वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आपल्याला शिवाजी महाराज हे कर्तव्यदक्ष, मुत्सद्दी,प्रजेची काळजी वाहणारे म्हणून माहिती आहेत .पण ज्या इंग्रजांनी पुढे आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केले त्या इंग्रजांना मूर्ख बनवले होते हे आपल्याला ठाऊक नसते.
August 18, 2024
ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकरांचा काश्मिर प्रश्नावरील हा लेख शेअर करत आहे...
गेल्या दहाबारा वर्षात हळुहळू काश्मिरचा कधी पॅलेस्टाईन होऊन गेला, तेच आपल्या लक्षात आलेले नाही. वीसपंचवीस वर्षापुर्वीचे पॅलेस्टाईनचे फ़ोटो कुठे मिळाले तर मुद्दाम शोधून बारकाईने तपासा. मग त्याची प्रचिती येईल. यापुर्वी निदान काश्मिरमध्ये हुर्रीयत व फ़ुटीरवादी निवडणूकीवर बहिष्कार वा अधूनमधून सार्वत्रिक बंदचे आवाहन करीत. पण कुठे लष्करावर हल्ले झाले किंवा दगडफ़ेक झाली, असे प्रसंग चारपाच वर्षापुर्वीही आपल्याला बघायला ऐकायला मिळत नव्हते. पण आजकाल असे प्रसंग वारंवार घडू लागलेले आहेत. त्याची कार्यप्रणाली म्हणूनच तपासून बघता येईल. पॅलेस्टाईनच्या राजकारणात ज्याला चार दशकापुर्वी इंतेफ़ादा असे नाव दिले गेले त्याची ही भारतीय पुनरावृत्ती आहे. म्हणजे असे, की काही पॅलेस्टाईनी शांततेचे नाटक रंगवणार आणि इस्त्रायलच्या भागात रोजंदारीसाठी जाणार. त्यापैकी कोणी तिथे घातपात करणार. मग त्याला पकडले वा गोळी लागून मारला गेला, तर धुमाकुळ सुरू करायचा. एकाच वेळी अनेक आघाड्यांवर हे युद्ध छेडले जात असे. म्हणजे असे, की अशा घटना घडल्या, मग बाजूचा लेबेनॉन तोच मुहूर्त साधून इस्त्रायलवर हल्ले सुरू करायचा. युद्धाची स्थिती निर्माण करायचा. म्हणजे पॅलेस्टाईनचा पश्चीम किनारा व बाजूच्या अरब राष्ट्राकडून एकाच वेळी इस्त्रायलच्या सीमेवर हल्ले सुरू व्हायचे. एकीकडे लेबेनॉन सशस्त्र हल्ले करणार आणि पॅलेस्टाईनचे तरूण किरकोळ बॉम्ब वा दगडफ़ेकीने इस्त्रायली सेनेवर हल्ले करणार. मग जगभरच्या पुरोगामी माध्यमांनी त्याचा हलकल्लोळ करून टाकायचा. पॅलेस्टाईनमध्ये कसे निरपराध नागरिक मारले जात आहेत, त्यावरून मानवतावादी संघटनांनी रान उठवायचे. ही एक मोडस ऑपरेन्डी बनून गेलेली होती. आजकाल पाकिस्तानी सेना व काश्मिरातूल फ़ुटीरवादी तशीच काहीशी रणानिती संयुक्तपणे राबवित आहेत.
या संदर्भात ज्यांना अधिक तपशील हवा असेल, त्यांनी इंटरनेटवर इंतेफ़ादा शब्दाचा शोध घेऊन तपशील मुद्दाम वाचले पाहिजेत. काही फ़ुटीरवादी जिहादी नेमका तोच शब्द काश्मिरातही वापरत असतात. कारण स्पष्ट आहे. आता तीच रणनिती योजनाबद्ध रितीने इथेही वापरली जात आहे. मग त्यावरून काहुर माजले, की भारतातले मानवतावादी पाकिस्तानशी बोलणी करा म्हणून टुमणे लावणार. किंवा काश्मिरात सैनिकी कारवाईत बळी पडलेल्यांचे उदात्तीकरण करणार. फ़ारूख अब्दुल्ला यांची भाषा व पॅलेस्टाईनचे नंतर अध्यक्ष झालेले यासर अराफ़त यांची भाषा किती जुळतीमिळती आहे, त्याचाही जिज्ञासूंनी अभ्यास करायला हरकत नाही. आज काश्मिरात काय चालले आहे, त्याची ओळख इंतेफ़ादा समजून घेतल्याशिवाय होऊ शकत नाही. इंतेफ़ादा ही रणनिती आहे. कुरापत काढायची आणि त्यातून लष्करी कारवाईचा बडगा उगारला, मग अमानुष म्हणून सत्तेच्या विरोधात गळा काढायचा. अशी ही रणनिती आहे. यात प्रत्येक पात्राला त्याची भूमिका ठरवून दिलेली आहे. त्यात दिर्घकाळ जिहादी घातपाताचे कृत्य करण्यासाठीच प्रसिद्ध असलेल्या यासर अराफ़त, यांच्याशी इस्त्रायलने बोलणी केली आणि त्यांच्या पॅलेस्टाईन प्रदेशाला स्वायत्त म्हणून मान्यता दिली. पण अशा स्वायत्ततेला आपले सैन्य उभारण्यास मोकळीक दिलेली नव्हती. आपल्या काश्मिरात यापेक्षा काहीही वेगळे नाही. पण आपल्यावरचा जिहादी कलंक पुसला गेल्यावर आराफ़त यांनी, आडोश्याने अन्य जिहादी पुढे करून तोच उद्योग चालू ठेवला होता. आराफ़त त्यात सक्रीय नव्हते. पण जे कोणी घातपात करीत होते, त्या हमास संघटनेच्या हिंसाचाराला पाठीशी घालत, त्याचे उदात्तीकरण आराफ़तच करीत होते. आज फ़ारूख अब्दुल्ला काय वेगळे करीत आहेत? हा सगळाच संगनमताने चाललेला तमाशा नाही काय?
फ़रक इतकाच आहे, की इस्त्रायल अन्य कुठल्या मानवतावादी संघटना वा त्यांच्या जागतिक नेत्यांना दाद देत नाही. हल्ले वा घातपात झाले, मग इस्त्रायली सेना लगेच प्रतिहल्ला चढवते आणि युद्धपातळीवर परिस्थिती हाताळू लागते. त्यात पॅलेस्टाईन भागातून जिथे कुठे घातपाती अड्डे आहेत, त्यांच्यावर क्षेपणास्त्रे डागून विध्वंसक प्रतिहल्ला केला जातो. जिथे सैनिकी कारवाईत निदर्शक म्हणून दगडफ़ेके समोर येतात, त्यांना घातपाती ठरवून गोळीबारही केला जातो. त्याचवेळी पॅलेस्टाईनचे नेते म्हणून पोपटपंची करणार्यांनाही आपल्या घरातून बाहेर पडता येणार नाही, इतका हलकल्लोळ त्याही भागात केला जातो. एकदा तर आराफ़त यांचे वास्तव्य असलेल्या कंपाऊंडवरही बॉम्बफ़ेक करण्यात आली होती. काही दिवस त्यांना काळोखात काढावे लागले होते. तिसरी आघाडी लेबेनॉनसारखे शेजारी लढवत असतात. उघडपणे लेनेनॉन कधी इस्त्रायलशी लढाईत उतरत नाही. पण तिथे हिजबुल्ला नामक जिहादी संघटना आहे, तिच्यामार्फ़त इस्त्रायलवर सैनिकी हल्ले केले जातात. आपल्याकडे काश्मिरात तोयबा वा मुजाहिदीन नावाने तसेच हल्ले पाकभूमीत बसलेले पाक सैनिक करीत असतात. हा सगळा प्रकार अगदी लेबेनॉनसारखा आहे. उरी येथे असा हल्ला झाल्यावर आपण त्याला सर्जिकल स्ट्राईकने उत्तर दिले होते. त्याचे आपल्याला मोठेच कौतुक आहे. पण असे प्रतिहल्ले इस्त्रायल इतके खोलवर करते, की त्यानंतर अनेक महिने लेबेनॉनच्या हिजबुल्ला संघटनेला डोकेही वर काढता येत नाही. हवाई हल्ले व क्षेपणास्त्रे सोडून इस्त्रायलने अनेकदा लेबेनॉन बेचिराख करून टाकला आहे. त्यात शेकड्यांनी नागरिकही मारले गेले आहेत आणि सैनिक तर त्याहूनही अधिक मारले जातात. असे होऊ लागले, मग जागतिक नेते मध्यस्थी करतात आणि इस्त्रायलही युद्ध संपल्याची घोषणा करून टाकतो. पण केव्हा?
इस्त्रायलची ही रणनिती आपण गंभीरपणे अभ्यासली पाहिजे. एकदा असा इंतेफ़ादा सुरू झाला, मग इस्त्रायल सर्व पातळीवर आणि सर्वच आघाड्यांवर युद्धाचा पवित्रा घेऊन टाकते. त्यात जागतिक नेत्यांनी हस्तक्षेप करण्यापर्यंत एकदोन आठवड्याचा कालावधी निघून जातो. परिणाम असा होतो, की इस्त्रायलच्या सीमेपलिकडचा प्रदेश पुर्णपणे होरपळून निघतो. शेकड्यांनी लोक जखमी होतात, तितकेच मारले जातात. हजारो घरे व इमारती जमिनदोस्त होऊन जातात. सहाजिकच अशा नागरी वस्तीत आडोसा घेऊन बसलेल्या हिजबुल्ला वा अरबी सेनेचा कणा पुर्णपणे मोडून काढला जातो. त्यांनी कष्टपुर्वक उभारलेली गनिमी युद्धाची रचना व सामुग्री अशी उध्वस्त करून टाकली जाते, की इस्त्रायल कितीही गाफ़ील राहिला तरी पुढले कित्येक महिने कुणाही जिहादीला कुरापत काढणेही अशक्य होऊन जाते. भूकंपातून सावरासावर करावी, तशी त्यांची दुर्दशा होऊन जाते. जिहादी लढवय्ये सोडाच. त्यांचे पालनपोषण करणारी कुटुंबे व वस्त्याही पुरत्या नष्ट होऊन जातात. त्यातून अगोदर नित्यनेमाने जगण्याच्या सुविधा पुन्हा उभारण्याचे काम हाती घ्यावे लागते. नागरी जीवन रुळावर आल्याखेरीज इस्त्रायलची कुरापत काढण्याचा विचार इंतेफ़ादा पुकारलेल्यांच्या मनात येऊ शकत नाही. सहाजिकच वर्ष दिडवर्ष इस्त्रायलला शांततापुर्ण जीवन जगत येते. मग तो कालावधी उलटला, की पुन्हा पॅलेस्टाईनी व लेबेनॉनच्या हिजबुल्लाला लढायची खुमखुमी येते. पुन्हा इंतेफ़ादा सुरू होतो. पुन्हा इस्त्रायल आधीच्याच रणनितीचा अवलंब करते. हा घटनाक्रम आता जगाच्याही अंगवळणी पडला आहे. हळुहळू भारतालाही काश्मिर व पाकिस्तानातील त्यांच्या पाठीराख्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी इस्त्रायली युद्धनितीचाच अवलंब करावा लागणार आहे. कारण आपण ज्याला आझादीची लढाई समजून बसलो आहोत, तो प्रत्यक्षात काश्मिरातील पॅलेस्टाईनी इंतेफ़ादाच आहे.
--- भाऊ तोरसेकर
-- संकलन : शेखर आगासकर
सोशल मिडियातून येणारे चांगले लेख जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माझा उपक्रम.
June 8, 2017
अष्टांग संग्रह सूत्रस्थान या ग्रंथामधे अकराव्या मात्राशीतीय नावाच्या अध्यायात श्लोक क्रमांक 64 ते 68 या मधे काय सांगितले आहे ते पाहूया. फार सुंदर आहे. त्यातील मतीतार्थ सांगतो.
" जसे रेल्वेचं इंजिन धावत असताना, त्याला इंधन जास्ती प्रमाणात लागते. इंजिन सुरू आहे, पण नुसते उभे असेल, तर इंधन कमी प्रमाणात लागते, तसेच शरीराला इंधनाची जास्ती आवश्यकता असते. पण रात्रौच्या वेळी इंधनाची फार आवश्यकता नसते."
व्यवहारातील अत्यंत समर्पक उदाहरण ग्रंथकारांनी दिले आहे. कोणत्याही यंत्राचे असेच असते. जेव्हा काम जास्ती तेव्हा इंधन जास्ती. काम नसेल तर इंधनाची गरज जास्ती रहात नाही.
समजा आपल्याला तीन चारशे किलोमीटरचा प्रवास करायचा असेल तर सुरवातीला गाडीमधे आपण इंधन पूर्ण भरून घेतो. मग लवकर रिझर्व्ह लागणार नाही. दर वीस पंचवीस किलोमीटरला दोन दोन लीटर इंधन घालत पुढे जायचे , असं करतो का आपण ? नाही ना ! मग दर दोन चार तासाने खायचे हा नियम कुठुन काढला ?
एकदा दहा माणसाना पुरेल एवढा चहा करायचा हे ठरलं तर एक एक कप चहा करीत रहायचं की एकदम दहा कप चहा करायचा ? की एक कप चहा उकळला कि त्यातच परत एक कप पाणी घालून पुनः साखर पावडर घालायची ? असं दहा वेळा करायचं ?
एकदा ठरलं की प्रश्नच संपला. तसंच जेवणाचं पण आहे. माझं आजचं काम कसं आहे, किती काम करायचं आहे, त्याला इंधन किती लागणार आहे, हे सुरवातीला (सकाळी) ठरवून घ्यायचं आणि इंधन भरायचं.
एवढं मी जेवलंच पाहिजे, नाहीतर ताकद येणारच नाही, असा नियम करून जेवू नका. कारण प्रत्येकाचं काम वेगवेगळं आहे,
आपली कामे देखील दिवसाचीच खूप असतात. म्हणून सकाळचे जेवण जास्ती प्रमाणात घ्यावे. ज्या दिवशी कामे कमी असतील तेव्हा खाणेही कमी असावे. पण व्यवहारात नेमके उलटे घडते. जेव्हा सुट्टी असते, तेव्हाच पोटावर अत्याचार जास्ती होतात.
अगदी क्वचित रात्रपाळीला प्रश्न येईल, पण नियम तोच जेव्हा काम जास्ती तेव्हा अन्न जास्ती. आणि सूर्यास्तापूर्वी जेवण संपलेच पाहिजे. तरच उर्जा निर्माण होईल. जेव्हा रात्रपाळी असेल तेव्हा सायंकाळी जेवणाचे प्रमाण जास्त आणि सकाळी कमी जेवावे. आणि जेव्हा नियमितपणे दिवसा काम असेल तेव्हा सकाळी जेवण जास्ती प्रमाणात आणि सायंकाळी अगदी कमी जेवावे.
......म्हणजे गाडी ओव्हर लोड होत नाही.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
09.03.2017
March 10, 2017
तिकडे जाऊन आल्यावर हात धुवावेत. हात पाण्याने धुवावेत, पण माती किंवा रखा सुद्धा वापरावी. असेही सांगितलेले आहे. आज साबण वापरला जातो, चेहेऱ्याचा साबण वेगळा,
February 20, 2018
नुकतीच नागोठणे येथील एक पोस्ट सोशल मिडियावर फिरतेय. अजगराने मुलीला गिळले.. अशा शिर्षकाने.....
सोशल मीडियाचा गैरवापर म्हणतो तो हाच. कुठलीही माहिती कुठेही जोडायची आणि वायरल करायची.
रेटिक्युलेट पायथन (जाळिदार अजगर) हा अंदमान निकोबार बेटावर आढ़ळतो .त्याची लांबी 32 फुट एवढी नोंदली आहे. एवढा मोठा अजगर माणसाला इजा पोहचवु शकतो ,पण अजून तरी तशी नोंद भारतात नाही.
सध्या वायरल होत असलेली पोस्ट व त्यातील फोटो ज्यात माणसाचे पाय दिसत आहेत तो एका विषारी सापाचा फोटो एडिट केलाय, अजगराला विषारी सुळे (दात) नसतात.आणि जो गाडिमधे काहीतरी खाऊन आहे तो जाळीदार अजगर आहे. हे फोटो भारतातले नसून ते खुप जूने आहेत.
आपल्या कड़े इंडियन रॉक पायथन (भारतीय अजगर) आढ़ळतो.त्याची लांबी 25 फुट एवढी नोंदली आहे.या अजगराने आता पर्यन्त माणसाला गिळल्याची नोंद नाही. कुत्रा मांजर कोंबड्या शेळ्या मेंढ्या यांच्या मागे इंडियन रॉक पायथन मनुष्य वस्तीत येण्याच्या घटना कॉमन आहेत.
कृपा करुन आधीच बदनाम केलेल्या या असहाय जिवाना आणखी बदनाम करू नये यासाठी सर्वानी प्रामाणिक प्रयत्न करू या.
या अशा पोस्ट या जिवाना नामशेष करण्यासाठी पुरेशा असतात. अज्ञान हे आंधळ असतं. आपण भारतीय सत्य जाणुन घेण्या ऐवजी अंधानुकरण करण्यात पुढे आहोत.
-- FON फ्रेंड्स ऑफ़ नेचर ,चिरनेर
उरण-रायगड
February 7, 2017
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या (WHO) मते धूम्रपान आणि तंबाखूमुळे दरवर्षी 7 दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो.
March 9, 2022
गजेंद्र अहिरे हा माणूस आरपार क्लिष्ट आहे. भावनांचे जंगल तयार करायचे, त्यांत प्रेक्षकांना सोडायचे आणि हळूच हातातून हात काढून घ्यायचा. मग तुम्ही वल्हवत बसा होडी- नशिबी असेल तर मिळेल किनारा अन्यथा आहेच चारही बाजूला पाणी- नाकातोंडात जाऊन गुदमरायला लावणारे.
February 2, 2023
शिवसेनेकडून सातत्याने वापरल्या गेलेल्या मराठी माणसाने संधी मिळताच आपली खरी ताकद दाखवून दिली. आज राज ठाकरे सेनेसोबत असते, राणे, भुजबळांना बाळासाहेबांनी बाहेर पडू दिले नसते तर राज्यातील चित्र वेगळे दिसले असते; परंतु दुर्दैवाने केवळ उद्धवचे भले पाहताना बाळासाहेबांनी सेनेच्या आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या भल्याकडे साफ दुर्लक्ष केले. शेवटी बाळासाहेबांना आपला मुलगा शिवसेनेपेक्षा, मराठी माणसाच्या हितापेक्षा अधिक प्यारा वाटला, असेच म्हणावे लागेल.
November 1, 2009
बंगाली संस्कृतीत नवरात्रात ‘दुर्गा पूजे’ची विशेष परंपरा आहे. नवरात्राच्या सातव्या दिवसापासून ते विजयादशमीपर्यंत दुर्गादेवीची आराधना बंगाली संस्कृतीत केली जाते. बंगाली समाजात देवी दुग्रेला विशेष महत्त्व असून तिला ‘दुर्गा माँ’ असे संबोधले जाते. नवरात्रीच्या दिवसात दुर्गा पूजा करण्याची बंगाली समाजाची विशेष परंपरा आहे. साधारण महाराष्ट्रात नवरात्रीच्या पहिल्या म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी घटाची स्थापना करून मग नऊ दिवसाच्या नऊ माळा पूर्ण करत देवीची आराधना केली जाते. पण बंगाली समाजात नवरात्रीच्या सातव्या दिवशी दुर्गा माँची भव्य प्रतिमा स्थापित करून विजयादशमीपर्यंत तिची पूजा-अर्चा करण्याची पद्धत आहे. या पूजेत दुर्गा माँच्या प्रतिमेला विशेष महत्त्व असते. अगदी पारंपरिक पद्धतीनेच तिची भव्य प्रतिमा मूíतकारांकडून घडवून घेतल्या जातात. यात देवीच्या मूर्तीबरोबरच गणपती, काíतकेय, सरस्वती आणि लक्ष्मी यांच्या मूर्तीचाही समावेश असतो. यात एका भल्या मोठय़ा आडव्या पाटावर या मूर्तीची मांडणी केली जाते आणि त्याच्यामागे एक भव्य कमान उभी केली जाते.
सहाव्या म्हणजे महासष्टीच्या दिवशी सायंकाळी शंखांचा नाद करत दुर्गादेवीची प्रतिमा मंडपात आणली जाते. याला आमंत्रण अथवा अधिवास असे म्हटले जाते. महासप्तमी म्हणजेच सातव्या दिवशी त्या प्रतिमेची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. सर्वप्रथम कलश स्थापनेचा विधी केला जातो. यात एका कलशामध्ये श्रीफळ आणि आंब्यांची पाने लावून दुर्गा माँचे प्रतीक मानून त्याची पूजा केली जाते. त्यानंतर महास्थानाचा विधी पार पाडला जातो. यात प्रतिमेसमोर एक आरसा ठेवून त्या आरशात पडणाऱ्या देवीच्या प्रतििबबावर हळद आणि मोहरीचे तेल लावून त्या प्रतििबबाला उसाच्या रसाने अथवा गंगेच्या पाण्याने स्नान घातले जाते. त्यानंतर पुजारी दुर्गा माँचे नाव लिहिलेला आरसा, साडी, आभूषणे हे सगळे बेडी म्हणजे पूजा करण्याच्या ठिकाणी ठेवून त्याची पूजा करतात. या सर्व प्रक्रियेत सर्व जातीच्या आणि देहविक्री करणाऱ्या स्त्रीच्या घरातील मातीला विशेष महत्त्व असते. या सर्व विधींनंतर प्राणप्रतिष्ठापना हा महत्त्वाचा विधी पूर्ण केला जातो. यात पुजारी मंत्रोच्चार करून कलश आणि दुर्गादेवीच्या प्रतिमेत प्राण निर्माण करतो, अशी आख्यायिका आहे. अष्टमीच्या दिवशी देवींनी महागौरीचे रूप घेतल्यामुळे तिची महागौरी पूजा केली जाते. यानंतर नवमीला चंडी पूजा केली जाते. या क्षणी देवीने चामुंडाचे रूप घेतलेले असते. त्यावेळी देवीला विशेष असा ‘नीट भोग’ चढवला जातो. यात भात, वरण, भाजी, चटणी आणि पायेश या गोड पदार्थाचा समावेश असतो. १०८ दिवे आणि १०८ कमळ फुलेही याक्षणी देवीला वाहिली जातात. विजयादशमीच्या दिवशी देवीला मध-दुधाचा भोग दाखविला जातो. याला ‘चरणमिर्ती’ असे म्हणतात. याच दिवशी स्त्रिया सिंदुर उत्सव साजरा करतात. देवी आपल्या पतीच्या घरी कैलासावर जात आहे, अशी धारणा धरून त्या तिच्या डोक्यावर सिंदूर लावतात. याला ‘कनक अंजली’ असे म्हटले जाते. त्यानंतर देवीच्या उत्तरपूजेची सुरुवात होते. यामध्ये कलशासमोर उत्तर दिशेस म्हणजेच कैलास पर्वताच्या दिशेने एक फूल ठेवले जाते आणि त्यानंतर देवीच्या प्रतिमेस विसर्जनासाठी बाहेर काढले जाते. विसर्जनानंतर पुजारी विसर्जनस्थळावरील पाणी ज्याला शांती जल म्हटले जाते ते भक्तांच्या अंगावर आंब्याच्या पानाच्या साहाय्याने शिंपडतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
October 5, 2019
जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे एकतीस
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा
निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग पंचवीस
नित्यं हिताहारविहारसेवी
समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
दाता समः सत्यपरः क्षमावान
आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।
पाचकळ बाचकळ बोलू नये
ज्या बोलण्याचा काहीच फायदा होत नसतो, ते बोलण्यात उगाच वेळ घालवू नये. आपल्या बोलण्यातून दोन अर्थ निघतील, असं पाचकट बोलणं झालं तर ऐकणारा तुमची वैचारिक पातळी ओळखतो. आपणच आपली किंमत कमी करून घेत असतो. म्हणून कधी पाचकट बोलू नये.
बाचकळ म्हणजे बालीश बोलणे करू नये. आपली पत, आपली योग्यता, आपला व्यवसाय, आपल्या समाजातील मानाच्या स्थानाला कधीही धक्का पोचेल असे आपले बोलणे करू नये, विशेषतः बालीशपणाने पण बोलू नये. आपल्या बोलण्याने आपल्याच माणसाची मानहानी होईल असे वागू नये. वेळ काळ पाहून बोलावे.
फिदी फिदी उगा हसू नये
चार चौघात असताना उगाच गरजेपेक्षा जास्त मोठ्या आवाजात हसू नये, याने खरंतर आपलेच हसे होत असते.
भोकाड मोठे पसरू नये
रडणे हा जरी मनावरचा ताण कमी करणारा वेग असला तरी त्याचे उदीरण किंवा प्रवर्तनाचे नाटक होऊ नये. रडण्यामुळे मनावरचा ताण हलका होतो. पण अति सर्वत्र वर्ज्ययेत या न्यायाने मोठ्या आवाजात रडू नये. आपले रडणे चार भिंतींच्या आत असावे. ते पलिकडील भिंतीला कळले की तिसऱ्या कानाला सुद्धा आपोआपच समजते. आणि भिंतीच्या कानाचे ओठ होतात, आणि ते बोलू लागतात.
फुकाचे बोल बोलू नये
वांझोट्या चर्चा करून काहीही साध्य होत नाही. ज्यातून काहीही निष्कर्ष निघण्याची शक्यताच नसते, अशा गोष्टी करून काय साध्य होणार असते ?
समर्थ म्हणतात, अशा ठिकाणी आपली बुद्धी वेळ आणि पैसा संपवू नये.
धकाधकीचा मामला
कैसा घडे अशक्ताला ........
जो वैचारिक दृष्टीने अशक्त आहे त्याला विज्ञानातील मोठे मोठ्या जड शब्दांचे अर्थ कसे समजणार ?
प्रयत्न कधी सोडू नये.
सतत प्रयत्नशील आणि प्रयोगशील रहावे. नवनवीन पद्धतीने कार्य करावे. शंभर घाव घातले की फुटणारा दगड नव्याण्णव घाव घालून फुटत नाही, आता काही होणार नाही, असे म्हणून प्रयत्न थांबवणाऱ्याला काहीच लाभ होत नाही. मागाहून येणारा एकमेव शेवटचा घाव दगडावर घालतो आणि त्याच्या एका घावाने दगड फुटतो. म्हणून प्रयत्न कधी सोडू नयेत.
प्रयत्न सोडणे म्हणजे जगण्यावरील विश्वास सोडून देणे. हे जे आई मुलांना सांगते त्यात आईचे काय चुकले ?
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
August 20, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti