(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • स्त्री यंत्र नाही हो

    स्त्री यंत्र नाही हो , ती ही माणुस आहे .
    तीला ही मन आहे ,ह्रदय आहे.
    तीला ही भावना आहेत .
    ती ला ही हसावेसे वाटते .
    चारचौघांमध्ये मिसळावेसे वाटते .
    आपल्या विचारांना प्रकट करावेसे वाटते .
    काम करून ती ही थकते .
    ती ला ही आरामाची गरज असते .

    असे म्हणतात की या जगात कोणीही परिपुर्ण नाही ,मग एका स्त्री कडून ती परिपुर्ण होण्याची अपेक्षा का केली जाते .
    प्रत्येक वेळी तीच्या चुकांचा उहापोह का केला जातो ?

    का वारंवार केलेल्या चुकांच्या उहापोहामुळे तीच्यात न्युनगंड तर निर्माण होत नाही ना?
    कधी आळशी तर अकार्यक्षमतेची लेबल्स चढविली जातात .
    केवळ पोटाला जेवण ,अंगाला कपडा व चैनीला वस्तु एवढ्याच तीच्या गरजा असतात का?

    नाही , खरी गरज असते ती भावनिक आधाराची ,तीला समजुन घेणार्या आपल्या माणसाची ,तीला गरज असते प्रेमाची ,मायेची .
    तुमचा एक कौतुकाचा शब्द तीला दहा हत्तींचे बळ देऊन जाते .
    "तु थकली असशील ,थोडा आराम कर "हे प्रेमळ शब्द तीला नवीन उत्साह देऊन जातात .
    तीला ही तीच्या आवडी निवडी असतात .
    तीला ही मित्र मैत्रिणी असताच ,त्याच्यात बसावं गप्पा गोष्टी कराव्यात असही तीला वाटते .
    कधी कधी स्वतःसाठी एक क्षण जगण्याची तीचीही इच्छा असते
    तीलाही कधी कधी एकांतात बसावेसे वाटते .
    भुतकाळातील आठवणींना उजाळा द्यावासा वाटतो .
    तीच्या आवडत्या व्यक्तीशी खुप गप्पा माराव्याशा वाटतात .
    पण म्हणुन काय ती स्वैराचारी होते ?का ती माणुस नाही ?
    तीला भावभावना नाहीत ?
    का तीच्या गरजा इतरांपैक्षा वेगळ्या असतात ?
    मित्रांनो !

    तीला समजुन घ्या ,तीचे दुःख समजुन घ्या .
    तीच्याशी मनमोकळे पणाने बोला ,कारण हे आयुष्य खुप लहान आहे .
    व गेलेला व्यक्ती पुन्हा कधीच परत येत नाही .आणि मागे उरतात त्या फक्त आठवणी व डोळ्यात पश्चातापाचे पाणी !!!!


    -- संकलन : अशोक साने
    फेसबुक, WhatsApp यासारख्या माध्यमातून दररोज येणारे चांगले लेख तुमच्यासाठी शेअर करतो.. लेखकाचे नाव माहित नाही.

  • देवाशी संवाद

    माणूस : देवा रागावणार नसशील तर एक प्रश्न विचारु का?

    देव : विचार ना.

    माणूस : देवा, माझा आजचा दिवस तू एकदम खराब केलास. असं का केलंस तू देवा?

    देव : अरे काय झालं पण ?

    माणूस : सकाळी अलार्म वाजलाच नाही . मला उठायला खूप उशीर झाला .

    देव : बरं मग ?

    माणूस : मग माझी स्कूटर पण चालू होत नव्हती . कशीबशी रिक्षा मिळाली .

    देव : मग?

    माणूस : आज कँटीन पण बंद . बाहेर सँडविच खाल्लं . ते पण बेकार होतं .

    देव : (नुसताच हसला )

    माणूस : मला एक महत्त्वाचा फोन आला होता . त्या माणसाशी बोलताना माझा फोनच बंद पडला .

    देव : बरं मग

    माणूस : संध्याकाळी घरी गेलो तर लाईट गेली होती.मी इतका थकलो होतो की ए .सी. लावून झोपणार होतो .
    का तू असं केलंस देवा माझ्या बरोबर ?

    देव : आता नीट ऐक .
    आज तुझा मृत्यूयोग होता. मी माझ्या देवदूतांना पाठवून तो थांबवला. त्या गडबडीत अलार्म पण थांबला .

    तुझी स्कूटर मी सुरू होऊ दिली नाही कारण स्कूटरला अपघात होणार होता .

    कँटीनच्या जेवणातून तुला विषबाधा होणार होती. ते सँडविच वर निभावलं.

    तुझा फोन मी बंद पाडला कारण समोरचा माणूस तुला एका कारस्थानात अडकवणार होता.

    संध्याकाळी तुझ्या घरी शॉर्टसर्किट होऊन आग लागणार होती म्हणून मी लाईट घालवली .

    माणूस : देवा मला क्षमा कर .

    देव : क्षमा मागू नकोस. फक्त विश्वास ठेव. माझ्या योजनांविषयी कधीच शंका घेऊ नकोस . आपल्या आयुष्यात जे बरं वाईट घडतं त्याचा अर्थ फार उशीरा लागतो आपल्याला

    आपण खरंच देवावर श्रद्धा आहे असं म्हणतो. मग प्रार्थनेच्या वेळी डुलक्या का येतात ? तीन तासाच्या पिक्चर मध्ये जराही झोप येत नाही. ...

    आपल्या आयुष्याला सुंदर बनवणारे विचार आपण दुर्लक्षित करतो आणि नको ते मेसेज फॉरवर्ड करतो.....

    देवाशीच संगत केली तर आपल्याला एकटं का वाटावं? तोच तर हलवतो सगळी सूत्र......
    माणूस हा सवडीनुसार ,वागत असतो...!
    चहात माशी पडली तर चहा फेकून देतो,

    पण साजूक तूपात माशी पडली तर तो
    माशी फेकून देतो तूप नाही..
    अगदी तसच...

    आवडत्या माणसाने चूक केली तर
    काहीही न बोलता ती पोटात घालतो पण
    जर नावडत्याने केली तर आकांडतांडव
    करून बोभाटा करतो.

    'माझं' म्हणून नाही "आपलं" म्हणून जगता आलं पाहिजे ...
    जग खुप 'चांगलं' आहे फक्त चांगलं "वागता" आलं पाहिजे ...
    सगळं विकत घेता येतं पण संस्कार नाही।
    कितीही केल तरी वाळवंटात आणि समुद्रात पिक घेता येत नाही

    देह सर्वांचा सारखाच. फरक फक्त विचारांचा.... 

  • देवाशी संवाद

    माणूस : देवा रागावणार नसशील तर एक प्रश्न विचारु का?

    देव : विचार ना.

    माणूस : देवा, माझा आजचा दिवस तू एकदम खराब केलास. असं का केलंस तू देवा?

    देव : अरे काय झालं पण ?

    माणूस : सकाळी अलार्म वाजलाच नाही . मला उठायला खूप उशीर झाला .

    देव : बरं मग ?

    माणूस : मग माझी स्कूटर पण चालू होत नव्हती . कशीबशी रिक्षा मिळाली .

    देव : मग?

    माणूस : आज कँटीन पण बंद . बाहेर सँडविच खाल्लं . ते पण बेकार होतं .

    देव : (नुसताच हसला )

    माणूस : मला एक महत्त्वाचा फोन आला होता . त्या माणसाशी बोलताना माझा फोनच बंद पडला .

    देव : बरं मग

    माणूस : संध्याकाळी घरी गेलो तर लाईट गेली होती.मी इतका थकलो होतो की ए .सी. लावून झोपणार होतो .
    का तू असं केलंस देवा माझ्या बरोबर ?

    देव : आता नीट ऐक .
    आज तुझा मृत्यूयोग होता. मी माझ्या देवदूतांना पाठवून तो थांबवला. त्या गडबडीत अलार्म पण थांबला .

    तुझी स्कूटर मी सुरू होऊ दिली नाही कारण स्कूटरला अपघात होणार होता .

    कँटीनच्या जेवणातून तुला विषबाधा होणार होती. ते सँडविच वर निभावलं.

    तुझा फोन मी बंद पाडला कारण समोरचा माणूस तुला एका कारस्थानात अडकवणार होता.

    संध्याकाळी तुझ्या घरी शॉर्टसर्किट होऊन आग लागणार होती म्हणून मी लाईट घालवली .

    माणूस : देवा मला क्षमा कर .

    देव : क्षमा मागू नकोस. फक्त विश्वास ठेव. माझ्या योजनांविषयी कधीच शंका घेऊ नकोस . आपल्या आयुष्यात जे बरं वाईट घडतं त्याचा अर्थ फार उशीरा लागतो आपल्याला

    आपण खरंच देवावर श्रद्धा आहे असं म्हणतो. मग प्रार्थनेच्या वेळी डुलक्या का येतात ? तीन तासाच्या पिक्चर मध्ये जराही झोप येत नाही. ...

    आपल्या आयुष्याला सुंदर बनवणारे विचार आपण दुर्लक्षित करतो आणि नको ते मेसेज फॉरवर्ड करतो.....

    देवाशीच संगत केली तर आपल्याला एकटं का वाटावं? तोच तर हलवतो सगळी सूत्र......
    माणूस हा सवडीनुसार ,वागत असतो...!
    चहात माशी पडली तर चहा फेकून देतो,

    पण साजूक तूपात माशी पडली तर तो
    माशी फेकून देतो तूप नाही..
    अगदी तसच...

    आवडत्या माणसाने चूक केली तर
    काहीही न बोलता ती पोटात घालतो पण
    जर नावडत्याने केली तर आकांडतांडव
    करून बोभाटा करतो.

    'माझं' म्हणून नाही "आपलं" म्हणून जगता आलं पाहिजे ...
    जग खुप 'चांगलं' आहे फक्त चांगलं "वागता" आलं पाहिजे ...
    सगळं विकत घेता येतं पण संस्कार नाही।
    कितीही केल तरी वाळवंटात आणि समुद्रात पिक घेता येत नाही

    देह सर्वांचा सारखाच. फरक फक्त विचारांचा....

  • नशिबावरचा विश्वास

    AMOR FATI - नशिबावरचा विश्वास

    हा शब्द लॅटिन भाषेतला आहे. याचा उच्चार कसा करतात मला माहित नाही. मी आमोर फाटी असा करतोय.
    याचा अर्थ आहे "नशिबावरचा विश्वास".

    आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट मग ती वाईट असली, नुकसान करणारी असली तरीही ती तशी घडणे आवश्यक होते... अशा दृष्टिकोनातून ती गोष्ट स्विकारणे. ती गोष्ट आवडली नाही तरीही ती स्विकारणे... अगदी झेन तत्वज्ञानात सांगितलेल्या शांततेने, प्रसन्नतेने स्विकारणे.

    थाॅमस एडिसन जेवत होता. तेवढ्यात एक माणूस धावत आला. त्याने वाईट बातमी आणली होती. एडिसनच्या प्रयोगशाळेला आग लागली होती.
    एडिसनने त्याला कशी प्रतिसाद दिला असेल असे वाटते?
    "अरे देवा, काय हे... माझं नशिबच फुटकं... माझी सगळी मेहनत वाया गेली... " अशी?
    की त्याने खूप चिडून, बिथरून, आरडाओरड केली असेल?
    पण यापैकी काहीच घडलं नाही. एडिसनने आपल्या मुलाला हाक मारली आणि म्हणाला "अरे तुझ्या आईला आधी बोलाव, तिला अशी आग परत पहायला मिळणार नाही"
    स्वाभाविकपणे मुलाला हेच वाटले की आपल्या बापाचे डोके फिरले, वेडा झाला बाबा. आजवर केलेली सर्व मेहनत आगीत भस्मसात होत होती आणि एडिसन शांत होता. तो शांतपणे म्हणाला "आग लागली हे बर झालं माझ्या सगळ्या चुका आणि इतर अनावश्यक गोष्टी जळून गेल्या."

    आमोर फाटी खऱ्या स्वरुपात स्विकारणे म्हणजे काय, याच हे उदाहरण म्हणता येईल - नशिबात असलेली गोष्ट आनंदाने स्विकारणे.
    ६७ वर्षांचा एडिसन विमनस्क, हताश, उदास काहीच न होता नव्या उत्साहाने कामाला लागला. आगीत भस्मसात झालेली संपत्ती त्याने दसपटीने परत मिळवली.

    मी या आमोर फाटी कल्पनेच्या प्रेमातच पडलोय. का माहितेय? कारण आपलं नशिब स्विकारण्यातली ताकत मला समजलीय. यात अक्षरशः एवढी प्रचंड ताकत आहे की आपल्याला काहीच अशक्य वाटत नाही. प्रत्येक गोष्ट होण्यामागे काही कारण असतं आणि ती गोष्ट सकारात्मकतेने स्विकारणे हे तुमच्या हातात असते.

    # कदाचीत तुमचा जाॅब गेला असेल,

    # कदाचीत तुमची आयुष्यभराची कमाई कोणी लुबाडली असेल,

    # कदाचीत तुमच्या सर्वात प्रिय व्यक्तिला असाध्य रोग झाला असेल,

    # कदाचीत तुम्हाला कोणी अत्यंत वाईट वागणुक दिली असेल,

    # कदाचीत आयुष्याने तुमच्यासमोर असे आव्हान उभे केले असेल ज्यातून तुमची सुटका नाही,

    तुम्ही हे सगळं हसत स्विकारता आणि त्यातूनच नव्या उर्जेने पुढे जाता याला आमोर फाटी म्हणतात.

    तुमच्या बाबतीत अशा गोष्टी घडल्याच तर तेव्हा तुम्हाला ओके किंवा चांगल वाटावं हा या लेखाचा उद्देश नाही. काहीही घडलं तरी तुम्हाला ते ग्रेट वाटावं आणि तुम्ही ते हसत स्विकारावं हा उद्देश आहे.
    जर ते घडलं तर ते घडणारच होतं आणि त्यातून तुम्ही स्वतःचा फायदा करून घ्यावा हा आहे.

    एखादी आपत्ती आली असतांना शांत रहाणं हे अनैसर्गिक वाटतं.
    पण तेव्हा शांत रहा.

    जेव्हा आपल्याला हरल्यासारखं वाटेल तेव्हा ते शांत रहाणंच जोमाने प्रवास करण्यासाठी नविन उर्जा देणारं ठरेल...
    बास आता, झालं तेवढं खुप झालं अस वाटेल तेव्हा ते शांत रहाणं नवं इंधन देणार ठरेल...
    सगळं विपरित घडत असतांना ते शांत रहाणं थिंक बिग सांगणारं ठरेल...
    हताशा आली असतांना ते शांत रहाणं तुमच्या चेहऱ्यावर हसू उमटवणारं ठरेल...

    चला मित्रांनो आमोर फाटी स्विकारुया...

    -- राम जोशी, अलिबाग
    (अनुवाद)


    -- संकलन : अमित कुलकर्णी
    मला आवडलेले फेसबुक आणि WhatsApp वरचे पोस्ट मी शेअर करत असतो..

  • आमच कोकण

    From the time line of श्रीनिवास चितळे


    अनुपमा ---"काका ,मी आधीच तुम्हाला सांगून ठेवते कि मला लग्नानंतर पुणे सोडून कुठेही जायचं नाही ,नो कर्जत ,नो कोकण ,नो मुंबई ."
    "अग तू कुठे बघितल आहेस का ? कोणी आवडलाय का ? मला सांग हवतर मी जाऊन विचारतो .
    "तस काहीही नाहीये काका ,पण मला पुणे सोडायचं नाही आणि आई पाठी लागली आहे कि देवगडच एक स्थळ आहे ,मुलगा इंजिनियर आहे आणि इथली बजाज मधली नोकरी सोडून तो गावाला शेती ,बाग बगिच्या पाहायला स्वतःहून गेला आहे म्हणे ".
    "अहो,भावोजी बघा हो ,दारी १००० कलम ,सुपारीच्या ५ बागा ,शेती ,मुंबई पुण्याच्या सर्व सुख सोई आहेत आणि हि जायचं नाही म्हणते ".
    "अहो वाहिनी सोडून द्या ना ,तिला नाहीना जायचं ,आणि त्याला छपन्न मुली मिळतील आणि हिला ५६ उत्तम स्थळ येतील ,अहो आपली एवढी हुशार मुलगी ,कम्प्युटर इंजिनियर त्या शिवाय लेखिका ,कवयत्री ."
    "अहो त्या मुलाने आणि त्याच्या आईने हिला सरोज वन्सनच्या शेखरच्या लग्नात पहिली आणि त्यांना हि खूप आवडली आहे ,मी काय म्हणते एकदा आपण देवगडास जाऊन तर येऊ ,त्या मुलग्याशी हिला बोलू दे ,तिच्यावर जबरदस्ती नाही पण सहज एक कोकण ट्रीप म्हणून जायला काय हरकत आहे ? तिला नाही आवडला तर नाही ."
    "अनुपमा हा वाहिनीचा मुद्दा मला पटला ,अग बघून घे कि ."
    "ठीक आहे ,आलिया भोगासी असावे सादर "म्हणत बाई तयार झाल्या .
    आम्ही कोकणात गेलो ,उत्तम स्वागत .तिच्या सासऱ्यांच्या "ये ग मनी माऊ ,अग तुला पाहिल्यावर अनिकेतनेच तुला हे नाव ठेवलय .आणि हे बघ मस्त दोन दिवस फिरा ,बागेत जा ,समुद्रावर जा ,खा प्या मजा करा आणि तरीही तुला पसंत नाही पडल तर नाही म्हण बाळा ."या गोड बोलण्यानेच अनुच्या चेहऱ्यावरचे भाव थोडे बदलले ,त्या दोघांनी खूप गप्पा वगैरे मारली आणि येताना गाडीत मला अनु म्हणाली "काका बोका आवडला,आणि मग पुणे येई पर्यंत त्याची आजी ,आई ,सासरे ,धाकटा दीर ,एक वन्सबाई ,बाग हे कित्ती कित्ती मस्त आहे याची सहस्र आवर्तन झाली .
    लग्न झाल ,हि माझी तशी लांबची पुतणी , नंतर बरेच वर्ष गाठभेट नाही ,कधीतरी फोनवर बोलण व्हायचं ,तीच सारख एकच टुमण "काका ,काकू या कि एकदा पुतणीच राज्य बघायला ."
    बरेच वर्षांनी योग आला ,गाडीतून उतरलो तर काकूला आणि मला मिठी मारून रडून झाल ,"काका तुम्ही इकडे ट्रीप सारख यायचं सांगितल नसतत ,तर मी खरच स्वर्गाला मुकले असते ,thank you ,thank you ,thank you काके काकू करून झाल .
    "अगो बाई ,एक बाई रुसल्यात का आमच्यावर ,दोन दिवसात इकडे फिरकले नाही म्हणून,"बाप रे किती तो शिष्ठपणा अगदी पहिली कळी उमलली म्हणून एवढ नकोय काही ,माहित्ये पाहिलट करीण आहेस ती ,"सुखली ग ताई माझी ,दोन दिवसात पाणी नाही का मिळाल ,आज सांगत्ये हो वामनला इकडे पाट फिरवायला ."ओ पोफळे वाहिनी ,तुम्ही जीव धरणार कधी ,जरा वारा आला को १८० अंशात डुलता ."
    मी आणि हि बघतच राहिलो ,"अनु किती सुरेक बोलत्येस झाडांशी ?अग कोणी शिकवलं तुला हे ?.
    "काका ,आजे सासूबाई होत्याना त्या सुरवातीला मला घेऊन या बागा मधून फिरायच्या ,झाडावरून एवढ्या प्रेमाने हात फिरवत बोलायच्या कि ती झाड अगदी झिम्माड होऊन जायची आणि खर सांगते काकू ,आजी बागेत शिरण्यापूर्वी पेक्षा त्या अस झाडांशी बोलून गेल्या कि झाड टवटवीत व्हायची ."
    मध्यंतरी माझ्या सासर्यांनी म्हणजे बाबांनी एक गोष्ट सांगितली कि म्हणे एक आदिवासी जमात आहे ,त्यांना एखाद झाड काढून टाकायचं असल कि ते झाड तोडत नाहीत ,सगळे गावकरी जमून त्या झाडाला मोठमोठ्या आवाजात शिव्या देतात ,मग ते झाड अपोआप मरून जात ."
    आमच्या सासूबाई सांगतात झाड ,गुर यांच्याशी प्रेमाने बोलाव ,त्यांच्या पाठीवरून हात फिरवीत कौतुक कराव कि ती झाड देता किती घेशील दो कराने अस दान देतात .
    आम्ही मंत्रमुग्ध होवून नुसत ऐकत होतो ,तेवढ्यात सासूबाई म्हणाल्या झाल्या का बागा फिरून आणि मालकिणीने केलेलं कौतुक ऐकून ? अनु तू बस हो काका काकूशी गप्पा मारीत मी बघत्ये जेवणाच .
    मग .
    एवढ्यात सासरे आले आणि गप्पात सामील झाले ."बाबा उद्या आपल्याला समुद्रावर पोहायला जायचं आहे ,मी काही ऐकणार नाही ".
    "ते म्हणाले अग मी कशाला ?नवऱ्याला घेऊन जा ,माझ्यावर नको तुझी दादागिरी ".
    अहो त्याला वेळ असेल तर ना ,साहेबांचा काहीतरी नवीन कलमाचा प्रयोग चालू आहे ,उद्या दापोलीस जायचं होत पण आता काका आलेत म्हणून पुढे ढकलली .
    "अनु ,पोहायला कधी शिकलीस ?"
    आज्जे सासूबाई आणि बाबा यांची पहिली अट होती कि पोहायला शिकायचं ,मी भीत होते पण बाबांनी हट्टच धरला कि यंदा गणपती विसर्जनाला समुद्रात तू गणपती नवऱ्या बरोबर घेऊन जायचीस म्हणून ,मग काय मारली उडी आणि घाबरल्ये मग यांनी माझी वेणी धरून वर घेतली आणि अशी घट्ट बिलगल्ये त्यांना ,तेव्हा हे हळूच म्हणाले अशी बिलगणार असलीस तर सतरा वेळा विहिरीतून वर काढेन .
    "काका ,सासऱ्याच्या समोर काय पुराण लावल आहे ते ऐकलत ना ?"सासरे हसून म्हणाले तशी पटकन म्हणाली "बाबा you are not my सासरा only ,तुम्ही मित्र आहात माझे ".
    माझ्या डोळ्यातून अश्रू यायचे बाकी होते .
    तेवढ्यात तीच पिल्लू आल आणि म्हणाल "आई मी शिपण्याला जाऊ ?'
    फावड उचलत तरी का ?उगीच पाटात पाय फिरवत खेळत बसायचं ,सर्दी होईल ,काही नको जायला ."
    तेवढ्यात सासूबाई पोह्याच्या बशा घेऊन बाहेर आल्या आणि म्हणाल्या "गवयाच्या पोराने मोठा आ लावला तर घसा दुखत नाही अनु ,जाऊ दे त्याला ."
    "तरी काका अनुची गंमत सांगत्ये ,पहिल्यांदाच पावसात मनसोक्त भिजली ,एवढा पाऊस पुण्यात कधी बघितलेला नसेल ,आणि आली शिंकत आणि कोमट अंग घेऊन ,तेवढ्यात तिचा नवरा हसला आणि मग काय ग बाई तो सदाशिवपेठी फणकारा .तिला औषध दिल आणि दोन दिवसांनी पुन्हा मोठी सर आली तशी गोधडी लपेटून बसलेली ,तेवढ्यात हे आले आणि म्हणाले चला सुनबाई पावसात ,मनसोक्त भिजा ,अग म्हणजे इथल्या पावसाला पण कळत कि हे आपल माणूस आहे ,दोन तीन वेळा भिजलीस कि पाऊस मग सर्दी वगैरे नाही फक्त वरदहस्त देतो ."
    तीन दिवस हे सगळ ऐकत होती ,जावई आणि अनु त्यांच्या नवीननवीन योजना ,शेतीतील ,बागेतील एकेक प्रयोग दाखवीत होते,गोठ्यातील गोधन दाखवीत होते .मी आणि हि फक्त अचंबित .तेवढ्यात दोन खड्डे खणलेले आणि दोन डाळिंबाची रोप उभी होती तिथे अनु घेऊन गेली आणि म्हणाली "तुमच्या दोघांच्या हस्ते वृक्षारोपण आणि आज इथेच बागेत जेवण असा बेत आहे ,"
    निघताना मी विचारल "अनु पुण्यास कधी फेरी ?'
    "काका ,खर सांगू ,इथून पाय निघत नाही ,दोन दिवस नसले कि या आमच्या लाडूबाई म्हणजे वेली रे रुसतात ,मला आठवण आली कि मीच गाडी पाठवून आई ,बाबांना इकडे बोलवून घेत्ये आणि आता काका तू हि निवृत्त झाला आहेस ,तुला हवेतेव्हा कळव मी तुमच्यासाठी गाडी पाठवून देईन ."आणि एकदा सगळ्या मुलांना देखील पाठवून द्या बघा म्हणाव आमच कोकण ".

    -- श्रीनिवास चितळे


    -- संकलन : अशोक साने
    फेसबुक, WhatsApp यासारख्या माध्यमातून दररोज येणारे चांगले लेख तुमच्यासाठी शेअर करतो..

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग चौसष्ट

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 20-धूपं समर्पयामी-भाग एक

    षोडशोपचार पूजेमधील पुढील उपचार आहे, धूप दाखवणे. देवासाठी धूप दाखवणे. निर्गुण रूपातल्या ईश्वराला सगुण रूपातील मूर्तीमधे स्थापन करून त्या देवत्वाला धूप दाखवणे. असा हा उपचार !

    वनस्पतिरसोद्भूतो गंधाढ्यो गंध उत्तमः।
    आघ्रेयः सर्व देवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम् ।।

    असा मंत्र म्हणत धूप दाखवायचा आहे.
    उत्तम वनस्पतीच्या उत्तम रसापासून निर्माण झालेला, सुगंधी द्रव्यांमध्ये उत्तम गंध असलेला, सर्व देव देवतांना ज्याचा गंध आवडतो असा धूप मी तुला अर्पण करतो, त्याचा तू स्विकार कर, अशी प्रार्थना करायला सांगितलेली आहे.

    या सुगंधी धुपातून तयार होणाऱ्या धुराच्या वासाने वातावरणातील अनिष्ट आणि अदृश्य शक्ती नष्ट होतात. वातावरण सुगंधीत व्हावे, प्रसन्न व्हावे, याकरीता देवाच्या नावे हा धूप सर्व घरामधे पसरवला जातो.

    आजच्या भाषेत सर्व घर "फ्युमिगेट" केले जाते. फ्युमिगेशन ही प्रक्रिया आजही ऑपरेशन थिएटर निर्जंतुकीकरणामधे जगभरात वापरली जाते. जे न देखे रवि ते देखे कविच्या स्टाईल मधे जिथे कोणतेही स्थूल द्रव्य अथवा द्रव द्रव्य पोचू शकत नाही, अशा लपलेल्या ठिकाणी हे सूक्ष्म वायुरूप औषध त्वरीत पोचते आणि तेथील छुपलेल्या सूक्ष्म आणि स्थूल दोन्ही जीवजंतुंना बाहेर काढते. देवाला धूप का दाखवायचा ? या प्रश्नाचे हे आहे एका वाक्यातले उत्तर.

    खरंच आहे. साधे घर साफ करायचे असेल तर प्रथम केर काढला जातो. स्थूल रूपातील म्हणजे डोळ्यांना सहज दिसतात असे पाल, उंदीर, असे मोठे जीव आणि ढेकूण, किडे, डास, चिलटे, कोळी, मुंगी, वाळवी, असे घरात लपलेले उपद्रवी छोटे छोटे किटक बाहेर काढले जातात. ( आपले रहाते घर, ज्याला मी 'माझे माझे' म्हणत असतो, पण या माझ्याशिवाय कितीतरी जण या माझ्या निवासस्थानात रहात असतात, हे सांगताना, अनेक प्रकारच्या किड्यांचे वर्णन समर्थांनी दासबोधामधे केलेले आहे.)
    तर असे हे छोटे मोठे किटक केरसुणीने घराबाहेर काढता येतात. पण जमीनीखाली, किंवा फरशीवर चिकटलेले काही जीवजंतु केरसुणीने काढता येत नाहीत, यासाठी गोमूत्र कालवलेल्या शेणाने सारवून घेणे, पाण्यात विभूती, गोमूत्र टाकून सर्व काचा दरवाजे, तावदाने पुसुन घेणे, शेणखळा किंवा सडा टाकणे, अगदी आजही फिनेल, डेटाॅल, सॅव्हेलाॅन, हार्पिक, लायझाॅल इ.इ. द्रव द्रव्य म्हणजेच सॅनिटायझर वापरून उरलेले, चिकटून राहिलेले जंतु धुवुन टाकले जातात. घराची, जमिनीची जेवढी स्वच्छता करता येईल तेवढी आपण करीत असतो. यासाठी घन, द्रव पदार्थ वापरत असतो. परंतु एवढ्या उपायांनी पूर्ण घर स्वच्छ शुद्ध होत नाही. छत आणि जमिन यांच्यामधेही काही भाग शिल्लक असतो, जिथे शुद्धी करणारे घन अथवा द्रव पदार्थ पोचू शकत नाहीत. इथे धूर उपयोगी होतो.

    भिंतीना पडलेल्या सूक्ष्म भेगा, कपाटांच्या मागे, बेडच्या खाली, उशी, बेडशीट, गाद्यांच्या मधे, कौलारू घरात कौलांच्या मधे लपलेले सापासारखे स्थूल जीव, किंवा फ्रीजच्या मागे, टीव्हीच्या मागे, स्पीकर बाॅक्सच्या मागे, पुस्तकाच्या कपाटातील कसर, केरसुणीने पण जाणार नाही किंवा तिथे सॅनिटायझर पण वापरता येणार नाही. अशा सर्व ठिकाणी धूपं समर्पयामी.
    जिथे इतर कोणतेही घन अथवा द्रव द्रव्य पोचू शकणार नाही, अशा ठिकाणी जंतुनाशक म्हणून वायुरूप द्रव्य सहज पोचते आणि जंतुनाशनाचे काम करते.

    आले का काही लक्षात ? कोणत्या देवासाठी धूप घालायचा आहे तो !
    खरं तर हा धूप देवासाठी नाहीच आहे, तो आहे दानवांसाठी ! पण "मिडीयाला" कसे सांगणार ? देवाला आवडतो म्हणून देवासाठी आम्ही धूप जाळतो, असं सांगितले की सगळेच खुश !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    13.06.2017

  • जगाचा पोशिंदा जगला पाहिजे

    केदार दिवेकर यांच्या फेसबुकवरून साभार

  • देव-बीव सगळं झूट आहे

    देव-बीव सगळं झूट आहे..थोतांड आहे..'मेडिकल सायन्स' हाच खरा परमेश्वर आहे..गेल्या ५० वर्षांत मेडिकल सायन्स मुळे जेवढे प्राण वाचले असतील,तेवढे देवाने लाखो वर्षात कुणाचे वाचवले नाहीत..मला कीव करावीशी वाटते त्या लोकांची जे 'ऑपरेशन थेटर ' च्या बाहेरही देवाची प्रार्थना आणि स्तोत्र म्हणत बसतात.."-डॉकटर कामेरकरांच्या ह्या वाक्यावर, सभागृहात एकंच हशा उठला..डॉक्टर कामेरकर एका 'मेडिकल कॉन्फरन्स' मध्ये बोलत होते..डॉक्टर कामेरकर शहरातले निष्णात डॉक्टर..त्यांना भेटायला पेशंट्सच्या रांगाच्या रांगा लागत असत..

    कॉन्फरन्स संपली आणि डॉक्टर घरी आले..वाटेतच त्यांच्या 'मिसेस' चा मेसेज होता कि "मी आज किटी-पार्टीला जात्ये..मुलं सुद्धा बाहेर गेली आहेत..जेवण डायनिंग टेबलवर काढून ठेवलंय..घरी गेलात कि जेवा"...डॉक्टर घरी आले..हात-पाय तोंड धुवून जेवायला बसले..जेवण आटोपल्यावर लक्षात आलं,कि बरंचसं जेवण उरलंय..आता जेवण फुकट घालवण्यापेक्षा कुणाला तरी दिलेलं बरं..म्हणून उरलं-सुरलेलं सगळं जेवण डॉक्टरांनी एका पिशवीत बांधलं आणि कुणातरी भुकेल्याला ते द्यावं म्हणून आपल्या बिल्डिंगच्या खाली उतरले..लिफ्ट मध्ये असताना, त्यांचंच भाषण त्यांच्या कानात घुमत होतं.."देव-बिव सगळं झूट आहे" -हे वाक्य त्यांच्याच भाषणातलं सगळ्यात आवडतं वाक्य होतं..डॉक्टर कामेरकर हे पक्के नास्तिक..देव अशी कुठलीही गोष्ट,व्यक्ती,शक्ती जगात नाही ह्यावर ठाम..जगात एकंच सत्य..'मेडिकल सायन्स'..बाकी सब झूट है'..

    डॉक्टर स्वतःच्याच विचारात बिल्डिंगच्या खाली आले..जरा इकडे-तिकडे बघितल्यावर रस्त्यात थोड्याच अंतरावर कुणीतरी बसलेलं दिसलं..ते त्या दिशेने चालू लागले..जवळ आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं कि एक मध्यम वयाची बाई,आपल्या एका १०-१२ वर्षांच्या मुलाला कवटाळून बसली आहे.
    ते पोर त्याच्या आईच्या कुशीत पडून होतं..ती बाई देखील रोगट आणि कित्येक दिवसांची उपाशी वाटत होती..डॉक्टरांनी ती जेवणाची पिशवी, त्या बाईच्या हातात टेकवली..आणि तिथून निघणार, इतक्यात ती बाई,तिच्या मुलाला म्हणाली "बघ बाळा..तुला सांगितलं होतं ना..आज आपल्याला जेवाया मिळेल..देवावर विश्वास ठेव..हे बघ..देव-बाप्पाने आपल्यासाठी जेवण धाडलंय"......हे ऐकल्यावर डॉक्टरांच्या तळ-पायाची आग मस्तकात गेली..ते त्या बाईवर कडाडले, "ओह शट-अप..देव वगैरे सगळं खोटं आहे..हे जेवण तुझ्यासाठी मी घेऊन आलोय..देव नाही..हे जेवण मी फेकूनही देऊ शकलो असतो..पण मी ते खाली उतरून घेऊन आलोय..काय देव देव लावलंयस..नॉन-सेन्स.."

    "साहेब..हे जेवण तुम्ही माझ्यासाठी आणलंत ह्यासाठी मी तुमची आभारी आहे..पण साहेब..देव हा माणसातच असतो ना ? आपणच त्याला उगीच चार हात आणि मुकुट चढवून त्याला फोटोत बसवतो..माझ्यासाठी तर प्रत्येक चांगलं कर्म करणारा माणूस,हा देवच आहे..आपण त्याला फक्त चुकीच्या ठिकाणी आणि चुकीच्या पद्धतीने शोधाया जातो एवढंच..माझ्यासाठी तुम्ही 'देव'च आहात साहेब..आज माझ्या लेकराचं तुम्ही पोट भरलंत..तुमचं सगळं चांगलं होईल...हा एका आईचा आशिर्वाद आहे तुम्हाला.."

    डॉक्टर कामेरकर, त्या बाईचं बोलणं ऐकून सुन्न झाले..एक रोगट-भुकेलेली बाई त्यांना केवढं मोठं तत्वज्ञान शिकवून गेली होती..आणि ते ह्याच विचारात डांग झाले कि ही गोष्ट आपल्या कधीच डोक्यात कशी काय आली नाही ? चांगली कर्म करणारा प्रत्येक माणूस हा देवच असतो...चांगल्या कर्मातच परमेश्वर आहे..चांगल्या माणसात देव आहे..प्रत्येक 'सत्कृत्यात' देव आहे हे आपल्या कधीच का लक्षात आलं नाही ? आपण 'देवावर विश्वास' ठेवा म्हणतो म्हणजे नक्की काय ? तर आपल्याला चांगली माणसं भेटतील,चांगली परिस्थिती निर्माण होईल ह्यावरच तो विश्वास असतो..डॉक्टरांनी एकदाच त्या बाईकडे वळून बघितलं..आपल्या भुकेल्या लेकराला ती माउली भरवत होती..त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून डॉक्टरांच्या डोळ्यांत पाणी आलं होतं..एक कणखर डॉक्टर त्या दोन अश्रूंत विरघळला होता...डोळे मिटून,ओघळत्या अश्रूंनी,डॉक्टरांचे हात नकळत जोडले गेले होते..

    -- स्वरूप पुरुषोत्तम काळे

    -- संकलन : अशोक साने
    फेसबुक, WhatsApp यासारख्या माध्यमातून दररोज येणारे चांगले लेख तुमच्यासाठी शेअर करतो.. लेखकाचे नाव माहित नाही.

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग त्रेसष्ट

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 19-पुष्प सातवे

    पत्री पूजे मधे आणखी कोणाकोणाला मान दिला आहे तो पाहू.
    माका, बेल, धोतरा, तुळस, शमी, आघाडा, डोरली वांगी, कण्हेर, रूई, अर्जुन, गोकर्ण, वड, ताड, केवडा, निर्गुंडी, इडलिंबू किंवा महाळुंग, आवळा, अशोक, दुर्वा, कदंब, ब्राह्मी, जास्वंद, गुलाब, जाई, जुई, चमेली, सायली, चाफा, इ. अनेक वनस्पतींची पाने देव आणि विशेषतः देवींसाठी सांगितलेली आहेत.
    यातील काही नावे कळणार नाहीत, गुगल गुरूजींना विचारलेत तर फोटोसहीत दाखवतील.

    ही सर्व पाने आपल्या अवतीभवती असतात. फक्त अज्ञानामुळे आपणाला त्याचे उपयोग माहिती असत नाहीत. पण प्रसंगी जीव वाचण्यासाठी सुद्धा काही पाने उपयोगी ठरतात.

    पानफुटी किंवा घावमारी किंवा कोंबाचे पान नावाची वनस्पतीचे पान रक्तस्तंभक आहे. म्हणजे कोणत्याही अवयवातून होणारा रक्तस्राव, किंवा बाह्य आघातामुळे जखमेतून होणारा रक्तस्राव थांबवण्यासाठी ही पाने जादूसारखी काम करतात. जखमेच्या आकारानुसार याची दोन तीन पाने वाटून ही पानांची चटणी जखमेवर लावली असता, जखम पटकन भरून येते.
    पेरूचा पाला, लाजरीचा पाला अशाच प्रकारे काम करतो. विशेषतः मुळव्याधीचे रक्त थांबवण्यासाठी पोटातून सुद्धा या पानांची चटणी खावी.

    जाईचा पाने चावत राहिली तर तोंडात येणारे उष्णतेचे फोड कमी होतात.

    तुळशीचे पान तर कफ विकारावर हुकुमी एक्काच आहे.

    हे सर्व उपचार करताना कोणातरी वडीलधारी माणसांची मदत घ्यावीच. यासाठी ते आपल्या जवळ असावेत,( वृद्धाश्रमात नसावेत. ) अन्यथा याचे प्रमाण, वापरायची पद्धत हे सर्वच काही लिहिता सांगता येत नाही ना. यासाठी गुरू हवा. जवळपास असणाऱ्या वैद्यांना भेटून त्यांच्या सवडीनुसार निसर्गाने दिलेल्या या अमूल्य ठेव्याचे ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत पोचवावे. अशी अनेक मंडळी आपल्या अवतीभवती असतात, यांच्याकडून जेवढे मिळेल ते ज्ञान घेत जावे, शिकत रहावे, ज्ञानी होत रहावे.

    एरंडाचे किंवा कापसाचे पान टाळूवर ठेवले असता, डोके गरम होत नाही. लहान मुलांची टाळू तेलाने भरून झाल्यावर त्यावर कापसाचे पान लावण्याची आपली परंपरा आहे. आता 'अंगाला तेल लावूच नका', असं डाॅक्टरच सांगतात, तेव्हा विषयच संपला. पण या सर्व जुन्या परंपरा कालबाह्य नक्कीच नाहीत. डाॅक्टरांना देखील माहिती आहे, की या रूढीमागील आरोग्य जरी आपल्याला माहिती नसले तरी, आपण लहानाचे मोठे झालो तेव्हा आपल्या आईने आपल्याला हे सर्व उपचार केलेले होते, फक्त हे उपचार आज आमच्या पाश्चात्य धर्तीच्या सिलॅबसमधे लिखित स्वरूपात नाही, आणि आमच्याकडे यातील आरोग्य शोधून काढायची दृष्टी नाही एवढंच.

    देवाच्या नावाने का होईना पण काही वनस्पतींना आपल्या अवतीभवती जागे ठेवणाऱ्या या भारतीय रूढी परंपरंपरांना साष्टांग नमस्कार.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    12.06.2017

  • मेंढ्यांचा मालक

    अशी परिस्थिती देशातील सर्वसामान्य जनतेची झाली आहे..