(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • जीवनाचा सकारात्मक दृष्टिकोन – ब्रेव्हहार्ट

    चित्रपट हे एक माध्यम आहे. त्यामुळे या माध्यमातून परिवर्तनही घडवता येऊ शकतं. या माध्यमाचं काम केवळ मनोरंजनात्मक न राहता विविध विषय हाताळून विस्तारत जात आहे. बायोपिक चित्रपट हे देखील त्यातीलच एक. बायोपिक चित्रपट प्रेक्षकांना ऊर्जा देण्यासाठी बनवले जातात.

  • जगण्याचे साधे सोप्पे नियम – भाग तीन

    ऐकलेले आणि बघितलेले यात चार बोटांचे अंतर असते, तसे नियम आणि वास्तव यात एक हाताचे अंतर असते.

  • सोनारांचे कान टोचण्याची गरज !

    कधी काळी भारतात सोन्याचा धूर निघत असे. खरं आहे. सोने हे आपले सर्वांचे आकर्षण. एक चांगली गुंतवणूक म्हणून पाहताना आपण अन्य गोष्टींपैकी सोन्याला विशेष प्राधान्य देत आलो आहोत. दीर्घकाळात सोन्याचा परतावा योग्य येऊ शकतो या कारणास्तव सोने म्हणजे भविष्यातले आपले तारणहार पण हिला निर्जीव गुंतवणूक म्हणू या ...! कारण या पासून आपल्याला व्याज असे काही मिळत नाही. विवाह कार्यात लेकी, सुना, नातवंडाना सोन्याचे दागिने देण्याच्या असलेल्या पद्धतीमुळे आपला ओढा सोन्याकडे अधिक असतो, हे तर सांगणे न लगे. परिस्थितीनुसार काही जन आपली हौस चांदीचे दागिने परिधान करून भागवतात. अडीअडचणीला स्वत:चे दागदागिने विकून घराला आíथक संकटातून खेचून बाहेर काढणाऱ्या स्त्रिया बघितल्या की सोन्याची ताकद काय ती समजते. सोने हे सौंदर्यवृद्धीसाठी आहेच शिवाय शरीरस्वास्थाची काळजी घेते व काही रोग बरे करण्यासाठी मदत करतात, अये आयुर्वेद सांगत आहे. परिधान केलेले सोन्याचे दागिने शरीरातील काही नलिका बिंदूवर दबाव टाकून मन व शरीर प्रसन्न ठेवते.

    कान टोचावयास सोनारांची समस्त हिंदुना गरज सोनारांची पडते त्या सोनारांचे कान कोण टोचणार ....? हा प्रश्न नेहमीच आम्हांला पडतो. असे अनेक व्यावसायिक असतील त्यांच्या बाबतीत हेच घडत असेल. सोनार म्हणजे अर्थात ज्वेलर्स, जे सोन्याचांदीची खरेदी विक्री करतात त्यांच्याविषयी माझ्याच नव्हे तर जनमनातले विचार प्रतिपादन करायचे आहेत. गल्लीबोळात असणारे विशेषत: घोडपदेव फेरबंदर विभागात नव्हे तर अन्य विभागात व्यापाऱ्यांनी काय उच्छाद मांडला आहे तो केवळ गरीब आणि गरजवंत यालाच ठाऊक आहे. पण अडचणीचा फायदा घेऊन त्याची पिळवणूक करणारे हे सोनार. त्यांच्याकडून लुबाडणूक होत असूनही त्याच्याच कडे जाणारे खरेदीदार म्हणजे सर्वसामान्य अर्थात आपण मंडळी.

    मी एकदा आपल्या एका ज्वेलर्सकडून बारश्याला लहान मुलाला भेट देण्यासाठी लहान मुलाची २३ कॅरेटची अंगठी रोकड देऊन खरेदी केली. काही अवधीनंतर झवेरी बाजार मध्ये एका ज्वेलर्सच्या दुकानात कामासाठी बसलो होतो. तेथे सरसकट २२ कॅरेटचा व्यवहार चालतो. तेथे बसलेलो असताना मी घेतलेल्या अंगठीशी तंतोतंत दिसणाऱ्या अंगठ्या काउंटर वर आल्या. हजार दोन हजार अंगठ्याचा जुडगा मुंबईतल्या वेगवेगळ्या दुकानामध्ये वितरीत होणार होता. मी सहज त्याला बोललो ‘अरे यार मी अशी २३ कॅरेटची अंगठी कालच खरेदी केली.’ त्याने सांगितले शक्य नाही, या मालामध्ये २३ कॅरेट नसते. अरे मी तर २३ कॅरेटचे पैसे देऊन खरेदी केले. त्यावर हसत मला त्यांनी सांगितले, ‘तुला त्याने उल्लू बनविले.’ अरेच्या असं कसं होईल या मारवाड्यांना आपण आपले मानले आहे. ते आपल्याला कसे फसवू शकतील. म्हणून त्या प्रकारची अंगठी खरेदी करण्याच्या उद्देशाने अनेक दुकानात फिरलो आणि २३ कॅरेटच्या अंगठीची विचारणा केली पण कोठे ही आढळून आली नाही. मग मात्र माझं डोकं सैरभैर झाले. पन्नास रुपये जादा गेल्याचे दु:ख नव्हते. फसविल्याची कळ सोसवत नव्हती. इकडे आमच्यासारख्यांना लुटायचं आणि सामाजिक, विधायक कार्यांना मदत केल्याचे चित्र निर्माण करण्यात यांचा हातखंडा. देणार तर हजार दोन हजार पण अशा थाटात देणार की, त्याने फार मोठे पुण्याचं काम केले आहे.

    गल्लीबोळात धंदा करणाऱ्या व्यापाऱ्यांविषयी माझे स्पष्ट मत आहे. त्यात काही चांगलेही असतील आणि काही चांगलेही नसतील. काही प्रामाणिक असतील तर काही लुटेरेही असतील. हे आपल्या सर्व सामान्य वर्गाला का लुटतात...? तरीही लुट होत असूनही आपला माणूस त्यांच्या दुकानाची पायरी का चढतो....? या प्रश्नाच्या मुळाशी गेलात तर हे व्यापारी काही महिन्यासाठी उधार देतात, तगादा लावत नाहीत. घडणावळ बाहेरच्या व्यापाऱ्यापेक्षा कमी असते. व्यापाऱ्याकडून ग्राहकाला मिळणारे अवास्तव महत्व आणि त्याला हुरळून जाणारा ग्राहक. आणि उद्या गहाण अथवा मोडण्याची वेळ आली तर दूर जायला नको. अशी आपण स्वत:हून ओढवून घेतलेली कारणे. एका विशिष्ट प्रांतातल्या लोकांनी आपल्या जीवावर कसे इमले बांधलेत, याचं तर वर्णन करावयास नको.

    सोने खरेदी करताना तुम्हाला सोन्याची शुद्धतेची हसत हसत शाश्वती देणाऱ्या व्यापाऱ्यांच्या बोलण्यात दुट्टपीवृत्ती भरलेली असते. यांच्याकडून घेतलेले सोनं काही दिवसात काजळी चढल्याप्रमाणे का दिसते. २३ कॅरेटच आहे मग त्याप्रमाणे ते देतात का...! किती मिलावट असते,याचा विचार कोणीही करीत नाही. मग तुम्ही मोडावयास गेल्यानंतर कपाळावर हात मारून घेता की नाही. एकूण एका तोळ्याच्या मागे १ ग्राम घट धरली जाते ती काय म्हणून...! काही मारवाडी १ ग्राम घट धरूनही एकूण चालू भावाच्या १०% कमी दर त्या व्यक्तीच्या गळी उतरवितो. वाहन घसारा किंवा इलेक्ट्रोनिक्स वस्तूवर घसारा मान्य आहे. या सोन्यातल्या घट विषयी व्यापाऱ्यांची उद्दामगिरी आपण खपवून घ्यायची. आपले लोक काही पैसे वाचविण्यासाठी बिल घेत नाहीत. मग त्यांना आयती संधी चालून येते. ज्या दुकानात सोने घेतले त्यांनी त्या दिवसाचा पूर्ण भाव आहे तो द्यायलाच हवा. ही त्याची जबाबदारी आहे . त्याने जबाबदारी असून दूर पळता कामा नये.

    आपली माणसं देवभोळी आहेत. हल्ली दुकानात सोन्या चांदीच्या देवादिकांच्या नाणी, मुर्त्या आहेत. त्यामध्ये मिलावट असूनही व्यापारी सांगेल त्या भावाला खरेदी करतो. देव्हाऱ्यात ठेवा काही दिवसात काळ्याभोर पडतात. तरीही उजेडात सरळ फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांचा उदोउदो आपणच करतो. या व्यापाऱ्यांच्या उद्यमशीलता वाढीसाठी जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ सतत असतो पण दिसत नाही. प्रचंड संयम व कौशल्य आणि दुधात साखर म्हणुन त्यांस लागणारा अपार गोडवा जो मुळातच केवळ आतच नाही तर जिभेतुन पाझरत असतो.

    काही ग्राहक क्रेडीट कार्डाचा वापर करून सोने घेतात तेव्हा काही मारवाडी त्यावर काही टक्के अधिक रक्कम उकळतात. सोन्याचांदीची किती मोठमोठी दुकाने आहेत . त्यांच्या दुकानात असं घडत नाही मग हे गल्लीबोळातले महाभाग आपल्या भोळ्याभाबड्या माणसांना का फसवितात...? त्यांच्या अनैतिक व्यवहाराला कसा लगाम घालता येईल, हे ग्राहकच ठरवू शकतो.

    अशोक भेके

  • मुत्राशयावर संयम न रहाण्याची कारणे

    १. तणाव असंयमन
    व्यायाम करताना, खोकला येताना, कफ असेल तेव्हा, शिंकताना, जोरात हसताना, एखादी जड वस्तू उचलताना किंवा शरिरावर ताण येणारी कोणतीही हलचाल करताना जेव्हा थोडी लघवी होते, त्याला मुत्राशयाचे तणाव असंयमन म्हणतात. मध्यम वयीन स्त्रीयांमध्येसुद्धा ही व्याधी दिसून येते. बाळंतपण झाल्यावर किंवा मेनॉपॉझ सुरू झाल्यावर स्त्रीयांना ही अडचण येऊ शकते.

    २. घाई होणे, आणि ताबा न रहाणे
    लघवीसाठी जाताना त्या जागी पोहोचे पर्यन्तसुद्धा काहीजण स्वत:वर ताबा ठेउ शकत नाहीत इतकी त्यांना घाई होते. सुदृढ-निरोगी व्यक्तींमधे सहसा ही अडचण दिसत नाही, परंतु मधुमेह झालेल्या व्यक्ती, स्ट्रोक, अल्झायमर, पार्किन्सन्स ह्या व्याधींसहीत जगणा-या व्यक्तींमधे लघवीवरील ताबा न रहाण्याची अडचण ब-याचदा दिसून येते. ही काहीवेळा ब्लॅडर कॅन्सरची पूर्वसूचनाही असू शकते.

    ३. अतिप्रवाह असंयमन
    मुत्रप्रवाहावर असंयमन होते, जेव्हा थोडी लघवी न होता खूपच जास्त होते. पुरुषांचे प्रोस्टेट जेव्हा वाढते तेव्हा त्यांना अनेकदा ह्या व्याधीला सामोरे जावे लागते. मधूमेह किंवा मणक्याची काही व्याधी ह्यामुळे सुद्धा अतिप्रवाह असंयमनाची अडचण वाढू शकते.

    ४. सामान्य असंयमन
    वृद्ध व्यक्तींमधे मुत्राशयावरील सामान्य असंयमनाची अडचण अनेकदा येते. ही अडचण अशांवर येते, ज्यांचे मुत्राशयावरील संयमन सर्वसामान्य आहे परंतु त्यांना लघवी लागल्यावर इतर काही कारणांमुळे उठायला त्रास होतो, चालायला त्रास होतो, अर्थ्रायटीस, गुडघे दुखी, अशक्तपणा ह्या व्याधींमुळे ही अडचण येऊ शकते. फक्त त्याचे गांभीर्य कितपत आहे आणि ते त्या वृद्ध व्यक्तीने कशा त-हेने घेतले आहे, आणि त्यांची जीवनशैली कशी आहे ह्यावरही ते अवलंबून असते.

    ५. मुत्राशयावरील नियंत्रणाचे प्रशिक्षण
    आपल्या मुत्राशयाची काहे व्याधी सुरू झाली असेल लघवीवरील नियंत्रण जात असेल तर डॉक्टर आपल्याला ते नियंत्रण कसे ठेवायची ह्याचे प्रशिक्षण देतात. ह्यासाठी खरं तर अनेक मार्ग आहेत, परंतु आपल्या मुत्राशयाची व्याधी नेमकी काय आहे ह्यावर सुद्धा ते प्रशिक्षण अवलंबून असते. आणि प्रशिक्षण आत्मसात केल्यास आपण योग्य असे नियंत्रण मुत्राशयावर ठेऊ शकतो.

    ६. पेल्विक स्नायूंचा व्यायाम
    पेल्विक स्नायूंच्या व्यायामाला केगल व्यायाम असेही म्हणतात. हा व्यायाम आपले मुत्राशयाजवळचे काही स्नायू बळकट करण्यासाठी उपयोगी ठरतो. हा स्नायू बळकट झाल्याने वृद्ध व्यक्तींना लघवीवर संयम राखणे सोपे जाते. तसे पहाता हे व्यायाम खूप सोपे आहेत. त्यामुळे आपला ताणही हलका होतो.

  • ठोठवा म्हणजे उघडेल

    एक मंदिर होत, प्रसिध्द मंदिर होत, त्या मंदिरात अनेक देश विदेशातील लोक यायचे, भक्तगन यायचे. त्यामुळे ते मंदिर खुपच चर्चेचे प्रसिध्दीचे होते. आणि मग काही दिवसांनी त्या मंदिराचे ट्रस्टी बदलले. आणि मग ट्रस्टी बदलल्यावर त्यांनी विचार केला आपल्या मंदिरात देश-विदेशातील लोक, भाविक भक्त येतात. त्यामध्ये इंग्रजी बोलणारे भाविक भक्त वैगेरे असतात. तेव्हा आपल्या मंदिरातल्या सगळया लोकांना, कर्मचार्यांना पण इंग्रजी आल पाहिजे. त्यांनी लगेच फरमानच काढला. मंदिरामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला इंग्रजी आलच पाहिजे. कंम्पलसरीच आहे म्हणे….

    झाल…..
    आता काय,

    आता त्या देवळात एक घंटा वाजवणार होता. त्याला हि कंम्पलसरी झाल ना. ते म्हणे मला काय इंग्रजीचा उपयोग आहे? मी का इंग्रजीत घंटा वाजवतो का ? आणि इंग्रजीत वाजविली काय अन मराठीत वाजवली काय, वाजणार घंटाच आहे. म्हणुन मी शिकलो नाही म्हणुन काय होतय… ट्रस्टी म्हणाले नाही, नियम म्हणजे नियम, सगळयांना इंग्रजी आलच पाहिजे.

    आता त्या घंटा वाजवणाराच पन्नास-पंच्चावन वय त्याच, तो म्हणाला आता कधी शिकव ? त्याने सरळ ती घंटा वाजवायची नौकरीच सोडली.

    बर आता नौकरी सोडली पण पोटापाण्यासाठी काहीतरी केलच पाहिजे. कराव तर काय कराव, मग त्याने विचार केला मंदिर प्रसिध्द आहे देश-विदेशातले भाविक-भक्त येथे येतात आणि मंदिराच्या आसपास कुठ चहा पिवाव तर काही व्यवस्था नाही. मग त्याने काय केले तर सरळ मंदिराच्या बाहेर एक चहाच टपर टाकल. आता मंदिरात अनेक भाविक-भक्त यायला लागले त्यामुळे गर्दी जास्त, जशी गर्दी जास्त तस चहाच टपर जोरात चालल. बघता बघता त्या चहाच्या टपराच त्याने एका छोट हाॅटेल केल. छोट हाॅटेल हि तुफान चालल. मग छोटया हाॅटेलच त्याने मोठ हाॅटेल केल. मोठ हाॅटेल सुध्दा भयानक चालल आणि बघता बघता त्याची तिन चार मोठी हाॅटेल झाली. आणि मग नंतर त्याने फाईव्हस्टार हाॅटेलच काढल. आणि अशा फाईव्ह स्टार हाॅटेलची साखळीच तयार केली. अन त्याच्या या फाईव्ह स्टार हाॅटेल मध्ये देष-विदेषातील भाविक-भक्त यायला लागले. निवासासाठी थांबायला लागले. त्या हाॅटेलच व्यवस्थापण, तिथल नियोजन हे सगळ बघायला लागले.

    एका दिवशी त्या हाॅटेलला एक विदेशी शिष्टमंडळ उतरल आणि उतरलेल्या विदेषी शिष्टमंडळाला अस वाटल की या हाॅटेलच नियोजन, व्यवस्थापन इतक उत्तम आहे तेव्हा या हाॅटेलच्या मालकाला भेटाव. आणि त्यांनी त्या मालकाला भेटायची इच्छा व्यक्त केली.

    मग हा आला भेटायला. आता ते सगळे इंग्रजीतुन बोलायला लागले अन हा पठठया मराठीतुन बोलायला लागला. मग एकजण म्हणाला अहो, एवढया फाईव्ह स्टार हाॅटेलचे मालक तुम्ही; अन तुम्हाला इंग्रजी येत नाही का ? तुम्ही इंग्रजी शिकला नाहीत का ? तसा हा पठठया म्हणाला इंग्रजी शिकलो असतो तर आत्तापर्यंत देवळात घंटाच वाजवत बसलो असतो……

    यशाकडे नेणाऱ्या पुष्कळ वाटा असतात हो, एक दार बंद झाल तर त्या झोळीत दहा दार उघडलेली असतात. तुम्ही एकाच दारावर नका टकरा मारत बसु. आम्ही काय करतो एक दार बंद झाल ना, की तिथच हातपाय गाळुन शांत बसतो. काहीच नाही होणार आता, हा दरवाजा उघडच नाही…

    दरवाजा स्वत:हुन नाही उघडणार; तुला उघडावा लागेल.
    रस्ता तुझ्यापुढे नाही येणार; तुला स्वत:ला रस्ता निर्माण करावा लागेल नाहीतर शोधावा लागेल.

    एक जिवंत नियम आहे-
    सांगा म्हणजे कळेल,
    मागा म्हणजे मिळेल,
    शोधा म्हणजे सापडेल,
    आणि ठोठवा म्हणजे उघडेल…
    हे करणं ज्याला जमत त्याला यश मिळत…

    शोधा म्हणजे सापडेल. दार ठोठवा म्हणजे उघडेल, कारण मागणार्‍याला मिळतं, शोधणार्‍याला सापडतं आणि दार वाजवणार्‍याला दार उघडतं.

  • केमिकल फ्री’ अन्नासाठी…

    १. नैसर्गिक पद्धतीनं शेती केलेलं अन्न खाणं चांगलं. म्हणजेच ऑरगॅनिक फूड. त्यात रसायनं असण्याची शक्यता नसते. त्यामुळे ज्या-ज्या वेळी शक्य असेल त्यावेळी ऑरगॅनिक फूड घ्या.

    २. साखर कमीत कमी वापरावी किंवा बंदच करावी. थोडी तरी साखर शरीराला हवी, हा गैरसमज आहे; कारण नैसर्गिक साखर आपल्याला गहू, भात, फळं यातही मिळत असतेच. साखरेऐवजी गोडीसाठी शुद्ध मध किंवा 'केमिकल फ्री' गूळ वापरावा.

    ३. तेल-रासायनिक प्रक्रिया करून शुद्ध केलेलं तेल वापरण्यापेक्षा मशिनच्या माध्यमातून शुद्ध केलेलं तेल वापरावं. गाळलेलं किंवा घाण्यावरचं तेल वापरलं तर उत्तम.

    ४. कमीत कमी प्रक्रिया केलेले पदार्थ वापरा. उदाहरणार्थ, सफरचंद नुसतं खाणं उत्तम, त्याचा रसही ठीक; पण त्याचा जाम मात्र भरपूर प्रक्रिया केलेला, निःसत्त्व आणि साखरेमुळे खूप जास्त कॅलरीजचा असतो. म्हणूनच पदार्थ जास्तीतजास्त त्यांच्या नैसर्गिक स्वरूपात खावं. बाहेर स्ट्रॉबेरी, मँगो असे ड्रिंक्स किंवा आईस्क्रीम मिळतात; परंतु त्यात केवळ कृत्रिम स्वाद वापरलेला असतो

    ५. भाज्या ताज्या आणि त्या त्या मोसमात खालेल्या जास्त चांगल्या; कारण त्यावेळी त्यांच्यात जीवनसत्त्वं आणि क्षार जास्तीत जास्त असतात. साठवलेल्या, पावडर केलेल्या, फ्रोझेन भाज्यांमध्ये नैसर्गिक सत्त्वं कमी आणि रसायनं अधिक असू शकतात. भाज्यांच्या सूप पावडरचं पाकीट वाचल्यावर त्यात किती अनैसर्गिक गोष्टी आहेत, ते आपल्याला कळेल.

    ६. घरचं अन्न घेणं कधीही चांगलं. हॉटेलमधील भाज्या छान दिसण्यासाठी त्यात रंग वापरले जातात.

    ७. मिठाई वरचा वर्ख आणि त्यातील कृत्रिम रंगही शरीराला हानिकारक ठरतात. असेच रंग केक, पेस्ट्रीज, बर्फाचा गोळा, गोळ्या यातही वापरले जातात म्हणून यांचा वापर कमीत कमी करण्यावर भर द्यावा. घरी केलेला नाचणी केक वगैरे उत्तम.

    ८. मासे किंवा फिश यात ओमेगा फॅट्स असतात. आकारानं मोठ्या माशांमध्ये मर्क्युरीचं प्रमाण जास्त असतं. यासाठी आकारानं लहान मासे घ्यावेत.

    गजानन वैद
    whats app -7775871809

    (आरोग्यदूत या WhatsApp ग्रुपमधून साभार)

  • परदेशी झाडे पर्यावरणास घातक

    बहुपयोगी वड ,पिंपळ,चिंच ,फणस ,आवळा ,आंबा ,बेल,कडुनिंब ,मोह , कदंब ,पळस अशी भारतीय देशी झाडे लावायची सोडुन मॉडर्नपणाच्या खोट्या समजुतिने परदेशी कॅशिया,ग्लिरिसिडीया,फायकस ,सप्तपर्णी ,स्पॅथोडिया,रेन ट्री अशी परदेशी झाडे लावण्याची फॅशन आली आहे.पण ही परदेशी झाडे पर्यावरणास व आरोग्यास घातक असल्याचे संशोधनावरुन सिध्द झाले आहे.

    झाडांवर कधीही पक्षी?? बसत नाहीत आणि घरटी करत नाहीत .एकवेळ आपले पक्षी मुळ भारतीय असलेल्या रामकाटी बाभूळ या देशी झाडावर घरटे करतात पण परदेशी झाडावर करत नाहीत .( रामकाठी बाभूळ ही उंच वाढणारी पिवळी फुले येणारी मूळ देशी बाभूळ आहे ,मात्र आता सर्वत्र झुडुपासारखी वाढणारी वेडी बाभूळ ,बंगाली बाभूळ ,चिलार या नावाने ओळखली जाणारी बाभूळ परदेशी असुन १९७२ साली आयात केलेल्या गव्हा(मिलो )बरोबर भारतात आली आहे . )

    झाडाची पाने ,फुले ,शेंगा आपल्याकडील गाय ,बैल ,शेळी ,माकड कधीच खात नाहीत .माकडे देखील परदेशी झाडावर बसत नाहीत. म्हणजे मुक्या प्राण्यांना जे कळते की परदेशी झाडे घातक आहे ते आपल्या समाजधुरीणांना कळत नाही हेच मोठे दुर्देव अमेरिकेतील ग्लिरिसिडीया या झाडाची पाने,फुले खाण्यात आली तर उंदीर देखील मरतात.त्याच्या आसपास गवत व इतर झाडे वाढु शकत नाहीत .या झाडाखालुन चालताना धाप लागते .या झाडापासून विषारी वायु उत्सर्जित केला जातो,त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होते .इतके विषारी झाड आपल्याकडे सरकारी वृक्षारोपणातुन सर्रासपणे लावलेले आहे .जवळपास ९०% सरकारी जंगले व नर्सरी ग्लिरिसिडीयाने भरलेली आहेत.१९७० च्या दशकात युरोपियन देशांनी षडयंत्र रचुन जागतिक बॅंकेचे कर्ज देण्यासाठी भारतासमोर ग्लिरिसिडीया हे झाड भारतीय जंगलात लावण्याची अट घातली तेव्हापासून आपल्याकडे ग्लिरिसिडीया हे झाड आले.तेव्हापासून पावसाचे प्रमाण हळुहळु कमी झालेले आहे .आपल्या शासकीय वनीकरण कार्यक्रमात वड ,पिंपळ ही देशी झाडे आजपर्यंत न लावल्यामुळे वनीकरण अपयशी ठरले आहे .
    या झाडाच्या पानाचा धुर घेतल्यास शरीर सुजते. परदेशी झाडांचे कोणतेही आयुर्वेदीक उपयोग नाहीत .त्यापासुन ऑक्सीजन देखील मिळत नाही .

    ज्या गार्डनमधे मोठ्या प्रमाणावर परदेशी झाडे आहेत तेथे फिरायला जाणाऱ्या नागरिकांमधे ह्रदय रोगाचे प्रमाण वाढलेले असल्याचे संशोधनावरुन सिध्द झालेले आहे .

    मोठ्याप्रमाणावर परदेशी झाडे लावली गेली आहेत आणि त्यांना मुद्दाम नीलमोहोर ,काशीद ,सप्तपर्णी अशी स्थानिक दिशाभुल करणारी नावे दिलेली आहेत की कोणते झाड परदेशी समजायचे असा गोंधळ निर्माण होतो यासाठी ज्या झाडांवर आपल्याकडील पक्षी बसत नाहीत आणि घरटी करत नाहीत ते झाड परदेशी समजावे )

    ही झाडे ज्या भागात आहेत तेथे हमखास पाउस पडतो.असे संशोधनावरुन सिध्द झालेले आहे .

    झाडे मुबलक प्रमाणात ऑक्सीजन सोडतात व त्यांचे असंख्य आयुर्वेदीक उपयोग आहेत .
    त्यामुळे खऱ्या अर्थाने वृक्षारोपण करुन पर्यावरणाला हातभार लावायचा असेल तर फक्त देशी झाडे लावा ही विनंती.

    मेसेज जास्तीत जास्त फॉरवर्ड करा त्यायोगे तुमचा वृक्षारोपणास हातभार लागेल.

  • जगण्याचे साधे सोप्पे नियम – भाग दोन

    नियम एक.
    कोणताच नियम पाळू नये. भाग दोन.

    दूध म्हणजे विष नाही, दही म्हणजे विष नाही, गुळ म्हणजे विष नाही, पाणी म्हणजे विष नव्हे, पण हे पदार्थ प्रमेहामधे रोगाचे कारण सांगितलेले आहे. हे विसरून चालणार नाही. म्हणजे हे पदार्थ बंद करायला हवेत असं नाही. आपली प्रकृती आपली पचनशक्ती जर कफाकडे जाणारी, कफ वाढवणारी असेल, तर या पदार्थांचा वापर करताना युक्तीचा वापर करायला हवा. हे सर्व पदार्थ पचायला जड आहेत. हे पदार्थ खाल्ले आणि काहीच व्यायाम केला नाही तर मात्र गडबड होणार हे नक्की.

    सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत खावे, दोन मुख्य जेवणे या वेळेत झाली, की त्याचे पचन सूर्य करतो, पचन सोपे होते, हा नियम झाला, पण एखादे वेळी दोनापैकी एक जेवण झालेच नाही, आणि सूर्यास्तानंतर खूप भूक लागली तर काय करावे ?
    मस्त जेवावे.
    फक्त अशा वेळी लक्षात ठेवावे की, सूर्यासारखा, पचनाला मदत करणारा अग्नी हा अत्यंत महत्त्वाचा घटक शरीराला पचनासाठी वापरता येणार नाही, तेव्हा फार लोड येईल असे खाऊ नये. जे काही खाऊ ते चापून खाण्याऐवजी हातचे राखून खावे, मटण चिकन, श्रीखंड, गुलाबजाम असे पचायला जड होणारे जेवण तर अजिबात नको. ही युक्ती हवी.
    असे जड जेवण घेतले तर त्याचे पचन पूर्ण होण्यासाठी तसाच व्यायाम, तसेच कष्ट, तशीच मेहनत करायला हवी. नाहीतर सगळेच ओमफस्स !

    संकष्टीला दिवसभर उपवास करून रात्री उशीरा चंद्रोदय झाल्यावर मोदकाचे जेवण जेवावे, या संकल्पनेमधे आपण नियम मोडलाच. पण दिवसभर उपाशी आहोत, स्वतः ठरवून, जाणून बुजुन, व्रत म्हणून, मनाला संयम घालून दिवसभर उपवास करून रात्री जेवलात तर ते क्षम्य ठरू शकते. पण ते सुद्धा महिन्यातून एक वेळ नियमाला हा अपवाद आहे. आम्ही अपवादाचा नियम केला की, सत्यानाश !

    चातुर्मास करताना, या चार महिन्यात "देव झोपतो", अशी आपली संकल्पना आहे. या चार महिन्यात देवच जर झोपला, तर शरीराचे सर्व व्यवहार आपल्यालाच पहावे लागणार आहेत, उगाच काही मोठे निर्णय घेण्याची चूक करू नये, याचे भान राखून आपण आपले व्यवहार करावेत, ही युक्ती आहे. हे आपल्या लक्षात असावे, म्हणून चातुर्मासामधे काही विशिष्ट व्रते सांगितली जातात. एखाद्या वेळी एखादा उपवास चुकुन मोडला, म्हणून लगेच, " आता उपास मोडलाच आहे, भजी खाऊन घेऊया" असा विचार करणे ही चुक आहे.

    तारतम्य बाळगणे, योग्य अयोग्याचा विचार करणे ही युक्ती असते. एखादी कृती दुसरा करतोय मग मी का नको ? असा विचार करणे चूक आहे असे नाही, पण त्यासाठी मला, जशाच्या तसा "दुसरा" बनणे आवश्यक आहे.

    व्यायामाचे तेच आहे. व्यायाम जरूर करावा, पण कोणी करू नये, हे पण शास्त्रात सांगितलेले आहे.

    प.पू. रामदेव स्वामी महाराज शीर्षासन करून हातावर चालतात, मग मला का नाही जमणार असे एखाद्यानं ठरवले आणि तसं करण्याचा प्रयत्न केला तर काय होईल ? नाक तोंड फुटेल बाकी काही नाही. यासाठी तसा अभ्यास, तसे सातत्य, पहिल्यापासून हवे, तर जमेल. नाहीतर नाही.

    शेवटी नियम हे आपल्याला मर्यादा समजावी म्हणून सांगितलेले असतात. तसेच्या तसे ते तंतोतंत पाळणे आणि सगळे नियम धाब्यावर बसवणे, दोन्ही चुकच !
    युक्ती वापरली की, सगळ्याचा उपभोग घेता येतो. त्याचा हेतु योग्य असला की झालं.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    11.04.2017

  • वार्धक्यातील दिनचर्या कशी असावी

    वार्धक्यातील आजार टाळण्यासाठी दिनचर्या आहार-विहार, नियमितपणा फार महत्वाचा आहे. ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठे स्वस्थो रक्षार्थमायुष:

    ब्रह्म मुहूर्तावर म्हणजे पहाटे उठावे, बाहेर फिरायला जावे. यावेळी वातावरणात प्रदूषण कमी असते व शरीरातील मलमूत्र इ. अधारणीयवेग निर्माण होण्यास त्याचप्रमाणे मन व शरीर उल्हासित, आनंदी रहायला उपयुक्त आहे. कोमट पाणी तोंडावाटे प्यावे. जमल्यास वातप्रकृती व्यक्तीने तुप व कोष्ण जल प्यावे. तसेच कफ प्रकृतीच्या व्यक्तीने फक्त गरम पाणी प्यावे. मध हा गरम पाणी किंवा गरम पदार्थाबरोबर कधी घेऊ नये.

    अभ्यंग- संपूर्ण शरीराला स्निग्ध अशा तेलाने मर्दन करणे, म्हणजे मालिश करणे. आयुर्वेदात प्रत्येकाने रोज न चुकता अभ्यंग केलेच पाहिजे, असे आवर्जून सांगितले आहे. क्षणोक्षणी झिजणाऱ्या शरीरयंत्राला तेल दिल्याने त्या शरीरयंत्राच्या सर्व अवयवरूपी लहान मोठ्या भागाची झीज कमी होते. आयुष्यमान वाढते. शरीराला रोज अभ्यंग करणे शक्य नसल्यास डोके, पाय व कान यांनातरी तेल मर्दन करावे. अभ्यंग साधारणपणे संपूर्ण पाच मिनिटे करावे. अभ्यंगासाठी तिळतेल हे सर्व श्रेष्ठ आहे. ते नसल्यास साधे गोडतेल, खोबरेल तेल वापरावे. त्यानंतर उटण्याने स्नान करावे. साबण शक्यतो टाळावा. त्यामुळे होणाऱ्या त्वचारोगाला आळा बसतो. उटणे नसल्यास डाळीचे पीठ व त्रिफळाचूर्ण वापरावे.

  • औषधी वाळा – गरीबांचा A.C.

    वाळ्याला गरीबांचा A.C. म्हणतात. या बहुगुणी वाळ्याचा विशेषत: उन्हाळ्यात खूप उपयोग होतो.

    Chrysopogon zizanioides हे शास्त्रीय नाव असलेले Vetiver grass म्हणजेच वाळा, ज्याचा मूळ उगम आपल्या भारतातच आहे. वाळ्याला बेना, बाला, मुदीवाळा, कुरुवेल, सुगंधी-मूलक, उशीर, खर, बेकनम्‌, कसक्युकस ग्रास, व्हेटिव्हेरिया झिझॅनॉईडिस अशी अनेक नावं आहेत. विशेषत: पश्चिम आणि उत्तर भारतात "खस गवत" ह्या नावाने परिचीत असलेले हे गवत. वाळा या गवता या बहुवर्षायू गवताची उगवण दाट होते. हे गवत मृद्‌संधारणासाठी अतिशय चांगले आहे. लागवड स्लिप्स’पासून केली जाते. पिवळा वाळा, काळा वाळा असे वाळ्याचे दोन प्रकार आहेत. गवती बांध या तंत्रामध्ये समपातळीत उतारास आडवे मातीचे बांध टाकण्याऐवजी वनस्पतीची लागवड केली जाते व त्याचा बांधासारखा उपयोग करता येतो. याकरिता प्रामुख्याने मारवेल-८, मद्रास अंजन, खस गवत आणि सुबाभूळ अशा वनस्पतींची निवड करतात. उन्हाळ्यात माठात वाळा टाकल्यास पाण्याला मस्त सुगंध येतो आणि पाण्यातील दोष निघून जाण्यासही मदत होते. वाळ्याच्या मुळांच्या दोन जुड्या तयार कराव्यात. एक जुडी पिण्याच्या पाण्यामध्ये घालावी आणि दुसरी उन्हात वाळत ठेवावी. दुसर्याड दिवशी उन्हात वाळवलेली जुडी पिण्याच्या पाण्यात आणि पाण्यातील जुडी उन्हात ठेवावी. याप्रमाणे दररोज करावं. हे वाळ्याचे पाणी उष्णतेचे विकार दूर करणारे आहे. तसेच हे पाणी थंड व सुगंधी होते. त्या पाण्याने तहान भागते. वाळ्याचे पडदे करून त्यावर पाणी मारलं तर सभोवती गारवा वाटतो. म्हणूनच उन्हाळ्यात अनेक ठिकाणी वाळ्याचे पडदे लावण्याची पारंपरिक प्रथा आपल्याकडे आहे. वाळा हा अतिशय थंड आहे. अंगाची आग होणे, अंगातील उष्णता यावर वाळ्याचे चूर्ण घ्यावे. लघवीच्या, किडनीच्या आजारांवर वाळ्याचा चांगला उपयोग होतो. लघवीला आग, जळजळ होणे, लघवीचे प्रमाण कमी होणे यावर वाळ्याचा उत्तम उपयोग होतो. मुलांचा घोळाणा फुटणे, विशेषत: उन्हाळ्यात काही मुलांना हा त्रास खूप होतो. यावर वाळ्यापासून तयार केलेले 'उशीरासव' इतर औषधांबरोबर वापरतात. घामोळ्या, अंगावर पित्त येणे त्वचेवर लाल चट्टे येणे यावर वाळ्याच्या चूर्णाचा लेप लावतात. त्वचारोग, त्वचेची आग होणे, त्वचेची आग होणे, तारुण्यपिटीका यासाठी वाळा चूर्णाचा इतर चूर्णांबरोबर वापर करतात. त्यामुळे त्वचा टवटवीत होते. अंगाला घाम जास्त येत असल्यास, घामाला दुर्गंधी येत असल्यास वाळ्याचे चूर्ण अंगाला लावावे. खूप ताप, विशेषत: उन्हाळ्यातील ताप तसेच रक्तपित्त, त्वचेखाली रक्तस्त्राव यावर वैद्यांच्या सल्ल्याने वाळ्याचा उपयोग करतावा. वाळा अत्तर म्हणजेच खसचं अत्तर. वाळ्याचा वास मनाला उल्हसित करतो, आपल्या संवेदनकेंद्रांना चेतना देतो. त्यामुळे आपल्याला सुगंधाचं ज्ञान होतं. वाळ्याचं चूर्ण अंगाला चोळलं तर त्वचेचा दाह कमी होतो. घामाचं नियंत्रण होतं आणि घामाची दुर्गंधीही कमी होते. चूर्ण पाण्याबरोबर पोटात घेतलं तर "तृषा' शमते आणि पोटातली कडकी कमी होते. वाळ्याचे तेल बाजारात ८ ते १०००० रुपये किलो दराने विकले जाते. वाळ्याचे तेल उध्र्वपातन पद्धतीने काढताना खूपच काळजी घ्यावी लागते. नैसर्गिक सुगंधी तेल हे अनेक रासायनिक पदार्थाचे मिश्रण असते. यातल्या प्रत्येक पदार्थाचा उत्कलन बिंदू विशिष्ट असतो व इतरांपेक्षा भिन्न असतो. तसेच त्यांच्या स्पेसिफिक ग्रॅव्हिटी (सापेक्ष घनता)मध्येही फरक असतो. ऑईल सेपरेटरद्वारे तेल व पाणी वेगळे करताना जर पाण्यापेक्षा सुगंधी तेल जड असले तर ते तेल भांडय़ाच्या तळाशी राहते व हलके असले तर पाण्यावर तरंगते. वाळ्याच्या तेलाची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी .९९० ते १.०३२ असते. उध्र्वपातन प्रक्रियेने वाळ्याचे तेल काढण्याची प्रक्रिया सुरू केल्यावर सुरुवातीला येणारे वाळ्याच्या तेलातील काही घटक हे पाण्यावर तरंगतात तर नंतर येणारे काही घटक हे पाण्यापेक्षा जड असल्याने भांडय़ाच्या तळाशी राहतात. बाजारात वाळा मिळतो. छोट्या शहरांमध्ये तर मिळतोच पण पुण्या मुंबईलाही मिळतो. काष्ठौषधी असलेल्या दुकानात नक्की मिळतो.

    वाळ्याचे औषधी उपयोग
    वाळ्यामध्ये शीत, तृष्णाशामक, मुत्रल हे मुख्य गुणधर्म आहेत. मुळांचे चूर्ण थंड, उत्तेजक व मुत्रल आहे.
    वाळा पित्त व कफनाशक तसेच दुर्गंधीनाशक असून दमा, खोकला, उचकी, रक्तरोग, उलटी, तहान, हृदयरोग, मूत्ररोग, लघवीची आग, अंगाचा दाह, व्रण आणि ज्वर या विकारांवर उपयुक्त आहे. वाळा जाळून धुरी घेतल्यास तीव्र डोकेदुखी कमी होते. उन्हाळी लागल्यास वाळा चूर्ण पाण्यात उकळून थंड झाल्यावर घेतल्यास आराम मिळतो. थकवा कमी करण्यासाठी वाळा सरबत उत्तम आहे. उन्हाळ्यात उष्णता कमी करण्यासाठी वाळ्याच्या पडद्यांचा उपयोग करतात.
    वाळ्याचे तेल, अत्तरे, सौंदर्य प्रसाधने व खाद्य पदार्थात वापरतात. वाळ्यात रंगद्रव्ये, आयर्न ऑक्साेईड, आम्ल चुन्याचे प्रमाण असते. वाळ्याचे सरबत तर हिरव्या रंगामुळे व थंड गुणामुळे उपयोगी आहे.

    चंदन वाळा सरबत.
    साहित्य. चंदन पूड पाच ग्रॅम, वाळा पावडर पाच ग्रॅम, पाणी 50 मि.लि., साखर 100 ग्रॅम.
    कृती. पाणी उकळलेल्या पाण्यात चंदन व वाळा पावडर टाकून दोन तास झाकून ठेवावी. नंतर चमच्याने ढवळून गाळून किती होते ते मोजावे. एक वाटी मिश्रणास दोन वाटी साखर व एक वाटी पाणी याप्रमाणे घ्यावे. पाणी व साखर एकत्र उकळून फेस शांत झाला आणि मिश्रण स्वच्छ दिसू लागले, की गॅस बंद करून त्यात चंदन-वाळ्याचं तयार केलेलं मिश्रण घालून चांगलं चमचाने ढवळून गाळणीने गाळून बाटलीमध्ये भरून ठेवावे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ- इंटरनेट