वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
गणपतीला कमळ प्रिय आहे म्हणून पूजेत कमळ वाहण्याची प्रथा आहे माझ्या अभ्यासात असे लक्षात आले की कमळ पित्तशामक व ह्रूद्य आहे म्हणजे हार्टला उपयोगी आहे. कमळामुळे क्षयातील ताप कमी होतो ,बायकांच्या रक्तप्रदरावर(जास्त दिवस ब्लिडींग होणे) कमळ उपयोगी आहे.हार्टवर कमळ जबरदस्त उपयोगी आहे.
१९८६सालची गोष्ट. श्री. चौबळ (वय७२)ह्मानी मला सांगितले की डॉक्टरानी सांगितले आहे की त्यांचे(चौबळाचे)हार्ट७५% काम करत नाही. फक्त२५%च काम करते आहे मी त्यांना जमेल तेव्हा ताजी कमळे खायला दिली. नंतर कमळे सुकवूनकेलेल्या गोळ्या दिल्या. चार महिन्यानी एक दिवस मला सकाळी९वाजता चौबळांचा फोन आला."ताप आल्यामुळे पूजा नर्सिंग होम मधे आहे. आज सकाळी पावणे आकरा वाजता येऊन भेटा.' मी म्हटले"अहो सकाळी१०-४५ला शक्य नाही , वाँटर प्रुफिंगसाठी माणसाना कामाला लावायला जायचे आहे. १२ वाजता येतो .'तेम्हणाले "नाही १०-४५लाच या. बाकी मला माहिती नाही 'आणि फोन ठेवून दिला. मी पावणे आकराला नाईलाने गेलो. चौबळानी मला बसयला सांगितले .व मी सांगे पर्यंत उठायचे नाही असे सांगितले.मी वैतागून बसून राहिलो कामे दिसत होती. पण इलाज नव्हता. तेव्हड्यात डॉ क्टर आले. त्यांनी चौबळाना तपासले. ठीक आहे म्हणून जाऊ लागले. चौबळानी डॉ ना विचारले हार्ट कसे आहे? त्यावर डॉ क्टर म्हणाले चौबळ तुमचे हार्ट१००%काम करते आहे. किती वेळा सांगू. का लिहून देऊ. आणि डॉ क्टर गेले. नंतर चौबळ मला म्हणाले माझे हार्ट१००% काम करत आहे हे मला तुम्हाला डॉ क्टरांच्या तोंडून ऐकायचे होते. म्हणून त्रास दिला. कारण हे तुमच्या कमळाच्या गोळ्यामुळे झाले. मी गेली दहा वर्षे डॉ च्या गोळ्या खाल्या पण फायदा नव्हता.
आपल्या पूर्वजानी गणपतीला कमळ आवडते सांगून सर्वसामान्याचे आरोग्य राखण्याचा प्रयत्न केला. देवाला जे प्रिय ते माणसाला उपयुक्त! त्यांनी धंदा केला नाही म्हणून ते अडाणी होते का?
मला वाटते दर वर्षी गणपतीला कमळ वाहून झाल्यावर दुसरे दिवशी ते कमळ पाण्यात २४तास भिजत ठेवावे .नंतर ते पाणी सर्वानी प्यावे. म्हणजे वर्ष भर हार्ट सेफ राहयाला मदत होईल. ज्यांना हार्टचा त्रास आहे त्यांनी रोज कमळाचे सरबत करून प्यावे फायदा होण्याची शक्यता आहे. किमान त्रास नक्की नाही.
-- अरविंद जोशी. B,Sc,
9421948894
हा मेसेज फाँर्वड करताना कोणताही बदल करु नये
May 16, 2017
पुणेकरांवरती विनोद करताना त्यांच्या या प्रश्नाला सगळेच हसून दाद देतात. मात्र बुद्धीवादी पुणेकराचा हा प्रश्र्न एकशे एक टक्के बरोबरच आहे. म्हणजे या प्रश्नातून तो अनेक शक्यतांचं समाधान करुन घेतो.
January 24, 2023
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.
September 4, 2018
एकजात सगळ्याच तज्ज्ञांना मोडीत काढणाऱ्या निवडणूक निकालाचे विश्लेषण करायचे झाल्यास ते केवळ एका वाक्यात करता येईल आणि ते म्हणजे मतदारांनी विकासाला कौल दिला.विकासासाठी एक स्थिर आणि सक्षम सरकार गरजेचे असते, ही भावना कुठेतरी मतदारांच्या मनात बळावली आणि त्यांनी दोनपैकी एक पर्याय निवडताना काँठोसला उजवा कौल दिला.
पंधराव्या लोकसभेचे निवडणूक निकाल काँठोससहित सगळ्याच राजकीय पक्षांना आणि तथाकथित राजकीय तज्ज्ञांना धक्का देणारे ठरले.
May 24, 2009
आयुर्वेदातील ‘सुवर्णप्राशन संस्कार’ हा हिंदुस्थानच्या ‘राष्ट्रीय लसीकरण’ मोहिमेचा भाग व्हायला हवा. आयुर्वेद हे या राष्ट्राचे पर्यायी नव्हे तर प्रमुख वैद्यकशास्त्र आहे. उत्तम रोगप्रतिकारक्षमता निर्माण करण्यासाठी आपल्याला आयुर्वेदाचाच आधार घ्यावा लागेल.
August 23, 2016
शब्दांमध्ये इतकी व्यापकता, समर्थता सामावलेली असते की, ज्याप्रमाणे चिंतामणी मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकतो, अगदी त्याचप्रमाणे शब्दांमध्येही माणसाच्या मनातल्या सगळ्या इच्छा पुर्या करण्याचं सामर्थ्य असतं.
January 22, 2022
जेजे लोकं इतिहासापासून काही शिकत नाहीत, त्यांना भविष्य माफ करत नाही, असे म्हणतात. या म्हणण्यात तथ्य निश्चितच आहे. शेवटी इतिहास म्हणजे तरी काय?
June 26, 2005
नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये मतदानाचे महत्व सगळ्यांनी सांगूनही कित्येक लोक त्यापासून दूर राहिले. त्यातील काही लोक पूर्णपणे आत्मकेंद्रित होते हे गृहीत धरले तरी काही लोकांनी असा सूर काढला की काय करणार कोणीच लायक उमेदवार नव्हता म्हणून आम्हाला मतदान करता आले नाही. आता ही पळवाट म्हणून काढणारे किती व खरेच असा विचार करुन मत न देणारे किती हा संशोधनाचा विषय होईल. पण मग मत न देऊन तरी हा प्रश्न सुटणार आहे का? चांगले उमेदवार नाहित म्हणून मत द्यायचे नाही आणि मग पुन्हा लोकांशी देणे घेणे नसण्यार्या प्रतिनिधींकडे सत्ता सोपवायची हेच चालू ठेवायचे का? माझ्या ‘लढा किंवा झोप काढा ’ या लेखात म्हटल्याप्रमाणे हाही एक स्वातंत्र्यलढाच आहे. या लेखात आपण दुसर्या पर्यायाचा विचार करू.
October 15, 2009
कवी नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ बी यांची इयत्ता सातवीच्या कुमारभारती पुस्तकात असलेल्या या कवितेचा आणि गाईंचा तसा काही संबंध नाही. आठ-नऊ वर्षांच्या आपल्या रूसलेल्या-रडवेल्या चिमुरडीची समजूत घालत असलेल्या बापाचे मनोगत कथन करणारी ही कविता…
December 12, 2017
एकतर इथली सगळी स्टोअर्स प्रचंड मोठाली. त्यात नवखा माणूस हरवला तर शोधायला मुश्कील अशी परिस्थिती. आतातर सेलफोनशिवाय एकाच दुकानात एकमेकांना शोधणं अवघड वाटतं. आठ नऊ वर्षांपूर्वी, सेलफोन्सशिवाय, आम्ही सात आठ जण इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या दुकानांतून फिरून, एवढया धुमश्चक्रीमधे आमचा एकही मेंबर कसा हरवला नाही, याचंच आश्चर्य वाटतं. अर्थात दळणवळणाची साधनं नसतानाही, आपल्या सेनेच्या सार्या तुकड्यांना नियंत्रणात ठेवण्यात, अनुपमाने एखाद्या कसलेल्या सेनापतीसारखे नैपुण्य दाखवले, हे मान्य करायलाच हवे.
सोबत भली मोठी शॉपिंग लिस्ट घेऊन जायची आणि केवळ काही तासांमधे अगदी यादी बरहुकूम खरेदी करून सार्या वस्तू आणायच्या, हे काही येर्यागबाळ्याचे काम नाही. एकतर यादीतल्या सार्या वस्तू मिळवण्यासाठी जबरदस्त प्लॅनिंग, चपळाई आणि स्मार्टनेस असावा लागतो. दुसरं म्हणजे, आजूबाजूला पसरलेल्या या सेलच्या अफाट समुद्रातल्या, इतर असंख्य आकर्षक गोष्टींकडॆ काणाडोळा करायचा कठोर मनोनिश्चय देखील लागतो. हे म्हणजे, अलीबाबाच्या गुहेत जाऊन, मोजून चार माणकं, पंधरा पाचू, एकवीस मोती आणि एक नीलमणी हुडकून काढायचा आणि बाकीच्या खजिन्याकडे निर्धाराने न बघता गुहेच्या बाहेर यायचं असा प्रकार झाला. आमच्याकडे आणि देशमुख कुटुंबाकडे ना हव्या असलेल्या वस्तू मिळवायची चतुराई होती, ना नको असलेल्या वस्तूंच्या मोहात न पडण्याएवढा मनोनिग्रह! त्यामुळे हव्या असलेल्या वस्तूंपेक्षा ऐनवेळी दुसर्याच वस्तू आवडणं, ऐन समरप्रसंगी, घेण्याच्या आणि न घेण्याच्या वस्तूंमधे चित्त भरकटून दोलायमान होणं, नको त्या वस्तू धुंडाळण्यात वेळ घालवल्यामुळे, नेमक्या हव्या त्या वस्तूंपर्यंत पोहोचण्यास उशीर होणे, वगैरे छोटे मोठे प्रमाद आमच्या हातून घडलेच.
शेवटी एकदाचं शॉपिंग आटोपलं. सकाळचे जेमतेम साडे दहा वाजले होते. पुन्हा एकदा सारे गुर्जरांच्या घरी येऊन पोहोचलो. श्रीयुत गुर्जर व आमचा मुलगा सिद्धार्थ आरामात उठून ब्रेकफास्ट करून प्रसन्न चित्ताने टी.व्ही. बघत बसले होते. पुढचे दोन तीन तास, खरेदी केलेल्या वस्तूंची, शिवाजी महाराजांनी लुटलेल्या सुरतेच्या खजिन्याच्या थाटात छाननी झाली. काही कपडे दुकानातून घरी आणताना अचानक आकुंचित झाले होते, तर काही प्रसरण पावल्यासारखे वाटत होते. काही वस्तू दुकानात जेवढया आकर्षक वाटल्या तेवढया आता वाटत नव्हत्या. माधवरावांनी थोडी अधिक चपळाई, धूर्तपणा आणि थोडं कमी स्त्रीदाक्षिण्य दाखवलं असतं, तर हाता तोंडाशी आलेल्या दोन तीन वस्तू गमवाव्या लागल्या नसत्या असं नलिनीबाईंनी पुन्हा पुन्हा बोलून दाखवलं. परंतु एकंदर मोहीम फत्ते झाली, असे सर्वांचेच मत पडले.
त्यानंतर आठ नऊ थॅंक्सगिव्हींग आले आणि गेले. आता त्या थॅंक्सगिव्हींग च्या सेलचं काही मोठंसं अप्रूप देखील राहिलं नाही. किंबहुना त्या २००२ सालच्या थॅंक्सगिव्हींग सेलनंतर, पुन्हा कधी आम्ही त्या सेलला जाण्याचं धाडस देखील केलं नाही. त्यावेळी तर आम्ही खरेदी केलेल्या वस्तू नंतर कशा का वाटेना, त्या आपल्या गळ्यात पडल्यासारख्या वापरत राहिलो. अशा खरेदी करून आणलेल्या किंवा कुणाकडून भेट म्हणून मिळालेल्या परंतु पसंत न पडलेल्या वस्तू, न वापरता त्याच दुकानात पावतीसकट परत करता येतात, याचा देखील आम्हाला पत्ता नव्हता. बर्याच वर्षांनी समजलं की थॅंक्सगिव्हींगच्या सेलच्या दुसर्या दिवशी त्याच स्टोअर्समधे दोन दोन तास रांगांमधे उभे राहून लोक न पसंत पडलेल्या वस्तू परत करत असतात.
अजूनही थॅंक्सगिव्हींगचा सेल येतो. ऑफिसमधले, आसपासचे, ओळखीचे कोणी कोणी सेलमधे काय काय घ्यायचं याच्या याद्या आणि strategy planning करत असतात. आम्ही आपले बर्याच वर्षांपूर्वी, श्रीयुत गुर्जरांनी दाखवलेल्या व्यवहारीपणाला दाद देत, स्वत:ला उबदार पांघरूणात गुरफटून घेऊन झोपी जाणं पसंत करतो.
– डॉ. संजीव चौबळ
April 2, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti