(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • हरभरे अथवा चणे

    एक अत्यंत पूरक अन्न. चणे अथवा हरभरे खाल्याने प्रचंड शक्ती वाढते. त्यामुळे माणूस कधीच थकत नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे घोड्याला नेहमी चण्याचा अथवा हरभऱ्याचा खुराक देतात. कारण या शक्तीने घोडा कितीही धावू शकतो. हरभऱ्यात काय नाही. अनेक गोष्टी हरभऱ्यातून मिळतात. हरभऱ्यात भरपूर प्रथिने असतात. अगदी त्याचप्रमाणे हरभऱ्यात आपल्याला जे इसेंशियल अमायनो ॲसिड ही सर्व प्रथिनात म्हणजे दहाही अमायनो अॅसिड असतात.

  • श्री गणेश पंचरत्न स्तोत्र – भाग ३

    समस्तलोकशङ्करंनिरस्तदैत्यकुञ्जरं !
    दरेतरोदरं वरं वरेभवक्त्रमक्षरम् !!
    कृपाकरं क्षमाकरं
    मुदाकरं यशस्करं !
    मनस्करं नमस्कृतां नमस्करोमि भास्वरम् !! ३!!

    समस्तलोकशङ्कर- शम् म्हणजे कल्याण. ते कल्याण जे करतात ते शंकर. समस्त लोक अर्थात सर्व लोकांचे किंवा सर्व विश्वाचे कल्याण करतात म्हणून मोरयांना समस्तलोकशङ्कर असे म्हणतात.

    निरस्तदैत्यकुञ्जर- कुंजर म्हणजे हत्ती. दैत्यकुंजर अर्थात हत्तीप्रमाणे अत्यंत बलशाली असणारे दैत्य.
    भगवान श्रीगणेश आणि आपल्या विविध अवतारात देवांतक- नरांतक, सिंधू, सिंदुर, कमलासुर इ. अनेक राक्षसांचा निःपात केला. त्यामुळे त्यांना निरस्तदैत्यकुञ्जर असे म्हणतात.

    दरेतरोदर- दर शब्दाचा अर्थ आहे घट्ट. मजबूत. परिदृढ. त्याचा इतर म्हणजे विपरीत अर्थात लवचिक, परिवर्तनीय ते दरेतर. असे ज्यांचे उदर अर्थात पोट ते दरेतरोदर.

    भगवान श्री गणेशांना लंबोदर असे म्हणतात. त्यांच्या उदराततून ही अनंत कोटीब्रह्मांडे उत्पन्न होतात आणि शेवटी त्यातच लय पावतात. त्यामुळे त्यांना लंबोदर म्हणतात. भगवान गणेश असे लंबोदर असल्याने त्यांचे उदर सगळ्यांना सामावून घेणारे लवचिक आहे म्हणून ते दरेतरोदर.

    वर म्हणजे सर्वश्रेष्ठ.

    वरेभवक्त्रमक्षर- वर म्हणजे श्रेष्ठ. इभ म्हणजे गज अर्थात निर्गुण निराकार. असे निर्गुण-निराकार तत्व आहे ॐ कार ब्रह्म. त्याला अक्षर असे म्हणतात. तेच ज्यांचे वक्त्र अर्थात मुख ते वरेभवक्त्रमक्षर.

    मुख ही आपली ओळख आहे. चेहऱ्यावरूनच आपण एकमेकांना ओळखतो. निर्गुण, निराकार ॐ कार हीच मोरया ची ओळख म्हणून मोरया,वरेभवक्त्रमक्षर.

    कृपाकर अर्थात भक्तांच्या जीवनात कृपेचा अखंड वर्षाव करणारे.

    क्षमाकर अर्थात प्रार्थना करणाऱ्या, क्षमा याचना करणाऱ्या भक्तांच्या चुकांना माफ करणारे.

    मुदाकर अर्थात भक्तांच्या जीवनात सर्वोत्तम आनंद निर्माण करणारे.

    यशस्कर- अर्थात उपासकांना त्यांच्या मन इच्छित कार्यात यश प्रदान करणारे.

    नमस्कृतां मनस्कर- अर्थात धर्म संमत रीतीने वागणाऱ्यांच्या, श्री गणेश चरणावर नत असणाऱ्या सर्व भक्तांच्या मनात येणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण करणारे.

    अशा भास्वर अर्थात परम तेजस्वी भगवान गणेशांना मी नमस्कार करतो.

    -- -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • रोईंगचा सुवर्णाध्याय

    राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये पदकांची भरघोस कमाई केल्यानंतर भारतीय खेळाडूंचे आशियाई स्पर्धेतील अपयश अधिकच उठून दिसत होते. त्यात सेनादलाच्या बजरंगलाल ताखर या जवानाने रोईंगच्या सिंगल्स स्कल प्रकारात सुवर्णपदक मिळवून देशाची प्रतिष्ठा राखली. राजस्थानमधील पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या गावातून आलेल्या बजरंगलालने अपुर्‍या आणि दर्जाहीन सुविधांसह खडतर परिश्रम करून हे पदक मिळवले.

  • आजचा आरोग्य विचार – भाग सोळा

    आतमधे साधं मोबाईलवर बोलत बसलो तरी जे तोंड उघडं रहातं, तेवढा जंतुसंसर्ग होण्याची शक्यता जास्त. त्यामुळे भलाई यातच आहे की रिकाम्या हातानी आत जावं आणि लगेचच रिकामं होऊन यावं.

  • बाजीराव पेशवे

    मित्रांनो १८ ऑगस्ट ही तारखेप्रमाणे *श्रीमंत बाजीराव पेशवे सरकारांची* जयंती आहे. हे निमीत्त साधुन त्यांच्या बद्दल माहीती देण्याचा प्रयत्न आहे. सदर स्वरूपात त्यांच्या पराक्रमाबाबत थोडक्यात माहीती देण्याचा विचार आहे.

    शिवराय व शंभुराजे नंतर इतिहासाला दखल घ्यायला लावणाऱ्या या पराक्रमी योध्याला लोकांनी फक्त मस्तानी पुरताच ओळखला आहे. शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर हे बाजीरावांनीच केले. दिल्ली पर्यंत मजल मारणारा स्वराज्याचा पहीला पंतप्रधान म्हणुन स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. शेवट पर्यंत छत्रपतींचा सेवक म्हणुनच जगलेला हा योद्धा काळाच्या पडद्याआड गेला.

    २० वर्षाच्या वादळी कारकिर्दीत एकही युद्ध न हरलेला हिंदवी स्वराज्याचा एकमेव पेशवा म्हणुन आजही ओळख आहे.

    सदस्यांनी आपली पसंती कळवावी.

  • पक्षीपरिचय २२

  • इन्फंट्री डे

    २६ ऑक्टोबर १९४७ रोजी काश्मीरचे तत्कालीन महाराज हरी सिंह यांनी जम्मू-काश्मीरच्या भारतातील विलीनीकरणाच्या करारनाम्यावर सही केली खरी पण त्याआधीच पाक पुरस्कृत टोळीवाले श्रीनगरच्या दिशेने कूच करून येत होते आणि ते उरी पर्यंत पोचले देखील होते.
    पाकिस्तानी सैन्याने ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच “ऑपरेशन गुलमर्ग” या नावाने कारवाई चालू केली होती.

  • सुट्टी पे सुट्टी… !

    सुट्टी हा विषय सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा. ती कोणाला नको असते? अगदी शाळेतल्या मुलांपासून ते शिक्षकांपर्यंत, सरकारी कर्मचाऱ्यांपासून ते कॉर्पोरेट अधिकाऱ्यांपर्यंत.. किंवा मग डॉक्टरांपासून वकिलांपर्यंत… आणि कोर्टापर्यंत सुद्धा..

  • नवरत्नमालिका – ६

    वारणाननमयूरवाहमुखदाहवारणपयोधरां
    चारणादिसुरसुन्दरीचिकुरशेखरीकृतपदाम्बुजाम् ।
    कारणाधिपतिपञ्चकप्रकृतिकारणप्रथममातृकां
    वारणान्तमुखपारणां मनसि भावयामि परदेवताम् ॥ ६॥

    कोणत्याही स्त्रीचे खरे वैभव म्हणजे तिचे मातृवात्सल्य. जगज्जननी आई जगदंबेच्या त्याच मातृवात्सल्याचा आधार करीत, तिचे वर्णन करतांना आचार्यश्री म्हणतात,

    वारणानन - वारण शब्दाचा एक अर्थ आहे हत्ती. त्याचे आनन म्हणजे मुख. तसे ज्यांचे मुखकमल आहेत ते भगवान गजानन.
    मयूरवाह- मयूर हे ज्यांचे वाहन आहे असे. अर्थात भगवान षडानन, कार्तिकेय.
    मुखदाह- त्यांचा मुखदाह अर्थात भुकेमुळे त्यांच्या मुखाची होणारी जळजळ.
    वारण- येथे वारण शब्दाचा अर्थ निवारण करणे असा आहे.
    पयोधरां- पयोधर शब्दाचे दोन अर्थ आहेत. वैशिष्ट्य म्हणजे येथे दोन्ही लागू पडतात.
    पयोधर शब्दाचा सामान्य अर्थ आहे मेघ. पय म्हणजे पाणी त्याला धारण करणारा तो पयोधर.मुखा मधील दाह वर्णन केला असल्याने तो शांत करणारा मेघ, हा अर्थ लागू पडतो.
    पय शब्दाचा दुसरा अर्थ आहे दूध. त्याला धारण करणारे मातेचे स्तन. त्या दोन्ही बालकांच्या मुखाची भुकेची आग शांत करणारे ते विश्व तृप्तीकारक पयोधर.
    चारणादि- चारण म्हणजे स्तुतिपाठ करणारे गण,
    सुरसुन्दरी- आई जगदंबे च्या बाबतीत हे कार्य सुर अर्थात देवतांच्या सुंदरी करत असतात.
    सुरसुन्दरी शब्दात एकतर ब्रह्मदेव ,विष्णू, सूर्य,इंद्र यांच्यासहधर्मचारीणी सरस्वती, लक्ष्मी, संज्ञा, इंद्राणी इ. देवपत्नी किंवा स्वर्गीय अप्सरा असे दोन्ही अर्थ आहेत.
    चिकुर- मस्तकावरील केस.
    शेखरीकृतपदाम्बुजाम् - ज्या चरणकमलांना मस्तकावर घेतात असे.
    एकत्रित विचार करता समस्त देवनारी स्तवन करीत मस्तकावरील केसांनी जिच्या चरणकमलाची सेवा करतात अशी.
    कारणाधिपतिपञ्चक- ब्रह्मदेव, विष्णू, रुद्र, ईश्वर आणि सदाशिव अशा पाच स्वरूपांना कारणधिपती पंचक असे म्हणतात.
    प्रकृतिकारण- त्या सगळ्यांच्या प्रकृती म्हणजे कार्याचे कारण अर्थात अधिष्ठान स्वरूप शक्ती असणार्या,
    प्रथममातृकां- आदि जननी असणाऱ्या,
    वारणान्तमुखपारणां- गजमुखाच्या मुखाला आनंद देणाऱ्या,

    मनसि भावयामि परदेवताम् - परम देवता आई जगदंबेचे मी मनाने ध्यान करतो.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • शंख व त्याचे हिंदू धर्मातील महत्व

    शंखाचे अनेक प्रकार आहेत. पण शास्त्रानुसार वामावर्ती आणि दक्षिणावर्ती शंख हे सर्वात महत्त्वाचे मानले जातात. शंख निर्मिती ही शंखचूर्णांच्या हाडांपासून होते असं मानलं जातं. तर त्यांची उत्पत्ती समुद्र मंथनादरम्यान झाली होती असंही मानलं जातं. हेच कारण आहे की, देवी लक्ष्मी आणि दक्षिणावर्ती शंख हे दोघे भाऊ-बहिण मानले जातात. शंख हा लक्ष्मीचा छोटा भाऊ समजला जातो. शंख हे समुद्र मंथनातून प्राप्त झालेले पाचवे रत्न आहे.