(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • आर्थिक वर्ष २०१६-१७ चा अंतिम दिवस

    आर्थिक वर्ष २०१६-१७ चा अंतिम दिवस म्हणजे ३१ मार्च. एप्रिल महिन्यांपासून नवे आर्थिक वर्ष सुरू होते.या आर्थिक वर्षाला निरोप देण्याआधी प्राप्तिकराच्या बाबतीत काही आवश्यीक कामे आपण ३१ मार्चआधी न विसरता करून घ्यायला हवीत, प्रचलित प्राप्तिकर कायद्यानुसार करदाता आपले मागील दोन आर्थिक वर्षांचे प्राप्तिकर विवरणपत्र भरू शकतो. याचा सोप्या भाषेत अर्थ असा, की जर आपले आर्थिक वर्ष २०१४-१५ चे विवरणपत्र काही कारणास्तव दाखल करायचे राहून गेले असल्यास ३१ मार्च २०१७ ही अंतिम तारीख आहे, हे विसरता कामा नये.

    आर्थिक वर्ष २०१४-१५ च्या प्राप्तिकर विवरणपत्राबाबत.
    सामान्यपणे आर्थिक वर्ष संपले, की ३१ जुलै ही त्या संपलेल्या आर्थिक वर्षाचे विवरणपत्र दाखल करावयाची देय तारीख असते. परंतु, बऱ्याच करदात्यांकडून देय तारखेपर्यंत असे विवरणपत्र दाखल होत नाही. अशाच प्रकारे जर आपले आर्थिक वर्ष २०१५-१६ चे विवरणपत्र अजूनही सादर केले गेले नसल्यास ते ३१ मार्च २०१७ च्या आधी दाखल करावे, खरे तर ३१ मार्च २०१७ नंतरही आपण आर्थिक वर्ष २०१५-१६ चे विवरणपत्र दाखल करू शकता. परंतु, ३१ मार्च २०१७ नंतर आपणास पाच हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. या दोन्ही आर्थिक वर्षांच्या विवरणपत्राबाबत तुम्ही देय तारखेनंतर विवरणपत्र दाखल करत असल्यामुळे आपल्याला दुरुस्तीपत्र दाखल करता येणार नाही.

    अॅडव्हान्स टॅक्स बद्दल.
    खरे तर आगाऊ कर हा सुद्धा टप्याटप्याने भरला गेला पाहिजे. परंतु तो भरला नसल्यास आताही वेळ गेलेली नाही, कारण ३१ मार्च २०१७ पर्यंत आर्थिक वर्ष १६-१७ साठी भरला गेलेला प्राप्तिकर हा आगाऊ करच असतो. थोडक्याणत सांगायचे तर ज्यांचा देयकर १० हजार रुपयांपेक्षा जास्त येत आहे, त्यांनाच आगाऊ कराच्या तरतुदी लागू आहेत. तसेच असे ज्येष्ठ नागरिक (वय ६० वर्षे किंवा जास्त) ज्यांना उद्योगधंदा अथवा व्यवसायातून काहीही उत्पन्न नसल्यास, त्यांनाही आगाऊ कर भरणे सक्तीचे नाही. अशांनी येणारा देय प्राप्तिकर आपले विवरणपत्र दाखल करण्याआधी भरला तरी चालू शकेल. नव्या नियमानुसार, जे व्यापारी एकूण उलाढालीच्या किमान आठ टक्के निव्वळ नफा दाखवून प्राप्तिकर कलम 44 ए.डी अंतर्गत विवरणपत्र दाखल करतात, अशांना देखील आता मार्च महिन्यातील आगाऊ कराचा हप्ता भरणे जरुरीचे केले आहे. आगाऊ कर न भरल्यास अथवा कमी भरल्यास व्याजरुपी ओझे करदात्याला सोसावे लागू शकते.
    पगार सोडून इतर करपात्र उत्पन्न असल्यास (व्यवसाय, भाडे, मुदत ठेवींवरील व्याज, भांडवली नफा आदी) आणि असे उत्पन्न आपल्या कंपनीने घोषित केले नसल्यास त्यावर बसणाऱ्या कराची गणना करून आगाऊ कर भरला गेला पाहिजे. बॅंक आपळ्या व्याजातून करकपात करत असते, पण अशा करदात्यांनी लक्षात घ्यावे, की बॅंक ठेवींच्या व्याजातून केवळ १० टक्के दराने करकपात केली जाते. परंतु, जर तुमचे वार्षिक एकूण निव्वळ करपात्र उत्पन्न पाच लाख अथवा दहा लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास तुम्ही अनुक्रमे २० टक्के आणि ३० टक्के कर दरात येतो. तेव्हा केवळ १० टक्के करकपात पुरेशी नाही, हे लक्षात ठेवा.

    प्राप्तिकर बचतीसाठीच्या गुंतवणुकीसारखी इतरही काही कामे आहेत, जी आपण ३१ मार्च २०१७ पूर्वी आवर्जून पूर्ण करायला हवीत.

    एनपीएस
    एनपीएस टियर १ अकाउंट होल्डर्ससाठी महत्वाचं आहे की, त्यांनी आपल्या अकाउंटमध्ये प्रत्येक आर्थिक वर्षात १००० रुपये डिपॉझिट करावे. ज एनपीएस टियर १ अकाउंट होल्डर्सने असे केले नाही तर त्यांचं अकाउंट ३१ मार्चपूर्वी फ्रिज होईल.

    पीपीएफ अकाउंट
    पीपीएफ अकाउंटमध्ये पेनल्टीपासून वाचण्यासाठी तुम्हाचं वार्षिक योगदान कमीत कमी ५०० रुपये असायला हवं. जर तुम्ही असं करु शकला नाहीत तर तुम्हाला ५० रुपयांची पेनल्टी द्यावी लागेल. पीपीएफ अकाउंटमध्ये ५०० रुपये डिपॉझिट करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च आहे.वर फक्त महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख केलेला आहे, जेणेकरून नंतर करदात्याला त्रास होणार नाही, हाच त्यामागचा उद्देश!

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • डॉक्टर  नावाच्या देवांनो…….!

    एका दु:खी बापाचे काय सांगू गाऱ्हाणे.....! काळाने उलटा डाव टाकला होता हसतं खेळतं बाळ अंथरुणाला खिळलं होतं. एक दिवशी काळ उगवला अन बाबूचा बबन्या देवाघरी गेला. डेंग्यूने एक बळी घेतला होता. बाबु हतबल झाला. तीळ तीळ तुटला. बाबु होता कणखर तरीही वाहत होती डोळ्यातून आसवांची खळखळ...! एखादे फुल उमलण्याच्या आधीच नष्ट झाले. त्या मात्या- पित्यावर झालेला आघात अत्यंत दुर्दैवी. किती जपलं होतं त्या फुलाला. त्या दु:खी माईचे अश्रू सांगत होते. पण विधात्याने जे भाळी लिहिले त्याला सामोरे जाणे भाग आहेच. पण हे एकाच घरात घडले नाही. अनेकांच्या घरी या डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया सारख्या घातक रोगाची लागण झाली. गेले अनेक. लागण झालेल्यांची संख्या मोजता न येण्यासारखी होती. विशेषत: नागरिक दहशतीखाली वावरत आहेत. याची नोंद कुणी घ्यावी अथवा न घ्यावी परंतु आपलेच चुकत असेल तर.....! महापालिका आरोग्यसेविकांचा सल्ला ऐकत नाही. त्यांना हवं असलेले सहकार्य करीत नाहीत, अशी एक कुजबूज आहे. आपण आपल्या कुटुंबियांसाठी काळजी घ्यायला हवीच.

    डॉक्टर हा ईश्वरी अंश मनाला जातो. डॉक्टर हा देव तर दवाखाना हे एक मंदिर. कारण रुग्णाला बरं करण्यासाठी जीवाचे रान करीत असतो. म्हणून ईश्वरानंतर डॉक्टरांना देवच. यात शंका घेण्यासारखे काहीच नाही. खरोखर डॉक्टर हे आई वडील गुरुजनानंतर चौथे पूज्यनीय स्थान म्हणावे लागेल. डेंग्यू,मलेरियाची लागण झाल्यापासून विभागातील महापालिका दवाखान्यातील डॉक्टर शिंदे, डॉक्टर जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. त्यांचा गौरव करणे स्वाभाविक आहे. गरिबांनी नव्हे तर श्रीमंतांनी देखील धाव घेतली या दवाखान्यात आणि उपचार घेतले. योग्य सल्ला आणि आवश्यक तपासण्या करून त्यांनी उपचार केल्यामुळे रुग्णांना दिलासा मिळाला. डेंग्यू, मलेरिया आणि कावीळ या दहशतवादी रोगांवर प्रतिबंध करणारे माणुसकीचे डॉक्टर आपल्या विभागात कार्यरत असल्याने मनस्वी आनंद होत आहे.

    विभागात कितीतरी डॉक्टर होऊन गेले.आजही आहेत. रस्त्याने जाताना मंदिर दिसले तरी अदबीने नमस्कार करावासा वाटतो, त्या प्रमाणे त्या डॉक्टरांना पाहताच आपोआप हात जोडले जातात. आपणां कुणाला *डॉक्टर पांडुरंग कुलकर्णी* आठवत असतील.नावाप्रमाणे विठोबाच, या विठोबाच्या मंदिरात सदानकदा रांग लागलेली असे. काय राजा माणूस....! गरीबांचा डॉक्टर... पैसे नसले तरी उपचार केले त्यांनी. आपल्या श्रमजीवी लोकांचा डॉक्टर. डॉक्टर कुलकर्णीसारखे अनेक देव विभागाला लाभले. ते ही रुग्णांचा स्थिती पाहून उपचार करीत म्हणजे एखाद्याकडे पैसे नसले तरी इलाज करीत होते. तेव्हा परिस्थिती तशी होती. त्या वेळेस डॉक्टर रुग्णांच्या सुख दु:खाशी समरस होत होते. आजही समाजात अनेक देव आहेत जे रुग्णसेवा म्हणजेच आपला धर्म मानतात. भगवंत त्यांना शक्ती देवो. त्यांच्यामुळे आपण निश्चित आहोत आणि बरेच देव असे आहेत की,देव बनण्यात झालेला खर्च लवकरात लवकर कसा भक्ताकडून काढू शकतो ह्यातच आपला धर्म आहे असे मानतात... त्यांना भगवंत सद्बुद्धी देवो.

    पण आता हेच डॉक्टर आपली मर्यादा ओलांडू लागल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. खरं बोलले की, खऱ्या आईला राग येतो. हे अनुभवलेले आहे. त्यामुळे या पूज्यनीय देवांवर कडक भाषेत लिहिण्याऐवजी सौम्य भाषेत लिहावं, असं मन सांगत होते. काय करीत आहेत हे गल्लीबोळातले देव ...? एक डॉक्टर आपल्या दवाखान्यात विनापरवाना औषधं विक्री करीत आहे. उपचार अधिक औषध या दोन्ही गोष्टी देऊन लुबाडत आहे. आता या डॉक्टरला सौम्य भाषेत सांगायचं की, आपला बडगा दाखवायचा. अनेक डॉक्टर अनैतिक स्वरूपाचे व्यवहार करीत आहेत. रुग्ण दवाखान्यात जाऊ शकत नाहीत. वृध्द असतात. चालू शकत नाहीत किंवा अन्य कारणाने डॉक्टरला घरी बोलाविण्यात येते तेव्हा एक डॉक्टर विभागातल्या विभागात घरी भेट द्यायचे ५०० रुपये आकारत आहेत. हे बरोबर आहे का ...? काही डॉक्टर केवळ रजेचे दाखले देण्यासाठी बसलेले आहेत. दिवसापाठी रुपये २० आकारीत आहेत. रोजंदारीवर काम करणाऱ्या दोनशे अडीचशे पगार वाल्यांनी काय करायचे. काही महिन्यापूर्वी एका डॉक्टरने मयत दाखला देण्यासाठी ५०० रुपये घेतले. एका रुग्णाला डॉक्टरने जागचे हलायचे नाही. एकाच जागी पडून राहायचे, आराम करायचा, सल्ला दिला. पेशंटला थोडासा त्रास होऊ लागला. तेव्हा एक दोन मिनिटावर असलेल्या डॉक्टरला सांगितले त्याने बेधडक सांगितले. मी एम डी आहे. माझी फी परवडणारी नाही. घर एक मिनिटावर असो वा दहा मिनिटावर....! फी ठरलेली आहे. ती देत असाल तर येतो. वैद्यकीय व्यवसायाकडे डॉक्टरांची दृष्टी बदलत्या काळानुसार बदलत आहे. आताचे डॉक्टर रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा फी आकारत आहेत. पैसे नसले तर उपचार करतात, उधारी ठेवतात. पण फीचा तगादा यांचा भारी आहे. एका फेरीत पेशंट बरा होईल असे त्यांच्याकडून घडत नाही. दोन तीन फेऱ्या मारायला लावल्यानंतर पेशंटला आराम मिळतो. तो पर्यंत खिसा खाली झालेला असतो. कोणी तरी म्हणेल या पेशंटला जवळच्या सरकारी किंवा महापालिकेच्या रुग्णालयात जाता येत नाही का ...? काहींचे हातावर पोट असते.दिवसभर राबावे लागते. आजारी असल्याचे सांगता येत नाही. दुकानात कामावर असलेल्या नोकरदारांचे उदाहरण घ्या. कामावर नाही गेलात तर ते तुम्हाला घरचा रस्ता दाखवितात. काही तरी कमवून आणले तरच त्यांची कच्ची बच्ची जेवतात. त्यांच्यासाठीच.....! या गल्लीबोळात मंदिर उभारून बसलेल्या देवांनो समजुतीने घ्या. जेव्हा जेव्हा साथीच्या रोगांनी नागरिक त्रस्त असतात. तेव्हा तरी त्यांना सांभाळून घ्या.

    अशोक भेके

  • इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग चौदा

    पचनासाठी कफ, पित्त वात तीनही दोषांची आवश्यकता असते.या दोषांच्या गुणांचा विचार केला तर कफ आणि पित्त यांना स्वतःची गती नाही, हे दोन्ही दोष स्वतःचे काम करण्यासाठी, हालचाली करण्यासाठी, वातावर अवलंबून असतात.

    ग्रंथकार एक उत्तम उदाहरण देतात. जसे आकाशातले काळे पांढरे ढग स्वतः काहीच करू शकत नाहीत, जेव्हा वारा येतो, तेव्हाच हे ढग हालचाली करू शकतात. आणि वारा जिकडे नेईल तिकडे पळतात. तसेच शरीरात कफ आणि पित्त स्वतः अपंग असतात. वात दोष जसे हलवेल तसे त्यांना आपले काम दाखवता येते.

    जेवणानंतर लगेचच कफ दोष वृद्धींगत होतो. (दोष म्हणजे 'फाॅल्ट' नव्हे) हा कालावधी साधारणपणे दीड ते दोन तासांचा असतो. त्यानंतर पित्ताचे काम अधिक जोमाने सुरू होते. आणि नंतर वाताचे कार्य अधिक जोरात सुरू होते.

    आपल्या नकळत चाललेलं हे पचन पूर्ण होईपर्यंत पोटाकडे जरा जास्ती रक्तपुरवठा होत असतो. वात दोष पोटात फिरल्यामुळे बाकी बाहेरील शरीराच्या ठिकाणी वाताचे कार्य मंदावते.

    त्याचा परिणाम म्हणून इतर अवयवांना रक्त थोडे कमी पडते. मेंदू, इंद्रिये यांना सुस्ती येते, आळस भरतो, काम न करता पडून रहावेसे वाटते, झोप आल्यासारखी वाटते. ती येतेच.

    आयुर्वेदात काही गृहीतके आहेत, काही संकल्पना आहेत, काही धारणा आहेत, काही प्रत्यक्ष प्रमाण आहेत, या अमूर्तांचे गुण वर्णन केलेले आहे, या गुणांचा तरतम भावाने विचार केला तरी यांचे गुण केव्हाही बदलत नाहीत, हाच खरा अभ्यास, हे खरे शास्त्र, त्रिकालाबाधीत सत्य. आजही वात पित्त कफाला समजून घ्यायचे असेल तर त्याच्या त्याच गुणांचा अभ्यास करावा लागतो. आणि त्यांचे गुण अंशानेही बदललेले नाहीत. हे आयुर्वेदाचे अविनाशित्व !

    हीच पचन प्रक्रिया प्रत्यक्षरीत्या समजून घ्यायची झाल्यास रसायन शास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, फिजीऑलाॅजी, पॅथाॅलाजी, इ. अनेक पद्धतींनी समजून घेता येईल. त्यासाठी अन्नातील घटकद्रव्यांचा स्वतंत्र विचार, एकमेकांत होणाऱ्या जीवरासायनिक प्रक्रिया, इ. सर्व समजून घेण्यासाठी, त्या त्या शास्त्रांचा परत स्वतंत्र अभ्यास करावा लागेल, तरच ते नीट समजून घेता येईल. यापेक्षा आयुर्वेदात काय सांगितलेले आहे ते समजून घेणे हे अगदी सोपे आहे, असे वाटते.

    मायक्रोलेव्हलला आतमधे काय चाललेले आहे हे प्रत्यक्षात पहाण्यापेक्षा, वात पित्त कफाच्या, गुरू मंद आदि वीस गुणांचा अभ्यास करून, अनुमान प्रमाण वापरून, आतील सूक्ष्मातील कार्य समजून घेणे, हे समजायला सोपे नाही का ?
    जे सोपे आहे ते अधिक सोप्पे करून सांगितलं तर समजण्याचं काम सोप्पं होतं ना !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    29.03.2017

  • हे राम , नथुराम

    या माझ्या लेखाच्या वाचक मित्र—मैत्रिणिंनो , हे नाटक इतक्या ज्वलंत विषयावरचं अाहे की त्याचा अाशय काय असावा हे वेगळं लिहिण्याची गरज नाहि.या नाटकाचं परिक्षण वगैरे करण्याएवढा मी मोठा लेखक नाहि अाणि तसा माझा कांगावखोर दावाहि नाहि.हा लेख लिहिण्यामागे केवळ दोनंच उद्देश अाहेत :

  • ठाणे म्यूझिक फोरम

    तर मंडळी , अाटपाट नगर होतं { ठाणे हां , अहमदनगर नव्हे! }.तिथे ३ झपाटलेल्या वल्ली होत्या : शशांक दाबके — अनंत जोशी अाणि धनश्री लेले ! २०१३ सालापासून त्यांनी एक पण केला : काय पण झालं तरी ठाण्यातल्या लोकांना संगीताची भरगच्च मेजवानी द्यायची अाणि या त्यांच्या अट्टाहासातून गेली ५ वर्षे ठाणे म्यूझिक फोरम अाणि उत्कर्ष मंडळयांच्या सहयोगाने हा संगीतरथ अव्याहत वाटचाल करतोय ! अाणि हा कार्यक्रम होण्याचं ठिकाण काय तर सहयोग मंदिर ! या वास्तूचं नांव सहयोग खेरीज दुसरं असूच शकत नाहि ! कितीतरी विषयांवरचे कार्यक्रम अखंडपणे इथे चालतात अाणि अाम्हां ठाणेकरांना अाकंठ तृप्त करतं हे सहयोग मंदिर मंडळी यावर्षी २४ , २५ , २६ मार्च असे ३ दिवस हा कार्यक्रम झाला.पहिल्या दिवशी ओढव रागांवर { म्हणजे ५ सुरांवर अाधारित } , दुसर्‍या दिवशी षाढव रागांवर { म्हणजे ६ सुरांवर अाधारित } अाणि सांगतादिनी संपूर्ण सूरसप्तकावर अाधारित राग सादर केले गेले ! तीन दिवस कान तृप्त झाले ! बाकी एखादा संगीत वा कलेविषयक अनुभव हा वर्णन करुन दुसर्‍या व्यक्तीला तितकाच अानंद देऊ शकेल इतकी कुणाचीहि लेखणी समर्थ कशी असेल ? फार तर तांत्रिक बाबींवर वर्णन करता येईल

  • ३६० वर्षांची तळमळ…..

    नमस्कार माझ्या देशबांधवांनो आणि भगिनींनो !
    आमचा जन्म सुमारे ३६० वर्षांपूर्वी झाला , आणि आमच्या ध्येयाविषयी किंवा आमच्या कुवतीविषयी काही व्यक्तींना असणार्‍या शंकांमुळे आम्हाविषयी या व्यक्तींनी फक्त गरळच ओकली आहे किंबहुना आमचा एकमेव दोष फार मोठा करून इतिहासाला दाखवला आहे ! त्यामुळे आपल्यापैकी बर्‍याच जणांच्या मते आम्ही कुविख्यात असण्याची शक्यता आहे.पण आम्ही केलेल्या एकमेव चुकीचे आम्ही प्रायश्चित्त पण तितकेच कठोर आई भवानीकडून “याची देही याची डोळा” मागून घेतले आणि त्या परम दयाळू मातेने ते दान आंम्हांस दिलेही !

    सांगण्याचा मुद्दा असा की, या सगळ्या गोष्टींमुळे माझा जन्म आपणास लक्षात असण्याची सुतराम शक्यता नाही , पण आमचे मरण मात्र आपल्याला जरूर लक्षात असेल – आधी आमची उंटावरून बसून तख्ता कुलाह लावून विदुषकाच्या पेहेरावातील काढलेली धिंड, मग आमचे हाल हाल करताना आधी डोळे, मग जीभ , मग सार्‍या अंगाची सालडी , मग हात, मग पाय आणि सर्वांत शेवटी आमचे मस्तक धडावेगळे करून आमचे एक एक अवयव वढू बद्रूक येथे गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर टाकणार्‍या औरंगझेबास आणि शरीराच्या तुकड्या तुकड्यांनी तुमच्या राज्यांतील नदीकिनारी पडलेल्या स्वराज्याच्या दुसर्‍या छत्रपतींना तुम्ही कदाचित् ओळखत असाल ,नाही? काय आहे , की गेली ३२८ वर्षे आमचा आत्मा तळमळतो आहे आणि आजचे आमचे वंशज मराठा जे भोगत आहेत ,

  • हे राम , नथुराम

    काल गडकरीला हे नाटक पाहिलं अाणि खूप दिवसांनी काहितरी विचार मनात घेऊन नाट्यगृहाबाहेर पडलो !

    या माझ्या लेखाच्या वाचक मित्र—मैत्रिणिंनो , हे नाटक इतक्या ज्वलंत विषयावरचं अाहे की त्याचा अाशय काय असावा हे वेगळं लिहिण्याची गरज नाहि.या नाटकाचं परिक्षण वगैरे करण्याएवढा मी मोठा लेखक नाहि अाणि तसा माझा कांगावखोर दावाहि नाहि.हा लेख लिहिण्यामागे केवळ दोनंच उद्देश अाहेत :
    १) कुठल्याहि परिस्थितीत नथुरामची प्रामाणिक देशभक्ती अाणि गांधीवधामागची भूमिका नाटकासारख्या प्रभावी माध्यमातून लोकांपर्यंत पोचवावी , गांधीवधामागे स्वातंत्र्यवीर सावरकर या तेजस्वी देशभक्ताचा काहिहि संबंध नव्हता हे अधोरेखित करत गांधिजींना त्यांच्या देशभक्तीचं वाजवी श्रेय देत त्यांच्या अवाजवी बनवलेल्या देशापेक्षाहि मोठ्या प्रतिमेचं चोख मूल्यमापन करत झोपी गेलेल्यांना जागं करणं , जागं असलेल्यांना मरगळ झटकत हलवणं या हेतूनं प्रेरित होऊन मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकातूनंहि राहून गेलेली काहि सत्यं नीडरपणे मांडणार्‍या जिगरबाज शरद पोंक्षे अाणि प्रमोद धुरत या जोडीचं तोंडभरून कौतुक करणं ! अाणि
    २) हे नाटक कुणी कुणी पहायलांच हवं हा { न मागता दिलेला अागाऊपणाचा } सल्लेवजा प्रस्ताव मांडणं.....

    नाटक बघताना एक जाणवलं ते म्हणजे निव्वळ लेखक , दिग्दर्शक व अभिनेत्याच्या पलिकडे जाऊन केलेलं नाटकाचं संकलन..... तुमच्यापैकी ज्यांनी ह्रषिकेश मुखर्जींचा अानंद पाहिला असेल त्यांना अाठवतत्रअसेल की अमिताभच्या अावाजातलं निवेदन .... जिन दिनों मैं अादसे मिला.... ते अानंद मरतें नहिं पतचं संकलन ज्या हळुवार पण प्रभावी पद्धतीने केलं गेलंय तितक्याच ताकदीने ते शरदजींनी नथुराम गोडसेंच्या जीवनपटाविषयी { किंबहुना मृत्यूपावेतो } मांडलंय..... ३० जानेवारी १९४८ ते १५ नोव्हेंबर १९४९ या ६५५ दिवसातली नथुरामच्या मनाची अवस्था अाणि ३० जानेवारी १९४८ या दिवशी सायंकाळी सव्वापाच वाजेपर्यंत त्याचा झालेला गांधीवधाचा दृढनिश्चय हे दोनहि कंगोरे अत्यंत प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोचवणे हे येरागबाळ्याचं काम नव्हे महाराजा ! बरं हे करत असताना दिलेल्या कोपरखळ्या , पाकिस्तानातील अणि स्वतंत्र भारतातील पण मुसलमान लोकांकडून झालेले हिंदूंवरचे अनन्वित अत्याचार , सरकारचं { अजूनहि चालूच असलेलं मुसलमानांचं } लांगूलचालन ते अगदि पार बॅरिस्टर देवीदास मोहनदास गांधींचं नथुरामचं वकीलपत्र घेण्यामागचं दांभिकपण { हसत खेळंत दाखवलं असलं तरी त्यामागचं अत्यंत किळसवाणं अाणि स्वार्थी धोरण } अाणि सरतेशेवटि अखंड भारत अमर रहे या घोषवाक्यासह वेदीवर लटकलेले नथुराम ..... संवेदमशील माणसाच्या डोळ्यांना धारा अाणि अावंढे येईपर्यंतचे नाटकातील कैक प्रसंग ...... हे सगळं अनुभवण्यासारखं अाहे , नाटक अवश्य पहा अाणि सहकुटुंब सहपरिवार पहा ! , १५ नोव्हेंबर १९४९ ते अाज ३ मार्च २०१७ पर्यंत , म्हणजेच ६७ वर्षे ३ महिने १८ दिवस पर्यंत तळतळणार्‍या नथुरामच्या अात्म्याची ह्रद्य हकिकत जाणून घेण्यासाठी तरी पहा.....

    हे नाटक कुणी पहावं?
    छत्रपती शिवाजी महाराजांचं नांव सांगून ६६० कोटि रुपये खर्च { दाखवायचा हां , करायचा नव्हे ! } करत समुद्रात महाराजांचा पुतळा बसवणार्‍या तमाम राजकारण्यांना मतं अाणि पाठिंबा देणार्‍यांनी पहावं , सावरकरांसारख्या तेजपुरुषाला पण तसबीरीचाहि मान मिळू नये म्हणून अाटोकाट प्रयत्न करणार्‍या शिरो मणींनी पहावं , Semi Automatic Pistol ने २ फुटांवरुन ३ गोळ्या लागल्यावरहि पोलादी पुरुषाप्रमाणे कणखरपणे शेवटच्या क्षणीहि हे राम शब्द सत्य—अहिंसेचा पाठपुरावा करणार्‍या गांधीजींसारख्या नेत्याच्या तोंडी देणार्‍या दांभिक लोकांनी अाणि हाच इतिहास म्हणून तमाम भारतियांच्या गळी उतरवणार्‍या पाठ्यपुस्तक महामंडळ व शैक्षणिक संस्थांच्या महानुभावांनी पहावं अाणि गेला बाजार ऊठसूट संघाविरुद्धंच छापणार्‍या तमाम वृत्तपत्रांच्या संपादकांनी पण बघावं .....

    धगधगता ज्वलंत विषय न डगमगता न थकता निडरपणे समाजासमोर अाणण्याचं धारिष्ट्य दाखवणार्‍या शरद पोंक्षे या लेखक—दिग्दर्शक—अभिनेता—निर्मात्या चौफेर जिगरबाज माणसाचं अाणि प्रमोद धुरत या जिगरबाज निर्मात्याचं करावं तेवढं कौतुक कमीच अाहे !

    जाता जाता एक विनंती मात्र शरदजी व प्रमोदजींना : तिकिटविक्री अाजपासून सुरु असं वृत्तपत्रांत अाल्या दिवसापासूनंच संपूर्ण थिएटर House Full घोषित करणार्‍या Ticketees.com व फोनबुकिंगचा नंबर न उचलणारे असे दोन्हि - Booking वाले कृपया बदला , फार मनस्ताप होतो !

    कळावे ,
    अापला विनम्र ,
    उदय गंगाधर सप्रेम—ठाणे
    ०३ मार्च २०१७

  • २९ मार्च १९३० – ‘प्रभात’चा ’खूनी खंजीर चित्रपट प्रदर्शित

    २९ मार्च १९३० – ‘प्रभात’चा ’खूनी खंजीर चित्रपट प्रदर्शित

    २९ मार्च १९३० रोजी ’प्रभात’चा ’खूनी खंजीर हा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.

    कोल्हापूर येथील मंगळवार पेठेतील तस्ते गल्लीजवळच्या इमारतीत प्रभात फिल्म कंपनीची स्थापना १९२९ झाली. व्ही. शांताराम, फत्तेलाल शेख, केशवराव धायबर, सीताराम बी. कुलकर्णी व विष्णुपंत दामले या तत्कालीन चित्रसृष्टीतील धुरीणांनी मोठे ध्येय घेऊन ही कंपनी उभारली. बुद्धिमत्ता, पवित्रता, शालीनता, सौंदर्यता, कलात्मकतेचे बळ घेऊन नवे स्वप्न साकारण्यासाठी उगवत्या सूर्याकडे पाहून तुतारी फुंकणारी महिला असे कंपनीचे बोधचिन्ह अजरामर झाले. याच तुतारीच्या निनादाचे बळ घेऊन येथे अयोध्येचा राजा, गोपालकृष्ण, खुनी खंजीर, राणीसाहेब व बजरबट्ट उदयकाल, चंद्रसेना, जुलूम अशा मूकपटाची निर्मिती येथे झाली. खुनी खंजीरच्या छायाचित्रणाची त्यावेळी बरीच तारीफ झाली होती.

    कालांतराने १९५२ मध्ये प्रभात कंपनी पुण्याला स्थलांतरित झाली.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • दुर्दैवी दुखणे

    सोनियाजी व शरदराव त्यांच्या दुखण्याच्या इलाजासाठी वारंवार परदेश गमन करून करदात्यांचा पैसा उधळतात. हो उधळणे असा शब्द मी वापरला आहे, कदाचित त्यांचे दुखणे पाहून हा शब्द, असहिष्णू असाच वाटेल; नाही तो आहेच हे माझे हि ठाम मत आहे, कदाचित लोकांचा रोष ओढवून घेण्यासाठीच मी हा शब्द वापरत आहे असे त्यांच्या भक्तांनी समजावे.

    आपल्या देशात साठ वर्षातील एकहाती सत्तेत राहून या नेत्यांनी चांगले डॉक्टर्स बनविण्यासाठी का महाविद्यालये बनवली नाहीत? भारतीय डॉक्टर इतक्या सुमार दर्जाचे आहेत का, कि ज्यांना या नेत्यांचे दुखणे बरे करता येत नाही? मग याचा अर्थ आमच्या सारखे आम भारतीय, अश्या सुमार डॉक्टरांचे उपचार घेतो आहोत हा आमच्यासाठी शापच म्हणावा लागेल, असे नाही का वाटत?

    भारतात दरवर्षी हजारो लोक कॅन्सर सारख्या रोगाने मरतात, तेच भोग या नेत्यांच्या वाट्याला आले आहेत, हे सर्वश्रुत आहे, पण केवळ परदेशात जाऊन आमच्या पैशावर इलाज घेऊन यांना दुखण्यावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे, हाच अधिकार आम भारतीयाला का नाही? आपल्या देशातील सरकारी दवाखाने याना नरकासारखे भासतात, पश्चिमात्य देशांनी जवळपास वीस वर्षांपूर्वी टाकून दिलेल्या तंत्रज्ञानावर आधारित वैद्यकीय यंत्रे आपल्या देशात दसपट किमतीने विकत घेतली जातात, यातून सरकारचे नुकसान तर होतेच, व मूळ किमतीच्या वरची नऊपट किंमत यांच्यासारखे भ्रष्ट खाऊन मातब्बर होतात, म्हणूनच यांचा या देशातील दवाखान्यातील वैद्यकीय यंत्रांवर व त्याचा वापर करून इलाज करणाऱ्या डॉक्टरांवर विश्वास नाही, हे यांच्या परदेशात जाऊन उपचार घेण्यावरून सिद्ध होते.

    या नेत्यांचा हा आजार कालपरवाचा नाही, गेल्या कित्येक वर्षांपासून हे परदेशी जात आहेत, त्यांना असलेला आजार आज देशातील हजारो लोकांना आहे. जर हे खरे लोकनेते असते तर त्यांनी सुरवातीची वैद्यक सेवा तिथे घेऊन असे ठणकावून सांगितले असते, की माझ्या मातृभूमीतच मी पुढची सेवा घेईन, त्यासाठी लागणारी सर्व अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रे त्वरित खरेदी करण्यात यावीत, ज्यामुळे मला परत परदेशात जावे लागणार नाही, तसेच माझे देशबांधव ज्यांना माझ्यासारखे दुखणे आहे त्यांना सुद्धा या सुविधांचा वापर अल्पदरात करता येईल. जाऊ दे ओ, इतकी वैचारिक परिपक्वता असती तर, या देशात हे नेते व त्यांची पिल्लावळ स्वातंत्र मिळाल्यानंतर सत्तर वर्षांनी सुद्धा हम गरीब लोगोंके लिये काम कर रहे है, असा राग आळवत बसले नसते. आजकाल या नेत्यांनी गरीब हा शब्द जरी उच्चारला तरी मला भयंकर राग येतो.

    या देशातील डॉक्टरांचा सर्वाना सार्थ अभिमान आहे, हे माझे ठाम मत आहे. आज हजारो विदेशी लोक उपचारासाठी दिल्ली, मुंबई, बंगलोर, चेन्नई सारख्या शहरातील नामांकित हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी येत आहेत. नुकतीच एक जवळपास पाचशे किलोची महिला भारतात वजन कमी करण्यासाठी दाखल झाली, आणि येथील डॉक्टरांनी ती मायदेशी चालत जाईल असे आत्मविश्वासाने सांगितले, तसेच हृदय, यकृत व मूत्रपिंडरोपणासाठी सुद्धा असंख्य परदेशी लोक स्वस्त व मस्त सुविधा आहेत पाहून भारतात येतात, हे आम्ही वरचेवर पेपर मध्ये वाचतो, तसेच अवयव दानासाठी डॉक्टरांच्या खांद्याला खांदा भिडवत पोलीस यंत्रणा सुद्धा काम करताना दिसते, याचे नुसते कौतुक वाटत नाही, तर गर्वाने उर भरून येते. असे असताना याना परदेशात जाण्याची दुर्बुद्धी का होते? यातून या नेत्यांना आपल्याच डॉक्टरांच्यावर विश्वास नसल्याचे अभिप्रेत होते, असे मीच म्हणतो असे नाही, तर प्रत्येक भारतीय असे म्हणतो आहे.

    या बाबतीत सुषमा स्वराजजींचे कौतुक करायला हवे, त्यांच्या दोन्ही किडण्या (मूत्रपिंड) निकामी झाल्या, त्या उपचारासाठी मंत्री या नात्याने परदेशात जाऊन सरकारी खर्चाने उपचार घेऊन येऊ शकल्या असत्या, पण तसे न करता, आपल्या देशातील AIIMS हॉस्पिटल मध्ये उपचार घेऊन, किडन्या बदलून संसदेमध्ये कामावर रुजू झाल्या. यातून आपल्या डॉक्टरांच्यावरचा त्यांचा विश्वास दिसून येतो, यातून एक चांगला संदेश आम जनतेत गेला आहे.

    असे म्हणतात, A leader should lead by an example, असे लीडर बनण्याची लायकी असावी लागते, जाऊ दे, कोळसा कितीही घासला तरी तो काळाच राहणार आहे.

    जाता जाता विनंती, डॉक्टरांच्यावर हात उचलून/ उगारून प्रश्न सुटत नसतात. आपल्या देशात लोकसंख्येच्या प्रमाणात खूप कमी डॉक्टर्स आहेत, म्हणून सरकारी रुग्णालयात सर्व रुग्णांवर हवे तसे लक्ष्य देऊन डॉक्टरांना उपचार करता येत नाहीत, यासाठी सय्यम हाच एकमेव उपाय आहे, हे आपण जनतेने लक्ष्यात घ्यायला हवे. हाताची पाची बोटे सारखी नसतात, तसे काही डॉक्टर भातातल्या खड्यांसारखे असतीलही, त्यांना उघडे पाडायला हवे, आणि त्याच्यावर इंडियन मेडिकल असोसिएशन ने योग्य कारवाई करून त्यांचे लायसन्स रद्द करायला पाहिजे.

    आता थांबतो.

    धन्यवाद

    -- विजय लिमये

  • ‘सुंदर मठ’ रामदास पठार – शिवकालीन शिवथर प्रांत

    सुंदरमठ,शिवथर घळ