(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • चंचल चित्त स्थिर करणारे श्री दत्तात्रेय स्तोत्र

    संसारात अन् परमार्थात आपल्याला काही साध्य करायचे असेल तर सर्वप्रथम आपल्या मनाची एकाग्रता साधणे अतिशय आवश्यक आहे.मन स्थिर नसेल तर आपल्या अभ्यासाचा किंवा साधनेचा काही उपयोग होत नाही. भक्तगणांची ही अडचण ओळखून परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराजांनी साक्षात दत्तगुरूनांच चित्त स्थिर करण्यासाठी ह्या स्तोत्रातून साकडे घातले आहे.

  • नोटा – बदली’ नंतरचे ‘राज’ बदल ?

    ८ नोव्हेंबर २०१६ च्या नोटा - बदलिच्या निर्णयाने मोदी सरकार ने धमाका उडवून दिला. कोणी त्याचे समर्थन करो , कोणी विरोध करो ; पण कोणीही दुर्लक्ष करूच शकणार नाही . " अशाच स्वरूपाचा तो निर्णय आहे . या निर्णयांच्या अंमलबजावणीमुळे अक्षरशः सर्वांनाच या ना त्या प्रकारे स्वतःच्या आर्थिक व्यवहारांचा पुनर्विचार करावा लागत आहे . एक प्रकारे या निर्णयांचा पाठपुरावा हा प्रतिष्ठेचा प्रश्न बनत आहे . . . . सरकारच्या समर्थकांसाठी आणि विरोधकांसाठीही .

    तेंव्हापासून माझ्या मनात असे येत आहे कि ही कदाचित केवळ सुरुवात आहे. अगदी आर्थिक क्षेत्रापुरता विचार करायचा झाला तर वस्तू आणि सेवाकर ( GST ) ची अंमलबजावणी उशिरात उशीरा ऑगस्ट - सप्टेंबर २०१७ च्या सुमारास होणे, आर्थिक वर्ष सध्याच्या एप्रिल ते मार्चच्या ऐवजीजानेवारी ते डिसेंबर करण्याची घोषणा होणे , वैयक्तिक आणि संस्थात्मक आयकरात दर आणि करपात्र उत्पनाच्या पातळ्यांमधे बदल होणे , जास्तीतजास्त आर्थिक व्यवहार बन्कान्मार्फतच करण्याची सक्ती होणे , बन्कान्मार्फत होणारे व्यवहार हा काही प्रमाणात तरी कर - रचनेचा पाया होणे आणियावर्षी अर्थसंकल्प जरी १ फेब्रुवारी २०१७ ला सादर होणार असलातरी नंतरच्या काळात तो नोव्हेंबर - डिसेंबर मधेच सादर होणे असे बदल होण्याचीशक्यता जरासुद्धा नाकारता येत नाही .

    अर्थातच असे बदल फक्त आर्थिक क्षेत्रातच होतील असे मला आधीही वाटत नव्हते . आणि भारतीय लष्कराच्या सर - सेनापतीची नेमणूक करताना दोनआधिकार्यान्ची वरिष्ठता डावलली गेली हे पाहिल्यावर तर जास्तच तसे वाटू लागले आहे . पण त्याचवेळी हेही लक्षात घेतले पाहीजे कि त्याच आठवड्यातसर्वोच्च न्यायालयाच्या सर - न्यायाधीशान्ची निवड करताना अशी वरिष्ठता डावलली गेलेली नाही . त्यात संबंधित न्यायाधीशनी काही अवघड निर्णयघेतले असले तरी सुद्धा !

    त्यातच या दोन ( सरसेनापती आणि सरन्यायाधीश ) नेमणुका होत असतानाच त्याच काळात भारतीय युवा मोर्चाच्या अध्यक्ष - पदी खासदारपूनमताई महाजन यांची नेमणूक , निवड होणे हे मोठे सूचक आहे . राजकीय क्षेत्रातही उलथापालथ होणार अशा अर्थाने ही नेमणूक सूचक आहे . महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास मंत्री नामदार पंकजाताई मुनढे यांचे पंख येणाऱ्या काळात छाटले जातील असा तर या नेमणुकीतुन दिला जाणारा संकेततर नाही ना हे बघणे महत्वाचे ठरू शकेल . तसे नंतर करायचे असेल तर मुनढे - महाजन गटाच्या मंडळी कडून होऊ शकणार्या संभाव्य विरोधाची धारकमी करण्यासाठी मदत म्हणून तर ही नेमणूक आधीच केली गेली नाहीये ना हे तर येणारा काळच ठरवेल .

    राजकीय क्षेत्रात होऊ शकणारा एक संभाव्य बदल म्हणजे २०१७ - १८ सालासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत संमत झाल्यानंतर केंद्रीय मंत्री -मंडळात होऊ शकणारे बदल . असे बदल होतील असे जर ग्रुहित धरले तर त्यापैकी एक बदल असा असू शकतो कि विद्यमान केंद्रीय अर्थमंत्री मा . श्री. अरुण जेटली यांची अर्थखात्यातून बदली . अशी बदली जर झालीच तर जेटली ग्रुह , संरक्षण किंवा परराष्ट्र - व्यवहार यांपैकी कोणत्या खात्याचे तेमंत्री बनतील हे बघणे उदबोधक ठरेल .

    कारण अरुण जेटली हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अत्यंत विश्वासातले मंत्री आहेत . २०१४ च्या मोदी लाटेत अम्रुतसर सारख्या लोकसभा मतदार -संघातून निवडणूक हरूनही ते अर्थसारख्या महत्वाच्या खात्याचे मंत्री आहेत . सुरवातीस तर अर्थखात्याबरोबरच संरक्षण खात्यासारख्या दुसऱ्याअतिशय महत्वाच्या खात्याचा कार्यभार त्यांच्याकडे होता .

    त्यामुळे अरुण जेटली यांची अर्थखात्यातून बदली झालीच तरी ती परराष्ट्र - व्यवहार , संरक्षण किंवा ग्रुह अशा अतिशय मान्यवर आणि महत्वाच्या खात्यातच होण्याची शक्यता आहे . विद्यमान परराष्ट्रमंत्री मा . सुषमाजी स्वराज यांची नुकतीच एक मोठी सर्जरी झाली आहे . त्यामुळ मा . श्री . अरुण जेटली हे जर अशा संभाव्य फेरबदलात परराष्ट्रमंत्री झालेच तर सुषमाजी लोकसभा सभापती होण्याची शक्यता आहे . भाजपाचे ज्येष्ठ नेते मा . श्री .लालकृष्ण अडवाणीजी यानी अलीकडेच संसद न चालल्याबद्दल केलेल्या निषेधाची दखल घेतल्याचा संकेत त्यातून दिला जाऊ शकतो . सुषमाजी तशाही अडवाणी गटाच्या मानकरी असल्याची चर्चा माध्यमात होत असते हे लक्षात घेता तोही भाग असेल . निदान असू शकतो . तसे झाल्यास लोकसभेच्या सध्याच्या सभापती मा . सुमित्राताई महाजन यांचा समावेश एकतर केंद्रीय मंत्रीमंडळात होऊ शकतो ( अटलजीन्च्या मंत्रीमंडळात त्यामंत्री होत्याच . ) किंवा एखाद्या मोठ्या राज्याच्या राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ति होऊ शकते .

    अशा संभाव्य फेरबदलात जेटली साहेब परराष्ट्रमंत्री होण्यास एकच अडचण वाटते आणि ती म्हणजे स्वतः पंतप्रधान मा . श्री . नरेंद्र मोदी यांचे स्वतचेया खात्यात इतके सातत्यपूर्न लक्ष असते कि जेटली साहेबांसारखा त्यांचा अत्यंत विश्वासू मंत्री ते या खात्यास देतील का ? मात्र खरंच तसेच झाल्यास सध्या एम. जे . अकबर आणि व्ही . के . सिंग असे दोन मातब्बर राज्यमंत्री परराष्ट्र खात्यात आहेत . त्यातल्या अगदीच दोघांचीही या खात्यातून जरीबदली झाली नाही तरी निदान एकाची तरी होईल अशी शक्यता आहे .

    जर अशा संभाव्य फेरबदलात जेटली साहेब परराष्ट्रमंत्री झाले नाहीत तर दुसरी शक्यता म्हणजे ते केंद्रीय ग्रुहमन्त्रि होतील . मात्र ते उत्तर प्रदेशच्याविधान - सभा निवडणुकात काय निकाल लागतो यांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असेल . उत्तर प्रदेशात भाजपाचे राज्य त्या निवडणुकात आल्यासमा . श्री . राजनाथसिंगजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यास ही शक्यता जास्त आहे .

    मा . श्री . अरुण जेटली अशा संभाव्य फेरबदलात जर ग्रुह किंवा परराष्ट्रमंत्री न झाल्यास संरक्षणमंत्री होण्याचीही शक्यता आहे . सध्याचे संरक्षणमंत्री मा. श्री . मनोहर पर्रिकर यांची कार्यक्षमता , निस्प्रुहता , निरलसता , बुद्धीमत्ता या कशाचाच प्रश्ण नाही . पण एका विशिष्ट वयाननन्तर सार्वजनिक पदीन राहण्याचा त्यांचा स्वतचाच स्वयंघोषीत निर्णय आणि काही कालापूर्वीच्या त्यांच्या एका मुलाखतीत त्यांनी " संरक्षण खात्यात स्थिरावलो आहे , पणदिल्लीत नाही " हे उत्तर यावरून ही शक्यता वाटते .

    मा . सुषमाजी स्वराज यांच्या बाबत वाटणारी अजून एक शक्यता म्हणजे विद्यमान राष्ट्रपति मा .श्री . प्रणबकुमार मुखर्जी यांची राष्ट्रपतिपदाचा कार्यकालसंपल्यावर त्या पदासाठी होणाऱ्या निवडणुकीत सुषमाजी भाजपाच्या उमेदवार असू शकतात . ज्येष्ठतेच्या निकषांवर मा . श्री . लालकृष्ण अडवाणी हेत्यासाठीचे उमेदवार असायला हवे . पण सद्यस्थितीत ती शक्यता कमी वाटते . याची खात्री पटल्यामुळे तर खासदारकी सोडण्यास असल्याची चिडचिडत्यांच्याकडून व्यक्त झाली असेल का ? मा . श्री . शरद पवार हे राष्ट्रपति पदाचे उमेदवार असण्याची शक्यता त्यांच्या समर्थकांना वाटत असली ,मोदीसाहेब अधूनमधून पवार साहेबान्बद्दल कौतुकास्पद उदगार काढत असले , महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा . श्री . देवेंद्र फडणवीस यांनी जरी आत्ताच्यास्थानिक संस्थाच्या निवडणुकात नाव घेऊन टीका केली नसली तरी शरद पवार साहेबांच्या राष्ट्रपति पदासाठीच्या उमेदवारीला मोदी साहेबांचा भाजपपाठिंबा देण्याची शक्यता आजमितिला तरी फार कमी वाटते . पण भाजपाने पुरस्कृत केले नाही तरी जर पवार साहेब राष्ट्रपति पदासाठी उभे राहिले तरशिवसेना काय भूमिका त्यावेळी घेते हे बघणे महत्वाचे ठरेल . मा . प्रतिभाताई पाटील यांना मराठी महिला या मुद्द्यावर दिलेल्या पाठिंब्याच्या जरपुनरावृत्ति झाली तर त्यावेळी भाजप - शिवसेना यांचे परस्पर - संबध हा विषय त्यावेळी पुन्हा एकदा ऐरणीवर येऊ शकतो .

    अरुण जेटली साहेब यांची जर अर्थखात्यातून बदली झालीच तर नवीन अर्थमंत्री कोण असेल ? राज्यसभा tv ला त्यांनी नोटाबंदीच्या संदर्भात दिलेल्यामुलाखतीनंतर डॉ . नरेंद्र जाधव यांच्या नावाची त्या पदासाठी काहीजण चर्चा करत आहेत . पण पंतप्रधानांची कार्यपद्धती लक्षात घेता ती शक्यता फारकमी वाटते . मा . श्री . पीयूष गोयल भाजपाचे राष्ट्रीय खजिनदार असूनही , मोदी साहेबांचे जुने निकटवर्ती असूनही पीयूष गोयल एकदम पूर्ण कॅबिनेटमंत्री झाले नव्हते हे इथे आवर्जून लक्षात घ्यावे लागेल . सध्याचे रेलवे मंत्री सुरेश प्रभू यांची शक्यता तुलनेने जास्त वाटते . पण माझा अंदाज असाआहे कि जर खरोखरच नवीन व्यक्ति केंद्रीय अर्थमंत्री बनन्याची संधी असेलच तर ती व्यक्ति पीयूष गोयल असेल . त्यांची मोदी सरकार मधलीआजपर्यंतची कामगिरी , त्यांची शैक्षणिक पात्रता , नोबेल पारितोषिक विजेत्या अर्थतज्ज्ञला खडे बोल सुनावन्याचे त्यांनी दाखवलेले धाडस या गोष्टीइतकेच याबाबत महत्वाचे ठरू शकेल असा घटक म्हणजे मा . नरेंद्र मोदी यांची त्यांनी गेली अनेक वर्ष केलेली पाठराखण . याबाबत मा . अरुणजेटली आणि पीयूष गोयल यांच्यत असणारे साम्य म्हणजे नरेंद्र मोदी हे अश्वमेध विजेते योद्धे आहेत हे त्यांनी फार पहिल्यापासूनच ओळखले . गोवाअधिवेशनात मोदिन्च्या नावाची अधिक्रुत घोषणा ही फार फार नंतरची बाब आहे . जेटली - गोयल यांनी त्याच्या कितीतरी आधीपासून मोदी साहेबांनासक्रिय पाठिंबा दिला आहे . याबाबत मा . निर्मलाजी सीतारामन आणि मा . श्री . जयंत सिन्हा यांची नावेही चर्चेत येऊ शकतात . पण या सगळ्यांतमा . श्री . पीयूष गोयल यांचे पारडे अरुण जेटली साहेबांची जागा घेण्यास मला जड वाटते .

    जर कदाचित खरोखरच श्री . पीयूष गोयल हे केंद्रीय अर्थमंत्री झालेच तर आजमितिला त्यांच्याकडे असणारा " एकत्रित " उर्जा खात्याचा कारभार मा .श्री . जयंत सिन्हा यांच्याकडे जाऊ शकतो . श्री . जयंत सिन्हा यांची अर्थखात्याचे राज्यमंत्री म्हणून असणारी अत्यंत वाखाणणयाजोगी असणारीकामगिरी आणि आजपर्यंत नोटा - बदलीच्या निर्णयाबाबत केंद्र सरकारची बाजू जर सर्वात जास्त प्रभावीपणे जर कोणी मांडली असेल तर ती श्री जयंतसिन्हा यांनी हे दोन घटक याबाबत नक्कीच त्यांच्या बाजूने उभे राहतील . पण जर यदाकदाचित या खात्याचे मंत्री म्हणून जर जयंत सिन्हा यांना संधीमिळाली नाही तर ती संधी मा . निर्मलाजी सीतारामन यांना मिळेल असा माझा अंदाज आहे .

    अजून एक ओझरता , पुसटसा विचार किंवा शक्यता . . . अगदीच लगेचच होईलच असेही नाही . . . पण मला वाटणारी शक्यता म्हणजे आपल्यामहाराष्ट्राचे आपले मुख्यमंत्री मा . श्री . देवेंद्र फडणवीस यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश . शब्द समावेश असा आहे . वर्णी असा नाही . त्यामुळेजेंव्हा केंव्हा असा बदल होईल तेंव्हा मा . श्री . देवेंद्रजी फडणवीस यांना केंद्रात चांगलेच खाते मिळेल . आणि जर खरोखरच देवेन्द्रजी केंद्रीय मंत्री झालेतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद मा . श्री . प्रकाशजी जावडेकर किंवा मा . श्री . चंद्रकांतदादा पाटील यांना मिळू शकेल .

    अर्थातच हे सगळे अंदाज आहेत . पंतप्रधान मा . श्री . नरेंद्र मोदी यांची खासियतच मुळी सर्वांचे अंदाज ( चांगल्या अर्थाने )'चुकवन्याची आहे .

    (ही माझी वैयक्तिक मते आहेत . )

    -- चंद्रशेखर टिळक
    C - 402 . राज पार्क
    मढवि बंगल्या जवळ .
    राजाजी पथ .
    डोम्बिवलि ( पूर्व ) .
    पिन . . . ४२१२०१ .
    मोबाईल . . . . ९८२०२९२३७६ .
    E-Mail : tilakc@nsdl.co.in

  • द्वेष म्हणजे तिरस्काराची भावना

    मानवी जीवन म्हणजे एक कोडेच म्हणावे लागेल. मानवी मनाचा थांग पत्ताच लागत नाही असे अनेकवेळा म्हटले जाते एव्हढेच नव्हे तर तशी प्रत्यक्ष प्रचिती देखील जीवन जगताना येते. मानवी मन हे गुणअवगुणांचा महासागर आहे. इथे चांगुलपणा आहे वाईटपणा देखील आहे.

  • मनं निर्ढावत चालली आहेत

    हिरवी हिरवी रानं....निळं निळं आकाश...लख्खं लख्खं सूर्यप्रकाश पात्यापात्यावर चमकणारे दवबिंदू ...उंच माळाच्या पोटाला अलगद बिलगून जाणारी चिमुकली पाय वाट. हलकेच झाडाला हेलकावून टाकणा-या वा-याच्या लहरी... झाडावर बगळ्यांची पांढरी नक्षी हे सारं असं मनात साठवलेलं होतं.. पूर्वी.परिसराची किती किती ओढ होती म्हणून सांगावी.... निसर्गाविषयी खूप आकर्षण वाटायचं.. तासनतास घालवायचे नदीच्या काठावर.. पिवळी- पिवळी कन्हेरीची फुलं गोळा करायची.. वाटत रहायचं आपल्याला ह्या फुलाशिवाय या निसर्गाशिवाय पर्यायच नाही... अगदी बुडून जायचो निसर्गाच्या रुपात तेंव्हा.. हळूहळू काळ बदलला.. एक एक करून अनुभवाचे पक्षी -हदयाच्या झाडावर गोळा होऊ लागले.त्यातले काही विचित्र होते.. काही थोडे निराशावादी होते. तर काहीना वर्गीकरणाच्या कुठल्याच कप्प्यात बसवता येणार नाही एवढे भयानक होते....

    ज्या निसर्गावर जीवापाड प्रेम करावं. जीव ओवाळून टाकावा असे वाटायचे तोच निसर्ग आज खायला उठल्यासारखा वाटू लागला आहे.. आपल्याला शेत आहे याची जाणीव होऊ लागली.. मग नदीला मोठ्ठा पूर आला तर सारी पिकं वाहून जातील... नुकसान होईल अशी भिती वाटू लागली. त्यामुळे पूर्वीसारखा मोठ्ठा पाऊस आल्यावर पूर आला तर टाळ्या वाजवून होणारा आनंद आज राहिला नाही... जाणिवांची मनात पक्की वस्तीस्थानं होत गेली.. अन पूर्वीच्या आनंदाच्या झोपडीचं पुनर्वसन होत गेलं... एक एक करून हळूहळू खळाळून हसणं विरुन गेलं...उरलं फक्त नाटकी हसणं तेवढंच...

    आत्ता आत्ता मुर्दाड विचारांनी डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. हळूवार भावनांचे पक्षी दूर देशी उडून गेलेत आपण एक निगरगठ्ठं दगडी माणूस बनू लागलोय... तरीही आपण हात- पाय हलवून जिवंत असल्याचं नाटक करत असतो... आपण जिवंत नसतोच मुळी.. आपल्या भावना मृत... आपल्या संवेदनांना बोथट कातडीची साल.. कासवाच्या पाठीवरील टणटणीत... कवचासारखी किंवा आपण म्हणजे एखाद्या खाटीकखान्यात कसाई... कुणाबद्दलही कशाबद्दलही अनुकंपा न बाळगणारं आपलं स्वार्थी कठोर मन... या सार्या गोष्टी पुरेशा आहेत आपले मुर्दाड जीवन स्पष्ट करायला.... फक्त श्वास घ्यायलाच आपण जीवंत जीवन समजत असतो.

    आता तर आपल्या डोळ्यांमध्ये स्प्लेन्डर किंवा कॅलीबर्सची स्वप्न तरळू लागली आहेत. कधी कधी आपण एखादी ड्रीम राईडही घेऊ लागतो त्यावरून. एखाद्या गाडीची ठेकेदार फायरींगही रुंजी घालू लागते... आपल्या कानात... सेकंड ... थर्ड करत करत आपण सुसाट वेगाने धावू लागतो.. काळ्या करकरीत.. डांबरी रस्त्यावरुन ... काही रुपायाचं पेट्रोल गाडीत टाकून चेहऱ्यावरुन फुटका आनंद आणि दळभद्री समाधान मिरवत असतो आपण नेहमीच... पण ज्यांना संध्याकाळच्या फोडणीच्या तेलाची भ्रांत आहे अशी माणसं दिवसभर हाडाची काडं करून राबल्यावर संध्याकाळी त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारं निखळ समाधान किंवा खळाळून हसणं आपल्याला हेवा वाटावं असंच असतं... पण आपल्याला त्याचं काहीच नसतं आपण फक्त खोट्या समाधानाच्या पाठीमागे लागलेलो असतो. आपल्याला आता ओळखू येत नाही ओढ्याचा खळखळणारा आवाज किंवा पाखरांचे कुजबुजणे, झाडांचे पानांच्या आडून डोकावणे... फुलांचे हळुवार पसरणे.... मोरांचे केकारव... काही काहीच वाटत नाही कशाचं ....समजत नाही त्यांची भाषा. आपली सौंदर्य दृष्टीच वेगळी झाली आहे पूर्णपणे.. कृत्रिम फुलं काचेच्या भांड्यात टेबलावर ठेवणं किंवा चित्रात दिसणारं संकुचित सौंदर्य एवढंच आपल्याला माहीत असतं..

    एखादं सुंदर गीत मुक्तपणे ऐकायला येईनासं झालं आहे हल्ली कुठलाच स्वर मधुर वाटत नाही गीत कितीही हळुवार असलं तरीही कानावर कर्कश्य आघात व्हावेत किंवा मुर्दाड भावनाच सारख्या मनात येऊ लागतात राहून-राहून सर्वांनाच सवय झाली आहे याची.. कुणालाही कशाचेही काहीही वाटत नाही.. सर्वांची मनं वरचेवर निर्ढावू लागली आहेत... प्रत्येक जण घाई... गर्दी .. गडबड यातच एवढा रमला आहे की त्याला किंचितही कळवळा वाटत नाही.. करुणेचा झरा कोरडा पडू लागलेला आहे... नावाभोवती वलंयं तयार होत आहेत.. मोठेपणाचे बेगडी मुखवट्यावर मुखवटे चढवले जात आहेत.. भावनांचेही व्यावसायीकरण होऊ लागलं आहे.. करकचून बांधून टाकलं आहे आपण आपल्या मनाच्या मुक्ततेला 'लाईफ स्टेटस'च्या नावाखाली आपल्याला फार मोठं टेन्शन येतं आपल्या बायकोला पिक्चरला घेऊन जाता आलं नाही याचं.. उटी.. कुलू मनालीला जायचं रिझर्वेशन तिकीट मिळालं नाही याचं.. कधीकधी नळाच्या पाण्याचं किंवा पेपर उशिरा आल्याचं टेन्शन येतं... आपल्याला पण आपल्याला चुकूनही आठवण होत नाही आपल्या शेजाऱ्याचा मुलगा का आतल्याआत धुमसतो आहे? किंवा परवा गल्लीत कोणी तरी का आत्महत्या केली? कारण आपण त्यांच्यावर खदाखदा हसण्याशिवाय काहीच करू शकत नसतो तसे आपण... आपण स्वतःला जिवंत समजत असतो तसं आपलं वागणंही फार काही चूक नसतं...

    अनुभवाच्या पक्षाच्या टोचण्या खात -खात प्रवास चालू असतो मात्र आपलीच फसवणूक करीत असतो... आपण... नेहमीच!

    -- संतोष सेलूकर
    परभणी
    ७७०९५१५११०

  • विळखा दहशतवादी कारवायांचा : आय.एस.आय. वर नियंत्रण करण्याची गरज

    हिवाळ्यापूर्वीच भारतामध्ये घुसखोरी करण्याच्या इराद्याने २,०००-२,५०० अतिरेकी भारतात घुसण्याच्या प्रतीक्षेत असल्याचा गौप्यस्फोट लेफ्टनंट जनरल के.एच सिंग यांनी नाग्रोटा येथे २६ जुलैला केला.पाकमध्ये, ३०-३५ छुप्या अतिरेकी-प्रशिक्षण-केंद्रांतून प्रशिक्षण देणे सुरूच आहे.

  • ६ मे – आंतरराष्ट्रीय नो डाएट दिवस

    पहीला नो डाएट दिवस इग्लंड मध्ये मैरी इवांस यांनी ६ मे १९९२ रोजी साजरा केला. १९९८ सालापासून ६ मे रोजी पूर्ण जगात हा आंतरराष्ट्रीय नो डाएट दिवस पाळला जातो.

  • पन्हाळगडचा शिवा काशीद : एक शोध ( सुधारित लेख )

    ( व्यक्ती, समाज )
    पन्हाळगडचा शिवा काशीद : एक शोध
    ( सुधारित लेख )

    • आषाढ महिना आला की जशी विठ्ठलाची आठवण होणें साहजिक आहे; तशीच शिवाजी-काळातील, पन्हाळगडचा वेढा, आणि त्यासंदर्भात, बाजी प्रभू देशपांडे व शिवा काशीद यांचें स्मरण होणें अपरिहार्य आहे. बाजी प्रभूंबद्दल अनेक ठिकाणी उल्लेख झालेला असतो, (मीही अन्यत्र त्यांच्याबद्दल कांहीं लिहीतच आहे ) ; पण, आपल्याला शिवा काशीद याच्याबद्दल फारशी माहिती नसते. इतिहासकारही त्याच्याबद्दल जास्त माहिती देऊं शकत नाहींत.
    आज आपण या शिवा काशीदबद्दल थोडासा विचार करूं या. त्यासाठी, आधी पन्हाळगडच्या वेढ्याचा अगदी थोडक्यात आढावा.

    • अफझलखानाच्या वधानंतर विजापुर दरबारनें सिद्दी जौहर याला शिवाजीविरुद्ध लढायला धाडलें. सिद्दी किंवा हबशी म्हटले जाणारे हे लोक म्हणजे अबीसीनियन्स (आजचे, इथोपियन्स). जंजीर्‍याचा सिद्दीही तसाच; आणि, या पन्हाळगडच्या वेढ्याच्या प्रसंगीं शिवाजी राजांकडून ( त्यावेळी ते ‘महाराज’ झालेले नव्हते) लढणारा सिद्दी हिलाल हाही तसाच, हबशी.
    सिद्दी जौहर चालून आला त्यावेळी शिवाजी राजे मुद्दाम पन्हाळ्यावर थांबले. ध्यानात घ्या, हा पन्हाळा शिवाजी राजांनी अल्प काळापूर्वीच स्वराज्यात सामील केला होता. याचा अर्थ असा की, या वेळी शिवा काशीद व बाजी प्रभू यांचा शिवाजी राजांशी परिचय होऊन अल्प काळाचाच कालावधी लोटला होता. बाजी प्रभू तरी, बांदलांचे कां होईना, पण सरदार होते. त्यामुळे शिवाजी राजे पन्हाळ्यावर राहिल्यानंतर, बाजींचा शिवाजी राजांशी, अगदी ज़वळचा नसला तरी, खचितच परिचय झालेला होता असणार. पण, शिवा काशीद तर, किल्ल्यावरील ८००० माणसांपैकी एक साधारण माणूस. त्यामुळे, बहुतेक करून, त्याचा शिवाजी राजांशी, आधी (म्हणजे, पन्हाळ्याहून पलायनाचा प्लॅन बनण्याआधी) व्यक्तिगत परिचयही नसणार. शिवाजी राजांसाठी प्राणाची आहुती देणार्‍या या दोघांच्या संदर्भात ही बाब ध्यानांत ठेवणें आवश्यक आहे ; तरच त्यांच्या प्राणाहुतीचें महत्व ध्यानीं येऊं शकेल.

    शिवाजी राजांचा होरा असा होता की, आपण पन्हाळ्यावर थांबल्यानें सिद्दी जौहर पन्हाळ्याजवळच, म्हणजेच स्वराज्याच्या अगदी कडेलाच थांबेल. जौहरनें पन्हाळ्याला वेढा दिला. पावसाळा ज़वळ आलेला होता. शिवाजी राजांचा कयास होता की, पावसाळा सुरूं झाला की जौहर वेढा उठवून चालता होईल. पण तसें झालें नाहीं. वेढा सुरूंच राहिला. अखेरीस, राजांनी निर्णय घेतला की जौहरला गाफील बनवून आपण स्वत: विशाळगडावर पलायन करायचें. त्याप्रमाणें, त्यांनी जौहरशी तहाची बोलणी सुरूं केली.अमुक अमुक दिवशीं राजांनी जौहरच्या छावणीत येऊन त्याला भेटायचें, असें दोन्ही बाजूंच्या चर्चेत ठरलें. त्यामुळे जौहर व त्याची फौज बेसावध झाली. त्याचा फायदा घेऊन, त्या ‘ठरलेल्या’ दिवसाच्या आदल्याच रात्रीं, अगदी अंधारात, थोड्याशा माणसांना बरोबर घेऊन, राजांनी विशाळगडाकडे लपूनछपून प्रयाण केलें. त्यावेळी, त्यांच्या रक्षणाची जबाबदारी बांदलांकडे होती. बाजी प्रभू देशपांडे हे बांदलांचे सरदार असल्याकारणानें शिवाजी राजांच्या बरोबरच होते. सिद्धी जौहरचा वेढा अगदी ‘घट्ट’ होता ; त्यामुळे, त्याच्या माणसांना आपल्या पलायनाचें वृत्त कळूं शकेल, आणि तसें झाल्यास ते आपला पाठलाग करतीलच; म्हणून त्यांची दिशाभूल करायला शिवाजी राजांनी ‘शिवा काशीद’ याला बरोबर घेतले होते. बाजी प्रभू व बांदलांच्या मावळ्यांबरोबर शिवाजी राजे वेगळ्या वाटेनें (जंगलातून) पुढे गेले ; आणि शिवा काशीद एका पालखीत बसून , शिवाजी राजांसारखाच पोषाख करून, अन्य थोड्याशा मावळ्यांसोबत, दुसर्‍या वाटेनें (मलकापुरकडे जाणार्‍या हमरस्यानें ) पुढे गेला. ती पालखी जौहरच्या जावयाच्या सैनिकांनी पकडली, व आपण खर्‍या शिवाजीलाच पकडलें असें समजून ते शिवा काशीदला जौहरकडे घेऊन गेले. तिथें उलगडा झाला की हा तर खरा शिवाजी नाहींच. जौहरनें शिवा-काशिदला ठार मारायाचा हुकूम दिला, आणि तो लागलीच अमलात आणला गेला. पण, या सगळ्या ‘डायव्हरशन’मुळे, शिवाजी राजांना विशाळगडाकडे पोचण्यासाठी अमूल्य वेळ मिळाला. शिवा काशीदचें बलिदान असें कामाला आलें.

    • हा शिवा काशीद कोण होता ? त्याबद्दल विविध पुस्तकांमध्ये एवढाच उल्लेख आढळतो की तो एक न्हावी होता, व तो शिवाजी राजांसारखा दिसत होता. ( त्याबद्दल आपण पुढे चर्चा करणारच आहोत) .

    या ‘शिवा काशीद’मधील ‘काशीद’ म्हणजे काय ? तें त्याचें आडनांव होतें काय ? आज ‘काशीद’ हें आडनांव महाराष्ट्रात आढळते खरें ; पण काशीद हा शब्द मराठी वाटत नाहीं. शिवकाळात व मराठेशाहीत , आदिलशाही इत्यादींच्या राजकारणात फारसी भाषा चालत असे, व आजूबाजूच्या मिश्र समाजात ‘दखनी हिंदी’ चालत असे. दखनी हिंदी म्हणजेच, फारसी व मराठीचें मिश्रण, ज्यात दक्षिणेतील तेलगू, कन्नड या भाषांचे शब्दही आहेत.

    या पार्श्वभूमीमुळे मी असा विचार केला की, काशीद या नांवाचें मूळ फारसीत सापडूं शकेल. (मला उर्दू-फारसीतील ‘क़ासिद’ हा शब्दही परिचित होता ) . त्या अनुषंगानें, आतां आपण ‘शिवा काशीद’ या नांवामध्ये ज़रा खोलात ज़ाऊन पाहूं या.

    • फारसीत ‘काशीद’ या शब्दासारखे दोन शब्द आहेत. एक आहे, वर उल्लेखलेला ‘क़ासिद’ हा शब्द. क़ासिद या शब्दाचा अर्थ होतो, ‘पत्रवाहक, संदेशवाहक, दूत’. हा शिवा काशीद, जौहरसाठी ‘दिशाभूल करणारा संदेश’ (की, ‘हाच खरा शिवाजी आहे’) घेऊन जाणारा, एकतर्‍हेचा ‘दूत’च होता. म्हणून त्याला ‘काशीद’ म्हटलें असावें काय ? शक्य आहे. पण, या निष्कर्षाला अंतिमत: येण्यापूर्वी, आपण ‘काशीद’सारख्याच फारसीतील दुसर्‍या शब्दाकडेही पाहूं या. हा शब्द आहे ‘कासिद’ .

    ( ध्यानात घ्या, ‘क़ासिद’ हा शब्द वेगळा व ‘कासिद’ हा वेगळा. फारसीत ‘क़’ आणि ‘क’ या भिन्न उच्चारांसाठी ‘क़ाफ’ आणि ‘काफ’ ही भिन्न अक्षरें आहेत. हिंदीतही ‘नुक़ता’ देऊन हा फरक दाखवता येतो. पण, मराठीत नुक़त्याची पद्धत नसल्यानें , हा फरक स्पष्ट करून सांगणें मला उचित वाटलें).

    कासिद या फारसी शब्दाचा अर्थ आहे, ‘ खोटा, नकली’. आणि, हा अर्थ पाहिल्यानंतर, लागलीच आपल्याला ‘शिवा काशीद’ या नांवाचा अर्थ स्पष्ट कळतो. ‘कासिद’ या फारसी शब्दाचें मराठीत झालें ‘काशिद, किंवा काशीद’. म्हणजेंच, ‘शिवा काशीद’ याचा अर्थ होतो ‘ नकली शिवा ’. अर्थातच, त्याला ‘शिवा काशीद’ हें नांव शिवबांनी दिलेलें नसणार ; तर, ‘सिवा कासिद’ (नकली शिवा) हा उल्लेख, विजापुरच्या सैन्याकडून, कदाचित स्वत: सिद्दी जौहरकडूनसुद्धा , झालेला होता असणार. मग, तेंच नांव इतिहासाकालीन पोवाड्यांमध्ये, व कथाकहाण्यांमध्ये रूढ झालें.

    • या ‘शिवा काशीद’ चें खरें नांवही ‘शिवा’च होतें, ही कविकल्पनाच. त्याचें खरें नांव इतिहासाच्या पानांमध्ये लुप्त झालेलें आहे. हा ‘शिवा काशीद’ अगदी शिवबांसारखाच दिसत’असे , हें वर्णन तर नक्कीच ‘फक्त एक कविकल्पना’ आहे.
    एका टी.व्ही. सीरियलमध्ये तर दाखवलें होतें की शिवा काशीद हा, शिवाजी राजे यांच्यासाखाच पोषाख करून हिंडत असे. हीसुद्धां कविकल्पनाच. पूर्वी राजेलोक आपल्यासारखा दिसणारा ‘डुप्लिकेट’ ठेवत असत, ती गोष्ट वेगळी. त्यासाठी अर्थातच, ‘राजमान्यता’च असे. एक तर शिवा काशीदसारख्या सामान्य माणसाला राजांसारखा भरजरी पोषाख बनवून घेणें परवडलेंच नसतें. आणि, त्यातून, त्यानें स्वत:होऊन, राजाज्ञेशिवाय असा पोषाख केलाच , तर त्याला निश्चितच सज़ा झाली असती (अगदी मृत्यूदंडसुद्धा) . शिवाजी राजे तर या बाबतीत, ( डुप्लिकेटच्या बाबतीत) खचितच फार जागृत असणार.

    मात्र, ‘शिवा काशीद’ याची उंची व बांधा आणि वय हे, साधारणपणें शिवबांसारखेच असणार, हें उघड आहे. शिवाजी राजांनी कांहीं काळ आधीपासूनच पलायनाची तयारी ठेवलेली होती; म्हणून त्याप्रमाणें, शिवा काशीदला शिवबांसाख्या दाढीमिशा वाढवायला सांगितलें गेलें असेल. किंवा, त्याकाळी, बरेच लोक दाढीमिशा ठेवीत, त्याप्राणें या शिवा काशीदला आधीपासूनच दाढीमिशा असतील, व त्या फक्त ‘शेऽप’ (shape) करून शिबवांसारख्या बनवल्या गेल्या असतील . जर शिवा काशीद खरोखरच न्हावी असेल, तर, हें दाढीमिशांना ‘शेऽप’ ( shape) देण्याचें काम त्यानें स्वत:च केलें असूं शकेल.

    आणखी पुढें जाऊन, मला असें वाटतें की, शिवा काशीदला शिवाजी राजांसारख्याच , किंवा त्यांसारख्या shape करतां येण्याजोग्या, दाढीमिशा असण्याची शक्यता कमीच आहे . समजा, त्याला आधीच दाढीमिशा वाढवायला सांगितलें गेलें असलें, तरीही, उपलब्ध वेळेत, त्याच्या दाढीमिशा शिवाजी राजांएवढ्या वाढतील याची शाश्वती काय ? उपलब्ध काळ हें एक महत्वाचें factor आहे. तें अशासाठी की, आधी शिवाजी राजांना वाटत होतें की पावसाळा सुरूं होऊन, मुसळधार पाऊस पडायला लागल्यानंतर विजापुरच्या फौजा वेढा उठवून परत जातील. पण, पावसातही, वेढा न उठवतां, उलट तो अधिकच आवळून, सिद्दी जौहरनें शिवाजी राजांचा होरा चूक ठरवला. त्यानंतरच राजांनी विशाळगडाला पलायन करण्याचा बेत रचला असणार. म्हणजेच, असा बेत ठरवण्याच्या वेळेपासून ते प्रत्यक्ष पलायन करेपर्यंत, मध्ये फारसे दिवस गेलेले नसणार ; आणि एवढा कमी काळ दाढीमिशा व्यवस्थित वाढवायला पुरेसा नाहीं. पण, मुद्दा असा की, शिवा काशीदनें शिवाजी राजांसारख्या दाढीमिशा वाढवायची गरजच काय ? त्याला तशा नकली दाढीमिशा लावतां येऊं शकत होत्या ; आणि अंधारात, त्या खोट्या आहेत हें लगेच कळलेंही नसतें. असा नकली दाढीमिशा फक्त नाटकांतच वापरल्या जाऊं शकतात असें नव्हे. शिवाजीचा गुप्तहेरप्रमुख बहिर्जी हा रूप पालटून हिंडत असे. तो बैरागी, साधू अशी रूपेंही घेतच असणार. अशा लोकांवर तर इतर जन हेरगिरीचा संशयही घेणार नव्हते. या रूपांसाठी बहिर्जी, नकली दाढीमिशा वापरतच असणार. बहुतेक करून, तशा प्रकारच्या खोट्या दाढीमिशा, पलायनाच्या वेळीं शिवा काशीदला लावल्या गेल्या असाव्यात.

    तें कांहींही असो ; पण, दाढीमिशा घातलेला, पालखीत बसलेला, शिवाजी राजांप्रमाणें कपडे घातलेला, सोबत रक्षणासाठी पांच-पन्नास मावळे असलेला, हा ‘ शिवा काशीद’ जेव्हां सिद्धी जौहरच्या माणसांना ‘सापडला’ ( ज्याला शोधायला व पकडायलाच तर ते बाहेर पडले होते) , तेव्हां, खास करून रात्रीच्या अंधारात, तो खरा शिवाजी राजाच आहे, असें त्यांना वाटणें साहजिक होतें. आणि, तशीच त्यांची एक्सपेक्टेशन (अपेक्षा) होतीच, त्यामुळे, पकडल्या जागीं अधिक शहानिशा न करतां त्यांनी शिवा काशीदला नेऊन, सिद्दी जौहरच्या पुढे हज़र केलें . (शत्रूला चकवण्यासाठी इतका डीटेल्ड् प्लॅन बनवणारे, व शत्रूच्या मानसशास्त्राची पूर्ण कल्पना असणारे, अशा शिवाजी महाराजांना शतश: प्रणाम).

    • मला स्वत:ला, शिवा काशीद हा खरोखरच न्हावी होता काय, याबद्दल संभ्रम आहे . मला असें वाटतें की, जसें या ‘नकली’ शिवाला आदिलशाही लोकांनी ‘शिवा कासिद’ असें म्हटलें , त्याचप्रमाणें, त्याचें ‘न्हावी’ असें नामाभिधान आपल्या मराठ्यांनीच केलेलें असूं शकेल. (लक्षात असूं द्या, त्याकाळीं ‘न्हावी’ असा उल्लेख करणें हें अपमानास्पद समजलें जात नसे) .

    आपण जेव्हां एखादा ‘सीक्रेट प्लॅन’ करतो, त्यावेळी इतरांना त्याचा सुगावा लागूं नये म्हणून आपण ‘कोड् वर्डस्’ वापरतो. शिवाजी राजांच्या पन्हाळगड ते विशाळगड या ‘पलायनाच्या बेता’साठीही एखादा ‘कूट शब्द’ असेल, आणि त्यात महत्वपूर्ण भूमिका निभावणार्‍या ‘काशीद’ या व्यक्तीसाठी ‘न्हावी’ असा ‘गुप्त शब्द’ वापरला जाऊं शकतो. ‘न्हावी’ हा शब्द कां निवडला असेल ? तर, तो सिद्दी जौहरची ‘बिनपाण्यानें हजामत’ करणार आहे ( फजिती करणार आहे) , म्हणून. ‘न्हावी अमुक रस्यानें जाईल’ असा उल्लेख कुणी जरी ऐकला तरी, त्या त्रयस्थाला, (किंवा कुणी एखादा फितूर असलाच, तर त्याला ) काय कळणार आहे ? शिवाजी राजांची कार्यपद्धती, व सावधपणा, पाहतां, हेंच योग्य वाटतें.
    [ इथें एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते, अन् ती ही की, युद्धात अथवा राजकारणात स्ट्रॅटेजी प्रथम ठरते; मग विशिष्ट ‘ऑपरेशन’ , (कामगिरी) ठरते, { वा सब्-ऑपरेशन (उप-कामगिरी) ठरतें } ; नंतर तिला ‘कोड नेम’ दिलें जातें. आणि, त्यानंतर त्या कामगिरीसाठी माणसांची निवड केली जाते. त्यामुळे, प्रस्तुत पलायनाच्या संदर्भातल्या उप-कामगिरीमधील ‘डुप्लिकेट’ शिवाजीसाठी ‘न्हावी’ असा गुप्त शब्द आधी ठरविला गेला असणार, आणि मागाहूनच त्या व्यक्तीची ------ जिला आपण शिवा काशीद म्हणून ओळखतो, त्याची ----निवड केली गेली असणार. याचा अर्थ असा की, ‘शिवा काशीद’ हा खरोखरच न्हावी होता किंवा नाहीं, या बाबीचा ‘कोड नेम’बद्दलच्या थिअरासाठी फरक पडत नाहीं. ( आणि, तो खरोखरच जर न्हावी जमातीमधील होता असेल , तर त्याबद्दल माझा कसलाही आक्षेप नाहीं . माणसाचें कर्तृत्व त्याच्या जन्म-ज़ातीवर अवलंबून नसतें. महाभारतील कर्ण म्हणतोच , ‘दैवायत्त कुले जन्म: मदायत्त च पौरुषम्’ ; मी कुठल्या कुलात जन्म घ्यावा हें दैवानें ठरविलें आहे , पण माझें पौरुष, माझें कर्तृत्व माझ्यावरच निर्भर आहे ). त्यामुळे, सर्वाधिक महत्वाची गोष्ट म्हणजे ‘शिबा काशीद’ नामक व्यक्तीने स्वत:होऊन स्वराज्यासाठी ‘जान कुर्बान’ करणारी कामगिरी केली, याची नोंद घेणें गरजेचें आहे ] .

    • आपल्या सर्वांना बाजीं प्रभूच्या पावनखिंडीतील लढ्याची ब बलिदानाची माहिती आहेच. त्यांच्या बलिदानाचें महत्व यत्किंचितही कमी न लेखतां, आपण शिवा काशीदच्या बलिदानालाही महत्व दिलें पाहिजे. अशा ‘अनाम’, (किंवा ‘कोड् नेऽम’ असल्यामुळे ज्यांचें खरें नांव माहीत नाहीं, अशा ) अनेकांनी आपल्या प्राणांची बाजी लावली, त्या पायावरच तर स्वराज्य उभें राहिले. लक्षात घ्या, केवळ कांहीं महिन्यांपूर्वीच ज्या शिवाजी राजांशी त्यांचा प्रत्यक्ष परिचय झालेला होता, ( परंतु, ज्या शिवबांच्या महद्.कार्याची त्यांना आधीपासून माहिती होती असणार), त्या शिवाजी राजांसाठी , व त्याच्या महत्तापूर्ण हेतूच्या पूर्तीसाठी, बाजी प्रभू या शूर सरदारानें आणि ‘शिवा काशीद’ या अगदी सर्वसाधारण माणसानें आपापली अत्यधिक-महत्वाची भूमिका पार पाडली , आपण आपले प्राण गमावणार हें आधीच ठाऊक असूनही ! अशा साधारण-असाधारण व्यक्तींना माझा सलाम, माझा मुजरा.

    - - -

    - सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
    मुंबई / पुणें
    M – (91)-9869002126
    eMail : vistainfin@yahoo.co.in
    Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

  • घुमान साहित्य संमेलनाचे थेट प्रक्षेपण

    मराठी साहित्य संमेलनाला महाराष्ट्र आणि पंजाब सरकारचे सहाय्य, तसेच इतरही मार्गातून पैसे मिळत असताना पाच लाख रुपयाच्या थेट प्रक्षेपणासाठी सरकारची पुन्हा मनधरणी करणे योग्य आहे का?

  • मैत्र आत्म्याला भिडणारे (फ्रेंडशिप डे विशेष)

    कोणाचे तरी कोठे तरी मैत्रीचे नाते जुळते. बऱ्याच वेळा मैत्री व्यक्तीसापेक्ष असते. पण तसा विचार केला तर आवडीच्या क्षेत्रात कार्यरत असल्यास त्या क्षेत्राशीही मैत्रीचे बंध निर्माण होतात. मग अशा मैत्रीला काय नाव द्याल ? कशी असेल त्याची अनुभूती ? जाणून घ्यायचेय ? नेमके हेच प्रश्न समोर ठेवून आम्ही बोलते केले प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि प्रकाश आमटे यांना…

  • दादरचा अभूतपूर्व छंदोत्सव

    p-34951-dadar-hobby-exhibition

    १० आणि ११ मार्चला दादरच्या दादर सार्वजनिक वाचनालयातील " छंदोत्सव २०१७ " या विविध छंद जोपासणाऱ्यांच्या छंदांच्या प्रदर्शनाला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. होळीच्या सणाची सुट्टी, दुसऱ्या शनिवारची सुट्टी , उत्कंठा शिगेला पोचलेल्या उत्तरप्रदेश निकालांची घोषणा आणि मुलांच्या परीक्षांचे दिवस यामुळे प्रदर्शनाला कसा प्रतिसाद मिळणार याबद्दल साशंकता होती. पण उ.प्र. च्या निकालांप्रमाणेच या प्रदर्शनाला छंदप्रेमी प्रेक्षकांनी अतिशय अनपेक्षित आणि अभूतपूर्व प्रतिसाद दिला. परीक्षा तोंडावर आलेल्या असूनही, कित्येक पालक आपल्या मुलांना " चांगले काही " पाहायला मिळावे म्हणून आवर्जून घेऊन येत होते.कितीतरी रसिक हे कल्याण, अंबरनाथ, वसई-विरार, पालघर अशा लांबच्या ठिकाणाहूनही आले होते.

    वेगळेच क्रोशाचे काम, फेल्टच्या कापडाच्या कलाकृती,सुसंगत अशा कविता लिहिलेल्या छत्री- बुकमार्क्स- टीशर्ट- पिशव्या-किचेन्स- पिगीबँक अशा वस्तू, कागदाच्या घड्या घालून केलेली फुले आणि विविध वस्तू, ओरिगामी, पार्चमेंट आणि आयरिश फोल्ड यांच्या वापराने बनविलेल्या कलाकृती,नारळ आणि बांबू यांच्या वापरातून बनविलेल्या श्रीकृष्ण मूर्ती- गणपती- दिवे-कलश-अशा कलाकृती,केवळ कागदाच्या जेमतेम पाव सेंटिमीटरच्या विविधरंगी पट्ट्या वापरून केलेली देखणी चित्रे, झाडांची पाने- झावळ्यांच्या पट्ट्या-- हिराच्या काड्या इत्यादींपासून बनविलेल्या पर्यावरण स्नेही वस्तू आणि छोटी खेळणी, कॅनव्हासवर उतरविलेली छायाचित्रे,रद्दी कागदापासून बनविलेले दणकट फर्निचर, नैसर्गिक रंगांमधील सुलेखन, वेगळ्या प्रकारच्या भरतकामातून तयार केलेले घड्याळ- कोंबड्याच्या आकाराचा
    टिकोझी- पर्स- फ्रेम्स- अशा अनेक गोष्टी,करवंटी आणि लाकूड यापासून बनविलेल्या लामणदिवा- मोटारसायकल- पिस्तूल- अशा वस्तू अशा असंख्य कलाकृती प्रदर्शनामध्ये होत्या.
    चित्रविचित्र आकाराचे - खूप जुने आणि नवे- विविध उपयोगाचे पत्ते आणि गंजिफा, विविध मुखवटे, महाराष्ट्रातील सर्व बस सेवेची तिकिटे, नाणी-नोटा- टपाल तिकिटे- प्रथम दिवस आवरणे,सुप्रसिद्ध व्यक्तींच्या सह्या आणि हस्ताक्षरे , जुन्या / नव्या काड्यापेट्यांची लेबल्स यांचे संग्रहही खूप छान होते.
    कागद कोरून साकारलेला आयफेल टॉवर- २ x २ इंचाचा कॅरम बोर्ड- २ इंचाचा फ्लॉवरपॉट अशा वस्तू सत्तरी ओलांडलेल्या चंद्रहास पटवर्धन यांनी बनविल्या होत्या. उपनिषदांचा अभ्यास केलेल्या यास्मिन श्रॉफ या ज्येष्ठ पारसी बाई स्वतः: काढलेल्या पक्ष्यांच्या आणि निसर्ग छायाचित्रांवरून " जगात सर्व गोष्टी शक्य आहेत, कधीही निराश होऊ नका, सकारात्मक विचार करा " असा प्रत्येकाशी व्यक्तीश: बोलून संदेश देत होत्या. मालती मेहेंदळे या सर्वात ज्येष्ठ म्हणजे ८१ वर्षांच्या छंद कलाकारांनी बनविलेली सध्या आणि क्रेप कागदाची फुले शब्दश: अचंबित करणारी होती. त्यांनी बनविलेली बकुळ, सोनचाफा, जास्वंद, आंबोली,नागचाफा अशी फुले ही कागदाची आहेत यावर विश्वासच बसत नव्हता. त्यांनी बनविलेल्या कागदाच्या जरबेरा फुलांच्या शेजारी खरी जरबेरा फुले ठेवून मी एक छायाचित्र घेतले. यातील खरे कुठले आणि खोटे कुठले हे ओळखणे कठीण होते.
    छंद जोपासला की वय, जात-धर्म, भाषा असे बांध राहतच नाहीत पण खूप सकारात्मक आणि सृजनशील जीवन जगता येते.
    -- मकरंद करंदीकर.