(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • अमेरिकन हार्ट असोसिएशनच्‍या पहिल्‍या महिला अध्‍यक्ष डॉ. हेलन टाऊसिग

    अमेरिकन हार्ट असोसिएशनच्‍या पहिल्‍या महिला अध्‍यक्ष डॉ. हेलन टाऊसिग या बालहृदयरोजतज्‍ज्ञ म्‍हणून प्रसिद्ध होत्‍या. जन्‍मतःच हृदयात दोष असणार्‍या बालकांवर हृदयशस्‍त्रक्रिया करून त्‍यांचे आयुष्‍यमान उंचावणारी शल्‍यचिकित्‍साडॉ. ब्‍लॅलॉक यांनी प्रथमतः यशस्‍वी केली व त्‍यानंतर त्‍यांचे नाव सर्वतोमुखी झाले.

      May 14, 2019


  • जागतिक मातृभाषा दिवस

    २१ फेब्रुवारी हा दिवस जगभरात जागतिक मातृभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतातील तसेच जगातील अनेक देशांमधील विविध समूहांच्या मातृभाषांचे जतन, संवर्धन करणाऱ्या विविध संस्था, जागतिक मातृभाषा दिवस साजरा करतात ! सर्व दूतावास आणि आंतरराष्ट्रीय संस्था हा दिवस विविध उपक्रमाद्वारे साजरा करतात.

    हा जागतिक मातृभाषा दिवस साजरा करण्याची प्रथा कशी पडली त्याचा इतिहासही रंजक आहे.

    पूर्व पाकिस्तान (सध्याचा बांग्ला देश) भागात पाकिस्तानची उर्दू ही राष्ट्रभाषा लादण्याच्या अविचाराविरूद्ध आंदोलन सुरू झाले ! हे आंदोलन खूप भडकले तेव्हा आंदोलन आटोक्यात आणण्यासाठी ढाक्का विद्यापीठात निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पाकिस्तानी लष्कराने २१ फेब्रुवारी १९५२ या दिवशी गोळीबार केला. पूर्व पाकिस्तानात उर्दू लादू नये आणि सर्व शासकीय कारभार बंगालीतच असावा या जनतेच्या मागणीला उन्मत्त सत्तेने गोळीबाराने उत्तर दिले !

    २१ फेब्रुवारी हा दिवस बांग्ला भाषेसाठीच्या तीव्र आंदोलनाचा प्रेरणा दिवस ठरला. १९५३ पासून दरवर्षी बांग्ला भाषेच्या आग्रहासाठी २१ फेब्रुवारी हा दिवस पूर्व पाकिस्तानात भाषाग्रह दिवस म्हणून साजरा होऊ लागला. पाकिस्तानचे केंद्र सरकार उर्दूचा हट्ट सोडत नाही आणि बांग्ला भाषेची जास्तच गळचेपी होतेय हे लक्षात आल्यावर या भाषाग्रहाचे रूपांतर पुढे " पाकिस्तानच नको, स्वतंत्र देशच हवा " या मागणीत झाले !

    बांग्ला भाषाग्रहामुळे देश स्वतंत्र झाला याच भावनेतून बांग्ला भाषकांनी आपल्या नव्या देशाचे नाव बांग्ला देश ठेवले. जगात बहुतेक देशांच्या नावावरून त्या देशातील सर्वाधिक प्रचलित भाषेचे नाव ठरले आहे पण बांग्ला देशाचे एकमेव उदाहरण असे आहे की येथील प्रमुख भाषेचे नावच त्या देशाला दिले गेले आहे !

    काही वर्षांनी बांग्ला देशाला संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्यत्व मिळाल्यानंतर १९८२ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघ अधिवेशनात बांग्ला देशाच्या प्रतिनिधीचे पहिले भाषण झाले. त्यात या प्रतिनिधीने बांग्ला देशाच्या वतीने मागणी केली की, मातृभाषेच्या संरक्षण, संवर्धनासाठी दिलेल्या लढ्यातून निर्माण झालेला बांग्ला देश हा जगातील पहिला देश आहे. बांग्ला देशातील या यशस्वी भाषाग्रही लढ्याचा प्रेरणा दिवस २१ फेब्रुवारी आहे. आणि म्हणून संपूर्ण जगाने बांग्ला देशाचा हा प्रेरणा दिवस जागतिक मातृभाषा दिवस म्हणून साजरा करावा.

    ही मागणी संयुक्त राष्ट्रसंघाने १९८९ मध्ये मान्य केली आणि २१ फेब्रुवारी १९९२ पासून जगातील सर्व देशात दरवर्षी २१ फेब्रुवारी हा दिवस ' जागतिक मातृभाषा दिवस ' म्हणून साजरा करण्यास सुरूवात झाली.

    -- निनाद अरविंद प्रधान

      February 21, 2023


  • श्री कनकधारा स्तोत्रम् – १८

    स्तुवन्ति ये स्तुतिभिरमिभिरन्वहं त्रयीमयीं त्रिभुवनमातरं रमाम्।गुणाधिका गुरुतरभाग्यभागिनो भवन्ति ते बुधभाविताया:।।१८।।

    स्तुतिभिरमिभि: - या स्तुतीच्याद्वारे, या स्तोत्राचा आधारे.

    अन्वहं- अनु म्हणजे प्रत्येक आणि अह म्हणजे दिवस. अर्थात प्रत्येक दिवशी. नित्यनियमाने.

    स्तुवन्ति ये- जे स्तुती करतात.

    स्तवन नित्यनियमाने हवे. अडचण आल्यावर नाही.

    त्रयीमयीं- त्रयी शब्दाचा एक अर्थ आहे तीन वेद. त्या ज्ञानाने युक्त असणारी. त्रयी शब्दाचा दुसरा अर्थ आहे, सत्व,रज आणि तम यांची साम्यावस्था. त्रयी शब्दाचा तिसरा अर्थ आहे, स्वर्ग, मृत्यु आणि पाताळ यांचा समूह.

    या सगळ्यांमध्ये परिपूर्ण व्यापलेली ती त्रयीमयी.

    त्रिभुवनमातरं- तीनही भुवनांची, तेथील समस्त जीवांची माता.

    रमाम्- संपूर्ण विश्वाला रममान करणारी.

    अशा आई महालक्ष्मीची जे भक्त या स्तोत्राच्या द्वारे स्तुती करतात.

    भवन्ति ते- ते होतात.

    गुणाधिका- अधिक गुणसंपन्न. अर्थात विश्वातील समस्त जीवांपेक्षा अधिक गुणशाली. गुरुतरभाग्यभागिनो - गुरु तर म्हणजे अत्यंत श्रेष्ठ. अशा भाग्याचे, भाजन अर्थात पात्र.

    अर्थात त्यांना सर्वाधिक श्रेष्ठ असे भाग्य प्राप्त होते.

    बुधभाविताया:- बुध अर्थात ज्ञानी लोक. भावित अर्थातच कौतुक केलेले.
    अर्थात आई जगदंबा, महालक्ष्मीच्या कृपेने या स्तोत्राचे पठण कर्ते विद्वान लोकांच्या कौतुकाला पात्र ठरतात.

    भिक्षा मागायला गेल्यानंतर एका दरिद्री वृद्ध स्त्रीच्या परिस्थितीने गलबलून गेलेल्या पूज्यपाद आचार्यश्रींनी आई महालक्ष्मीची प्रार्थना केल्यानंतर ते ज्या गरीब वृद्ध महिलेच्या अंगणात उभे होते. तेथे असणाऱ्या आवळ्याच्या झाडांवरून सोन्याच्या आवळ्यांचा पाऊस पडला. त्या स्त्रीचे दारिद्र्य कायमचे दूर झाले.

    अशी कथा या स्तोत्राच्या सोबत वर्णन केली जाते.

    -- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड

      March 27, 2020


  • पुस्तक म्हणजे काय ?

    वाचून बघ किंवा होऊन बघ
    मग कळेल, पुस्तकाने उत्तर दिले.
    कपाटात रहातो म्हणून कमी समजू नका.
    वाचता वाचता झोप आली की
    तसेच छातीवर किंवा डोळ्यावर
    ठेवून बघा.

    अनेकांना मी हवा असतो
    वाचकांना वाचण्यासाठी
    कपाटांना कधी कधी सजवण्यासाठी
    तर काहींना ढापण्यासाठी
    पुस्तके ढापणारी मंडळी पण
    मजबूत असतात....तरबेज असतात...

    कोणी ज्ञानासाठी ढापते
    तर कोणी अज्ञान झाकण्यासाठी..
    पुस्तकाप्रमाणे मजकूरही ढापला जातो...
    अगदी लहान ' C ' त्याचे रक्षण करतो म्हणे.
    एक मात्र मानावे लागेल पुस्तक आहे

    म्हणून जग ज्ञानी आहे हे नाकारता येणार नाही.
    त्या पुस्तकात काय नसते राव...
    सर्व काही
    लेखकाचे हुंदके,आनंद, अश्रु
    आणि हो
    डुबवलेले मानधनही..

    प्रकाशक, समीक्षक आणि पुस्तक
    याचें नाते इतके घट्ट असते की त्याला
    उपमा नाही...लेखक पण असतोच
    अर्थात लेखकाचे, कवीचे हुंदके समीक्षकांला का समजत नाहीत ?
    तरी सर्व काही असून नसून पुस्तके अजिक्य आहेत.
    आजच्या इ बुक ने मात्र त्याला धक्का दिला हे निश्चित.
    कपाटातून त्याला काढले आणि अँप मध्ये फिट केले.

    हजारो पुस्तके, लाखो शब्द खिशात ठेवून वाचक फिरत आहे.
    खरे तर पुस्तकाची जागा कपाटातच
    खिशात नाही असे आता म्हणता येणार नाही.
    माझ्या कपाटातील पुस्तके हातात येतात
    टेबलावर अस्ताव्यस्त पडतात तेव्हा
    एक वेगळेच अस्तित्व खोलीत, मनात असते...

    पण कधीकधी त्या खिशातल्या पुस्तकाचा मोह होतोच होतो..
    तरीपण एक मन सांगते पुस्तकेच श्रेष्ठ ?
    अर्थात ई बुक देखील ?
    काळच श्रेष्ठ असतो...

    सतीश चाफेकर

      October 28, 2023


  • आर्मी डे

    आर्मी डे

    भारतीय लष्कराचा मूळ पाया व अंतर्गत गाभा हा ब्रिटीश आर्मीवर आधारलेला आहे. याच ब्रिटिशांकडून १५ जानेवारी १९४९ ला फिल्डमार्शल (तत्कालीन जनरल) के. एम. करिअप्पा यांनी पदभार स्वीकारला. यामुळे हा दिन भारतीय लष्कर दरवर्षी ‘आर्मी डे’ म्हणून साजरा करते.

    भारतीय लष्कर ही प्रशंसनीय काम केलेली सन्माननीय संस्था आहे व आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपल्या लष्कराला मान आहे.

    भारतीय लष्कराची एक प्रतिमा आहे, ती चांगली आहे, लष्कराची नेहमीच प्रशंसा झालेली असून लष्कराने देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय आव्हानांचा सामना करताना आदर्श कामगिरी केलेली आहे,संयुक्त राष्ट्रांच्या शांतिरक्षक सेनेत भारतीय लष्कराची मोठी भूमिका आहे, आंतरराष्ट्रीय समुदायाने भारतीय लष्कराच्या कामाची स्तुतीच केली आहे. भारतीय लष्कर हे केवळ शक्तिप्रदर्शनासाठी नाही पण या संस्थेकडे एक परिपक्वता व जबाबदारी आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      January 16, 2017


  • सुप्रसिद्ध क्रिकेटपटू ब्रायन लारा

    १६ डिसेंबर २००६ साली तो वेस्ट इंडिजचा एकदिवसीय सामन्यांमध्ये १०,००० धावांचा आकडा ओलांडणारा पहिला खेळाडू ठरला.

      August 21, 2021


  • राष्ट्रीय विज्ञान दिवस

    सध्या , शुध्द विज्ञानाचा अभ्यास करण्याची, विद्यार्थ्यांची आवड आणी निकड कमीकमी होते आहे. अुपयोजित आणि व्यावसायिक विज्ञान आणि तंत्रज्ञान शिकण्याकडे आणि तोच व्यवसाय निवडण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढतो आहे.

      February 11, 2022


  • भोग

    मनुष्याच्या आयुष्यात सुखाचा भोग असो किंवा दुःखाचा भोग ! तो मनुष्याला संचित पाप कर्म व पुण्यकर्म यामुळेच भोगावा लागतो. संतश्रेष्ठ जगतगुरु संत तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात प्रमाण देतात की,

    भोगें घडे त्याग । त्यागें अंगा येती भोग ||
    ऐसें उफराटें वर्म । धर्मा अंगीं च अधर्म ||
    देव अंतरे तें पाप । खोटे उगवा संकल्प ||
    तुका म्हणे भीड खोटी । लाभ विचारावा पोटीं ||

    संतश्रेष्ठ संत शिरोमणी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा हा गाथ्यातील अभंग आहे. संत तुकोबाराय या अभंगात असे सांगत आहेत की, एखादा मनुष्य प्रपंचातील विषय भोग घेत असेल आणि त्याला काही काळानंतर त्याचा त्याग करावा वाटला आणि त्याने त्या विषयांचा त्याग केला कि, त्याला लगेच त्या सर्व संचित पाप आणि पुण्य कर्माचा भोग भोगावा लागतो. म्हणजे एखाद्या वाईट व्यक्तीने वाईट कर्म करीत असताना तो करीत राहिला परंतु त्याने तो वाईट कर्म न करण्याचा संकल्प केला आणि त्याने ते वाईट करने सोडून दिले. परंतु त्याने वाईट कर्म सोडून देताच त्याच्यावर दुःखाचा डोंगर किंवा मोठा संकटांचा डोंगर कोसळतो. याचाच अर्थ असा की, त्याने वाईट कर्माचा त्याग करताच त्याच्या पूर्व कर्माचा भोग समोर उभा राहतो.

    संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकोबाराय असेही सांगतात की, हे असे उफराटे वर्म म्हणजे उलटे वर्म आहे. आणि धर्मा अंगीच अधर्म आहे. ज्या कर्मामुळे देवात आणि भक्तामध्ये अंतर पडते ते कर्म म्हणजे पाप कर्म ! आणि देवाचे कर्म म्हणजेच सत्कर्म ! हे लक्षात घेऊनच भक्ताने नीतीने आणि न्यायाने जगायला शिकले पाहिजे. खोटे व्यर्थ संकल्प चांगल्या व्यक्तीने कायमचे सोडून द्यावे.

    तुकोबाराय शेवटच्या चरणात असे सांगत आहेत की खोटे संकल्प, व्यर्थ संकल्प, खोटी भीड न धरता जिथे आपला लाभ असेल, जिथे आपला परमार्थ असेल तेथे आपण आपला लाभ बघावा. आणि आपण नीती न्यायाने कर्म करीत जगत राहावे.

    *विठोबासी शरण जावे |*
    *निजनिष्ठे नाम घ्यावे ||*

    विठोबाचे शरण जाऊन त्याचे नाम घेत अखंड चिंतन करत राहण्यातच खरा धर्म आहे, खरा स्वार्थ आहे आणि खरा लाभ आहे. कारण विठोबाचे नामस्मरण हे फक्त निमित्तमात्र आहे, परंतु त्यामुळे आपल्या मनात नकारात्मक विचार येत नाहीत. आपण सकात्मक विचाराने पुढील कार्य करायला लागतो, ज्याचे भोग आपणास सकारात्मकच मिळते.

    -- डॉ. शांताराम कारंडे

      November 12, 2018


  • आणि नायगारा ठणठणीत कोरडा पडला…

    आणि नायगारा ठणठणीत कोरडा पडला…

    निसर्गराजाने एकदाच… फक्त एकदाच…. असा चमत्कार केला होता, जो पाहून -ऐकून लाखो लोक आश्चर्यचकित झाले होते ! अमेरिकेच्या उत्तरेस असलेल्या आणि अमेरिका-कॅनडा देशांच्या सरहद्दीवर हजारो वर्षे अष्टौप्रहर कोसळत असलेल्या अतिप्रचंड जलप्रपाताचे, नायगारा धबधब्याचे कोसळणे २९ मार्च १८४८ रोजी अचानक थांबले आणि तब्बल तीस तास त्यातून पाणी आलेच नाही. नायगारा ठणठणीत कोरडा पडला होता !

      March 29, 2022


  • बडोदा वस्तूसंग्रहालय

    वस्तुसंग्रहालय म्हणजे ऐतिहासिक ठेवा जतन व संवर्धन करण्याचे ठिकाण होय. ‘वस्तुसंग्रहालय’ या संकल्पनेचा उगम युरोपमध्ये झाला. इ.स. पूर्व तिसऱ्या शतकात अलेक्झांड्रीयामधील टॉलेमी राजाने आपल्या राजवाड्यात पहिल्यांदा वस्तुसंग्रहालय सुरू केले. या राजवाड्यातच अलेक्झांडर द ग्रेट यांचा ग्रंथसंग्रह ठेवण्यात आला होता. परंतु ग्रीक लेखक पॉसॉनियस यांच्या माहितीनुसार इ.स. दुसऱ्या शतकात अथेन्स शहरात एका मोठ्या दालनात काही पेंटिंग्ज सार्वजनिक प्रदर्शनासाठी ठेवलेल्या होत्या. ही प्राचीन काळातील सार्वजनिक वस्तुसंग्रहालयाची सुरुवात होती.

      July 13, 2024