(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • मेरा भारत देश बघा किती महान

    एका बाजूला दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबाचे पोट भरायला पैसे नाही म्हणून आत्महत्या करतोय. पिकवणारया शेतकरयांची तूर खरेदी ला पैसे नाही. शेतकरी कर्जमुक्ती करायला पैसे नाहीत.

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग पंचवीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक सहा

    पोटात खड्डा पडावा - भाग तीन

    पाण्याला गती असते ती वरून खालच्या दिशेत. पाणी म्हणजे सगळे द्रव पदार्थ. पंप लावल्या शिवाय किंवा कोणते यंत्र लावल्याशिवाय जलमहाभूत उर्ध्व दिशेत काम करीत नाही.

    हीच पाण्याची गती शरीरात अन्नाला पुढे सरकवायला मदत करीत असते. जेवताना पाणी पिणे यासाठी फायदेशीर ठरते. पाण्याचा / जलमहाभूताचा आणखी एक गुण म्हणजे सखल जागी हे पाणी खेचले जाते.

    समजा आपल्या घराच्या सभोवती पाणीच पाणी साठलेले असेल, तर त्याचा परिणाम म्हणून घरामधे ओल येते, जी आपल्याला त्रास देते. ही ओल नको असेल तर काय करावे लागेल ?

    घराबाहेर जमलेल्या पाण्याचा लवकरात लवकर निचरा करणे. यासाठी जिथे खोलगट भाग आहे तिथून या पाण्याला मार्ग तयार करून द्यावा. पाणी शांतपणे तिथून निघून जाईल. जिथे उंचवटा येईल, तिथे पुनः ते अडकून अवरोध निर्माण करेल. तिथे पुनः मार्ग मोकळा करून द्यावा. असं करत करत रस्त्यावरील मुख्य गटारापर्यंत हे पाणी ढकलावे लागेल. एकदा का हे पाणी मुख्य गटारात गेले की आपले काम संपले.

    तस्संच शरीरात होतं. आपण हे ओळखून त्या अतिरिक्त पाण्याला मुख्य स्रोतसात आणण्यासाठी मदत करायची की झाले.

    मुख्य स्रोतस म्हणजे मुखापासून गुदापर्यंत ! ही एकच पोकळी आहे. आकाश महाभूत. यामधे नैसर्गिकरीत्या काही जलमहाभूत पाझरत असते. साहाजिकच त्याची गती अधोगती असते. वरून खाली असा हा प्रवाह असतो. या आकाश महाभूतात्मक आतड्यांमधे आपण खाल्लेल्या पृथ्वी महाभूतात्मक अन्नातील चिकटून राहीलेला काही भाग तिथे असलेल्या अतिरिक्त जलमहाभूतामुळे अवरोध निर्माण करतो. तिथेच चिकटलेल्या मळाला मागाहून येणारे चांगले अन्न पाणी चिकटत जाते.

    वायु महाभूतामुळे आतड्यांची योग्य हालचाल जर होत असेल तर यातील जल महाभूत अडचणीतून, अडथळ्यातून वाट काढत पुढे पुढे जात रहाते.

    पाण्याचा निचरा वृक्कावाटे केला जातो, तर घन भाग मलावाटे शरीराबाहेर टाकला जातो. या दोघांचेही मार्ग वेगवेगळे आहेत, हे लक्षात ठेवावे. उगाचच जास्ती पाणी पिऊन ते काही मलावाटे जात नाही. ते किडनीतूनच बाहेर काढले जाईल.

    शरीराची गरज नसताना अधिक पाणी घेतले तर आतमधे नुसता चिखल होईल. आणि या रबडा झालेल्या चिखलातून पुनः पाणी वेगळे करून ते मूत्रावाटे बाहेर काढणे, हे आणखी कठीण काम होऊन बसते.

    यासाठी हेच लक्षात ठेवावे, पाण्याला शरीराबाहेर पडून जाण्यासाठी जे नैसर्गिक उतार किंवा सखल भाग हवा, तो करून द्यावा. कपालभाती, नौली, नमनमुद्रा, मंडुकासन, शशांकासन, सूर्यनमस्कार, पवनमुक्तासन, बटरफ्लाय, यासारख्या आसनांनी, यौगिक क्रियांनी आतड्यातील आमाचे अडथळे दूर होत जातात, खड्डे पडत जातात, अतिरिक्त पाण्याला पुढे जायला योग्य रस्ता करून दिला जातो.

    आमरूपी चिखलातून पाणी वेगळे करीत गेलो, की पचन सुधारतेच ! पचन म्हणजेच अग्नि.
    शुद्ध तेजमहाभूत !!!

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    05.05.2017

  • १० मे १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाची स्मृती जागवा

    १० मे १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाची स्मृती जागवा

    १० मे २०१६ ला भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य-युद्धाला १५९ वर्षें पूर्ण होतील. तें युद्ध १० मे १८५७ ला सुरूं झालें होतें. जरी इंग्रजांनी त्याची ‘गदर’ म्हणून संभावना केली असली तरी, तें स्वातंत्र्ययुद्धच होतें, हें स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १९०७ मधील त्यांच्या ग्रंथाद्वारें दाखवून दिलेलें आहे.

    हें स्वातंत्र्ययुद्ध असफल झालें असें म्हटलें जातें. बहादुरशहा जफर याला दूर ब्रह्मदेशात कैदेत ठेवलें गेलें, झाशीची राणी लक्ष्मीबाई हिला वीरमृत्यू आला, तात्या टोपे यांना फाशी देण्यात आले, नानासाहेब पेशवे परागंदा झाले, कित्येक लहानमोठ्या वीरांचा मृत्यू झाला, किंवा त्यांना झाडांवर लटकवून फाशी दिलें गेलें. काळ्या पाण्याची शिक्षा १८५७ नंतरच सुरूं झाली. आणि, १८५७ नंतर, ब्रिटिश सत्तेचे पाय भारतात आणखी घट्ट रोवले गेले. या सर्वांचा अर्थ , ‘हें युद्ध असफलच झालें’, असा काढला गेला तर नवल नव्हे.

    पण, हें युद्ध असफल झालें नाहीं !! ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार या युद्धानंतर संपुष्टात आला ; ही महत्वाची घटना नाहीं काय ? त्यानंतर या कंपनीचा सर्व व्यापार संपलाच ! , आणि ती एक केवळ एक पोकळ shell बनून अस्तित्वात राहिली.

    या युद्धानंतर जरी UK च्या सरकारनें भारताचा कारभार हातात घेतला , तरी, आपण हें ध्यानात घ्यायला हवें की, it was the beginning of the end of the British Rule in India. कारण, १८५७ च्या युद्धापासून स्फूर्ती घेऊन, त्यानंतर ब्रिटिशांशी विविध पातळ्यांवर संघर्ष सुरूं झाला, आणि परिणामस्वरूप, १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळालें. हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या भारतासारख्या पुरातन देशाच्या दृष्टीनें , (१८५७ ते १९४७ ही) ९० वर्षें म्हणजे कांहींच नाहीं !

    रामदास स्वामींनी म्हटलें आहे – ‘वन्हि तो चेतवावा रे’. तो वन्हि १८५७ नें नक्कीच चेतवला, आणि त्याचे दूरगामी परिणामही झाले !

    मात्र, २१ व्या शतकात जन्म झालेल्या युवा पिढीला १८५७ चें महत्व काय आहे, तें कितपत ठाऊक आहे ? ; कांहीं कल्पना नाहीं. तें महत्व तिला कळायला मात्र नक्कीच हवें.

    दर वर्षी, भारत सरकार, राज्य सरकारें व consencious राजकीय पक्षांनी, तसेंच जनजागृती करणार्‍या सोशल-ऑरगायझेशन्सनी, १० मे हा दिवस, ‘१८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाचा स्मृतिदिवस ’ म्हणून साजरा करायला हवा, असें मला सुचवावेसें वाटतें. (मात्र या दिवशीं, सुट्टी नको. आधीच भारतात खूप सुट्ट्या आहेत ! ). १० मे या दिवशी, या दिवसाची महती वर्णणारे, त्याची long-term implications सांगणारे कार्यक्रम व्हावेत, अशी अपेक्षा करणें चूक आहे काय ?

    पाहूं या, कोणी जागें होतें कां, तें.

    -- सुभाष स. नाईक . सांताक्रूझ मुंबई.

    M- 9869002126. eMail : vistainfin@yahoo.co.in

  • चिनी ड्रॅगनचे आव्हान आणि भारताचे प्रत्युत्तर

    चीनने संरक्षणावरील तरतूद सात टक्क्यांनी वाढवली. त्यामुळे संरक्षण खात्यावरील तरतूद तब्बल १५२ अब्ज अमेरिकन डॉलर एवढी झाली आहे. ही रक्कम भारत संरक्षणावर करत असलेल्या तरतुदीच्या तिप्पट आहे.अमेरिका आणि चीनच्या वादात चीनने संरक्षणावरील तरतूद वाढवली असली तरी ती भारताच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे.

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग एकोणतीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक सात

    निसर्गाचे नियम - सर्वांसाठी सारखेच - भाग चार !

    एक माणूस सोडला तर कोणी पशुपक्षी सहसा आजारी पडत नाहीत, हे कटु सत्य आहे. इतर प्राणी आणि माणूस यात एक धर्म सोडला तर बाकी आहार निद्रा भय आणि मैथुन या चार गोष्टी समान आहेत. या अर्थी एक सुभाषित पण शिकल्याचे स्मरते.

    या सगळ्या पशुपक्ष्यांना नियत आयु मिळाली आहे. निसर्गाचे वरदान आहे. निसर्गच त्यांना शिकवत असतो. प्रत्येकाचा आहार ठरवून दिलेला आहे, त्यात ते बदल करीत नाहीत. गाई म्हैशीला कितीही उपाशी ठेवले तरी मांस भक्षण करणार नाही, वाघसिंहाला कितीही उपाशी ठेवले तरी ते गवताला तोंडही लावणार नाहीत. यामुळे की काय त्यांचे आरोग्य चांगले रहाते. शिकार करून पोट भरलेले असले तर समोर हरीण फिरले तरी सिंह त्याच्याकडे बघत सुद्धा नाही,

    पोपट फक्त झाडावरचाच पेरू खातो, शिळा पेरू अजिबात खात नाही. शिळा म्हणजे झाडावरून जमिनीवर पडलेला सुद्धा खात नाही. कावळ्याला मात्र किडे पडलेला उंदीर सुद्धा चालतो, किंवा विष घालून मारलेला उंदीर देखील चालतो. गटारात पडून मेलेला पण चालतो, अपघाताने गाडीखाली सापडून मेलेला उंदीर ही त्याची जणुकाही फीस्टच !

    प्रत्येक पशुपक्ष्याच्या नवीन पिल्लांसाठी प्रत्येक वेळी नवीन घरटे बांधले जाते. जुन्या घरट्याचा वापर कुंभारमाशीदेखील करत नाही. फळांनी लगडलेल्या झाडावर पक्ष्यांचे घरटे दिसत नाही, छोटे पक्षी छोट्या झाडांवर तर, गरूडासारखे मोठे पक्षी मोठ्या झाडाच्या अगदी वर घरटे बांधतात. ही यांची जीवन वैशिष्ट्य दिसतात. स्वतः जगण्यासाठी किंवा त्यांचा वंश वाढण्यासाठी असे करणे त्यांना निसर्गाने शिकवलेले असते.

    जाती वर्ण भेदानुसार हे वरवर दिसणारे फरक असले तरी सूर्यास्त झाल्यावर मात्र कोणीच खात नाही, हे मात्र वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

    माणसाने पाळलेल्या प्राण्यांमधे मात्र ही वैशिष्ट्ये बदललेली दिसतात. माणसाप्रमाणे, माणसाने पाळलेल्या पशुपक्ष्यांनीही आपली जीवनपद्धती बदलली आणि माणसांप्रमाणे त्यांनाही डाॅक्टरांची गरज भासू लागली.

    निसर्गात आढळणारे प्राणी आणि माणसाच्या अवतीभवती वावरत असले तरी, माणसाने ज्यांना पाळलेले नाहीत, अश्या पशुपक्ष्यांनी मात्र आपली जीवनपद्धत बदललेली नाही.

    त्याचाच परिणाम म्हणून असेल, पण सर्व कावळे एकाच आकाराचे दिसतात. एक जाड, एक बारीक, असे दिसत नाही. जसा कावळा तशीच चिमणी, तसाच पोपट, तसेच कबुतर.

    निसर्गातील सर्वच प्राणी आहेत त्या आकारामधे बंदिस्त आहेत....
    .
    .
    .
    .
    .
    .

    फक्त माणूस सोडला तर !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    09.05.2017

  • जागतिक अॅकॉर्डियन दिवस

    दरवर्षी ६ मे हा दिवस जागतिक अॅकॉर्डियन दिवस म्हणून साजरा केला जातो. जागतिक स्तरावर २००९ पासून हा दिवस साजरा केला जातो परंतु भारतात २०११ पासून अॅ्कॉर्डियन दिन साजरा करण्यास सुरवात झाली. पहिला जागतिक अॅकॉर्डियन दिवस हा पहिला अॅकॉर्डियन १८२९ ला बनविला गेला व त्याचे पेटंट ६ मे १८२९ रोजी व्हिएन्ना येथे ख्रिस्तीफर डिमेनी यांनी घेतले, या गोष्टीला १८० वर्षे झाली म्हणून ६ मे २००९ पासून जागतिक अॅकॉर्डियन दिवस साजरा करण्यास सुरवात झाली.

    भारतात बॉलीवूडमध्ये केसी लॉर्ड इनॉक डॅनियल्स ही नावे अॅकॉर्डियन मध्ये अग्रगण्य मानले जातात. केसी लॉर्ड यांची अॅकॉर्डियन वाजवण्याची एक विशिष्ट शैली होती आणि अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांच्या अॅकॉर्डियन वादनाचा अंतर्भाव आहे. रुप तेरा मस्ताना आणि शर्मिली सारख्या अजरामर गीतांमधील अॅकॉर्डियन वादन त्यांनी स्वत: केले होते. ‘आराधना’तल्या ‘रूप तेरा मस्ताना’ या गाण्यातले धुंद वातावरण क्षणात् उभे करणारा सुरुवातीचा तो थरारून टाकणारा अॅाकॉर्डियन या वाद्याचा पीस आणि नंतर अॅ कॉर्डियन आणि सॅक्सेफोन यांची जुगलबंदी सुरू असावी असे वाटणारे एकाहून एक सरस पीसेस, ‘है अपना दिल’ आणि ‘आईये मेहरबाँ’ गाण्यांतले ठेका धरायला लावणारे चायनीज टेंपल ब्लॉक्स, ‘तस्वीर तेरी दिल में’, ‘मुझे दुनियावालों शराबी न समझो’ अशा शेकडो गाण्यांमध्ये अॅाकॉर्डियनच्या बेलोजचा परिणामकारक वापर करून घेतला होता. तसेच मा.इनॉक डॅनियल्स हे सुद्धा भारतीय चित्रपट संगीतातील एक महान अॅकॉर्डियन वादक. त्यांचा टेक दोन-तीन तासांतच ओके होत असे.

    व्हायोलिनचा चाळीस वादकांचा ताफा त्यांच्याकडे होता. जयकिशन बॅकग्राऊंड म्युझिकचा सम्राट होता.. सलील चौधरी स्वत: संयोजक, पियानोवादक असूनही इनॉक डॅनियल्स यांना सन्मानपूर्वक बोलावत. त्यांना पाश्चात्त्य संगीताची फार चांगली समज होती. सर्व सिंफनी त्यांच्या आवडत्या होत्या. ‘छाया’च्या ‘इतना ना मुझसे तू प्यार’मध्ये त्यांनी मोझार्टच्या सिंफनीचे स्वर घेतले आहेत. त्यांच्या रचना पूर्ण मेलडीवर असल्या तरी हार्मनीकडे त्यांचा कल होता. त्यामुळे त्यांच्या रचना हार्मनी-ओरिएंटेड आहेत. त्यांचे व्यक्तिमत्त्वही उदात्त होते. रेडिओ सिलोनवर ‘साज और आवाज’ या सात ते सव्वासातच्या सुमारास सकाळी कित्येक वर्षे मा.इनॉक डॅनियल्स यांच्या अॅनकॉर्डियनवर वाजविलेल्या रचना वाजवल्या जातात. बॉलीवूड मध्ये गुडी सिरवाई, मा.धीरजकुमार,मा. सुमित मिश्रा यांसारखे अॅजकॉर्डियन वादक होऊन गेले. याशिवाय शंकर जयकिशन, एस.डी.बर्मन, वसंत देसाई, सी.रामचंद्र यांच्यासारख्या दिग्गज संगीतकारांनी संगीतबद्ध केलेल्या अनारी, श्री ४२०, काला पानी, छाया, प्रेम पत्र, चोरी चोरी या चित्रपटांतील गीतात अॅकॉर्डियनचा प्रभावी पणे वापरला गेला होता.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग अठ्ठावीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक सात

    निसर्गाचे नियम - सर्वांसाठी सारखेच - भाग तीन !

    निसर्ग कोणासाठी थांबत नाही.
    निसर्गाने निर्माण केलेले प्राणी सहसा आजारी पडत नाहीत. कर्मभोगाप्रमाणे जे आजार होत असतात, ते निसर्गच बरे करत असतो. त्यासाठी वापरायची औषधे ही नैसर्गिकच असावीत.
    कृत्रिम औषधे वापरून कृत्रिम आजार वाढविण्यात येत आहेत, असे म्हटले तरी अतिशोयोक्ती होणार नाही.

    निसर्ग शक्तीमान आहे. निसर्गाचे जसे एक मन आहे, तसेच निसर्गाचा एक आत्माही आहे. परम आत्मा! त्याची काही कर्मेंद्रिये आणि ज्ञानेंद्रिये पण असतील. या सर्वांच्या आधारे निसर्ग आपला गाडा हाकत असतो.

    मनुष्य ही निसर्गाची छोटी प्रतिकृती आहे. जसे निसर्गामधे घडत असते, अगदी तस्सेच शरीरात देखील घडत असते. जसा निसर्गामधे सूर्य तसा शरीरात अग्नि किंवा पित्त, उष्णता. जसा निसर्गामधे चंद्र तसा शरीरात कफ किंवा थंडावा, ओलावा. जसा निसर्गामधे वारा तसा शरीरात वायु, गती, हालचाल, चंचलता.

    जे बदल निसर्गात होत असतात, त्याचा परिणाम थेट शरीरावर होत असतो. बाहेर उष्णता वाढली की शरीरावर घाम यायला सुरवात होते आणि त्वचा ओली ठेवून आतील रक्त आदि थंड ठेवले जातात. साहाजिकच उन्हाळ्यात लघवीला कमी होते.

    याउलट हिवाळ्यात लघवीला जास्ती वेळा जावे लागते, आणि घाम येतच नाही. त्वचेचे, घर्मछिद्रांचे आकुंचन केले जाते. आतील उष्णता बाहेर जाऊ नये यासाठी जणुकाही दरवाजे बंद केले जातात.

    हे सर्व बदल कोण करते ? कोण ठरवतं आता आकुंचन आता प्रसरण ? कोण ठरवतं काय खावे प्यावे ? इच्छा कोण निर्माण करतं ? ह्रदय यकृत मेंदूकडून काम करवून घेणारी एक यंत्रणा समांतरपणे काम करीत असते. याचे नियंत्रण कोणाकडे असते ? या प्रश्नांची उत्तरे आजही अर्वाचीन शास्त्राकडे नाहीत.

    उपनिषदे, वेद, पुराणे यामधे याची उत्तरे दडलेली आहेत. याला आपण निसर्ग म्हणू, ईश्वर म्हणू. अशी एक अत्यंत सूक्ष्म शक्ती की, जिच्या सुप्त इच्छेपुढे आपले विचार कस्पटासमान आहेत. या शक्तीचेच विराट रूपातील दर्शन म्हणजे अर्जुनाला झालेले विश्वरूप दर्शन होय !

    म्हणजे मी अर्जुन झालो तर मला सुद्धा असे दर्शन होईल का ? याचे उत्तर हो. असेच येईल. फक्त अर्जुनाचे सर्वच्या सर्व गुण आपल्यात आले पाहिजेत. ती उत्कट भक्ती, ती शक्ती, ती मैत्री, ती भावविभोरता, ती जिज्ञासा, ते वैराग्य, तो कर्मयोग, ते बंधुप्रेम, त्या प्रतिज्ञा, तो संयम, ते शौर्य, ती वीरता, ते चातुर्य, तो संन्यास, सारं काही असलं की भगवंत ( म्हणजे निसर्ग ) अनुकुल होऊन आपल्या सर्व शक्तींनी युक्त होऊन विराट रूप दर्शनासाठी आपल्यासमोर उभे ठाकतात.

    जाणून घेण्याची शक्ती नसली की काही जणांना तो प्रलय वाटतो तर काही जणांना ते तांडव वाटते.
    अक्राळविक्राळ रूपातील नरसिंहाला शांत करण्यासाठीचा, प्रल्हादाचा एक भक्तीकटाक्ष जरी आपल्यात आणता आला तरी निसर्ग आपल्याला अनुकुल होईल आणि निरामय आरोग्य निश्चितच मिळेल.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    08.05.2017

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग सत्तावीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक सात

    निसर्गाचे नियम - सर्वांसाठी सारखेच - भाग दोन !

    यापूर्वी लिहिलेल्या उपवास मालिकेमधे खरंतर हे सर्व नियम सांगितले आहेतच, पण.....

    आपलं जसं एक मन असतं, तसं निसर्गाचं एक मन असतं. विश्व मन. आपण जसा विचार करत असतो, तसा निसर्ग पण विचार करत असतो. आपलं मन जेव्हा विश्वमनाशी जोडलं जातं, तेव्हा खूप प्रसन्न वाटतं. विश्वाची सर्व एनर्जी, उर्जा आपण जेव्हा आपल्या मनापासून स्विकारतो, तेव्हा ही आनंदाची अनुभूती आपल्याला येत असते.

    आपण जसा विचार करतो, तसं आरोग्य आपणाला मिळत असतं. कोणत्याही रोगाची बीजे ही आपल्याच मनामधे असतात. ती विश्वमनाशी जोडली गेली की, तीच स्पंदने पुनः आपल्यापाशी येतात.

    आपल्या उपनिषदांमधे हेच सांगितले आहे. ब्रह्मांडामधे प्रचंड शक्ती आहे. ब्रह्मांडातील सर्व चांगल्या गोष्टी माझ्यासाठी दास बनून येऊ शकतात. हे विश्व मला सतत मदत करत आहे. मला माझ्या प्रत्येक कार्यात ही शक्ती सूक्ष्म रूपात मदत करत आहे. माझ्या सर्व गरजा विश्वमनाकडून पुरवल्या जात आहेत. हे विश्व खूप सामर्थ्यशाली आहे, त्यामुळे माझ्या सर्व योग्य गरजा विश्वमनाकडून सहज पूर्ण होणाऱ्या आहेत. त्याच्यासाठी या गरजा म्हणजे किस झाड की पत्ती !

    फक्त योग्य शब्दात, योग्य वेळी त्या मागितल्या पाहिजेत. त्या सर्व इच्छा पूर्ण होणारच आहेत, असा विश्वास पाहिजे, या आनंदात सतत राहिलो तर त्या मिळतातच !

    वास्तुशास्त्रामधे पण हेच सांगितलेले आहे. वास्तु कायम "तथास्तु" म्हणत असतो. घरात कायम सकारात्मक स्पंदने असतील तर कोणतीही प्रबळ अनिष्ट शक्ती कोणताही त्रास देऊ शकत नाही. निसर्गाचे हे नियम, ही स्पंदने, ही उर्जा घेण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. असा सकारात्मक विचार करायला शिकलं पाहिजे.

    माझ्या आजोबांना डायबेटीस होता, वडीलांना पण होता, आता मलाही तो होणार आहे, असा विचार जर मनात प्रबळ होत गेला तर, कितीही पथ्य पाळले तरी डायबेटीस तुम्हाला शोधत तुमच्याकडे येणारच. हाच निसर्गाचा नियम आहे.

    मग विचारांची स्पंदने जर सकारात्मक ठेवली तर विश्वमना पर्यंत पोचणारा परिणाम सकारात्मकच असणार ! म्हणजेच काहीही झाले तरी मला डायबेटीस होणार नाही, वाढलेल्या साखरेचा मला काहीही त्रास होणार नाही, अशी स्पंदने जर निसर्गामधे प्रक्षेपित केली तर तीच स्पंदने जास्त ताकद घेऊन पुनः आपल्याचकडे परत येतात आणि रोगापासून हवे असलेले संरक्षक कवच आपणाला मिळत असते. यालाच आजच्या भाषेत प्रतिकारशक्ती म्हणतात.

    राॅन्डा बर्न यांनी लिहिलेले एक पुस्तक आहे, द सिक्रेट नावाचं. या पुस्तकात हेच रहस्य सांगितलेलं आहे. आपण जो विचार करतो, तो एवढा सकारात्मक करा की विश्वमनाशी तो जोडला जाईल.

    रोन्डा बर्न यांचे नाव एवढ्यासाठीच घेतले की आपली मानसिकताच अशी बनली आहे, की पाश्चात्य तज्ञ जे सांगतात, तेच अंतिम सत्य. जणुकाही आकाशातूनच पडले आहे, आपल्या पराभूत भारतीय मानसिकतेचा तो परिणाम आहे, इतकंच. बाकी विशेष नाही.
    सो बी पाॅझिटीव्ह, नेचर हियर्स यु !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    07.05.2017

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग सव्वीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक सात

    निसर्गाचे नियम - सर्वांसाठी सारखेच - भाग एक !

    बरेच जण विचारतात, आम्हाला आमच्या लाईफ स्टाईलमधे बदल करणे खरोखरच शक्य नाही.

    आमची लाईफ स्टाईल आमची आम्हीच बनवलेली आहे. निसर्ग नाही थांबू शकत कोणासाठी ! सूर्य उगवायचा आणि मावळायचा नाही ना थांबणार.

    काही गोष्टी या निसर्गावर अवलंबून असतात. देश, काल, ऋतु, वातावरण, हवा, पाऊस पाणी, या गोष्टी आपण नाही बदलू शकत. आणि हे सर्व आयुर्वेदात लिहिलंय हं !
    (दूष्यं देश बल काल...यावर सविस्तर भाष्य पूर्वी झालंय.)

    जेव्हा दुसरा बदलू शकत नाही, तेव्हा आपणच बदलायचं असतं, हा साधा सोपा नियम आहे. निसर्गाच्या काय किंवा शरीराच्या काय, विरोधात गेलात तर पुनः विरोध हा होणारच. अगदी वैज्ञानिक भाषेत सांगायचे तर न्यूटनच्या तिसऱ्या नियमाप्रमाणे ते परत आपल्याकडेच उलटणार, यालाच आपल्या भारतीय संस्कृतीमधे कर्माचा सिद्धांत म्हणतात.

    भारतीय संस्कृतीतील, इतिहासातील, पुराणातील, दाखले देण्याचा मी प्रयत्न करतो, तेव्हाही काही जणांची नाके मुरडतात. काही जणांचा जातीयवाद उफाळून येतो, काही जणांचा बुद्धीवाद, काही जणांचा समाजवाद असा उफाळून येतो, की बोलायचं काम नाय.
    हे सगळं का करायचं ? कशासाठी करायचं ? का जगायचं ?
    आयुर्वेद सांगतो,
    पुरूषार्थ प्राप्तीसाठी !
    झालं....
    टीकाकार आता विचारतील,
    "म्हणजे स्त्रीयांन्ला काहीच म्हत्त्व दिलं न्हाई म्हणाकी, तुमच्या आयुर्वेदात "
    या शब्दांचे योग्य अर्थ समजून घेण्यासाठी भारतीयत्व समजून घ्यावं लागेल, तरच आयुर्वेद नीट समजून घेता येईल. समजून घ्यायचा तो भावनेच्या स्तरावर !! बुद्धीच्या स्तरावर शिकायचे ठरवले तर त्याचे असे अनेक वेगवेगळे विकृत अर्थ निघतात. असो !

    धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरूषार्थ मिळवण्यासाठी, आरोग्य दिलं जातंय, हे महत्त्वाचे आहे. ते जर करणार नसाल, तर आरोग्य मिळवून तरी काय करायचंय ?

    तर आपण या निसर्गाला समजून घेतलं पाहिजे. त्याअनुसार मला बदलून घेतलं पाहिजे, ही धारणा तयार करायला पाहिजे. नाहीतर आरोग्यापासून आपण दूर जातोय हे लक्षात ठेवावे.

    निसर्गातील अन्य पशुपक्षी, प्राणी यांचा अभ्यास केला, त्यांच्या आरोग्याचा अभ्यास केला, त्यांच्या राहणीमानाचा, फूड हॅबिटॅटचा विचार केला, तर अनेक रहस्य आपणाला उडगलतील.

    जो निसर्गाने केलेला नियम मोडतो, तो आजारी पडतो, असे लक्षात येते. आणि निसर्गाच्या बरोबरीने जो जगतो, त्याला नियत आयुष्य आनंदाने जगता येते.

    निसर्गाने केलेले नियम, हे वैश्विक नियम आहेत, उत्तरधृवासारख्या काही अत्यंत प्रतिकुल परिस्थिती सोडल्या तर निसर्गाने केलेला कोणताही नियम मोडण्याची तशी गरज भासत नाही.

    फक्त आपण आपली दृष्टी बदलण्याची गरज आहे. आजच्या भाषेत, आरोग्यासाठी आपण इकोफ्रेंडली व्हावं !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    06.05.2017

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग सव्वीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक सात

    निसर्गाचे नियम सर्वांसाठी सारखेच - भाग एक !

    बरेच जण विचारतात, आम्हाला आमच्या लाईफ स्टाईलमधे बदल करणे खरोखरच शक्य नाही.

    आमची लाईफ स्टाईल आमची आम्हीच बनवलेली आहे. निसर्ग नाही थांबू शकत कोणासाठी ! सूर्य उगवायचा आणि मावळायचा नाही ना थांबणार.

    काही गोष्टी या निसर्गावर अवलंबून असतात. देश, काल, ऋतु, वातावरण, हवा, पाऊस पाणी, या गोष्टी आपण नाही बदलू शकत. आणि हे सर्व आयुर्वेदात लिहिलंय हं !
    (दूष्यं देश बल काल...यावर सविस्तर भाष्य पूर्वी झालंय.)

    जेव्हा दुसरा बदलू शकत नाही, तेव्हा आपणच बदलायचं असतं, हा साधा सोपा नियम आहे. निसर्गाच्या काय किंवा शरीराच्या काय, विरोधात गेलात तर पुनः विरोध हा होणारच. अगदी वैज्ञानिक भाषेत सांगायचे तर न्यूटनच्या तिसऱ्या नियमाप्रमाणे ते परत आपल्याकडेच उलटणार, यालाच आपल्या भारतीय संस्कृतीमधे कर्माचा सिद्धांत म्हणतात.

    भारतीय संस्कृतीतील, इतिहासातील, पुराणातील, दाखले देण्याचा मी प्रयत्न करतो, तेव्हाही काही जणांची नाके मुरडतात. काही जणांचा जातीयवाद उफाळून येतो, काही जणांचा बुद्धीवाद, काही जणांचा समाजवाद असा उफाळून येतो, की बोलायचं काम नाय.
    हे सगळं का करायचं ? कशासाठी करायचं ? का जगायचं ?
    आयुर्वेद सांगतो,
    पुरूषार्थ प्राप्तीसाठी !
    झालं....
    टीकाकार आता विचारतील,
    "म्हणजे स्त्रीयांन्ला काहीच म्हत्त्व दिलं न्हाई म्हणाकी, तुमच्या आयुर्वेदात "
    या शब्दांचे योग्य अर्थ समजून घेण्यासाठी भारतीयत्व समजून घ्यावं लागेल, तरच आयुर्वेद नीट समजून घेता येईल. समजून घ्यायचा तो भावनेच्या स्तरावर !! बुद्धीच्या स्तरावर शिकायचे ठरवले तर त्याचे असे अनेक वेगवेगळे विकृत अर्थ निघतात. असो !

    धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरूषार्थ मिळवण्यासाठी, आरोग्य दिलं जातंय, हे महत्त्वाचे आहे. ते जर करणार नसाल, तर आरोग्य मिळवून तरी काय करायचंय ?

    तर आपण या निसर्गाला समजून घेतलं पाहिजे. त्याअनुसार मला बदलून घेतलं पाहिजे, ही धारणा तयार करायला पाहिजे. नाहीतर आरोग्यापासून आपण दूर जातोय हे लक्षात ठेवावे.

    निसर्गातील अन्य पशुपक्षी, प्राणी यांचा अभ्यास केला, त्यांच्या आरोग्याचा अभ्यास केला, त्यांच्या राहणीमानाचा, फूड हॅबिटॅटचा विचार केला, तर अनेक रहस्य आपणाला उडगलतील.

    जो निसर्गाने केलेला नियम मोडतो, तो आजारी पडतो, असे लक्षात येते. आणि निसर्गाच्या बरोबरीने जो जगतो, त्याला नियत आयुष्य आनंदाने जगता येते.

    निसर्गाने केलेले नियम, हे वैश्विक नियम आहेत, उत्तरधृवासारख्या काही अत्यंत प्रतिकुल परिस्थिती सोडल्या तर निसर्गाने केलेला कोणताही नियम मोडण्याची तशी गरज भासत नाही.
    फक्त आपण आपली दृष्टी बदलण्याची गरज आहे.
    आजच्या भाषेत, आरोग्यासाठी आपण इकोफ्रेंडली व्हावं !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    06.05.2017