(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • व्हेगन डाएट’च्या अनुयायींसाठी….

    अति सर्वत्र वर्ज्ययेत्।' अशी एक म्हण आहे. एखादी गोष्ट कितीही चांगली असली तरी तिचा अतिरेक वाईटच. याचे उत्तम उदाहरण म्हणजे व्हेगन डायट. १९४४ साली इंग्लंडमध्ये व्हेगन ही संकल्पना जन्माला आली. याचे प्रणेते डोनाल्ड वॉटसन यांच्यावर गांधींच्या अहिंसावादी तत्वज्ञानाचा प्रभाव होता. १९२० साली गांधींनी नैतिकतेच्या बळावर शाकाहाराचा पुरस्कार करायला हवा असे भाषण इंग्लंड येथील 'व्हेजिटेरियन सोसायटी'समोर दिल्यावर वॉटसन फारच प्रभावित झाले आणि शाकाहाराचा हा अतिरेक जन्माला आला. व्हेगन डायट म्हणजे प्राणिज अन्नपदार्थांचा संपूर्ण त्याग. ही आहारशैली पाळणारे लोक दूध, तूप, मध हे पदार्थदेखील खाण्यास वर्ज्य मानतात. हे पदार्थ मिळवताना हिंसा होते असा त्यांचा सिद्धांत.

    यामुळे स्वाभाविकपणे वरील पदार्थांचे पर्याय शोधणे क्रमप्राप्त होते. मग दुधाला पर्याय म्हणून सोया, हेम्प, कोकोनट आणि अल्मन्ड मिल्क सुरु झाले तर लोण्याचा पर्याय (तूप ही संकल्पनाच माहिती नसल्याने) म्हणून व्हेगन मेयोनीज आले. चीझ वा पनीरच्या जागी टोफू आणि पोषक आहार म्हणून फळांचे रस पिणे सुरु झाले. आज या आहाराचा इतका बोलबाला आहे की जगातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर त्याची भलामण करताना दिसतात. जागोजागी व्हेगन सोसायटी जन्माला आल्या आहेत. हे लोक केवळ आपल्या आहारापुरते एकत्र आलेले नसून दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्या शाकाहारी लोकांवर यथेच्छ घणाघात करत असतात. मांसाहाराबद्दल तर बघायलाच नको!!

    नाण्याची दुसरी बाजू.

    दूध आणि तूप हे शरीराला पोषण देणारे सर्वोत्तम पदार्थ आहेत असं आयुर्वेद सांगतो. 'घृतं वै आयु:।' अशी श्रुती आहे. आमच्याकडे पूजेचा प्रसाद पंचामृत तीर्थाशिवाय पूर्ण होत नाही याचे हेच कारण आहे. इथे भगवंतांची पूजादेखील 'गोपाल' या नावाने केली जाते. गोशाळांच्या माध्यमातून दूग्ध संकलन केले जात असताना वासरांवर कोणताही अन्याय अत्याचार होत नसून उलट त्यांचा पोटच्या पोराप्रमाणे सांभाळ केला जातो हे तथ्य आहे. मधवरील आक्षेप अंशतः मान्य. म्हणूनच तो केवळ आपद्धर्म म्हणून 'औषधापुरता' वापरावा हा पर्याय असू शकतो.

    आहारातून दूध तुपासारख्या शुक्रधातू आणि ओज वाढवणाऱ्या पदार्थाना दूर सारून जे व्हेगन पर्याय वापरले जातात ते प्रामुख्याने कडधान्यांपासून बनलेले असतात. कडधान्ये ही फोडणीशिवाय सतत वापरल्यास शुक्रधातू आणि ओज या दोहोंना घटवतात. यांच्यावरच आपले आरोग्य आणि आयुर्मान अवलंबून आहे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. याशिवाय व्हेगन आहारातून ज्या पोषणमूल्यांची पूर्तता होत नाही त्यांची पूर्तता करण्यासाठी 'सप्लिमेंट्स'चा सोप्पा मार्ग निवडून आत्मघात केला जातो. (या आधीचा लेख जरूर वाचा.) पाश्चात्यांचे अनुकरण करण्याच्या नादात व्हेगन डायटला आपल्या देशात सध्या प्रसिद्धी मिळू लागली आहे. याबाबत वेळेच सावध होणे गरजेचे आहे. जिथे परमेश्वरालादेखील लाडाने 'माखनचोर' असे म्हटले जाते; त्याच्या हातावर आवर्जून लोण्याचा मऊसर गोळा देण्याची प्रथा आहे. जिथे घराघरांना गोकुळाची उपमा दिली जाते आणि आपल्या तान्ह्या बालकांनाही कौतुकाने दुधातुपाने आणि लोण्याने पोसले जाते. अशा या हिंदुस्थानात व्हेगन डायटसारख्या प्रकारामागे धावणे म्हणजे कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळणे आहे. प्राणीप्रेम जरूर असावे; भूतदया महत्वाचीच. पण त्याचा हा मार्ग नव्हे हे निश्चित!!

    © वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
    आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
    ।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
    संपर्क: ०२५१-२८६३८३५

  • दात पिवळे होणे किंवा त्यांवर डाग पडणे (रंग ख़राब होणे)

    दात स्वच्छ न घासणे.

    खाण्याच्या सवयी.

    धुम्रपान.

    पान मसाला चघळणे.

    हिरड्यांचे संक्रमण (इन्फेक्शन).

    दात किंवा जबड्याचे हाड मोडणे.

    जीवनसत्त्व क आणि ड ची कमतरता.

    कॅल्शियमचे प्रमाण कमी होणे.

    पाण्यात फ्ल्युओरीनचे प्रमाण जास्त असणे.

    किडलेले दात.

    काळजी.

    दिवसातून दोनदा दात स्वच्छ करा - सकाळी (उठल्यावर) आणि रात्री (झोपण्यापुर्वी).

    खाऊन झाल्यावर स्वच्छ पाण्याने गुळण्या करा.

    योग्य दंतमंजन वापरा.

    पौष्टिक अन्नाचे सेवन करा.

    धुम्रपान टाळा, तंबाखू खाणे टाळा.

  • दातदुखीवर नैसर्गिक उपाय

    लवंगेचे तेल उर्फ क्लोव ऑइल हा दातदुखीवरचा सर्वात प्रभावी नैसर्गिक उपाय मानला जातो. लवंगेचे थोडे तेल काळ्या मिर्या्सोबत मिसळा व ते कापसाच्या बोळ्यावर घेऊन दुखणार्या दातावर ठेवा.

    मोहरीच्या तेलाने देखील दातदुखी कमी होते. हे तेल व मिठाचे मिश्रण हिरडीच्या दुखर्या भागावर चोळा.

    लिंबाच्या रसाच्या थेंबांनी देखील दातदुखी कमी करता येते.

    दुखर्या दातावर किंवा हिरडीवर कांद्याचा ताजा कापलेला तुकडा ठेवल्याने ही दातदुखी कमी करता येते.

    दातदुखीवर उपयोगी झाडपाल्याचे अर्क वापरून आपणही घरच्याघरी माउथवॉश बनवू शकता – कॅलेंड्युला (कॅलेंड्युला ऑफिसिनालिस), मर्र (कॉमिफोरा मर्रा), सेज (साल्विया ऑफिसिनालिस). बेसिल, मार्जोराम किंवा ऍसाफेटिडासारख्या इतर वनस्पतींचाही वापर ह्यासाठी करता येईल.

    दुखर्यान दाताला बाहेरील बाजूने (गालावर) बर्फाचा खडा दाबून धरल्यानेही दातदुखीपासून थोडा आराम मिळू शकतो.

    अचानक दातदुखी सुरू झाल्यास अति गरम, अति गार तसेच अति गोड पदार्थ खाणे कटाक्षाने टाळा अन्यथा दुखणे वाढेल.

    आहाराच्या सवयी बदलणे, भाज्या तसेच फळे भरपूर प्रमाणात खाणे आणि विशेषतः जंक फूड न खाणे ह्याने दातदुखी टाळता येते.

  • गाढवं; बांधुनही न बांधलेली

    शहाणा कुंभार गाढवांना जोडीजोडीने बांधतो… म्हणजे त्यांना खुंटीला बांधत नाही, एकमेकांशी बांधतो. गाढवं जागची हलत नाहीत. हलूच शकत नाहीत. कारण दोन्ही गाढवांनी पळून जायचं ठरवलं, तरी एक गाढव डावीकडे खेचतं, एक उजवीकडे. दोघेही जागच्या जागीच राहतात….याच्यावरूनच लग्नाची कल्पना सुचली असावी..

  • दाह शमन करणारा दैवी वृक्ष

    औदुंबर अर्थात उंबर ....

    नेहमी हिरवागार राहून थंडगार छाया देणारा औदुंबर वृक्ष अनेक दैवी गुणांनी युक्त आहे ...

    भारतात सर्वत्र हा महावृक्ष आढळतो, औदुंबर झाडाच्या आसपास जमिनीत पाणी आढळते ....
    किंबहुना जिथे पाणी मुबलक असते अशा जमिनीत हा वृक्ष वाढतो ...

    या वृक्षाचे काही अदभूत उपयोग पाहूया ...

    १. उंबराच्या सालीचा काढा करून तो थंड करावा . त्यात खडीसाखर-वेलची टाकून गुलाबी रंगाचे सरबत करावे . कॅन्सर झाल्यावर जी केमोथेरपी देतात त्यात शरीराची भयानक आग होते . त्यात हे सरबत उत्तम आहे . दिवसातून तीनदा घ्यावे ....

    २. अतिसार होऊन त्यातून रक्त पडत आसेल तर सालीचा काढा द्यावा .

    ३. जखम झाल्यावर ती धुण्यासाठी डेटोल- सेव्लोन च्या ऐवजी सालीच्या काढ्याने धुतली तर जखम वेगाने भरून येते ..

    ४. तोंड आले असता सालीचा काढा थोडा घट्ट करून तो तोंडाला आतून लावला तर वेगाने त्रास कमी होतो ...

    ५. गर्भाशयाची सूज कमी करण्यासाठी , रक्तप्रदर , श्वेतप्रदर, मासिक पाळीच्या अति प्रमाणात रक्तस्त्राव होईत असेल तर सालीचा काढा पोटात घ्यायला देतात सोबत योनिमार्गाद्वारे त्याच काढ्याचा उत्तरबस्ती दिला तर उत्तम गुण येतो ...

    ६. गर्भाचे पोषण व्हावे म्हणून काढा देतात .... सातत्याने गर्भपात होत असेल तर गर्भ धारणेनंतर सालीचे सरबत करून प्यावे ...

    ७. लहान मुलांना दात येताना जुलाब होतात त्यावेळी उंबराचा चिक बत्ताशासोबत देतात ...

    ७. भस्मक नावाचा एक व्याधी आहे ज्यात व्यक्ती सारखे काही न काही खात असते . पण त्या व्यक्तीचे पोट भरत नाही काही वेळाने परत भूक लागते . या आजारात उंबराची साल स्त्रीच्या दुधात वाटून दिली असता ही विचित्र लक्षणे कमी होतात ...

    ८. उचकी थांबत नसेल तर उंबराच्या फळाचा रस प्यावा ...

    ९.काविळीत उंबराचे पिकलेले अर्धे पान विड्यातून देतात ...

    १०. तापात अंगाची आग होत असेल तर पिकलेले उंबराचे फळ खायला द्यावे ...

    ११. सरते शेवटी एक गोष्ट सांगतो हिरण्यकश्यपूचे पोट फाडल्यावर भगवान नरसिंहाच्या बोटांचा दाह होऊ लागला .. तो कशानेच थांबेना . मग त्यांनी त्यांची बोटे उंबराच्या फळात रोवली आणि त्यांचा दाह क्षणात कमी झाला ...

  • जाणून घ्या, कोणत्या दिशेला डोके ठेवून का झोपू नये

    आपल्या दिनचर्येतील सर्वात महत्त्वपूर्ण अंग शयन आहे. शयन म्हणजे झोप. मनुष्य, पशु-पक्षी, झाडे-झुडपं सर्वजण शयन करतात. झोप कशाप्रकारे आल्या स्वास्थ्य आणि चेतनेसाठी लाभदायक ठरू शकते, यासाठी शास्त्रामध्ये विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. झोपताना पाय दक्षिणेकडे असू नयेत आणि उत्तर दिशेकडे डोके ठेवून झोपू नये. अशा स्थितीमध्ये झोपल्यास मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. येथे जाणून घ्या, शास्त्रामध्ये झोपण्याशी संबंधित सांगण्यात आलेल्या काही खास गोष्टी...

    दिवसभर काम करून आपण थकून जातो. आपल्या शरीरातील उर्जा कमी होते. अशावेळी शरीराला आरामाची आवश्यकता असते. शरीराला आराम देण्यासाठी आपण झोपतो. जेव्हा आपण झोपेतून उठतो तेव्हा स्वतःमध्ये ताजेपणा, स्फूर्तीचा अनुभव करतो. झोपल्यानंतर आपल्यामध्ये पुन्हा उर्जा एकत्र होते, ज्यामुळे आपल्याला काम करण्याची ताकद मिळते. झोपेचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी थेट संबंध आहे. याच कारणामुळे आपल्या ऋषीमुनींनी या संदर्भात काही नियम तयार करून ठेवले आहेत. या नियमांचे पालन केल्यास झोपेचा अधिकाधिक लाभ प्राप्त होऊ शकतो. संध्याकाळी झोपू नये, झोपताना पाय दक्षिणेकडे करू नयेत असे निर्देश शास्त्रामध्ये देण्यात आले आहेत.

    पुढे जाणून घ्या, झोपेशी संबंधित इतर काही खास गोष्टी

    - रात्री जेवण केल्यानंतर लगेच झोपू नये. झोपण्यापूर्वी सद्ग्रंथांचे अध्ययन आणि देवाचे स्मरण करावे. झोपण्यापूर्वी उद्या करावयाची कामाची आखणी केल्यास उत्तम राहते. पूर्व आणि दक्षिण दिशेला डोके करून डाव्या अंगावर झोपावे. बेडरूममध्ये प्रसन्न चित्र लावणे उत्तम ठरते.

    - झोपण्यापूर्वी भजन किंवा आवडते संगीत ऐकावे. यामुळे मन तणावरहित होते. मन शांत असेल तर झोप शांत लागते. सूर्योदयापूर्वी झोपेतून उठावे. सूर्योदयानंतर झोपेतून उठल्यास शरीरात आळस राहतो.

    पूर्व किंवा दक्षिण दिशेला डोके करून झोपणे विज्ञान सम्मत प्रक्रिया आहे. यामुळे आजार दूर राहतात. सौर जग ध्रुवावर आधारित आहे. ध्रुवाच्या आकर्षणाने दक्षिणेकडून उत्तरेकडे प्रगतीशील विद्युत प्रवाह आपल्या डोक्यात प्रवेश करतो आणि पायाच्या माध्यमातून बाहेर पडतो.

    - अशा स्थितीमुळे जेवण सहजपणे पचते. सकाळी आपण झोपेतून उठल्यानंतर मेंदू शांत आणि शरीर उर्जावान असते. यामुळे झोपताना पाय दक्षिणेकडे करू नयेत.

    डाव्या अंगावर झोपणे -
    डाव्या अंगावर झोपण्यामागे वैज्ञानिक कारणही आहे. ही प्रक्रिया स्वर विज्ञानावर आधारित आहे. आपल्या नाकातून आत आणि बाहेर जाणार श्वास स्वर असतो. डाव्या नाकपुडीतून श्वास घेण्याच्या आणि सोडण्याच्या क्रियेला चंद्र स्वर म्हणतात. अशाप्रकारे उजव्या बाजूचा सूर्य स्वर असतो. सूर्य स्वर आपल्या शरीरात उर्जा निर्माण करतो, यामुळे अन्न पचण्यास मदत होते. यामुळे शास्त्रामध्ये डाव्या अंगावर झोपण्यास सांगितले आहे.

  • साखर – इंग्रजांनी दिलेलं विष

    साखर तयार करण्याचा सर्वांत पहिला कारखाना भारतात इंग्रजांनी सन १८६८ मध्ये सुरु केला. त्याआधी भारतीय लोकं शुद्ध देशी गुळाचेच सेवन करत होते आणि कधीही आजारी पडत नव्हते.

    साखर हे एक प्रकारचे विष आहे जे अनेक रोगांना निमित्त ठरते . हे कसे काय घडते याबद्दल आपण जरा माहिती घेऊ या...

    (१) -- साखर बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये गंधकाचा सर्वाधिक वापर केला जातो. गंधक म्हणजे काय तर फटाक्यांमधील मसाला!

    (२) -- गंधक हा अत्यंत जड धातू असून एकदा का गंधक शरीरात गेले की ते शरीराबाहेर पडतच नाही.

    (३) -- साखर ही कॉलेस्ट्रॉल वाढवते. कॉलेस्ट्रॉल वाढल्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो.

    (४) -- साखरेमुळे शरीराचे वजन अनियंत्रित वाढते व त्यामुळे अंगी स्थूलपणा येतो.

    (५) -- साखर ही रक्तदाब वाढवते.

    (६) -- साखर ही मेंदूला झटका येण्याचे एक मुख्य कारण आहे.

    (७) -- साखरेतील गोडपणाला आधुनिक चिकित्सा पद्धतीत सुक्रोज म्हटले जाते. माणसे व जनावरे हे दोघेही सुक्रोज पचवू शकत नाहीत.

    (८)-- साखर तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये तेवीस हानीकारक रसायने वापरली जातात.

    (९)-- साखर ही मधुमेह होण्याचे एक मुख्य कारण आहे.

    (१०) -- साखर हे पोटातील जळजळीचे एक मुख्य कारण आहे.

    (११) -- साखर ही शरीरातील ट्राइ ग्लिसराइड वाढवते.

    (१२) -- साखर हे पेरेलिसिसचा झटका अथवा लकवा होण्याचे एक मुख्य कारण आहे.

    (१३) कृपया आपणास जितके शक्य होईल तितके साखर सोडून गुळाचा वापर करणे सुरू करा.

    वरील हितकारक माहिती आपल्या ओळखीची लोकं, आपले मित्र, नातेवाईक आणि इतर गटांना अवश्य पाठवा.

  • वृद्धत्त्वामुळे नेहमी येणा-या अडचणी

    वृद्धत्त्वामुळे नेहमी येणा-या अडचणी अनेक असतात. मुत्राशयाच्या समस्या, दृष्टीमध्ये येणा-या अडचणी, अलझायमर, डिमेंशिया, ह्रदयविकार अशी अनेक उदाहरणे आहेत. सुरवातीला आपण मुत्राशयातील समस्यांबद्दल माहिती घेणार आहोत.

    वयोमानामुळे घडत जाणारे बदल
    मुत्राशयावर संयम न रहाणे ही फक्त वृद्ध स्त्रीयांमधील व्याधी नसून पुरुषांमधेही दिसून येते. खरे तर ही अडचण कोणत्याही वयात येऊ शकते. परंतु वृद्धत्त्वामधे सर्वात जास्त दिसते. मूळव्याध, बद्धकोष्ठ, काही ठराविक औषधे घ्यावी लागणे, मुत्राशयावर एखादा रोग-संचार (इन्फेक्शन) होणे अशी कारणे सुद्धा मुत्राशयावर संयम न रहाण्यासाठी पुरतात. मुत्रपिंडाचा एखादा स्नायू दुबळा झाला, मुतखडा (किडनी स्टोन) झाला, पार्किन्सन्स किंवा अर्थ्रायटीस सारखा मुत्रपिंडावरचा संयम जाऊ शकणारा आजार झाला तर काही वेळा त्यामुळे आलेली मुत्रपिंडावरची अस्वस्थता ही जास्त कालावधीसाठी टिकून रहाते. वृद्धत्वामधे लघवी करत असताना मुत्राशयातले स्नायू कधी कधी आकुंचित पावतात. त्यमुळे योनीमार्गात जळजळ होऊ शकते. आणि त्याच वेळी मुत्राशयाच्या आजुबाजूचे अवयव शिथील होतात आणि संयम नसताना लघवी होऊ शकते

  • वार्धक्यातील आहार

    सर्व सहा रसांनीयुक्त ( मधुर, आंबट, खारट, तुरट, तिखट, कडू) असा आहार असावा, परंतू त्यासाठी जठराग्नि चांगला प्रदिप्त असावा. म्हणजे पचन सुलभ होते. यातही म्हातारपणी अडथळे येतात. उदा. दातांचा अभाव, आर्थिक अडचणीमुळे आहार हा सर्व गुणसंपन्न मिळू शकत नाही.

    तसेच स्त्रियांना काटकसरी धोरणामुळे शिळे अन्न खाण्याची सवय असते.

    म्हातारपणी काय करायचे जिभेचे चोचले, वगैरे विचारधारणेमुळे शरीराकडून आपोआप व्यक्त होणाऱ्या इच्छा दडपल्या जातात.

    तसेच म्हातारपणी एकभूक्त म्हणजे एकदाच जेवून राहावे इ. दृढसमज असतात, त्यासाठी आयुर्वेद सांगतो निसर्गाला शरण जा.

    जेव्हा भूक लागेल तेव्हाच खा, भूक नसेल तर पाणीसुध्दा पिवू नका.

  • जगण्याचे साधे सोप्पे नियम – भाग एक

    आता जगण्यासाठी सुद्धा नियम करावे लागतील का ?
    हो.
    कसे जगावे, यासाठी जे नियम चुकीच्या पद्धतीने प्रस्थापित होत आहेत, झालेलेच आहेत, त्यातील दोष काढून त्यांना पुनर्स्थापित करावे लागणार आहे. शास्त्र न सोडता, आणि परंपराचा आदर राखून हे नियम बनवता आले तर जगणे सोपे होईल.
    "मला असे वाटते" या सदराखालीच हे नियम बनवावे लागणार आहेत. कारण या नियमांना कोणताही ठोस आधार नाही.
    हे नियम स्पष्टपणे कुठेही वर्णन केलेले नाहीत, पण नियम असल्याशिवाय इथे पानही हलत नाही, कुठे आहे रेफरन्स दाखवा पाहू, असे विचारले तर उत्तर देणे, पुरावा दाखवणे कठीण होईल, हे आधीच नमूद करतो.
    नियम असतात ते अंदाज बांधण्यासाठी असतात. तेच खरं असंही काही नसतं. आरोग्याचे नियम म्हणजे कायदा नव्हे, आणि कायद्याने सर्व मिळतेच असे तरी कुठे आहे ना ?

    एवढ्या उंचीला एवढे वजन असावे, असलेच पाहिजे असे नाही, रक्तदाब एकशेवीस बाय ऐशी असावा. तो तेवढाच असावा असे नाही. नियम केला की, एकशेवीस चे एकशे एकवीस झाले की रक्तदाब वाढला की नाही ? से येस ऑर नो. उत्तर द्यावे लागेल. हो. पण तारतम्याने आपण ठरवतो, एकने वाढ म्हणजे लगेच एक गोळी वाढवावी, असे नसते ना ! शेवटी तारतम्य आणि होणारा त्रास, दिसणारी लक्षणे, आणि नियम यांची योग्य सांगड घालता येणे महत्त्वाचे!

    पण नियम म्हणून काही हवेत की नकोत ? म्हणून काही नियमांची क्रमशः चर्चा करू.

    नियम एक.
    पहिलाच नियम असा करू की, कोणताही नियम पाळू नये.

    प्रत्येकाचे शरीर वेगळे, प्रत्येकाचे हातापायांच्या बोटांचे ठसे वेगळे, केसांची संरचना वेगळी, प्रत्येकाच्या डोळ्याची ठेवण वेगळी, प्रत्येकाचा आत्मा वेगळा, प्रत्येकाचे मन वेगळे, प्रत्येकाच्या इंद्रियांची क्षमता वेगळी, प्रत्येकाची प्रकृती वेगळी, प्रत्येकाची भूक वेगळी, प्रत्येकाची आवडनिवड वेगळी, प्रत्येकाचा कोठा वेगळा, प्रत्येकाचे प्रारब्ध वेगळे, प्रत्येकाचे कामाचे स्वरूप वेगळे, प्रत्येकाची धारण करण्याची क्षमता वेगळी, प्रत्येकाची शक्ती वेगळी, प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी........

    एवढी विविधता इथे नांदत असताना, प्रत्येकाला होणारा आजाराचे स्वरूप वेगळे, त्याला होणारे त्रास वेगळे, प्रत्यःकाला बरे वाटण्याची कारणे वेगळी, त्याचे पथ्यापथ्य वेगळे, त्याची औषधे वेगळी......... हे फक्त आयुर्वेद सांगतो.

    एवढी विविधता आपल्या अवतीभवती दिसत असताना, प्रत्येकाने पाळायचे नियम एकच कसे असतील ? यासाठी पहिलाच नियम, आपल्या आरोग्याच्या बाबतीत कोणताच नियम नक्की होऊ शकत नाही. अगदी एकाच प्रकृतीची, एकाच वेळी जन्माला आलेली, दोन जुळी माणसे किती भिन्न स्वभावाची असतात ? त्या दोघांमधे बाहेरून आतून थोडेफार साधर्म्य दिसेल पण तेवढ्यापुरतेच असते. कुंडलीशास्त्रानुसार देखील त्यांच्या अंशांश कुंडल्या बदलतात. असंच प्रत्येकाचे असते. त्यामुळे इथे प्रत्येकाचे नियम वेगळे.

    हे नियम, थोडे तारतम्य वापरून, थोडा अनुभव वापरून, थोडा विवेक वापरून, थोडा ग्रंथांचा अभ्यास करून, थोडे व्यवहारज्ञान वापरून, थोडे थोरामोठ्यांनी सांगितलेले ऐकून, बदलायचे असतात.

    जसे, दूध दही हा प्रमेहाचा हेतू म्हणजे मधुमेह होण्याच्या अनेक कारणातील एक कारण सांगितले आहे. याचा अर्थ लगेचच दूध दही कायमचे बंद करण्याची आवश्यकता नाही. आपल्या प्रकृतीला, आजच्या भाषेत काय "सुट" होते ते पहावे. अतिरेक नक्की टाळावा. चहामधे दूध चालेल, पण दुधाचाच चहा नसावा. गरज असेल तरच दूध घ्यावे. औषध म्हणून नको. अनुपान म्हणून दुध प्यावे, पण नियम म्हणून बोर्नव्हीटा खपवण्यासाठी दूध नको. म्हणजे बोर्नव्हीटा खाल्ला नाहीतर ताकद कशी येणार म्हणून दूध पाजवायचे, किंवा दुधामधे पूर्ण शक्ती असते, म्हणून दूध प्यायलाच हवे, पण दुधाचा वास चव आवडत नाही म्हणून त्यात काहीतरी टाॅनिकच्या नावाने विरघळून टाळूत ओतायचे, हा नियम नको.

    इथे तारतम्य हवे, माझ्या मुलाला खरोखरच या सर्वाची गरज आहे का, हे एखाद्या जाणकार वैद्याला विचारून घ्यावे आणि नंतरच निर्णय घ्यावा. उगाचच कोणीतरी हिरो, खेळाडू, आपले खोटेनाटे सिक्रेट ओपन करत असतील तर भुलून जाऊ नये, इतकेच.

    सांगायचा मुद्दा असा की, स्वतः ठरवून काहीही करू नये. सहजपणाने एखादी गोष्ट घडून जावी, नको त्या ठिकाणी असलेली बुद्धी संपवून टाकली तर हवी तिथे ती वापरता येत नाही.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    10.04.2017