वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आपण जसे बाहेरच्या जगासमोर असतो ना, तसे आपल्या आतल्या जगात नसतो. बाहेरच्या जगात मला एखाद्या गोष्टीचा राग येत असेल तर मी व्यक्त होत नाही, मात्र आतल्या आत व्यक्त होत राहतो… अगदी स्पष्टपणे…
November 24, 2019
महाराज बलीने तीन पाऊले भूमीचे दान दिल्यानंतर वामन रूपधारी भगवान विष्णूंनी त्याला दिव्य दृष्टी दिली. एका पावलाने संपूर्ण स्वर्ग तर दुसऱ्या पावलाने संपूर्ण पृथ्वी आच्छादित केली. त्या प्रसंगाचे वर्णन करीत आचार्य श्री भगवान विष्णूच्या चरणकमलांचे वर्णन करीत आहेत. ते म्हणतात,
December 15, 2020
गडचिरोली-चिमूर आणि भंडारा-गोंदिया मतदारसंघात आणि विशेषत: त्या मतदारसंघातील नक्षलप्रवण क्षेत्रात मतदान हे पवित्र वातावरणात किंवा कर्तव्य म्हणून नव्हे तर दहशतीच्या वातावरणात पार पडले. या मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी इतर मतदारसंघातील मतदानापेक्षा अधिक राहिल्यामुळे पोलिस आणि प्रशासन खूश असले तरी हा प्रकार योग्य नव्हता. भीती दाखवून किंवा दडपशाही करून मतदारांना बाहेर काढायचे असेल तर मग नक्षली आणि पोलिसांमध्ये फरक तो काय राहिला?
April 26, 2009
एखादी इमारत बांधायला घ्यायची म्हणजे बऱ्याच जणांची मदत लागते.जसे,तयार इमारतीची विविध दालने कुठे, कशी असावीत हे आर्किटेक्ट ठरवतात. त्यांच्या नकाशाला आर्किटेक्चरल फ्लॅन आणतात.आर्किटेक्चरच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्या इमारतीचा एक सांगाडा तयार करावा लागतो. त्याला बरेच खांब (कॉलम्स) आणि तुळया (बीम्स) असतात. संपूर्ण इमारत या खांब आणि तुळयांनी पेललेली असते.
January 8, 2023
माणूस किती असंवेदनशील बनत चाललेला आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या आपण इतके आहारी गेलो आहे की, आपल्यालातील एकमेकांप्रती असलेला जिव्हाळा, प्रेम,माया, ममता आणि आपुलकीची भावना नष्ट होत चालली आहे. आपण तंत्रज्ञानाच्या युगात इतके व्यवहारी होत चाललो आहोत की, आपल्याला रक्ताची नातीही कळेनाशी झालेली आहेत. कुणीही जगल्या – मेल्याचं सोयर- सुतक कुणालाही राहील नाही.
September 29, 2018
शेतकरी घाम गाळून धान्य पिकवतो. पण हे धान्य शेतात पुरते तयार होण्याआधीच त्यातले ३५ टक्के अन्नधान्य चक्क उंदरांच्या पोटात गेलेले असते. पुन्हा धान्य साठवून ठेवले की त्यावर उंदराचा डोळा असतो, तो वेगळाच. जागतिक आरोग्य संघटनेच्या चार दशकाआधी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जगभरचे दरवर्षी ३० लाख टन अन्न उंदरांचे भक्ष्य बनते. इतके हे उंदीर येतात तरी कुठून? उंदरांच्या विविध जातीपैकी ४१ जाती ह्या साठवून ठेवलेल्या अन्नधान्यावर वाढत असतात. एका उंदराचे आयुष्य जरी जेमतेम एक वर्षाचे असले तरी जन्मल्यापासून काही आठवड्यातच ते पुनरुत्पादन करण्याची क्षमता प्राप्त करतात. खूप मोठ्या प्रमाणात ते आपली प्रजोत्पत्ती करीत असतात. अगदी एका आठवड्यात उंदराची प्रजा १०% ने वाढत असल्याची आढळले आहे. हे खादाड उंदीर धान्याचा फडशा पाडतातच, पण आपल्या मलमूत्र व अंगावरील केसांनी अन्नधान्याची नासाडी करतात. एका वर्षाला एक उंदीर २५,००० लेंड्या, साडेतीन लिटर मूत्र व १० लाख केस, कोठारात साठविलेल्या अन्नात टाकून ते दूषित करीत असतात. शिवाय ते घराच्या वास्तूला आणि कोठारालासुद्धा हानी पोहचवीत असतात. तेव्हा माणसाचा शत्रू असलेल्या ह्या उंदरांना आवर घालण्यासाठी विविध प्रयत्न जारी आहेत. पण त्या उपायांवरदेखील ते चाणाक्षपणे मात करीत दिसून येत आहे. धान्याची कोठारे मोकळ्या हवेशीर जागेत असली तर उंदरांना लपण्यास जागा मिळत नाही. तसेच खांबावर उभारलेल्या कोठारापर्यंत उंदीर पोहोचू नयेत म्हणून त्यांच्या बुडाशी संरक्षक ठेवले जातात. कित्येकदा धान्याच्या कोठारांच्या आसपास मांजर, कुत्रा, मुंगूस ह्यासारखे उंदरांना भक्ष्य बनविणारे वा पळविणारे प्राणी पाळले जातात. किंबहुना उंदीर मारण्यासाठी बक्षिसेदेखील जाहीर केली जातात. परंतु वर्षानुवर्षे वापरात आणल्या जाणार्या ह्या उपायांचा फारसा फायदा होत नाही, हे आढळून आलेले आहे. उंदरांना अटकाव करण्यासाठी दोन प्रकारची रसायने विष म्हणून वापरता येऊ शकतात. झिंक सल्फाईड हे असेंद्रिय रसायन उंदरासाठी जहरी विष आहे. पिठाच्या गोळ्यात ते घालून शेते वा घरांच्या आजुबाजूला ते ठेवता येतात. हे रसायन एकदोन वेळा पोटात गेले तर उंदीर मरू शकतो. परंतु हे रसायन अन्य सस्तन प्राण्यांना, किंबहुना माणसांनादेखील बाधा ठरू शकते व ते पोटात गेले तर त्यावर रामबाण उपायदेखील उपलब्ध नाही, त्यामुळे त्याच्या वापरावर नियंत्रण आले आहे. दुसरे विशेष म्हणजे एकदा ते अल्प प्रमाणात पोटात गेले की उंदरांना त्याचा परिणाम जाणवू लागतो. मग तो कावेबाज प्राणी पुन्हा त्या आमिषाला अजिबात तोंड लावीत नाही, असे प्रयोगात आढळले आहे. त्यामुळे त्यांना मारण्याइतका झिंक सल्फाईडचा डोस त्यांच्या पोटात गेला की त्यांची रक्त गोठण्याची प्रक्रिया थांबते. त्यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव होऊन उंदीर मरू शकतो. हे औषध चुकून माणसाच्या शरीरात गेले तर व्हिटामिन के चा डोस देऊन बरे करता येते. परंतु हे वारफेरीन औषध उंदरांना पुन्हापुन्हा द्यावे लागते व ते महाग आहे. साहजिकच तिसर्या जगातील गरीब राष्ट्रांत त्याचा वापर होत नाही. थॅलियमयुक्त रसायने उंदीर मारण्यासाठी वापरली गेली, पण त्यांची विषारी बाधकता माणसालादेखील धोक्याची ठरली. पाश्चिमात्य देशांनी ह्या विषाचा उंदरासाठी सातत्याने वापर केला होता. पण आता त्यांना समजले आहे की हळूहळू उंदरांनी ह्या विषाला प्रतिबंध करणारी शक्ति निसर्गतः प्राप्त केली आहे. ह्या विषाच्या वर्गातील डायफेनाकूम व फ्लोकूमासेन ही दुसरी रसायने बाजारात आली आहेत. अगदी अल्पशा अंशाने उंदरांना मारण्याची ताकद ह्या नव्याह औषधांत आहे, ही एक आशावादी बाब आहे. तरीसुद्धा जगभर शास्त्रोक्त कार्यक्रम राबवून उंदराच्या वाढीवर नियंत्रण ठेवणे, ही माणसाच्या हिताच्या दृष्टीने एक निकडीची गरज आहे, हे कुणालाही पटते.
October 25, 2016
मुंबई आणि आसपासच्या परिसरात आढळणाऱ्या कबुतरांची गणना बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी करणार आहे. पहिल्या टप्प्यात कबुतरांची संख्या मोजली जाईल. दुसऱ्या टप्प्यात कबुतरखाने, कबुतरांचे राहणीमान, त्याचे लोकांवरील परिणाम आणि तिसऱ्या टप्प्यात विविध डॉक्टरांशी चर्चा करून, कबुतरांचे आरोग्य आणि कबुतरांचे नागरिकांच्या आरोग्यावर होणारे परिणाम या विषयी माहिती मिळविली जाईल. मुंबईत कबुतरांसाठी दाण्यांची, राहण्याची आणि सुरक्षेची सोय सहज होते. अशा अनेक कारणांमुळे मुंबईत कबुतरांची संख्या येत्या काळात अधिक वाढणार आहे, असे बीएनएचएसचे म्हणणे आहे.
July 1, 2017
प्रत्येक घराण्याचा एक इतिहास असतो, परंपरा असतात… जाणुन घेऊया अशाच एक अजब परंपरेची ही कथा…. अश्विन महिन्यात… नवरात्रीत येणाऱ्या गणपतीबाप्पांची !
September 28, 2022
हा दिवस साजरा करण्याचा उद्देश म्हणजे, चीन येथे हुमेन या गावी फार मोठ्या प्रमाणात ओपियमची (खसखस) शेती केली जात होती. याच ओपियमच्या फळांचा उपयोग मोठ्या प्रमाणात विविध ड्रग्ज (अंमली पदार्थ) बनविण्यासाठी व्हायचा. याच्या विरोधात लिन झीयू या व्यक्तीने खूप मोठे आंदोलन तेथे उभे करून यशस्वी केले. याच कार्याची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली. त्यांच्या सन्मानार्थ २६ जून १९८९ पासून ‘जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन’ साजरा करण्यात येऊ लागला.
June 26, 2022
रक्तदाब कमी होण्याच्या समस्येकडे हायपरटेंशन ( रक्तदाब वाढणे) इतके लक्ष दिले जात नसले तरीही त्यातून आजाराची गुंतागुंत वाढण्याची शक्यता अधिक असते. रक्तदाब कमी झाल्यास मरगळ / निस्तेज वाढणे, मळमळणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षण आढळतात. अचानक रक्तदाब कमी झाल्यानंतर नेमके काय करावे हे अनेकांना सुचत नाही.
अचानक डोळ्यांसमोर अंधार येणे, गरगरल्या सारखे वाटल्यास ताबडतोब पाठीवर झोपा. काहीवेळ डोळे बंद करून शांत पडून रहा.
ओरल रिहायड्रेशन सॉल्ट (ओआरएस ) शरीराला पुन्हा रिहायड्रेट करायला मदत करतात. तसेच मीठ आणि इलेक्ट्रोलाईट्सचा पुरवठा करतात. बाजारात मिळणारी ओआरएसची पाकीट जवळ ठेवा. व त्याप्रमाणे मिश्रण बनवून प्या. मात्र मधूमेहींनी तयार ओआरएस पावडर पाण्यात मिसळून पिणे टाळा. यामध्ये साखरेचादेखील समावेश असतो.
तुमच्याजवळ ओआरएस नसल्यास पाणी प्या. त्यामध्ये चिमुटभर मीठ आणि चमचाभर साखर मिसळा. मीठातील सोडीयम रक्तदाब सुधारेल. तर साखर ग्लुकोज वाढवायला मदत करेल.
रक्तदाब कमी झाल्यास मीठ चाखणे किंवा खारी बिस्किटं खाणं हा उपाय अनेकजण करतात. यामुळे रक्तदाब सुधारण्यास मदत होते. यासोबत तुम्ही साखर-मीठाचे पाणी पिऊ शकतात. पण हे अति करू नका. यामुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता असते.
रक्तदाब स्थिरावल्यानंतर तसेच तुम्हांला सामान्य वाटत असले तरीही डॉक्टरांना त्वरीत भेटा. तसेच नेमके कशामुळे रक्तदाब कमी झाला हे जाणून घ्या. अनेकदा ही समस्या लहान स्वरूपात असताना त्याकडे दुर्लक्ष करतात आणि अचानक त्रास वाढल्यास डॉक्टरांचा धावा करतात. रक्तदाबाचा त्रास जाणवत असल्यास नियमित ते तपासून घ्या. 110/60 mm Hg पेक्षा कमी झाले तरीही अनेकदा त्याची लक्षण आढळून येत नाहीत. त्यामुळे त्रास जाणवत असल्यास स्वतःची औषाध स्वतः निवडण्यापेक्षा डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०७१७३३
January 5, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti