(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मन्ना लिजा

    पॅरिसमधील जगप्रसिद्ध लुव्र संग्रहालयाला रोज हजारो पर्यटक भेट देतात. १९५६ सालची गोष्ट आहे, नेहमी प्रमाणे संग्रहालयामध्ये पर्यटकांची गर्दी होती. त्यातील एका माथेफिरू पर्यटकाने जगप्रसिद्ध मोनालिसाचे चित्र पाहताना आपल्या हातातील दगड दहा फुटावरील चित्राच्या दिशेने भिरकावला. तो दगड चित्राला लागून तेथील रंग खरवडला गेला.

      June 11, 2023


  • समर्थ रामदास स्वामी …..३

    समर्थांनी शिवथर घळीत त्याचे पट्ट शिष्य कल्याण स्वामी यांना दासबोध सांगितला आणि कल्याण स्वामी यांनी तो लिहून काढला. दासबोधा शिवाय समर्थांनी निर्माण केलेले वाङ्मय प्रचंड आहे . या शिवथर घळीचे महात्म खूप मोठे आहे. महाड- भोर रस्त्यावर माजेरी हे गाव लागते. त्या गावा पासून ४ मैलावर शिवथर घळ आहे. समर्थांनी या ठिकाणी वाङ्मय निर्मिती केली.दासबोध लिहिला गेला. महाराष्ट्रात दोन ठिकाणे अशी आहेत कि तिथे कंपास दक्षिण -उत्तर दिशा दाखवत नाही.शिवथर घळ आणि ठाणे जिल्ह्यातील गणेश पुरी जवळ तुंगारेश्वर पर्वतावर एक प्रचंड मोठी पांडव कालीन शिळा आहे तिथे कंपास दिशा दाखवत नाही.गणेश पुरी येथील नित्यानंद स्वामी त्याठिकाणी एकांतात बसायचे.आता श्री सदानंद स्वामी त्याठिकाणी ध्यान धारणा करतात.

    दासबोधा शिवाय त्यांनी करुणाष्टके, मनाचे श्लोक ,आनंदवनभुवनी, आनंदवनभुवनम् (संस्कृत) आत्माराम अंतर्भाव,सार्थ अंतर्भाव,चत्वारमान, जनस्वभावगोसावी ,जुनाटपुरुष, पंचसमासी, पंचीकरणयोग,पूर्वारंभ, बाग प्रकरण,कारखाने प्रकरण,मनोबोध ,मान पंचक , षड्रिपुनिरुपण ,सवाया, समर्थ-वेण्णास्वामी संवाद, समर्थ- कल्याणस्वामी संवाद, समर्थ- केशवस्वामी संवाद, सार्थ भीमरूपी स्तोत्र, श्री सूर्यस्तुती, गुरुगीता, अशी अनेक स्त्रोत्र , कवने आणि आरत्यांची निर्मिती केली .

    चिंतामणी कारखानीस

      March 1, 2016


  • बॉम्बे चे मुंबई – २६ वर्षे पूर्ण

    अनेक वर्षा पासून ‘बॉम्बे’हे शहराचे नाव नसावे, ‘मुंबई’असावे, अशी रास्त भूमिका शिवसेनेने घेतली होती आणि ४ मे १९९५ रोजी त्या वेळच्या युती सरकारने अधिकृतपणे ‘मुंबई’हे नाव अस्तित्वात आणले.

      May 4, 2022


  • मिलते हैं फिर !

    मिलते हैं फिर ! रात्री झोपताना स्वतःला हे आश्वासन देऊन झोपण्याची माझी सवय आहे. आणि सकाळी डोळे उघडले की चक्क स्वतःशी भेट होते. पण हे वाक्य दरवेळी इतकं सहजी सत्यात येत नाही.

      October 6, 2022


  • डिसेंबर ३० : ब्रॅडमन शून्यावर, तेही पहिल्याच चेंडूवर बाद

    ब्रॅडमनला कसोट्यांमध्ये शून्यावर बाद करणारे गोलंदाज आणि ब्रॅडमनच्या कारकिर्दीचे एक विश्लेषण.

      December 29, 2010


  • जानेवारी २४ : पदार्पणात सचिनला दोनदा बाद करणारा नील जॉन्सन

    १९९९ चा विश्वचषक गाजविणारा आणि पदार्पणाच्या कसोटीत दोनदा सचिनचा बळी मिळविणारा झिम्बाब्वेचा नील जॉन्सन.

      January 24, 2016


  • दारूगोळा सुरक्षा यंत्रणेत लाल फितीमुळे अडथळे

    विदर्भातल्या पुलगावमधल्या सेंट्रल ॲम्युनिशन डेपो (केंद्रीय दारूगोळा भांडार, सीएडी) मध्ये ३१ मेला मोठा स्फोट होऊन आगीचा डोंब उसळला. हा भारतातला सगळ्यात मोठा आणि आशियातला दुसऱ्या क्रमांकाचा डेपो होय. बंदुकीच्या गोळ्या, ८१ मिलिमीटर बाँब, १५५ मिलिमीटर गन शेल्स, टॅंक शेल्स, हॅंड ग्रेनेड्‌स, भूसुरुंग, ब्रह्मोस व इतर विद्‌ध्वंसक क्षेपणास्त्रं आणि इतर अमाप दारूगोळा या डेपोमध्ये असतो. या स्फोटाच्या निमित्ताने एकूणच दारुगोळा सुरक्षा यंत्रणेबाबत घेतलेला एक आढावा…

      June 7, 2016


  • सापाचे कान!

    साप या प्राण्याची गणना सरीसृपांच्या गटात होते. तरीही साप हे इतर सरीसृपांपेक्षा वेगळी वैशिष्ट्यं बाळगून आहेत. उदाहरणार्थ, त्यांचा लांबलचक आकार, पायांसारख्या अवयवांचा अभाव, स्वररज्जूंचा अभाव, इत्यादी. सापांना स्वररज्जू नसल्यानं त्यांना स्पष्ट स्वरूपाचे आवाज काढता येत नाहीत. मात्र तोंडानं हवा सोडून केलेल्या ‘हिस्स’ अशा आवाजाद्वारे ते इतर प्राण्यांना घाबरवू शकतात. आवाजाशी संबंधित त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना कान नाहीत. त्यांना कान नसले तरी, ऐकू मात्र येतं. याचं कारण म्हणजे त्यांना, बाहेरून दिसू शकणारा कानाचा भाग नसला तरी, त्यांच्या त्वचेच्या आतल्या भागात श्रवणसंस्थेसारखी रचना आहे.

      July 20, 2023


  • राष्ट्रीय ग्राहक दिन

    ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी ‘ग्राहक संरक्षण कायदा १९८६’ अस्तित्वात असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यावर कायदेशीर कारवाईची तरतूद आहे.

      December 24, 2021


  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – ४

    शिवेशानतत्पूरुषाघोरवामादिभिः
    पंचभिर्हृन्मुखैः षड्भिरंगैः |
    अनौपम्य षट्त्रिंशतं तत्त्वविद्यामतीतं
    परं त्वां कथं वेत्ति को वा ‖ ४ ‖

    भगवान श्रीशंकरांच्या अगम्यतेचे वर्णन करतांना पूज्यपाद आचार्यश्री म्हणतात,
    शिवेशानतत्पुरुषाघोरवामादिभिः
    पंचभिर्हृन्मुखैः- शिव, ईशान, तत्पुरुष, अघोर, वामदेव या पाच प्रसन्न मुखांनी.
    येथे भगवान शंकरांच्या पंचतुंड स्वरूपाचे वर्णन आले आहे. यातील शिव किंवा ज्याला सद्योजात असेही नाव आहे ते जलतत्वाचे, ईशान हे पृथ्वी तत्त्वाचे, तत्पुरुष हे अग्नी तत्वाचे, अघोर हे आकाश तत्वाचे तर वामदेव हे वायू तत्वाचे प्रतिक आहे. त्या पंचमहाभूतांच्या रूपात भगवान प्रगट होत असल्याने यांना मुख म्हटले आहे.
    षड्भिरंगैः - सहा अंगांनी.
    वेदांची सहा अंगे आहेत. शिक्षा, कल्प, व्याकरण , निरुक्त, ज्योतिष आणि छंद.
    या सहा अंगांनी अध्ययन केल्यावर वेदांचा अर्थ कळतो. भगवान या सगळ्यांच्या पार आहे.
    अनौपम्य- अनुपमेय. ज्यांना कशाचीच उपमा देता येत नाही असे.
    षट्त्रिंशतं तत्त्वविद्यामतीतं- छत्तीस तत्व विद्यांच्या पार असणारे.
    शैव सिद्धांतामध्ये असणाऱ्या तंत्रांतर पटल या आगम ग्रंथात, पंचमहाभूते, पंचतन्मात्रा, पंचकर्मेंद्रिये, पंचज्ञानेंद्रिय, यासह मन, बुद्धी ,अहंकार, शिव,शक्ती, सदाशिव, ईश्वर, विद्या, माया, अविद्या, कला, राग, काल, नियती,जीव आणि प्रकृती अशा छत्तीस तत्वविद्यांचे वर्णन आहे.
    परं - या सगळ्यांच्या पार असणाऱ्या,
    त्वां कथं वेत्ति को वा - आपणास कसे आणि कोण जाणू शकेल?

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      June 13, 2020