ठरतात , तेव्हा आजीच्या बटव्यातील हे .......
1) आरामदायी केळं :
केळ्यातून शरीराला उच्च प्रतीच्या पोटॅशियमचा पुरवठा होतो त्यामुळे पोटात आम्ल (acid ) निर्मितीची प्रक्रिया मंदावते . तसेच ‘फायबर’ शरीराची पचनक्रिया सुलभ करते. फळांमधील काही विशिष्ट घटकांमुळे अम्लांच्या विघातक परिणामांपासून आपले रक्षण होते.
- पित्त झाल्यास पिकलेले केळ खाल्याने आराम मिळतो. केळ्यातील पोटॅशियम विषहारक द्रव्य म्हणून काम करते व पित्ताचा त्रास कमी होतो.
2) फायदेशीर तुळस :
तुळशीमधील एन्टी अल्सर घटक पोटातील / जठरातील अम्लातून तयार होणाऱ्या विषारी घटकांपासून बचाव करते.
– तुम्हाला पित्ताचा त्रास जाणवत असल्यास किंवा अस्वस्थ वाटत असेल तर ४-५ तुळशीची पाने चावून खा .
3) अमृतरुपी दुध :
दुधातील कॅल्शियमच्या घटकांमुळे पोटात तयार होणारी विघातक आम्ल निर्मिती थांबते व अतिरक्त आम्ल दुध खेचून त्याचे अस्तित्व संपवते . थंड दुध प्याल्याने पित्तामुळे होणारी पोटातील व छातीतील जळजळ कमी होते.
– दुध हे पित्तशामक असून ते थंड तसेच त्यात साखर वा इतर पदार्थ न मिसळता प्यावे . मात्र त्यात चमचा भर साजूक तूप घातल्यास ते हितावह होते.
4) बहुगुणी बडीशेप:
बडीशेपमधील एन्टी अल्सर घटक पचन सुधारते व बद्धकोष्ठता दूर करते . बडीशेपमुळे पोटात थंडावा तयार होऊन जळजळ कमी होते.
– बडीशेपाचे काही दाणे केवळ चघळल्याने देखील पित्ताची लक्षणे कमी होण्यास मदत होते. तसेच पित्तामुळे अस्वस्थ वाटत असल्यास , बडीशेपाचे दाणे पाण्यात उकळून ते रात्रभर थंड करून ठेवलेले पाणी प्यायल्याने आराम मिळतो.
5) पाचक जिरं :
जिऱ्याच्या सेवनामुळे शरीरात काही लाळ निर्माण होते , ज्यामुळे पचन सुधारते , मेटाबॉलीझम सुधारते आणि शरीरातील वायू व गॅसचे विकार दूर होतात .
– जिऱ्याचे काही दाणे केवळ चघळल्यानेदेखील आराम मिळतो . किंवा तुम्ही जिऱ्याचे दाणे पाण्यात उकळून ते पाणी थंड करून प्या.
6) स्वादिष्ट आणि गुणकारी लवंग :
लवंग चवीला तिखट असली तरीही लवंग अतिरिक्त लाळ खेचून घेते , पचन सुधारते आणि पित्ताची लक्षणं दूर करते . लवंगामुळे पोटफुगी व गॅसचे विकार दूर होतात.
- जर तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर लवंग दाताखाली पकडून ठेवा , त्यातून येणारा रस काहीकाळ तोंडात राहू द्या . यारसामुळेच पित्ताची तीव्रता कमी होते. लवंगेमुळे घश्यातील खवखवही कमी होते.
7) औषधी वेलची:
आयुर्वेदानुसार वेलची शरीरातील वात, कफ व पित्त यांमध्ये समतोल राखण्याचे काम करते . स्वादाला सुगंधी व औषधी गुणांनी परिपूर्ण वेलचीच्या सेवनाने पचन सुधारते. पित्ताचा त्रास कमी होतो.
- पित्तापासून आराम मिळवण्यासाठी वेलचीचे दोन दाणे ठेचून (सालीसकट / सालीशिवाय ) ती पाण्यात टाकून उकळा , हे पाणी थंड झाल्यावर प्यायल्याने पित्तापासून तात्काळ आराम मिळेल .
8) वातहारक पुदिना :
पुदिना पोटातील आम्लाची तीव्रता कमी करतो . पुदिन्यातील वायूहारक गुणधर्मामुळे पचनक्रिया सुधारते. पुदिन्यातील थंडाव्यामुळे पोटदुखी व जळजळ थांबते .
- पित्ताचा त्रास होतअसल्यास काही पुदिन्याची पाने कापा व पाण्यासोबत उकळा . थंड झाल्यावर हे पाणी प्या. अपचनावरदेखील पुदिना गुणकारक आहे. पुदिन्यातील ‘मेन्थॉल’ पचण्यास जड पदार्थ खाल्ल्याने होणारा त्रास , डोकेदुखी तसेच सर्दी दूर करण्यास मदत करतो.
9) आल्हाददायक आलं :
आलं या औषधी मुळाचा भारतीय स्वयंपाकघरात प्रामुख्याने वापर केला जातो . आल्याच्या सेवनाने पचन सुधारते . तसेच पोटातील अल्सरशी सामना करण्यास आल्याचा फायदा होतो . आल्यातील तिखट व पाचकरसांमुळे आम्लपित्त कमी होते.
- पित्तापासून आराम मिळवण्यासाठी आल्याचा एक लहान तुकडा चघळत रहा. तुम्हाला जर आलं तिखट लागत असेल तर ते पाण्यात टाकून उकळून ते पाणी प्या . किंवा तुम्ही आल्याचा तुकडा ठेचून त्यावरथोडा गुळ टाकून चुपत रहा.
10) पित्तशामक आवळा :
तुरट , आंबट चवीचा आवाळा कफ आणि पित्तनाशक असून त्यातील ‘व्हिटामिन सी’ , अन्ननलिका व पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करते .
-रोज चमचाभर आवळ्याची पावडर / चूर्ण घेतल्यास पित्ताचा त्रास होत नाही .
- कच्चा आवळा मिठासोबत खाल्ल्यास शरीरास सर्व रस (षड्रस) मिळतात.
गोड , खारट , तुरट , कडू आणि तिखट या पाच चवींनी युक्त लसणाचे वैशिष्ट्य हे आहे कि खारट रस नैसर्गिकरित्या असणारा एकमेव कंद आहे … खरं पाहायला गेलं तर लसूण खरोखरच अमृत असावा ....
संस्कृत मध्ये याला रसोन म्हणतात. रस + ऊन म्हणजे एक रस उणे असणारा …
लसूण हे कांद्याच्या परिवारातील एक कंदमूळ आहे. एलियम सॅटायव्हम या वनस्पतीच्या कंदाच्या पाकळ्या म्हणजे लसूण होय. जगातील अर्जेटिना, बल्गेरिया, चीन, भारत, इटली, मेक्सिको, रशिया, अमेरिका आदी देशांत याची लागवड केली जाते. परंतु उत्पादनात चीनचा पहिला तर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. कांद्याप्रमाणे कच्च्या लसणाचा स्वाद आणि चव उग्र असते. परंतु शिजवला असता त्याची चव गोडसर होते. भारतीय मसाल्यांमध्ये, सॉस, चटण्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर वापर केला जातो. अशा या लसणाचे जीवाणूविरोधी, अँटिबायोटिक, अँटिसेप्टिक असे कितीतरी गुणधर्म आहेत. लसणात ऍलिसीन (dllicin) नावाचे सल्फर कंपाउंड आहे. या ऍलिसीनमुळे लसणात ऍण्टीबायोटिक व बुरशीजन्य आजारांना प्रतिबंध करण्याचा गुण दिसून येतो; परंतु या उडणशील द्रव्याचा फायदा मिळविण्यासाठी लसूण चिरणे किंवा चावून खाणे गरजेचे आहे. लसणाची पाकळी तशीच गिळल्यास औषधी गुणांचा फायदा मिळत नाही.
भारतीय जवळजवळ प्रत्येक घरात भाज्यांत लसूण वापरली जाते. पदार्थाची चव वाढविण्यासाठी लसूण हिचा गुणधर्म आहे. बहुतेक लोक फक्त अन्न शिजविण्यासाठी मसाले वापरत असले तरी लसूण वापरतात. लसूण ही औषध म्हणून फायदेशीर आहे. लसूण अनेक रोगांवर फायदेशीर ठरली आहे.
लसूण शरीराची प्रतिकार शक्ती वाढते. कर्करोग सारख्या गंभीर रोग लढण्यासाठी मदत करते. वैद्यकीयदृष्ट्या कोलोस्ट्रोल कमी करण्यास मदत करते. स्तनाचा आणि कर्करोग कमी करण्यासाठी लसूणीच्या कच्च्या पाकळ्या खाणे केव्हाही चांगल्या. शरीरातील टी-सेल्स, फॅगोसाईट्स, लिंफोसाई्टस आदी प्रतिरोधक तत्व वाढणिवण्यास लसूण मदत करते. प्रतिरोधक घटक आरोहित आणि शरीराची प्रतिकार वाढविण्यासाठी लसूण महत्वाची भूमिका बजावते. वाढता रक्तदाब नियंत्रणात आणण्यात लसूण उपयोगी ठरते.
लसूण खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. आपले हृदय नेहमी तंदुरुस्त ठेवण्यास लसूण मदत करते. शरीरात वाढणार कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल पातळी दूर करणे सोपे आहे. उच्च रक्तदाब आणि रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी लसणाच्या दोन कच्या पाकळ्या खाणे आवश्यक आहे.
आपल्या वायू पोटात तयार होतो किंवा आपण बद्धकोष्ठता समस्येने अस्वस्थ आहेत तर लसूण आपल्यासाठी खूप फायदेशीर असेल. काही काळ नियमितपणे लसूण खाण्यात समाविष्ट केले तर त्याचा लाभ चांगला होतो. लसूण बारीक करुन गरम दूध आणि गरम पिण्यातून पिणे चांगले. सांधे दुखी किंवा कमर दुखीवर हे पाणी अधिक गुणकारी आहे.
आपली श्रवण क्षमता वाढविण्यासाठी लसूण चांगली. तिळाच्या तेल्यात लसूण बारीक करुन ते गरम करायचे. थंड झाल्यावर ते तेलाचे काही थेंब कानात टाकल्यास कान दुखणे थांबतो. हे जर तुम्ही नियमित केल्यास तुमची ऐकण्याची क्षमता वाढते. कान दुखण्यावर आराम मिळतो. लसूण अनेक रोगांवर रामबाण उपाय आहे.
लसणाचे उपयोग :
१. कफाशी संबंधित आजार झाल्यास लहान मुलांची गळ्यात लसणीच्या कांड्याची माळ गळ्यात घालतात .
२. लसणाची पेस्ट करून त्याचा लेप आमवातासारख्या सूज असणाऱ्या व्याधीत करतात .
३. बरगडीत वेदना होत असतील लसणाचा रस चोळावा.
४. गजकर्णासारखा खाज असलेला त्वचारोग लसणाचा रस नियमित चोळला असता बरा होतो .
५. किडा चावल्याने वेदना आणि खाज येत असेल तर लसणाचा रस चोळावा .
६. कानात वेदना होत असेल तर कानात लसूण रस घालून आटवलेले गोडेतेल सोडावे . हेच तेलं छातीवर चोळले तर कफ असूनही कोरडा वाटणारा खोकला बरा होतो .
७. भूक न लागणे , तोंडाला चव नसणे, अजीर्ण, पोटात वेदना, जंत, अशा आजारात लसणाचे नित्य सेवन करावे .
८. भात खाल्ल्याने पोट फुगत असेल तर लसूण घालून शिजवलेला भात खायला द्यावा .
९. हृदयाची अतिउत्तेजना कमी करून हृदयाला आलेली सूज लसूण कमी करतो .
१०. ३० मि.ली. दुधामध्ये लसणाच्या पाच पाकळ्या घालून दूध चांगलं गरम करावं. दररोज असं दूध प्यायल्याने जुनाट खोकला, दमा, क्षयरोग यांचा नाश होतो .
११. लसूण मनाची मरगळ घालवतो .
१२. हाड मोडले असता लसूण घालून उकळलेले दुध दिले असता हाड लवकर सांधले जाते .
१३ . लसणामध्ये नैसर्गिक रित्या गंधक असते . कच्चा लसूण खाल्ला तर त्यातल्या गंधकाचे उत्सर्जन त्वचेतून घामावाटे होते . कुजणाऱ्या/ सडणार्या कुष्ठरोगात याचा विशेष फायदा होतो .
१४. तापावर औषध म्हणून लसूण वापरता येतो . जुनाट तापावर , किंवा थंडी वाजून येणाऱ्या तापावर लसूण चांगला आराम देतो ….
१५. लसूण कीटकनाशक असून दररोज लसूण खाल्याने टीबीचे विषाणू मरण पावतात.
१६. अँटिबायोटिक औषधांना लसूण हा एक उत्तम पर्याय आहे. लसणाच्या एका कांडीचे चार भाग करून दोन्ही वेळच्या जेवणानंतर अध्र्या तासाने त्यातील दोन तुकडे ठेवून चघळावे नंतर पाणी प्यावे.
१७. डोकेदुखीवरही लसूण हा रामबाण उपाय आहे. लसणाच्या चार पाकळ्या ३० ग्रॅम मोहरीच्या तेलात घालून ते तेल कोमट करून डोक्याला लावल्याने डोकेदुखी थांबते. कान दुखत असल्यास हेच तेल कानात घालावे. त्वरीत आराम पडतो.
१८. ज्वरनाशक असून हाडांतला तापही यामुळे बरा होतो.
१९. शरीरास हानिकारक असलेल्या रक्तातील कोलेस्ट्रॉलला नियंत्रित ठेवण्याचे काम लसूण करते. म्हणूनच दैनंदिन आहारात दोन ते तीन लसूण पाकळ्यांचा जरूर वापर करावा.
२०. संधिवात व आपवाताचा त्रास असणाऱ्यांनी त्यांच्या रोजच्या आहारात लसणाचा समावेश केल्यास “शूल’ कमी होण्यास मदत होते. लसूण खाल्ल्याने काही लोकांना ऍसिडिटी होते. अशांनी लसूण 2-3 तास दुधात भिजवून मग खावा व भरपूर पाणी प्यावे.
२१. लसूण हा कर्करोग प्रतिबंधकदेखील आहे. लसूण नियमित खाण्यात असल्यामुळे जठर व आतड्याच्या कॅन्सरचा धोका कमी होतो, असे एका शास्त्रीय पाहणीत आढळून आले आहे. प्राण्यांवर केलेल्या एका संशोधनात लसणामुळे ट्यूमर कमी झालेला आढळून आला.
काळजी :
लसूण तीक्ष्ण, उष्ण असल्याने पित्त प्रकृतीच्या व्यक्ती, गर्भिणी यांना तो वर्ज्य आहे …..
जास्त लसूण खाल्ल्याने त्रास झाला तर माठातील थंडगार पाण्यात धने पावडर भिजवून ते पाणी गाळून थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने पाजावे …
गृहिणींनी भाजी, वरण आमटी व चटणीत लसणाचा सढळ हाताने वापर करावा. त्यामुळे कुटुंबातील सर्वांचे आरोग्य उत्तम राहू शकेल.
आरोग्यदूत WhatsApp ग्रुपवरुन
शिवांबू म्हणजे स्वमुत्र प्राशन करणे. शरीर रक्तापासून मूत्र वेगळे करून शरीराबाहेर टाकते. परंतु हे मूत्र प्राशन केल्याने शरीरातील रोग, त्रास कमी होतात असे अनुभव आहेत. मी गेले ४० वर्षे शिवांबू घेत आहे. माझे वय ७० आहे. शिवांबू घ्यायला सुरवात केल्यापासून मला डॉक्टरची औषधे घ्यावी लागली नाहीत. मी दररोज शिवांबू घेतो. हवा बदल, खाणे यातून ताप येणे, जुलाब, सर्दी, खोकला, लघवीला आग हे होतच असते. त्यावेळी शिवांबू जास्त घेतो. सध्या माझ्या तोंडात दोनच दात शिल्लक आहेत. तरीसुद्धा सर्वकाही खातो. अगदी पिझ्झा, बर्गर, सामोसे, पंजाबी डिशेस सुद्धा खातो. नंतर शिवांबू घेतो. त्यामुळे हे पदार्थ बाधत नाहीत. मी ह्या वयातही माझे लाईफ एन्जॉय करतो. मला डायबेटीस, हार्टचा त्रास नाही. मी गेल्या ४० वर्षात बर्याच लोकांना शिवाम्बुचा सल्ला दिला. ज्यांनी केले त्या प्रत्येकाला फायदा झाला. अगदी डायबेटीस वाल्यांना सुद्धा! काहींची ऑपरेशन्स वाचली. तर काहींची जाडी कमी झाली. त्या अनुभवांचे 'शिवांबू कसे व का घ्यायचे?' हे पुस्तक प्रसिद्ध केले. ते वाचून अनेक लोकांची शिवांबू घेण्याची मनाची तयारी झाली.
फायदे:
शिवांबू हे शरीरच देत असल्याने डायग्नोसिस साठी टेस्ट कराव्या लागत नाहीत.
औषधाला पैसे मोजावे लागत नाहीत किंवा कमतरताही नसते.
ह्यात आपल्याशिवाय कोणीही भेसळ करू शकत नाही.
जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी आपल्या बरोबरच असते.
आपण घेतलेले कुणालाही कळत नाही अगदी लाईफ पार्टनरलासुद्धा!!
शिवांबू सुरु करताना पहिला महिनाभर शिवांबू निम्याला निम्मे पाणी घालून प्यावे.
शिवाम्बुचा सर्वसाधारण डोस वय गुणिले १० मिली असा असावा.
(२० वर्षे * १० मिली = २०० मिली = १ ग्लास/४० वर्षे * १० मिली = ४०० मिली = २ ग्लास)
अरविंद जोशी
९४२१९४८८९४
आरोग्यदूत WhatsApp ग्रुपवरुन
ऋतुनुसार, दिनमानानुसार सर्वसाधारणपणे सकाळी 6 ते 10 हा काल कफाचा, 10 ते 2 पित्ताचा आणि 2 ते 6 हा वाताचा काळ येतो. असेच सायंकाळ पासून सकाळ पर्यंत समजावे.
जेवण हे भूक लागेल तेव्हा घ्यावे. भूक असेल तेवढेच घ्यावे. परंतु सूर्य असेपर्यंतच घ्यावे. म्हणजे सर्व साधारणपणे दिवसा जेवावे. रात्रौ जेवू नये.
व्यवहारात, नियम करायचाच झाल्यास, जेवणाच्या मुख्य वेळा दोन सकाळी नऊ ते अकरा आणि सायंकाळी पाच ते सात.
पण आपण समजा दुपारी बारा वाजता पोटभर जेवलो तर पुनः चरचरीत भूक किती वाजता लागेल ? रात्री 8 वाजता. म्हणजे किती वेळ गेला ? आठ तास. दुपारचे जेवण पचायला फक्त आठ तास.
समजा, रात्री 8 वाजता पोटभर जेवलो तर पुनः भुक कधी लागते ? पित्ताची प्रकृती असलेल्यांना सकाळी नऊ दहा वाजता. आणि इतरांना चरचरीत भूक कधी लागेल? चरचरीत भूक लागेल, दुपारी बारा वाजता. म्हणजे किती वेळ गेला ? सोळा तास. रात्रीचे जेवण पचवायला सोळा तास ?????
दिवसाचे जेवण पचायला फक्त आठ तास आणि रात्रौचे जेवण पचायला तब्बल सोळा तास जातात. एवढा वेळ का लागतो ?
उत्तर सोपं आहे, दिवसा सूर्य असतो म्हणून आणि रात्रौ सूर्य नसतो म्हणून.
आपण हे पाहिलंय की सूर्य म्हणजे अग्नि.
पचन घडवणारा तो सूर्यनारायण. हजर असला तर पचन होणारच ना ! त्यात विशेष ते काय ?
प्रश्न येतो तो, रात्रीचं पचन घडवणार कोण ?
पचन घडवणे म्हणजे नेमके काय हे पण आपण अन्नपचन कसे होते ? या लेखमालेतून पाहिले आहे. पचन म्हणजे रूपांतरण. एका बाह्य घटकद्रव्याचे रूपांतर शरीराला योग्य होईल अशा अवस्थेत बदलवून घेणं. त्याचे शरीरातील वेगवेगळ्या विकरकामार्फत ( एन्झाईम्स) विघटन घडवून आणणे, त्याचे चांगल्या ( उपयुक्त) आणि वाईट (टाकाऊ) भागात विभागणी करणे, चांगल्या भागातून शरीराचे पोषण करवणे, टाकाऊ भाग जवळच्या मलमार्गापर्यंत आणून ठेवणे, इ. कामे करवून घ्यायला, शरीरातील काही उर्जा संपून जाते. म्हणजे पचन घडवून आणायला, रूपांतरण घडवायला, उर्जा निर्माण करायला उर्जा संपून जाते.
या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आता एक रूपक पाहू. हे उदाहरण ग्रंथात लिहिलेलं नाही. पण समजून घेण्यासाठी थोड्या वेळ पुरतं विचारात घेऊ.
आपल्या शरीरात एक बॅटरी आहे. जी सोलर एनर्जी वर चालते. सूर्योदय ते सूर्यास्त असं हिचं चार्जिंग सुरू असतं. जोपर्यंत चार्जिंग सुरू असतं, तोपर्यंत सगळी हेवी ड्यूटी कामे करून घ्यावीत. चार्जिंग संपल्यावर जर बॅटरीकडून काम जास्ती करून घेतलं तर बॅटरी लवकर संपून जाईल, अगदी तस्सच होतं पचनाचं.
सूर्यास्तानंतर या शरीरातील बॅटरी, बॅकअप वर जाते. पचनासाठी लागणारी उर्जा संपू नये असं वाटत असेल तर बॅकअपवर कमीत कमी काम करायचे. म्हणून सूर्यास्तापूर्वी जेवून घ्यावं. जोपर्यंत सूर्य आहे, तोपर्यंत पचन पूर्ण करून घ्यावं आणि पुढील महत्वाच्या कामासाठी ही बॅटरी रिझर्व्ह ठेवावी. सकाळपर्यंत नो प्रॉब्लेम. पचन पूर्ण. उठल्या उठल्या दोन नंबरचा काॅल येणार. आणि संपूर्ण दिवस चांगला जाणार.
सायंकाळी एवढ्या लवकर जेवणार म्हणजे सकाळी लवकर जाग येणार. भूक लागूनच जाग येणार. किंवा कदाचित झोपच लागणार नाही. कारण तशी सवयच नाही ना. गेल्या चाळीस वर्षातील चुका दुरूस्त करायच्या असतील तर थोडा त्रास तर होणारच. काहीजणांची थोडी अॅसिडीटी वाढणार.
हा पोटात पडणारा खड्डा सुखासाठीच असल्याने त्याचं दुःख मानायचं नाही, ( देहे दुःख ते सुख मानीत जावे ) असं आपलं आधीच ठरलं आहे.
कुछ बडा पाने के लिए कुछ छोटा खोना तो पडता ही है दोस्तो !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021
04.03.2017
तुम्हाला केस विंचरण्याची कल्पना नकोशी वाटते का? खाली नमूद केलेली योगासने करून पहा, नक्की लाभ होईल. पण एक गोष्ट लक्षात असू द्या की केस गळतीवर उपचार करण्यापेक्षा ती सुरु होण्या आधीच खबरदारी घेतलेली जास्त उपयुक्त ठरते. केस गळतीवर प्राचीन उपचार पद्धतींबद्दल अधिक माहितसाठी पुढे वाचा
एका सुप्रसिद्ध मासिकाची पाने चाळताना हा लेख मला दिसला. मला खात्री आहे की या आवृत्तीच्या प्रति शिल्लक राहिल्या नसतील कारण सर्वजण सध्या एकाच अडचणी वर विविध उपचार शोधत आहेत आणि तो म्हणजे केस गळणे. तुमच्या सोयीसाठी मी त्यातला काही भाग इथे प्रसिद्ध करत आहे.
खरं म्हणजे आपले केसांचे आरोग्य आपल्या एकूण आरोग्यचे ध्योतक आहे . सुंदर केस हे तुमच्याकडे असलेला आरोग्याचा अनमोल ठेवाच होय.
केस गळतीचे मुख्य कारण म्हणजे: मानसिक तणाव, खाण्य-पिण्याच्या सवयी, व्याधी, आमली पदार्थांचे सेवन, हेअर-डाय चा वापर, अनुवांशिक विकार आणि धूम्रपान.
योग आणि ध्यान केल्याने फक्त केसांची समस्याच दूर होईल असे नाही तर पूर्ण शरीरालाच त्याचा लाभ होऊ शकतो. शारीरिकच नाही तर मानसिक स्वास्थ्यही ह्यामुळे सुधारेल. योगा केल्याने टाळूच्या त्वचेमध्ये रक्ताभिसरण वाढते, पचन प्रक्रिया सुधारते आणि ताण-तणाव कमी होतो.
केस गळती थांबविण्यासाठी उपयुक्त आसने:
पुढे वाकून केलेली सर्व आसनं डोक्यातील व टाळू कडील भागातील रक्ताभिसरण वाढवतात. ह्या मुळे केसांच्या मुळांना पुष्टी मिळते. हा परिणाम काही दिवसातच लक्षात येईल.
१.अधोमुख श्वानासन
हे आसन केल्याने मस्तकात व्यवस्थित रक्ताभिससरण होते ज्यामुळे सायनसचा व सर्दीचा त्रास कमी होतो. मानसिक थकवा, तणाव आणि निद्रानाश ह्या लक्षणांवार मात करण्यासाठी देखील हे आसन उत्तम आहे.
२. उत्थानासन:
थकवा व शीण घालवण्यासाठी हे आसन उत्तम समजलं जातं. रजोनिवृत्ति काळात ह्या आसनाचा खूप लाभ होतो, पचन शक्तीची वृद्धी होते.
३. वज्रासन
हे एकमेव असे आसन आहे जे जेवल्यानंतर लगेच करता येते. मूत्र यंत्रणेचे विकार, वजन कमी होणे, मंदाग्नी ह्यांच्यावर परिणामकारक असे हे आसन आहे. पोटातील निर्माण झालेला वायू कमी करण्यासाठीही वज्रासन उत्तम समजले जाते.
४. अपानासन:
अपान म्हणजेच आपल्या पचन यंत्रणेतील गरळाचे शुद्धीकरणास जबाबदार असलेली उर्जा. हे आसन केल्याने मनाचे स्थर्य येते, बद्धकोष्ठतेवर मात करता येते.
५ .पवनमुक्तासन:
पवनमुक्तासन केल्याने शरीरातील वायूवर नियंत्रण येते व पचन सुधारते. पाठीच्या खालच्या भागातील स्नायू मजबूत होतात. पोट व कुल्ल्यावरील मेद (चरबी) कमी होते.
६. सर्वांगासन:
हे आसन थायरॉईड ग्रंथीना पुष्टी देते ज्यामुळे श्वसनसंस्था, पचनसंस्था, प्रजननसंस्था व कार्यरत राहतात.
केस गळती थांबविण्यासाठी उपयुक्त प्राणायाम:
१. कपालभाती प्राणायाम:
हा प्राणायाम केल्याने मेंदूला अधिक प्राणवायूचा पुरवठा होतो ज्यामुळे मज्जासंस्था अधिक कार्यरत राहते, विषद्रव्यांचा निचरा नीट प्रकारे होते. स्थूलपणा व मधुमेहावरही अत्यंत प्रभावी.
२. भस्त्रिका प्राणायाम:
ह्यामुळे शरीरातील अतिरिक्त वात, कफ आणि पित्ताचा समतोल राहतो. मज्जासंस्थेचे शुद्धीकरण होते ज्यामुळे शरीर स्वस्थ राहते.
३. नाडी शोधन प्राणायाम:
हे हृदयाच्या समस्या, तसेच दमा आणि संधिवात, नैराश्य व डोळे आणि कानाच्या समस्या दूर ठेवते.
लक्षात ठेवण्यासारख्या आणखी काही गोष्टी:
आसनांबरोबरच आपला आहार नियंत्रित ठेवणे खूप आवश्यक आहे. आहार संतुलित असावा ज्या मध्ये ताजी फळं, पाले भाज्या, डाळी, मोड आलेली कडधान्ये आणि दुधा पासून बनलेली उत्पादने ह्यांचा समावेश असावा. ही केस वाढीसाठी महत्वाचे पोषक देते. अशा आहाराने केसांचे व्यवस्थित पोषण होते.
कडुलिंबाच्या पाणयाने केस धुतल्याने, आठवड्यातून २-३ वेळा धूवून स्वछ ठेवल्याने, नारळाचे तेलाने मालिश केल्याने केसांची वाढ उत्तम प्रकारे होते.
केसांवर कोणतीही उग्र रसायने किंवा केस सजवण्याची बाजारू भंपक उत्पादने वापरणे टाळा.
एक गोष्ट मात्र समजून घेतली पाहिजे की केस गळती ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. केस गाळण्याच्या प्रक्रियेची गती कमी करणे शक्य आहे पण गेलेले केस परत येणे सोपे नाही.
मार्च ११, १२ आणि १३ २०१६ रोजी होणारा जागतिक सांस्कृतिक उत्सव (वर्ल्ड कल्चरल फेस्टिवल) म्हणजे दि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सेवा, माणुसकी, अध्यात्म आणि मानवतावादी मुल्ये या क्षेत्रातील ३५ वर्षाच्या कार्याचे पर्व साजरे करणे होय. हा उत्सव म्हणजे संपूर्ण जगभरातील संस्कृतींमधील वैविध्य साजरे करताना मानवी समाजाचे सदस्य म्हणून आपल्यातील एकोप्याचे दर्शन घडवून आणेल.
-- सुषमा मोहिते
आरोग्यदूत या Whatsapp ग्रुपवरुन
कायद्यानुसार; स्वतःला निसर्गोपचारतज्ज्ञ म्हणवणाऱ्या व्यक्तीकडे आयुर्वेदाची BAMS ही पदवी नसल्यास ती व्यक्ती रुग्णांना कोणतेही आयुर्वेदीय औषध वा पंचकर्म इत्यादि देऊ शकत नाही. आपण ज्यांच्याकडून असे उपचार घेत आहात त्यांच्याबद्दल वरील मुद्द्यांबाबत खात्री करून घ्या.
Copyright © 2025 | Marathisrushti