वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
अक्षय तृतीयेला कृत युग संपून त्रेतायुग सुरू झाले असे सांगितले जाते. या दिवशी दुसऱ्या युगाला सुरुवात झाली होती.ही समजूत जुनी असली तरीही आपण यातून काही शिकण्यासारखे नक्कीच आहे.केशवसूतांच्या 'जुने जाऊ द्या मरणालागुन' या उक्तीप्रमाणे आपणच घालून दिलेल्या चौकटी, रूढी-परंपरा, रीतीरिवाज वेळोवेळी बदलत्या काळाच्या कसोटीवर तपासून घ्यायचे काम समाजपुरुषाने करायचे असते.त्यामुळे वर्षभर आलेले अपयश झटकून नव्या जोमाने अभ्यासाला लागा.
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नांगरलेल्या शेतजमिनीचे मशागत करण्याचे काम अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पूर्ण करायची प्रथा आहे.कोकणात या दिवशी शेतात बियाणे पेरण्याची प्रथा आहे, देशावर नाही. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बियाणे पेरण्यास सुरुवात केल्यास त्या बियाणांपासून विपुल धान्य पिकते व कधीही बियाणाला तोटा पडत नाही, अशी समजूत आहे.त्यामुळे विद्यार्थी मित्रहो, आजपासून पुन्हा अभ्यासाला लागा.आज केलेला अभ्यासाला क्षय लागणार नाही.कारण हा सन अक्षय आहे.
अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आळी करून लावलेल्या फळबागा भरघोस फळ उत्पादन देतात अशी समजूत आहे.म्हणूनच संकल्प करा आज मी स्वत:ला अभ्यासात रुजवून घेणार आहे.व यंदा यशाची गोड फळे नक्कीच चाखणार आहे.
आज फिरोजखान यांची पुण्यतिथी व आजच विनोद खन्ना यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली असून, त्यांची जागा कधीच भरून निघू शकणार नाही. १९६८ साली चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या विनोद खन्ना यांनी १४० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांनी चित्रपटांमध्ये खलनायक आणि सहकलाकार म्हणून जास्तीत जास्त भूमिका साकारल्या होत्या. सुरुवातीच्या काही चित्रपटांमधून ते स्वतःची ओळख निर्माण करू शकले नाहीत. फिरोज खान यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘कुर्बानी’ या चित्रपटाने त्यांना प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटात फिरोज खान यांनी दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता या तिहेरी भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटात फिरोज खान यांनी दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता या तिहेरी भूमिका साकारल्या होत्या. ‘कुर्बानी’ चित्रपटानंतर विनोद खन्ना आणि फिरोज खान यांच्यातील मैत्री अधिक घट्ट झाली. विनोद खन्ना आणि फिरोज खान यांनी कुर्बानी, शंकर शंभू, दयावान यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांचे कुर्बानी, दयावान सारखे चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड़ गाजले होते. त्या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. ते दोघे खऱ्या आय़ुष्यातही एकमेकांचे खूप चांगले मित्र होते आणि विशेष म्हणजे विनोद खन्ना यांचे निधन २७ एप्रिल २०१७ ला झाले तर फिरोज खान यांचे निधन बरोबर आठ वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजे २७ एप्रिल २००९ ला झाले होते. कुर्बानी या चित्रपटातील ईश्वर का दुसरा नाम दोस्ती है हा संवाद आज त्यांच्यासाठी तंतोतत खरा ठरला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक चार
जगण्यासाठी औषधं काम करत नाही. - भाग नऊ
विश्वासराव पानीपतच्या लढाईत मारला गेला. आता कोणावर विश्वास म्हणून ठेवायला नको, असे वाक्प्रचार आपण व्यवहारात वापरतो.
औषध देणाऱ्यावर पूर्ण विश्वास ठेवून औषध घेणं महत्वाचे असते, तसंच मी बरा होत आहे, बरा होणार आहे, हा स्वतःवरचा विश्वास देखील महत्वाचा असतो.
औषध सेवन करत असताना हा विश्वास मिळवण्यासाठी भाव निर्माण करणं महत्त्वाचा असतो.
औषधं जाह्नवीतोयं, वैद्यो नारायणो हरिः ।
...... श्रद्धय हरिकिर्तनम।
मी हे जे काही औषध घेत आहे, ते जणुकाही गंगोदक आहे, त्याने माझे सर्व रोग नष्ट होत आहेत, आणि "औषध देणाऱ्या वैद्याला, मी नारायण स्वरूपात पहातोय, मग त्याने दिलेले तीर्थ घेतल्यावर मला गुण का येणार नाही," अशी श्रद्धा हवी, म्हणजे साधे एचटुओ सुद्धा तीर्थ बनते.
अकाल मृत्यु हरणम्
सर्व व्याधी विनाशनम्,
विष्णुपादोदकं तीर्थे
जठरे धारयाम्यहम् ।
असा मंत्र आपण देवाचे तीर्थ घेताना म्हणतो, (असा म्हणावा, म्हणजे तसा भाव, कल्पनेने तयार करावा, म्हणजे आपण जे एचटुओ, दूध, पंचामृत, नदीचे, नळाचे पाणी पितो, ते जणुकाही प्रत्यक्ष भगवंताने दिलेले औषध आहे, असा भाव ठेवावा. ब्रॅण्डेड औषध आणि जेनेरीक औषध घेताना सुद्धा असाच भाव ठेवावा का, असा प्रश्न कृपया विचारू नये.
हे तीर्थस्वरूप औषध घेतल्यावर, माझा अकालमृत्यु टळणार आहे, सगळे व्याधी मुळातून नष्ट होत आहेत, म्हणून हे औषध स्वरूपात असलेले तीर्थ, मी माझ्या जठरात म्हणजे पोटात घेत आहेत. (आता मला काळजीचे काहीच कारण नाही. आता माझी काळजी घेणारा, सर्व शक्तीमान परमेश्वर माझ्याबरोबर असताना काळजी कशाला ? काळोख कितीही पडलेला असेना का, जर माझ्याकडे उजेड करण्याचे खात्रीचे साधन जर असेल तर काळोखाची भीती वाटायचे काहीच कारण नाही.)
आता, परमेश्वरच नाही, ही विकल्प भावना आपणच जर तयार करून घेतली असेल तर, तीर्थ काय, पाणी काय. ब्रॅण्डेड काय, जेनेरीक काय, कशानेच गुण येणार नाही. एक भक्कम आधार भक्तीचा हवा तर भीती नाहीशी होते.
"मेरे लिए दुवा करो,"
"प्लीज, प्रे फाॅर मी" असं सांगणारी मुसलमान ख्रिश्चन माणसे आपण अवतीभवती बघतो, पिक्चरमधे असे डायलाॅगदेखील आपण ऐकतो, पण "माझे आजारपण कमी होण्यासाठी तुम्ही, माझ्यासाठी देवाला सांगा", असं विश्वासाने सांगणारी माणसे कमी होत चालली आहेत.
केवळ औषध काम करत नाही.
हरबार दवा काम नही करती, कभी कभी दुवा भी काम करती है !
यालाच दैवं पंचमम् उत्तमम् असे म्हटलेलं आहे.
-- वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021
02362-223423.
27.04.2017
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे क्रमांक चार
जगण्यासाठी औषधं काम करत नाही - भाग आठ
औषध घेतलं पण गुणंच आला नाही. असं बऱ्याच वेळा होतं. असं का होत असेल. काही तरी चुकतंय, कुठेतरी चुकतंय, हे शोधून काढलं की दोष निघून जातो. कोणत्याही समस्या या याच पद्धतीने सोडवायच्या असतात. ही आयुर्वेदीय दृष्टी प्राप्त व्हायला हवी.
जसं आपली एखादी टुव्हीलर सुरूच होत नाहीये, बंद पडली आहे. तिची काय काय कारणं असू शकतात, याचा विचार करतो तेव्हा पहिलं कारण इंधन संपलेलं असणं,इंधनाचा दर्जा योग्य नसणं, इंधनामधे कचरा असणं, टाकीमधे असलेलं इंधन कार्बोरेटरला न मिळणं, कार्बोरेटरमधे कचरा अडकणं, कारबोरेटरमधे एअर येणे, दुसरं, बॅटरी संपलेली असणं, अन्य पार्टस मधे काहीतरी गडबड निर्माण होणं, सायलेन्सर साफ नसणं, अशी अनेक कारणांचा विचार एकाच वेळी करावा लागतो.
घरातलं उदाहरण घेऊ, पुरणपोळी योग्य लुसलुशीत न होण्याची कारण काय असतील, याचा नीट विचार केला तर अनेक कारणांचा शोध घ्यावा लागतो. जसं चणाडाळ योग्य प्रतीची नसणं, ती नीट न शिजणं, नीट वाटली न जाणं, शिजल्यावर कटाचे पाणी नीट निथळून न घेणं, नीट न ढवळता आल्याने पातेल्याच्या बुडाला शिजलेली डाळ करपणं, दुसरं गुळ चांगला नसणं, तो योग्य प्रमाणात न घेणं, त्याचा पाक योग्य न होणं, डाळीमधे एकत्र करताना योग्य त्या प्रमाणात योग्य त्या वेळी एकत्र न करणं, नीट न ढवळणं, तिसरं पीठंच चांगले नसणं, योग्य तेवढं तिंबलं न जाणं, त्या पीठात सढळ हस्ते तेल न घालणं, तिंबून झाल्यावर योग्य तेवढा वेळ जाऊ न देणं, तवा योग्य नसणं, विस्तव नीट नसणे, पोळपाट नीट नसणं, नीट लाटताच न येणं, तव्यावर पसरवणं, ती फिरवणं, परतणं,खमंग भाजल्यावर वाफ जाईपर्यंत पसरून ठेवणं, अतिरिक्त पीठ हळुवार काढून घेणं,तिची नीट घडी करून ठेवणं......इ.इ.
पुरणपोळीचा मनसोक्त आस्वाद घेता येत नाही, याची ही एवढी कारणं असू शकतात. ही अगदी वरवरची कारणे झाली, सूक्ष्म कारणांचा विचार केलेलाच नाही. इ.इ. अनेक कारणे जेव्हा लक्षात घेतली जातील, आणि ती जेव्हा दूर केली जातील, तेव्हा पुरणपोळी अगदी म न प सं त झालीच पायजे.
बरोबर ना !
अगदी हीच, अशीच कारणे, औषधं लागू न पडण्याची आहेत,
वैद्याचे निदान चुकणे, वैद्याकडून औषधाची निवड चुकणे, अनुपान सांगायला विसरणे, चुकणे, इ.
औषधे देणाऱ्या मदतनीसाकडून, औषध द्यायची वेळ चुकणे, चुकीचे औषध देणे, चुकीच्या वेळी देणे, औषध देताना विश्वासाने न देणे, वैद्याने सांगितलेले अनुपान न निवडता, स्वतःच्या मनाने त्याअनुपानात बदल करवून देणे, इ.इ.
रुग्णाने, दिलेले औषध पूर्ण मात्रेत न घेणे, अर्धे औषध वाटीत तसेच ठेवून पटकन वाटी धुवून टाकणे, गोळी घेतल्याचे नाटक करून, ती तोंडातच लपवून, चुळ भरण्याच्या बहाण्याने ती गोळी थुंकुन टाकणे, कंटाळत औषध घेणे, विश्वासाने न घेणे, "एवढी औषधे संपवली, आता ह्या एवढ्याश्या गोळीने काय होणारे" असा नकारात्मक विचार औषध घेताना मनात निर्माण होणे, इ.इ.इ.
औषधाचा दर्जा योग्य नसणे, खूप जुने (एक्स्पायर्ड) दळ गेलेले औषध वापरणे, जसे सांगितलेले आहे तस्सेच औषध न मिळणे, काही औषधांचा संग्रह हा विशिष्ट ग्रहणाच्या वेळी, विशिष्ट नक्षत्र असताना, विशिष्ट दिशेचे, विशिष्ट मंत्र म्हणून, त्या वनस्पतीला प्रार्थना करून, विशिष्ट विधी करून, तोडून संग्रहीत करायची असतात. वाळवताना सावलीत वाळवणे, कडक उन्हात वाळवणे, वाळवून झाल्यावर ती योग्य त्या ठिकाणी संग्रहीत न करणे, काही औषधे भाताच्या राशीत, काही जमिनीमधे पुरून, काही औषधे मधात बुडवून, काही औषधे लाकडी कपाटात, काही काचेच्या बरणीत ठेवायची असतात. तर काही औषधे तयार करताना सूर्य हवा, तर काही औषधे तयार करताना चंद्राचा प्रकाश त्यावर पडायला हवा, काही औषधे तयार करताना विशिष्ट मंत्र म्हटले असता, औषधांची कार्यशक्ती वाढते, इ.इ.इ.इ.
अबबबबब एवऽढीऽ कारणे असू शकतात, याला ग्रंथकार चिकित्सेचे चतुष्पाद असा शब्द योजतात. वैद्य, परिचारक, रूग्ण आणि औषध.
पाचवे कारण दैव अनुकुल असणे वा नसणे, हा दैववाद देखील आयुर्वेद मानतो.
हे परम्युटेशन काॅम्बीनेशन, ज्याचे जुळले त्याला औषधांचा गुण आलाच म्हणून समजा !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
26.04.2017
मुद्रा शास्त्रात आरोग्यासाठी वेगवेगळ्या मुद्रा सांगितल्या आहेत. त्यातील अपान मुद्रा फार महत्वाची आहे. हाताच्या अंगठ्याचे टोक आणि मधले बोट व अनामिका ह्यांची टोके एकत्र जोडली की अपान मुद्रा तयार होते. ही मुद्रा कोणत्याही वेळी व कितीही वेळ केली तरी चालते. दोन्ही हातांनी किंवा न जमल्यास एका हाताने केली तरी चालते. सध्याचे जीवन बघता असे दिसते की: पुरेसा व्यायाम नाही, वाहनांच्या सुविधेमुळे शरीराची हालचाल कमी होते, आहार शांतपणे मन लावून घेतला जात नाही, आहार गरजेपेक्षा जास्त घेतला जातो, भूक लागल्यावर घेण्याऐवजी वेळ झाली म्हणून भूक नसताना देखील घेतला जातो, चमचमीत पदार्थ चवीसाठी भूक नसताना खाल्ले जातात. अशा प्रकारच्या स्वैर वर्तनाने आपल्या शरीरात टॉक्सिन्सची भरपूर साठवणूक होते आणि आपले आरोग्य बिघडते.
अपान मुद्रा केल्याने शरीरातील कोणत्याही प्रकारच्या मलाचे, विजातीय द्रव्याचे निचरा होण्याची क्रिया सहज वाढते व शरीर शुद्ध होऊ लागते म्हणजेच निरोगी होण्याला मदत होते.
१. ही मुद्रा केल्याने शौच क्रिया सुधारायला मदत होते.
२. छाती कफाने भरल्यावर ही मुद्रा केल्याने कफ पातळ होऊन खाली जात असल्याची जाणीव होऊन छाती मोकळी होते.
३. अपचनामुळे जळजळ होत असल्यास ह्या मुद्रेने फायदा होतो.
४. कुठल्याही प्रकारची सूज उतरवायला मदत होते.
५. लाघवी साफ होण्यास मदत होते.
६. ही मुद्रा केल्याने गुडघ्यावरील सूज कमी होऊन गुडघे दुखायचे थांबतात असा बरेच जणांचा अनुभव आहे.
७. ही मुद्रा केल्याने हाय बी पी वाल्यांना फायदा झाला आहे.
८. एका गृहस्थांचा डावा पाय वर पासून खाल पर्यंत सुजला होता. मी त्यांना अपान मुद्रा करायला सांगितली. एक महिन्यानंतर त्यांनी येऊन पाय दाखवला. पायाची सूज पूर्णपणे उतरून दोन्ही पाय एकसारखे दिसत होते.
९. डास चावल्यावर तेथे आग होते. ती आग ही मुद्रा केल्याने थांबते असा माझा अनुभव आहे.
१०. एका गरोदर बाईंना आठव्या महिना संपल्यावर ही मुद्रा करण्यास सांगितले त्या बाईंची डिलिव्हरी नॉर्मल झाली. त्यामुळे त्या बाई खुश होत्या.
११. एका बाईनी ही मुद्रा केल्याने पित्ताचा त्रास गेल्याचे सांगितले.
१२. सोलापूरच्या एका बाईंनी फोन करून सांगितले की त्यांच्या पतीराजांचे क्रीयेटीनीन अठवड्यातून दोनदा डायलेसिस करूनसुध्दा गेले सहा महीने ११च रहात होत. तुमच्या पुस्तकांत दिल्या प्रमाणे मी गेले एक महीना त्यांना जास्तीत जास्त अपान मुद्रा करायला लावली. ह्यामुळे त्याचे क्रीयेटीनीन एक महीन्यात ४ वर आले. तुम्हाला धन्यवाद.
ही मुद्रा केल्याने शरीरशुद्धी होत असल्याने कॅन्सर सारखे आजार न होण्यास मदत होऊ शकेल असे मला वाटते.
अरविंद जोशी
९४२१९४८८९४
हा लेख वाचून काही शंका असल्यास जरूर फोन करावा.
मी अजूनही मोबाईल फोन वापरत नाही.मोबाईल या विषयावर आता उलटसुलट बोलण्यासारखे काही राहिलेले नाही. ती एक अत्यंत आवश्यक गोष्ट आहे यात वादच नाही. पण तरी मी अजूनही मोबाईल वापरीत नाही आणि त्यामुळे माझे फारसे काही अडतही नाही.
पण माल याचे फायदे असे की प्रवासात एखादे पुस्तक वाचू शकतो. मित्र असला आणि त्याचा मोबाईल मध्येच नाही वाजला तर कितीही वेळ गप्पा मारू शकतो.प्रवासात आजूबाजूला किती सुधारणा झाल्या आहेत, किती विविध प्रकारचे सहप्रवासी आहेत,फेरीवाले आणि निरनिराळी माणसे कशी वागतात अशा अनेक गोष्टींचा आस्वाद घेत घेत माझा प्रवास पूर्ण होतो.अगदी झोप जरी लागली तरी फोन वाजला म्हणून किंवा वाजला नसेल ना या भीतीने मला जाग येत नाही. मस्त ताणून देता येते.कितीतरी गंमती … सगळ्याच देत येत नाहीत.
पण मित्र,नातेवाईक, सहप्रवासी यंच्या मोबाईल वापरातील वैविध्यातून मला सुचलेल्या काही नवीन मोबाईल म्हणी---
१) स्वामी तिन्ही जगाचा , चार्जरविना भिकारी
२) बुडत्या बँटरीला , चार्जरचा आधार
३) चेहेऱ्यातच नाही तर सेल्फीत कुठून येणार ?
४) नाय ते app आणि डोक्याला ताप
५) फोन वितभर आणि एक्सेसरीज हातभर
६) आला मेसेज, केला फॉरवर्ड
७) एक न धड आणि भाराभर चार्जर
८) खाली मुंडी आणि contact धुंडी
९) मुंबईचा पाउस आणि मोबाईलवरचा DP, कधी बदलेल सांगता येत नाही
१०) बायकोचा नसेलना म्हणून सतत स्क्रीन बघतो आणि म्हणे बायकोला कोण भितो !
-- मकरंद करंदीकर.
अनेकजण फळांची साल काहीच कामाची नाही म्हणत ती फेकून देतात. मात्र, त्यामध्येही भरपूर अँटिऑक्सिडंट आणि पोषक द्रव्ये असतात. तसेच ही साल आरोग्य आणि सौंदर्य वाढवण्यासाठीही फायदेशीर असते.
जाणून घेऊया फळांच्या सालीचे फायदे..
संत्रा - संत्र्यामध्ये असलेले फ्लेव्हनॉइड्स कोलेस्टेरॉल कमी करतात. एका अमेरिकन संशोधनानुसार संत्र्याच्या सालीमध्ये ज्यूसच्या तुलनेत २० पट अधिक अँटिऑक्सिडंट्स असतात. केकमध्ये या सालीचा वापर केल्यास चव येते.
पपई - पपईचा गर टाचेवर चोळल्यास भेगा लवकर बर्या होतात. पपईमध्ये भरपूर ‘अङ्क जीवनसत्त्व आणि पापेन नावाचा घटक असतो. यामुळे मृत पेशींपासून मुक्तता मिळते.
डाळिंब - पोटाशी संबंधित विकार झाल्यास डाळिंबाची साल पाण्यात उकळून घ्या. तसेच त्यात दालचिनीचे काही तुकडेही टाका. थंड झाल्यावर हे
पाणी प्राशन करा. हे पाणी दररोज तीनवेळा पिल्यास पीडितास फायदा मिळतो.
सफरचंद - सफरचंदाच्या सालीमध्ये अरसोलिक अँसिड नावाचे रसायन असते. त्यामुळे ही साल एवढी चमकदार असते. सालीसह सफरचंदाचे सेवन केल्यास स्नायूंचा विकास होतो आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. सोबतच रक्तातील साखरेचे प्रमाणही नियंत्रित राहते.
केळी - शोच्या झाडांची पाने चमकदार बनवण्यासाठी केळीच्या सालींचा वापर केला जातो. केळीची साल नैसर्गिक कीटकनाशकाचे आणि खताचे कामही करते. जखम झाल्यावर केळीच्या सालीचा मऊ भाग लावल्यास आराम मिळतो.
नाशपाती - या फळाच्या सालीमध्ये भरपूर फायबर आणि जीवनसत्त्वे असतात. यामध्ये असलेल्या क्लोरोझेनिक अँसिड अँटिऑक्सिडंट आणि फ्लोरेटिन नावाच्या फ्लेव्होनॉइडमुळे कँसरग्रस्त पेशी पसरत नाहीत. त्यामुळे या फळाचे भरपूर सेवन केले पाहिजे.
पीच - या फळामध्ये भरपूर पोटॅशियम आणि ‘अङ्क जीवनसत्त्व असते. या फळामुळे त्वचा कोरडी राहते. याच्या सालीत साखरेचे काही दाणे ठेवून चेहर्यावर
चोळल्याने त्वचेच्या मृत पेशी हटतात आणि चेहरा उजळतो.
किवी - या फळाच्या सालीमध्ये गराच्या तुलनेत तिप्पट अधिक अँटिऑक्सिडंट्स असतात. तसेच या फळाच्या सालीमुळे अँलर्जी होत नाही आणि प्रतिकारशक्तीही वाढते. हे फळ विषबाधेस जबाबदार असलेल्या स्टेफिलोकोकससारख्या जिवाणूंपासूनही संरक्षण करते.
(आरोग्यदूत WhatsApp ग्रुपवरुन)
देशी गोवन्श पालन मध्ये आजकाल खूप फेमस व ऐकायला व बोलायला सुखकारक वाटणारा मजेशीर शब्द म्हणजे ब्रिड डेव्हलपमेंट. आमच्या गोशाळेत अनेक महान लोक भेटीसाठी नेहमी येत असतात. ज्यांना गाई म्हणजे काय? हे साधे माहित नसते, पण त्यांचे बोलणे ऐकले कि थक्क व्हायला होते. आम्ही अमुक ठिकाणी अमुक जातीच्या गाईचे तमुक इतके {किमान 25 वर} लिटर दूध पाहिले वगैरे वगैरे.
प्रत्यक्ष पत्ता यातील 99% लोकांना माहित नसतो कारण हे एक सांगीवांत असते. मुळात या बाबतीत आमचे म्हणणे खूप वेगेळे आहे. अनेक लोकांना ते पटत असेल किव्हा पटावेच असा आमचा हेतू अजिबात नाही. देशी गोवन्श हा मुळात दुधा साठी नाही. हे आधी आपण आपल्या मनात पक्के केले पाहिजे. गाई पासून मिळणारे पंचगव्य हे तिचे आपणाला मुख्य देणे आहे. बोनस म्हणून आपण दुधाची अपेक्षा केली पाहिजे.
पूर्वीचे गोपालन याच बेस वर सुरु होते म्हणून तेव्हा लोक व गाई दोन्ही खुशीत व सुखात होत्या. नंतर हे जास्त दूध देणारे प्राणी येऊ लागले तसे आपले लक्ष आमच्या या गोमातेच्या कासे कडे गेले व मग आम्ही सुद्धा तिच्या कडून अवास्तव्य अपेक्षा करायला लागलो व आमच्या गोवन्शची व आमची हानी करून घेऊ लागलो.
अनेक पिढ्या नासविल्या, त्यांना अनेक विदेशी जातींसोबत ब्रीडिंग केले व मधील जवळपास 3 दशकातील 4 पिढयांची आम्ही वाट लावली. काही जाती तर आम्ही नामशेष करून टाकल्या. का ?? तर फक्त दूधासाठी, व नंतर कंटाळून या गाई आम्ही कसायाच्या दारात उभ्या करून मोकळ्या झालो.
काय अधिकार होता आपल्याला निसर्गाच्या या कालचक्रात आपले {मूर्ख} डोके घुसवण्याचा ??
कोणी अधिकार दिला होता तो गोवन्श संपवण्याचा??
आपल्या अति लालचेने हा बळींचा मेळावा आपणच भरवला होता व आता हि तेच होताना दिसत आहे.
आमच्या गोमातेला आता कुठे सुखाचे दिवस येत आहेत. लोक आत्ता तिच्याकडे वळायला लागले आहेत. अभ्यासाअंती व अनेक निष्कर्ष अंती तिचे महत्व अधोरेखित होत चालले आहे. पण आमची निद्रिस्त चेतना पण पुन्हा दूध वाढ याच संकल्पनेने जागी झाली आहे. फार काळजी वाटते जेव्हा हा शब्द कानी पडतो...
"तुमची गाय किती दूध देती " ??
व तेव्हा जास्तच वाटते जेव्हा आम्ही अभिमानाने सांगतो " आमची गोमाता 7 ते 10 लिटर दूध देते" तेव्हा त्यांचे ओशाळलेले व काहीसे तिरस्कारिक छटेचे त्यांचे चेहरे पाहतो, तरी त्यातला एखादा जाणकार म्हणतोच .
" काय हे गुरुजी 10 वर्ष काम करताय व तुम्हाला गाय 20 लिटर च्या पुढे न्हेता नाही आली "?? छ्या... व या एका शब्दाने आमच्या गोपालनाची पुरती विल्हेवाट लावतो .
आम्ही आजही लोकांना हेच सांगण्यात मग्न आहोत कि गाय हि दुधासाठी नसून तिच्या गोमय , गोमुत्रासाठी आहे .
त्यात खरी ताकद आहे. आपली शेती, मती, गती जर वाढवायची असेल तर नुसते दूध वाढवून उपयोग नाही तर त्या माऊलीच्या वात्सल्याचे गुण वाढले पाहिजेत .
याचे उदाहरण असे....
जर आपण ब्रिड डेव्हलप करत गेलो कि आपण त्या कडे फक्त आणी फक्त दुधाचे मशीन याच नजरेने पाहत जातो. ज्यामुळे तुमचे आणि तिचे नाते एका ठराविक स्वार्थावर जिवन्त राहते कि तू मला जेवढे दूध देशील तेवढे तुला खाद्य मिळेल व हाच स्वभाव के त्या माऊलीच्या मनात, नंतर तनात, व कालांतराने दुधात जातो.
यावर विचार करून बघा....
मुळातच सध्या जगात किती स्वार्थी पणा आहे हे आपण पाहतो आहे. जर अश्या वेळेस हे दूध आपल्या शरीरात गेले तर त्याचे मनावर होणारे दुष्परिणाम आपण कसे टाळू ??
मान्य... मातेचे दूध उत्तम... पण सायन्सने हे सिद्ध केलेले आहेच कि तिची मनस्थिती हा विषय सुद्धा महत्वाचा आहेच.
जसे आपल्याला {स्त्रीत्वाला } नियम लागू होतात कि गर्भावस्थेत असताना तिच्या मनावरील विचार तिच्या गर्भावर जातात व तिच्या दूध प्राशनाने ते सबळ होतात तोच विषय इथे आहे.
म्हणून आम्हाला ब्रिड डेव्हलपमेंट या शब्दाची भीती वाटतेय.
-- श्री प्रतिक उमेश भिडे (गुरुजी)
मोरया गोसंवर्धन
वाटेगाव
९८९००८२०४५
कॅनडाचे संरक्षणमंत्री हरजितसिंग सज्जन हे १७ एप्रिल ते २४ एप्रिल भारताच्या दौर्यावर आहेत. खलिस्तानी दहशतवाद्यांचे समर्थक असलेले कॅनडाचे संरक्षण मंत्री हरजीत सज्जन यांना भेटण्यास पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नकार दिला आहे. एका मुलाखातीदरम्यान कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी हरजीत सज्जन खलिस्तानवादी असल्याने त्यांच्याशी भेटणार नसल्याचे सांगितले.
माझ्या फुलांचे संशोधनात शेवंती असिडिटी, पित्ताचा त्रास ह्यावर उपयोगी आहे असे आले.
शेवंती कोणतीही चालते, पांढरी किंवा पिवळी. त्या फुलांना शेवंतीची वास आला पाहिजे हे महत्वाचे, कारण आजकाल शेवंतीच्या जवळपास दिसणारी पांढरी व पिवळी फुले मिळतात, परंतु त्यांना शेवंतीचा वास नसतो. शेवंतीच्या फुलाच्या पाकळ्यांचे पाणी करावे, त्यामुळे आम्लपित्त,अँसिडिटी जाते. अगदी उत्तम गुण येतो. आज त्रास होतो म्हणून हे पाणी घेतले तर उद्या चमचमीत खाल्ले तरी त्रास होत नाही. असा माझा अनुभव आहे.
एकदा तिखट खाल्याने पोटात खूपच जळजळ होत होती. शेवंती असिडिटी वर आहे म्हणून शेवंतीच्या फुलांचे पाकळ्यांचे पाणी प्यायलो, तीन तासात पोटातील जळजळ, आग थांबली. म्हणून पुन्हा एक डोस घेतला. बरे वाटले. ठरवले आता तिखट (स्पायसी )खाणे नाही. त्रास होतो. आणि दुसरे दिवशी नेमकी बरेच दिवसांनी भेटलेल्या मित्राबरोबर बेडेकर ची मिसळ खावी लागली. खाताना मनात विचार आला मिसळ त्रास देणार आहे. पण शेवंती चे पाणी घेऊ, आणि मिसळ खाल्ली. घरी आल्यावर कामात शेवंतीचे पाणी घेणे विसरून गेलो. दुसरे दिवशी संध्याकाळी लक्षात आले अरे आपण शेवंतीचे पाणी घेतले नाही, पण त्रास पण झाला नाही.
प्रयोगातून असे लक्षात आले कि पाण्याचा इफेक्ट ४-५ दिवस राहतो. एकदा पाणी पाकळ्यासकट घेतले तर त्याचा इफेक्ट जवळ जवळ दोन महिने राहिला. आता पाकळ्या सुकवून गोळ्या केल्या व पेशेंटना दिल्या, त्यांना चांगला फायदा झाला.
माझ्या आईला (वय ८०) पित्ताचा त्रास खूप व्हायचा, पित्त उलटून पडायचे (हा त्रास ४० वर्षे होता). तिला शेवंतीचे पाणी दिल्यामुळे तो कमी झाला.
माझा "निर्माल्य औषध" हा लेख छापून आल्यावर बरेच जणांना मी शेवंतीच्या फुलांच्या पासून केलेली साखर दिली व त्यांना फायदा झाला काहींना साखरेने थोडासा गुण आला. त्यांना शेवंतीच्या पाकळ्या सुकवून केलेल्या गोळ्या दिल्यावर खूपच छान गुण आला.
निसर्ग देवता किती दयाळू व माणसाची काळजी घेणारी आहे. अश्विन व कार्तिकात पित्त वाढते. त्या दिवसात भरपूर शेवंती येते. आमचे पूर्वजांना शेवंतीची हा उपयोग माहिती असावा म्हणून नवरात्र,लक्ष्मीपूजनाला शेवंती आवश्यक अशी प्रथा पाडली.
जे देवाला ते माणसाला.
शेवंतीचे माझ्या संशोधनात आलेले काही गुण खालील आजारावर लागू पडते .
यकृत सूज, कोलायटिस, संडासला खडा, मधुमेह, गॅसेस अडकणे, दमा कोरडा, डोक्यात मुंग्या येणे, रेटिना, अर्धांगवायू, लठ्ठपणा वाढणे, उष्माघात, धनुर्वात, मूत्रपिण्ड काम न करणे, लघवीला आग,किडणी स्टोन.
ह्या आजारांवर मी अजून वापरलेले नाही.
ज्याना ते त्रास असतील त्यानी वापरून मला त्याचे अनुभव कळवावेत ही विनंती.
-- अरविंद जोशी
९४२१९४८८९४
शेवंतीच्या ह्या गुणधर्माना आयुर्वेदिक ग्रंथाधार आहे का नाही हे मला माहिती नाही. माझे काम अनुभव घेणै व सांगणे हे आहे.
(आरोग्यदूत या WhatsApp ग्रुपमधून साभार)
Copyright © 2025 | Marathisrushti