वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
सहज आणि मोफत उपलब्ध असणारे गोमुत्र. आपण फक्त त्याचा वापर धार्मिक विधी करिता वापरतो. आज औषध म्हणून गोमुत्राचा कसा उपयोग होतो ते अभ्यासू या.
गोमूत्राने जखमा फार लवकर धनुर्वात न होता बऱ्यां होतात.
चमच्याभर गोमूत्रामधे 2 थेंब मोहरी तेल मिसळून नाकात टाकल्याने बंद नाक त्वरित मोकळे होते. श्वास घेणं सहज होते.
गोमूत्रात थोड़े गाईचे तूप व् कापुर मिसळून, कपड़ा ओला करून छातीवर ठेवल्याने कफ वितळून मोकळा होतो.
सायटिका, गुढ़गे, कोपर, पोटर्या, मांसपेशींमधे दुखणे, सूज आल्यावर गोमूत्रापेक्षा मोठे दूसरे औषध नाही.
संधिवात, हाडं ठिसुळ होणं, रुमेटिका फिव्हर आणि अर्थरायटिसमधे सर्व औषधे निष्फळ होतात.
80 प्रकारच्या वातरोगांमधे गोमूत्र एकमात्र औषध आहे. यासाठी आर्धाकप गोमूत्रात 2 ग्रॅम शुद्ध शिलाजीत, 1 चमचा सुंठचूर्ण, शुद्ध गुग्गुल अथवा महायोगराज गुग्गुलच्या 2 गोळ्या मिसळून पाजावे.
शौचाला साफ़ न होणे हे सर्व रोगांना निमन्त्रण देते. गोमूत्र लघवी व् शौच, मलावरोध दोघांना मोकळे करते. अशा वेळेला गोमूत्र दोन्ही वेळा 50-50 मिली घ्यावे.
गोमूत्रात एरंडतेल 1 चमचा मिसळून दिल्याने जुलाब साफ़ होतात.
लहान मुलांना शौचचा त्रास असल्यास २ चमचे गोमूत्रात १ चमचे मध मिसळून पाजावे.
गाइच्या दुधात 2 चमचे तूप मिसळून पाजल्याने गर्भावती महिलांना मलारोध होत नाही.
डायबिटिसमधे गोमूत्र फार उपयुक्त आहे. गोमूत्र डायबिटीस कंट्रोलमधे ठेवते.
यकृतरोग, काविळ, जॉण्डिस या रोगांमधे गोमूत्र व् पुनर्नवा मंडूर घ्यावे.
एलोव्हेराच्या 30 मिली रसात 50 मिली गोमूत्र मिसळून पिल्याने पचनसंस्थेचे सर्व अवयव रोग मुक्त होतात.
2 ग्रॅम ओवाचूर्ण अथवा जायफळ वाटून गोमूत्रात मिसळून पाजल्याने पोटाचे दुखणे, मुरडा, आव, भूक न लागणे ठीक होते.
मुळव्याधींच्या कोणत्याही तक्रारीमधे 50 ते 100 मिली गोमूत्र पिल्याने फायदाच् होतो.
खरुज, एक्झिमा, पांढरेडाग, कुष्ठरोग यामधे गोमूत्रात 2 वेळा गुळवेलीचा रस मिसळून पिल्याने त्वरित फायदा होतो.
त्वचेवर बटमोगर्याच्या तेलात गोमूत्र मिसळून मालीश करावे.
हार्टविकारामधे गोमूत्र पिल्याने रक्तातील गुठळया होत नाहीत. हायब्लड प्रेशर व् लोब्लड प्रेशरमधे गोमूत्रातील लैक्टोज जबरदस्त परिणाम करतं. हृदयरोगात गोमूत्र उत्तम टॉनिक आहे.
गोमूत्र शिरा व् धमन्यामधे कोलेस्टेरोल साठू देत नाही.
किडनी काम करत नसेल तर गोमूत्र घ्या.
प्रोस्टेट ग्रन्थी वाढलेली असेल तर गोमूत्र घ्या. किडनी व् प्रोस्टेट ग्रन्थिंचे कार्य गोमूत्र सुधारते.
गोमूत्रासारखे दूसरे कुठलीही औषध नाही, लहान मुलांपासून वृद्धांपर्यन्त कोणत्याही रोगां शिवाय नियमित घेऊ शकता.
गोमूत्र नेहमी 8 पदरी कॉटनच्या कापडाने गाळून घ्यावे. गोमूत्रात मध घालून ठेवल्याने टिकून रहते. 1 ते 2 महीन्याने व्यायला येणाऱ्या अथवा विल्या नंतर 1 महीने घेऊ नका. आजारी गाईचे गोमूत्र घेऊ नका. गोमुत्र हे फक्त देशी गाईचेच वापरा.
सगळे उपाय एकत्र करू नयेत.
-- डॉ. गौरी पाटील
निसर्गोपचार तज्ञ
9820584716
कपालभातीकड़े आजार घालवणारा प्राणायाम म्हणून पाहिलं जातं. कपालभाती करून जे कुबड्यांशिवाय चालू शकत नव्हते ते कुबड्यांशिवाय पळू लागलेले मी पाहिले आहेत. कपालभातिमुळे साधक आत्मनिर्भर होतो. स्वयंपूर्ण होतो.
कपालभातीने हार्टमधले ब्लाॅकेज पहिल्या दिवसापासून उघडू लागतात व् 15 दिवसात पूर्ण ओपन होतात. कोणतेही औषध न घेता. कपालभाती करणार्याच्या हार्टची कार्यक्षमता वाढते. हार्टची कार्यक्षमता वाढवणारे कोणतेही औषध उपलब्ध नाही. हार्ट फंक्शन नॉर्मल रहातं. अजुन एक सांगते, कपालभाती करणाऱ्याचं हार्ट कधीच बन्द पडत नाही. हल्ली 70 ते 80 टक्के लोक हार्ट बन्द पडल्याने मरतात.
कपालभाती केल्याने शरीरांतर्गत व शरीरावरील कोणत्याही प्रकारची गाठ डीझाॅल्व होते. कपालभातीने शरीरात हिट जनरेट होते त्यामुळे गाठी विर्घळतात. मग ती ब्रेस्ट मधली असो अथवा चेस्ट मधली असो. ब्रेनमधला ट्यूमर असो अथवा ओव्हरी मधले सिस्ट असो अथवा यूटेरस मधले फाइब्रॉइड असो. नाव अनेक असले तरी गाठी होण्याची टेंडेंसी एकच असते.
कपालभातीने वाढलेलं कोलेस्टेरोल कमी होते. मुख्यबाब ही आहे की कपालभाती करू लागल्यावर पहिल्याच दिवशीपासून कोलेस्टेरोलची गोळी बंद करायला सांगतात.
कपालभातीने वाढलेलं ईएसआर, यूरिक एसिड, एसजीओ, एसजीपीटी, क्रिटेनिन, टीएसएच, हार्मोन्स, प्रोलक्टीन लेव्हल नॉर्मल होऊ लागते. कपालभाती केल्याने हीमोग्लोबिन एका महिन्यात 12% पर्यन्त पोचते. हीमोग्लोबिन वाढीच्या एलोपेथिच्या गोळ्या खाऊन कधीही कोणाचे हीमोग्लोबिन वाढलेले पाहिले नाही. एका वर्षात 16 ते 18 पर्यन्त जाते. महिलांच हीमोग्लोबिन 16 व् पुरुषांच्ं 18 असायला हवे. हे उत्तम लक्षण मानले जाते.
कपालभातिमुळे महिलांच्या पिरिएड्सच्या सर्व तक्रारी एका महिन्यात सामान्य होतात. हे पहाण्यात आले आहे.
कपालभातिमुळे थायरॉइडचे आजार एका महिन्यात गायब होतात. याच्याही गोळ्या पहिल्या दिवसापासून बन्द करायला सांगितले जाते. हे कपालभातीमुळे होते.
एवढंच नाही तर, कपालभाती करणारा 5 मिनिटात मनाच्या पलीकडे जाता. गुड़ हार्मोन्स क्रिएट होऊ लागतात. स्ट्रेस हार्मोन्स गायब होतात. मनाचा व् शरीराचा थकवा नाहिसा होतो. कपालभातीने जी एकाग्रता येते ती इतरत्र येत नाही. किती विशेष आहे पहा.
कपालभातीने प्लेटलेट्स वाढतात. WBC. व्हाईटब्लड सेल्स, RBC. रेडब्लड सेल्स कमी किंवा जास्त झाल्या असतील तर त्या करेक्ट होतात. बैलन्स होतात.
कपालभातीने सर्व बैलन्स होते. कुणी अंडरवेट रहात नाही नी कुणी ओव्हरवेट रहात नाही. दिवसाला एक एक किलो वजन कमी होते. वजन कमी किंवा वाढवण्यासाठी कपालभाती सारखा दुसरा उपाय नाही. कपालभातीने शरीर संतुलित रहते. अंडरवेट असणं जसा आजार आहे तसं ओव्हरवेट असणं ही आजारच आहे.
कपालभातीने कोलायटिस, अल्सरीटिव्ह कोलायटिस, अपचन, मंदाग्नि, संग्रहणि, जीर्ण संग्रहणि, आव असे शौच लागणार आजार बरे होतात. कोंस्टीपेशन, गैसेस, एसिडिटी हेही बरे होतात. समस्त पोटाच्या तक्रारी कपालभातीने दूर होतात.
कपालभातीने पांढरेडाग, सोरायसिस, एक्झिमा, लिकोडर्मा, स्कियोडर्मा असे त्वचारोग बरे होतात. स्कियोडर्मा वर जगात औषध नाही, जो कपालभातीने बरा होतो. पोट खराब असल्यानेच त्वचारोग येत असतात. जस जसे पोट ठीक होत जाते तस तसे त्वचारोगही बरे होत जातात.
अर्थ्राइटिस मधला अजुन एक प्रकार र्होमिटाइड अर्थ्राइटिस म्हणजे आर ऐ फैक्टर पॉझिटिव्ह होणं. अर्थात इथे हाडांमधे विकृति येते. हाडांमधे टॉक्सिसिटी वाढते. एस्ट्रो अर्थ्राइटिस म्हणजे, हाडांमधल्या कुशन्सची झिज होते, कार्टिलेज तुटतात, लिगैमेट्स झिजतात, सांधे झिजतात. एस्ट्रो अर्थ्राइटिस मधे डॉक्टर्स औषध म्हणून स्टीरॉयड देतात. मेडिक्लसायन्स सागतं, स्टिरोइड मुळे एस्ट्रो पोरोसिस होतो. म्हणजे हाडं कमजोर होतात, ठिसुळ होतात. गम्मत बघा, एस्ट्रो अर्थरायटिसमधे स्टिरोइड दिल्याने हाडं ठिसुळ होतात व् त्याच रुग्णास स्टिरोइड दिल्याने एस्ट्रो पोरोसिस होतो. म्हणजे एक आजार जात नाही व् दूसरा आजार निर्माण केला जातो. असं आहे मेडिकलसायंस. विज्ञानाच्या नावावर अज्ञान आहे की नाही.
कपालभातीने छोटी इंटेस्टाइनला संपूर्ण व्यायाम होतो. व्यायामाने अन्न पचु लागतं. अन्न पचल्याने, कैल्शियम, मैग्नेशियम, फॉस्फर्स, प्रोटीन्स आतड्यात शोषल जातात. कैल्शियम, मैग्नेशियम, फॉस्फर्स, प्रोटीन्स अव्हेलेब्ल झाल्याने , कुशन्स, लिगैमेंट्स, हाडं बनु लागतात व् 3 ते 9 महिन्यात, अर्थ्राइटिस, एस्ट्रो अर्थ्राइटिस, एस्ट्रो पोरोसिस यासारखे हाडांचे आजार कायमचे बरे होतात.
लक्षात ठेवा कैल्शियम, प्रोटीन्स, हीमोग्लोबिन, व्हिटैमिन्सच्या गोळ्या न पचताच शरीर बाहेर टाकते कारण केमिकल्स द्वारे बनलेल्या गोळ्या शरीरात शोषण्याची व्यवस्था नाही. आपल्या शरीरात रोज 10% बोनमास चेंज होत असते. ही क्रिया जन्मापासून मृत्यु पर्यन्त अखण्ड चालु असते. ती काही कारणाने बंद पडली की हाडांचे आजार येतात. कपालभाती ही क्रिया बंद पडु देत नाही. त्यासाठी कपालभाती नियमित केलीच पाहिजे.
विचार करा प्राणायामामधली एक क्रिया किती फायदे देते. एवढे फायदे एकाच ठिकाणी दुसरीकडे कुठेही मिळत नाहीत, म्हणून प्राणायाम सर्वश्रेष्ठ आहेत.
एक महत्वाची गोष्ट की आजारी, रोगी यांनी प्राणायाम योग्य, अनुभवी तज्ञाकडूनच शिकले पाहिजेत. अन्यथा गड़बड़ होऊ शकते.
करा योग रहा निरोग.
-- डॉ. गौरी पाटील
निसर्गोपचार तज्ञ
9820584716
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक चार
जगण्यासाठी औषधं काम करत नाही. - भाग सात
ज्यांची प्रतिकारशक्ती जास्ती, त्यांना औषधांची गरज रहात नाही. ही प्रतिकार क्षमता येते कुठुन ?
अनेक गोष्टींवर ही क्षमता अवलंबून आहे. जसे, खाण्यापिण्याच्या सवयी, शरीराचे नैसर्गिक नियम पाळणे, व्यायाम करणे, इ. इ. गोष्टीवर अवलंबून असते.
एक श्लोक आपण बघितला होता...
दूष्य देश बल काल वय ......
...... अवस्थाश्च पृथक्विधः ।।
या श्लोकाचा पूर्ण सविस्तर अर्थ यापूर्वी बघितला असल्याने पुनरूक्ती दोष टाळण्यासाठी, पुढे जाऊया.
आपण जे औषध घेतोय त्याची गरज भासू नये, यासाठी आपला आहार संतुलीत असावा. सहा चवींचा समावेश नेहेमीच्या जेवणात असावा. खाताना, भीती बाळगून, फार चिकित्सक बुद्धीने खाऊ नये. आणि खाल्ल्यानंतर आठवत बसू नये. खाल्लेलं अन्न पचवायला पुरेसा वेळ द्यावा. म्हणजे शरीराला आवश्यक असलेले सर्व घटकपदार्थ आतल्या आत तयार करता येतील. आणि बाहेरून काही भरावे लागणार नाही. म्हणजेच औषधांची गरज उरणार नाही.
यासाठी जेवणाची वेळ बदलावी. सर्व साधारणपणे सकाळी सात ते सायंकाळी सात पर्यंत खावे, नंतर शक्यतो काही खाऊ पिऊ नये. म्हणजे शरीराला आवश्यक ते घटकपदार्थ तयार पुरेसा वेळ मिळेल, आणि सगळी ए टू झेड द्रव्ये आतल्या आतच तयार होतील. हा विषय देखील सविस्तर यापूर्वी लिहून झालेलाच आहे.
विचारांचा गोंधळ होतोय ना !
आपण काय करतोय, दोन परस्पर विरूद्ध विचार एकत्र करण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे गोंधळ होतोय. पाश्चात्य पद्धतीने आरोग्य आणि भारतीय पद्धतीने आरोग्य अभ्यासले तर ठीक आहे, पण दोन्ही पद्धतींना "काळाची गरज" या गोंडस नावाखाली एकत्र करण्याचा प्रयत्न करतोय, म्हणून वैचारिक गोंधळ होतोय. एकाच बाजूला येऊन विचार केला तर विचारांना स्थिरता येईल. मग आयुर्वेदात कॅल्शियम वाढण्यासाठी काय आहे ? थायराॅईडसाठी काय औषध सांगितले आहे? कॅन्सर वर काही आहे काहो उपाय ? असे प्रश्न निर्माणच होणार नाहीत.
दोन भिन्न विचार प्रवाह एकत्र करणं खूप कठीण गोष्ट आहे. आपल्या जीवनपद्धती मधे होत असलेला हा बदल एका मधल्या पिढीने आपल्या डोळ्यादेखत बघितला आहे.
औषधांशिवाय आरोग्य ही संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी आपल्याला भारतीयत्वाच्या दृष्टीकोनातून आयुर्वेद शिकणं, जास्त गरजेचं आहे, असं मला वाटतं.
कुछ पाने केलिए कुछ तो खोना पडता है ।
और यहा तो जिंदगी का सवाल है ।
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021
02362-223423.
25.04.2017
रुग्णांना चांगल्या आणि स्वस्त दरातील आरोग्यसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद सरकार प्रयत्नशील आहे. त्याच अनुषंगाने सरकारने स्वस्त औषधांची उपलब्धता आणि अत्यावश्यक औषधांच्या किंमती नियंत्रणाखाली आणण्यासाठी पावले उचलली असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. सरकारने जेनेरिक औषधांच्या माध्यमातून जनतेसाठी स्वस्त पण दर्जेदार जीवनावश्यक औषधे उपलब्ध करून दिली आहेत.
स्वस्त उपचारांसाठी केंद्र सरकार लवकरच नवा कायदा आणण्याची तयारी करत आहे. या कायद्यामुळे डॉक्टरांनी रुग्णांना स्वस्त जेनेरिक औषधे लिहून देणेही बंधनकारक होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.
आज काल आपण सर्वजण विविध माध्यमातून जेनेरिक औषधांविषयी ऐकतो आहोत.
पण काय आहेत ही जेनेरिक औषधे?
खरंच परिणामकारक आहेत का?
कुठे उपलब्ध आहेत?
मी आत्ता घेत असलेल्या औषधांसाठी कोणता जेनेरिक पर्याय उपलब्ध आहेत ?
व ती तुलनेत एवढी स्वस्त कशी?
जेनेरिक औषधे म्हणजे काय?
‘जेनेरिक औषधे’ म्हणजे ब्रॅँडेड नसलेली स्वस्त पण दर्जेदार औषधे. जेनेरिक औषध व त्याचे ब्रॅण्डेड औषध यात खालील साधम्र्य असते. मुख्य घटक पदार्थ शरीरात शोषले जाण्याचा वेग आणि रक्तातली पातळी औषधाचे डोसेज फॉर्म (उदा. टॅब्लेट, कॅप्सूल, सिरप)
अनेक वर्षांच्या संशोधनातून शोधल्या गेलेल्या फॉर्म्युल्यानुसार औषध तयार केले जाते. दरम्यान, या औषधांचा उत्पादन करण्याचा खर्च जरी कमी असला तरी संशोधनावर झालेला खर्च भरून काढण्यासाठी त्या कंपनीला त्या औषधाची निर्मिती करण्याचा हक्क काही वर्षांसाठी देण्यात येतो, म्हणजेच पेटंट देण्यात येते. या औषधाला कंपनी विशिष्ठ नाव देते, त्यालाच आपण ‘ब्रँडेड औषध’ असे म्हणतो. पेटंटचा कालावधी सात ते वीस वर्षांदरम्यान असतो. या कालावधीनंतर इतर औषध कंपन्या त्या कंपनीचा फॉर्म्युला वापरून व तिच्या परवानगीशिवाय त्याच गुणवत्तेचे औषध वेगळ्या नावाने म्हणजेच जेनेरिक नाव देऊन तयार करू शकतात. हे तयार केलेले औषध म्हणजेच ‘जेनेरिक औषध’ होय.
जेनेरिक औषधांची किंमत कमी का असते?
जेनेरिक औषधांवरील संशोधनाचा खर्च संबंधित कंपनीने पेटंटच्या कालावधीत वसूल केलेला असतो. अर्थातच औषध निर्मितीचा खर्चही कमी असल्याने त्याची किंमत मूळ ब्रँडेड औषधांपेक्षा खूप कमी होते. यामुळे नागरिकांनी स्वतःहून जेनेरिक औषधांची मागणी करायला हवी. यामध्ये पैशांचीही बचत आणि उपचारही उच्च दर्जाचा असेल.
उदा. डोकेदुखी, अंगदुखी, ताप यांपासून आराम देणारे ‘पॅरासिटॅमॉल’ नावाचे एक औषध आहे. ‘पॅरासिटॅमॉल’ हे जेनेरिक नाव झाले. तर क्रोसिन, मेटॅसीन, कॅलपोल आदी ब्रँडेड औषधे आहेत. ही जी निरनिराळ्या ब्रँडनेमखाली मिळतात त्यांना ‘ब्रँडेड-जेनेरिक’ असे म्हणतात. भारतात सुमारे ९०० जेनेरिक औषधांपासून बनलेली ६०००० ‘ब्रँडेड-जेनेरिक’ औषधे आज भारतात विकली जातात.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
आज आपण प्रतिकारशक्ती चांगली कशी ठेवता येईल या विषयी थोडी माहिती घेऊ. काही छोटय़ा गोष्टी नियमित केल्या तर आपण आपली प्रतिकारशक्ती त्यातल्या त्यात चांगली ठेवू शकतो.
१) तुळस
रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर तुळशीची आठ ते दहा पानं रोज चावून खावीत. यामुळे शरीरात जंतूसंसर्गाला अटकाव होतो.
२) तूप
कोणत्याही वयोमानात शरीराचं पोषण करायचं असेल तर अर्धाचमचा तूप आवजरून खावं. तुपामुळे शरीराला वंगण मिळतं. अनेकजण कौतुकानं आपल्या आहारात चीज, बटर असल्याचं सांगतात. पण जी कमाल अर्धा चमच तूप करतं ती या पदार्थाना जमत नाही.
३) आवळा-लिंबू
लिंबामध्ये मोठ्या प्रमाणात क जीवनसत्त्वं असतं. एक अख्खं लिंबू आपण खावू शकत नाही. पण लिंबाची एक फोड मात्र सहज खावू शकतो. पण लिंबू खावं म्हणजे लिंबूचं खावं. लिंबाचं लोणचं नव्हे.
आवळा हा प्रामुख्यानं हिवाळ्यात मिळतो. पण मुरंबा, मोरआवळा, कॅंण्डी या स्वरूपात वर्षभर आवळा उपलब्ध असतो. रोज थोडा तरी आवळा पोटात गेला तरी आपली रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहण्यास मदत होते.
४) पाणी
आरोग्याच्यादृष्टीनं पाण्याचं महत्त्वं वेगळं सांगण्याची गरज नाही. पाण्याची तहान लागली तर ती पाण्यानंच भागेल याची काळजी घेतल्यास शरीरात योग्य प्रमाणात पाणी जाईल. तहान लागली पाणी नाही म्हणून मिल्क शेक/ नारळपाणी/ज्यूस प्यायलं म्हणून तहान भागत नाही. उलट शरीराची पाण्याची गरज पूर्ण झाली नाही तर पाण्याला पर्याय म्हणून पोटात टाकलेले पदार्थ शरीर उलटवून टाकण्याचीच शक्यता जास्त. पाणी आवश्यकतेपेक्षा कमी प्यायलं किंवा जास्त प्यायलं तरी अपाय होतो.
५) नाचणी सत्वं
दिवसभर शरीरातली ऊर्जा टिकवून धरायची असेल तर रोजच्या न्याहारीत नाचणीचं सत्त्व हवंच. नाचणीच्या सत्त्वामध्ये सर्व मुख्य जीवनसत्त्वं असतात. हे नाचणी सत्त्वं दिवसातून एकदा तरी शरीरात जाणं आवश्यक असतं. नाचणीची भाकरी खावी .
६) बीट
दुपारच्या जेवणात कोशिंबीर असावी. पण ती काकडी, टोमॅटो नाहीतर मुळयाचीच हवी असं नाही. उलट रोजच्या जेवणात बीटाची कोशिंबीर खाल्ल्यास एकाचवेळेस शरीराला जीवनसत्त्वं, खनिजं, अॅंन्टिऑक्सिडंटस मिळतात. बीट हे उत्तम शक्तीवर्धक आहे त्यामुळे वृध्दांच्या आहारात तर बीटाचा समावेश असायलाच हवा.
७) दूध-हळद
रात्री जेवल्यानंतर एक कपभर दुध उकळून त्यात एक चमचा हळद घालावी. आणि ते दूध रोज प्यावं. या दुधात चव म्हणून अनेकजण साखर घालतात. पण तसं करू नये.
लहान मुलांना दूध-हळद ऐवजी दूधात थोडं केशर आणि एखादा बदाम भिजवून, वाटून ते दूध द्यायला हवं. दुधात केशराच्या एक-दोन काडय़ाच वापराव्यात.
८) दही आणि ताक
रोजच्या जेवणात कोणी दही खावं आणि कोणी ताक घ्यावं याबाबतही काही नियम आहेत. प्रौढ स्त्रिया-पुरूष आणि वृध्दांनी रोजच्या जेवणात ताक घ्यावं. ताक म्हणजे दह्यात पाणी घालून घुसळून केलेलं ताक नव्हे. तर लोणी घुसळल्यानंतर शिल्लक राहणा:या अंशाला आहारशास्त्रात ताक म्हणतात. आणि या ताकाच्या सेवनानं शरीराला फायदा होतो. लहान मुलांना ताक देवू नये. त्याऐवजी रोज दुपारच्या किंवा संध्याकाळच्या जेवणात त्यांना दोन चमचे ताजं दही द्यावं. मुलांना दही देतांना त्यात साखर घातली जाते. त्याऐवजी दह्यामध्ये खडीसाखर घालावी.
९) गुळाचा खडा आणि खडीसाखर.
घरात वृध्द आणि लहान मुलं असले की आपल्या डब्यातला गूळ आणि खडीसाखर कधीही संपू देवू नये. वृध्दांना दिवसभर तरतरी राहण्यासाठी गुळाचा खडा खूप उपयुक्त असतो. शिवाय चक्कर आल्यास, तोल जात आहे असं वाटल्यास, घसा कोरडा पडल्यास गुळाचा खडा किंवा खडींसाखर तात्काळ शरीरात ऊर्जा निर्माण करतं.
लहान मुलं एका जागी कधीच बसत नाही. दिवसभर त्यांच्या अॅक्टीव्हीटी चालूच असतात. यामुळे त्यांच्या शरीराला ऊर्जेची गरज असते. ही ऊर्जा खडीसाखरेतून मिळू शकते. मुलांना शाळेच्या डब्यात एक छोट्या डब्बीत खडीसाखर घालून आवश्य द्यावी.
आरोग्यम् धनसंपदा
(आरोग्यदूत या WhatsApp ग्रुपमधून साभार)
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक चार
जगण्यासाठी औषधं काम करत नाही - भाग सहा
औषध न लगे मजला आणि औषध नल गे मजला या धर्तीवर आणखी एक श्लेष आजच एका गटात वाचायला मिळाला.
औषधे किती हवी जवळी ?
औषधे ? कि, "ती" हवी जवळी ?
औषधांमधे ताकद आहे कि "तिच्यामधे" जास्ती ताकद आहे.
जर "ती" जवळ असेल तर,
जर तिने जवळ घेतले असेल तर ,
जर तिला जवळ धरले असेल तर,
औषधे कशाला हवीत ?
असं या प्रश्नकर्त्याला विचारायचे आहे.
ती माझे सर्वस्व!
ती माझी प्रेरणा !
ती माझी धारणा !
ती माझी शक्ती !
तीच माझी भक्ती !
शक्तीचीही शक्ती तीच तूही !
सतत असतेस अंतरी
न दिसशी दुसऱ्यास जरी
माझी कर्ती करविती
बोलवती धनी तीच तूही !
केवळ बाजूला बसूनी
सतत सूचना करूनी
घेते गाडी चालवूनी
दुसऱ्या करवी
कधी कोपशी
कधी उर्वशी
कधी फटकारीशी
कशी कवटाळीसी
अशी कशी तू ललना
सांभाळीशी माझ्या जीवना
माझा प्राण तू
माझा श्वास तू
माझा भास तू
अंतरीची आस तू
तू माझे जीवन
जीवन झाले पावन
पावन होण्या कारण
कारण माझे मन !
मनासी देसी कामना
आत्म्यासी चेतना
शरीरासी वासना
तूची देसी
जन्मलो तुझ्यासाठी
जगेन तुझ्यासाठी
सोडलीस जर साथ तू
मृत्युही उभा दारी
सोडू नको साथ अशी
दुधावरची साय जशी
मुलाला माय तशी
रहा जवळी माझेपाशी
खरंय हे ?
एवढी ताकद आहे "तिच्यामधे" ?
का शंका का यावी मनामधे ?
एवढी जपावी ह्रदयामधे ?
अशी कोण लागोन गेली ?
"ती" म्हणजे कोण हे ज्याच्या त्याच्या विचार करण्यावर अवलंबून आहे.
मला "ती" म्हणजे "प्रतिकारशक्ती" वाटली.
आणि आपल्याला. ?
वाचा पुनः
- वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021
02362-223423.
24.04.2017
आजची आरोग्यटीप
१. दिवसाला 5 ते 10 कप इतक्या प्रमाणात अती उकळलेला चहा पिणारे पचनशक्ती बिघडून आम्लपित्त, अल्सर, सांधेदुखी, अंगदुखी आणि मलावरोध या विकारांना बळी पडतात.
२. भारतियांमध्ये चहात साखर घालण्याचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. त्यामुळे बैठा व्यवसाय करणार्या व्यक्ती मधुमेह, कोलेस्टेरॉल, हृदयविकार आणि स्थौल्य अशा विकारांकडे ओढल्या जात आहेत.
३. दूध-साखरविरहित चहा जरी पुष्कळ प्रमाणात प्यायला, तरी त्याच्या तुरट चवीच्या अतिरिक्त प्रमाणामुळे मलावष्टंभ,रक्तदाब वाने, पक्षाघातासारखे विकार आणी शुक्राणूंची संख्या अल्प होणे असे विकार बळावतात.
४. दूध, साखर आणि चहाची भुकटी एकत्र करून उकळलेला चहा कफ-पित्त वाढवणारा आणि उष्ण गुणाचा आहे.
५. टपरीवर चहा अॅल्युमिनियमच्या भांड्यात उकळला जातो. अॅल्युमिनियमच्या धातूचा खाद्यपदार्थांना झालेला दीर्घकाळ संपर्क ‘अल्झायमर्स’ (स्मृतीनाश) सारखा असाध्य विकार निर्माण करणारा असतो.
६. चहा दिवसाला २ वेळेस पिल्यास (५ रू/चहा असे) वर्षाचे ३६०० रू होतात. ५ वर्षाचे १८००० रू होतात.
७. भारतासारख्या समशीतोष्ण कटिबंधातील देशात ‘चहा’ हे कधीही, केव्हाही फार प्यायचे पेय नाही.’
८. चहा चवीला तुरट असल्यामुळे तो बद्धकोष्ठता निर्माण करतो. काहींना चहा न प्यायल्यास शौचाला होत नाही हे सवयीमुळे होते. शौचाचा वेग निर्माण करणे हे चहाचे काम नव्हे. चहा रक्ताची आम्लता वाढवतो.
९. नियमित चहा पिण्याने हाडे ठिसूळ होतात, रक्तवाहिन्या आकुंचन पावून रक्तदाब वाढतो आणि आम्लपित्ताचा त्रास वाढतो.
१०. चहासमवेत आपण काही पदार्थ खातो. त्या पदार्थांमध्ये मीठ असल्यास मिठाचा चहातील दुधाशी संपर्क आल्यामुळे चहा शरिराला मारक बनतो.
खरे पाहिले तर 'चहा' दारू पेक्षा ही जास्त घातक आहे पण दारू बदनाम आहे चहा नाही .
(आरोग्यदूत या WhatsApp ग्रुपमधून साभार)
ऊन किती तापलंय म्हणत तुम्ही तुमच्या मुलांना बाहेर पडूच देत नसाल, तर मोठेपणी त्यांचे दात लवकर पडणार आणि जाता-येता हाडं मोडणार, हे नक्की. - हे असं का?
उन्हाळा पेटला की, भडकलेल्या सूर्यापासून बचाव कसा करावा? याचे किमान हजार उपाय आणि पर्याय सुचवले जाऊ लागतात.
उन्हाळा असो वा नसो, एकूणच तापत्या उन्हापासून दूर राहावं आणि लहान मुलांना तर उन्हात अजिबात फिरकूच देऊ नये, असं मानणारी एक भलती जीवनशैली रुजू लागली आहे.
सूर्याला आपल्या आयुष्यातून असं हद्दपार करणं आणि उन्हात जायची वेळ आलीच तर डोक्यावर टोपी, त्यावर स्कार्फ, डोळ्याला गॉगल असा जामानिमा करूनच बाहेर पडणं यातून आपण काय कमावतो?
तर ‘ड’ जीवनसत्त्वाची जीवघेणी कमतरता.
वनस्पती अन्नाच्या बाबतीत स्वावलंबी असतात. त्या त्यांचे अन्न तयार करू शकतात. त्यांच्या देहात हरितद्रव्य असते. या हरितद्रव्याच्या आधाराने, पाणी आणि कार्बन डायॉक्साईडवायू हे मूळ घटक वापरून सूर्याच्या उपस्थितीत वनस्पतींना कर्बोदके बनवता येतात. वनस्पतींनी बनवलेले हे अन्न खाऊन इतर प्राणी जगतात. आपण माणसेही तसेच करतो. अन्नाप्रमाणेच जीवनाला अतिशय अल्प प्रमाणात लागणारी जीवनसत्त्वेही आपण वनस्पतींकडूनच मिळवतो.
जीवनसत्त्वांचा शोध लावणार्यांनी त्यांना रासायनिक नावे दिली. मात्र ती लक्षात ठेवायला अवघड म्हणून त्यांना जीवनसत्त्व अ, ब, क, ड, ई, के इत्यादि नावे दिली. एवढंच नाही तर त्यांच्यापैकी कोणाच्या अभावामुळे शरीराला कोणत्या प्रकारचा त्रास होतो याचीही माहिती संशोधन करून मिळवली आणि आपल्याला सांगितली.
जीवनसत्त्वे शरीराला आवश्यक असतील तर ती शरीर स्वत:च का निर्माण करत नाही? ती इतरांच्या जीवावर का अवलंबून ठेवली आहेत? एका जीवाने दुसर्या जीवाला पुष्ट करावे असे निसर्गाला वाटते? अर्थात निसर्गाने सर्वच जीवांना परावलंबी केलेले नाही आणि सर्वच बाबतीत परावलंबी केलेले नाही.
आपण माणसे कोणत्या जीवनसत्त्वांत्या बाबतीत स्वावलंबी आहोत? केवळ दोन जीवनसत्त्वं अशी आहेत ज्यांच्याबाबतीत माणूस स्वावलंबी आहे. जीवनसत्त्व ‘ब’ मधील काही प्रकार आणि जीवनसत्त्व ‘ड’ आपल्या शरीरात तयार होतात. त्यापैकी जीवनसत्त्व ब मधील काही प्रकार आपल्या पचनसंस्थेत सुखानं राहणारे आपले मित्र जीवाणू तयार करतात. मात्र जीवनसत्त्व ‘ड’ आपलं आपणच तयार करतो.
जीवनसत्त्व ड तयार होण्यासाठी – कोलेस्टेरॉल – कच्चा माल म्हणून लागते.कोलेस्टेरॉलमुळे शरीराला आवश्यक असणारी अनेक विकरे किंवा हार्मोन्स बनतात. त्या शिवाय सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे पित्तरस. यकृतात कोलेस्टेरॉलचा वापर करून पित्तरस बनतो. हा पिवळसर हिरवा रंग असणारा पित्तरस लहान आतड्यात अन्न पचविण्याचं काम करतो. आपल्या शरीरात कोलेस्टेरॉल बनलेच नाही तर आपल्याला अनेक शारीरिक क्रिया करताच येणार नाहीत. कोलेस्टेरॉल आपला शत्रू नाही तर जन्माचा जोडीदार आहे.हे कोलेस्टेरॉल सूर्यप्रकाशाच्या मदतीनं त्वचेच्या वरच्या स्तरात ‘ड’ जीवनसत्त्व तयार करतं, उन्हात जायचं ते त्यासाठी ! सूर्यापासून प्रकाश मिळतो त्यात विविध प्रकारच्या प्रकाश लहरी असतात. त्यांपैकी अतिनील - ब किंवा अल्ट्राव्हायोलेट- बी (290 ते 320 नॅनोमीटर ) प्रकारच्या तरंगलहरी ड जीवनसत्त्व बनण्यासाठी उपयुक्त असतात. सूर्य उगवताना तांबूस दिसतो कारण सूर्य आणि आपल्यामध्ये हवेचा थर जाड असतो. त्यातून येताना बाकीचे तरंग इतस्तत: फेकले जातात आणि तांबड्या रंगाच्या लहरीच आपल्यापर्यंत पोचतात. सूर्य वर चढेल तसतसा सूर्य किरणांना पार करायला लागणारा हवेचा थर कमी कमी होत जातो. अधिक तरंगलांबीच्या लहरी आपल्यापर्यंत पोचतात. मग सूर्याचा प्रकाश पांढुरका आणि प्रखर दिसायला लागतो. अशा प्रकाशात अतिनील ‘ब’ किंवा अल्ट्रा व्हॉयोलेट बी प्रकारच्या तरंगलहरी असतात. त्या ‘ड’जीवनसत्त्व तयार करण्यासाठी आवश्यक असतात. कोलेस्टेरॉलपासून ‘ड’ जीवनसत्त्व बनतं ते आपल्या त्वचेच्या वरच्या स्तरात. जितकी त्वचा सूर्यप्रकाशाला उघडी असेल तितक्या प्रमाणात ‘ड’ जीवनसत्त्वाचे कच्चे रेणू तयार होतात. हे काम अगदी कोवळ्या उन्हात होऊ शकत नाही. सूर्य साधारण क्षितिजापासून पंचेचाळीस अंश वर आला की, हे काम सुरू होतं. सकाळच्या म्हणजे कोवळ्या नव्हे; पण चटका बसणार्याही नव्हे अशा उन्हातच आपलं शरीर ‘ड’ जीवनसत्त्व बनवू शकतं. (25 ते 30 मिलीग्रॅम प्रती चौरस सेंटिमीटर). आधुनिक जीवनशैलीत उन्हा-तान्हातले कष्ट आणि सूर्य यांना हद्दपार करण्याला ‘विकसित’झाल्याचं मानलं जातं. ती कल्पना लवकरात लवकर दूर केली पाहिजे. कारण न वापरल्यानं माणसाची शेपूट गेली. तसेच न वापरल्यानं शरीराची ‘ड’ जीवनसत्त्व निर्माण करणारी यंत्रणा संपायला नको.
ऊन, घाम, अंघोळ आणि साबण !
उन्हात त्वचेवर बनलेले ‘ड’ जीवनसत्त्वाचे कच्चे रेणू शरीराच्या आत जायला साधारपणे दोन तास घेतात. यासाठी उन्हातून फिरून आल्यावर लगेचच अंघोळ करू नये. उन्हातून फिरून आल्यानंतर अंघोळ करताना उघड्या त्वचेवर साबण लावणं टाळावं. उघड्या त्वचेवरील ‘ड’जीवनसत्त्वाचे कच्चे रेणू तयार झालेला भाग साबणात विरघळतो आणि अंग घासताना अंगावरून पडून गटारीत वाहून जातो. या अंघोळीच्या वेळेला झाकलेल्या जागी काखेत, जांघेत साबण लावायला हरकत नाही.
उन्हात फिरल्यानंतरचे अठ्ठेचाळीस तास !
सकाळच्या उन्हात फिरण्याला आपण सूर्यस्नान म्हणू. सूर्यस्नानात तयार झालेले ‘ड’ जीवनसत्त्वाचे कच्चे रेणू नंतर शरीरात यकृत या अवयवात जातात. तिथे त्यांचे रेणू थोडे पक्केहोतात. त्यानंतर ते मूत्रपिंडाकडे नेले जातात. तिथे त्यांचे पक्के ‘ड’जीवनसत्त्व होते. त्यालाच डॉक्टरी भाषेत ‘कोलेकॅल्सिफेरॉल’ म्हणतात. या प्रक्रियेला अठ्ठेचाळीस तास लागतात.
‘ड’ जीवनसत्त्व मूत्रपिंडात तयार झालं की, त्याचं सर्वात महत्त्वाचं कार्य सुरू होतं... ते म्हणजे शरीरातून लघवीवाटे बाहेर पडणार्या कॅल्शिअमला पकडून परत शरीरात कार्यरत करणं. आपल्या शरीरात कॅल्शिअमची कमतरता निर्माण झाली तर शरीर हाडातून-दातातून हाडं पोखरून कॅल्शिअम काढून घेतं. (आपल्याला घर बांधणीसाठी दगड लागतात ते आपण गावाच्या आसपासच्या टेकट्या, डोंगर पोखरून मिळवतो. पोखरलेले डोंगरही पावसापाण्यामुळे कोसळू शकतात.) पोखरलेली हाडं ठिसूळ बनतात. अशी हाडं मोडण्याची शक्यता वाढते.
स्कार्फ आणि सनस्क्रीन लावण्यापूर्वी..
उन्हामुळे त्वचा काळवंडते म्हणून घराबाहेर पडल्यावर अनेक मुली-स्त्रिया विशेषत: वाहन चालवताना चेहरा झाकून घेतात, हातपायही झाकून घेतात. त्यांच्यात ‘ड’जीवनसत्त्वाचा अभाव निर्माण होऊ शकतो. त्वचा उजळ करण्याचे दावे करणारी क्रीम्स शिवाय ‘सनस्क्रीन’ लावतात. त्यातील रसायनं त्वचेच्या आत ऊन जाऊ देत नाहीत. कितीही‘माइल्ड’ क्रीम असलं तरी ते अतिनील ‘ब’ किरणांना त्वचेच्या आतल्या भागापर्यंत पोचू देत नाही. त्यामुळेच ‘ड’जीवनसत्त्व तयार होण्यास मज्जाव होतो.
सतत ऊन टाळत राहिलात तर..
आपल्या शरीरात एक मिलिलिटर रक्तात ५0 ते ७0 नॅनोग्राम इतक्या प्रमाणात ‘ड’ जीवनसत्त्व असावंच लागतं. इतकंसं ‘ड’ जीवनसत्त्व आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या ३000 जनुकांना कार्यरत ठेवतं. ही जनुकं कार्यरत राहिली नाहीत तर शरीरात अनेक व्याधी आणि आजार निर्माण होऊ शकतात.
ड जीवनसत्त्वाचा अभाव ओळखण्याची सर्वात सोपी परिक्षा म्हणजे – छातीचे हाड अंगठ्याने दाबा.
दाबल्यावर कळ आली किंवा दुखले तर ड जीवनसत्त्वाचा अभाव असू शकतो.
ड जीवनसत्त्वाअभावी
ऑस्टिओपोरोसीस म्हणजे हाडांमध्ये पोकळ्या वाढतात. पुढे मन दडपलेले असणे, मधूमेह, लठ्ठपणा, सोरायसीस, दुभंगलेली मनोवस्था, स्तनाचा, गर्भाशयाचा, प्रोस्टेटचा कर्करोग अशा अनेक विकारांची पायाभरणी होऊ शकते.
इतकी पाळी कशाला येऊ द्यायची ?
त्यापेक्षा उन्हात थोडे उघड्याने फिरून –बसू दे थोडा चटका!
लेखक - विनय र.र.
स्रोत :मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग
संकलन - #ज्ञानभाषामराठी
(आरोग्यदूत या WhatsApp ग्रुपमधून साभार)
नोटाबंदीनंतर अचानक माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांनी राज्यसभेत मौन सोडले तेव्हा गांधारीने आपल्या डोळ्यावरची पट्टी काढून आपल्या डोळ्यातील तेजशक्ती आपल्या लाडक्या पुत्राला देण्याच्या प्रसंगाची आठवण झाल्या शिवाय राहत नाही. डॉ मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारच्या नोटा बंदीच्या निर्णयाचा समाचार घेताना अदमासे दहा वर्षे आपल्या मुखात साठवून ठेवलेल्या ज्ञानमयी वक्तृत्वाने काँग्रेसची लाज सावरण्याचा प्रयत्न केला पण काँग्रेस रुपी दुर्योधनास जवळ पुण्याची कोणतीही वल्कलं नसल्याने त्याचा काही उपयोगच झाला नाही आणि उरलीसुरली लाजही गेली.
आपल्या टीकेचा सूर टिपेला नेत डॉ मनमोहन सिंग यांनी नोटा बंदीचा निर्णय हि देशाची "ऑर्गनाइज्ड लूट" आहे असे म्हणत आपला बोलक्या बाहुल्याचा कार्यक्रम संपवला आणि संपूर्ण जनता अवाक झाली याचे कारण कि डॉ मनमोहन सिंग याना अध्यारुत असलेल्या या लुटीचा फायदा कोणाला, केंव्हा आणि कसा झाला याचे स्पष्टीकरण देण्याचे टाळून ते सूक्ष्मात परतले.
गाझियाबाद्च्या सभेत पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी याच डॉ मनमोहन सिंग व काँग्रेसची " तुम्ही चार आठ आणे बंद केलेत कारण तुमची तेवढीच औकात होती आमच्या औकाती प्रमाणे आम्ही ५०० आणि १००० च्या नोटा बंद केल्या असे म्हणत चांगलीच खिल्ली उडवली. मोदींच्या या विधानाने त्यांच्या पाठिराख्यांचे मनोबल वाढले आणि विविधप्रकारचे विनोद या निमित्ताने व्हॅट्सअँप फेसबुक वर प्रसारित केले गेले, आणि नेमकी हीच बाब डॉ मनमोहन सिंग यांच्या जिव्हारी लागली आणि त्यांच्या वरील वक्तव्याचा जन्म झाला.
पण चार आठ आणे बंद करण्याचा निर्णय हा विनोदाचा विषय नसून आज त्यामुळेच देशाला महागाईच्या भस्मासुराचा सामना करावा लागत आहे याची नोंद आपण घेतली पाहिजे.
चार आठ आणे बंद झाल्याने अगदी तळागाळातील जनतेच्या रोजच्या निकडीच्या सर्वच्या सर्व गोष्टीच्या किमती सुमारे ३३% ते १००% पर्यंत वाढ झाली केवळ चलन रद्द झाल्याने आणि आपल्या देशात आपल्याच पैशाचे अवमूल्यन झाल्यासारखे चित्र निर्माण झाले. पोळीभाझी केंद्रावर मिळणाऱ्या जीवनावश्यक गोष्टींच्या भावात लक्षणीय वाद झाली. आठ आणे असलेली पोळी १ रुपया झाली तेव्हा चक्क १००% ते ३३% टक्के झालेली वाढ आपल्या लक्षातच अली नाही दळणाचे दर रूपये १.५०/= पैशावरून रूपये २/= झाले तेव्हा ३३% भाववाढ आपल्या लक्षात आली हे आपल्या लक्षात आले नाही. हीच गत झाली भाजीपाला, पाव, अंडी, बस भाडे, रिक्षा भाडे,वडा पाव, कटिंग चहा.पान, उपमा. इडली, पोहे यांच्यातील भाव वाढीची, हे केवळ झाले कारण नियंत्रित भाडेवाढ होण्याकरिता आवश्यक असलेले चलनच सरकारकडून देशात उपलब्ध नव्हते. म्हणूनच या भाववाढीला अर्थशास्त्रातील मुख्य नियम : मागणी आणि पुरवठा यातील तफावत लागू होत नाही. कारण मागणी आणि पुरवठा कायम राहूनही केवळ चलन रद्द झाल्याने बेसुमार भाडेवाढ करणे अपरिहार्य झाले. या प्रश्नाकडे त्या वेळी कम्युनिस्ट पक्षानेही जास्त लक्ष दिले नाही. या भाडेवाढी वरून काही प्रश्न विचारले असता ह्याच डॉ मनमोहन सिंग यांनी मूळ मुद्द्याला बगल देऊन त्यावेळी भारतातील जनता आजकाल जास्त खात सुटली आहे असे विचार मांडले होते. कांग्रेस प्रवक्ता आणि अभिनेता राज बब्बर याने मुंबईत १२ तर दिल्लीत ५ रुपयात आजही भरपेट जेवण मिळते आहे असे बेताल वक्तव्य केले होते. बर सध्या पोळीचे आणि केळ्याचे उदाहरण पहिले असता. आठ आण्याची पोळी १ रुपया झाल्यानंतर ती सरळ चार आठ आणे न वाढता एक एक रुपयांनी वाढत आज चक्क ७ रुपयावर येऊन ठेपली आहे आठ आण्याचा २००८ चा मूळ भाव पकडून झालेल्या वृद्धीचे मूल्यमापन केले असता चक्क पोळीच्या किमतीत १४ पट वाढ झाली आहे. गरिबांचे अन्न असलेले केळे ५० पैशावरून आज ५ रुपयांवर, २.५० पैशाचा वडापाव १५ रुपयांवर ६० पैशाचा सामोसा आज १५ रुपयांवर ६ रुपयांचे इडली सांबर ४० रुपयांवर २ रुपयांचे सँडविच ३० रुपयांवर उपमा / पोहे ५ रुपयांवरून २५ ते ३० रुपयांवर अशी भीषण भाववाढ झाली. हातावर पोट असलेल्या जनतेला भाववाढीला तोंड द्यावे लागत आहे. त्यातच २०११ मध्ये एका दिवशी रु ४० खर्च करणारे गरीब नाहीत असे दस्तुरखुद्द तत्कालीन अर्थमंत्री मा श्री चिदंबरम यांनी जाहीर केले तेंव्हा जनतेची तळ पायाची आग मस्तकात गेली. अर्थशास्त्राच्या मूळ नियमानुसार कोणतीही भाववाढ हि त्या त्या वास्तूच्या मागणी आणि पुरवठा या मध्ये निर्माण होणाऱ्या तफावतीमुळे होत असते.
पण सर्वसामान्यांना दररोज आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी लागणाऱ्या बारीक सारीक जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढण्याचे कारण मात्र आगळे वेगळेच होते आणि ते म्हणजे चार आठ आण्याचे चलनच रद्द करण्याचा डॉ मनमोहन सिंग सरकारचा निर्णय. बर हे करताना अंत्तरराष्ट्रीय स्तरावर रुपयाचे अवमूल्यन करण्यासही हे सरकार कचरले नाही. त्यातूनच या प्रगतसनशील देशाच्या कामगारांचे, सरकारी कर्मचाऱ्यांचे उदार हस्ते ५ वा ६वा पुढे ७ वा वेतन अयोग्य लागूंकरून पैशाचा पुरवठा करीत भाववाढीच्या आगीत तेल ओतण्याचे व सार्वत्रिक लूट करणारे डॉ मनमोहन सिंग जेव्हा हे सर्व सोयीस्कररीत्या विसरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडतात तेंव्हा त्यांच्या बद्दलचा एक व्यक्ती म्हणून असलेला उरलासुरला आदर गाळून पडतो आणि प्रचंड संताप मनात उमटतो.
नवल वाटते ते प्रसार माध्यमांचे ९ नोव्हेंबर १६ च्या नोटा बंदी पासून ते नोटा बदली पर्यंत मोदी सरकारला टीकेचे धनी करीत एकसुरी राग आळवत आहेत. आपला देश जो जगातली सर्वात मोठी लोकशाही मनाला जात असताना याचा एक महत्वाचा स्तंभ असल्याचे भान ठेऊन प्रसार माध्यमांनी वागणे अपेक्षित होते पण तसे झाले नाही. मोदींच्या नोटबंदीमुळे भारतीय अर्थवावस्थेला लागलेल्या आणि काँग्रेसने जपलेल्या काळ्या पैशाच्या किडीचे समूळ उच्चाटन होण्याच्या प्रक्रियेत या पुढे प्रसारमाध्यमानी आपली जबाबदारी ओळखून बातम्यांचे संपादन केले पाहिजे. जनतेचा संपूर्ण पाठिंबा, निष्प्रभ विरोधीपक्ष, काळ्या पैशाच्या चिंतेने बेजार समाजकंटक असे खरेखुरे सुधारणावादी व भारताच्या भविष्यातील अर्थक्रांतीची पाऊलवाट प्रशस्त करणाऱ्या या निर्णयाचे सर्व थरातून होणारे स्वागत हेच या योजनेचे यश म्हणायचे.
या मुळे मोदी सरकारचे "अच्छेदिनचे" स्वप्न प्रलंबित होण्याचे मूळ कारण हे चवली पावली बंद होण्याने झालेली बेसुमार महागाई आहे. या महागाईने भारतातील कर्मचारी आणि कामगारांचे पगाराचे स्थर उंचावले. कृषी प्रधान देशाच्या कृषी क्षेत्राला या पगारवाढीचा सर्वात मोठा फटका बसला. कृषी कामगारांचे वेतन वाढून कृषी उत्पनात घट झाली. शेतकऱ्यास कामगार ठेवणे कठीण होऊन बसले. शेतमजूरांच्या पगारावर आधारभूत असलेल्या शेतमालाच्या किमती बाजारात तग धरू नाहीश्या झाल्या. कृषी प्रधान देशाला धान्यवस्तू आयात कराव्या लागल्या तसेच वाढलेल्या पगारानी आपली निर्यात महागडी केली.
समाजकारण करत जमवलेली अटलजींच्या सरकारने सुपूर्त केलेली परकीय चलनाची गंगाजळी आटू लागली. त्यातच कांग्रेस सरकारने सन २००४ ते २००८ च्या काळात १००० रुपयांच्या दुप्पट नोटा चलनात आणून कृत्रिम चालनफुगवट्यास वाट करून दिली व निर्माण झालेला पतपुरवठा रिअल इस्टेट क्षेत्रात किमती वाढू देऊन गिळंकृत करण्यात आला. आजही कोणत्याही गोष्टींच्या वाढलेल्या किमती कधीही खाली येऊ शकत नाहीत यावर ठाम विश्वास असलेला वर्ग मोठ्याप्रमाणावर आपल्या देशात मौजूद आहे आणि तोच आहे " अच्छेदिन ' येण्याच्या वाटेतील मुख्य अडसर. वाढत्या पगाराच्या (wage war) या युद्धात आपल्याकडे वस्तू निर्मतीवर (manufacturing ) फार विपरीत परिणाम झाला आहे. अगदी परवा परवा १४००० हजार कामगारांची कपात करण्याचा लार्सन अँड टुब्रोचा निर्णय याचीच निष्पत्ती आहे.
चायनीज वस्तूं वर बहिष्काराच्या घोषणा व बातम्यांची अंमलबजावणी करण्याचे मूळ आहे कि या बेसुमार भाववाढीमुळे ( अपरिहार्य पगारवाढीमुळे) आपण वस्तू निर्मितीत लागणाऱ्या पगाराचा अडसर यामुळे जागतिक स्तरावर आपण निर्माण करीत असलेल्या वस्तूंच्या किमती स्पर्धेत टिकत नाहीत हेच खरे. अन्न वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा वाढीव पगारात भागविण्यात जनता मेटाकुटीला येत आहे. अन्न धान्यातील भाववाढ हि चवली पावलीच्या रद्द केल्याने झाली तर निवारा - पायाभूत सुविधांमधील भाववाढीचे कारण हि कांग्रेसने आपल्या सरकारच्या काळात छापलेले व चलनात सोडलेल्या अतिरिक्त ५०० आणि १००० च्या नोटा होत. म्हणून काँग्रेसचा " आक्रोश दिन " साजरा करताना केवळ नेते मंडळी दिसून आली कार्यकर्त्यांचा पत्ताच नव्हता. मोदींनी याच मुळावर घाला घातला आहे. एक गमतीदार लॉजिक सांगितले जाते १२३ कोटीच्या देशात केवळ ३ टक्के जनता श्रीमंत आहे व संपूर्ण देशाचा पैसे त्याचे कडे आहे. त्यामुळे ९७ टक्के गरिबांना श्रीमंत करण्यापेक्षा ३ टक्के श्रीमंतांना गरीब केल्यास त्यांचे धन सरकारकडे जमा होऊन ते ९७ टक्के जनतेला जन धन, अटल पेन्शन, मनरेगा, प्रधान मंत्री ग्राम सडक योजना आश्या विविध योजनांच्या माध्यमातून लाभ देऊ शकतात. व्याज दर कपात होऊन गृह कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या जनतेला दिलासा देण्यात येईल. प्राप्तिकराच्या दारात सुसूत्रता आणून तो सुसह्य होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मालमत्ता क्षेत्रात काही बंधन येऊन त्यातील गैरकारभाला अटकाव निर्माण होऊ शकतो. जवळ पैसे (cash) बाळगण्यावरही बंधने येऊन म्हणजे त्याच्या सुरक्षेची हमी काढून घेऊन प्रवृत्तीला अटकाव होऊ शकतो.
शेवटी एक चहावाला देश बदलू पाहतोय त्याच्या साठी गरज आहे ती जनतेने एक एकसाथ कटींग चहाचा ग्लास उचलून एक मुखाने "चिअर्स" म्हणण्याची. एवढेच ........
महेंद्र काशिनाथ मोने, ठाणे
पाऊस पाहिजे?
तापमान कमी पाहिजे?
स्वच्छ हवा, पाणी पाहिजे?
जमिनीत पाण्याची पातळी वाढली पाहिजे?
इतर ब-याच गोष्टी आपल्याला पाहिजे?
कश्या मिळतील?
खालील आकडेवारी वाचा. विचार करा.
दरडोई झाडांचे प्रमाण :
१.कॅनडा : ८९५२ झाडे
२.रशिया : ४४६१ झाडे
३.अमेरिका : ७१६ झाडे
४.चीन : १०२ झाडे
५.(महान ) भारत : २८ झाडे
जगातील सगळ्यात कमी दरडोई झाडांचे प्रमाण आपल्या देशात आहे.
" वसुंधरा दिनानिमित्त " हे प्रमाण आले आहे.अत्यंत दयनीय परिस्थिती आहे.वॉर फुटिंगवर झाडे वाढवण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत,अन्यथा आपल्या पुढील पिढ्यांचे जगणे अवघड होईल आणि त्याला जबाबदार आपल्या व मागील पिढ्यांना धरण्यात येईल.
बघा वेळीच जागे व्हा
झाडे लावा
झाडे जगवा
पाणी जपुन वापरा
जागर पाण्याचा निसर्गाच्या रक्षणाचा
आता तरी जागे व्हा !!
मागील प्रत्येक १० वर्षांपूर्वी 35 ते 40 अंश से असलेले तापमान आज ४3पार केले आहे.
पुढील प्रत्येक ५:५ वर्षात ४५:५० नंतर ६० अंश से पर्यंत जाईल
तेव्हा अशी रडायची वेळ येईल कि आहे ती झाडेही सुकतील. तुमचा २२ हजारांचा ऐसी तुम्हाला दगा देईल . दिल्लीवाले पण बुलेट ट्रेनने पानी पाठवणार नाहीत. आपला जिल्हा हा वाळवंट व्हायला
वेळ लागणार नाही..
रडू नका लक्ष्यात असुद्या
तमाम नागरिकांना जाहिर आवाहन ; कृपया जे करायचे ते स्वत:च करा.
१.येत्या पावसाळ्यात प्रत्येकाने ५ झाडे लावा
३ वर्ष पोटच्या मुलासारखे
संगोपन करा.
२. पानी वाचवण्याचा संदेश प्रसार करा. प्रत्येक धरणांचा गाळ काढण्यास
मदत करुन पाण्याची पातळी वाढवण्याचा प्रयत्न करा
५ वर्षात 2 कोटी 50 लाख झाडे
मनापासून विचार करा
सर्वांनी एकत्र या हायवे, मोकळ्या जागा वाटून घ्या. दर रविवारी घर सोडा, एक दिवस पर्यावरन,संवर्धनासाठी द्या.
सैराट चे message पाठवण्यापेक्क्षा हा १०० वेळा पाठवा.सुखी व्हाल..
Copyright © 2025 | Marathisrushti