वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
ह्याचे बहुवर्षायू २-८ फुट उंचीचे क्षुप असते.ह्याची पाने दंतुर कडा असलेली असतात.ह्याचे मुळ औषधी मध्ये वापरतात तर ह्याच्या पानांची भाजी करतात.हि भाजी अत्यंत पथ्यकर व रुचकर लागते.
हि पाने सुध्दा औषधी गुणांची असल्याने घरगुती उपचारात वापरतात.हि चवीला कडू तिखट असते व थंड गुणाची असल्याने शरीरातील तिन्ही दोष कमी करते.
हि भाजी शक्यतो कोवळी असतानाच करावी जुन पाने वापरू नये व हि भाजी नीट निवडूनच करावी कारण पानांच्या खाली बारीक अळ्यांचे बस्तान असण्याची दाट शक्यता असते.
चला आता हिचे औषधी उपयोग पाहूयात:
१)जखम भरून येण्यास भारंगीच्या पानांचा लेप जखमेवर लावावा.
२)सर्दी खोकल्या मध्ये भारंगीची पाने+ सुंठ+ मिरी+गुळ घालून काढा करावा व प्यावा.
३)भारंगीची भाजी शिजवून त्याचे पाणी प्यायले असता पोटातील कृमिंचा नाश होतो.
४)तापामध्ये भारंगीची व गुळवेलीची पाने एकत्र शिजवून काढा करावा व तो मध घालून घ्यावा.
५)अंगाचा दाह होत असल्यास भारंगीच्या पानांची चटणी वाटून तिचा लेप तळहातावर व पायांवर करावा.
हि भाजी जास्त प्रमाणात खाल्ल्यास जुलाब होतात.
-- वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
October 30, 2016
काही लोकांना त्यांच्या शिक्षणाचा त्यांच्या पदाचा, दिसण्याचा किंवा त्यांच्या आर्थिक परिस्थीतीचा ॲटीट्युड असतो ज्यातून त्यांची वृत्ती किंवा त्यांचा दुसऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन दिसून येतो ज्यामुळे अशी लोकं आपल्या आयुष्यात पुन्हा येऊच नयेत असं मला वाटायचं. शेवटी जिद्द आणि चिकाटी सोबतच कोणाच्या ॲटीट्युडला कशासाठी आणि किती महत्व द्यायचे हे तर आपल्याच हातात आहे.
February 18, 2024
मुख्यमंत्री.......
शरद पवार ( मराठा )
अशोक चव्हाण ( मराठा )
पृथ्वीराज चव्हाण ( मराठा )
यशवंतराव चव्हाण ( मराठा )
शंकरराव चव्हाण ( मराठा )
विलासराव देशमुख ( मराठा )
वसंतराव नाईक ( मराठा)
सुधाकरराव नाईक ( मराठा )
शिवाजीराव निलंगेकर ( मराठा )
वसंतराव दादा पाटील ( मराठा )
पी.के. सावंत ( मराठा )
बाबासाहेब भोसले ( मराठा )
नारायण राणे ( मराठा )
येवढे मराठी मुख्यंमत्री होऊन गेले तरी मराठ्यांना 1 टक्का सुद्धा आरक्षण का देता नाही आलं?
ते हे तेरा जण का करू शकले नाहीत !!!
आणि आता यांना आरक्षण हवे ते फडणवीस कडून काय छान योग आणि मुहूर्त शोधुन काढलाय के हा नाही म्हणाला कि लगेच फडणवीस बामण होता म्हणून आरक्षण दिले नाही म्हणून आख्या महाराष्ट्राला vede pana लावायला हे मोकळे
विचार करा मित्रानों.......
Forwarded message in public interest ....
September 28, 2016
सिग्मंड फ्राईड एकदा बायको व मुलाला घेऊन बागेत फिरायला गेला. मुलगा छोटा होता. आई-वडील गप्पात गुंग झाल्यावर तो हळूच तेथून संधी साधून गायब झाला. थोडया वेळानंतर समोरच खेळणारा मुलगा गेला कुठे म्हणून आई कासावीस झाली. घाबरून ती इकडे तिकडे त्याला शोधण्यासाठी पळू लागली. घाबरलेल्या, सैरावैरा पळणार्या आपल्या पत्नीला फ्राईड म्हणाला, ‘‘अगं मला एवढंच सांग आपला बागेत जायचा बेत ठरला तद्नंतर तू त्याला अमुक एक जागी जाऊ नकोस असं काही सांगितलं होतं का?’’ ती म्हणाली हो, ‘‘बागेतल्या कारंज्याजवळ जाऊ नको असं बजावलं होतं. त्याने, लगेच बायकोला घेऊन कारंज्याकडे कुच केली. मुलगा कारंज्याच्या थुई-थुई नाचणार्या पाण्यात पाय बुडवून मजेत पाण्याचे फवारे अंगावर घेत नाचत होता.’’ बायकोने मुलाला हाक मारली व फ्राईडचा हात धरत विचारलं, ‘‘तुम्हाला सिध्दी प्राप्त झालीय का ? हा कारंज्याजवळच आहे हे कसे तुम्हाला कळालं ?’’ फ्राईड म्हणाला - ‘‘सिध्दी-बिध्दी काही नाही, मला माणसाचं मन समजतं थोडंफार.’’
खरोखर मित्रांनो कवयत्री बहिणाबाईंनी म्हटल्याप्रमाणे आता भुईवर असणारं मन क्षणार्धात आकाशात जाते. प्रयोग करून पहा, डोळे मिटून ध्यान करताना ध्यानात माकडे यायला नकोत असा विचार केला कि दोन-तीन माकडं डोळयासमोर येतील. एखादया दारावर आत डोकावू नये अशी पाटी लावली कि आत डोकावण्याची तीव्र इच्छा मनात निर्माण होईल व काहीही करून आपण आत डोकावणारच.
एक राजा लढाईला जाताना राजमहालात आपल्या देखण्या राणीला ठेवून जिवलग मित्राकडे चावी देऊन राजा त्याला म्हणाला, ‘‘मित्रा मी जर तीन दिवसांत परत आलो नाही तर लढाईत माझा मृत्यू झाला असे समजून तू राजमहालाचे कुलूप उघड व राणी तुझीच असे समज.’’ राजा लढाईला निघाला. वाटेत एक तासानंतर तो विश्रांतीला थांबला. पाहतो तर काय त्याचा जिवलग मित्र खूप वेगाने घौडदौड करत चावी घेऊन आला व राजाला म्हणाला अरे यार ही किल्ली दुसर्या कुलपाची दिसतेय, राणीच्या महालाची नाही. पाहिलंत ना, राणीच्या मोहापायी तीन दिवसांनी कुलूप उघडण्याची राजाज्ञा त्याने धुडकावून लावली होती.
अंर्तमनाला एखादी गोष्ट करू नकोस असे ताकिद देऊन दरडावून सांगितले की ते तीच गोष्ट करून बघण्यासाठी धडपड करते. त्यावेळी बर्हिमनाने त्याला सहजपणे - हळुवारपणे, तत्वनिष्ठ भावनेने गोंजारत समजावून सांगितले व त्याचे फायदे-तोटे मैत्रीभावनेने लक्षात आणून दिले कि अंर्तमन-बर्हिमन यात सुसंवाद सुरू होतो. तेथे ताणाचा अजिबात लवलेश नसल्याने दुष्कृत्य घडत नाहीत. अंर्तमन व बर्हिमन यांच्यात सतत बोलणे चालू असते. त्यालाच स्वसंवाद असे म्हणतात. आपल्या मनाचा काही भाग आपण सर्वांना दाखवण्यासाठी प्रयत्न करतो. पण काही भाग मात्र कोणालाही व कधीही दिसू नये यासाठी आपण जागरूक असतो.
आपला भाव देवाला दिसावा असे भक्ताला वाटते, आपले प्रेम प्रेयसीला कळावे असे प्रियकराला वाटते, कविता रसिकांनी वाचावी व लोकांनी आपणांस दाद दयावी असे कवीला वाटते. आपल्या जीवनाचा काही भाग सगळयांना दिसावा पण संपूर्ण अंतरंग मात्र सगळयांना दिसावे, असे आपणास कधीच वाटत नाही. कारण आपण प्रथम आपले व नंतर जगाचे असतो.
मन हा आपल्या जीवनाचा गाभा आहे. जीवनाचे सारे रंग व तरंग सामावून घेणारे अंतरंग म्हणजे मन. निर्वाणाचा साक्षात्कार होतो तो मनाच्याच ठायी. सारे वेग व आवेग विराम पावतात ते मनाच्याच ठायी. जीवनाचे सुख-दुःख हे मनावरच अवलंबून असते. म्हणून मनात काय चाललेय याचा वारंवार एक्स-रे काढण्यासाठी सजग राहून दिर्घश्वसनाचा सराव करावा. थोडे चालणे, काही आसने करणे, सुर्यनमस्कार घालणे महत्वाचे असते. हे करण्याबरोबर मनाचे शांत चित्ताने तटस्थपणे निरिक्षण करावे त्यासाठी *रोज सकाळ-संध्याकाळ मांडी घालून शांत बसा. तटस्थपणे येणार्या जाणार्या श्वासाला डोळे मिटून जाणत रहा*. यामुळे मनातील विचारांचे वादळ हळूहळू शांत होऊ लागेल व मनाचा एक्स-रे व्यवस्थित पाहून मनानी मनानेच ऑपरेशन करून मनाला प्रसन्न करता येईल.
शेवटी म्हणतात ना, ‘‘मन करा रे प्रसन्न - सर्व सिध्दीचे कारण.’’
Forwarded Post
December 12, 2016
रासायनिक गुणधर्म या दोन शब्दांबरोबर आम्लधर्मी की आम्लारिधर्मी हे गुणधर्म डोळ्यासमोर येतात. कोणत्याही पदार्थातील आम्लधर्म किंवा ओळखण्यासाठी साधी चाचणी असते. या आम्लारिधर्म चाचणीला सामू तपासणे असे म्हणतात. या चाचणीमध्ये कागदाचे खूप बारीक तुकडे करून ते शुद्ध पाण्यात उकळतात. नंतर हे द्रावण गाळतात.
February 26, 2023
पुराणवाङ्मयात गणेशाच्या अवतारांचा उल्लेख आहे. पुराणें वेदांहून खूपच अर्वाचीन आहेत हें खरें. (पुराणाचा काळ आहे, इ.स. च्या पहिल्या सहस्रखातीक पहिली काही शतकें). परंतु, आधी म्हटल्याप्रमाणें, एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी, ती ही की, कालप्रवाहात जनसमूहांमधे अनेक प्रकारची माहिती व ज्ञान पिढ्यान् पिढ्या मौखिक स्वरूपात चालत येते, व नंतरच त्याचा लिखित साहित्यात समावेश होतो. त्यामुळे, हें गृहीत धरायला हरकत नसावी, की पुराणांमधील उल्लेखांच्या खूप आधीपासूनच, गणेशावतारांची संकल्पना व माहिती जनमानसामधे रूढ झालेली आहे.
अवतार घेणें म्हणजे धरतीवर पुनरामन करणें. अर्थातच, गणेशावतार म्हटलें की, गजाननाचे धरतीवर पुन्हापुन्हा आगमन आभिप्रेत आहे. त्या संकल्पनेचा वैज्ञानिक अर्थही आपण शोधायला हवा.
एक महत्वाची शक्यता अशी : अवकाशप्रवासात ‘टाइम-डायलेशन’ होतें. म्हणजेच, पृथ्वीवर अनेक शतकें लोटलेली असली, तरी अवकाशयानातील प्रवाशासाठी फक्त अल्प वर्षेंच गेलेली असतात. (अशी सापेक्ष कालगणना भारतीय परंपरेमधेसुद्धा आहे. मानवाची अमुक-लक्ष वर्षें म्हणजे ‘ब्रह्म्याचे’ एक वर्ष, असें भारतीय परंपरा सांगते.) म्हणजे असें पहा, हा अवकाशयात्री (किंवा त्याची टोळी) एकदा येऊन गेल्यानंतर, पुढील वेळी जेव्हां पृथ्वीवर उतरला असेल, तेव्हां तो स्वत: फक्त थोडीशी वर्षेंच व्यतीत करून आलेला असेल, परंतु पृथ्वीवर मात्र कैक शतकें व अनेक पिढ्या गेलेल्या असतील. त्यामुळे, अवकाशप्रवासी ही व्यक्ती स्वत: तीच जरी असली तरी, पृथ्वीवासीयांना तो नवीन ‘अवतार’ वाटणें स्वाभाविक आहे.
दुसरी एक शक्यता : आपण आणखीही एक अन्य गोष्ट आपण ध्यानात घेऊं. आपण हें पाहिलेंच आहे की, ‘विशालकाय गजानन’ म्हणजे ‘स्पेस-सूट घातलेला अवकाशप्रवासी’ आहे. आतां, एक गोष्ट उघड आहे की, स्पेस-सूट हा एकप्रकारचा ‘युनिफॉर्म’च (गणवेश) आहे. आणि, आपणां सर्वांना ठाऊकच आहे की, गणवेश घातलेल्या सर्व व्यक्ती, दुरून नजर टाकल्यावर ‘एकसारख्याच’ दिसतात. उदाहरणार्थ, पोलिस, फायर-ब्रिगेडवाले, सैनिक, वगैरे. त्यामुळे, आधी व कालांतरानें पृथ्वीवर उतरलेल्या व असा युनिफॉर्म म्हणजे स्पेस-सूट घातलेल्या अवकाशयात्री व्यक्ती जरी भिन्न भिन्न असल्या, तरी बघणार्याना ‘ती एकच व्यक्ती पुन्हा अवतरली आहे’, असे वाटणें सहज शक्य आहे.
हल्लीचे उदाहरण : आपण हल्लीचे एक उदाहरण घेऊन हा मुद्दा अधिक स्पष्ट करू. काहीं दशकांपूर्वी पृथ्वीवासी ‘ऍस्ट्रॉनॉट’ आर्मस्ट्राँग हा चंद्रावर उतरला होता. तेव्हां त्यानें स्पेस-सूट घातलेला होता. आपण त्याची तशा वेशातील, चंद्रावरील छायाचित्रेही पाहिलेली असतील.
समजा, चंद्रावर त्यासमयीं जर कोणी अप्रगत जीव वास करत असते, तर त्यांना आर्मस्ट्राँग हा गजाननासारखा, व आकाशातून उतरलेला, ‘देव’ वाटू शकला असता.
आणि, कांही दशकांनंतर,. किंवा शतकांनंतर, जर दुसरा एखादा, तसाच स्पेस-सूट घातलेला ऍस्ट्रॉनॉट चंद्रावर उतरला, तर तेथील जीवांना तो ‘त्या देवाचा अवतार’ आहे, त्या देवाचें ‘पुनरागमन’ झालें आहे, असेच वाटलें असते.
म्हणूनच, आपल्याला गजाननाच्या अवतारांचा उल्लेख मिळतो ; गजानन अनादि आहे, अनंत आहे, असें मानलें जातें.
विविध अवतारांची भिन्नभिन्न वाहनें :
पुराणांनुसार, गजाननाच्या प्रत्येक अवताराचें वाहन भिन्न आहे. जसें, उंदीर, सिंह, मोर. तें कां, याचाही विचार करायला हवा.
याचें स्पष्टीकरण सोपें आहे. आजही, मोटारींचे वेगवेगळे आकार आपण पाहतोच. तसेंच, फक्त-जमिनीवर पळणारी मोटार, पाण्यात-चालणारी होडी किंवा बोट, व ‘ऍम्फिबियस’ (भूमी व पाणी, दोन्हीवर प्रवास करू शकणारें) हॉवरक्राफ्ट यांचे स्वरूप भिन्नभिन्नच असते.
ज़रासे-वरती, आकाशात प्रवास करू शकणार्या, हवाई-बलून (एअर-शिप), ग्लायडर व हेलिकॉप्टर यांचे स्वरूपही एकमेकांपेक्षा वेगळें असतें. जमिनीवरून टेक्-ऑफ् घेऊन उंच-उंच उडणार्या जेट-विमानांचा आकार अगदीच वेगळा असतो. असेच ‘फ्लाइंग-सॉसर्स’चें होतें आहे. अशा ‘उडत्या तबकड्या’ वस्तुत: अस्तित्वात आहेत की नाहींत, हा एक वेगळाच विषय आहे, परंतु, एक मात्र खरें की, ज्यांना अशी ‘अनआयडेंटिफाइड फ्लाइंग ऑबजेक्टस्’ (UFOs) ‘दिसलेली’ आहेत, ते लोक त्यांच्या आकाराचें भिन्नभिन्न वर्णन सांगतात, जसें, बशीसारखें, चिरूटासारखें, गोळ्यासारखे- गोलाकार (speherical), इत्यादि.
त्याप्रमाणेंच, अवकाशप्रवासी वापरत असलेल्या ‘ग्राउंड-कार्स’चें (पृथ्वीग्रहावरती, जमिनीवर, पाण्यात, किंवा काहीं उंचीवर आकाशातून, प्रवास करू शकणार्या वाहनांचें) स्वरूप कालानुसार किंवा आवश्यकतेनुसार, भिन्नभिन्न असूं शकेल; व त्यामुळे, भूतलवासियांना त्या वेगवेगळ्या प्राण्यांप्रमाणें दिसल्या असाव्यात.
गणपति : विज्ञानयुगीन उकल : गजाननाची विज्ञानयुगीन प्रार्थना, आरती :
गजमुख देव गणपतीची स्तोत्रे, प्रार्थना, नमन, वंदना, आरत्या, हें सर्व आपण वाचलेलें-ऐकलेलें आहे. पण, परग्रहवासी-अवकाशप्रवासी अशा गजाननासाठी जुनी स्तोत्रें इत्यादी कितपत उपयोगी ठरतील ? त्यासाठी, त्याची ही विज्ञानयुगीन नूतन स्तुती, नूतन आरती :
‘व्योमातुन अवतरला गजमुख’
अंतराळ-यायित्राकासारखा धारुन गणवेश
व्योमातुन अवतरला गजमुख, देव-गणाधीश ।। १
सोंडेसम भासतो मुखवटा, ‘प्राणवायु’ पुरवी
संरक्षक अवकाश-कवच त्या तुंदिलतनु बनवी
ध्वनिसंवर्धक मुखाजवळ, जणुं हस्तिदंत एक
शूर्पकर्णसम बशीमधे केंद्रित ध्वनि प्रत्येक
अश्वहीन रथ मूषक भासे, पुच्छ धूम्ररेष ।।
व्योमातुन अवतरला गजमुख देव-गणाधीश ।। २
प्रकाशगतिनें कुठून आला लक्ष-लोक लांघुनी
भूवर कधि, कितिदा अवतरला, नच जाणे कोणी
कोटिकोटि मानव-जन्मांच्या पल्याड कर्तृत्व
मर्त्य जगाला कालातीतच वाटे अस्तित्व
निरर्थ भूत-भविष्या करतो, अवकाशा दास ।।
व्योमातुन अवतरला गजमुख देव-गणाधीश ।। ३
असे हें, कालातीत गजाननाचें, अवकाशयात्री-गण-पतीचे व गणेशाच्या अवतारांचे विज्ञानयुगीन स्पष्टीकरण. वाचल्याबरोबर, लागलीच तें पटो न पटो; पण काहीं अवधीनंतर तें सर्वांच्या विचारांना नक्कीच चालना देईल, अशी खात्री वाटते. काही काळाने, एखाद्या गणेशोत्सवात वरील आरतीचा गजर घुमला तर आश्चर्य वाटायला नको.
-- सुभाष स. नाईक.
मुंबई.
M - 9869002126.
August 5, 2016
दरवर्षी मुंबईत ७ ऑगस्ट हा दिवस बेस्ट-दिन म्हणून साजरा केला जातो. उपनगरी रेल्वेच्या बरोबरीने मुंबईकर प्रवाशांची जीवनवाहिनी बनलेली 'बेस्ट' सेवा मुंबई महानगर पालिकेने ताब्यात घेतल्याला आज ७४ वर्षे पूर्ण झाली. मुंबईत वीज व ट्राम सेवा चालवण्याचा परवाना बॉम्बे इलेक्ट्रिसिटी सप्लाय अँड ट्रामवेज या खाजगी कंपनीकडे होता. पण देशाला स्वतंत्र्य मिळायच्या आठवडाभर आधीच ७ ऑगस्ट १९४७ रोजी ही कंपनी मुंबई महापालिकेने ताब्यात घेतली म्हणून 'बेस्ट दिन' म्हणून साजरा केला जातो.
मुंबईत बेस्टने शहराच्या विकासात अत्यंत महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. घोड्यांनी ओढल्या जाणाऱ्या ट्राम ते वातानुकूलीत बस असा मोठा प्रवास बेस्टने केलेला आहे. तर आता शहरात मोनो आणि मेट्रो ट्रेनही सुरु झाल्या आहेत. गेल्या दिडशे वर्षांमध्ये मुंबईने ही गतीमान प्रगती केली आहे.
खरंतर मुंबईमध्ये सार्वजनिक वाहतुकीसाठी घोड्यांनी ओढल्या जाणाऱ्या ट्रामची कल्पना एका अमेरिकन कंपनीने १८६५ साली मांडली होती. त्या कंपनीला त्याचा परवानाही मिळाला होता. मात्र ती योजना प्रत्यक्षात आली नाही. बॉम्बे ट्रामवे कंपनी, महापालिका, 'स्टर्न्स अँड किटरेज' कंपनी यांच्यामध्ये करार करण्यात आल्यानंतर १९७३ साली बॉम्बे ट्रामवे कंपनीची स्थापना करण्यात आली. मुंबई प्रांतासाठी बॉम्बे ट्रामवेज अॅ क्ट १८७४ संमत करुन त्यानुसार बॉम्बे ट्रामवे कंपनीला ट्राम चालवण्याचे हक्क देण्यात आले. ९ मे १९७४ रोजी घोड्यांद्वारे ओढली जाणारी पहिली ट्राम मुंबईमध्ये धावली. कुलाबा ते पायधुणी आणि बोरीबंदर ते पायधुणी अशा मार्गांवर धावलेल्या ट्रामसाठी केवळ तीन आणे भाडे ठरवण्यात आले मात्र कोणतेही छापिल तिकीट तेव्हा देण्यात आले नाही. प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादानंतर तिकीट कमी करुन ते दोन आणे करण्यात आले होते. नंतर काही महिन्यानंतर तिकिटे छापण्यात आली. स्टर्न्स अँड किटरेज कंपनीने ट्रामसाठी ९०० घोडे पाळल्याचे सांगण्यात येते.
इंग्लंडच्या 'ब्रिटीश इलेक्ट्रीक ट्रॅक्शन कंपनी'ने १९०४ साली विजेच्या वितरणाच्या परवान्यासाठी विनंती केली. त्यासाठी 'ब्रश इलेक्ट्रीकल इंजिनियरिंग कंपनी'ने एजंट म्हणून काम पाहिले. 'बॉम्बे ट्रामवे कंपनी', 'मुंबई महानगरपालिका', 'ब्रश कंपनी' यांच्यामध्ये ३१ जुलै १९०५ रोजी करार होऊन हा परवाना देण्यात आला. १९०५मध्ये बेस्ट म्हणजेच 'बॉम्बे इलेक्ट्रीक सप्लाय अँड ट्रामवे कंपनी'ची स्थापना करण्यात आली. १९०७ साली घोड्य़ांनी ओढल्या जाणाऱ्या ट्राम बंद करुन मुंबईमध्ये पहिली इलेक्ट्रीक ट्राम धावली तर १९२६ साली डबलडेकर ट्रामही शहरात आली. त्यानंतर या कंपनीने शहरामध्ये बससेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. १५ जुलै १९२६ साली शहरात पहिली बस अपगाण चर्च ते क्रॉफर्ड मार्केट या रस्त्यावर धावली. १९४७ साली कंपनीते नाव 'बॉम्बे इलेक्ट्रीक सप्लाय अॅंड ट्रान्सपोर्ट' (BEST) असे करण्यात आले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
August 7, 2021
दक्षिण आशियामध्ये चीनला प्रभाव वाढवायचा आहे. त्यात त्यांना भारताचा अडथळा जाणवत आहे. दुसरीकडे जागतिक महासत्ता बनण्यासाठी त्यांची अमेरिकेशी स्पर्धा सुरू आहे. या दोन्ही आघाड्यांवर लढताना त्यांनी पाकिस्तानला हाताशी धरून भारताच्या सीमांवर अशांतता निर्माण करण्याचे धोरण ठेवले आहे. यात भारताचे बरेच नुकसान होत असून अमेरिका आणि चीन यांच्या वर्चस्वाच्या युद्धात भारत होरपळून निघत आहे.
September 14, 2010
प्रभो नाम तुझे । मल्हारी । भत्त*ांचा कैवारी ।
राणी म्हाळसा । सुंदरी । शोभे सूर्याप्ररी । प्रभो नाम तुझे ।।धृ।।
पहिले ठाणक हे । मूळ महिलार । भत्त*ांचे माहेर ।
खंडेराव रूद्राचा । अवतार । होतो जय जयकार ।।
अंगणी नाचती । अवधारा । उधळुनीया भंडारा ।।
प्रभो नाम तुझे ।।धृ।।
दुसरे ठाणक हे । पालीत । पहा मनुजा ख्यालीत ।
पालीत पाहुनीया । देवराव । श्री मार्तंड भैरव ।।
घालीत नगाऱ्या । वर घाव । विघ्ना सुटला धाव ।।2।।
प्रभो नाम तुझे ।।धृ।।
तिसरे ठाणक हे । बाळ्यांत । सदरच्या किल्ल्यात ।
मुल देव बसले । खुशभत्त* । गड जेजुरीला जात ।।
माथा वन्दीले । चरण । भवजलधी तारण ।।3।।
प्रभो नाम तुझे ।।धृ।।
चौथे ठाणक हे सातारा । शेगुडी देव पाहता ।
आनन्दले चित्ता । अवचिता । हरली माझी चिता ।।
प्रभु म्या देखियला । अवधारा । हरपले असे धारा ।।4।।
प्रभो नाम तुझे ।।धृ।।
पाचवे ठाणक हे । जेजुरी । नवखण्ड मेदिनी ।
परतुन आणीली । धनंगिरी । बाणु उजव्याकरी ।।
राणी म्हाळसे । हे माते । पसन्न हो भत्त*ाते ।।5।।
प्रभो नाम तुझे ।।धृ।।
गायक - श्री. नितिन श्री.
October 15, 2015

भारताची राज्यघटना, नागरिकांचे कर्तव्य, नागरिकांचे अधिकार आणि लोकशाहीसाठीची आपली कटिबद्धता यांची आठवण करून देणारा हा सण म्हणजे एक प्रकारे येणार्या पिढ्यांवर लोकशाहीचे संस्कार करणारा, लोकशाहीमध्ये पार पाडावयाच्या जबाबदारीबद्दल जागरूक करणारा असा उत्सव आहे.
२६ जानेवारी १९५० रोजी देशाचा पहिला प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. पण हा प्रजासत्ताक दिन राजपथावर नव्हे, तर इर्विन स्टेडियम (सध्याचं नॅशनल स्टेडियम) वर झाला. त्याला आज ‘मे. ध्यानचंद स्टेडियम’ म्हणून ओळखले जाते. त्यादिवशी ध्वजाला ३१ तोफांची सलामी दिली गेली होती, त्यानंतर ध्वज फडकवण्यात आला. पहिला समारोह दुपारनंतर साजरा करण्यात आला. या वेळेस पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद ६ घोड्यांच्या बग्गीतून गव्हर्नमेंट हाउसमधून दुपारी २.३० वाजता निघाले. कॅनॉट प्लेस व ल्यूटेन्स झोन याला फेरी मारत, त्यांची फेरी स्टेडियमच्या आत पोहोचली व ३.४५ वाजता सलामी मंचापर्यंत पोहोचली, तेव्हा तिरंग्याला ३१ तोफांची सलामी देण्यात आली. विशेष म्हणजे, १९५० ते १९५४ पर्यंत प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम इर्विन स्टेडियम, किंग्सवे, लाल किल्ला, रामलीला मैदान आदी ठिकाणी झाला. पण १९५५ पासून प्रजासत्ताक दिन राजपथावर साजरा करण्याची परंपरा सुरु झाली. तेव्हापासून आजपर्यंत दरवर्षी प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम राजपथावर मोठ्या उत्साहात होतो. या कार्यक्रमानिमित्त आयोजित करणाऱ्या संचलनाची सुरुवात, रायसीना हिल्सवरुन होते. इथून राजपथ, इंडिया गेट मार्गे लाल किल्ल्यावर येऊन ती संपते. यानिमित्त राजपथावर भारताची ताकद आणि संस्कृतीची झलक पहायला मिळते. या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून आशियान शिखर परिषदेच्या नेते हजर राहणार आहेत. या मध्ये सुलतान हसनल बोल्काय (अध्यक्ष, ब्रुनेई), ह्युन सेन (पंतप्रधान, कंबोडिया), जोको विडोडो (राष्ट्राध्यक्ष, इंडोनेशिया), थाँगलून सिसूलिथ (पंतप्रधान, लाओस), नजीब रजाक (पंतप्रधान, मलेशिया), आंग सान सू की (स्टेट कौन्सीलर, म्यानमार), रोड्रिगो रोआ ड्युआर्टे (राष्ट्राध्यक्ष, फिलिपाइन्स), ली ह्यसीन लूंग (पंतप्रधान, सिंगापूर), प्रायुथ चान ओचा (पंतप्रधान, थायलंड), न्ग्युएन झुआन फुक (पंतप्रधान, व्हीएटनाम) समावेश आहे. २०१६ मध्ये देशाच्या इतिहासात पहिल्यांदा प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भारतीय जवानांसह फ्रान्सच्या सैनिकांनीही सहभाग घेतला. तब्बल ६७ वर्षांनी ही ऐतिहासिक घटना घडली. या कार्यक्रमासाठी फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रांसवा ओलांदा हे प्रमुख पाहुणे होते.
जगातील विविध देशांच्या प्रमुखांनी आजवर या कार्यक्रमास हजेरी लावलेली आहे. प्रमुख पाहुणे होण्याचा मान इंग्लंड आणि फ्रान्सला पाच वेळा, भूतानला चार वेळा तर रशियाला चार वेळा मिळाला आहे. शेजारील देश, आफ्रिकेतील देश, तसेच युरोपातील देशांच्या राष्ट्रप्रमुखांना ही संधी देण्यात आलेली आहे. २९ जानेवारी रोजी मावळणाऱ्या सूर्याच्या साक्षीने होणाऱ्या कार्यक्रमाने ‘प्रजासत्ताक दिन सोहळा’ अधिकृतरीत्या संपतो. याला बीटिंग द रिट्रिट असे म्हणतात. नॉर्थ आणि साउथ ब्लॉक जवळ होणाऱ्या या कार्यक्रमात विविध बँड्सचा समावेश असतो. या तीन दिवसांमध्ये राष्ट्रपती भवन आणि परिसरास दिव्यांची रोषणाई केली जाते.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
January 26, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti