वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
इंदिरा संत याचे शेला, मेंदी, मृगजळ, मरवा ,निवारा असे अनेक काव्यसंग्रह प्रसिदध आहेत. त्यांनी ऐकून २५ पुस्तके लिहिली.
July 30, 2021
पर्यटन विशेषांकासाठी संस्कृत साहित्यातील मेघाचा रामगिरी ते अलका व्हाया उज्जैन असा प्रवास किंवा रघुवंशातील रामाने सीतेसह वानर आदींचा घडलेला लंका ते अयोध्या प्रवास या दोन विषयांबाबत काही लिहाल का? अशी विचारणा झाली. त्याला पूर्वी कधीतरी मीच उल्लेख केलेल्या डॉ. भावे आणि डॉ. सोहोनी यांच्या सदीप व्याख्यानाच्या स्मृतीची पार्श्वभूमी होती पण मग मी म्हटलं, त्या प्रवासांवर स्वतंत्र पुस्तके प्रकाशित झाली आहेत
August 17, 2023
शुक्रवारचा दिवस हा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी काळा दिवस ठरला कारण आता पर्यंतचा सर्वात मोठा 'रॅन्समवेअर' व्हायरसचा हल्ला शुक्रवारी झाला. भारतासहित जवळपास १०० देशात 'वन्नाक्राय ' या 'रॅन्समवेअर' व्हायरस ने अक्षरशः धुमाकूळ घातला . सायबर सिक्युरिटी फर्म अव्हास्ट ने सांगितले कि जगभरात जवळपास पंचाहत्तर हजार संगणकावर हा हल्ला झाला. शंभराहून अधिक देश या हल्ल्याचे शिकार झाले . या हल्ल्याचा सर्वात जास्त फटका इंग्लड ला बसला . इंग्लडमधील हॉस्पिटल्स आणि टेलिफोन यंत्रणा यामुळे खिळखिळी झाली . अनेक हॉस्पिटल्स मध्ये तर रुग्णांचे ऑपेरेशन आणि अपाईनमेंट देखील रद्द करावे लागले तर अनेक ठिकाणी रुग्णांचा डेटा नससल्यामुळे डॉक्टरांवर कागद पेन घेऊन रुग्णांचा चार्ट तयार करण्याची वेळ आली.
'रॅन्समवेअर' म्हणजे नेमकं काय ?
एखाद्या दिवशी तुम्ही तुमचा संगणक किंवा लॅपटॉप चालू करायला जाता आणि त्यावर एक मेसेज तुम्हाला दिसतो कि तुमचा संगणक किंवा लॅपटॉप आम्ही हॅक केलेले असून तुमचा संपूर्ण डेटा तुम्हाला हवा असल्यास स्क्रिन वर दिसत असलेल्या पेमेंट ऑप्शन ला क्लिक करून अमुक इतकी रक्कम ह्या बँक खात्यात पुढील अमुक इतक्या तासात जर ही रक्कम जमा झाली नाही तर तुमचा सर्व डेटा डिलिट होईल. तुमच्या स्क्रीनवर एका बाजूला तुम्हाला दिलेल्या वेळेचे काउंट डाऊन सुद्धा चालू झालेले असते. अर्थात तुमच्या संगणक किंवा लॅपटॉपचा संपूर्ण ताबा ह्या हॅकर्स ने घेतलेला असतो. ह्या मेसेजच्या पुढे तुमचा संगणक किंवा लॅपटॉप जातच नाही अर्थात तुमची ऑपरेटींग सिस्टम चालूच होत नाही. ह्या प्रकारच्या सायबर गुन्हेगारीला रॅन्समवेअर असे म्हणतात. ह्या मध्ये कुणीतरी सायबर गुन्हेगार अज्ञात ठिकाणाहून तुमचा संगणक किंवा लॅपटॉप हॅक करतो आणी तुम्हाला खंडणीची मागणी करतो. असे प्रकार जगात अनेक ठिकाणी उघडकीस आलेले आहेत .जगाच्या कुठल्या तरी कानाकोपर्यात बसून तुमचा डेटा नष्ट करण्याचे उद्योग हे ‘सायबर भामटे’ करायला लागले.
काय काळजी घ्यावी ?
१. सगळ्यात आधी तर तुमच्या संगणक किंवा लॅपटॉप मध्ये चांगला अॅण्टीव्हायरस असणे तसेच अॅण्टीव्हायरस नियमित अपडेट असणे आवश्यक आहे.
२.इंटरनेट वापरताना नेहमी सुरक्षित वेबसाईटलाच भेट द्या. कुठल्याही मोफत भूलथापाना बळी पडुन चुकीच्या वेबसाईटला किंवा अनोळखी लिंकला क्लिक करू नका .
३. संगणक किंवा लॅपटॉपची ऑपरेटींग सिस्टमही नेहमी अपडेट असावी कारण अपडेट मध्ये बऱ्याच वेळा काही प्रॉब्लेम्स वर सोलुशन उपलब्ध असते . जसे कि 'रॅन्समवेअर' साठी पॅच मायक्रोसॉफ्ट ने दोन महिन्यापूर्वीच जारी केला होता .
४. तुमच्या संगणक किंवा लॅपटॉपचा नियमित डेटा कॉपी करून दुसऱ्या हार्ड डिस्कवर ठेवावा म्हणजे तुमचा संगणक हॅक झाला आणि तुमच्या डेटा च्या बदल्यात हॅकर ने तुम्हाला पैसे मागीतले तरी तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही .
स्मार्टफोन ला ही धोका
संगणकांप्रमाणे स्मार्टफोन ला ही हॅकिंग चा धोका वाढल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. अनेक वेळा तुमच्या स्मार्टफोन वर काही जाहिराती दाखवल्या जातात त्यातील काही जाहिराती ह्या हॅकरने तुम्हाला भुलवण्यासाठी सुद्धा टाकल्या असू शकतात .त्यामुळे अशा जाहिरातीला क्लिक करू नये तसेच एखादे एप तुमच्या स्मार्टफोन वर इन्स्टाल करण्यापूर्वी ते सुरक्षित आहे की नाही हे पाहून घ्या . शक्यतो गुगल प्ले वरून एप इन्स्टाल करा . कुठलीही ए पी के फ़ाइल घेऊन तुमच्या स्मार्टफोन वर इंस्टाल करू नका .
Free Jio Data च्या नावाने व्हाट्सअप मेसेज मध्ये येणाऱ्या लिंक्स देखील अशाच फसव्या आणि घातक असतात.. फ्री डेटा तर मिळणार नाहीच, पण तुमच्या मोबाईल मध्ये फ्री व्हायरस नक्की येऊ शकतो... तेव्हा असे फुकट मेसेज मधील लिंक ओपन देखील करू नका आणि फॉरवर्ड देखील करू नका...
May 14, 2017
मलेरियाच्या संशोधनातील महत्त्वाचे शास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते
मलेरिया विषयक संशोधनात रॉस खेरीज अनेक युरोपियन शास्त्रज्ञ आघाडीवर होते. किंबहुना काही संशोधकांनी मलेरियाच्या परोपजीवांचा सखोल अभ्यास डॉ. रॉस या क्षेत्रात पडण्यापूर्वीच सुरू केला होता. त्या सर्वांचा या संशोधन मार्गावरील इतिहास हाही तितकाच मनोरंजक आहे.
अल्फानॉस लॅव्हेरान
याचा जन्म फ्रान्समधील एका बुद्धिमान कुटुंबात झाला. वैद्यकीय शास्त्रामधील मेडिसीन व पॅथॉलॉजी ह्या दोन महत्त्वाच्या विषयांमध्ये तो निष्णात होता. कोणत्याही रोगाचा अभ्यास करताना या दोन्ही विभागांचा आधार घ्यावा लागतो. फ्रेंचांची वसाहत अल्जियर्स म्हणजे अफ्रिकेच्या उत्तर भागात होती. लॅव्हेरान याची या जागी युद्धातील एक प्रमुख वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. वॉने व कॉनस्टेंटाईन या दोन गावात १८८० ते १८८५ मध्ये फ्रेंच सेना लढत होती. त्या काळात तेथे तापाची साथ इतकी जबरदस्त होती की, युद्धभुमीवर जेवढे सैनिक लढताना मरत, त्यापेक्षा जास्त साथीच्या रोगाने मरत होते. लॅव्हेरान या तापाच्या रोगाने चक्रावून गेला होता.त्याने अनेक तापाने मेलेल्या सैनिकांचे शवविच्छेदन (Autopsy) केले, तेव्हा या सर्वांमध्ये आकाराने मोठी झालेली प्लीहा व यकृत (Enlarged Spleen & Liver) निरिक्षणात आढळले. त्यावर काळपट रंगाचे पट्टेही दिसून आले. हे पाहुन लॅव्हेरानला दाट शंका आली की हा कोणत्यातरी जंतूंचा परिणाम असून त्यामुळे रोगी दगावतात. हे लक्षात घेऊन त्याने मरणपंथाला लागलेल्या काही रुग्णांच्या रक्ताचे नमुने काचपट्टीवर घेऊन अतिशय प्राथमिक स्वरूपाच्या मायक्रोस्कोप खाली तपासणी सुरू केली सध्याच्या काळात काचपट्टीवरील रक्तातील सर्व तऱ्हेच्या पेशी व परोपजीवी यांच्यावर रंगीत द्रावाचा (staining procedure) प्रक्रिया केली जाते. त्यामुळे ते अधिक ठळकपणे ओळखण्यास सोपे जातात परंतु सुरवातीला लॅव्हेरानच्या काळात ह्या द्रावांचा शोध लागला नव्हता, ही त्याच्यासाठी मोठी अडचणच होती. असे असून सुद्धा रंगहीन तांबड्या पेशींवर लॅव्हेरानला काळपट रंगाचे बारीक कण दिसत होते. त्यांना Malariform leucocytes असे नाव देऊन तो या निष्कर्षाला आला की हेच मलेरियाचे जंतू असून तेच या तापाला कारणीभूत आहेत. एका सकाळी तो रुग्णाच्या रक्ताचे काचपट्टी वरील निरीक्षण करीत असताना एका तांबड्या रक्तपेशीजवळ वळवळ करणारा बारीक तंतूमय जीवाणू त्याला दिसला त्यावेळी त्याची बालंबाल खात्री पटली की हा मलेरियाच्या जंतूचा काहीतरी भाग आहे. खरे तर अशी वळवळणारी जीवाणूची स्थिती आजमितीलासुद्धा मायक्रोस्कोपखाली दिसणे फार दुर्मिळ असते.
त्या काळामध्ये साधारणत: मलेरियाबाबत असा प्रचलित प्रवाह होता की त्याचे जंतू बहुधा हवेतून शरीरात शिरतात परंतु लॅव्हेरान जसजसा खोलात जाऊन संशोधन करू लागला तेव्हा त्यांच्या असे लक्षात येऊ लागले की हे जंतू (Bacteria) नसून परोपजीवी म्हणजेच (Parasites) आहेत. एकदा तर त्याने अशीही शंका व्यक्त केली होती की हे परोपजीवी डासांच्या चावण्यातून माणसाच्या शरीरात शिरत असावेत. परंतु या त्याच्या विधानाला बाकीच्या वैद्यकीय शास्त्रज्ञांनी नुसते धुडकावलेच नाही तर त्याला वेड्यातही काढले. यामुळे तो हवालदील झाला पण तरीही आपण पाहिलेले रक्तातील परोपजीवी त्याने प्रसिद्ध फ्रेंच जंतू शास्त्रज्ञ लुई पाश्चर यांना मायक्रोस्कोप खाली दाखविले व पाश्चरचीही खात्री पटली की हे जंतू नसून परोपजीवी आहेत.
मलेरियाचे परोपजीवी शोधण्याचा पहिला मान लॅव्हेरानकडे जातो. त्याने पॅरेसायटॉलॉजी ही शाखा (परोपजीवांचे शास्त्र) मनुष्याच्या अनेक रोगांशी निगडीत आहे हे सिद्ध केले. दुर्दैवाने मलेरिया व डास यांचा निकटचा संबंध तो दाखवू शकला नाही. परंतु त्याच्या संशोधनाची व्याप्ती खरोखरच फार मोठी होती. लॅव्हेरानने आपले सर्व लक्ष Trypanosoma या अफ्रिकेतील रोगाकडे केंद्रित केले होते. हा रोग एका विशिष्ट गटाची माशी चावल्यामुळे होऊन त्यात माणूस अखंड झोप येऊन अखेर मरण पावतो (Sleeping Sickness). त्याने या रोगाचे परोपजीवी काचपट्टीवरील रक्तामध्ये दाखवले व त्याच सुमारास काचपट्टीवरील रक्ताचा नमुना रंगीत करण्याची ढोबळ पद्धत सुदैवाने अवगत झाली होती.
Leishmaniasis (kala Azar, Dum Dum Fever) हा रोग एका विशिष्ट माशीपासून होतो हेही लॅव्हेरानने सिद्ध केले होते. या रोगाचा प्रार्दुभाव बिहार बंगाल भागात जास्त प्रमाणात आढळतो परेसायटॉलॉजीचा जनक लॅव्हेरान त्याच्या संशोधनामुळे अजरामर ठरला होता.
पॅट्रीक मॅन्सन
इंग्लंड देशाचा अतिशय नावाजलेला M.D. Physician, ज्याने आपले उभे आयुष्य उष्ण कटिबंधातील (Tropical Medicine) रोगांवरील संशोधनात घालावले. आजमितीसही भारत व आजुबाजूच्या देशांमध्ये या रोगांचा तिढा तसाच कायम आहे किंबहुना Tropical Medicine चा मॅन्सन हा जनक असून त्याने आपल्या प्रत्यक्ष अनुभवांवरील लिहीलेले पुस्तक हे वैद्यकीय शास्त्रावरील अतिशय सन्मान मिळालेल्या पुस्तकाच्या यादीमधील एक असे समजले जाते. त्याने अंदाजे २० वर्षे फिलीपाईन्स व चीन या देशात इंग्लंडचा वैद्यकीय अधिकारी म्हणून बहुमोलाचे काम केले होते. Filariasis (हत्ती रोग) डास चावल्याने होतो याचा शोध व रक्तात दिसणारे परोपजीवी त्यानेच प्रथम दाखविले होते. डास व मलेरिया यांचा काहीतरी संबंध आहे हा सिद्धांत त्यानेही मांडला होता. यामधूनच डॉ. रॉसला संशोधनाचा सूर मिळाला व रॉसने आपले कार्य पूर्णत्वास नेले. मॅन्सनने त्या सिद्धांताचा पुढे पाठपुरावा केला नाही. त्या काळी तो लंडनमधील एक प्रतिष्ठित, उच्च दर्जाचा फिझिशियन म्हणून मानला जात असे. या व्यवसायातून त्याने भरपूर मान, कीर्ती व पैसा मिळवला.
केमिलो गॉल्गी
हा एक हुषार इटालियन डॉक्टर, प्रथम फिजिशियन, नंतर सायकॅट्रीस्ट पुढे पॅथॉलॉजी विभागात मेंदू व मज्जारज्जूचा मायक्रोस्कोप द्वारा अभ्यास करणारा गाढा अभ्यासक व मलेरिया परोपजीवांचा अभ्यास करणारा अशा प्रकारे विविध वैद्यकीय क्षेत्रात नैपुण्य मिळविणारा महान संशोधक होऊन गेला. मलेरिया परोपजीवांची तांबड्या रक्तपेशींत होणारी वाढ व बरोबर त्याच वेळी रुग्णांना येणारी प्रचंड हुडहुडी (Chills) व वाढत जाणारा ताप याचा संबंध प्रथम गॉल्गीने दाखवून दिला व त्याचबरोबर क्वींनिन या औषधाने परोपजीवी मरतात, त्यावेळी ताप पूर्णपणे उतरतो हे महत्त्वाचे अनुमान त्यानेच काढले. काचपट्टीवरील रक्ताच्या तांबड्या रक्तपेशीत दिसणाऱ्या मलेरियाच्या परोपजीवीचा फोटो प्रथमच त्याने दाखविला. पाव्हिया येथील इटालियन विद्यापीठाच्या म्युझियम मध्ये ही अनमोल रक्ताची काचपट्टी व फोटो आजही उपलब्ध आहे. याखेरीज मज्जातंतू मायक्रोस्कोपखाली पहताना रंगीत दिसावेत यासाठी त्याने विविध स्टेन (रंग द्रव्य) शोधून काढले. या मज्जातंतूंच्या पेशीमधील महत्त्वाचा भाग गॉल्गी टेंडन या नावाने प्रसिद्ध आहे.
मलेरिया व नोबेल पारितोषिक
नोबेल पारितोषिकांच्या गेल्या शंभर वर्षांच्या इतिहासात वैद्यकीय विभागामध्ये मलेरिया व त्यासंबंधीत महत्त्वाचे संशोधन यासाठी आजपर्यंत तीन वेळा पारितोषिके देण्यात आली आहेत. यावरून मलेरियाचे महत्त्व किती होते हे पटण्यासारखे आहे
१९०२ रोनॉल्ड रॉस-पूर्णपणे मलेरियावरील संशोधन
१९०६ केमिलो गॉल्गी-मज्जातंतूचा अभ्यास व मलेरियावरील संशोधन
१९०७ लॅव्हेरान -मलेरिया, ट्रिपॅनोसोमियासिस व काला आझार या रोगांवरील संशोधन
इटालियन डॉक्टर निओवनी ग्रासी
ग्रासीने प्लाझमोडियम गटाचा (मलेरियाच्या परोपजीवाचा) शोध अतिशय मेहनत घेऊन लावला होता. पुढे त्याची दिशा चुकली व तो रॉस बरोबरील भांडणाच्या गुंत्यात साफ अडकला. मॅन्सननेही डासांवरील संशोधनाचा पाठपुरावा शेवटपर्यत जाऊन केला नाही. त्यामुळे ग्रासी व मॅन्सन यांचे मलेरियावरील पारितोषिक हुकले परंतु तरीसुद्धा दोघांचे कार्य मोलाचे आहे ह्यात शंकाच नाही.
-- डॉ. अविनाश वैद्य
October 10, 2022
आज दिवाळसणाचा चवथा दिवस. दिवाळीची चवथा दिवस म्हणजे सरत्या विक्रमसंवताचा शेवटचा दिवस.. अश्विन वद्य अमावास्येचा हा दिवस ‘लक्ष्मीपूजना’चा दिवस..
October 30, 2016
नवा भारत घडवण्यासाठी देश सज्ज मात्र विरोधी पक्ष अजूनही जुन्या मानसिकतेत .काळानुसार बदला नाहीतर मोडून पडाल हा संदेश गेला आहे .
December 5, 2016
आपण आपल्या आवडत्या अभिनेत्याप्रमाणे आवडत्या नेत्यालाही कोणत्या ना कोणत्या साचात बंदिस्त करायला आपण व आपला समाज आतुर असतो. त्यामागचे कारण म्हणजे सर्वच पातळीवर त्याबाबतचे अज्ञान किंवा बौद्धिक आळस. एकदा का आपल्या आवडत्या साच्यात त्यांना बसवले की, त्याच्या स्वतंत्र विचारशक्तीची वा आकलनाची गरज आपल्याला वाटत नाही. खरं तर आपले डोके चालवून आकलन करून घ्यायची वेळ येऊ नये, यासाठीच तर आपला आग्रह आणि अट्टाहास असतो. अशा साचेबद्ध रचनेत सर्वात जास्त अन्याय झालेले महापुरुष म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
December 6, 2022
समाजमनाला आज स्त्री – पुरूष यांचा एकत्रीतपणे विचार करायचा सोडून देत त्यांच्या स्वतंत्रपणे विचार करायला सुरूवात करायला हवी. तरच आपल्या देशात स्त्री- पुरूष समानता कर्या अर्थाने अस्तित्वात येईल.
June 7, 2013
तांदुळजा (चवळीचा पाला) हि भाजी बारा महिने उगवते. हिची लहान रोपं असतात व पाने बारीक असतात. हि भाजी चवीला गोड व शीतल गुणाची असल्याने शरीरातील वात व पित्तदोष कमी करते.
हिचे बरेच औषधी उपयोग आहेत ते आपण पाहूयात:
१)भाजलेल्या जखमेवर तांदुळजाच्या भाजीचा रस लावावा.
२)डोळे,हातपाय,व लघ्वीची आग होणे ह्यात तांदुळजाच्या भाजीचा १/४ कप रस+ साखर हे मिश्रण उपाशी पोटी घ्यावे.
३)चाई अर्थात केसांना लूत लागणे असे बोली भाषेत म्हणतात, त्यांवर तांदुळजाच्या भाजीचा रस+हिंग हे मिश्रण डोक्यावरील केस गेलेल्या भागी जीरवावे.
४)वारंवार ताप येणे किंवा तीक्ष्ण औषधे घेतल्याने अशक्तपणा आल्यास ४२ दिवस पाल्याचा रस एक कप घ्यावा.
५)संडास साफ होत नसेल तर तांदुळजाचा + पालक घालून केलेला सूप तूप घालून घ्यावा.
हि भाजी अतिप्रमाणात खाल्ल्यास शौचास पातळ होते.
-- वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
October 20, 2016
जन्मापासून दिल्लीत रहात असलो तरी महाराष्ट्रात जावेच लागतेच. एकदा नागपूरला गेलो असताना सहज नाक्यावर उभ्या काही तरुणांशी चर्चा केली. बहुतेक मराठी तरुण सरकारी परीक्षांची तैयारी करतच नाही. काही तरुण कालेजचे शिक्षण पूर्ण झाल्यावर, सरकारी नौकरीचा विचार करतात. फार्म भरल्यानंतर ३-४ महिन्यांच्या अर्धवट तैयारीवर, परीक्षा पास करण्याचे स्वप्न बघतात, जे संभव नाही. मग सुमार बुद्धीचे इतर भाषिक परीक्षा पास होतात आणि हुशार मराठी तरुण, पूर्ण व नियमित तैयारी नसल्यामुळे, असफल होतात.
August 25, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti