वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
ग्लोबलायझेशनमुळे मध्यमवर्गाच्या हातात बऱ्यापैकी पैसा खुळखुळू लागला व सहाजिकच त्या पैशाला खर्च करण्याचेही मार्गही निघू लागले. माझ्या पिढीचा बचतीकडे असणारा कल, नविन पिढीत खर्च करून उपभोग घेण्याकडे वळू लागला. पैसे साठवण्यासाठी नसून खर्च करणासाठी असतात ह्या विचाराने आता चांगलंच मुळ धरलंय.
१६ एप्रिल १८५३. हाच तो दिवस. बरोबर १६४ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी बोरीबंदर ते ठाणेपर्यंत ‘लोखंडी रस्त्या’वरून ‘आगीची गाडी’ गाडी धावली आणि मुंबई ‘महा मुंबई’ म्हणून भराभर वाढू लागली. चित्रपटात ज्याप्रमाणे ‘हिराॅईन्स’चं आकर्षण अनेक जणांना असतं व त्या हिराॅईनला एक झलक पाहाण्यासाठी जशी थेटरात गर्दी होते, तशी गर्दी पुढे मुंबईत रेल्वे या हिराॅईननं खेचली.
केंद्र सरकारने काही ठराविक सेवा वगळल्यास सर्वच मंत्री-अधिकाऱ्यांच्या गाडीवरचा लाल दिवा काढून टाकण्याचा निर्णय घेतला हे अतिशय उत्तम काम केलं. सामान्य जनतेच्या भावना सरकार ओळखू शकलं याचा अर्थ सरकारची जनतेशी नाळ जुळली आहे असा होतो.
आपलं म्हणणं जर एखाद्या व्यक्तीला पटलं नाही तर आपण किती सहजपणे तो मुर्ख आहे किंवा त्याला काही कळत नाही असं म्हणून मोकळं होतो. पण आपल्या विरूद्ध मतं मांडणाऱ्याची भुमिकाही बरोबर असू शकते हा विचार भले भले करू शकत नाही.
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक चार
जगण्यासाठी औषधं काम करत नाही. भाग पाच
"औषधं न लगे मजला"
औषध "नल" गे मजला.
नलराजाची प्रेयसी दमयंती, आपल्या सख्यांना म्हणजे मैत्रिणींना हे वाक्य सांगत आहे. मला कोणत्याही औषधाची गरज नाही. माझ्या आजारपणासाठी, नल राजा माझा होणे, हेच माझे औषध आहे.
एका मात्रेचा, एका जागेचा, एका उच्चाराचा, फरक पडल्यामुळे काय होते, हे सांगण्यासाठी मराठी भाषेत कोणे एके काळी अशी सुभाषिते शिकवली जायची.
आज त्यातील "औषध" या शब्दाने माझे लक्ष वेधून घेतले.
माझा प्रियकर हेच माझ्यासाठी मोठ्ठे औषध आहे.
या ठिकाणी "माझा प्रियकर" हे सुद्धा एक औषध असू शकते. फक्त प्रिस्किप्शनवर लिहिता येत नाही. प्रियकर म्हणजे मनापासून प्रेम करणारा जोडीदार. या दमयंतीच्या मनीच्या भावना त्या नलाच्या मनी सहजपणे समजून घेतल्या, की मनाच्याच नाहीत, तर दमयंतीच्या शरीराच्या वेदना पण दूर होतात.
जोडीदार मनातलं समजून घेणारा हवा. विशेषतः मासिक पाळी जातानाच्या वयातील तरल नाजूक भावना दमयंतीला फक्त प्रियकर नलाकडेच मोकळे पणाने बोलता येतात. रजोनिवृत्तीच्या वयातील भावनात्मक बदल हे दोन दोन वर्षे सुद्धा तसेच रहातात. बदलते रहातात. अचानक भीती वाटणे, अचानक रडू येणे, कोणाच्या तरी (म्हणजे नल ) भक्कम आधाराची गरज वाटणे, खूप राग येणे, राग आक्रस्ताळेपणाने व्यक्त होणे, एकटेपणा नकोसा वाटणे, गोंधळ, गोंगाट नकोसा वाटू लागतो. फक्त माझा प्रियकर माझ्या समवेत असावा, असे वाटू लागते. काही गोष्टी न बोलता त्याला समजल्या पाहिजेत, अशी दमयंतीची इच्छा असते. पण ही इच्छा पूर्ण न करण्यातच पुरूषार्थ वाटला की नलाच्या मनात, अहंकार जन्म घेतो.
पुरुषी अहंकार आणि स्त्रीचा हट्टीपणा हे जीवनातले दोन मोठे पैलू, ज्याला सोडवता आले, त्याचे जीवन यशस्वी झालेच, म्हणून समजावे.
प्रत्येक दमयंतीला काय हवंय हे जर नल राजाने समजून घेतलं तर ? निदान या मेनोपाॅजल एज मधेतरी समजून घ्यावंच !
या अवस्थेत कोणतीही औषधे शक्यतो घेऊ नयेत. ही पूर्णपणे नैसर्गिक प्रक्रिया आहे. फक्त मनाचा सहभाग समजून घेऊन दमयंतीला समजून घेणं, तिच्याबरोबर रहाणं, तिला राग येणार नाही, यापेक्षा तिला " मी कायम तुझ्याबरोबरच आहे" असा विश्वास तिला वाटेल अशी कृती नलराजाकडून तिला अपेक्षित असते.
आज जी औषधे दिली जातात, ती हाॅरमोन्स बदलवणारी असतात. मेजर्ड डोस मधे जेव्हा हार्मोन्स दिली जातात, तेव्हा मनातून आपोआप निर्माण होणारे स्पंद बदलतात. मनोशारिरीक संबंधाची ही साखळी, एकदा बदलली की पुढील सर्व शारीरिक क्रिया देखील बदलतात. यातूनच फायब्राॅईड सारख्या ग्रंथीची वाढ होत असावी. पुनः त्यावर ऑपरेशन हाच एकमेव पर्याय! हे औषधांचं दुष्ट चक्र आयुष्यभर असंच सुरूच रहाते.
बुद्धीपेक्षा भावना महत्वाच्या असतात. पंचज्ञानेंद्रियांनी त्या तशाच हळुवारपणे समजून घ्यायच्या असतात. तिला बरं वाटेल, असं काहीही करावं.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे "माझ्यासाठी वेळ राखीव ठेवणं" ही भावना ! दमयंतीसाठीचं हे सर्वात मोठ्ठं औषध आहे. पण सगळे नलराजे "तेवढं सोडून दुसरं काहीही मागावे," अशी मागणी करतात, मग इतर भौतिक औषधं सुरू होतात.
-- वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
23.04.2017
‘जागते रहो‘ या सिनेमात शेवटी येणारं जागो मोहन प्यारे, नवयुग चूमे नैन तुम्हारे. हे भैरवातलं बंदिशगीत आपल्याला रात्रीतून पहाटेकडे नेतं. खेड्यातून शहरात आलेला एक तरुण.राज कपूर. तहानलेला.पाण्यासाठी दारोदार वणवण हिंडत असता एका रात्रीत शहराचं भयाण वास्तव अनुभवणारा.
प्राचीन रागरागिण्यांच्या वर्गीकरणातल्या मुख्य सहा रागांमध्ये भैरव हा आहे. भैरवकुळात अनेक रागरागिण्या गुण्यागोविंदाने राहतात. कालिंगडा, रामकली हे त्याचे आप्त आहेत, तर नट भैरव, भैरव- बहार असे जोडराग त्याचे मित्र आहेत.
झुंजुमुंजू व्हायला येतं, पण पाणीही मिळालं नाही म्हणून त्रासलेला असा तो... शेवटी सामान्य स्थितीतली घागरीनं पाणी भरणारी स्त्री- ‘नर्गिस- घागरीनं पाणी त्याच्या ओंजळीत घालतेय.भैरवाच्या सुरांनी झालेली पहाट! सिनेमा संपतो,पण तो भैरव कायम मनात रेंगाळत राहतो.
विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणीनो,
शोमॅन आर के चा 'जागते रहो' हा खरे तर एक व्यंगात्मक चित्रपट.जवळपास या चित्रपटात राजकपूरच्या तोंडी संवादच नाही.एक घोटभर पाण्यासाठी दारोदारी फिरत त्याला आलेले अनुभव आपल्यासमोर मांडणारा.
हा चित्रपट पाहतांना तुम्हांला तुमची सध्याची स्थिती यात जाणवेल. पाणी म्हणजे जवळपास तुम्हांला हवी असलेली मनासारखी पोस्ट. तेव्हा संयम ठेवा. आपल्याला येत असलेल्या बऱ्या वाईट अनुभवाने जगणे शिका. एक दिवशी तुम्हांलाही नर्गिस मिळेल. जी तुमच्यासाठी पाणी (पोस्ट) घेउन तुमची वाट पाहत असेल.
लालदिव्याचं आकर्षण, वलय आणि दरारा आपल्या नेत्यांनाही चांगलाच समजला. त्याचं अनुकरण सरकारी बाबूंनी केले. अधिका-यांनीही आपल्यासाठीही लाल दिव्याची विशेष सोय करून घेतली. लाल दिव्याचं स्वप्न पाहून अनेक मुलं स्पर्धा परिक्षेच्या स्पर्धेत उतरली. सामान्य माणसांपेक्षा वेगळे अधिकार, नव्हे तर जगण्याचा खराखुरा अधिकार म्हणून लाल दिव्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बनला.
निरोगी शरीरासाठी अनुकूल वातावरण व पौष्टिक आहाराची आवशक्यता असते . तसेच मनाच्या विकासासाठी चांगला पौष्टिक आहार ,अनुकूल वातावरण आणि नियमित व्यायाम यांची आवश्यकता असते मनाचा विकास म्हणजे जीवनाचा विकास. व्यक्तीला वाटणारा आनंद ,दुःख ,भावना आपलं शहाणपण,आपली ताकद,आपला वेडेपणा आणि दुबळेपणा या सगळ्या गोष्टी आपल्या मनाच्या अवस्थेवरच अवलंबून असतात .
नैराश्य :बालमनातील स्व-संकल्पना (Despair in Child Self-Concept)
वेगवान स्पर्धेच्या काळात प्रत्येक व्यक्ती ही सुखी व यशस्वी आयुष्य जगण्यासाठी धडपडत असते.संयुक्त कुटूंबातून एकल कुटुंबापर्यंत ,ग्रामीण भागातून शहराकडे, त्याच्या गरजा ,स्वप्नं ,आशाआकांक्षा ,राहणीमान, खानपान, चैनीच्या वस्तू ,सुंदर घर ,शिक्षण ,चांगली नोकरी ,सुंदर जीवन-साथी इ. गोष्टीच्या लालसेने स्वतःचे मानसिक स्वास्थ्य बिघडवत आहेत. अनिश्चित घटना आणि अस्थिरता,अगतिकता,असुरक्षितता,अपेक्षांचं ओझं ,अपमानास्पद वागणूक त्यामुळे ताणतणाव,चिंता व नैराश्य या घटनांना सामोरे जावे लागत आहे.
ताणतणाव म्हणजे,
" ज्या एका मानसिक अवस्थेतेमुळे शरीर स्वास्थ्य प्रभावित होऊ शकते ती म्हणजे ताण (Stress). ""ज्यांच्यामुळे शारीरिक व मानसिक कार्यक्षमतेत विघटन घडून येते किंवा घडून येण्याचा धोका संभवतो,अशा घटनांद्वारे उद्धवणारी प्रक्रिया म्हणजेच ताण (by Lazhrous /fhokman,psychologist).
वाईट घटनांमुळे निर्माण होणारा ताण खऱ्या अर्थाने त्रासदायक असतो तर चांगल्या घटनांमुळे होणारा ताण हा आनंददायक किंवा सुखद असतो.
स्व-संकल्पना म्हणजे ,
"स्वतःचे स्वतःविषयीची कल्पना,भावना,अभिवृत्ती,आवडी निवडी ,सवयी,क्षमता,राहणी,प्रेरणा इत्यादींचे मूल्यांकन म्हणजे स्वसंकल्पना होय." ताण निर्माण करणाऱ्या घटना :
जीवनात ठरविलेल्या गोष्टी मनाप्रमाणे झाल्या नाहीत तर मानवी जीवन अस्वस्थ होण्यास सुरुवात होते . जसे ,जीवनसाथी ,नोकरी दैनंदिन वादविवाद ,संशयवृत्ती ,भांडणे ,वैचारिक मतभेद ,नोकरीमधील वरिष्ठांची अपमानित वागणूक, प्रेमप्रकरणं ,फसगत अशा अनेक कारणांमुळे व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक घटकांवर प्रतिकूल परिणाम होऊन मानवी आरोग्य बिघडते . अपमान ,एकाकीपणा ,अभ्यासाचे दडपण ,भीती व अपयश, नातेसंबंधातील दुरावा ,जीवनातील अनेक लहान सहान समस्यांनी त्रस्त होणे,इतरांकडून न मिळणारा आधार,प्रेम ,यामुळे सतत तणावात राहणे त्यामुळे आंतरिक प्रतिकार शक्तीवर त्याचा विपरीत परिणाम होतो . व्यक्तीच्या आयुष्यात एका उंचीपर्यंत कार्यक्षमतेच्या प्राप्तीसाठी ताण येणे आवश्यक असते ,परंतु ताणाच्या कार्यक्षमतेची पातळी सतत वाढली तर त्याचे रूपांतर नैराश्याकडे जाऊ शकते . बालपणातील मानसिक,शारीरिक किंवा लैंगिक आघात . नकारात्मक विचार येणे,त्याबद्ल स्वप्नं पडणे,भीती वाटणे,लक्ष केंद्रित करता न येणे,स्मरणशक्ती कमी होणे,नकारात्मक विषयावरील टीव्ही सिरीयल पाहणे . समाजात मिळून मिसळून वागायची भीती वाटणे . कमकुवत आर्थिक स्थितीमुळे नेहमी ताण येतो.
समस्या १ : दीपाली मॅडम सरकारी शाळेत नोकरीला. वर्गात छान शिकवायच्या,प्रेमळ होत्या . त्यांच्या लग्नानंतर पतिपत्नीतील वैचारिक वादावरून पटेनासे झाले, नित्याची भांडणे,मारझोड,संशयवृत्ती यामुळे पतीचा त्रास वाढत गेला. सतत ताणतणावात असल्याने चिंता,नैराश्य यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला. या दरम्यानच्या काळात दोन अपत्य झाली .घरच्या सदस्यांनी समजाविले परंतु मार्ग निघाला नाही.एकाकीपणा ,सामाजिक नीति-नियम ,प्रतिष्ठेच्या कल्पना यामुळे इतरांना समस्या न सांगण्याचे धाडस अशा अनेक नकारात्मक कारणांमुळे नैराश्यात आयुष्य जगणे सुरु झाले .
मॅडम होळीला आपल्या सहा वर्षाच्या मुलासह माहेरी गेल्या . ताणतणावाचा परिणाम त्यांच्या शरीरावर व मनावर झालेला होता. आईला म्हणाल्या, माझ्या मुलांचा सांभाळ करशील का? या सवांदावरून आई वडिलांनी काळजी घ्यायला हवी होती. त्यांना आईवडिलांची साथ लाभले नाही व आई वडिलांनी त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. शेवटी सारं काही असहय होऊन आपल्या मुलासह आत्महत्या केली .
समस्या २ : सरिता मुलाला घेऊन आईवडिलांकडे वास्तव्याने राहायला आली. ती नोकरी करते. पाहायला सुंदर, प्रेमळ ,इतरांना मदत करणारी ,काय झालं असेल तिच्या आयुष्यात ?लग्नानंतर लहानसहान कारणावरून भांडण, वादविवाद,मतभेद ,नेहमीचा ताणतणाव चिंता यामुळे एकत्र आयुष्य जगणे असह्य झाले .समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न झाला परंतु अपयश .
दरम्यानच्या काळात पतीने एकत्र राहण्यासाठी प्रयत्न केला परंतु सरिताने नकार दिला .पती मुलाला शाळेतून परस्पर घेऊन गेला . पतीला काहीही न बोलता आपल्या ताणतणावाचे व वात्सल्याचे समायोजन केले पालकांनी सकारात्मक मानसिक धाडस दिलं . जगण्याची नवी उमेद दिली . तिच्या पाठीशी उभे राहिले. त्यांच्या प्रेमळ सहवासाने पती व मुलाविना सरिता आनंदाने आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतेय .
व्यक्तीच्या बालमनांतील स्वसंकल्पना :
स्पर्धेच्या काळात मनुष्य स्वतःच्या मानसिक आरोग्याचा विचार न करता स्वतः अंध काळोखात जात आहे. ही लहानपणातील स्वसंकल्पना होय .अनुवंश व बाह्य घटकांमुळे व्यक्तीची जडणघडण होते. उदा .स्वतःचे विचार व्यक्त न करू देणे ,स्वतःला कमी लेखणे, काळा वर्ण ,शारीरिक व्यंग इ .कारणांमुळे व्यक्तिमत्व न्यूनतेची स्व-संकल्पना बालमनात बनते . उद्धट बोलू नकोस ,वाद घालू नकोस,मुलीच्या जातीने जास्त बोलायचे नाही , अशा नकारात्मक गोष्टीचे मुले अनुकरण करतात यातून स्वसंकल्पनेची बीजे रुजविल्या जातात .कुटुंब व शाळेत मुलांमधील स्वतःचे महत्व कमी असल्याची स्वसंकल्पना दृढ होत जाते .बालकाच्या स्वसंकल्पनेवरच जीवनाचे यश अपयश अवलंबून असतेबालमनात कुटुंब व शाळामधून ऐकविलेल्या काल्पनिक परिकथा /गोष्टी उदा. सिंड्रेला, भुताच्या गोष्टी इत्यादींमधून स्वसंकल्पना बनत जातात समस्येचे मूळ त्याच्या बालमनांतील स्वसंकल्पनेत दडलेले असते .
बालमनातील भीतीयुक्त स्वसंकल्पनेमुळे समस्येचे समायोजन दीपाली मॅडमला करता आले नाही. पालकांनी समस्या व्यक्त करण्याचे धाडस निर्माण केले असते तर टोकाचा निर्णय घेतला नसता . आयुष्यातील चिंता ,ताणतणाव, नैराश्य या बाबत पालक ,जीवलग मित्र ,यांना सांगून समस्येचे निराकरण झाले असते.स्वतः कमावती असल्याने पतीपासून विभक्त किंवा वेगळे राहून आनंदी जीवन जगता आले असते .पालक, मित्र, नातेवाईकांनी भावनिक आधार दयायला हवा होता .आत्महत्या करण्यापेक्षा थोडे अपमान सहन करण्याची सकारात्मक हिंमत करायला हवी होती . सरिताने आयुष्यातील ताणतणावाचे आईवडिलांच्या भावनिक आधाराने,प्रेम व सहकार्याने समस्येचे व्यवस्थापन केले, आज आपले आयुष्य आनंदाने जगत आहे .
तणाव, चिंता ,नैराश्य यातून सुटका होण्यासाठी योगा आणि प्राणायाम यांचा उपयोग नियमित करावा .नैराश्य दूर करण्यासाठी परिस्थिशी जुळवून घेणे व समस्येचे भावनिक समायोजन करण्यास शिकणे .जीवनशैली साधी व गरजा कमी ठेवणे . बालमनावर कुटुंब व शाळांमधून सकारात्मक स्वसंकल्पनेची बीजे रुजविणे .स्वतःची बलस्थाने आणि उणिवा ओळखून त्याचा स्वीकार करणे .नकारात्मक विचार, गैरसमजुती, व्यसनाधीनता यापासून दूर राहणे, रागावर नियंत्रण ठेवावे .विनोदबुद्धी, छंद जोपासणे ,मैत्रीपूर्ण नातेसंबंध ठेवणे, साजेसा जीवनसाथी शोधणे. आपले काम प्रामाणिकपणे करणे व आनंदी राहणे. स्वआदरभाव राखून स्वतःचा व इतरांचा मानसन्मान करणे .अपमान सहन करायला शिकले पाहिजे .सकारात्मक प्रेरणा देणाऱ्या महामानवांच्या जीवनावरील पुस्तकांचे वाचन करावे. जसे, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले , सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, डॉ. ए पी जे अब्दुल कलाम, बाबा आमटे इ. स्वतःचा आत्मविश्वास वाढवावा, मी माझे मानसिक आरोग्य उत्तम ठेऊन आनंदाने आयुष्य जगू शकतो,असे स्वतःला सुचवित राहावे . सकारात्मक विचार देणाऱ्या चित्रपट, टीव्ही मालिका पाहाव्या .
ताणतणाव ,चिंता व नैराश्य यावर मात करून सुखी व आनंदी जीवन जगण्यासाठी प्रत्येकांनी प्रयत्न करावा व सकारात्मक विचारधारेचा अंगीकार करावा.
-- प्रा. हितेशकुमार पटले
ExamVishwa
भारतीय आहार पद्धतीमध्ये महत्त्वाचा घटक म्हणजे कांदा. कांदा जेवणाला स्वादिष्ट करण्याबरोबरच यात उत्तम औषधी गुणधर्म आढळतात. म्हणून अनेक आजारांवर कांदा रामबाण उपाय ठरतो. एक नजर टाकुयात कांदा खाण्याच्या फायद्यावर...
कांदा हा थंड असल्याने जर तुमच्या हातावर जळहळ होत असेल तर त्या जागेवर कांदा लावा.
जर तुम्हाला मुतखड्याचा त्रास असेल तर दररोज सकाळी दोन चमचे कांद्याचा रस प्या.
जर एखादा किडा तुमच्या शरिरावर चावला असेल तर त्यावर लगेच कांद्याने घासा. याने तुम्हाला लवकर आराम मिळेल.
सर्दी आणि घशातली खवखव दूर करण्यासाठी नेहमी कांद्याचा रस प्यावा.
जर तुम्हाला कुत्र्याने चावले असेल तर त्या जखमेवर कांदा कापून मधात मिक्स करून लावा. त्याने विषाचा प्रभाव कमी होतो.
कांदा खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास सहजरित्या दूर केला जाऊ शकतो.
मासिक पाळीदरम्यान पोट दुखत असेल किंवा पाळी अनियमित असेल तर कांद्याचं सेवन करावं.
कांदा खाल्ल्याने ब्लड प्रेशर नियंत्रित केला जाऊ शकते. शिवाय कोलेस्ट्रॉलही नियंत्रित ठेवता येतो.
ज्यांच्या शरीरात रक्त कमी आहे. त्यांच्यासाठी कांदा रामबाण आहे. दररोज कांदा खाल्ल्याने हृदयाचे आजारांचा धोका कमी होतो.
मुलांना अतिसार झाल्यास कांदा बारीक करून त्यांच्या नाभिवर लावा किंवा कपड्यात बांधून पोटावर लावा.
कांद्याच्या सेवनाने चांगली झोप येते आणि कॅलरी बर्न होण्यासही कांद्याची मदत होते.
तणाव कमी करण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहारात कांद्याचा वापर करावा.
मधुमेहग्रस्त लोकांनी तसेच ज्यांचे केस गळतात त्यांनी कांदा खावा.
कांदा खाल्ल्याने शुक्राणू संख्या आणि गुणवत्ता वाढते.
Copyright © 2025 | Marathisrushti