वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
हवाई दलाच्या विमानांचे दोन मोठे अपघात १४ मार्च रोजी झाले. त्यात सुखोई ३०एमकेआय हे लढाऊ विमान अपघातग्रस्त झाले. त्याच दिवशी चेतक हेलिकॉप्टरही अपघातग्रस्त झाले. या अपघातांमध्ये पायलट बचावले. मात्र, जिथे हे अपघात झाले त्या जमिनींवर सामान्य माणसे मात्र जखमी झाली. दोन्हीपैकी सुखोई हे विमान अत्याधुनिक समजले जाते. त्या आधीचे अपघात हे मिग या जुन्या विमानांचे होत असत.
परवा निवडणुकीच्या निमित्ताने एका संस्थेशी संबधित एक सज्जन संचालक गृहस्थ आम्हाला म्हणाले, संचालक म्हणजे लांडगे आहेत. लांडग्यांचा कळप... एक लांडग्याला जमिनीत पुरतात.फक्त मुंडके वर ठेवतात. ते पाहण्यासाठी बकऱ्या जातात तेव्हा लांडगा त्याला हव्या असलेल्या बकऱ्यांचा तोंडात पाय करकचून पकडतो. त्यामुळे अन्य बकऱ्या पळून जातात. मग पकडलेल्या बकरीचा समाचार घ्यायलाl लांडगे लक्ष्याच्या ठिकाणी एकत्र येतात. तेव्हा सज्जन गृहस्थाला आम्हीच सांगितले, बाबारे ....! बकऱ्यासाठी सापळा रचताना कधी काळी वाघ सिंह आले तर जमिनीत पुरलेल्या लांडग्याचे कसे होईल. ते निरुत्तर झालेच,पण उलट त्यांनी हसून दाद दिली.
तात्पर्य सांगायचे झाले तर नुकत्याच पार पडलेल्या विशाल जुन्नर सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत केवळ एका माणसामुळे निवडणुकीला सामोरे जावे लागल्यामुळे लाखो रुपयाची धूळधाण झाली. हा अनर्थ कसा झाला, कुणामुळे झाला, याला जबाबदार कोण ...? याचं आत्मपरीक्षण संबधितांनी करणे गरजेचे आहे. खरं तर ते या लाखो रुपयाचा चुराडा वाचवू शकत होते, परंतु आपली मनसबदारी कोणी सोडायला कबूल नव्हते. निवडणूक आहे कोणी तरी निवडणुकीला उभे राहणार , त्यात काही गैर नाही. कारण त्यांचा तो हक्क आहे. आता कोणी उभे राहायचे, यावर ढोबळमनाने विचार केला तर उमेदवार हा सामाजिक बांधिलकी जपणारा, चारचौघात उठणारा बसणारा, त्या संस्थेशी आस्था असणारा, त्यांच्या कार्यात योगदान करणारा असावा, हे साधे सरळ गणित आहे. परंतु अती सामान्य वकूबाची माणसं नेतृत्व हातात घेण्याचा प्रयत्न करतात. हे चुकीचे वाटत असले तरी सभासद आहे. त्यांना डिवचण्याचा किंवा यापुढे कधीही निवडणूक लढवू नका, असा सल्ला देत नाही. आपला तसा हेतू नाही. बरेच लोक निवडणुकीच्या रिंगणात उतरतात पण माघार घेतात कारण संबधित संचालक समूह रूपाने त्या त्या माणसाला काही तरी गाजराचं आमिष दाखवितात. त्यामुळे त्यांना आकाशाला गवसणी घातल्यासारखी वाटते, राजकारणात, सहकार क्षेत्रात अशा गोष्टी होत असतात. सर्वसामान्य माणूस निवडणुकीच्या विचारात पडत नाही. समोर येईल त्याचा तो बुद्धीपेक्षा भावनेने आदर करतो.
ही विशाल जुन्नर नावारूपाला आलेली संस्था आहे समस्त सभासदांना त्याचा सार्थ अभिमान आहे. जुन्नर तालुक्यात पुणे, मराठा सारख्या अनेक संस्था होऊन गेल्या. भोंगळ आणि भ्रष्ट कारभारामुळे बुडाल्या. आजही ज्यांचे पैसे गेले ते टाहो फोडत आहेत. विशाल जुन्नरच्या सभासदांना असे वाटत होते की, लोकांना संस्थेविषयी आस्था आहे. प्रेम आहे, जिव्हाळा आहे. त्यामुळे आता पर्यंत चांगले चालले आहे ना ....! चालू द्या म्हणून डोळेझाक करीत होते. परंतु विशाल जुन्नर संचालकांविषयी प्रचंड नाराजी आहे. हे झालेल्या मतदानावरून सिद्ध होते. जेव्हा इतके मतदान कमी प्रमाणात होते., तेव्हा संस्थेवरची विश्वासार्हता गमावलेली आहे. त्यांच्या विषयी मनात असलेली ओल आटत चालली आहे. असा अर्थ होतो की, काही दिवसांपूर्वी आम्हाला घरोघर निनावी पत्र पाठविली गेली. हे अनेक वेळा झाले पत्रे येतात चर्चा होतात. सभासदांना ठाऊक नसलेल्या घटनांचा पाढा पत्रात वाचलेला असतो. पण ही पत्रे पाठविणारे आपल्या संचालकांशी संबधित आहेत. छुप्या पद्धतीने नाराजी व्यक्त करताना कोणी संस्थेला बदनाम करीत असतील तर आतापर्यंत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल का केली जात नाही...? यामुळे सत्शील,सद्प्रवृत्त माणसाला नालायक म्हणून संबोधत असतील तर कायदेशीर कार्यवाही केली जावी. जर संस्था करायला धजावत असेल तर सभासदांनी याला आळा घालावयास हवा. यामुळे संस्थेची विश्वासार्हता धुळीस मिळत आहे. हे समस्ताना सांगणे आवश्यक आहे. विशाल जुन्नर विषयी किंवा त्यांच्या गौरवास्पद कामगिरीविषयी मी काही वर्षापूर्वी आपला वार्ताहर या दैनिकात लेख लिहिला होता. (संचालकांना विसर पडला असेल ) जे चांगले काम त्याचा आवर्जून उल्लेख करावा , असे मला वाटते. निवडणुकीच्या कालावधीत उमेदवार एका खोलीत बसले होते. संरक्षणात्मक व्यूह रचना सुरु असावी. मला पाहिले अन त्यांचे डोळे भिरभिरले. चटकन दार बंद झाले. पारदर्शकता नको. आत्मविश्वास आणि त्यातून निर्माण होणारी संरक्षणात्मक आणि प्रतिकाराची शक्ती गमावली की, माणसं अशी वागतात. निवडणुकीला कोणीही उभे राहावे, ज्यांच्या त्यांच्या मनाचा प्रश्न आहे. आमची मित्रमंडळी त्या समूहात असल्यामुळे निवडणुकीचा विचारही मनात शिवत नाही.
या संस्थेत संस्थापक सदस्य सुभाष शिंदे यांचे योगदान फार मोलाचे आहे. ते हयात नाहीत. संस्था विस्तार होत आहे. रौप्यमहोत्सवी वर्षात सभासदांना काय वाटायचे, या विषयावर काळाचौकीतील महानगरच्या कार्यालयात सभा होती. वक्त्यांनी अनेक सूचना केल्या. आम्ही त्यांना एक सूचना केली. तितक्या रक्कमेचे बोनस रुपी शेअर वाटावेत जेणे करून भविष्यात जो पर्यंत लाभांश मिळत राहील तो पर्यंत सभासदांना रौप्यमहोत्सवी वर्षाची आठवण येत राहील. त्यावर अनेकांनी सभेत विरोध केला पण नंतर देताना मात्र बोनस दिला. आपले सारे सत्य, बाकीचे सारे मिथ्या...! ही भावना जडलेली आहे. आताही या निमित्ताने एक सूचना करावीशी वाटते की, विशाल जुन्नर समूहातील सभासद ज्याची कामगिरी अत्युत्तम आहे. योगदान मोलाचे आहे. अशा सर्वसामान्य सभासदाला *कै.सुभाष शिंदे* यांच्या नावे *विशाल जुन्नर गुणवंत सभासद* हा पुरस्कार संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिला जावा. जेणे करून या संस्थापक सदस्याला खरीखुरी श्रद्धांजली अर्पण केली जाईल. प्रस्ताव आहे. विचार करणे वा न करणे हे संस्थेनी ठरवायचे आहे. लिहिण्यासारखे बरेच काही आहे हल्ली स्पष्ट बोलल्याने अथवा लिहिल्याने बरेच जन नाराज होतात. निवडून आलेल्या सर्व संचालकांचे घोडपदेव डी पी वाडी समूह हार्दिक अभिनंदन करीत आहे.
कालच ‘दै. महाराष्ट्र टाईम्सचे’ संपादक, ज्येष्ठ पत्रकार व लेखक गोविंदराव तळवलकर यांचे अमेरिकेत निधन झाले. ‘मटा’चे ते माजी संपादक असले तरी माझ्या मनात मटा म्हणजे गोविंदराव हे समिकरण पक्क बसलंय व म्हणून मी सुरूवातीला त्यांचा उल्लेख ‘मटाचे संपादक’ असाच केलाय.
सध्या स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याच्या बातम्या आहेत. स्वाईन फ्ल्यू होऊ नये म्हणून पुढील प्रमाणे फुलांचे पाणी प्यावे असा माझा अनुभव आहे
दोन ग्लास पाण्यात एका झेंडूच्या फुलाच्या पाकळ्या, निशीगंधाची 5-7 फुले, तुळशीची 5-7 पाने रात्रभर ठेवा सकाळी ते पाणी गाळून एक वाटी व संध्याकाळी एक वाटी प्यावे घरातील प्रत्येकाने. हे रोज करणे आवश्यक आहे.
ह्यात गलांडीचे फुल मिळाले तर ते पण घालावे
ही सर्व फुले हार व फुले विकणार्याकडे मिळतात
अरविंद जोशी B.Sc.
9421948894
(माझे पुणे परिसरात मिळणार्या 190 फुलांवर संशोधन आहे')
नुकत्याच महाराष्ट्रात काही मोठ्या महानगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणूका पार पडल्या. या वेळच्या निवडणूका काहीश्या अटीतटीच्या वातावरणातच झाल्या. सख्ख्या चुलत समजल्या जाणाऱ्या ‘दोन भावां’मधल्या या निवडणूकांकडे त्या भावांसकट सर्वांचेच लक्ष होते.
उन्हाळा सुरु होत आहे, थंडगार आईस्क्रिम खाण्याची मजा काही औरच आहे! गार गार मस्तच! हे आईस्क्रीम युरोप मधून भारतात आले. युरोपमध्ये बाहेर बर्फ पडते आणि हे लोक आईस्क्रीम खातात. ह्याचे कारण आईस्क्रीम हे स्पर्शाने थंड असले तरी गुणांनी उष्ण आहे. त्यामुळे ते उष्णता निर्माण करते व थंडीचा त्रास होत नाही.
आपण उन्हाळ्यात आईस्क्रीम खाल्ले की आपल्याला खोकला, घश्याला त्रास, जुलाब होतात. आपण थंडीत आईस्क्रीम खाल्ले तर त्रास होत नाही असा माझा ३० वर्षाचा अनुभव आहे. आम्ही थंडी मध्ये भरपूर आईस्क्रीम खातो. थंडीत दुकानात आईस्क्रीम पटकन मिळत नाही म्हणून मी बासुंदी फ्रिजर मध्ये ठेऊन कुल्फी करून खातो.
ह्या उन्हाळ्यात आईस्क्रीम खाऊच नका असे नाही पण एक पथ्य पाळा. जेवण झाले की लगेच (एक तासाचे आत) खा. म्हणजे त्याची उष्णता अन्न पचायला उपयोगी पडते व बाधत नाही.
अरविंद जोशी
९४२१९४८८९४
आपली पचन प्रक्रिया कशी चालते, ही समजून घेण्यासाठी, हे क्रियाशारीर सोपे करून, ढोबळमानाने सांगण्याचा हा प्रयत्न आहे. वास्तवाशी याचा डिट्टो संबंध असेलच, असे नाही. आपल्याला कुठे लेखी परीक्षा द्यायची नाहीये.
लाळेचे काम फक्त तोंडापुरतेच मर्यादित असते. नंतरची पचनाची जबाबदारी लाळेची नाही. मुळात अल्कलाईन नेचरची म्हणजे अल्कली ( क्षार ) गुणधर्म असलेली ही लाळ जेव्हा पोटात जाते, तेव्हा पोटात वाढलेल्या पित्ताला कमी करते आणि लाळेचे अस्तित्व संपते.
म्हणजे जेवढी लाळ जास्त तेवढेच तोंडातून सुरू होणाऱ्या पचनाला मदत होते. म्हणून जेवढे चर्वण जास्त तेवढे पुढे पोटातील पचन सुलभ होते.
भारतीय परंपरेमधे जेवणानंतर मुखशुद्धी खाल्ली जाते, ती याच कारणासाठी! घाई घाईने जेवताना, चावताना जी लाळ कमी पडते, त्याची पूर्तता या मुखवासाने पूर्ण केली जाते. मुखवास ही वेगळी टीप होईल. इथे फक्त उल्लेख आलाय म्हणून सांगितले.
जेव्हा आपल्याला ताप येतो, तेव्हा तोंडाची चव निघून जाते, भूक कमी होते. या शरीराकडून निर्माण होणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहेत. ताप आल्यावर शरीरातील अग्निची स्थिती बदलते. कोष्ठातील अग्नी, कोष्ठ सोडून बहिर्गम होतो, तेव्हा भूक लागत नाही. अशावेळी जर आपण अन्न सेवन केले तर ते पचतच नाही. म्हणजेच ताप आल्यावर भूक न लागणे, ही शरीराकडून आपोआपच केली जाणारी प्रक्रिया पुढची गुंतागुंत टाळण्यासाठी केलेली एक प्रतिबंधात्मक उपाययोजनाच आहे.
अशावेळी भूक नसताना जेवणे हे रोगाला निमंत्रण देणे असते. आयुर्वेदानुसार भूक लागणे हा एक वेग आहे. शरीराकडून केली जाणारी प्रक्रिया आहे. तिला वेळीच ओळखून सन्मानाने, आदर राखत न जेवणे हे हितकर असते. यालाच शास्त्रीय भाषेत, ज्वरादौ लंघनम् कुर्यात ! असे म्हटलेले आहे. म्हणजे तापाच्या सुरवातीला एखादा दिवस लंघन करावे. उदरगुहेचा द्वारपाल असलेल्या तोंडात जोपर्यंत लालास्राव निर्माण होत नाहीत, तोपर्यंत आतमधे कोणालाही सोडायचे नाही. आत (पोटा) मधे अग्नीची पुनः स्थापना झाली की, त्याच्याकडून संदेश येतो, "आता जेवायला हरकत नाही", तेव्हाच जेवावे. (प्रकृतीनुसार हे लंघन कसे करावे, हे बदलते असते. इथे वैद्यांचा सल्ला जरूर घ्यावा. )
लाळ जेवढी गिळता येईल तेवढी गिळावी. काही जणांना खूपच लाळ सुटते, त्यांनी तुरट चवीचा वापर जेवणानंतर अवश्य करावा. झोपेत लाळ गळण्याचा संबंध कृमीशी असू शकतो, किंवा खून दमलेल्यामुळेदेखील जेव्हा झोप लागते, तेव्हा तोंडातून लाळ गळते, हा रोग नाही. केवळ दंतमंजन वापरले तरी हे लक्षण कमी होते.
शरीराकडून काही प्रतिक्रिया या रोगसूचक असतात, तर काही नैमित्तिक असतात. जेवणानंतर तासाभरात ढेकर येणे स्वाभाविक असते. पण दिवसभर ढेकरा येणे हे पचन बिघडल्याचे लक्षण आहे.
बोटाला जरा कुठेही जखम झाली की लहानपणी लगेच बोट तोंडात जायचे, त्याला लाळ लागायची, ओठांनी जखम दाबून धरली जायची आणि जखम बरी देखील व्हायची. सर्व प्राणीमात्र आपले शरीर जीभेने म्हणजे लाळेनेच स्वच्छ करतात.
मी असं अजिबात म्हणत नाही की, आपणही आपले शरीर असेच चाटत बसावे. पण लाळेमधल्या या शक्तीवर अजून संशोधनाला वाव आहे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
24.03.2017
अन्नाला ओलेपणा क्लिन्नपणा येण्यासाठी महत्त्वाचे काम करते ती लाळ. डोळ्यात ज्याप्रमाणे पाणी स्रवत असते, तशी लाळ तोंडात स्रवत असते. लाळेच्या बुळबुळीतपणामुळे अन्न पुढे सरकायला मदत होते, आतड्यांना अन्न घासले जात नाही.म्हणून हा ओलेपणा एक प्रकारे वंगणाचे काम करत असतो.
लाळेमधे टायलीन नावाचे हे एक प्रकारचे विकर म्हणजे एन्झाइम आहे. पचनाला मदत करणारी अन्य घटकद्रव्ये यात सामावलेली असतात. जेवढी लाळ जास्ती तेवढे पचन सुलभ. त्यामुळे प्रत्येक घास जेवढा अधिक वेळ चावला जाईल, तेवढीच जास्त लाळ तयार होते.
शाळेत चौथीमधे असताना एक प्रयोग केलेला आठवतोय, भाकरीचा तुकडा जेवढा चघळला जाईल, जेवढी लाळ मिसळली जाईल, तेवढी भाकरी गोड होत जाते. पिष्टमय पदार्थांचे पचन करण्यासाठी लाळ मदत करते, असे अनुमान प्रयोगवहीत लिहिलेले होते.
आज व्यवहारात मधुमेहाच्या अपथ्यामधे पिष्टमय पदार्थ सांगितले जातात. पिष्टमय पदार्थ पचले नाहीत तर मधुमेहासारखे आजार बळावतात, म्हणून मधुमेहामधे आपली लाळ हे आपले औषध ठरू शकते. घाईघाईने खाल्ल्यामुळे लाळ अन्नामधे चांगली मिसळली जात नाही. आणि पचन बिघडते.
लाळ निर्माण करणाऱ्या ग्रंथींची तोंडे नीट उघडी असतील तर लाळेचे स्रवण चांगले होते. गव्हापासून बनलेल्या मैद्याच्या लगद्याने लाळेची काही छिद्रे बंद होतात. याकरीता मैद्यापासून बनलेले पदार्थ रोज रोज खाणे बंद करायला हवेत.
लाळ सुटण्यासाठी आंबट तिखट हे पदार्थ मदत करतात. चिंच म्हटली तरी तोंडात चिंच झरकन पाझरते. आवडीचे पदार्थ असतील तर तोंडाला पाणी सुटते. नारळाचा तुकडा, चार शेंगदाणे, दोन चिमूट बडिशेप, लवंग, वेलची, मसालापान यापैकी काहीही जेवणानंतर चघळल्यामुळे लाळ तयार होते आणि पचन सुधारते.
तंबाखू, गुटका, मावा सारखे सतत काहीतरी चघळत राहाणे चुकीचे. हे लक्षात ठेवावे.
नाहीतर आपण सोयीस्कर अर्थ काढण्यात पटाईत !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
23.03.2017
ज्ञानेंद्रिय पण आहे आणि कर्मेंद्रिय पण, असा एकमेव अवयव म्हणजे जीभ ! रसनेंद्रिय आणि वाक् इंद्रिय ! चव घेणे आणि बोलणे. एकाची प्रवृत्ती बाहेरून आत स्विकारण्याची तर एकाची आतून बाहेर पडण्याची ! एकाच वेळी असं आत बाहेर काम करण्याचे सामर्थ्य असलेला द्वैत अवयव म्हणजे जीभ.
एकाच अवयवावर ताबा मिळवला तर ज्ञान आणि कर्म या उभय प्रवृत्तींना जिंकता येणे सहज शक्य आहे, असा एकमेवाद्वितीय अवयव म्हणजे जीभ.
सर्वात जास्त रक्तपुरवठा असणारा हा रसमय अवयव जीभ ! तोंडात आलेला घास घोळवत घोळवत, इकडे तिकडे फिरवत फिरवत, बत्तीशीच्या ताब्यात देत देत, त्यांच्याकडून बारीक पीठ करवून, तयार लगद्याला आतमध्ये ढकलण्याचे महत्त्वाचे काम करणारा अवयव म्हणजे जीभ.
प्रत्येक पदार्थाची चव वेगवेगळ्या ठिकाणी वेगळेपणाने ओळखता येणारी, ही आगळीवेगळी जीभ, भातातून नजर चुकुवून येणारा दगड शोधून काढतेच, पण डोळ्यांना सहजपणे न दिसणारा, अगदी दाताच्या फटीत लपून बसलेला केसही शोधून काढते. ही सीआयडीची दृष्टी असलेला हा कलंदर अवयव म्हणजे जीभ !
सतत बत्तीस दातांच्या संरक्षणात फिरणारा, पण चुकुन मनात आणलं तर चुकीच्या क्षणी, चुकीचा शब्द, चुकीच्या व्यक्तीसमोर बोलून, बत्तीसच्या बत्तीस दात हातात काढून दाखवण्याचे सामर्थ्य असलेला एक चमत्कारिक अवयव म्हणजे जीभ !
बेधुंदपणे अखंड बडबडण्याचे प्रमुख काम करणारा आणि अन्नाला फावल्या वेळात पाठीमागे ढकलण्याचे काम करणारा, पण हे "काम" करताना, कधीही न दिसणारा अवयव म्हणजे जीभ ! दिसतो तो फक्त "आऽऽ कर" असं म्हटल्यावर, थोडाच वेळ दर्शन देणारा अवयव म्हणजे जीभ ! काम करताना मात्र कधीही दिसत नाही, असा "कामानिराळा" राहणारा हा बिलंदर अवयव जीभ !
दाताशी युती करत तथदध, ओठाशी युती करत पफबभ, दंतमूलाशी युती करत चछजझ, टाळुशी युती करत टठडढ, अशा अनेक युत्या, युक्तीने करत ध्वनी निर्मितीत सहाय्य करणारा युतीबाज अवयव म्हणजे जीभ !
पोटात काय चाललंय, याची बित्तंबातमी बाहेर डाॅक्टरांना दाखवणारा, तोंडात बसवलेला पण पोटाचा जणुकाही सीसीटीव्हीच असलेला एक अवलिया अवयव म्हणजे जीभ !
ओठाबाहेरील जगाला वेडावून दाखवून, आपल्या आतल्या मनाचं, तात्पुरते का होईना, समाधान करून देणारा, हा एक हुश्शार अवयव म्हणजे जीभ !
ज्या एका अवयवाला ताब्यात ठेवले तर शंभर वर्षापर्यंत सहज जगता येईल, अशी दिव्य अनुभूती देणारा एक योगी अवयव म्हणजे जीभ !
आजारी पडेपर्यंत खाणाऱ्यानी बरे होईपर्यंत उपवास करावा, असा संयम शिकणारा एकमेव अवयव म्हणजे जीभ !
उगाच नाही म्हटलंय, जेणे जिंकिली रसना......
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
22.03.2017
Copyright © 2025 | Marathisrushti