वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
।।गुहाग्रजाय नम:
अपामर्गपत्रंसमर्पयामि।।
ह्याचे ०.३३-१ मिटर उंचीचे क्षुप असते.काण्ड सरळ किंवा शाखायुक्त असतात.पाने २.५-१२ सेंमी लांब व रोमयुक्त,खरखरीत,मोठी व वाकलेली असतात.फुले पांढरी/ हिरवी असतात.फळ बारीक,लांबट धुरकट व त्यातून तांदळासारखे दाणे येतात.
ह्याचे उपयुक्त अंग आहेत मुळ,पाने,पंचांग,तंण्डूल /बिया.
आता आपण ह्याचे गुणधर्म पाहूयात:
ह्याची चव तिखट,कडू असून हे उष्ण असते.गुणाने हल्के,रूक्ष,तीक्ष्ण असते.
कफ व वात दोष कमी करते व पित्त वाढविते.
आता ह्याचे उपयोग थोडक्यात जाणून घेऊयात:
अंगास खाज येत असल्यास आघाड्याचा काढ्याने स्नान करावा.
आघाड्याच्या क्षाराचा लेप हा किरल्या/ कुरूप पायांवर येणारे कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.
दंतरोग अर्थात दातांच्या दुखण्यात आघाड्याच्या काढ्याच्या गुळण्या करतात.
आघाड्याचा क्षार हा अम्लपित्त कमी करतो.
मार लागुन सुज आल्यास आघाड्याच्या पानांचा लेप लावतात.
अति भुक लागत असल्यास ज्याला आपण भस्मक रोग म्हणतो त्यात आघाड्याच्या बियांची खार उपयुक्त आहे.
सर्दी,खोकला,दमा ह्यात आघाड्याचे चुर्ण मधासोबत चांगले काम करते.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर,
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
August 2, 2017
“काश्मीर पर्यटना साठी नको!” अशी मागणी जर काश्मीर मधल्या नागरिकांनी केली तर..? ही चळवळ मला थोडी अशीच वाटली, कारण जे ‘गंगा’खेड गंगेवरच्या “विधी” साठी ओळखले जाते, गंगाखेडची ४०% इकॉनॉमी ही ‘गंगे वरच्या विधी’ वर अवलंबून आहे तिथेच देहदान चळवळ फोफावत आहे! एखादे देहदान झाले की त्या घरचे लोकं गंगेकडे फिरकणार सुद्धा नाहीत.!!!!
September 28, 2019
प्रत्येक यंत्रणेत अनेक पातळ्यांवरचं व्यवस्थापन सांभाळणं हा मोठा कौशल्याचा आणि तंत्रशुद्धतेचा भाग असतो आणि रेल्वेबाबत तर, देशभर ठरलेल्या वेळेत, ठरलेल्या मार्गांवर रेल्वे धावती असणं आणि कोणती गाडी कोणत्या स्टेशनामध्ये किती वाजता येते आहे, जाते आहे हे प्रवाशांना माहीत असणं, असा प्रवाशांप्रतीच्या व्यवस्थापनाचा दुहेरी भाग ठरतो. आज प्रवाशांपर्यंत गाडीची माहिती पोहोचवण्याचं काम उद्घोषक करतात, पण रेल्वेच्या सुरुवातीच्या पंचाहत्तर ते शंभर वर्षांच्या कालावधीत उद्घोषक हा प्रकारच नव्हता. टाईम टेबलचा मोठा लाकडी बोर्ड एखाद्या प्लॅटफॉर्मवर असे. त्या बोर्डावर ‘गाडी थांबणाऱ्या' व 'न थांबणाऱ्या' स्टेशनांची नावं काळ्या व लाल अक्षरात दिसत, परंतु कित्येकदा ती स्टेशनची नाव बरोबर फिरतही नसत; त्यामुळे सर्वच कारभार रामभरोसे होता. तेव्हा दूर पल्ल्याच्या गाड्यांच्या आगमन-निर्गमनाच्या वेळा व प्लॅटफॉर्मसचे क्रमांक अचूकपणे सांगणारी एकमेव व्यक्ती असे व ती म्हणजे लाल डगलेवाला हमाल.
उद्घोषकाची पहिली सुरुवात १९५० मध्ये बोरीबंदर स्टेशनावरील लोकल सुटण्याच्या कक्षात सुरू झाली. नवेपणाच्या त्या दिवसांत घोषणांचे आवाज इतके भसाडे येत, की त्या उद्घोषणा ऐकवत नसत व काहीही कळतही नसे. काही वेळा तर लोकल गाडीची घोषणा गाडी निघून गेल्यावर होत असे. हळूहळू त्यात सुधारणा होत गेल्या आणि प्रवाशांचा त्या घोषणांवर विश्वास बसू लागला.
या कामाकरता खास करून चुणचुणीत व स्पष्ट बोलणाऱ्या मुलींची निवड झाली.
घोषणा कशा दिल्या जाव्यात याचं पद्धतशीर शिक्षण त्यांना देण्यात आलं. त्याकरता मार्गदर्शक पुस्तिका काढण्यात आली. लाऊडस्पीकर यंत्रणेत आमूलाग्र सुधारणा झाल्यानं आवाज स्पष्ट व दूरपर्यंत ऐकू येऊ लागले.
दूर पल्ल्यांच्या गाड्यांची संख्या खूप वाढली व त्यांना अनेक डबेही जोडले जाऊ लागले. या बदलांबरोबर लोकांना सोईचं व्हावं म्हणून 'इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले'ची यंत्रणा सुरू केली गेली. त्यामुळे सर्व स्टेशनांतही एक सुसूत्रता आली. प्रवास सुखकर होऊ लागला. काही वर्षांपूर्वी आपला डबा शोधताना घाम फुटत असे. आता मात्र गाडीचं नाव, गाडी क्रमांक, डब्याची येण्याची जागा हे सर्व गाडी स्टेशनात शिरण्याआधी जवळजवळ दहा मिनिटं आधीपासून सर्व मोठ्या स्टेशनावर पाहावयास मिळतं. त्यामुळे डब्यासमोर गर्दी-गोंधळ अजिबात होत नाही.
आता उद्घोषकांचा दर्जाही सुधारलेला आहे. मध्यवर्ती उद्घोषण केंद्र (Central Announcement Centre) मुंबई व्ही.टी. येथून थेट कल्याणपर्यंत जोडलेलं असल्यानं कोणती गाडी उशिरा येणार आहे, तिला किती वेळ लागेल, हे सर्व उद्घोषकामार्फत प्रवाशांना कळविलं जातं. भारतभरातील हजारो स्टेशनांवर हे उद्घोषक फार मोलाची कामगिरी बजावीत आहेत. ही कौतुक करण्यासारखी बाब आहे.
डॉ. अविनाश वैद्य
July 19, 2022
वाढत्या शहरीकरणाच्या रेट्यात घराचे स्वप्न गरीबांच्याच नाही, तर मध्यमवर्गीयांच्याही आवाक्याबाहेर गेले आहे. मागणी खूप आणि पुरवठा कमी; त्यामुळे जिथे मिळेल, जशी मिळेल तशी जागा घ्या अशी आज परिस्थिती आहे.
December 20, 2023
"झटपट आनंद - तात्पुरत्या सुखासाठी भविष्यातील होणारा तोटा स्वीकारणे."
एखाद्याला डॉक्टरांनी सांगितले असते कि अंडी मटण एकदम बंद- बाहेरचं खाणं बंद फक्त साधे जेवण वेळच्या वेळी खा. ते पटलेलं असते, परंतु कुठूनतरी मिसळपावचा किंवा चायनीजचा वास येतो किंवा मित्रांच पार्टिचे नियोजन सुरु होतं. मग काय डॉक्टरांनी सांगितलेल हळूच बाजूला पडते नी आपोआपच पार्टीला हजेरी लागते. मग काय कसली शुगर नी कसला बीपी ?
दुसरे उदाहरण - उद्यापासून पहाटे लवकर उठून व्यायाम करण्याचं नियोजन असते पण सकाळी अंथरुणावरून उठावेसे वाटत नाही.
काही लोक तर म्हणतात कि "अलार्म बंद करून झोपाल्यावर रात्रीपेक्षापण चांगली झोप लागते "
असे करता करता व्यायामाचे राहूनच जाते.
हि दोन जशी perfect उदाहरणे आहेत तशीच आणखीन काही आहेत.
गरजेशिवायचा अतिरिक्त खर्च करणे - हे तुमच्याकडुन नकळत होते.
उदा. तुम्ही एक जाहीरात बघता 100 Megapixel चा कॅमेरा ज्यात 2000 पट optical zoom ची फ़ॅसिलिटी आहे. किमतीवर २०% सुट आणि ”मासिक सुलभ हप्त्यावर उपलब्ध” असे कळताच आपल्यातला फोटोग्राफ़र जागा होतो.
किंवा "५२ इंची LED TV वर १५% डिस्काउंट, सोबत होमथिएटर फ़्री" अशी जाहिरात बघताच आपल्याला जाणवू लागते कि आपली जूनी टिव्ही बदलायची वेळ आली आहे. मग काय अशी खरेदी नकळतच होवुन जाते.
असे करताना बऱ्याचदा अशा वस्तूंची खरेदी खरंच गरजेची आहे का? हे आपण तपासत नाही. सर्व शेजारी, पाहुण्याकडे आहेत किंवा सगळे स्टाफ मेंबर घेत आहेत म्हणूनपन काही लोक खरेदी करतात. याबाबतीत मात्र "जगाबरोबर राहिलं पाहिजे" असे त्यांना वाटते
नवीन मॉडेल आले कि लगेच TV किंवा मोबाईल बदलले जातात.
यात जाणाऱ्या पैशाचा विचार त्यांच्या मनाला शिवत नाही याचे कारण म्हणजे तात्पुरते समाधान -Instant Gratification.
People
spend money,
to buy things,
to impress the people's,
People's- who they never like.
यामुळे होतं काय की " गरज नसलेल्या वास्तूसाठी जेव्हा जास्त पैसा खर्च होतो तेव्हा गरजेच्या गोष्टीसाठी पैसा उरत नाही.
या दसरा आणि दिवाळीच्या सणात अशाप्रकारच्या तात्पुरत्या सुखाच्या जास्त नादी लागू नका. तुमचे आरोग्य, कुटुंब, धन-संपत्ती यांच्याबद्दलचे निर्णय घेताना आपण "INSTANT GRATIFICATION" च्या ट्रॅपमध्ये अडकलेले नाही ना याची खात्री करा.
फुल्ल प्लॅनिंग असणे हाच यातून वाचण्याचा मार्ग आहे.
Forwarded post from Facebook
October 11, 2016
From the time line of श्रीनिवास चितळे
अनुपमा ---"काका ,मी आधीच तुम्हाला सांगून ठेवते कि मला लग्नानंतर पुणे सोडून कुठेही जायचं नाही ,नो कर्जत ,नो कोकण ,नो मुंबई ."
"अग तू कुठे बघितल आहेस का ? कोणी आवडलाय का ? मला सांग हवतर मी जाऊन विचारतो .
"तस काहीही नाहीये काका ,पण मला पुणे सोडायचं नाही आणि आई पाठी लागली आहे कि देवगडच एक स्थळ आहे ,मुलगा इंजिनियर आहे आणि इथली बजाज मधली नोकरी सोडून तो गावाला शेती ,बाग बगिच्या पाहायला स्वतःहून गेला आहे म्हणे ".
"अहो,भावोजी बघा हो ,दारी १००० कलम ,सुपारीच्या ५ बागा ,शेती ,मुंबई पुण्याच्या सर्व सुख सोई आहेत आणि हि जायचं नाही म्हणते ".
"अहो वाहिनी सोडून द्या ना ,तिला नाहीना जायचं ,आणि त्याला छपन्न मुली मिळतील आणि हिला ५६ उत्तम स्थळ येतील ,अहो आपली एवढी हुशार मुलगी ,कम्प्युटर इंजिनियर त्या शिवाय लेखिका ,कवयत्री ."
"अहो त्या मुलाने आणि त्याच्या आईने हिला सरोज वन्सनच्या शेखरच्या लग्नात पहिली आणि त्यांना हि खूप आवडली आहे ,मी काय म्हणते एकदा आपण देवगडास जाऊन तर येऊ ,त्या मुलग्याशी हिला बोलू दे ,तिच्यावर जबरदस्ती नाही पण सहज एक कोकण ट्रीप म्हणून जायला काय हरकत आहे ? तिला नाही आवडला तर नाही ."
"अनुपमा हा वाहिनीचा मुद्दा मला पटला ,अग बघून घे कि ."
"ठीक आहे ,आलिया भोगासी असावे सादर "म्हणत बाई तयार झाल्या .
आम्ही कोकणात गेलो ,उत्तम स्वागत .तिच्या सासऱ्यांच्या "ये ग मनी माऊ ,अग तुला पाहिल्यावर अनिकेतनेच तुला हे नाव ठेवलय .आणि हे बघ मस्त दोन दिवस फिरा ,बागेत जा ,समुद्रावर जा ,खा प्या मजा करा आणि तरीही तुला पसंत नाही पडल तर नाही म्हण बाळा ."या गोड बोलण्यानेच अनुच्या चेहऱ्यावरचे भाव थोडे बदलले ,त्या दोघांनी खूप गप्पा वगैरे मारली आणि येताना गाडीत मला अनु म्हणाली "काका बोका आवडला,आणि मग पुणे येई पर्यंत त्याची आजी ,आई ,सासरे ,धाकटा दीर ,एक वन्सबाई ,बाग हे कित्ती कित्ती मस्त आहे याची सहस्र आवर्तन झाली .
लग्न झाल ,हि माझी तशी लांबची पुतणी , नंतर बरेच वर्ष गाठभेट नाही ,कधीतरी फोनवर बोलण व्हायचं ,तीच सारख एकच टुमण "काका ,काकू या कि एकदा पुतणीच राज्य बघायला ."
बरेच वर्षांनी योग आला ,गाडीतून उतरलो तर काकूला आणि मला मिठी मारून रडून झाल ,"काका तुम्ही इकडे ट्रीप सारख यायचं सांगितल नसतत ,तर मी खरच स्वर्गाला मुकले असते ,thank you ,thank you ,thank you काके काकू करून झाल .
"अगो बाई ,एक बाई रुसल्यात का आमच्यावर ,दोन दिवसात इकडे फिरकले नाही म्हणून,"बाप रे किती तो शिष्ठपणा अगदी पहिली कळी उमलली म्हणून एवढ नकोय काही ,माहित्ये पाहिलट करीण आहेस ती ,"सुखली ग ताई माझी ,दोन दिवसात पाणी नाही का मिळाल ,आज सांगत्ये हो वामनला इकडे पाट फिरवायला ."ओ पोफळे वाहिनी ,तुम्ही जीव धरणार कधी ,जरा वारा आला को १८० अंशात डुलता ."
मी आणि हि बघतच राहिलो ,"अनु किती सुरेक बोलत्येस झाडांशी ?अग कोणी शिकवलं तुला हे ?.
"काका ,आजे सासूबाई होत्याना त्या सुरवातीला मला घेऊन या बागा मधून फिरायच्या ,झाडावरून एवढ्या प्रेमाने हात फिरवत बोलायच्या कि ती झाड अगदी झिम्माड होऊन जायची आणि खर सांगते काकू ,आजी बागेत शिरण्यापूर्वी पेक्षा त्या अस झाडांशी बोलून गेल्या कि झाड टवटवीत व्हायची ."
मध्यंतरी माझ्या सासर्यांनी म्हणजे बाबांनी एक गोष्ट सांगितली कि म्हणे एक आदिवासी जमात आहे ,त्यांना एखाद झाड काढून टाकायचं असल कि ते झाड तोडत नाहीत ,सगळे गावकरी जमून त्या झाडाला मोठमोठ्या आवाजात शिव्या देतात ,मग ते झाड अपोआप मरून जात ."
आमच्या सासूबाई सांगतात झाड ,गुर यांच्याशी प्रेमाने बोलाव ,त्यांच्या पाठीवरून हात फिरवीत कौतुक कराव कि ती झाड देता किती घेशील दो कराने अस दान देतात .
आम्ही मंत्रमुग्ध होवून नुसत ऐकत होतो ,तेवढ्यात सासूबाई म्हणाल्या झाल्या का बागा फिरून आणि मालकिणीने केलेलं कौतुक ऐकून ? अनु तू बस हो काका काकूशी गप्पा मारीत मी बघत्ये जेवणाच .
मग .
एवढ्यात सासरे आले आणि गप्पात सामील झाले ."बाबा उद्या आपल्याला समुद्रावर पोहायला जायचं आहे ,मी काही ऐकणार नाही ".
"ते म्हणाले अग मी कशाला ?नवऱ्याला घेऊन जा ,माझ्यावर नको तुझी दादागिरी ".
अहो त्याला वेळ असेल तर ना ,साहेबांचा काहीतरी नवीन कलमाचा प्रयोग चालू आहे ,उद्या दापोलीस जायचं होत पण आता काका आलेत म्हणून पुढे ढकलली .
"अनु ,पोहायला कधी शिकलीस ?"
आज्जे सासूबाई आणि बाबा यांची पहिली अट होती कि पोहायला शिकायचं ,मी भीत होते पण बाबांनी हट्टच धरला कि यंदा गणपती विसर्जनाला समुद्रात तू गणपती नवऱ्या बरोबर घेऊन जायचीस म्हणून ,मग काय मारली उडी आणि घाबरल्ये मग यांनी माझी वेणी धरून वर घेतली आणि अशी घट्ट बिलगल्ये त्यांना ,तेव्हा हे हळूच म्हणाले अशी बिलगणार असलीस तर सतरा वेळा विहिरीतून वर काढेन .
"काका ,सासऱ्याच्या समोर काय पुराण लावल आहे ते ऐकलत ना ?"सासरे हसून म्हणाले तशी पटकन म्हणाली "बाबा you are not my सासरा only ,तुम्ही मित्र आहात माझे ".
माझ्या डोळ्यातून अश्रू यायचे बाकी होते .
तेवढ्यात तीच पिल्लू आल आणि म्हणाल "आई मी शिपण्याला जाऊ ?'
फावड उचलत तरी का ?उगीच पाटात पाय फिरवत खेळत बसायचं ,सर्दी होईल ,काही नको जायला ."
तेवढ्यात सासूबाई पोह्याच्या बशा घेऊन बाहेर आल्या आणि म्हणाल्या "गवयाच्या पोराने मोठा आ लावला तर घसा दुखत नाही अनु ,जाऊ दे त्याला ."
"तरी काका अनुची गंमत सांगत्ये ,पहिल्यांदाच पावसात मनसोक्त भिजली ,एवढा पाऊस पुण्यात कधी बघितलेला नसेल ,आणि आली शिंकत आणि कोमट अंग घेऊन ,तेवढ्यात तिचा नवरा हसला आणि मग काय ग बाई तो सदाशिवपेठी फणकारा .तिला औषध दिल आणि दोन दिवसांनी पुन्हा मोठी सर आली तशी गोधडी लपेटून बसलेली ,तेवढ्यात हे आले आणि म्हणाले चला सुनबाई पावसात ,मनसोक्त भिजा ,अग म्हणजे इथल्या पावसाला पण कळत कि हे आपल माणूस आहे ,दोन तीन वेळा भिजलीस कि पाऊस मग सर्दी वगैरे नाही फक्त वरदहस्त देतो ."
तीन दिवस हे सगळ ऐकत होती ,जावई आणि अनु त्यांच्या नवीननवीन योजना ,शेतीतील ,बागेतील एकेक प्रयोग दाखवीत होते,गोठ्यातील गोधन दाखवीत होते .मी आणि हि फक्त अचंबित .तेवढ्यात दोन खड्डे खणलेले आणि दोन डाळिंबाची रोप उभी होती तिथे अनु घेऊन गेली आणि म्हणाली "तुमच्या दोघांच्या हस्ते वृक्षारोपण आणि आज इथेच बागेत जेवण असा बेत आहे ,"
निघताना मी विचारल "अनु पुण्यास कधी फेरी ?'
"काका ,खर सांगू ,इथून पाय निघत नाही ,दोन दिवस नसले कि या आमच्या लाडूबाई म्हणजे वेली रे रुसतात ,मला आठवण आली कि मीच गाडी पाठवून आई ,बाबांना इकडे बोलवून घेत्ये आणि आता काका तू हि निवृत्त झाला आहेस ,तुला हवेतेव्हा कळव मी तुमच्यासाठी गाडी पाठवून देईन ."आणि एकदा सगळ्या मुलांना देखील पाठवून द्या बघा म्हणाव आमच कोकण ".
-- श्रीनिवास चितळे
-- संकलन : अशोक साने
फेसबुक, WhatsApp यासारख्या माध्यमातून दररोज येणारे चांगले लेख तुमच्यासाठी शेअर करतो..
June 13, 2017
सातवा बरोबरीत सुटलेला एकदिवसीय सामना आणि एक वर्षाहून अधिक काळ १३३ हून अधिक सरासरी राखणारा अँडी फ्लॉवर.
November 17, 2010
विष्णूंचा तिसरा अवतार वराह होय. याची जयंती भाद्रपद शुद्ध तृतीयेला असते. हा अवतार हिरण्याक्ष नावाच्या असुराला मारण्यासाठी झाला असे उल्लेख आढळतात. याचे दुसरे नांव यज्ञवराह असेही आहे.
September 17, 2023
झाडांच्या बिया आपण नेहमीच पाहतो. पण त्यांतील दिव्यत्व आपल्याला जाणवत नाही. त्यांत बंदिस्त असलेल्या सांकेतिक आनुवंशिक आज्ञावल्या निसर्गाला वाचता येतात.
December 23, 2016
आज प्रमुख शहरांमधील रोज वाढणारी दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या आणि पर्यायी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था लक्षात घेता ती तोकडी पडते की काय असे चित्र बघावयास मिळते किंवा शहरातील नागरिकांस सर्व दृष्टीने सोयीची नाही असे स्पष्ट होते. तरी बरं मुंबईतील बहुसंख्य नागरिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग करून घेतात, नाही तर…! आजच्या घडीला शहरात वाहनांची एवढी कोंडी होते की एखाद्या ठराविक स्थानापर्यंत पोहचण्यास विलंब होतो.
August 2, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti