(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • निवासदर्शक आडनावं – लेवेनहूक.

    अँन्टोनी वॅन लेवेनहूक (Antoni Van Leeuwenhock, 1632-1723) या डच शास्त्रज्ञानं, लाल रक्तपेशी, अन्नपदार्थातील .. प्राण्यांच्या लाळेतील .. मानवी विष्ठेतील … सूक्ष्मजीवजंतू, साठलेल्या पाण्यातील सूक्ष्म प्राणी (protists), नरप्राण्यांच्या वीर्यातील शुक्राणू वगैरे अती लहान घटक प्रथमच पाहिले.

  • मानसिक डाएट

    ही कन्सेप्ट जरा नविन आहे, पण ती तुम्ही समजुनं घ्याल ही खात्री सुदधा आहे.

    म्हणजे बघाना....

    आपलं वजन वाढतं, आयुष्याच्या फिगरवर परिणाम होतो, बीपीच्या गोळ्या सुरु होतात, शुगर डिटेक्ट होते, किंवा कधी कधी स्वत:ची आगाऊ काळजी म्हणुन सुद्धा किंवा कधी कधी तर चक्क फॅशन म्हणुन आपण डाएट करायचा प्रयत्न करतो.

    हे सगळ करतं असताना आपण आपल्या मानसिक आरोग्या कडे पुर्णपणे दुर्लक्ष करतो.

    मी कुठेतरी वाचलं होतं की "तुमच्या मनातल्या विचारांचा प्रचंड प्रभाव तुमच्या शरीरावर असतो"

    ते वाक्य मनाला प्रचंड भिडलं. त्या वेळी मग खरंच विचार केला की आपल्या मनाला सुद्धा डाएटिंग ची तेवढीचं गरज आहे का जेवढी शरीराला आहे?

    अफसोस !

    असे बोर्ड्स अजुन दिसले नसतील ना मार्केटमधे...

    "इथे मानसिक डाएट प्लॅन करून मिळतील"

    अवघंड आहे असं होणं....

    मानसिक डाएट म्हणजे काउंसिलींग नव्हे.

    मी बोलतोय ते एका टेस्टी आयुष्याची चव घेण्याकरता केलेल्या डाएट बद्दल !

    हल्ली सगळ्यांना सगळं कसं टेस्टी लागतं स्वत:च तोंड कडु का असेना, पण लाईफ मधे स्पाईस महत्वाचा आहे बाॅस !

    स्वत:च अवघं आयुष्य बदलुन टाकायची ताकद आपल्या विचारांमधे असते मग त्यांना चांगलं हेल्दी ठेवायची जबाबदारी आपलीचं असते.

    तर मानसिक डाएट म्हणजे काय करायचं

    तरं आपले विचार आधिकाधीक फिल्टर्ड कसे रहातील ह्याचा प्रयत्न करायचा,

    तेलकट-तुपकट म्हणजे फडतुस-निगेटिव्ह विचार आपण करणार नाही,

    अती-गोड म्हणजेच स्वत:च्या आनंदात दुसर्‍याला विसरुन जाणारे विचार आपण जवळ येऊ देणार नाही.

    दररोज एका व्यक्तिला तरी आपण एक छान स्माईल देऊन खुष करु, दुसर्‍यांच्या पर्सनल आयुष्यात डोकावुन मजा घ्यायला लावणारे कुचके-नासके विचार फेकुन देऊ, आठवड्यातुन एकदा तरी साध्या विचारांची खिचडी-कढी खाऊ या अशा मुल्यशिक्षणा बरोबरंच महत्वाचं आहे ते स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला फरकं ओळखुन स्वत:ला "रीझनेबल" बनवणं, दुसर्‍यांच्या मतांना आदर देणं, दुसर्‍यांना वेळ देणं, संवाद चालु ठेवणं, मनाचं वातावरण नेहमी हलकं फुलकं ठेवणं, एकमेकांच्या अस्तित्वाची जाणीव ठेवणं आणि बरंच काही.

    या सगळ्यातला समतोल हरवला ना की आपल्या नात्यांना अपंगत्व येणारंच आणि मग नीट डायग्नोसीसंच झालं नाही म्हणुन मनाला कायमची बेडरेस्ट पण मिळु शकते.

    माणुस आहे, मनं पण थकतं हो कधीकधी, त्याला इंस्टंट एनर्जी मिळते ती फक्त एक कप काॅन्फिडन्सच्या चहाने, वाह ताज !!!

    सगळ्यात महत्वाचं कि आपल्या डाएटचे साईड इफेक्ट्स खुप मस्त असतातं.

    लोकं प्रेमात पण पडु शकतात तुमच्या. तुमच्या चेहर्‍या वरचा ताण कमी होतो, तुम्ही यंग वाटू लागता, टेंन्शन कमी होतात, लाईफ पाॅपकाॅर्न इतकंच हलकं होतं. वास्तविक, मन ओके असेल तरचं लाईफ ओके असतं, नाही कां?

    असं ह्या डाएटचं व्रत हे आजच्या सॅन्डव्हिच जीवनशैली मधे एक संजीवनी देईल हे नक्की. साध्या आणि ताज्या विचारांच सॅलड आपली नक्की काळजी घेईल. शाकाहारी विचार लंबी ऊम्र देऊन जातील.

    बदल हा नेहमीच चांगला असतो. असा मानसिक डाएट एकदा करुन बघायला काय हरकतं आहे ना ?

    कारण गुगलवर "एव्हरेस्ट" बघण्यापेक्षा प्रत्यक्षात बघण्यातं जास्त मजा आहे आणि त्या एव्हरेस्टवर जायला आपलं मनंच खरी ताकद देणार आहे.

    -- गौरी पाटील
    निसर्गोपचार तज्ञ
    9820584716

  • श्री स्वामी नामाचे माहात्म्य !

    अक्कलकोट निवासी जगद्गुरू परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरित्र हे सर्वांग सुदंर आहे. स्वामींच्या चरित्राचे पठण केल्याने साधा भोळा प्रांपचिक भक्त ते हटयोगी साधकापर्यंत सर्वांना हवे ते प्राप्त होते. दु:खित, पिडीत, मुमुक्षू जिवांना आधार देऊन दु:ख मुक्त करणारे दीनजनउध्दारक स्वामी महाराज हे केवळ शुध्द भक्तीभाव आणि निर्मळ मनाने केलेल्या अल्प साधनेने ही अतिप्रसन्न होतात.

  • दानशूर कर्ण

    महाभारतातील कर्णाचे स्थान अद्विती असून
    मान जाई उंचावुनी त्यास समजोनी घेता ।।१।।

    सुर्यपुत्र कर्ण घनुर्धारी महान
    दानशूर तो असून इतिहास घडविला ।।२।।

    सुर्य आशिर्वादे जन्मला कवच कुंडले लाभती त्याला
    रक्षण वलय शरिराला मिळती कर्णाच्या ।।३।।

    अंगातील कर्तृत्व शक्ति माणसाला उंचावती
    शक्तीस वाट फुटती शोधूनी त्याची योग्यता ।।४।।

    जन्मुनी प्रथम पांडव सहवासांत सारे कौरव
    हेच त्याचे खरे दुर्दैव नियतीचा होई खेळ ।।५।।

    महाभारत युद्ध प्रसंगी कौरवामध्ये कर्ण अग्रभागीं
    होता तो विजयाच्या मार्गी हादरुन सोडले पांडवाना ।।६।।

    इंद्रासह सर्व देव आकाशी बघती अर्जुन-कर्ण युद्धासी
    परी चित्त त्यांचे कृष्णासी बघती त्याची लिला ।।७।।

    थोपवून धरिला अर्जून रथ असूनी सारथी भगवंत
    बाण शक्तिनें नेला रेटीत कृष्ण परमात्म्यासह ।।८।।

    शक्तीचे हे दिव्य दर्शन बघू लागले आकाशांतून
    इंद्रादी देव विस्मयित होऊन न्याहळूं लागले कर्णाला ।।९।।

    चकीत झाले देवगण यश अर्जुना यावे म्हणून
    कवच कुंडले मागावी दान इंद्र करी मनीं विचार ।।१०।।

    प्रातः काळची सुर्य किरणे सुचवी कर्णा सावध राहणे
    रुप घेतले इंद्राने दान मागण्यासाठीं ।।११।।

    कर्ण होता दानशूर मन त्याचे उदार
    न घेई तो माघार संकल्प करिता एकदां ।।१२।।

    इंद्र देवाचा राजा ठोठती कर्ण दरवाजा
    ठेवूनी मनी भाव दुजा रुप घेतले याचकाचे ।।१३।।

    देवांचा नृपती दान मागण्या येती
    हे माझे भाग्य असती सत्व परिक्षा देण्याचे ।।१४।।

    ओळखले याचकाला इंद्राच्या सत्य रुपाला
    अभिवादन केले तयाला कवच कुंडले देई दान ।।१५।।

    कवच कुंडलाचे दान स्वहत्याचे ठरले कारण
    असूनी कर्णा हे ज्ञान इंद्रसी दानधर्म केला ।।१६।।

    इंद्रापरी याचक कोण जो मागेल मजसी दान
    त्याचा कर्णा अभिमान हीच त्याची श्रेष्ठता ।।१७।।

    कर्णाचे हे दान ठरले त्याचे समर्पण
    करी त्यासी महान अजरामर करुनी ।।१८।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    २०-२१११८३

  • याला जीवन ऐसे नाव भाग ३

    निसर्गातील प्रत्येक क्रियेचा कर्ता तो परमात्मा आहे. तसेच शरीराच्या प्रत्येक क्रियेचा नियंता, प्रणेता, भोक्ता तो आत्मा आहे. आत्मा हे परमात्म्याचेच एक छोटे रूप. एक रिमोट तर दुसरा सेन्सर. हे एकमेकांच्या सान्निध्यात, समोरसमोर असले तरच चॅनेल बदलणार. संवाद जुळणार.

    माझ्या शरीरात मला काय हवंय, काय नकोय याचा निर्णय तो घेतो. मन त्याची इच्छा ज्ञानेंद्रियाकडून विचारून घेतं आणि ती पूर्ण करण्यासाठी कर्मेंद्रियाकरवी सुखाने काम करवून घेतं. त्याला जेव्हा या पूर्तीचा आनंद होतो, तेव्हा आपणाला खरे समाधान मिळते.

    हो. पाणी पिण्याशीच याचा संबंध आहे. तहान हा एक वेग म्हणून आयुर्वेदात वर्णन केला आहे.

    त्याला ज्याची खरज वाटते, त्या गोष्टी तो आपल्याशी आतून बोलत असतो, त्याला मी वेग असे समजतो. हे वेग म्हणजे नॅचरल अर्जेस. त्याचा फक्त माझ्याशी आतून होत असलेला संवाद.

    हा संवाद इतर कोणालाही कळत नाही.
    कसा कळणार ?
    मलमूत्र संवेदना, ढेकर, शिंक, अश्रू, भूक तशीच तहान लागली की नाही हे फक्त माझं मलाच कळेल ना.
    आपुला संवाद आपणासी.....
    अशी ही अवस्था ओळखता यायला हवी. यासाठी कधीतरी अंतर्मुख व्हायला हवं. आतमधे काय हवंय, हे बाहेरून जरा चाचपून बघायला हवं, की समजतं.

    पाणी किती प्यायला हवं, कधी प्यायला हवं हे तो सांगतो, त्यासाठी तो *तृष्णा म्हणजे तहान, हे लक्षण निर्माण करतो. आपल्याला समजते, मला तहान लागली, आता पाणी प्यायला हवे, आतला आवाज ओळखून तेवढेच पाणी प्यायलो की, आणखी एक लक्षण तो निर्माण करतो, ते म्हणजे तृप्ती - समाधान.
    म्हणजेच तृष्णा आणि तृप्तीच्यामध्ये तो आहे.
    त्याला विसरून कसे चालेल ?

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    10.12.2016

  • मॅगझिन चॅम्पियन

    मानवी स्वभावाचा भाग म्हणुन तुमच्या, आमच्या, सर्वांमध्ये एक सुप्त चतुर रामलिंगम लपलेला असतो का?

  • विजय मल्ल्या शेवटी पळालाच …!!!

    कोण याती वशं लोके मुखे पिंडेन पूजिता
    मृदंगो मुखलेपेन करोति मधुरं ध्वनी .........

    या श्लोकाचा अर्थ असा कि-

    तोंडात ( भाताचा ) गोळा भरवल्यावर कोण वश होत नाही ? मृदुंगाच्या तोंडावर जेव्हा कणिक थापतात तेव्हा तो सुद्धा मधुर ध्वनी करू लागतो .....!

    विजय मल्ल्या शेवटी सर्वांना चुना लावून पळालाच. त्याला म्हणे भारतात परत आणण्यासाठी सरकार पयत्न करणार आहे.वरपासून खाल पर्यंत हा देश किती पोखरला आहे हे मल्ल्या प्रकरण मुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले. पुन्हा पुन्हा त्याच विषयावर बोरू घासत बसण्या पेक्षा लोकांनीच आता विचार करून सरकारला जाब विचारला पाहिजे.संसद किंवा विधानसभेत लोकांचे प्रश्न सुटनार नाहीत हेच पुन्हा पुन्हा सिद्ध झाले आहे.सर्वपक्षीय राजकारणी, नोकरशहा, बॅंकांचे काही बडे अधिकारी आणि काही उद्योगपती यांच्यातील हातमिळवणीचा मल्ल्या हा ढळढळीत पुरावा आहे!

    काळा पैसा आणणार ,२०२० साली देश महासत्ता होणार ...बुलेट ट्रेन .....स्मार्ट सिटी ....ऐकून ऐकून कंटाळा आला.

    लोकप्रतिनिधी आणि सरकारी बाबूंनी ज्या प्रमाणात या देशाला लुटले आहे ते पाहून इंग्रजांनी सुद्धा शरमेनी मान खाली घालावी.

    गांधी-- सावरकर या पैकी हा देश कुणाचा ?कोणी अधिक त्याग केला? या विषयावर चर्चा करण्यापेक्षा ज्यांनी गडगंज पैसा कमावून देशाला लुटण्याचा धंदा सुरु केला आहे त्यांचा हा देश आहे हेच या प्रकरणात अधोरेखित झाले आहे .हा देश शेतकरी कष्टकरी यांचा पूर्वीही नव्हता आणि आता तर होण्याची सुतराम शक्यता नाही.लोकसभेतील होणारी निरर्थक भाषणे करणारे नेते आणि सरकारी बाबू यांचा हा देश आहे ॰

    देशासाठी या साऱ्या "खेळा‘चा अर्थ एवढाच आहे की कॉंग्रेसप्रणीत राजवटीत मल्ल्यांनी देशातील राष्ट्रीयीकृत बॅंकांची हजारो कोटींची दिवसाढवळ्या लूट केली आणि भारतीय जनता पक्षाच्या राजवटीत तो सर्वांच्या हातावर तुरी देऊन परदेशात पसार झाला. त्यामुळे आता सर्वपक्षीय राजकारणी आणि काही उद्योगपती यांचे संगनमत आणि साटेलोटे यांचा मल्ल्या हा आता " प्रतीक " बनला आहे! बॅंकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या सगळ्या प्रकरणात काय केले, हाही प्रश्‍न विचारायला हवा. हजारो कोटींच्या थकीत कर्जांचे रडगाणे गात बसण्याऐवजी मल्ल्याच्या मुसक्‍या आवळाव्यात, असे राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या अधिकाऱ्यांना तो पळून जाईपर्यंत का वाटले नाही? एरवी लहान -लहान कर्जदाराच्या वसुलीसाठी हात धुवून मागे लागणाऱ्या या अधिकाऱ्यांची मल्ल्याच्या बाबतीत एवढी दातखीळ का बसली होती? सीबीआय अधिकाऱ्याला देखील हाच प्रश्‍न पडला आणि एकाही बॅंकेचा अधिकारी तक्रार घेऊन पुढे न आल्याबद्दल सीबीआय च्या अधिका-यांनी खेद व्यक्त केला.

    कर्जाची थकबाकी झाली कि शेतक-याच्या गळ्याभोवती" मृत्यू " चा फास घालणा-या बँकांच्या अधिका-यांचे काहीही नुकसान नाही .राजकारणी मोकळे , सरकारी अधिकारी मोकळे,न्यायालये हताश , कार्यकर्त्यांनी मात्र जय-जय म्हणत विविध पक्षाचे झेंडे नाचवायचे आणि वडापाव वर ताव मारून निवडून आलेल्या आमदार खासदार यांच्या भोवती गर्दी करायची.

    शेवटी गोरे घालवून आम्ही काय मिळवले.??????

    -- चिंतामणी कारखानीस

  • संत्रा : विदर्भाचा भाग्योदय होणार का?

    २०१९ च्या सुरवातीला हे संयंत्र सुरु करण्याची मनसुबा पतंजलीचा आहे. मेगा फूडपार्क आणि मेगा ज्यूस संयंत्रामुळे विदर्भातील शेतकर्यांचे भाग्योदय होईल का, या प्रश्नाचे उत्तर काळातच दडलेले आहे.

  • मशाल की कोलित ?

    माध्यम! माध्यम म्हणजे काय? तर आपल्या विचारांचे, भाव भावनांचे प्रकटीकरणच नव्हे तर सादरीकरण करणे ज्याद्वारे होते ते माध्यम. आत्ता मीसुद्धा माझे विचार या लेखाद्वारे सादर करत आहे व तो लेख अमुक अमुक प्रसिद्ध करत आहे म्हणजे ते जे आहे ते माध्यम ! हे जे मोठ्या प्रमाणावर अनेक लोकांपर्यंत पोचायला मदत करते ते मास मिडिया किंवा जनमाध्यम ! पुरातन ग्रीक संस्कृतीत रंगमंचावर अशी नाट्य सादरीकरण व्हायची. ८६८ ख्रिस्तपूर्व सालात चीनमध्ये डायमंड सूत्र म्हणून पहिले पुस्तक छापून प्रसिद्ध करण्यात आले.

  • जानेवारी १९ : अजिंक्य संघाचा सलामीवीर

    १९ जानेवारी १९२२ रोजी आर्थर रॉबर्ट मॉरिस या ऑस्ट्रेलियाई कसोटीपटूचा जन्म झाला. डावखुरा मॉरिस सर्वाधिक विख्यात आहे तो १९५४८ च्या इंग्लंड दौर्‍यावर गेलेल्या डॉन ब्रॅडमनच्या अजिंक्य संघातील बिनीचा खेळाडू म्हणून.