वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आहारातून उदरात जाणारा अन्नाचा प्रत्येक कण शरीराला पोषण देणारा असतो. अन्न चावल्याने त्यावर सर्वप्रकारच्या पाचक स्रावांचे सुयोग्य संस्कार होऊन शरीराला पोषण मिळते. ह्या प्रक्रियेत सर्वात पहिली जबाबदारी असते दातांची. अर्थात ह्यासाठी दातांचे आणि त्याचबरोबर हिरड्यांचे स्वास्थ्य उत्तम असणे नितांत गरजेचे आहे.
रोजच्या जेवणात असलेल्या तिखट पदार्थात सर्वांना आवडणारा एक चटपटीत आंबट तिखट पदार्थ म्हणजे चटणी.
ही चटणी बहुगुणी औषध आहे. जिरे, मिरी, मिरची, हिंग, कढीपत्ता, चिंच, पुदीना, कोथींबीर या पैकी कोणत्या तरी पदार्थाने नटलेली सजलेली, रंगीबेरंगी चटणी रोजच्या जेवणात असावी. सुकी किंवा ओली कशीही असली तरी चविष्ट लागते. म्हणजे इष्ट चवीची !
डाव्या हाताला असणारी चटणी मधे मधे खाल्ली की उजव्या बाजूच्या इतर पदार्थांची रूची पण आपोआपच वाढत असते.
लसूण, शेंगदाणे, तीळ, नारळ, जवस, कारळे, कांदा यापैकी ( म्हणजे आठवड्यातून दरदिवशी एक कोणत्याही वेगळ्या प्रकारची चटणी केली तरी) त्यातील मुख्य पदार्थ हा एक प्रकारची तेलबी असते.
या बिया आणि इतर वेगवेगळे मसाले कुटले कि त्यातील तेल बाहेर येते. त्यात मीठ घालून ढवळले की, चटणी तयार. यात कुटण्याची पद्धत महत्वाची.
मिक्सरमधून बारीक वाटून होते, पण कुटण्याचा संस्कार होत नाही. संस्कार बदलला कि परिणाम बदलतात, चवही बदलते.
मिक्सर आणि पाटा वरवंटा वापरून केलेल्या चटणी किंवा वाटपामधे फरक पडतोच ना ! मिक्सरमध्ये ब्लेडच्या सहाय्याने बारीक बारीक तुकडे पाडणे आणि वरवंट्याचा घाव घालून पाट्यावर रगडणे या दोन्ही कृतीतून तेलबीयांमधले तेल बाहेर पडल्यामुळे चवीतही फरक पडतो. म्हणून संस्कार महत्वाचा !
चटणीला चव येण्यासाठी वापरला जाणारा मसाला कच्च्या स्वरूपातच वापरला जातो. हे उघड सत्य आहे.
हे फक्त लक्षात आणून देतो की, चटणीमधले तेल आणि मसाले कच्च्या स्वरूपात वापरले जातात, तर भाज्या या सुसंस्कारीत करून खाल्ल्या जातात. भाज्या कच्च्या नाहीत, मसाले भाजून नाहीत, तर ते जास्त औषधी.
मसाला टिकवण्यासाठी किंवा नीट कुटला जावा, यासाठी तो भाजला जातो. तो परत परत भाजला तर त्यातला दळ, वास, तेल, आणि औषध निघून जाते. पूड होण्यासाठी किंचित गरम करणे इथपर्यंत ठीक आहे, पण खमंग वास आणि परत तेल सुटेपर्यंत भाजणे, म्हणजे त्यातील अंगभूत औषध उडवून लावल्यासारखं आहे. हे निमंत्रित केलेल्या पाहुण्याला, घराच्या दारात आल्यावर, आम्ही आता शिनिमाला जातुय, *तू आता परत जा, असे सांगण्यासारखेच झाले.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
12.11.2016
वार्द्धक्ये चेन्द्रियाणां विगतगतिमतिश्चाधिदैवादितापैः
पापै रोगैर्वियोगैस्त्वनवसितवपुः प्रौढिहीनं च दीनम् ।
मिथ्यामोहाभिलाषैर्भ्रमति मम मनो धूर्जटेर्ध्यानशून्यं क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥४॥
बरे पुढे वय वाढत गेल्यानंतर तरी हे त्रास कमी झाले का? तर नाहीच. उलट त्यात वार्धक्यामुळे आलेल्या नवनवीन त्रासांनी भरच घातली.
कोणते त्रास?तर आचार्य श्री म्हणतात,
वार्द्धक्ये चेन्द्रियाणां विगतगति - म्हातारपणामुळे इंद्रियांची गती क्षीण झाली. आता त्यांना हालचाल करणेही कठीण झाले आहे.
मतिश्च- मती अर्थात स्मरणशक्तीची देखील तीच अवस्था आहे. काही वेळापूर्वी केलेले कार्यही आठवत नाही.
आधिदैवादितापैः - आध्यात्मिक आधिदैविक आणि आधिभौतिक अशा त्रिविध प्रकारच्या तापांनी,
पापै - आज वर जीवनात केलेल्या विविध पापांनी,
रोगै:- त्यांचा परिणाम होऊन झालेल्या विविध रोगांनी,
वियोगै:- उपयुक्तता कमी झाल्यामुळे नातलगांनी देखील तोंड फिरवल्यामुळे आलेल्या वियोगानी,
त्वनवसितवपुः- अस्थिर झालेल्या शरीरानी,
प्रौढिहीनं च दीनम् - माझी सगळी प्रौढी गळून गेली आहे. आता मी हीन-दीन अवस्थेला पोहचलो आहे.
मिथ्यामोहाभिलाषैर्भ्रमति मम मनो- मात्र अद्यापी माझे मन त्या खोट्या मोहांमध्ये,अभिलाषा मध्येच भ्रमण करीत आहे. धूर्जटेर्ध्यानशून्यं - ते मन भगवान शंकरांच्या ध्यानाने अजूनही शून्यच आहे.
भगवंताचे ध्यान करीत नाहीच आहे.
क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो - हे भगवान महादेव शंभो शंकरा माझे हे अपराध क्षमा करा.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
डिबाकी कायमच प्रसिद्धीच्या झोतात राहिले. त्यांच्या ७० वर्षांच्या अत्यंत यशस्वी वैद्यकीय कारकीर्दीत साठ हजारांपेक्षा जास्त हृदय-शस्त्रक्रिया डिबाकी व त्यांच्या सहकार्यांनी डिबाकींच्या अध्यक्षेतखाली यशस्वी केल्या. यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी, लिंडन जॉन्सन, रिचर्ड निक्सन, ड्यूक ऑफ विंडसर, जॉर्डनचे राजे हुसेन, रशियाचे अध्यक्ष बोरिस येल्त्सिन, इराणचे शहा तसेच मार्लिन डिट्रिच यांच्यासारखे हॉलिवूड मधील तारे, तारका यांच्यावरील हृदय-शस्त्रक्रियांचा समावेश होता.

हिरव्यागार डोंगररांगा आणि लांबच लांब खाडी किनार यांच्या बेचकीत वसलेलं ठाणे शहर. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या ठाणे जिल्ह्यात वन्यजीव संपदा अमाप अशीच पाहायला मिळते. शेकडो फुलपाखरं, पक्षी, कीटक, प्राणी, वनस्पती,फुलं, सरपटणारे प्राणी अशी निसर्गाची नाना रूपाचंदर्शनच आपल्याला या ठाण्यात होतं. कॅमेराबद्ध केलेल्यानिसर्गाच्या याच वेगळ्या छटा,त्यांची शास्त्रीय माहिती आणि हे फोटो टिपण्यासाठी वापरलेलं फोटोग्राफीचं तंत्रज्ञान या सगळ्याचा मागोवा घेणारा सदर ठाण्याची वनजीवन संपदा.
डोंगराळ माळरानांनी सजलेल्या विस्तृत ठाण्याच्या जंगलात सरपटणाऱ्या प्राण्यांची संख्या तशी फार. देशभर आढळणाऱ्या अनेक सापांच्या प्रजातींपैकी काही प्रजाती या आपल्या शहराला लागून असलेल्या जंगलात आजही मोठ्या संख्येने आपलं अस्तित्व टिकवून आहेत. खरंतर भारतात आढळणाऱ्या सापांची संख्या तशी फार असली तरीही यातील काही जाती विषारी आहेत. विषारी सापांचा आढळ हा विविध ठिकाणी पाहायला मिळतो. घनदाट जंगलात, डोंगररांगांजवळ, गवताळ भागात, पाणवठ्याजवळ, दगड कपारीत तर काही विषारी साप हे मनुष्यवस्तीजवळ ही सापडतात. एकूण विषारी सापांपैकी मनुष्यवस्तीजवळ प्रामुख्याने सापडणारे असे चार विषारी साप असून हे साप अन्नाच्या शोधात मनुष्यवस्तीजवळ येतात. या चार सापांनंतर मनुष्यवस्तीजवळ आढळणारा अशा सापांच्या यादीत चापडा या विषारी सापाची गणना करता येईल.
जगाच्या पाठीवर सापांच्या अनेक जाती उपजाती पाहायला मिळतात. या सापांना राहण्यासाठी आवश्यक असलेल्या अनुकूल वातावरणानुसार यांचा अधिवास त्या त्या ठिकाणी पाहायला मिळतो. मात्र, या चापडा सापाचा अधिवास हा केवळ भारतातच आणि त्यातही पूर्व आणि पश्चिम घाटाच्या पट्ट्यातच हा चापडा साप आढळतो. आपल्या भारतात अनेक ठिकाणी याचा आढळ असून याच्या रंगात तसेच आकारात ठिकाणानुसार काहीसा फरक आढळून येईल.
या सापाची नोंद आपल्या इथे माथेरान, कोयना, भंडारा, महाबळेश्वर, कोल्हापूर, अंबोली, कर्नाटक या सारख्या भागात डोंगरावरील जंगलात हा बांबू पिट व्हायपर अथवा चापडा सहज सापडतो.आपल्या मुंबईत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, ठाण्यात येऊर, नागला बंदर, ओवळा इथलं जंगल, कल्याण-डोंबिवली नजीक गांधारी, निळजे या परिसरात तसेच नवी मुंबई, पनवेल, उरण इथे हा साप सापडतो.
चापडा हा साप व्हायपर या सापांच्या प्रकारात मोडतो. व्हायपर या जातीचे असे तसे रागीट आणि फारच चिडखोर असे असतात. आपल्या इथे मनुष्यवस्तीजवळ सापडणाऱ्या चार सापांपैकी दोन्ही व्हायपर या प्रकारातलेच आहे. नाग, मण्यार या सापांशिवाय फुरसं म्हणजेच साउस्केल व्हायपर आणि गुणच म्हणजेच रसल व्हायपर हे चार विषारी साप मनुष्यवस्तीजवळ अधिक येतात ते उंदीर, पाली यांच्या शोधात. या सापांचा दंश हा अनेकदा न कळत यांच्याजवळ गेल्याने वा अपघाताने सर्वाधिक झाल्याचं लक्षात येतो.
छायाचित्राची तांत्रिक माहिती
ठाण्यातल्या येऊरच्या जंगलातील पाठवणा पाडा या भागात सापडा सापाचं हे छायाचित्र मी टिपले आहे. चापडा साप अतिशय विषारी असल्याने याची फोटोग्राफी करताना फार काळजी घ्यावी लागली होती.
या छायाचित्रासाठी कॅननचा ५० डी कॅमेरा आणि टॅमरॉनची ९० मीमीची मायक्रो लेन्स वापरली आहे. कॅमेर्यात अपार्चर एफ ५.६, शटरस्पीड १/६० आणि आयएसओ ४०० ठेवून हे छायाचित्र घेतले गेले आहे.
("पुढारी" मध्ये पूर्वप्रकाशित)
भारतीय संस्कृतीने आपल्याला श्रेष्ठ संस्कारांचा बहुमोल खजाना दिला आहे. पारंपारिक प्रथा, उत्सव, जयंती, उपवास…. ह्या सर्वांद्वारे ईश्वर तसेच आपले पूर्वज, महात्म्याचा आदर करणे, त्यांची कर्मकथा आठवून त्यांच्याकडून काही शिकण्याची समज दिली आहे. त्यांच्यापैकीच एक म्हणजे श्राद्ध.
बायबलमध्ये एक बोधकथा आहे. येशू ख्रिस्त फिरत-फिरत एका गावात आले. त्यावेळी त्यांना दिसले की गावातील सगळेच लोकं एका मैदानात जमले आहेत. प्रत्येकाच्या हातात दगड आहे आणि मैदानाच्या मध्यभागी एका खांबाला बांधलेल्या स्त्रीला ते दगडांनी ठेचून मारणार आहेत. त्या स्त्रीचा अपराध कोणता, याची चौकशी केल्यावर येशू ख्रिस्तांना सांगण्यात आले की, ही स्त्री व्यभिचारी आहे आणि या गुन्ह्याची शिक्षा म्हणून तिला दगडांनी ठेचून मारण्यात येणार आहे. येशू ख्रिस्तांना त्या स्त्रीची दया आली किंवा त्यापेक्षा अधिक गावकर्यांच्या बुध्दीची कीव वाटली. पहिला दगड त्या स्त्रीकडे भिरकावल्या जाण्यापूर्वी येशू ख्रिस्ताने उपस्थित जमावाला उद्देशून म्हटले की, या स्त्रीला शिक्षा केली पाहिजे हे मान्य, परंतु ही शिक्षा देण्याचा अधिकार केवळ त्याच व्यक्तीला आहे, ज्याने एखादेही पाफत्य केलेले नाही. येशु ख्रिस्तांच्या या आवाहनाने उपस्थित जमाव अंतर्मुख झाला आणि प्रत्येकाच्या हातातील दगड गळून पडला. ही घटना किंवा कथा बोधप्रद असली तरी त्यातील बोध त्या घटनेपुरताच प्रासंगिक ठरला. पापी, अन्यायी किंवा कर्तुत्वहीन लोकांनी स्वत:लाच न्यायाच्या उच्चासनावर बसवून इतरांकडे दगड भिरकावण्याचा अधिकार बाळगणारी मानसिकता आजही विद्यमान आहे. ती स्त्री त्यावेळी भाग्यवान ठरली, परंतु असे भाग्य त्यानंतर कुणाच्या वाट्याला आले नाही.
आपल्या स्वयंपाकामध्ये जिच्या उपस्थिती शिवाय फोडणी हि संकल्पना पुर्णत्वाला येऊच शकणार नाही अशी ही फोडणीवर स्वत:ची मोहर टाकणारी मोहरी उर्फ राई. इंग्रजीत हिला Brassica तसेच Mustard असेही म्हणतात. अमुक व्यक्तीने एखाद्या गोष्टीच्या बाबतींत राईचा पर्वत केला हि म्हण आपल्या सर्वांच्या अगदी तोंडावर असते नाही का, तशीच आहे ही राई.
मोहरीचे लहान क्षूप असते आणि आपण वापरतो ती मोहरी ही त्याच्या बिया होय. चवीला कडू तिखट आणि बरीच उष्ण त्यामुळे शरीरातील कफ आणि वात दोष कमी करते.
चला मग हिचे औषधी उपयोग पहायचे ना.
१) पुष्कळ खोकला येऊन कफ सुटत नसेल तर १/४ चमचा मोहरी+१ चमचा खडीसाखर हे मिश्रण तोंडात ठेऊन त्याचा रस गिळावा आराम पडतो.
२) दात किडल्या मुळे दुखत असल्यास मोहोरीचा काढा करून त्याने गुळण्या कराव्यात दात दुःखी थांबते.
३) मोठ्या व्यक्तींना जप कायम पोटात जंत होण्याची तक्रार असेल तप मोहरीचे चूर्ण १/२ चमचा गरम पाण्यात सोबत घ्यावे व नंतर त्यांवर ५-६ चमचे एरंडेल तेल प्यावे त्याने शौचा मधून जंत पडतात.
४) कुठल्याही अवयवावर सूज आली असेल तर पादेलोण अर्थात काळे मीठ व मोहरी समप्रमाणात एकत्र वाटावी व त्या मिश्रणाचा लेप सूज आलेल्या भागी करावा सूज उतरते.
५) जास्त चालणे अथवा एका जागी फार काळ बसून राहील्याने जर सांधे दूखुन मुंग्या येत असतील तर मोहरी एरंडेल तेलात वाटावी व ते मिश्रण त्या भागावर चोळावे रक्तप्रवाह सुधारतो आणि ही तक्रार कमी होते.
मोहरीच्या अतिवापराने एॅसीडीटी, हातपायांची जळजळ, अंगावर पुरळ उठणे, डोके दुखणे, संडास, लघवी अथवा नाकातून रक्तस्राव होणे अशा तक्रारी होऊ शकतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील आंध्र राज्यातील विशाखापटटम ( वैझ्याग ) हे पुरातन काळापासूनचे महत्वाचे बंदर. ब्रिटीश राज्यकर्त्यानी मोठी गोदी बांधून समुद्र व्यापार मार्गाचे महत्वाचे ठिकाण तयार केले. आज भारतीय नौदलात त्याचे अनन्य साधारण महत्व असून सबमरीन्सचा महत्वाचा बेस येथे आहे. विशाखापट्टणम येथील रामकृष्ण बीच वरील सबमरीन म्युझियम पाहून डोळ्याचे पारणे फिटले. प्रत्येक भारतीय नागरीकाने त्याला भेट देऊन मानाचा मुजरा दिलाच पाहिजे अशी ही विशेष जागा आहे. आशिया खंडातील अशा तऱ्हेचे हे एकमेव म्युझियम आहे.
पान खाणे या प्रकारात, पानातील हे सर्व मिश्रण चावणे आणि चघळणे या दोन क्रिया महत्त्वाच्या !
पान तोंडातल्या तोंडात घोळवल्याने जीभेला उत्तम व्यायाम होतो. वर खाली, डावीकडे उजवीकडे,व तिरपी जीभ वळल्याने जीभेला जोडले गेलेले सर्व छोटे मोठे स्नायु अगदी स्वरयंत्रापर्यंत, ताणले जातात. आणि शब्दोत्पत्तीला मदत होते. गळ्यापासून टाळूपर्यंत जीभेला फिरावेच लागते. टाळू शकतच नाही.
Copyright © 2025 | Marathisrushti