(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग तेरा

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे क्रमांक चार

    जगण्यासाठी औषधं काम करत नाही - भाग चार

    काही वेळा चिकित्सा पत्रके पाहून असे वाटते की, रोग परवडला पण औषधे आवर. एका औषधाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी दुसरे, तिसरे... चौदा चौदा औषधे दिवसभरात. एखादा रूग्ण सकाळ दुपार रात्रीच्या फेऱ्यात कमीत कमी वीस वेळा तरी औषधं घेत असेल ! परत एवढ्या वेळा पाणी प्यायचे. बरं पाणी कमी प्यायले तर अंगाचा भडका होईल, एवढी उष्णता वाढते. करायचे तरी काय ? आणि जेवायचे तरी कधी ?

    बरं औषध बंद करायची पण भीती वाटते, न जाणो चुकुन काही झाले तर ? कोणतातरी रिपोर्ट वाढला, कमी झाला तर ? रोगाविषयी एवढी भीती निर्माण करून ठेवली जाते की, औषधांचे दुष्परिणाम झाले तरी चालतील, किंबहुना ते गृहीतच धरले जातात.

    भारत सरकारने जीवनावश्यक म्हणून अत्यंत आवश्यक असलेल्या औषधांची जी यादी प्रसिद्ध केलेली आहे, त्यात फक्त दीडशे ते दोनशे औषधे प्रकारची औषधे असतील. पण मार्केटमधे आज किमान पन्नास साठ हजार प्रकारची मिश्र औषधे विकली जात आहेत. ब्रुफेन सारखी काही औषधे तर प्रगत राष्ट्रामधे चाळीस पन्नास वर्षांपूर्वीच बॅन झालेली आहेत. पण भारतात मात्र ही औषधे आज भी धडल्ले से बेची जा रही है. डाॅक्टरांच्या चिठीशिवाय काऊंटरवर सुद्धा विकली जात आहेत. ही वस्तुस्थिती आहे. सावध आपणच रहायला हवे. सरकार तरी किती ठिकाणी लक्ष ठेवणार ना ?

    औषधकंपन्याचा प्रचंड नफा हे या मागील खरे राजकारण आहे. जेनेरीक मेडीसीन आणि कंपन्यांनी बनवलेल्या औषधांच्या दरामधे असलेला फरक लक्षात घेतला, की समजेल किती नफा कंपन्या मिळवतात ते !

    येनकेण प्रकारे औषधे विकायची त्यासाठी वाट्टेल ते प्रकार अवलंबायचे, हे बहुराष्ट्रीय कंपन्यांचे षडयंत्र गेली कित्येक वर्षे सुरू आहे.

    असो.

    एक विनोद म्हणून सांगावासे वाटते. आजारी पडलो की, डाॅक्टरांकडे जायचे, त्यांची जी फी असेल ती फी कुरकुर न करता द्यायची, कारण डाॅक्टर जगला पाहिजे. सांगितलेल्या सर्व तपासण्या करायच्या, कारण पॅथाॅलाॅजिस्ट जगला पाहिजे. परत डाॅक्टरांकडे जाऊन जी औषधे लिहून दिली जातात, ती केमिस्ट कडून विकत आणायची, कारण केमिस्ट जगला पाहिजे.
    आणि...
    ....... आणलेली सर्व औषधं तशीच ठेवून द्यायची कारण........
    .....
    ....
    ...
    ..
    .
    आपण जगलो पाहिजे.

    विनोदाचा भाग सोडला तर परिस्थिती फार गंभीर आहे. नवीन औषधे शोधून शोधणार तरी किती ? मुळ द्रव्ये तर तेवढीच आहेत. त्यातील मुलद्रव्यांमधे, थोडाफार तर तम भावात फरक करून नवीन औषध करण्या पलीकडे गाडी पुढे जात नाहीये. मंदी येऊ नये, यासाठी सुद्धा काही वेळा विशिष्ट रोगाविषयी "हॅवाॅक" निर्माण केला जातो. याच्यामागे देखील बहुराष्ट्रीय कंपन्यांचा मोठा सहभाग आहे. म्हणजे भीती निर्माण करायची आणि आपला माल खपवायचा !

    हे लिहिलेलं सुद्धा काहीजणांना "अति" कॅटेगरीमधील वाटेल. पण शेवटी सत्य कटू असते. कुठेतरी कोणाला तरी बोचणारच !
    इलाज नाही.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    22.04.2017

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग बारा

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे क्रमांक चार

    जगण्यासाठी औषध काम करत नाही - भाग तीन

    स्वतः ठरवून स्वतःच उपचार करणे हा आणखीन एक अति घातक प्रकार. कोणीतरी सांगितले म्हणून कुठेही, कोणत्याही नागरमुन्नळी सारख्या गावात सुद्धा स्पेशल गाड्या करून औषधे घेण्यासाठी लोक धावतात, याचे आश्चर्य वाटते. आपण आपल्या गाडीची काळजी घेतो, त्यात योग्य कंपनीचे, ऑईल, पेट्रोल, डिझेल घालतो. काही वेळा दुरुस्तीची वेळ आली तर त्या गाडीच्या स्पेशल मेकॅनिककडे नेतो. पण नशीबाने एकदाच मिळणाऱ्या या शरीरावर असे काही अत्याचारी औषधी प्रयोग करीत बसतो, की जणुकाही आपणाला आपले शरीर संपूर्णपणे कळलेलेच आहे.

    आपण कोणते औषध घेतोय, तो देणारा, तेवढा विश्वासार्ह आहे का, याची कोणतीही खातरजमा न करता, भोंदू वैद्य आणि बोगस डाॅक्टरांच्या मागे अक्षरशः धावतो, यात औषध देणाऱ्याला आपण शास्त्र बदनाम करीत आहोत, याचेही भान नसते. आणि घेणाऱ्याने आपली बुद्धी गहाण टाकलेली असते.

    प्रत्येक राज्याचे एक वैद्यकीय व्यवसाय नियामक मंडळ असते. जसे महाराष्ट्रात एमसीआयएम. महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडीसीन हे सरकारने नेमलेले मंडळ आहे. या मंडळाकडे जेव्हा वैद्यकीय महाविद्यालयाच्या संबंधित विद्यापीठाचे अधिकृत प्रशस्तीपत्रक सादर केले जाते तेव्हा, असे केल्यानंतर डाॅक्टरना वैद्यकीय व्यवसाय करण्याचा रितसर क्रमांक आणि प्रमाणपत्र मिळते. ते दवाखान्याच्या दर्शनी भागात लावलेच पाहिजे. असा नियम आहे. आपण रूग्ण म्हणून ज्यांच्याकडून औषधे घेणार आहोत, ते योग्य शिक्षण घेतलेले अधिकृत पदवीधर आहेत का, याची खात्री करून नंतरच त्यांची औषधे घ्यायची असतात. नाहीतर औषधांचे जे गंभीर दुष्परिणाम होतात, त्यांना सामोरे जावे लागते.
    आयुर्वेद, होमियोपॅथी, अॅलोपॅथी, योग, निसर्गोपचार, सिद्ध आणि युनानी या किमान पदवीधारकाकडून औषध घ्यावे, असा दंडक आहे.

    केवळ लक्षण सांगून, काही वेळा तर पूर्वीच्या डाॅक्टरनी केलेले निदान ऐकवून, स्वतःच पॅथाॅलाॅजीमधे जाऊन, रिपोर्ट करून, नेट वरून थोडीफार माहिती मिळवून, रोगाचे अचूक नावच सांगून, कोणत्याही पॅथीचे औषध घेणे ही खूप मोठी चूक होऊ शकते. यात मूळ शास्त्र बदनाम तर होतेच पण शरीराची जास्ती हानी होते, बोले तो, पूरी वाट लगती है । तेव्हा सावधान!!

    रुग्णाची अवस्था, रोगाची व्याप्ती, गंभीरपणा, रोगाचे भविष्यातील धोके, औषधांचे डोस, किती कालावधीसाठी औषध घ्यावे, पथ्यापथ्य इ. सर्व तपासल्यानंतर सल्ला अधिक चांगला देता येईल ना ! केवळ वाॅटसपवरचे सल्ले, कुणातरी पुष्पादिदिवर विश्वास ठेवून, आंबट तिखट तेलकट बंद करा आणि आमची अमुक औषधे घ्या, टीव्ही वरील जाहीराती वाचून, शेजाऱ्यांचे ऐकून, घरी आलेल्या एजंटकडून औषधोपचार ठरवणे, हा चक्क मूर्खपणा आहे.

    अनेक वेळा आयुर्वेदीय औषधांमधे अॅलोपॅथीच्या औषधांची भेसळ केली जाते. त्यातही त्वरीत वेदनाशामक म्हणून स्टिराॅईड असलेली औषधे जास्त प्रमाणात दिली जातात, याचे परिणाम न सांगता सुद्धा थोबाडावर दिसतात. कानाखाली सूज येणे, औषध घेतल्यावर लगेचच दुख कमी होणे, औषध थांबवले की परत त्रास सुरू होणे, भूक खूप लागणे, तेच औषध मला परत परत घ्यावेसे वाटणे, ही सर्व स्टिराईड पोटात जात असल्याची लक्षणे आहेत. जी भविष्यात खूप हानीकारक ठरू शकतात.
    किडनी साफ करण्यासाठी लघवी होणारी औषधे, सेक्सची ताकद वाढवणारी, त्वचा विकार कमी करणारी काॅर्टीझाॅन मलमे, आवळा आणि कोरफड ज्युसच्या नावाने मिळणारे पाणी, कफ सिरपच्या नावाने मिळणारा साखरेचा पाक, नोनीचे मार्केटींग, एमेलेमच्या नावाखाली चाललेला टाॅनिकचा धुडगुस, जिममधे सुचवली जाणारी प्रोटीनची खिरापत, कित्ती किती अनावश्यक औषधे म्हणून सांगू...

    औषधांचा काळाबाजार हा प्रथितयश औषधांच्या तुलनेत कदाचित दोन ते तीन पट अधिक असू शकेल. असा अंदाज आहे.

    हे म्हणजे "आधीच मर्कट, त्यात मद्य प्याला" अशी अवस्था होते. आधीच्या चुकीच्या औषधांचे दुष्परिणाम काहीवेळा सहा सहा महिने राहातात, आणि महत्वाच्या औषधाला गुण दिसत नाही, ही अवस्था तर आगीतून फुफाट्यात गेल्यासारखी होते. हे केवळ एकाच पॅथीमधे होत असे नाही तर सर्वच पॅथीमधे हा घोळ दिसतो. यावर सरकारचे लक्ष असेल नसेल, पण एक जबाबदार नागरीक म्हणून आपल्याला, आपल्या कुटुंबियांच्या हितासाठी, अनावश्यक औषधांचा अनावश्यक वापर टाळावा असा सल्ला द्यावासा वाटतो.

    नको त्या माणसाकडून, नको ती औषधे, नको त्या अवस्थेत घेतली की, परिणाम नको तेच दिसणार. आणखी दुसरं काय होणार ?

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    21.04.2017

  • खांदेरीच्या पोटात दडली विजयगाथा

    पोर्तुगीझांबरोबर स्वराज्यास त्रास देणारे जंजिरेकर सिद्दी आणि इंग्रज यांना शह देण्यासाठी, इंग्रजांची सिद्दीला मिळणारी रसद ठप्प करण्यासाठी, या दोन शत्रूच्या मुळावर पाचर ठोकण्यासाठी अलिबाग आणि मुंबईच्या मध्यावरील बेटांवर छत्रपती शिवरायांनी बांधलेला किल्ला.... खांदेरी. खांदेरी म्हणजे इंग्रजी भाषेत हेनरी. यानंतर सिद्दीने दीड किलोमीटर असलेल्या बेटावर उंदेरी किल्ला बांधला. अलिबागसमोरील खोल समुद्रात हे जलदुर्ग आहेत. मुंबई समुद्र किनाऱ्यावरून दिसणारे हे जलदुर्ग नेहमीच खुणावत असतात. पण जाण्या-येण्याच्या गैरसोयी आणि या बेटावर वावरण्यास असलेले निर्बंध यामुळे हे दुर्ग पाहणे कठीण होऊन गेले आहे. खांदेरी बेट हे सरकारच्या तटरक्षकाच्या ताब्यात असल्याने पर्यटकांना लाभ घेता येत नाही. परंतु एक पर्याय म्हणजे येथे कोळी लोकांचे दैवत वेताळबाबाचे मंदिर असल्याने त्यांची ये-जा नेहमी सुरु असते.त्यांच्यासोबत मात्र येथे आपला संचार करू शकतो.उंदेरीवर मात्र कोणी जात नाही. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या ताब्यात असलेल्या या बेटांवरील ब्रिटीशकालीन दिपगृहाला कान्होजी आंग्रे यांचे नांव देण्यात आले आहे.

    शिवाजीमहाराजांनी आरमाराबद्दल विचार केला तेव्हापासून म्हणजे इ.स. १६७१ पासून त्यांचे खांदेरी- उंदेरी या समुद्रातील बेटावर लक्ष होते. इंग्रज, पोर्तूगीजांच्या वाढत्या कारवायांना आळा घालण्यासाठी या बेटावर आपले मजबूत आरमार असावे असे त्यांना वाटत होते. त्याप्रमाणे त्यांनी पावले उचलली. इ.स.१६७९ साली मायनाक भंडारी यांना काम करण्यास बजावले. काम सुरु होताच इंग्रज खवळले. यावर तेथे आपले अधिकारी पाठवून बेट आपल्या मालकीचे असल्याचा कांगावा केला. पण मायनाक भंडारीने त्यांना न जुमानता काम जोराने सुरु ठेवले. पण मायनाक भंडारीने झाल्या प्रकाराबद्दल महाराजांना निरोप धाडला होता. हे ऐकून महाराजांनी आपल्या आरमाराचा सेनापती दौलतखान यास तातडीने रवाना केले.इ.स. ३ सप्टेंबर १६७९ इंग्रजांनी बेटाचा ताबा घेण्यासाठी ह्युजेस हा अधिकारी नेमला व इ.स. ६ सप्टेंबर १६७९ रोजी ह्युजेस आपल्या तुकडीनिशी बेटावर चालून आला. पाऊस पडत होता. दर्या उसळला होता.बेटावर लाटा येऊन थडकत होत्या त्याचवेळी मुंबई दिशेने अनेक बोटीतून सैन्य खांदेरीच्या दिशेने निघाले होते. मायनाक भंडारीनी बेटावरील तोफांचा ताबा घेतला होता तर त्या खवळलेल्या सागरात दौलतखान गस्त घालीत होता. चाणाक्ष सेनापती दौलतखान याने त्या इंग्रज तुकडी वर असे आक्रमण केले की, ते ज्या बोटीतून आले होते, त्यासहित त्यांना जलसमाधी दिली. तीन अवाढव्य गुराबा आणि साठ एक नांव होत्या.किमान ५००० इंग्रज सैन्य होते. परंतु सुखासुखी कोणी परतला नाही. इंग्रज नरमले. दुसरीकडून जंजीऱ्याचा सिद्दी कासम जागा झाला. दौलतखानने त्याची गत इंग्रजाप्रमाणे केली. हे सुरु असतना मायनाक भंडारीने अल्पावधीतच खांदेरीची मजबूत तटबंदी उभी केली. आज इतकी वर्षे होऊन गेली तरी तुफान दर्याच्या लाटांना तोंड देत खांदेरीची तटबंदी अद्याप ठामपणे उभी आहे. त्या पराक्रमाची गाथा सांगण्यासाठी वर्षानुवर्षे अशीच उभी राहणार आहे. खांदेरीच्या पोटात दडलेली ही विजयीगाथा थोड्या थोडक्या लोकांना ठाऊक असेल. जेव्हा पूर्णपणे खांदेरी उभा राहिला तेव्हा महाराज नव्हते. जर महाराज अजून दहा वर्षे असते तर एक इंग्रज दिसला नसता किंवाऔरंगजेब दख्खन मध्ये दाखल झाला नसता. तसेच स्वराज्याची वाताहतही झाली नसती.

    इ.स.१५८८ ची एक गोष्ट सांगाविशी वाटते. स्पेनचा स्पँनिश आरमाडा म्हणून जगातील अव्वल दर्जाचे आरमार. काटक, धिप्पाड, कष्टाळू स्पँनिश सैन्य अटलांटा महासागरातील उत्तर समुद्रात त्यांचे राज्य होते. ते स्वत:ला बलवान आम्हीच असे म्हणत आणि त्यांच्या वाटेला कोणी जाण्याची हिमंत करीत नव्हते. ब्रिटनच्या मनात त्यांच्याविषयी सल होती. दळणवळण यंत्रणा कुचकामी ठरत असल्यामुळे इंग्रज चवताळले होते. योग्य संधीची वाट पाहत त्यांनी स्पँनिश आरमाराला आम्ही खऱ्या अर्थाने बलवान आहोत, असे सांगितले. त्यामुळे स्पँनिश सैन्य इंग्रजावर धावून गेले. कुमक कमी असलेल्या आणि आरमारात प्रवीण नसलेल्या इंग्रजांनी स्पँनिश नौकांना सैन्यासहित जलसमाधी दिली आणि विजय संपादन केला. तेव्हा तसे कारणही घडले एक मोठ्या वादळाचा तडाखा युध्द सुरु असताना झाले. अन इंग्रजांच्या पथ्यावर पडले. त्यानंतर इंग्रज सर्वत्र संचार करू लागले. राज्याचा विस्तार होत गेला. पण त्यांनी त्या बुडविलेल्या नौका समुद्रातून बाहेर काढल्या. खर्च अमाप आला. परंतु आपल्या विजयाचे स्मरण भविष्यात आपल्या पिढीला व्हावे म्हणून त्या नौकाच्या लाकडापासून त्यांनी टेबल बाकडे बनविले आणि *ग्रीनव्हीच नेव्हल अँकँडमी* या सैनिकी शाळेत ठेवले. येथे शिक्षणास आलेल्या सैनिकांना आपण बसत असलेल्या आसनाविषयी माहिती दिली जात असते. एक विजयी भावना त्याच्या मनात जागृत होत असते. ते टेबल बाकडे या आधुनिक युगात अडगळीतील सामान न करता आजही त्या सैनिकी शाळेत आपल्या मुठभर पूर्वजांनी पराकोटीचा संघर्ष करीत पराक्रमाचा पूर्वेतिहास लिहिला आहे, याचा त्यांना सार्थ अभिमान वाटत आहे.

    आपल्या सैनिकांनी देखील असाच पराक्रम केला होता हे आपल्या भावी पिढीला प्रेरणादायक ठरावे म्हणून आपल्या समजूतदार आणि शहाणपणा अंगी मुरलेल्या लोकशाहीतील नेत्यांनी आपली चुणूक दाखवायला हवी होती. याविषयी सत्ताधीशांनी खांदेरीच्या पोटात काय काय दडलंय, याचा कधी शोध घेण्याचा प्रयत्न केला नाही. वरचेवर देशप्रेमाची गाथा सांगणारे बेंबीच्या देठापासून कोकलतील, पण भूतकाळातल्या या स्मृती खणून काढण्याचे प्रयत्न कोणी करणार नाही. आपल्याला बलवान राष्ट्र घडवायचे असेल तर सैनिकी शाळामध्ये असे विषय तरी घ्यायला काही हरकत नसावी.

    अशोक भेके

  • धन्य तो पिता

    एक जेमतेम शिकलेला पिता. नांव त्याचं शिवशंकर कोळी. सोलापूर शहरात राहत होते. त्यांना शिवपार्थ नावाचा लहान मुलगा माध्यमिक शाळेत शिकत होता. चुणचुणीत आणि तल्लख बुद्धीचा.खेळाची आवड होती. त्यात तो फुटबॉल खेळण्यात अत्यंत निष्णात. गेल्या काही दिवसापूर्वी शिवपार्थ मैदानात फुटबॉल खेळत होता. रखरखतं ऊन होत. सूर्य आग ओकत होता. खेळता खेळता शिवपार्थ उष्माघाताने कोसळला. उपचारासाठी जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी, मेंदूला जबर धक्का बसल्याने त्याचे वाचणे कठीण असल्याचे नातेवाईकांना सांगितले. तरीही शेवटचे प्रयत्न म्हणून सोलापूरचे डॉक्टर त्या लहानश्या जीवाला वाचविण्याचे आटोकाट प्रयत्न करीत होते. पण अखेर शिवपार्थला ब्रेन डेड घोषित करण्यात आले. खेळायच्या अगोदर ‘ सांग ना आई, मी कसा खेळतो ...!’ विचारले होते. ती धाय मोकलून रडत होती. ममता तडफडत होती. तिचा बाळ रुग्णालयाच्या खाटेवर निजला होता. मोकळं ढाकळ बोलणारा त्यांचा शिवपार्थ त्यांना सोडून गेला होता. त्यामातेची अवस्था कशी झाली असेल. विचार करा. बाप मात्र ती स्थिती बघून हबकला होता. कळवलेले डोळे मूक रडत होते. फक्त चेहर्‍यावर दिसत नव्हते. पण तो बाप त्याचा खोलखोल रुतत चाललेला स्वर दुर्दैवी घटनेचे मनावर प्रहार सहन करीत होता. मुलाच्या सुंदर आठवणींनी मन सैरावैरा धावू लागले होते.

    काय केले रे देवा..! म्हणून समस्त नातेवाईक देखील अश्रू ढाळू लागले होते. रुग्णालय गर्दीने भरले होते. कटू वास्तव्याचे हलाहल पूर्णत: पचविले अन दु;खित अ:तकरणाने बाप जागेवरून उठला आणि रडत असलेल्या बाळाच्या आईला म्हणाला. शिवपार्थच्या आठवणी जपायच्या असतील तर आपल्याला वेगळा निर्णय घ्यावा लागेल. त्याने आपल्या मुलाचे अवयव दान करण्याचा निर्णय बोलून दाखवला. आईने देखील होकार दर्शविला. डॉक्टरांना निर्णय सांगितला गेला. सोलापूर वैद्यकीय क्षेत्र लगेच कामाला लागले. शिवपार्थचे चार अवयव .... हृदय, यकृत आणि दोन मूत्रपिंड काढण्यात आली. हृदय हे हवाई मार्गाने पुण्याच्या रुबी हॉस्पिटलला पाठविण्यात आले. एक मूत्रपिंड आणि यकृत रुग्णवाहिकेने पुण्याच्या मंगेशकर आणि नोबेल हॉस्पिटलला पाठविण्यात आले. एका मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण सोलापुरात अश्विनी हॉस्पिटलमध्ये एका इंजिनिअरींग शिकत असलेल्या विद्यार्थ्यावर करण्यात आले. जो दोन वर्षापासून दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे डायलिसीस वर जीवन कंठत होता.

    एक जीव गेल्याचे दु:ख नक्कीच पण त्या जीवामुळे चार जीवांना जीवनदान मिळाले ते केवळ शिवपार्थच्या आई वडिलांनी घेतलेल्या क्रांतीकारी निर्णयामुळे. डॉक्टरांची तत्परता दाखविलीच शिवाय अनेक हात या निर्णयासाठी मदतीला पुढे आले. ते पोलीस असो वा समस्त सोलापुरी माणसं. त्यांना सलाम करायला हात उत्सुक आहेत. एक विचारसरणी बदलणारी ही घटना. त्या मायबापावर अकस्मात ओढवलेल्या संकटाने व्यथित होऊनही अन्य चार जणांच्या आयुष्यात आनंद फुलविण्याचा खरा आकार दिला.

    दान ही आपली संस्कृती तर भोग ही प्रकृती. श्रध्देने दिलेले दान किंवा ऐपतीनुसार केलेलं दान. अनेकजण देहाची विटंबना नको म्हणून माघारी परतले असते. असो ... शंभरात एक शूर जन्माला येतो. तर सहस्त्रामध्ये एक ज्ञानी असतो. तर दशसहस्त्रामध्ये एक वक्ता निर्माण होतो. पण शिवपार्थच्या वडिलांसारखा दाता हा क्वचितच लाभतो. दानी म्हटले की, त्या पुरुषाचे हात वर असतात तर याचक याचे हात नेहमीच खाली असतात.

    देशात आजच्या घडीला लाखो हृदयरोगी आहेत. पण हृदयदाते प्रमाण अल्प आहे. तर दीड ते दोन लाख मूत्रपिंडाचे रुग्ण आहेत पण केवळ 5000 शस्त्रक्रिया झाल्याचं निदर्शनास आले आहे. यकृतरोगींचा आकडा 30000 असताना केवळ 1000 यकृत रोग्यावर शस्त्रक्रिया झाल्याचे आढळून आले आहे. गरजे इतके दाते आज तरी मिळत नाहीत. याचाच अर्थ ज्याच्यावर शस्त्रक्रिया होत नाहीत ते कसेबसे आयुष्य जगत आहेत. वेळ आली की, जगाचा निरोप घेत आहेत. शिवपार्थच्या बाबांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा मानस नाही. पण त्यांनी दाखविलेले धाडस हे कौतुकास्पद आहे. शिवपार्थच्या देहाचे त्यांनी खरोखर सार्थक केले. त्यासाठी मनापासून त्यांना सलाम करावासा वाटत आहे.

    अशोक भेके

    घोडपदेव समूह

  • वारसा लोककलेचा २०१७

    vaarsa-ad-1

  • सायकल डे

    सध्याच्या काळात दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. सोबतच शहराचे प्रदूषण, तापमान वाढत आहे. याशिवाय वर्दळ आणि पार्किंगचाही त्रास सर्वसामान्यांना सोसावा लागतो. दिल्लीमध्ये सम-विषमचा प्रयोग केला गेला. भविष्यात ही परिस्थिती आपल्याही शहरात ओढावणार आहे. हे रोखण्याकरिता सायकलिंग करणे सर्वांत चांगला व आरोग्यदायी उपाय असून, प्रत्येकाने आठवड्यातून किमान एक दिवस सायकल चालविण्याचा निर्धार करावा. समाजात बदल हवा असल्यास त्याची सुरुवात स्वत:पासूनच करावी लागते. शहरात सायकल चालविण्याची संस्कृती रुजविण्यासाठी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक संघटना आणि व्यक्तीं नी पुढाकार घेतला पाहिजे. लोकांचा सायकलकडे पाहण्याचा दुय्यम दृष्टिकोन बदलण्याची व सायकलिंगमुळे होणारे फायदे समाजवून सांगितले पाहिजे. एवढेच करून चालणार नाही, शहरातील मार्केट, मॉल, रेल्वेस्थानक, बसस्थानक अन्य महत्त्वाच्या ठिकाणी सायकल पार्क करण्याची व्यवस्था असावी. सायकल संस्कृती रुजविताना जी वागणूक रस्त्यावरून मोटारसायकल, कार चालविणाऱ्यांना मिळत तीच सायकलिंग करणाऱ्यांना मिळाल्यास सायकल चालविण्याकडे नागरिकांचा कल वाढविण्यास मदत होईल. पालक पाल्यांना ५० ते ६० हजार रुपयांची मोटारसायकल घेऊन देतात. पण, दहा हजार रुपयांची सायकल घेऊन देत नाही. कारण ते त्यांना प्रतिष्ठेचे वाटत नाही. मोटारसायकलच्या किमतीपेक्षा महागड्या सायकल मिळतात. त्याने आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत व पैशाची बचत आणि अपघातांना पायबंद लावणे शक्या होते. परंतु, ते सर्व या माहितीपासून अनभिज्ञ आहेत.

    जगातील बऱ्याच देशात सायकलिंगला वेगळे स्थान आहे. नेदरलॅण्डमध्ये वाहतुकीचे साधन म्हणून ४० टक्के सायकलचा वापर केला जातो. विशेष म्हणजे तिथे सायकल चालविणाऱ्यांना प्राधान्य दिले जाते. यासाठी ठिकठिकाणी पार्किंग व्यवस्था, वाहतुकीचे नियम, सहज उपलब्धता यासर्व गोष्टींमुळे तिथे सायकल संस्कृती चांगली रुजली आहे. १८८० च्या दरम्यान पहिल्या सायकल ट्रॅकची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर अमेरिका, इंग्लंड आणि नंतर संपूर्ण युरोपमध्ये आवश्यकतेनुसार सायकलसाठीच्या पायाभूत सोयीसुविधा उभारल्या गेल्या. अलीकडच्या काळात तर सायकलिंगचे वाढलेले महत्त्व लक्षात घेता सायकलसाठीच्या पायाभूत सुविधांची निर्मिती हा शहराच्या नियोजनाचा भाग झाला आहे. सायकलस्वारांसाठी वेगळे ट्रॅक, सिग्नल व्यवस्था, पाìकग, नियम, कायदे आणि आवश्यक प्रशिक्षणाचा त्यामध्ये समावेश असतो. एवढेच नव्हे तर लहानपणापासूनच सायकलिंगबाबत गोडी निर्माण व्हावी यासाठी मुलांना सायकल चालवण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. युरोप आणि अमेरिकेत गेल्यावर आपल्याला त्याचा पावलोपावली प्रत्यय येतो. परदेशात कुठल्याही पायाभूत सुविधा उभारताना सायकलस्वारांची सोय लक्षात घेतली जाते. पायाभूत सुविधा उभारताना सर्वप्रथम पादचारी, सायकलस्वार, सार्वजनिक वाहतूक आणि त्यानंतर खासगी वाहने अशा पद्धतीने रस्त्यांची आणि पाìकगची आखणी केली जाते. नेदरलॅण्डमध्ये २०१४ मध्ये एक अनोखा प्रयोग करण्यात आला. तिथे किलोमीटरभर लांब रात्री चमकणाऱ्या सायकल ट्रॅकची निर्मिती करण्यात आली आहे. फ्लोरोसंट रंगाचे विशिष्ट तुकडे सिमेंट-काँक्रीटमध्ये वापरण्यात आले असून दिवसाच्या प्रकाशात ते ऊर्जा साठवून घेतात आणि रात्रीच्या अंधारात हाच रस्ता उजळून निघतो. स्पेनमधील सॅन सबॅस्टियन या शहरात २००९ साली जुन्या रेल्वेच्या बोगद्याचे रूपांतर सायकल ट्रॅकमध्ये करण्यात आले असून हा जगातील सर्वात लांब सायकल बोगदा आहे. विशेष म्हणजे सायकलस्वारांच्या सुरक्षिततेसाठी यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरेसुद्धा बसवण्यात आले आहेत.

    टोकियो शहरामध्ये जमिनीखाली सायकल पाìकगतळाची निर्मिती करण्यात आली असून दोनशे सायकल पार्क करण्याची सुविधा आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठीचा हा उपाय सरस आहे. जर्मनीमध्येही जुन्या रेल्वे ट्रॅकवर तब्बल नव्वद किलोमीटर लांबीचा सायकल ट्रॅक उभारणीचे काम सुरू आहे. अशाच प्रकारच्या सोयी सुविधा आपल्या शहरात मिळाल्यास निश्चिधत चांगले बदल दिसून येईल.

    भारतातही सायकलचा वापर फार पूर्वीपासून होत आहे. सायकल हेच दळणवळणाचे प्रमुख साधन होते. मात्र देशात सायकलसाठी म्हणून काही विशेष पायाभूत सुविधा उभारल्या गेल्याचे फारसे दस्तावेज उपलब्ध नाहीत. सायकलिंगबद्दलचे प्रेम वाढत आहे याबाबत शंका नाही. परंतु सायकलसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी लागणाऱ्या राजकीय इच्छाशक्तीचा आपल्याकडे अभावच आहे.
    आज सायकल दिना निमीत्त प्रतीज्ञा करा.

    मी आठवड्यातून एक दिवस सायकलचा वापर करीन.
    सायलक पार्क करण्याची व्यवस्था व ती सहज उपलब्ध व्हावी
    ती घेण्यासाठी कर्ज मिळण्याची सुविधा - सायकलचा विमा असावा
    सायकलिंगचे फायदे सांगण्यासाठी शिबिर, रॅली, काढावी सर्व काॅर्पोरेट कंपन्यानी कर्मचाऱ्यांना एक दिवस सायकलने येण्याचा सल्ला द्या.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग अकरा

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे क्रमांक चार

    जगण्यासाठी औषध काम करत नाही.

    भाग दोन

    जीवनावश्यक काय आहे ?
    अ.व.नि.
    अवनि म्हणजे पृथ्वी. तिचे रक्षण तर झालेच पाहिजे. पण शब्दाची फोड केली तर अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभुत गरजा आहेत. असे आम्हाला शाळेत इयत्ता चौथी अ मधे शिकवले होते. आताच्या काळाचा विचार करता, चौथी गरज वाॅटसपची झाली.....
    ....... तुला स्वर्गात जायचे आहे की नरकात असा प्रश्न विचारल्यावर जिथे फोरजीची रेंज येते आणि मोबाईल आणि चार्जर नेता येतो तिथे कुठेही चालेल, अशी उत्तरे देणारी मोबाईल अनिवार्य झालेली आजची पिढी.....

    पाचवी गरज औषधांची निर्माण झाली.
    असे वाटू लागले आहे, की औषधांशिवाय मी जगूच शकणार नाही. एकवेळ जेवण आणि आंघोळ राहिली तरी चालेल पण औषधे विसरून चालणार नाही, असे वाटण्या इतपत कायमस्वरूपी औषधाबद्दलचे प्रेम निर्माण झाले आहे.

    "उगाच रिस्क कशाला घेताय"
    " हेल्थ महत्त्वाची की पैसा"
    अशा गोंडस टायटल असलेली टिपीकल वाक्य डाॅक्टरनीच सुनावल्यावर, औषध ही जीवनावश्यक गरज बनली. परदेशवारीची ऑफर फार्मा कंपन्या, डाॅक्टरना देतात. एखाद्या कंपनीची औषधे जर वर्षभर वापरली तर सिंगापूर मलेशिया ट्रीप जर होत असेल तर या मोहात कोण पडणार नाही ? अर्थात सर्व डाॅक्टर ही ऑफर स्विकारतात असं नाही. पण हा सरळ सरळ बिझनेस आहे. दुर्दैव आहे की यात सर्वसामान्य जनतेचे आरोग्य पणाला लावले जातेय.

    फूड अॅण्ड हेल्थ सप्लीमेंटच्या नावाने महागड्या टूथपेस्ट पासून ते अगदी औषधे विकणाऱ्या कंपन्या, आपले टाय बांधलेले सोकाॅल्ड सोकावलेले एजंट दारोदारी फिरवत आहेत. दुर्दैवाने यात काही डाॅक्टरदेखील एजंट म्हणून सामील आहेत. आरोग्य जनजागृती च्या नावाने, जनतेच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. "आजकाल म्हणे अन्नाचा दर्जा खूप घसरल्यामुळे आमची ही पावडर तुम्हाला दिवसभराची सर्व एनर्जी देईल." इथपर्यंत असत्याचा प्रचार केला जातोय. फ्रि मेडीकल हेल्थ चेक अप कॅम्पच्या जनसेवेतून काही मशीनद्वारे मोफत कॅल्शियम, हिमोग्लोबिन तपासणीचे नाटक पार पाडले जाते. हवे तसे रिपोर्ट आणले की आमच्या कंपनीचे अमुक औषध आता आपल्याला विकत घ्यायला हवे, असेही या "फ्री" चेक कॅम्पमधे सांगितले जाते.
    उल्लु बननेवाले है, इसलिए "बनानेवाले" पैदा होते है।

    औषधे ही रोग घालवण्यापुरती, तात्पुरतीच घ्यायची असतात, नंतर रोग विसरून जायचा असतो, लक्षात ठेवायचा नसतो, हे लक्षातच येत नाही आणि औषधं कायमची पाठी लागतात.

    "माझ्या चुकीच्या जीवनशैलीमुळे मला त्रास होताहेत" हे मान्य न करता, हे जीवनचक्र असेच चालणार, आणि आम्ही आयुष्यभर औषधे घेत बसणार आहोत." अशी विचारसरणी असलेल्या व्यक्तींनी, हा लेख फारसा मनाला लावून घेऊ नये. विसरून जावे.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    20.04.2017

  • शोध – यशाचा

    यश या शब्दाबद्दल या सगळ्यांनी काय लिहून ठेवलंय बघा !!

  • १८ एप्रिल १९७५ – मराठी चित्रपट सामना प्रदर्शित

    १८ एप्रिल १९७५ रोजी "सामना" मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. मराठी चित्रपटसृष्टीतील "सामना‘ चित्रपट हे एक महत्त्वाचे वळण. ‘मारुती कांबळेचं काय झालं’ या अजरामर संवादासह सरपंच आणि मास्तर यांच्यातील संभाषणाची जुगलबंदी, . हा मास्तर, गप, गुमान र्‍हावा की… कशाला उगाच नसत्या चौकशा… आणि त्याच जोडीला ‘सख्या रे घायाळ रे हरिणी ’हे सामना चित्रपटांतील जबरदस्त गाणे व स्मशानशांतता असलेल्या महालांतील ती निघृण हत्या, याने गाजलेला गिरीराज पिक्चर्स या बॅनरचा 'सामना' हा चित्रपट. या चित्रपटाने राज्यातील सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली. एका ध्येयनिष्ठ मास्तरने (डॉ. श्रीराम लागू) एका सहकार सम्राटाच्या (निळू फुले) अस्तित्वास दिलेले आव्हान या कथासूत्राभोवती हा चित्रपट होता. हा चित्रपट झळकला आणि नंतर २५ जून रोजी देशात आणीबाणी जाहीर झाल्याने, या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालून तो चित्रपटगृहातून उतरवण्यात आला. विजय तेंडुलकरांची कथा-पटकथा-सवांद असणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. जब्बार पटेल यांचे होते. तर निर्मिते रामदास फुटाणे व माधव गालबोटे हे होते. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित पहिला चित्रपट. "सामना" चित्रपटाने बर्लिन महोत्सवात भारताची ‘प्रवेशिका’ म्हणून गेलेला पहिला मराठी चित्रपट मान मिळवला. या चित्रपटात स्मिता पाटील यांनी छोटी भूमिका केली होती. 'या टोपीखाली दडलंय काय' या गाण्यात 'पप्पा……… ' स्मिता पाटील होत्या. डॉ. श्रीराम लागू व निळू फुले यांच्या अभिनयाचा 'सामना' खूप गाजला. मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील हा 'माईलस्टोन' सिनेमा आहे. त्या वेळी अवघ्या दीड लाख रुपयांत चित्रपट बनला गेला. बेचाळीस वर्षांनंतरही ब्लॅक एन्ड व्हाईट मध्ये असूनही हा चित्रपट आजही त्याच उत्साहाने बघितला जातो. व चित्रपटाची विविध संदर्भात विशेष चर्चा सुरु असतेच.

    सामना १९७५ सामाजिक
    ३५ मिमी/रंगीत/११२मिनिटे/प्रमाणपत्र क्र.बी७६७०५/२-१-१९७५./यू

    निर्मिती संस्था :गिरीराज पिक्चर्स
    निर्माता :रामदास फुटाणे, माधव गानबोटे
    दिग्दर्शक :जब्बार पटेल
    कथा :विजय तेंडुलकर
    पटकथा :विजय तेंडुलकर
    संवाद :विजय तेंडुलकर
    संगीत :भास्कर चंदावरकर
    छायालेखन :सूर्यकांत लवंदे
    संकलक :शा. वैद्य
    गीतलेखन :आरती प्रभु, जगदीश खेबुडकर,जब्बार पटेल
    कला :दिनानाथ चव्हाण
    रंगभूषा :निवृत्त दळवी
    वेषभूषा :पांडुरंग खटावकर
    नृत्य दिगदर्शक :सोहनलाल
    स्थिरचित्रण :डी. व्ही. राव
    गीत मुद्रण :बी.एन्.शर्मा, रॉबिन चटर्जी
    ध्वनिमुद्रक :रामनाथ जठार, बाबा लिंगनूरकर
    निर्मिती स्थळ :जयप्रभा स्टुडिओज्, कोल्हापूर, शालिनी स्टुडिओज्, कोल्हापूर
    रसायन शाळा :बॉम्बे फिल्म लॅबोरेटरीज

    कलाकार :अस्वले गुरुजी, आबू, आशा पाटील, उदय लागू, उषा नाईक, औंधकर, नंदू पोळ, निळू फुले, भालचंद्र कुलकर्णी, मीटकर, मोहन आगाशे, रजनी चव्हाण, रमेश टिळेकर, लालन सारंग, विलास रकटे, शहाजी बारे, शिवाजी भोसले, श्रीराम लागू, संजीवनी बिडकर, सुरेखा शहा, स्मिता पाटील, हेमसुवर्णा

    पार्श्वगायक :लता मंगेशकर, उषा मंगेशकर, रवींद्र, श्रीराम लागू

    गीते :१) कुण्याच्या खांद्यावर कुणाचे ओझे, २) हा महाल कसला रानझाडी ही दाट, ३) कुणी तरी अशी पटापट गंमत आम्हा सांगिल काय या टोपीखाली दडलय काय?, ४) सख्या चला बागांमधी रंग खेळू चला, ५) रंगमहाली रंगबाजीचा डाव आला रंगाला
    कथासूत्र. खेड्यातून आता श्रीमंत झालेला बागाईतदारांचा एक वर्ग राजकारणात शिरून पुढारी बनतो व अनेक कृष्णकृत्ये करतो आणि अशा तथाकथित पुढाऱ्यांना वेळीच काबूत ठेवले पाहिजे हे कथासूत्र.हिंदुराव धोंडे पाटील हे पुढारी आणि जुने ज्वलंत गांधीवादी मास्तर.दोघांची मैत्री जमली.म्हणजे पाटलांनी चातुर्याने जमवली.पण एका खुनाच्या प्रकरणाने मास्तर अस्वस्थ झाले आणि पाटील व मास्तर असा सामना सुरु झाला.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    खालील लिंक क्लिक करून "सामना‘ चित्रपट बघू शकता.

    https://www.youtube.com/watch?v=qss_9no2Oeo

    https://www.youtube.com/watch?v=EqnFwzOtcAM

  • साडेतीन एकरावर ‘पुस्तकाचे गाव’

    ब्रिटन मधील हरफोर्डशायर येथे 'ऑन वे' या नावाचे गाव असून हे गाव पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाते. त्याच पध्दतीने महाराष्ट्रातही, स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असणारे महाबळेश्वर तालुक्यातील भिलार हे गाव आता ‘पुस्तकाचे गाव’ या रूपाने वाचन संस्कृतीसाठी समृद्ध झाले आहे. देशातील हा पहिला महाराष्ट्र शासनाने राबवला असून या प्रकल्पामुळे महाबळेश्वर तालुक्याचा देशात नावलौकिक उंचावला आहे. या योजनेंतर्गत भिलारमधील नव्या भूखंडावर सुमारे साडेतीन एकरावर हे ‘पुस्तक गाव’ विकसित करण्याची योजना आहे. यामध्ये विविध प्रकारची साहित्य दालने असतील. त्यात शेती, स्पर्धा परीक्षा याचीही माहिती यातून मिळेल. अत्याधुनिक दृकश्राव्य दालनात ई-बुक्स व आॅडिओ बुक्सही उपलब्ध असतील. तसेच या योजनेत निवडलेल्या घरांमध्ये विविध प्रकारची पुस्तके ठेवली गेली असून, त्याद्वारे वाचनसंस्कृती जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. त्या घरांमध्ये तसे पूरक वातावरण तयार केले केले गेले आहे.

    ‘पुस्तकाचे गाव’ या प्रकल्पाची वैशिष्ट्ये...
    साहित्यिकांच्या भेटीद्वारे रसिकांशी सातत्यपूर्ण संवाद लेखन, वाचन, संपादन, मुद्रितशोधन याबाबत प्रशिक्षण कार्यशाळा होतील शैक्षणिक सहलींसाठी अनुकूल वातावरण, साहित्यिकांच्या भेटी ठरवता येतील. गावात कायमस्वरूपी कविकट्टा व अभिवाचन कट्टा असेल गावातील सार्वजनिक जागा ग्रामपंचायत, समाजमंदिर, शाळा येथे वाचनकट्टे तयार करण्यात येणार आहे.

    घरांचे वाचनालय.. गावाचे ग्रंथालयात रूपांतर...
    महाराष्ट्र शासनाने भिलार या गावाला या पायलट प्रोजेक्टसाठी निवडले असून, यासाठी ग्रंथालय, पुस्तके व यासाठी लागणाऱ्या सर्व सुविधांसाठी आर्थिक तरतूद केली आहे. या माध्यमातून भिलारकडे उच्च दर्जाचे क्षेत्र म्हणून पाहिले जाणार आहे. तर रोजगार व आर्थिक स्थैर्य ही लाभणार आहे. त्यामुळे भिलारमधील घरांचे छोट्या वाचनालयात तर गावाचे मोठ्या ग्रथांलयात रूपांतर झाले आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट