वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी समर्थांची एक गोष्ट
July 9, 2017
मित्र म्हणजे ज्यांच्यासमोर रोजचे मुखवटे काही क्षण काढून ठेवता येतात अशी जमात ! हरिभाईच्या चार भिंतींमधील संस्कृतीने ज्यांना आजही बांधून ठेवले आहे असे हे सारेजण !
August 4, 2022
मागच्या जाहीरनाम्यातली कोणती आश्वासने व कामे पूर्ण केली, त्याचीही निवडणुकीपूर्वी जंत्री देण्याची राजकीय पक्षांवर सक्ती केली जावी. मागल्या सत्तर वर्षांतले विविध पक्षांचे जाहीरनामे आणि त्यापैकी पूर्तता झालेली आश्वासने व कामे, यांचा तौलनिक अभ्यास केला जावा. प्रचारात उखाळ्यापाखाळ्या काढण्यावर भर नसावा. जमलेल्या गर्दीला आपण नेमके काय करणार हे सांगावे. निवड्णुकीच्या काळात या वर चर्चा व्हावी ही अपेक्षा!
April 15, 2019
शिवकालीन इतिहासामधे विशाळगडाला महत्त्वाचे स्थान मिळालेले आहे. इतिहासामधे विशाळगड, खेळणा, खिलगिला, खिलकिला, सक्करलाना अशी वेगवेगळी नावे या किल्ल्याला मिळालेली आहेत. देश आणि कोकण यांना जोडणार्या आंबा घाटा जवळ असलेला विशाळगड सह्रयाद्रीच्या मुख्य रांगेला लागूनच आहे.
February 13, 2011
आज अंगारकी चतुर्थी. मंगळवारी येणाऱ्या ‘संकष्टी’ला अंगारकी म्हणतात कारण ‘अंगारक’ हे मंगळाचे नांव आहे. ‘अंगार’ म्हणजे आग..! अग्नीप्रमाणे तेजस्वी आणि दाहक असलेल्या मंगळाला म्हणूनच ‘अंगारक’ म्हणतात.
February 14, 2017
शिवरायांच्या स्वराज्याच्या हाकेने प्रेरित झालेले मावळातले महादेव कोळी वीर खेमा नाईकाच्या नेतृत्वात मुघल सत्तेविरुद्ध दंड थोपटते झाले. शिवनेरी सकट आपले सारे किल्ले त्यांनी जिंकून घेतले. दख्खन पादाक्रांत करण्यासाठी तेव्हा शहजादा असलेला औरंगजेब लाखोंचे सैन्य घेऊन आला होता. त्याने एका मुघल सरदारास हजारोंची फौज देऊन हे महादेव कोळ्यांचे बंद मोडून काढण्यास पाठविले. एवढ्या प्रचंड फौजेपुढे मावळे टिकले नाहीत. कित्येक मारले गेले आणि खेमा नाईकासमवेत दीड हजार बंदी बनविण्यात आले.मुघलांची दहशत बसावी म्हणून नाईकाच्या रक्तसंबंधातले तमाम लोक पकडून आणून कापले गेले. नाईकास निर्वंश केले आणि सगळ्या दीड हजार बंदी केलेल्यांची शीरे कापली गेली. त्या शिरांच्या ढीगावरच एक चबुतरा बांधण्यात आला. हाच तो कोळी चौथरा जो आजही शिवनेरीवर पाहायला मिळतो. इतिहासाच्या कुठल्याच नोंदीत त्या वीरांची नावे उपलब्ध नाहीत. नाईकाचे खरे नाव, गाव आदी काहीच उपलब्ध नाही. खेमा/खेमू नाईक असा त्या नेत्याचा उल्लेख फक्त काही ठिकाणी आढळतो.
महादेव कोळ्यांचा शिवनेरीवर संहार
पुणे परिसरातील शिवरायांच्या कारवाया आदिलशाहीला खुपत होत्या. मुघलांना जरी त्या ठाऊक असल्या तरी अजून त्यांना त्यांचा थेट उपसर्ग होत नव्हता. योगोयोग म्हणावा का ते माहित नाही पण त्याच सुमाराला काही महादेव कोळी लोकांनी मुघलांविरुद्ध आघाडी उघडून जुन्नर व शिवनेरीचा ताबा घेतला.
ह्यापूर्वी हा भाग निजामशाहीकडे होता. निजामशाही पडल्यानंतर सीमाभागाकडे आदिलशाहीचे व मुघलांचे थोडे दुर्लक्ष होत होते. कदाचित ह्याचा फायदा घेऊन ह्या महादेव कोळ्यांनी त्या प्रांतावर अधिकार स्थापित केला. मुघलांनी ह्यावर लगेच उपाययोजना करण्यासाठी व महादेव कोळ्यांना पस्त करण्यासाठी एक भली मोठी फौज पाठवली.
शिवनेरीला वेढा पडला व लवकरच महादेव कोळ्यांच्या नवख्या सैन्याने बलाढ्या मुघल सैन्यापुढे नांगी टाकली. सुमारे १५०० महादेव कोळ्यांना जेरबंद करण्यात आले. त्यांचे अतोनात हाल करून नंतर माथ्यावरच्या एका चौथऱ्यावर त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. ह्या नरसंहाराची आठवण म्हणून आज त्या चौथऱ्याला कोळी चौथरा नावाने संबोधिले जाते. नंतर त्या चौथऱ्यावर एक घुमटी बांधली गेली व त्यावर फारसीमधे दोन शिलालेखदेखिल आहेत.
दुर्दैवाने आज त्या महादेव कोळ्यांची किंवा त्यांच्या म्होरक्याची नावे उपलब्ध नाहीत. इस्लामी राज्यकर्त्यांनी त्यावेळी केलेल्या अनेक नरसंहारांपैकी एक म्हणून ही घटना गणली जाईल.
संदर्भग्रंथ
• श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ६९९-७११
• शिवनेरी, नाणेघाट, हरिश्चंद्रगड व परिसर, पृष्ठ ४३-४४
© *शिवकालीन सत्य इतिहास ग्रुप*
November 6, 2016
एखादं कौशल्य जनसामान्यात ओळख होण्यास पुरेसं असतं. कौशल्यानं वैगुण्यावरही मात करता येते. कौशल्य ओळखली पाहिजेत आणि जोपासली पाहिजेत. भाषण पाठ असून ते नजरेत भरत नाही; पण त्याचं सादरीकरणाचं कौशल्य लोकांच्या नजरेत भरतं, लक्षात राहातं. नुकताच दूरदर्शनवर एका लहान शाळकरी मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. प्रजासत्ताक दिनी शाळेच्या ध्वजारोहण समारंभात त्याने आपल्या विनोदी भाषणाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. ‘भारतात आजपासून लोकशाही लागू झाली असून लोकशाहीत आपण काहीही करू शकतो. मला स्वतःला मूर्ख बनवायला आवडते.’ त्याने लोकांना अक्षरशः मोठ्याने हसवले.
June 6, 2026
विद्यापीठाची एकूण ३७ वसतिगृहे असून त्यांपैकी सहा वसतिगृहांत मुलीच राहतात. विद्यापीठीय आवारात २८ वसतिगृहे आहेत. विद्यपीठाचे एक सुसज्ज आंतरराष्ट्रीय वसतिगृह असून तेथे पन्नास विदेशी विद्यार्थी राहण्याची सोय आहे.
February 4, 2022
भारतातील देवस्थानांभोवती असणाऱ्या देवराया ही जैवविविधतेची केंद्रे आहेत. अनेक सजीवांचे वसतिस्थान असणाऱ्या अशा जागा जगात इतरत्रही काही ठिकाणी आढळतात. इथिओपियातल्या देवराया हे अशा देवरायांचेच एक उदाहरण. इथिओपियात जी थोडीफार वनसंपत्ती टिकून आहे, ती या देवरायांमुळेच. या देवराया टिकून राहाव्यात म्हणून इथिओपियात प्रयत्न सुरू आहेत. त्या प्रयत्नांची ही माहिती…
October 8, 2023
सोमनाथचे हे देवालय म्हणजे स्थापत्य व शिल्पकलेच्या क्षेत्राचा एक उत्तम नमुना आहे आणि आम्हा भारतीयांची श्रद्धा आणि भक्तिभावना याचे हे द्योतक आहे. सौराष्ट्राच्या पुण्यभूमीत असलेल्या या ज्योतिर्लिंगाला सोमनाथ असं नाव पडण्याविषयीची कथा आपल्या स्कंदपुराणात आहे.
August 25, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti