वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
लुगडं’ म्हटलं की अनेकांच्या मनात अनेक प्रकारच्या भावना जागृत होत असतील. कुणाला आजीच्या, आईच्या जुन्या लुगड्यापासून बनवलेल्या उबदार गोधडीची आठवण येईल, तर कुणाला आठवणीतल्या कुणाच्या तरी शालुरूपी लुगड्यावरील ‘पदरावरचा जरतारीचा मोर..’ उगाचंच अस्वस्थ करेल. मला मात्र लुगडं हा शब्द ऐकला की, नऊवारी साडीच डोळ्यासमोर येते.
November 1, 2018
कांजिण्या: प्रत्यक्ष लागण झाल्यापासून दहा ते सतरा दिवसांत होणारा हा विषाणूजन्य आजार आपल्या ओळखीचा आहे. लहान मुलांमध्ये प्रामुख्याने दिसणारा हा आजार मोठेपणीही होऊ शकतो; पण एकदा होऊन गेला असेल तर सहसा पुन्हा होत नाही. हवेतून, प्रत्यक्ष स्पर्शाद्वारे किंवा हाताळलेल्या वस्तूंद्वारे विषाणू पसरतात. एखादा दिवस ताप, भूक मंदावणे, सर्दी अशी |लक्षणे दिसल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून पाण्यासारखे फोड छाती-पोटावर आणि इतरही अंगावर उठू लागतात
April 25, 2023
वंदीतो मी ध्रुवबाळ, भक्ति सामर्थ्याचे बळ,
मिळवी पद अढळ विश्वामध्यें ।।१।।
असोनी लहान बालक, वाकविले विश्वचालक,
हेच तपाचे प्रतीक, प्रभूचे राज्यीं ।।२।।
प्रभू प्राप्तीचे फळ, ह्यासी न लागे काळवेळ,
श्रद्धा आणि तपोबल, अंतर्मनी पाहिजे ।।३।।
ब्रह्माचा खेळ न्यारा, बहूत त्याच्या रंगधारा,
समज न येई हा पसारा, प्रभूच्या लिलेचा ।।४।।
खेळाच्या ठेवल्या मर्यादा, बसणे पळणे चालूं सदा,
खेळाचे चक्र फिरे सर्वदा, अवितरपणे ।।५।।
प्रत्येकाचे आयुष्यमान, कमी जास्त असून,
जीवन मर्यादा पडून, काल क्रमणा होई ।।६।।
कुणी राही क्षणभर, कुणाचे आयुष्य शंभर,
कांहीं जगती वर्षे सहस्त्र, हीच निसर्गाची विविधता ।।७।।
लाखो वर्षे राही तारे, इंद्रादी देवही जाती सारे,
सर्वांच्या मर्यादा ठरे, प्रभू शक्तिमुळे ।।८।।
उदाहरण अपवादात्मक, अढळ पदाचे प्रतिक
ध्रुव तारा एक, होई या ब्रह्मांडी ।।९।।
ध्रुव कथा मनोहर, भक्ति तपसिद्धी आधार,
इंद्र शक्तिची माघार, होई ध्रुवभक्तिपुढे ।।१०।।
उत्तानपाद राजा आसूर, दोन राण्यांचा संसार,
राज्य करी प्रजेवर, प्रेमळपणे ।।११।।
सुरुचि राणी आवडती, उत्तम तिचा मुलगा होता,
सुनीती ठरे नावडती, ध्रुव बाळाची आई ।।१२।।
ध्रुव एके दिनी दरबारी, चढूनी सिंहासनावरी,
राज्याच्या मांडीवरी, आनंदाने बसला ।।१३।।
हे न पटले सुरुचीला, खेचले खालती ध्रुवाला,
आहे तो मान उत्तमाला, असूनी तिचा मुलगा मोठा ।।१४।।
ध्रुव जाई रडत, आईसी दु:ख सांगत,
कुणी न मजसी खेळत, राग करी सारे ।।१५।।
नावडता म्हणून, न देई कुणी स्थान
हकलून देती सारेजण, प्रत्येक स्थानाहुनी ।।१६।।
माता सुनिती, हतबल होती,
न देखे दु:ख ती, ध्रुवाच्या ।।१७।।
आई करी ध्रुवाचे सांत्वन, प्रभूची महीमा महान,
त्यास प्राप्त करून, जीवन होई सुखी ।।१८।।
न सांगता कुणाला, ध्रुव जाई वनाला
शोधी परमेश्वराला, सर्व ठीकाणी ।। १९।।
भयाण जंगलात, प्रभू नामे टाहो फोडीत,
भाव भक्तिचे मनात, ठेवून बोलावती प्रभूला ।।२०।।
नारद भेटले ध्रुवासी, बघूनी भाव भक्तीसी
आशीर्वाद देई त्यासी, यश मिळण्याबाळा ।।२१।।
उपदेश नारद करी, श्रद्धा ठेवावी प्रभूवरी,
तोच सर्वांचा तारण हरी, त्यास करावे पावन ।।२२।।
प्रसन्न करावे प्रभूला, अर्पूनी भक्ती त्याला
त्याच्या इच्छे जाई फळाला, जीवनातील सर्व गोष्टी ।।२३।।
ॐ नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जपत राहाय
तोच तुझा आधार होय,प्रभू मिळे पर्यंत ।।२४।।
प्रभू मिळणे नाही सोपे, प्रयत्न करावे बहूत तपे
श्रद्धेने त्याचे नाम जपे तेव्हाची पान होई ।।२५।।
ऐकूनी नारदाचा उपदेश, मनी बिंबला ईश,
पावन करण्याची आस, ध्रुवास लागली ।।२६।।
नारदाचा आशिर्वाद घेवूनी, ध्रुव जाई वनी,
आसन झाडाखाली मांडूनी, तप करण्या बसला ।। २७।।
बालक ते लहान, मनी विश्वास महान
विसरोनी भूक तहान, मंत्राचा जप करी ।।२८।।
असे जेथे श्रद्धा प्रभू सदा,
मिळेल त्याच्या आशिर्वादा जीवनातील समाधान ।।२९।।
मंत्रोपचारास लागली वाणी, तरंगे त्याची बनूनी
चक्रगती त्यास मिळूनी, फिरू लागली देहा भवती ।।३०।।
मंत्र ऊर्जा मिळून, चेतना जागृत ठेवून
देह जिवंत राहून तप करी बहूत काळ ।।३१।।
मंत्र चक्र गती, ऊर्जा निर्माण करती
त्याचे तेजोलय बनती, देहा प्रकाशी ।।३२।।
मंत्र लहरी तेजोवलय, दिव्यती वाढत जाय
जैसे तप महान होय, बाळ ध्रुवाचे ।।३३।।
तपसिद्धीची शक्ती, प्रभूसी जागृत करती
चित्त त्याचे ओढती ध्रुव बाळाकडे ।।३४।।
इंद्र सर्व देवा संगे, ध्रुवचे तपसामर्थ्य बघे
निरनिराळ्या शक्ति सोडून अंगे, ध्रुव बाळाच्या ।।३५।।
अग्रीच्या ज्वाळा, वायूच्या वादळा
वरूणाचा पावसाळा, निष्प्रभ ठरली ध्रुवापुढे ।।३६।।
इंद्र शक्तीचा मारा, न तोडी तेजोलय चक्रा
रक्षण कवचाची धुरा मजबूत असे ध्रुवा भोवती ।।३७।।
संपता इंद्र शक्ती प्रदर्शन, प्रभू देई दर्शन
बाळ ध्रुवासी उठवूनी जवळ घेई त्याला ।।३८।।
प्रभू विचारी ध्रुवाला ,का शीनविसी बाल देहाला
सांग तपाचे कारण मला, देईन तुज मी ते ।।३९।।
निश्चीत नाही मज स्थान, सारेजण करी अपमान
उठविती सर्व पदाहून, ध्रुव सांगे प्रभूला ।। ४०।।
दूर घ्यावा निवारा, गगनातील एक तारा
मिळोनी प्रभूचा सहारा, कुणी न हलवावे मला ।। ४१।।
'वर'दिला प्रभूनी, अस्थिरता जाई निघूनी
पद ध्रुवाचे अढळ होवूनी कुणी न घेई त्यासी ।। ४२।।
कुणी न राही एके जागी, फिरत असे सदा मार्गी
स्थिरता फक्त ध्रुवतारा अंगी या विश्वमंडळामध्ये ।। ४३ ।।
।। शुभं भवतू ।।
डॉ. भगवान नागापूरकर
१५- २७११८३
January 15, 2018
०५ ऑगस्ट म्हणजे हिंदूस्थानचा स्वातंत्र्य दिवस यावर्षी ५८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करीत आहोत. पण ५८वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना आपण ज्या देशाचा स्वातंत्र्यदिन साजरा करीत आहोत त्या देशाचा नकाशा नीट, व्यवस्थित पाहिला आहे का? जो नकाशा आपले राज्यकर्ते आपणांस दाखवितात तसा तो १९४७ साली होता का? जो नकाशा आपले राज्यकर्ते पुन्हा पुन्हा आपल्याला दाखवितात आणि आपणही त्याला हाच माझा देशाचा नकाशा आहे. असे म्हणू लागलो. पण प्रत्यक्षात तो तसा होता का? नाही.
August 15, 2005
स्थापनेपासूनच जनसंघाचे कार्य महाराष्ट्रात सुरु झाले. अर्थात विविध राजकीय विचारधारा, विशेषतः काँग्रेसची विचारधारा, महाराष्ट्रात प्रचलित असल्याने हे काम तेवढेसे सोपे नव्हते. येथील वाटचालीत जनसंघासमोरील आव्हाने जेवढी मोठी होती, तेवढीच मोठी आव्हाने दुसऱ्या स्वातंत्र्यानंतर १९८० मध्ये स्थापन झालेल्या भारतीय जनता पार्टी (भाजपा) समोरही होती. पुर्वी जनसंघ असतांना जनसंघाचा दिवा घरोघरी लावा. असे कार्यकर्ते म्हणायचे. कारण पूर्वीच्या जनसंघाची निशाणी दिवा (पणती) होती. त्यावेळी विरोधक (कॉँग्रेस) जनसंघ व दिव्याची खिल्ली उडवायचे. त्यावेळी विजय दूरच परंतु उमेदवार मिळणे कठीण जायचे. आता निवडणूक जिंकल्यानंतर कार्यकर्त्याना जसा आनंद होतो तसाच आनंद तेव्हा जनसंघाला उमेदवार मिळाल्यानंतर व्हायचा. महाराष्ट्रात त्यावेळी स्व. उत्तमराव पाटील, स्व. रामभाउ म्हाळगी , स्व. रामभाउ गोडबोले, स्व. मोतीराम लाहने यांनी खूप कष्ट करून जनसंघ वाढवला. कॉँग्रेसला योग्य पर्याय म्हणूनही भाजपाचे नाव त्या वेळी होऊ लागले. याचबरोबर भाजपा एका-एका राज्यात सत्तेत येऊ लागला व अन्य पक्षांचे लोक भाजपात येऊ लागले.
April 6, 2022
भाद्रपद शुद्ध चतुर्थी रोजी गणेश चतुर्थी व्रत केले जाते. हे व्रत, उत्सव जवळपास संपूर्ण भारतात करतात. याला वरद चतुर्थी असेही नांव आहे.
September 19, 2023
भौतिक सुखे असे साध्या शब्दात म्हणता येईल मिळवण्यासाठी आपली सारी उर्जा खर्च करतो. आता आपण आपले श्रेयस, म्हणजे भौतिक सुखापलीकडचे असे काही तरी, जे आपल्या आत्म्याला परमानंद देईल
November 16, 2022
दिनांक २७ जुलैला संध्याकाळी, टीव्हीवर आपले माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या निधनाची दु:खद बातमी ऐकली आणि मन विषण्ण झाले. त्यांची आणि माझी मैत्री गेल्या ५२ वर्षांची! माझ्या मनात, डॉ. कलामांच्या अनेक आठवणी दाटून आल्या.
January 28, 2024
बातमी : ‘कोळी कुटुंबांचा आतां गिरगांव चौपाटीला ‘रामराम’ ?
संदर्भ : लोकसत्ता, मुंबई आवृत्ती , ‘मुंबई’ पुरवणी , दि. २८.०६.१६.
ज्या कोळी कुटुंबांनी लोकमान्य टिळकांच्या स्मारकासाठी जागा दिली होती, त्यांनाच आतां गिरगांव चौपाटी सोडण्याची वेळ आलेली आहे. कोणत्याही सुविधा उपलब्ध न करतां सरकारी यंत्रणांनी या कोळ्यांची हकालपट्टी करण्याची तयारी चालवली आहे.
पिढ्या बदलल्या की विचार बदलूं शकतात, नव्या पिढीला जुन्या संबंधांची जाण असतेंच असें नाहीं, आणि असलीच तर, पर्वा असतेच असें नाहीं. इतिहासात याची अनेक उदाहरणें दिसून येतात.
एक उदाहरण पाहूं या . ओरंगझेबाच्या मृत्यूनंतर मुघल राजपुत्रानें शाहूला कैदेतून सोडलें. तो महाराष्ट्रात आला व त्याचा, राजारामाची पत्नी ताराबाई हिच्याशी संघर्ष सुरूं झाला. धनाजी जाधव, त्याचा कारभारी बाळाजी विश्वनाथ वगैरे मंडळी शाहूच्या पक्षात गेली. शाहू छत्रपती झाला. तरीही सरखेल कान्होजी आंग्रे ताराबाईच्या पक्षात होता. बाळाजी विश्वनाथ यानें कान्होजीचें मन वळवलें व त्याला शाहूच्या पक्षात आणले. यानंतर बाळाजी विश्वनाथ व कान्होजी आंग्रे यांच्यात फार चांगले संबंध राहिले. पुढे बाजीराव (पहिला) यानेंही जंजिरा मोहिमेच्या वेळीं आंग्र्यांची मदत घेतली होती. बाजीरावाच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र नानासाहेब हा पेशवा झाला. त्याला सर्व मराठी सत्ता स्वत:च्या हातात हवी होती. (त्या गोष्टीच्या कारणांची व योग्यायोग्यतेची चर्चा येथें अभिप्रेत नाहीं ). नानासाहेबानें तुळाजी आंग्रे याला पकडून तहहयात कैदेत डांबले, व कैदेतच तुळाजीचा मृत्यू झाला. केवळ चाळीसएक वर्षांमध्ये आणि २ पिढ्यांतच, विचारांमध्ये एवढा अमूलाग्र बदल घडून आला. खरें तर, बालाजी विश्वनाथाला पेशवेपद मिळाले, त्याला अप्रत्यक्षपणें कान्होजी जबाबदार होता. कारण, जेव्हां शाहूनें बाळाजीला कान्होजीशी लढायला सागितलें, त्या वेळी बाळाजीनें पेशवेपद मागून घेतलें, आणि नंतर कान्होजी शाहूच्या पक्षाला मिळाल्यावर बाळाजीचा दबदबा वाढला. परंतु, दोन पिढ्यांनंतर नानासाहेबानें जुन्या गोष्टी बाजूला ठेवून त्याच्या तत्कालीन लक्ष्यांचा व धोरणांचा अवलंब केला आणि आंग्रे कैदेत पडला.
९६ वर्षांपूर्वी गिरगांवातील कोळ्यांनी आपली ज़मीन दिली, त्यानंतर आतां चौथी पिढी चालूं आहे. सरकारें बदलली, सरकारी अधिकारी बदलले. आतां ते सध्याच्या परिस्थितीचा विचार करून त्याप्रमाणें निर्णय घेणार. शंभर वर्षांपूर्वी या बिचार्या कोळ्यांच्या पूर्वजांनी काय केलें, याला आतां विचारतो कोण !
नानासाहेब पेशव्याच्या एकूण वृत्तीचा मराठेशाहीला किती फायदा-तोटा झाल, हें पुढे पानिपतानें दाखवून दिलेंच. मान्य, की पानिपताशी आग्र्यांचा संबंध नव्हता, पण नानासाहेबाच्या वृत्तीचा तर होता ना!
असें म्हणतात की, इतिहासाकडून माणसानें शिकावें. पण इथें इतिहास वाचायला वेळ कुणाला फुरसत आहे ? इतिहासातून शिकण्याची बात तर दूरच !
- सुभाष स. नाईक
June 28, 2016
गुलाबाच्या झाडावरील काटे मोजत बसण्यापेक्षा त्याची सुंदर फुले मोजा. जो काटे मोजत राहतो त्यांच्यासाठी फुलेही काटेच बनतात. असं असतं आपल्या विचार करण्याच्या पद्धतीचं. तुम्ही जसा विचार करता तसेच घडता.
रतन टाटा यांचं एक सुप्रसिद्ध वाक्य आहे. ‘लोखंडाला कोणीही नष्ट करू शकत नाही; पण त्याचा स्वत:चा गंजच त्याला नष्ट करू शकतो.’ तसेच माणसालाही कोणी नष्ट करू शकत नाही; पण त्याच्याच मनाचा दृष्टिकोन त्याला नष्ट करू शकतो. नष्ट होण्याऐवजी श्रेष्ठ बनण्याचा प्रयत्न आपण का बरे करू नये? चला श्रेष्ठ आणि सर्वश्रेष्ठ कसं बनायचं याचा विचार आपण करू.
‘कॅशियस क्ले’ म्हणजेच जगप्रसिद्ध मुष्टियोद्धा मुहम्मद अली. बारा वर्षांचा असताना पासून त्याने आपल्या कोटावर छोटीशी प्लेट लावली. ‘मी सर्वश्रेष्ठ आहे’ असे त्यावर कोरलेले होते. आपण अजिंक्य आहोत, हे तो वेडीवाकडी गाणी गाऊन चारचौघात जाहीरपणे बोलून दाखवायचा. त्याचं ते ब्रीदवाक्य होतं. कधीकधी त्याला हारही पत्करावी लागायची पण तो तीनवेळा जगातला अजिंक्य हेवीवेट मुष्टियोद्धा ठरला. चमत्काराप्रमाणे भासणा-या सगळ्या लोकविलक्षण यशाचं मूळ त्या व्यक्तीच्या सकारात्मक विचारात असतं.
जे मागतात शक्ती,
आभाळ पेलण्याची
देते त्यास आई,
उंची हिमालयाची
मी हे करू शकतो, असा ठाम विश्वास बाळगला व आपल्यात आत्मविश्वासाची शक्ती जागृत केली तर आभाळाएवढी संकटं जरी आली तरी विश्वास बाळगा तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. असा सकारात्मक दृष्टिकोन मात्र असावा लागेल.
डेल कारनेगी नावाच्या एका विद्वानाने सकारात्मक दृष्टिकोनाला व्यक्तिमत्त्वाचा आत्माच म्हटले आहे. कारनेगी म्हणतात, यशात ३० टक्के परिश्रम व ७० टक्के दृष्टिकोन यांचा वाटा असतो.
त्याच्याही खूप वर्षे अगोदर तुकोबांनी सांगितले आहे- ‘मन करा रे प्रसन्न,सर्व सिद्धीचे कारण’ म्हणजेच सकारात्मक विचार ठेवा व प्रथम आपण आपलीच ओळख करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. आपली क्षमता, आपल्यातले प्लस पॉर्इंट, मायनस पॉर्इंट जाणून घ्यावे व त्यास सकारात्मकतेची झालर जोडावी म्हणजे आपण यश मिळवू शकतो.
संत कबीर आपल्या दोह्यातून आपणास सांगतात-
अपने अपने चोर को,
सब कोय डारै मार
मेरा चोर मुझको मिलै,
सरबस डारू वार
‘अपने आप को पहचानिए’ असेही हिंदीत म्हटले जाते.
व्यक्तिमत्त्व हे त्यावरून घडते. अशा विचारांचे मनन, चिंतन, वाचन माणसाने सातत्याने करावे. हे फारच उपयुक्त ठरते. त्यामुळे स्वत:ची ओळख होते. आपणास सहज इतरांविषयी विचारले की आपण भरभरून त्याच्या गुण-दोषांची थैली उघडतो; पण स्वत:विषयी काही विचारलं तर मात्र बोलण्यास कचरतो. स्वरूप ओळखा असे संत सांगतात. ज्यांना स्वरूप कळाले त्यांनीच जगावर राज्य केले अन् तेच आजही करताहेत.
संत कबीर दोह्यात आपणास हेच सांगतात- जगातले सर्वच आपापल्या शत्रूंना मारून टाकतात. मात्र पकडले न जाणारे मन मला मिळाले तर मी त्याला मारणार तर नाहीच उलट माझे सर्वस्व त्याला अर्पण करेन, त्यांच्याशी मैत्री करेन. स्वत:ची ओळख होण्यासाठी स्वत:चे मन, प्रवृत्ती, कल, सवयी यांचा अभ्यास होणे महत्त्वाचे. एकदा का हा अभ्यास झाला म्हणजे गुण-दोष दिसतात. दोष कमी करत गेलो की मग गुण वाढीस लागतात. आपण काय करतो, का करतो, त्याचे काय परिणाम होणार हे कळते. त्यावेळी आपले मन सापडते.
‘तोरा मन दर्पण कहलाये’ असं दर्पणासमान मन आपणास सारे काही दाखवते. मग काय हा अल्लाऊद्दीनचा दिवा असलेलं आपलं मन हवं ते मिळवून देतं व आयुष्यातल्या अडचणी, संकटे, दु:ख यावर उपाय सापडतो व आपल्या आयुष्याला आकार मिळतो.
आपल्याही आसपास सकारात्मक विचार करून आपल्या स्वत:च्या आयुष्याला, दुस-याच्या आयुष्यालाही आकार देण्याचा सातत्याने प्रयत्न करणारी व्यक्तिमत्त्वे आढळतात. फक्त उघड्या डोळ्यांनी त्यांना अनुभवण्याची गरज असते.
जसा कुंभार ओल्या मातीला आकार देत असतो, प्रसंगी तो धपाटाही देतो व आधारही.
थोडक्यात सांगायचं तर अडचणीपासून कोणीही सुटलेला नाही. अडचणीविना जीवन एक भ्रम आहे. वाळवंटातल्या मृगजळाप्रमाणे अशा जीवनामागे धावून मानसिक व शारीरिक शक्ती वाया घालविण्याऐवजी अडचणी पेलून त्यावर मात करण्यातच खरे कौशल्य आहे. अशा या व्यक्तिमत्त्वापासून गुण घेऊ या अन् म्हणू या ‘सकारात्मक विचारच देतील आयुष्याला आकार’ आणि चला आयुष्य सकारात्मक विचारानं जगू या !
कुसुमाग्रज कवितेतून सांगतात-
कुंभारासारखा गुरू
नाही रे जगात
वरूनी घालतो धपाटा,
आतुनी आधाराचा हात.
-- दीपक गायकवाड
August 17, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti