(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • जागतिक हवामान दिनानिमीत्त ओझोनची माहिती

    ग्रीक भाषेतील वास घेणे ह्या अर्थी असलेल्या “ओझेइन” ह्या शब्दापासून ओझोन हा शब्द तयार झाला आहे. ओझोन हा वातावरणाच्या मुख्यत: दोन थरांमध्ये आढळतो. वातावरण म्हणजे प्रत्येकी १ किमी उंचीच्या १४० मजल्यांची इमारत आहे असे मानले, तर १६ मजल्यांपर्यंतचा (जमिनीपासून १० ते १६ किमीपर्यंतचा) वातावरणाचा थर म्हणजे तपांबर (troposphere).१७ ते ५०व्या मजल्यांपर्यंतचा (तपांबराच्या वर ५० किमी ) थर म्हणजे स्थितांबर. ओझोनच्या वातारवणातील एकूण प्रमाणाच्या १० टक्के ओझोन तपांबरात तर उरलेला ९० टक्के ओझोन स्थितांबरामध्ये (stratosphere) आढळतो. स्थितांबरातील ओझोनच्या ह्या मोठ्या प्रमाणामुळे ह्या थराला “ओझोनचा थर” असेही म्हणतात. ओझोनचे वातावरणातील प्रमाण सर्वत्र सारखे नसते. ओझोनचे प्रमाण विषुववृत्तीय प्रदेशावर कमी तर ध्रुवीय प्रदेशांवर सर्वाधिक असते.

    जैविक पदार्थांच्या दहनातून, तसेच काही वायू आणि प्रदूषकांतील नैसर्गिकरीत्या घडणार्याल रासायनिक अभिक्रियांमधून निर्माण होणारा ओझोन हा तपांबरातील (troposphere) ओझोनचा मुख्य स्रोत. तपांबरातील ओझोन हा प्रदूषक आहे. तपांबरामध्ये ओझोनचे प्रमाण वाढल्यास ते शेत्योत्पादनास तसेच जंगलांच्या वाढीस मारक ठरू शकते. फुफ्फुसांची क्षमता खालावणे, खोकला, घशाचे विकार वगैरेंसारख्या विविध श्वसनविकारांना आमंत्रण देते. ओझोनच्या विषारी गुणधर्मांमुळे हे श्वसनविकार मृत्यूसही कारणीभूत ठरू शकतात. ओझोन हा हरितगृह वायू (greenhouse gas) असल्यामुळे तो तपांबराचे व पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान वाढविण्यासही कारणीभूत होऊ शकतो. त्यामुळे तपांबरातील ओझोन हा वाईट ओझोन असतो.

    स्थितांबरातील (stratosphere) ओझोन हा नैसर्गिकरीत्या दोन टप्प्यांमध्ये तयार होतो. पहिल्या टप्प्यांत सौरप्रारणांमुळे ऑक्सिजनच्या रेणूंचे (O2)विघटन होऊन ऑक्सिजनचे अणू (O+O) वेगळे होतात. दुसर्याळ टप्प्यामध्ये विघटित ऑक्सिजन अणूंचा (O) ऑक्सिजनच्या रेणूंशी (O2) संयोग होऊन ओझोनचे रेणू (O3) तयार होतात. नैसर्गिकरीत्या निर्माण झालेल्या ओझोनचा सौरप्रारणांमुळे व मानवनिर्मित रसायनांशी संयोग पावल्याने नाश होतो.

    सूर्यकिरणांतील अतिनील (ultraviolet or UV) प्रारणांमुळे ओझोनच्या रेणूंचे विघटन होते आणि अशाप्रकारे ओझोनचा थर अतिनील किरणांना पृथ्वीच्या पृष्ठभागावर येण्यापासून थोपवतो. अतिनील किरणे जमिनीपर्यंत पोहोचल्यास ती आपल्यासाठी हानीकारक असतात. त्यांच्यामुळे त्वचेची प्रतिकार शक्ती कमी होऊन त्वचेचा कर्करोग होणे,गुणसूत्रांचे (chromosomes) उत्परिवर्तन (mutation) होणे, पेशीच्या जिवंतपणाचे लक्षण असणार्याक प्रथिने (protein) आणि केंद्रकाम्लासारख्या (nuclein acid) सूक्ष्म रेणूंना झळ पोहोचणे, अशासारखे दुष्परिणाम दिसून येतात. वनस्पती पेशींनाही त्यांमुळे झळ पोहोचते. पिकांच्या वाढीवर त्याचा परिणाम होऊन शेत्योत्पादन घसरते. अन्नसाखळीच्या तळाशी असणार्याक फायटोप्लॅंक्टन (जलीय वनस्पती) अतिनील प्रारणांमुळे नष्ट होऊ शकतात. स्थितांबरातील (stratosphere) ओझोन आपल्याला ह्या सर्व दुष्परिणामांपासून वाचवत असल्यामुळे हा चांगला ओझोन असतो.

    मानवनिर्मित रसायनांमुळे अंटार्क्टिक स्थितांबरात (stratosphere) ओझोनचे प्रमाण खूप कमी होण्याला ओझोन छिद्र असे म्हणतात. ओझोनच्या थराला पडलेले छिद्र म्हणजे छ्त्रीचे कापड एखाद्या ठिकाणी झिजून छत्रीला भोक पडण्यासारखे आहे. ह्या ओझोन छिद्राची पहिली नोंद १९८५ साली जे.सी. फार्मन, बी.जी. गार्डिनर आणि जे.डी. शांकलिन ह्यांनी नेचर मासिकात लिहिलेल्या एका शोधनिबंधामध्ये केली. १९७० सालापासून ब्रिटिश अंटार्क्टिक सर्व्हेसाठी त्यांनी त्यांच्या हॅली बे (७६ अंश दक्षिण) येथील संशोधन केंद्रामधून ओझोन थरावर बारीक लक्ष ठेवले होते.

    धरणाच्या भिंतीला छिद्र पडल्यास जसे त्यातून पाणी बाहेर उसळावे तसे ओझोन थर विरळ झाल्याने त्यातून अतिनील किरणे पृथ्वीच्या दिशेने उसळतात. अतिनील किरणांमुळे जीवसृष्टीवर होणारे घातक परिणाम आपण आधी पाहिलेच. ओझोन छिद्रामुळे होणार्याअ घातक परिणामांची झालेली पहिली जाणीव भीतीने अंगावर काटा यावा अशीच होती, कारण ते परिणाम थेट आपल्या अस्तित्वालाच आह्वान देणारे आहेत. शास्त्रज्ञांच्या फळीने ओझोनच्या थराला छिद्र पडण्यासाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत झाल्या असाव्यात हे शोधण्यासाठी कंबर कसली. त्यांच्या संशोधनांतून असे निष्पन्न झाले की ओझोन थराला छिद्र पाडणारे मुख्य गुन्हेगार आहेत ते ओझोननाशक पदार्थ (Ozone Depleting Substances, ODSs) ज्यांत प्रामुख्याने क्लोरोफ्लुरोकार्बने, अर्थात CFCs आणि इतर काही रसायनांचा समावेश होतो.
    प्रचलित रसायनांना अविषारी व अज्वलनशील असा पर्याय शोधण्यातून जनरल मोटर्सच्या संशोधन केंद्रात १९३० साली क्लोरोफ्लुरोकार्बनांचा जन्म झाला. फ्रेय़ॉन (डु पॉन्ट, यू.एस.ए.) आणि आर्कटॉन (आयसीआय, यू.के.) ही सीएफसींची व्यापारी नावे आहेत. उत्पादन कमी खर्चिक असणे, साठवण्यास सोपे असणे, ज्वलनशील व स्फोटक नसणे, त्यांची इतर वायूंशी रासायनिक प्रक्रिया न होणे अशा फायदेशीर गुणधर्मांमुळे सीएफसी लोकप्रिय ठरले.सीफसी हे प्रामुख्याने स्प्रे कॅन्समध्ये प्रॉपेलण्ट म्हणून, मऊ फोममध्ये, फ्रिजमध्ये गारवा निर्माण करण्यासाठी म्हणून वापरले जातात. विशेषत: विकसनशील देशांत जसजसे सीएफसीच्या वापराचे प्रमाण वाढले तसतशी ओझोनच्या थराबद्दलची काळजी शास्त्रीय वर्तुळात वाढू लागली आणि शास्त्रज्ञांनी घातक परिणामांचे इशारे वेळोवेळी दिले.

    ह्या ओझोननाशक पदार्थांमुळे (सीएफसी) ओझोनच्या थराला हानी कशी पोहोचते ते थोडक्यात पाहू. सीएफसी रेणूंचे हवेत उत्सर्जन (emission) झाले की वारे आणि वातावरणातील अभिसरणामुळे (Atmospheric Circulation) ते वातावरणातील खालच्या थरांत सर्वत्र मिसळतात. तापून वर जाणार्याि हवेसोबत हे रेणू स्थितांबरात (stratosphere) पोहोचतात. सूर्यकिरणांतील अतिनील प्रारणांमुळे (Ultraviolet (UV) Radiation) त्यांचे अभिक्रियाशील (reactive) सीएफसींमध्ये रुपांतर होते आणि ते ओझोनच्या रेणूंचा नाश आरंभतात. आता प्रश्न असा पडतो की ओझोननाशक वायूंची निर्मिती अंटार्क्टिकावर होत नसूनही ओझोन छिद्र अंटार्क्टिकावर कसे? तर ह्याचे उत्तर दडले आहे ते वातावरणाच्या अभिसरणात आणि अंटार्क्टिकाच्या वैशिष्ट्यपूर्ण हवामानात.

    तापमानातील फरकामुळे ध्रुवीय (Polar) प्रदेश आणि विषुववृत्तीय (Tropical) प्रदेशांदरम्यान वातावरणाचे अभिसरण होत असते. विषुववृतीय प्रदेशात तापून हलकी झालेली हवा वर जाऊन ती वातावरणाच्या वरच्या थरांत ध्रुवांच्या दिशेने जाते व धृवीय प्रदेशांत थंड होऊन खाली उतरून वातावरणाच्या खालच्या थरांमध्ये विषुववृत्ताच्या दिशेने वाहते. प्रक्रियाशील सीएफसी ह्या वातलहरींवर स्वार होऊन धृवांच्या दिशेने प्रवासाला निघतात.

    ध्रुवीय प्रदेशात सहा महिने दिवस आणि सहा महिने रात्र असते. ध्रुवीय प्रदेशांमध्ये, विशेषत: अंटार्क्टिकातील हिवाळ्यात स्थितांबरातील (Stratosphere) तापमान खूपच कमी असते. तिथे बर्फकणांचे ढग तयार होतात ज्यांना ध्रुवीय स्थैतांबरिक ढग (Polar Stratospheric Clouds) असे म्हणतात. तिथवर पोहोचलेले सीएफसी ह्या ढगांमध्ये गोठतात. अंटार्क्टिकावर वसंत ऋतूचे आगमन झाले की सूर्याच्या उष्णतेने स्थैतांबरिक ढगांतील बर्फ वितळतो. त्यावेळी मुक्त झालेले अभिक्रियाशील सीएफसी तेथील ओझोनचा प्रचंड प्रमाणात नाश करतात. अशाप्रकारे अंटार्क्टिकावर ओझोन थराला छिद्र पडले आहे.

    आर्क्टिक प्रदेशातही हिवाळ्यात कमी तापमान असले, तरी दर हिवाळ्यात ते ध्रुवीय स्थैतांबरिक ढग निर्माण होण्याएवढे खाली जातेच असे नाही. मात्र, गेल्या काही वर्षात अंटार्क्टिक प्रदेशाप्रमाणेच आर्क्टिक प्रदेशावरील ओझोनचा थरही विरळ होऊ लागल्याचे लक्षात आले आहे. हिवाळ्याच्या शेवटच्या महिन्यांमध्ये आणि वसंत ऋतूच्या सुरुवातीला अंटार्क्टिक प्रदेशावर ओझोन छिद्र मोठे होते.

    ओझोन छिद्रामुळे होणारे घातक परिणाम सुदैवाने आंतरराष्ट्रीय संघटनांच्या लक्षात येऊन त्यांनी ओझोन थराच्या संरक्षणार्थ योग्य ती पावले उचलली. त्याचाच परिणाम म्हणून १९८७ साली मॉंट्रियल करार झाला. क्लोरोफ्लुरोकार्बन, अर्थात सीएफसीच्या उत्पादनावर बंदी आणणे, त्यांना पर्यायी रसायने शोधणे वगैरे उपाय आधी विकसित देशांनी आणि कालांतराने विकसनशील देशांनी करून सीएफसींची निर्मिती आणि वापर पूर्णपणे थांबवावा अशी योजना ह्या कराराद्वारे आखली गेली. ह्या करारातील अटी १९८९ पासून लागू झाल्या. त्यानुसार सीफसीचा वापर कमी करण्यासाठीच्या उपाययोजनांची पद्धतशीरपणे अंमलबजावणी विकसित आणि विकसनशील देशांत सुरू झाली. ह्या अटींची काटेकोर अंमलबजावणी झाल्यास २०५० पर्यंत ओझोनचा थर पूर्ववत व्हावा असा अंदाज आहे. ह्या अटी जगभरातील अनेक देशांनी मान्य करून त्यांच्या पालनास सुरुवात केली असल्यामुळे आंतरराष्ट्रीय सहकाराचे ते उत्कृष्ट उदाहरण ठरले आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेचे माजी सचिव कोफी अन्नान ह्यांनी म्हटल्याप्रमाणे “हे आजवरच्या यशस्वी जागतिक सहकाराचे एकमेव उदाहरण असावे.” १९९१ साली ओझोन थराच्या संरक्षणासाठी भरलेल्या विएन्ना परिषदेमध्ये भारताने ह्या कार्यक्रमास पाठिंबा जाहीर करून १९९२ साली मॉंट्रिएल करारातील उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू केली.

    ओझोनच्या थराला घातक असणार्याू रसायनांचा वापर बंद करण्याच्या बाबतीत हा करार एक मैलाचा दगड ठरला आहे. उदाहरणार्थ, २०१० साल हे जगभरात सीफसींचे उत्पादन पूर्णपणे थांबवण्यासाठीचे शेवटचे वर्ष होते. आता सीफसींची जागा इतर रयायनांनी (उदाहरणार्थ हायड्रोक्लोरोफ्लुरोकार्बने (HCFC) व हायड्रोप्लुरोकार्बने (HFC) ) घेतली आहे. ही रसायनेही ओझोन थराला काही प्रमाणात घातक असली तरी ती सीफसींएवढी घातक नाहीत. ह्या नव्या रसायनांचा वापरही २०३० सालापर्यंत हळूहळू बंद होणे अपेक्षित आहे. हा वापर बंद करणे हे सर्व विकसित आणि विकसनशील देशांचे कर्तव्य आहे.

    डॉ. निनाद शेवडे
    संकलन:संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • जागतिक हवामान दिन

    आज जगभरात २३ मार्च हा दिवस जागतिक हवामान दिन म्हणून साजरा केला जातो.

    हवामानाबाबत संपूर्ण जगातील लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सार्यांबनाच हवामानाचे महत्त्व समजावे, हवामान चांगले राहण्यासाठी कोणती दक्षता घेतली पाहिजे, कोणकोणत्या उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत, याविषयी जाणीव आणि जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने २३ मार्च हा दिवस जागतिक हवामानदिन म्हणून साजरा केला जातो. गेल्या चाळीस वर्षांच्या तुलनेत मागच्या दशकात हवामानात झालेले बदल सर्वांच्याच चिंतेचा विषय बनलेले आहेत. हवामान बदलाच्या परिणामांमुळे आज भारतातीलच नव्हे, तर जगभरातील शेतीक्षेत्र ग्रासले आहे. भविष्यातही हवामान बदलाचे परिणाम कमी-जास्त प्रमाणात प्रभाव दाखवतच राहतील. त्यामुळे आपण संभाव्य परिस्थितीचा वेध घेऊन आपत्कालीन उपाययोजनांसाठी तयार राहणे आवश्यक आहे. विसाव्या शतकात मानवाने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली. पण या प्रगतीसोबतच हवामानातील बदल आणि वातावरणातील कमी होणारा संरक्षक ओझोन थर यांचे भीषण संकटही त्यातूनच उभे राहिले. जीवसृष्टीवरील दुष्परिणामाच्या रूपाने आपण ते अनुभवतो आहोत. हवामानातील बदल हा जागतिक तापमानवाढीमुळे होणारा सर्वाधिक चिंताजनक परिणाम आहे. अनेक देशांमध्ये, विशेषत: युरोप आणि अमेरिकेसारख्या देशात हवामानातील बदल स्पष्टपणे जाणवत आहेत.

    २०१० ते २०१३ या काळात अत्याधिक हवामानबदलाच्या अनेक घडामोडी घडून आल्या. या घडामोडींनुसार, २०१० ते २०११ हे वर्ष गेल्या १०० वर्षांतील सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले. २०१० ते २०१३ ही अत्याधिक हिमवादळे आणि थंडीची वर्षे ठरली. २०१० ते २०१३ हा अत्याधिक पावसाचे व वादळांचा कालखंड ठरला. त्याचबरोबर भारतात दिवस आणि रात्रीच्या तापमानातही वाढ झाली. मान्सून लहरी बनला. जागतिक हवामानातील या बदलांची आपण वेळीच दखल घेतली नाही आणि त्यासंबंधात योग्य ते खबरदारीचे उपाय योजले नाहीत तर आगामी काळात पृथ्वीवरील जीवसृष्टीसमोर कोणते भयावह संकट ओढवेल.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. डॉ. रामचंद्र साबळे / इंटरनेट

  • जागतिक काव्य दिन

    जगाला एकापेक्षा एक मौल्यवान, अजरामर काव्य कलाकृती प्रदान करणाऱ्या सर्व कवींना गौरवण्याचा हा दिवस.

    युनेस्कोने जागतिक काव्य दिनाची २१ मार्च १९९९ रोजी पॅरिस परिषदेत या दिवसाची घोषणा केली. तेव्हांपासून प्रत्येक वर्ष एका महान कवीला समर्पित केले जाते. यंदाचे वर्ष तब्लिसी (जॉर्जिया)येथील कवी निकोलस बाजातशविली (१८१७-१८४४) यांना समर्पित करण्यात आले आहे. त्यांनी ३२ पेक्षा अधिक काव्यरचना केल्या. त्यात बहुतांश प्रेमकविता होत्या. मानवी भावना प्रकट करणे तसेच अनुभवण्याची अद्वितीय क्षमता काव्यात असते. युनेस्कोच्या महासचिवांनी म्हटलेच आहे की, कविता हा एक झरोका असून याद्वारे मानवतेतील वैविध्य मनमोकळा श्वास घेऊ शकते. एकोणिसाव्या शतकातील फ्रेन्च कलावंत जोसेफ राँऊ ह्यानी म्हटले होते की Science is for them who learn, Poetry is for those who know. हे खरच आहे की बुद्धीची कसोटी लावून विज्ञान शिकता येते पण पद्य मनाला भावणे गरजेचे असते. सुप्रसिद्ध कवयित्री मा. संजीवनी मराठे ह्यांनी कवितेच्या उगमाची प्रक्रियाच ह्या कवितेतून समोर आणली आहे. कविता तिच्या नाजूक नखरेलपणामुळे आणि भावतरलतेमुळे स्त्रीलिंगी मानली जाते. स्त्रियांच्या नकारात अनेकदा होकार दडलेला असतो असं मानलं जातं. म्हणूनच आपल्या कवितेत त्या म्हणतात -

    कुंभ रसांचे शिरी घेऊनी शब्दांच्या गवळणी
    नजरेपुढती ठुमकत येती रूपवती कामिनी
    त्यांच्या नादे करू पाहते पदन्यास मी कशी
    मी न कुणाला सांगायची कविता स्फुरते कशी

    William Wordsworth ह्यांनी म्हटल्याप्रमाणे Poetry is the spontaneous overflow of powerful feeings. शब्दांच्या माध्यमातून होणारा रसरशीत भावनांचा उस्फुर्त उद्रेक म्हणजे कविता.
    सर्व कवी, कवीयित्रींना आजच्या जागतिक कवी दिनाच्या हार्दीक शुभेच्छा !

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • शहीद दिवस

    २३ मार्च १९२३ रोजी या तिघांना फाशी दिले गेले. इंग्रजांचा अधिकारी सँडर्स याच्या हत्येचा आरोप या तिघांवर होता. हे तिघे यांच्या जहाल (इंग्रजांच्या मते) देशभक्ती-देशप्रेम व निधड्या वृत्तीमुळे इंग्रजांना अतिशय डोईजड झालेच होते. संपूर्ण हिंदुस्तानात जहाल क्रांतीची धगधगती मशाल पेटली होती. कुठल्या न कुठल्या आरोपाखाली लवकरात लवकर यांचा बंदोबस्त इंग्रजांनी केलाच असता. हे तिघे व अनेक क्रांतिकारी स्वतंत्र भारताचे स्वप्न पाहत होते. इंग्रजांच्या गुलामीतून तर भारत मुक्त झाला. हजारो वीरांनी आपल्या प्राणांची-घरादाराची आहुती देऊन पारतंत्र्यातला भारत देश गुलामगिरीच्या जोखडातून सोडवून येणाऱ्या पिढीला एक खुशहाल आपला भारत देश, मोकळा श्वास घेण्यासाठी दिला. त्यावेळी इंग्रज हे एकमेव व संपूर्ण हिंदुस्तानाचे शत्रू होते. परंतु ज्या कारणांमुळे इंग्रजांनी आपली पावले इथे रोवली आणि राज्य केले तीच कारणे, अंतर्गत कलह-बंडाळ्य़ा-स्वार्थ मात्र आजही तशीच आहेत. शहीदांना सलाम ठोकले-उगाच दोनचार कार्यक्रम केले ( तेही कोणाला आठवण राहिली तरच .....), यानिमित्ते मिडियासमोर मिरवले......." अहो, म्हणून तर केला ना हा दिखावा.... नाहीतर आम्हाला काय घेणं देणं हो.... ते देशासाठी बलिदान वगैरे आम्हाला काही समजत नाही...... आणि गरजही नाही. " खरेच आहे ना...... जी गोष्ट आयती ताटात फुकट वाढून मिळते त्याची किंमत नसतेच. इंग्रजांच्या तावडीतून देश स्वतंत्र झाला आणि भ्रष्टाचार- नेतेगिरी-गुंडगिरी यांच्या तावडीत अडकला, अडकतच गेला. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू हे व तमाम क्रांतिकारी फक्त इतिहासाच्या पानातच राहिले. त्यातही काही ठिकाणी चक्क ते आतंकवादी होते असेही म्हटले आहे. इंग्रजांनी आतंकवादी म्हटले तर समजून घेता येईल पण चक्क आपल्यातील काही लोक त्यांना आतंकवादी म्हणतात म्हणजे........... तर कुठे गांधीजींनी या तिघांची फाशी थांबविण्यासाठी प्रयत्न का केले नाहीत हा वाद. परंतु भगतसिंग-राजगुरू-सुखदेव यांच्या विचारसरणीचा, देश स्वतंत्र का व कशातून झाला पाहिजे या दृष्टिकोनाचा कोणीही विचारच करत नाही. समोर दिसणाऱ्या शत्रूशी निदान निकराने व एकमुखाने लढता तरी येते. परंतु या न दिसणाऱ्या व तहहयात पोखरणाऱ्या आपल्यातील स्वार्थाशी - स्वार्थी प्रवृत्तींशी कसे लढायचे? आजकाल तर अनेक मुलांना हे क्रांतिकारी माहीत तरी असतील का, अशी शंका येते. पाठ्यपुस्तकातून धडेच्या धडे - हा इतिहासच इतिहासजमा करून टाकला जात आहे. उरलासुरला एकमेव मार्गही उखडून टाकला जाताना दिसतो. निदान एखादी लाट यावी तसे ते चार-पाच सिनेमे आले म्हणून तरी बऱ्याच मुलांना यांनी केलेले महान कार्य-त्याग समजला. (दुर्दैव सिनेमे पाहून समजला पण समजला हे जास्त महत्त्वाचे.) फक्त स्वकेंद्रित होऊन जगण्याने आपण सारेच देशाला कुठे घेऊन गेलो आहोत आणि जात आहोत हे पाहिले की भीती वाटते. या सगळ्या वीरांचे बलिदान सार्थकी लागलेय का? याला आपणही जबाबदार आहोतच. मूठभर शोषण करणाऱ्यांना आपण आपले शोषण करू देतो म्हणजे आपणही तितकेच दोषी. भगतसिंग शेजाऱ्याच्या घरी जन्माला यावा आपण मात्र सुखनैव राहावे ..... नाही. भगतसिंग आपल्या प्रत्येकाच्या घरी जन्माला यायला हवा तरच कदाचित.......
    भारताला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी हसत-हसत फासावर गेलेल्या शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांची आज पुण्यतिथी आहे. २३ मार्च १९३१ला शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू तिघांनाही लाहोर जेलमध्ये फाशी देण्यात आली होती. आजचा दिवस 'शहिद दिन' म्हणूनही ओळखला जातो.

    भगतसिंग
    भगतसिंग यांचा जन्म १९०७ च्या २८ सप्टेंबर रोजी बंगा येथे झाला. भगतसिंगांच्या जन्माच्या वेळी सरदार किशनसिंग आणि सरदार अजितसिंह यांची जेलमधून सुटका झाली, म्हणून हा मुलगा भाग्यवान आहे असे जाणून आजीने त्याचे नाव भगतसिंग ठेवले. जालियनवाला बागेचे हत्याकांड भगतसिंग यांच्या मनावर खोल परिणाम करून गेले होते. प्रसिद्ध क्रांतिकारक भगवतीचरण हे कॉलेजात भगतसिंगांच्या पुढे २ वर्षे होते तर सुखदेव हे त्यांचे वर्गमित्र होते. वीर सावरकरांचा प्रसिद्ध ग्रंथ 'दि इंडियन वॉर ऑफ इंडिपेन्डेन्स - १८५७' भगतसिंगांना तोंडपाठ होता. घरच्या लोकांनी लग्न ठरवल्यावर त्यांनी घर सोडले. देशसेवेचे व्रत घेतल्यामुळे आपण लग्न करू शकत नाही असे वडिलांना कळवून त्यांनी त्यांची क्षमा मागितली. कानपूरला आल्यावर 'बलवंतसिंग' या नावाने त्यांनी अनेक लेख लिहिले. अनेक धाडसी सत्कार्यात ते सक्रिय होते. लाला लजपत राय यांचा पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू झाला. त्यांना मारणार्याि स्कॉटचा बदला घेत असताना साँडर्स तावडीत सापडल्याने साँडर्सला उडविण्यात आले. या प्रकरणात सर्वजण फरारी झाले. क्रांतिकारकांचे म्हणणे काय आहे हे जाहीररीत्या सर्वांना समजावे यासाठी त्यांनी एक योजना आखली. 'पब्लिक सेफ्टी' बिलाविरूद्ध देशभर संताप व्यक्त होत होता. या बिलावर सेंट्रल असेंबलीत चर्चा चालू असताना बटुकेश्वर दत्त आणि भगत सिंह यांनी असेंबलीत बाँब फेकून गोंधळ उडवून दिला. स्वतःहून अटक करून घेतली. कोर्टात आपली बाजू प्रभावीपणे मांडली. कोर्टाने भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशीची शिक्षा फर्मावली. २३ मार्च १९३१ ला 'इन्कलाब झिंदाबाद' च्या घोषणा देत ते तिघेही हसत हसत फासावर चढले.

    राजगुरु
    शिवराम हरि राजगुरू यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील खेड (सध्या राजगुरूनगर) येथे १९०८ साली झाला. जालियनवाला बाग हत्याकांडाचे पडसाद त्यांच्या मनावर चांगलेच उमटले होते. अनेक पराक्रम करून त्यांनी क्रांतिकारकांच्या मनात मानाचे स्थान मिळवले होते. लाला लजपतरायांच्या हत्येचा सूड म्हणून त्यांनी साधलेल्या अचूक नेमबाजीमूळे साँडर्स वध घडवून आणलेला होता. पुढे फरारी असताना त्यांना फितुरीमुळे अटक झाली. लाहोर मध्ये झालेल्या खटल्यात त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली.

    सुखदेव
    सुखदेव थापर यांचा जन्म लायलपूरमध्ये दि.१५ मार्च १९०७ रोजी लायलपूर येथे झाला. भगतसिंग यांनी असेंम्बलीमध्ये बाँब टाकल्यानंतर सुरू झालेल्या छापेसत्रात लाहोरमध्ये छापे टाकण्यात आले. तेव्हा काश्मिर बिल्डींगमध्ये पडलेल्या छाप्यात काही बाँब जप्त करण्यात आले होते. ते बाँब सुखदेव यांनी तयार केले होते, म्हणून त्यांनाही अटक करण्यात आली. लाहोर कटाच्या पहिल्या खटल्यात १६ आरोपींचा नेता म्हणूनच सुखदेव यांची नोंद करण्यात आली. नवे सदस्य गोळा करून त्यांना क्रांतिदलात समाविष्ट करून त्यांच्या लायकीप्रमाणे काम देण्यात सुखदेव तरबेज होते. लाहोर केसमध्ये त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. भगतसिंग, राजगुरूंबरोबर सुखदेव देखील २३ मार्च १९३१ ला लाहोर तुरूंगात फाशी गेले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • २१ मार्च – आजचा दिवस व रात्र समान

    २१ मार्च – आजचा दिवस व रात्र समान

    ग्रेगरीयन कालगणनेनुसार उद्यापासून दिवस मोठा होत जाईल व २१ जून हा सर्वात मोठा दिवस असेल. आजचा दिवस व रात्र समान असतील. म्हणजे आज १२ तासांचा दिवस व १२ तासांची रात्र!

    पृथ्वीचा अक्ष २३. ४५ अंशाने कललेला असल्याने सूर्याची उगवण्याची आणि मावळण्याची जागा दररोज थोड्या प्रमाणात बदलत असते ह्या सूर्याच्या मार्गाला आपण आयनिकवृत्त असे म्हणतात. सहा महिने सूर्य उत्तर पृथ्वीच्या ध्रृवीय भागात व सहा महिने दक्षिण पृथ्वीच्या ध्रृवीय भागात असतो. अशा प्रकारे वर-खाली सरकताना तो दोन वेळा पृथ्वीच्या विषुववृत्ताच्या समान पातळीत येतो. त्यावेळेस दिवस-रात्र समान १२ तासांचे असतात. हे दिवस म्हणजे २१ मार्च रोजी म्हणजेच ज्यावेळेस सूर्य पृथ्वीच्या उत्तर ध्रृवीय भागात प्रवेश करतो, आणि २३ सप्टेंबर रोजी ज्यावेळेस सूर्य पृथ्वीच्या दक्षिण ध्रृवीय भागात प्रवेश करतो. आपण विषुववृत्तावर असाल तर ह्या दोन दिवशी सूर्य दुपारी १२ वाजता बरोबर डोक्यावर असतो. २१ मार्च ह्या दिवशी सूर्य ज्या बिंदूवर असतो त्यास 'वसंतसंपात' म्हणतात तर २३ सप्टेंबर ह्या दिवशी सूर्य ज्या बिंदूवर असतो त्यास 'शरदसंपात' असे म्हणतात. तसेच २१ जून ह्या दिवशी सूर्य जास्तीत जास्त वर उत्तर भागात आलेला असतो ह्यालाच उत्तरायण असे देखिल म्हणतात, तर २२ डिसेंबर ह्या दिवशी सूर्य जास्तीत जास्त वर दक्षिण भागात असतो. ह्यालाच 'दक्षिणायन' असे देखिल म्हणतात. पृथ्वी स्वत:भोवती फिरता फिरता सूर्याभोवतीही फिरते. त्यामुळेच दिवस व रात्र हे प्रहर व ऋतु निर्माण झाले. पण पृथ्वीचा अक्ष थोडा कललेला असल्याने प्रत्येक वेळी विषुव वृत्तच सूर्याच्या समोर असते असे नाही. त्यामुळे दिवस लहान-मोठा होत राहतो. मात्र २१ मार्च व २३ सप्टेंबर या दोन दिवशी पृथ्वीचे विषुव वृत्त सूर्याच्या समोर येते व दिवस आाणि रात्र ढोबळ मानाने समान असतात. अर्थात दिवसाच्या गणनेतील काही त्रुटी आजही बाकी असल्याने लिप वर्षासारख्या काळात हा दिवस पुढे-मागेही होतो. आजपासून दिवस मोठा होऊ लागणार व त्यामुळे गोठवणारी थंडीही कमी होऊन वातावरण ऊबदार बनू लागते.

    यासाठीच युरोपातील अनेक देशांत आज सणाचा आनंद साजरा होतो.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • पत्ते, बंगला आणि माणसाची निरागसता ! 

    नुकत्याच एका छंदिष्ट मित्रांच्या प्रदर्शनामध्ये मी माझ्याकडील विविध आणि विचित्र पत्ते मांडले होते. १ इंच ते दीड फूट आकाराचे,गोल- लंबगोल, चौकोनी- पारदर्शक- Z आकाराचे -५२ वेगवेगळ्या मांजरांच्या चित्रांचे- अत्यंत विचित्र आकाराचे, जादूसाठी वापरले जाणारे, विविध सणांची माहिती देणारे अशा विविध प्रकारचे दुर्मिळ पत्ते आणि गंजिफा, टॅरो कार्ड्स, अंध व्यक्तींसाठी ब्रेल मधील पत्ते इत्यादी प्रकारचे हे पत्ते होते. या वेळी एक शोभेची वस्तू म्हणून मी पत्त्यांचा बंगला ठेवला होता. सर्व पत्ते फेविकॉलने चिकटवले होते. पण अगदी मोठ्या वयाचे प्रेक्षकही पटकन " वाऱ्याने बंगल्याचे पत्ते पडत कसे नाहीत " असा प्रश्न हमखास विचारायचे. लगेच ते सावरून, " हां, चिकटवले असतील " असे म्हणायचे. मला मोठी गंमत वाटायची. माणूस मोठा होऊन सगळ्या कॢप्त्या, लबाड्या शिकतो. पण लहाणपणी निरागसतेने बंगला बांधताना तो वाऱ्याने सतत पडायचा हे मात्र त्याने त्याच निरागसतेने मनात जपलेले पाहून गंमत वाटायची.त्याला पटकन आठवायचा आधी तो , " पडणारा बंगला " आणि मग फेविकॉल !

    या निमित्ताने पत्त्यांविषयी थोडे --

    पत्त्यांचा खेळ

    p-34957-Patte-02अगदी छोट्या मुलापासून आजोबांपर्यंत आणि गरीबांपासून गडगंज श्रीमंतांपर्यंत, आपली पाळेमुळे घट्ट रोवलेला खेळ म्हणजे पत्त्यांचा खेळ ! जागा, वेळ, वय किंवा आर्थिक स्तर असे कसलेही बंधन नसलेला हा एक विश्वव्यापी खेळ आहे. आजोबा आणि नातू यांच्या निरागस “ भिकार-सावकार “ खेळापासून ते थेट लाखो रुपयांची हारजीत करणाऱ्या जुगारापर्यंत हा खेळ फिरतो. सतत कोसळत असूनही पुन्हा पुन्हा बांधायचा प्रयत्न करायची सहजपणे शिकवण देणारा “ पत्त्यांचा बंगला “ आपण अनेकांनी अनेकदा लहानपणी बांधलेला असतोच ! मराठी साहित्याला या खेळाने अनेक नवीन शब्द दिले. जीवनात येणारी परिस्थिती आणि हातात येणारे पत्ते हे आपल्या इच्छेनुसार येत नसल्यामुळे , पत्त्यांची उपमा अध्यात्मिक पातळीवरही पोचते. .... आणि आजवर पाहिलेल्या पत्त्यांच्या जादू तर कोण विसरणार? अनेकांनी पत्त्यांच्या आधाराने सांगितले जाणारे भविष्यही जाणून घेतले असेल.

    अशा या पत्त्यांचा सर्वात जुना उल्लेख चीनमध्ये ९ व्या शतकामध्ये आढळतो. तेव्हा ३२ पत्तेच होते. नंतर हे पत्ते १३ व्या शतकात मंगोल आक्रमकांनी “ सिल्क रोड ” मार्गे पर्शियात नेले. तेथे त्याला गंजीफेह म्हणत. मोगल आक्रमकांनी १६ व्या शतकात पत्ते भारतात आणले. भारतात पत्त्यांनी गोल आकार धारण केला. विष्णूचे १० अवतार, राशी, नवग्रह यांच्या आधारानी पत्त्यांची संख्याही १२० वर पोचली. आत्ताच्या स्वरूपातील पत्ते साधारणत: १५ व्या शतकात अवतरले. तेव्हा सर्वात कमी मूल्याचा पत्ता नेव्ह ( KNAVE ) म्हणजे “राजपुत्र” असा होता. आजही पत्त्यांच्या अनेक खेळांमध्ये राजा सर्वात मोठा की एक्का मोठा, असा प्रश्न असतोच. पत्त्यांमध्ये जोकर आणायची मूळ कल्पना अमेरिकन लोकांची पण जोकरांचा धुमाकूळ मात्र हल्ली सगळ्या क्षेत्रातच दिसतो.

    मकरंद करंदीकर
    टे - (०२२) २६८४२४९०

  • दादरचा अभूतपूर्व छंदोत्सव

    p-34951-dadar-hobby-exhibition

    १० आणि ११ मार्चला दादरच्या दादर सार्वजनिक वाचनालयातील " छंदोत्सव २०१७ " या विविध छंद जोपासणाऱ्यांच्या छंदांच्या प्रदर्शनाला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. होळीच्या सणाची सुट्टी, दुसऱ्या शनिवारची सुट्टी , उत्कंठा शिगेला पोचलेल्या उत्तरप्रदेश निकालांची घोषणा आणि मुलांच्या परीक्षांचे दिवस यामुळे प्रदर्शनाला कसा प्रतिसाद मिळणार याबद्दल साशंकता होती. पण उ.प्र. च्या निकालांप्रमाणेच या प्रदर्शनाला छंदप्रेमी प्रेक्षकांनी अतिशय अनपेक्षित आणि अभूतपूर्व प्रतिसाद दिला. परीक्षा तोंडावर आलेल्या असूनही, कित्येक पालक आपल्या मुलांना " चांगले काही " पाहायला मिळावे म्हणून आवर्जून घेऊन येत होते.कितीतरी रसिक हे कल्याण, अंबरनाथ, वसई-विरार, पालघर अशा लांबच्या ठिकाणाहूनही आले होते.

    वेगळेच क्रोशाचे काम, फेल्टच्या कापडाच्या कलाकृती,सुसंगत अशा कविता लिहिलेल्या छत्री- बुकमार्क्स- टीशर्ट- पिशव्या-किचेन्स- पिगीबँक अशा वस्तू, कागदाच्या घड्या घालून केलेली फुले आणि विविध वस्तू, ओरिगामी, पार्चमेंट आणि आयरिश फोल्ड यांच्या वापराने बनविलेल्या कलाकृती,नारळ आणि बांबू यांच्या वापरातून बनविलेल्या श्रीकृष्ण मूर्ती- गणपती- दिवे-कलश-अशा कलाकृती,केवळ कागदाच्या जेमतेम पाव सेंटिमीटरच्या विविधरंगी पट्ट्या वापरून केलेली देखणी चित्रे, झाडांची पाने- झावळ्यांच्या पट्ट्या-- हिराच्या काड्या इत्यादींपासून बनविलेल्या पर्यावरण स्नेही वस्तू आणि छोटी खेळणी, कॅनव्हासवर उतरविलेली छायाचित्रे,रद्दी कागदापासून बनविलेले दणकट फर्निचर, नैसर्गिक रंगांमधील सुलेखन, वेगळ्या प्रकारच्या भरतकामातून तयार केलेले घड्याळ- कोंबड्याच्या आकाराचा
    टिकोझी- पर्स- फ्रेम्स- अशा अनेक गोष्टी,करवंटी आणि लाकूड यापासून बनविलेल्या लामणदिवा- मोटारसायकल- पिस्तूल- अशा वस्तू अशा असंख्य कलाकृती प्रदर्शनामध्ये होत्या.
    चित्रविचित्र आकाराचे - खूप जुने आणि नवे- विविध उपयोगाचे पत्ते आणि गंजिफा, विविध मुखवटे, महाराष्ट्रातील सर्व बस सेवेची तिकिटे, नाणी-नोटा- टपाल तिकिटे- प्रथम दिवस आवरणे,सुप्रसिद्ध व्यक्तींच्या सह्या आणि हस्ताक्षरे , जुन्या / नव्या काड्यापेट्यांची लेबल्स यांचे संग्रहही खूप छान होते.
    कागद कोरून साकारलेला आयफेल टॉवर- २ x २ इंचाचा कॅरम बोर्ड- २ इंचाचा फ्लॉवरपॉट अशा वस्तू सत्तरी ओलांडलेल्या चंद्रहास पटवर्धन यांनी बनविल्या होत्या. उपनिषदांचा अभ्यास केलेल्या यास्मिन श्रॉफ या ज्येष्ठ पारसी बाई स्वतः: काढलेल्या पक्ष्यांच्या आणि निसर्ग छायाचित्रांवरून " जगात सर्व गोष्टी शक्य आहेत, कधीही निराश होऊ नका, सकारात्मक विचार करा " असा प्रत्येकाशी व्यक्तीश: बोलून संदेश देत होत्या. मालती मेहेंदळे या सर्वात ज्येष्ठ म्हणजे ८१ वर्षांच्या छंद कलाकारांनी बनविलेली सध्या आणि क्रेप कागदाची फुले शब्दश: अचंबित करणारी होती. त्यांनी बनविलेली बकुळ, सोनचाफा, जास्वंद, आंबोली,नागचाफा अशी फुले ही कागदाची आहेत यावर विश्वासच बसत नव्हता. त्यांनी बनविलेल्या कागदाच्या जरबेरा फुलांच्या शेजारी खरी जरबेरा फुले ठेवून मी एक छायाचित्र घेतले. यातील खरे कुठले आणि खोटे कुठले हे ओळखणे कठीण होते.
    छंद जोपासला की वय, जात-धर्म, भाषा असे बांध राहतच नाहीत पण खूप सकारात्मक आणि सृजनशील जीवन जगता येते.
    -- मकरंद करंदीकर.

  • खाद्यपदार्थांतील भेसळ ओळखण्यासाठी

    रोज वापरले जाणारे खाद्यपदार्थांतील भेसळ ओळखण्यासाठी काही खास टिप्स…

    • दुध

    दुधातील भेसळीच्या अनेक घटना ठिकठिकाणी घडत असतात. दुधात डिटर्जंट मिसळलं जातं किंवा दुधाच्या नावावर काही जण सिंथेटिक मिल्कही विकतात. ही भेसळ जीवावरही बेतू शकते. म्हणूनच ती ओळखणं अत्यंत गरजेचं आहे. १० मिली. दूध तितक्याच पाण्यात एकत्र करा. त्यात फेस झाल्यास ती डिटर्जेंटची भेसळ आहे. तर, सिंथेटिक दूध चवीला वाईट असतं आणि ते उकळवताना त्याला फिक्कट पिवळा रंग येतो.

    • लाल तिखट

    रोज भाजी-आमटीला फोडणी देताना वापरल्या जाणाऱ्या लाल तिखटात विटेचा चुरा किंवा मीठ मिसळलं जातं. ही भेसळ ओळखणं अगदीच सोपं आहे. एक चमचाभर लाल तिखट ग्लासभर पाण्यात एकत्र करा. हे पाणी जर रंगीत झालं तर त्यात भेसळ आहे, असं समजा.

    • पनीर

    पनीरची भाजी आपण अगदी चवीनं, बोटं चाटून-पुसून खातो. पण या पनीरमध्ये स्टार्च मिसळून डेअरीवाले आपल्याला उल्लू बनवू शकतात. अशावेळी, पनीर घरी आणल्यानंतर ते थोड्याशा पाण्यात घालून उकळावं आणि थंड झाल्यावर त्यावर आयोडीन सोल्युशनचे काही थेंब टाकून त्याचा रंग तपासावा. पनीर जर निळं झालं, तर ते टाकून द्यावं किंवा दुकानात नेऊन ‘साभार’ परत करावं.

    • मध

    आपल्याकडचा मध शुद्ध आहे की नाही, हे तपासून पाहायचं असेल, तर कापसाची वात त्यात भिजवून पेटवून पाहावी. ती जर तेवत राहिली तर मध शुद्ध आहे. भेसळयुक्त मधात भिजवलेली वात सहजासहजी जळत नाही. ती तडतडते.

    • खोबरेल तेल

    खोबरेल तेलात बऱ्याचदा इतर तेलं मिसळून ग्राहकांची फसवणूक केली जाते. ही भेसळ ओळखण्यासाठी खोबरेल तेलाची छोटी डबी फ्रीजमध्ये ठेवावी. जे गोठेल ते खोबऱ्याचं तेल आणि बाकीची भेसळ.

    • धने पावडर

    आपल्या जेवणाला चव यावी आणि पोटदुखी वगैरे होऊ नये, म्हणून आपण धने पावडर आवर्जून वापरतो. पण त्यात लाकडाचा भुसा असेल तर? घाबरू नका. थोड्याशा पाण्यात धने पावडर शिंपडा. भुसा असेल तर तो पाण्यावर तरंगेल आणि आपल्या शंकेचं निरसन होईल.

    • जिरं

    जिऱ्यातील भेसळ ओळखायची असेल, तर थोडंसं जिरं तळहातावर घेऊन ते चोळावं. जर जिरं काळ पडलं तर ते भेसळीचे चिन्ह आहे.

    • काळी मिरी

    भेसळयुक्त काळी मिरी खूप चमकते आणि त्याला हलकासा रॉकेलसारखा वास येतो.

    • सफरचंद

    ‘अॅन अॅपल ए डे, किप्स डॉक्टर अवे’, हे जरी खरं असलं तरी आपण जे चकचकीत सफरचंद खातोय त्याला मेणाने पॉलिश तर केलेलं नाही ना, हे पाहणं आजकाल अत्यावश्यक झालंय. त्यासाठी इतकंच करा की, ब्लेड किंवा पातळ सुरी हलकेच फळाच्या सालावरून फिरवा. पांढऱ्या रंगाचा काही पदार्थ ब्लेड-सुरीला चिकटला तर ते मेण असेल. असं सफरचंद सालं काढून खा किंवा फळवाल्याला परत करून टाका.

    • हळद

    आपलं रोजचं जेवण हळदीशिवाय होऊच शकत नाही. पण या हळदीत जर मेटानिल येलो हा घटक असेल तर तो कॅन्सरला कारणीभूत ठरू शकतो. म्हणूनच हळद तपासून घेतलेली बरी. हळद पावडरमध्ये पाच थेंब हायड्रोक्लोरिक अॅसिड आणि पाच थेंब पाणी घालावं. त्याला जर वांग्याचा रंग आला, तर ही हळद कॅन्सरला आमंत्रण देऊ शकते.

    • हळकुंड

    काही जण हळकुंड आणून, ती कुटून घरीच हळद पावडर तयार करतात. अशावेळी, हळकुंड पॉलिश केलेली नाहीत ना, हे तपासणंही सोपं आहे. एका कागदावर हळकुंड ठेवून त्यावर थंड पाणी ओतावं. हळकुंडाचा रंग गेल्यास ते पॉलिश केलेलं आहे, हे सहज कळू शकेल.

    • दालचिनी

    दालचिनी असली की नकली हे ओळखणंही कठीण नाही. दालचिनी हातावर रगडल्यानंतर जर तुमच्या हाताला रंग लागला, तर ती अस्सल दालचिनी समजावी.

    • फ्रोजन मटार

    सध्या फ्रोजन मटारची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जाते. ते स्वस्तही पडतात आणि टिकतातही खूप. पण त्यात मेलाकाइट ग्रीन या घटकाचा समावेश असल्यासं पोटाशी संबंधित काही विकार होऊ शकतो. म्हणून आपण खरेदी केलेल्या मटाराचे थोडे दाणे थोड्याशा पाण्यात घालून ते ढवळावे. साधारण अर्ध्या तासानंतर त्याचा रंग पाहावा. पाणी रंगीत झालं, तर हे मटार न खाणंच श्रेयस्कर.

    • चहा पावडर

    चहा पावडरमध्ये वापरलेली चहा पावडर बेमालूमपणे मिसळली जाते किंवा अन्यही भेसळ होते. चहापत्ती थंड पाण्यात घातल्यानंतर रंग सोडत असेल तर त्यात भेसळ आहे, हे निश्चित!

  • हृदयविकार आणि पक्षाघात

    हृदयविकाराचा झटका येणे आणि पक्षाघात होणे (शरीराचा एक भाग लुळा पडणे) या दोन्ही विकारांचे कारण त्या त्या अवयवाला रक्ताचा पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यात रक्तपुरवठ्यास निर्माण झालेला अडथळा हे असते. असा अडथळा निर्माण होण्यामागे बरीच कारणे असू शकतात. या कारणांपैकी बरीच कारणे आता शास्त्राला उलगडलेली आहेत. या आजारांचा प्रतिबंध म्हणजे या कारणांचा प्रतिबंध करणे. सर्वच माणसांनी याबाबत जागृत असणे आदर्श आहे. किमान ज्यांच्या घराण्यात या प्रकारचे आजार ज्ञात आहेत, अशा वयाच्या चाळिशीच्या पुढच्या पुरुषांनी आपली तपासणी करून घेऊन योग्य तो जीवनशैलीत बदल करणे आवश्याक आहे. जीवनशैली म्हणजे आपला आहार, आपला व्यायाम, आपली व्यसने (विशेषतः तंबाखूचा वापर), आपली विचारांची पद्धत, आपले मनोरंजनाचे मार्ग आणि आपले जीवनविषयक तत्त्वज्ञान.

    आहाराचा शास्त्रशुद्ध विचार नऊ विभागांत केला जातो
    १) उष्मांक, २) प्रथिने, ३) स्निग्ध पदार्थ, ४) कर्बोदके, ५) जीवनसत्त्वे, ६) खनिजे, ७) पाणी, ८) चोथा आणि ९) तृप्ती. यापैकी प्रत्येक व्यक्तीच्या गरजेनुसार योग्य बदल (वाढ किंवा घट) एक किंवा अधिक अन्नघटकांत करणे इष्ट असते. सर्वसाधारणपणे आपले अन्नघटक पुढील असतात - १) तृणधान्ये (गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, मका, वरी, नाचणी), २) डाळी व कडधान्ये (मूग, मसूर, मटकी, चवळी, सोयाबीन, तूर इत्यादी), ३) भाज्या (पालेभाज्या, शिरांच्या भाज्या), ४) कोशिंबिरी, ५) दूधदुभते, ६) ऋतुमानाप्रमाणे फळे, ७) अन्नास चव येण्याकरता वापरलेले मीठ, मसाले, तेल, तूप व स्निग्ध पदार्थ, ८) चहा, कॉफी, इतर पेये याखेरीज मांसाहाराचादेखील विचार आवश्य क आहे.

    वजन योग्य पातळीवर येण्याच्या दृष्टीने उष्मांकांवर लक्ष हवे. वजन जास्त असले तर ते कमी करण्याकरता आहारातील उष्मांक कमी करून नियमाने व्यायाम करणे आवश्यवक आहे. त्या दृष्टीने मद्यपान (आणि धूम्रपान) कटाक्षाने वर्ज्य करावे. साखर सोडावी. भात, बटाटा, रताळे, साबुदाणादेखील शक्या तेवढा टाळावा किंवा सेवन मर्यादित ठेवावे. तीच योजना तेल, तूप, साय, लोणी, तळलेले पदार्थ यांच्याबद्दल असावे. मिठाचे सेवन चवीपुरतेच असावे. जीवनसत्त्व ब १२ व फोलिक यांचे सेवन आवश्य,क आहे. या दृष्टीने दूध नियमाने घ्यावे व ताज्या कोशिंबिरी सेवने इष्ट आहे. या कोशिंबिरींवर ताजे कापलेले लिंबू पिळून घ्यावे.

    संथगतीने सपाटीवर चालण्याचा व्यायाम वजन कमी करण्याच्या दृष्टीने चांगला आहे. दररोज ४० मिनिटे सकाळी व संध्याकाळी (दिवसाकाठी ८० मिनिटे) पायी चालण्याने दर आठवड्याला दोन हजार उष्मांक वापरले जातात. नऊ हजार उष्मांक वापरले गेले, की एक किलो मेदाचे विघटन होते म्हणजे ४० मिनिटे सकाळी व संध्याकाळी नियमाने संथगतीने सपाटीवर चालण्याने सहा आठवड्यांत एक किलो वजन कमी व्हावे. ही गती चालू ठेवल्यास सहा महिन्यांत निदान तीन किलो वजन घटेल. या प्रमाणात तीन वर्षांत पुरेसे वजन घटेल. कोणत्याही व्यायामाच्या बाबतीत काही मूलभूत नियम पाळावेत. व्यायाम सुरू करण्यापूर्वी आपली वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. वाढलेला रक्तदाब, त्रास न होणारा हृदयविकार, मधुमेह, गुडघ्यांचे आजार, पायांत दोष इत्यादी नाहीत याची शहानिशा आवश्याक आहे. व्यायामाची सुरवात माफक प्रमाणातच करावी. व्यायाम करून झाल्यावर अतिरेकी प्रमाणात थकवा येऊ नये. व्यायाम नियमित करावा. केवळ शनिवार - रविवार खूप व्यायाम करणे आणि इतर दिवशी व्यायाम न करणे हे अपायकारक ठरते. सुरवातीच्या माफक व्यायामात सावकाश वाढ करावी. कोणता व्यायाम करावा याचे मार्गदर्शन तज्ज्ञांमार्फत करून घ्यावे.

    आपल्या जीवनाचे ध्येय ठरविताना व्यवहार्यतेचा आणि वास्तवाचा विचार आवश्याक असतो. आपले विचार कितीही उच्च पातळीवर असले तरी पाय जमिनीवरच ठेवून माणसाने आपले ध्येय ठेवावे. आपली कुवत आणि परिस्थितीची पारख आणि जाणीव वास्तवाला धरून नसल्यास आपण ठरविलेले ध्येय गाठणे अव्यवहार्य ठरेल. त्यातून सतत अपेक्षाभंगाचे अनुभव येत राहतील. त्यातून मनावर विपरीत परिणाम घडेल. अस्वस्थ मनाचा परिणाम शारीरिक व्याधी निर्माण होण्याकडे होतो. रक्तदाब वाढतो, रक्तशर्करा वाढते, रक्तातील कोलेस्टेरॉल व इतर मेदघटक वाढतात. या साऱ्यांचा परिणाम हृदयविकार होण्यात होतो. हृदयविकार टाळणे शक्य् आहे. जेथे या रिस्क फॅक्टकर्सबद्दल समाजाचे प्रबोधन केले गेले आहे आणि बहुसंख्य लोकांनी योग्य आहार, नियमाने व्यायाम, तंबाखूपासून मुक्ती, उच्च रक्तदाबाचा ताबा आणि रक्तातील मेदघटांचे योग्य प्रमाण राखले तेथे हृदयविकार घटलेला आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- सकाळ / डॉ. ह. वि. सरदेसाई

  • इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग सहा

    आपण घेतलेल्या अन्नाला शरीराला आवश्यक असणाऱ्या स्वरूपात बदलवणे आणि पुढे ढकलणे हे तोंडाचे काम. त्यासाठी जीभ, पडजीभ, दात, दाढा, गाल, टाळू हे अवयव मदत करीत असतात.

    बत्तीस दातांना त्यांचे काम करण्यासाठी पुरेसा वेळ देणं आवश्यक ठरते. सावकाश जेवा, याचा आणखी एक अर्थ अभिप्रेत आहे, "नीट चावून चावून गिळा." यासाठी दात कणखर, बळकट असणे आवश्यक आहेत.

    हल्ली लहान मुलांचे दात लवकर किडतात, दोन वेळा ब्रश करूनदेखील दात किडतात, यासाठी प्लॅस्टिकच्या ब्रशऐवजी बोटांचा वापर करणे, किंवा कडूनिंबाच्या काड्यांचे टोक चावून ब्रश तयार करून वापरणे आणि टूथपेस्ट ऐवजी दंतमंजन वापरणे योग्य ठरेल. दात दोन वेळा घासले पाहिजेत. तसेच चुळादेखील नीट भरल्या पाहिजेत, म्हणजे दात लवकर किडत नाहीत. दंतमंजन गोड नको, फेस येणारे नको आणि नुसती पांढरी पावडर नको. किंचीत कडू, किंचीत तिखट किंचित तुरट असावे.

    प्रत्येकाच्या दातांची ठेवण वेगळी असते. पण काम एकच असते. अन्नाचे बारीक चूर्ण करणे. वरची किंवा खालची एक दाढ जरी पडली तरी त्या दाढेखाली येणारे अन्न भरडले जात नाही आणि तो तुकडा तसाच रहातो गिळला जातो आणि अपचन सुरू होते. त्यामुळे पचनाशी दातांचा संबंध देखील असतो, हे लक्षात घेतलं पाहिजे.

    किडलेल्या दात आणि दाढांवर वेळीच उपचार करून घ्यावेत. शक्यतो दात काढू नये. रूट कॅनाॅल सारखी पद्धत वापरून जेवढं वाचवता येईल तेवढं वाचवावं. गडग्यातला एक दगड काढला तर बाजूचे दगड हलू लागतात आणि सर्व गडगा ढेपाळतो. (गडगा म्हणजे दगडाची भिंत जी, कुंपण म्हणून केली जाते.) किडलेला, हलणारा दात अथवा दाढ ही अपचनाची सुरवात असते. ती जास्तीत जास्त वाचवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.

    त्याने जी बत्तीशी दिलीय, ते काही तरी कारण असेल म्हणूनच दिलीय ना ! त्याने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी विशिष्ट हेतू असतो, ते ज्ञान मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करणे म्हणजे खरे शिक्षण.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    21.03.2017