वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आपण पाहातो, अनुभवतो की मानसिक ताणतणावामुळे प्रथम मनाचं आणि नंतर शरीराचं आरोग्य धोक्यात येतं. कारण ताणतणाव हे मानसिक अनारोग्याचं लक्षण आहे. एकदा अंतरंगातच बिघाड झाला तर त्याचे विपरीत परिणाम शरीरावर दिसायला कितीसा वेळ लागणार?
मग या ताणतणावाच्या अगदी विरुद्ध क्रिया केली तर? आपलंच शरीर आणि मन. त्यात दोन वेगवेगळ्या भावनांच्या प्रभावाने जर दोन वेगळे परिणाम मिळणार असतील तर?
आपणच आपले डॉक्टर व्हायला काय हरकत आहे?
ताणतणावामुळे जर सगळंच बिघडत असेल तर जरा हसून पाहा काय होतं ते !
तत्त्वज्ञानाची मांडणी करत असताना आचार्य श्री पुढील पुढील टप्प्यांचा विचार आपल्या समोर उलगडून दाखवत आहेत.
बोर्डा मैदानाचे आणी त्यानंतर ६७ वर्षांच्या अंतराने जयपुरच्या सवाई मानसिंग मैदानाचे कसोटिपदार्पण
अमेरिकन शेती खात्याच्या (United States Department of Agriculture) २००७ सालच्या सर्वेक्षणाकडे नजर टाकली तर अमेरिकन शेती व्यवसाय व पशुसंवर्धनाच्या संदर्भात बरीच उद्बोधक माहिती मिळू शकते. २००७ साली अमेरिकेत सुमारे २२ लाख फार्म्स होते. मागे उल्लेख केल्याप्रमाणे अमेरिकन संदर्भात फार्म्स ही संज्ञा किंवा संकल्पना लवचिकपणे वापराय़ची आहे. प्रत्यक्ष कृषी उत्पादन तसेच पशुसंवर्धनाशी निगडीत सर्व व्यवसायांना त्यात समाविष्ट करायचे आहे.
त्यांच्या मालकांच्या जीवनपद्धतीमधे ’फार्मिंग’ला काय स्थान आहे यावरून हे फार्म्स वेगवेगळ्या प्रकारात मोडतात. यातील दोन सर्वात मोठ्या प्रकारात मोडणारे फार्म्स म्हणजे उपजीविकेसाठी वापरण्यात येणारे फार्म्स (३६%) आणि निवृत्ती फार्म्स (२१%).
उपजीविकेसाठी वापरण्यात येणारे फार्मस् – यांचे वार्षिक उत्पन्न २५०,००० डॉलर्सपेक्षा कमी असते आणि मुख्य मालक शेती शिवाय इतर काही तरी नोकरी /व्यवसाय उत्पन्नाचे साधन म्हणून दाखवतो.
निवृत्ती फार्मस् – यांचे देखील वार्षिक उत्पन्न २५०,००० डॉलर्सपेक्षा कमी असते आणि शेतीला निवृत्ती नंतरचा व्यवसाय म्हणून स्वीकारलेला असतो.
अनेक कुटुंबांमधे शेती व्यवसाय हा पिढ्यान पिढ्या चालत आलेला असतो. यातले बरेच फार्म्स आकारमानाने प्रचंड मोठे असतात. अशा या ‘मोठ्या खानदानी फार्म्स’ आणि ‘अतिशय मोठ्या खानदानी फार्म्स’चे वार्षिक उत्पन्न अनुक्रमे २५०,००० ते ५००,००० डॉलर्स आणि ५ लाख डॉलर्सपेक्षा अधिक असते.
वर उल्लेखल्या प्रमाणे पशुसंवर्धन तसेच शेतीच्या फार्म्सची घटत जाणारी संख्या, वाढत जाणारे आकारमान आणि थोड्याच परंतु सामर्थ्यवान फार्म्सच्या हातात होत चाललेले उत्पादनाचे आणि एकंदरीतच व्यवसायाचे केंद्रीकरण हा कल (trend) २००७ च्या सर्वेक्षणामधे पुन्हा एकदा अधोरेखीत झाला आहे. उदाहरणार्थ, २००२ साली १४४,००० फार्म्स मिळून सुमारे ३/४ अमेरिकन शेती मालाची (किंमतीच्या स्वरूपात) निर्मिती करत होते, तर २००७ साली केवळ १२५,००० फार्म्स मिळून तेव्हढ्याच उत्पादनाची निर्मिती करत होते. वर उल्लेखलेल्या ‘मोठ्या खानदानी’ आणि ‘अतिशय मोठ्या खानदानी’ फार्म्सची संख्या, एकूण फार्म्सच्या संख्येच्या केवळ ९% आहे; परंतु एकूण शेती उत्पन्नाच्या (किंमतीच्या स्वरूपात) जवळ जवळ २/३ (६६% हून अधिक) उत्पादन हे फार्मस् करतात. वेगवेगळ्या राज्यांच्या पातळीवर जाऊन दाखले द्यायचे झाले तर मिसुरी या राज्यातले केवळ ७% शेतकरी त्या राज्यातले ३/४ शेतीमालाचे उत्पादन करतात. कान्सास राज्यामधे २/३ शेती उत्पादन हे ३% हून कमी फार्म्सवर होतं. यावरून या प्रचंड मोठ्या फार्म्सच्या उत्पादन क्षमतेची कल्पना यावी.
डॉ. संजीव चौबळ
गुप्तकाळात मातृदेवतांचा उठाव झाल्यानंतर त्यांनाही नाण्यांवर स्थान मिळू लागले. जसे सिंहासनाधिष्ठीत लक्ष्मी किंवा उमा, पार्वती. पुढे मुस्लिम राज्यकर्ते आल्यावर मानवी आकृत्याच गायब झाल्या. एका राजाने खलिफाचे चित्र असलेली नाणी काढली म्हणून असंतोष निर्माण झाला व नाणे मागे घ्यावे लागले. अशा काळात स्त्रियांना कोण स्थान देणार. तरीही एका मुस्लिम राजाने आपल्या रूपवती राणीची जन्मपत्रिकाच नाण्यावर छापली होती.
आजचे आपले जगणे इतके गतिशील झाले आहे की प्रत्येक गोष्ट लवकर हवी. झटपट मॅगी, फास्ट नेटवर्क, रातोरात श्रीमंती.. .. अश्या अनेक गोष्टी आपण बघतो त्यामुळे काही मिळवण्यासाठी परिश्रम, चिकाटी, जिद्द हवी हे आता विसरत चालले आहेत. शालेय जीवनामध्ये value education दिले जाते पण practical जीवनात मात्र काही दिसून येत नाही. इमानदारी, चिकाटी, जिद्द, प्रामाणिक हे सर्व फक्त कथा कादंबऱ्या मध्येच वाचायला मिळतं.
करोना संसर्ग रोखण्यासाठी आता आपल्याला एकजुटीने उभं राहायचं आहे..करोना विषाणू सोबत युद्धाचा बिगुल वाजला आहे.. सरकार, प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा धीरोदत्तपणे मुकाबल्यासाठी उभी आहे. मात्र, लोकसहभागाशिवाय हे युद्ध जिंकताचं येणार नाही.. त्यामुळे, आपण सगळे या लढाईतील सैनिक आहोत.. ही लढाई आपल्याला रणांगणावर नाही तर घरात बसून प्रतिबंधात्मक उपायांच्या शास्त्राने लढावी लागणार आहे..‘एकमेका साह्य करू…’ या भूमिकेतून करोना संसर्गाचा मुकाबला केला करोनाची आपल्यासमोर काय ‘औकात’ आहे?
मुंबई-पुण्याहून माथेरानला पर्यटनासाठी जाणार्यांना माथेरानच्या राणीने नेहमीच खुणावले आहे. गेली तब्बल १०९ वर्षे ही राणी दररोज अनेक प्रवाशांना आपल्या कुशीत घेउन माथेरानचा डोंगर चढत-उतरत आहे. दोन-सव्वादोन तासांच्या, २० किलोमीटरच्या प्रवासात गेल्या दोन वर्षात या राणीने जवळपास आठ लाख प्रवासांना माथेरानच्या निसर्गसौंदर्याचे दर्शन घडवले आहे.
माथेरान हे ठिकाण पर्यावरणीय पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. या गावात प्रदूषण करणार्या वाहनांना प्रवेश नाही. त्यामुळेच येथे जाणार्या पर्यटकांना गावाच्या वेशीबाहेर आपली वाहने उभी करावी लागतात. गावात थेट पोहोचण्यासाठी या माथेरानच्या राणीचाच आधार आबालवृद्धांना असतो.
गेल्या काही आठवड्यात ही माथेरानची राणी एक-दोनदा रुळावरुन घसरली काय आणि तिला कायमची बंद करण्याची चर्चा सुरु झाली काय. खरेतर नव्या तंत्रज्ञानाचा आधार घेउन या गाडीला नवीन ताकद देणे गरजेचे आहे. मात्र तशी इच्छाशक्तीच रेल्वेच्या अधिकार्यांमध्ये नाही त्याला कोण काय करणार?
सतत महाराष्ट्राला दुजाभाव देणार्या रेल्वे प्रशासनाला आता या गाडीच्या निमित्ताने पुन्हा एकदा जोर आलेला दिसतोय. या गाडीच्या निमित्ताने एका उच्च(?)स्तरीय अभ्यास(?)गटाची स्थापना करण्यात आली. ही गाडी यापुढे चालवू नये असा सल्ला या अभ्यासगटाने आपल्या अहवालात देऊनही टाकला. त्यापुढे जाऊन या गाडीची रचना नव्याने करण्यासाठी आणि त्यानुसार नवा रेल्वेमार्ग बांधण्यासाठी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे सहकार्य घ्यावे लागेल असा सल्ला या दिडशहाण्या अभ्यासगटाने दिला.
संवेदनाशुन्य अधिकारी, स्वत:च्या स्वार्थात मश्गुल असलेले प्रशासन आणि उठसुठ परदेशी सल्लागारांवर अवलंबून रहाण्याची प्रवृत्ती यामुळे आपले किती नुकसान होते आहे हे बघणार कोण?
गंमत बघा.. याच महाराष्ट्राच्या मातीत, कोकणासारख्या दुर्गम भागात, अतिशय प्रतिकूल परिस्थितीत कोकण रेल्वेचा मार्ग ऊभारणार्या कोकण रेल्वे कॉर्पोरेशनकडे जम्मू-काश्मीरमधील जास्त खडतर परिस्थितीत रेल्वेमार्ग उभारण्याचे काम अतिशय विश्वासाने केंद्र सरकारने दिले आहे. माथेरानच्या रेल्वेमार्गासाठी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे सहकार्य घ्यावे असे सांगणार्या या दिडशहाण्यांना कोकण रेल्वेचे नाव तरी माहित आहे का हा प्रश्न पडावा.
अर्थात एक गोष्ट सरळपणे दिसतेय ती म्हणजे आता रेल्वेला या मार्गाचे लोढणे आपल्या गळ्यात नकोय. त्यामुळे आता ते पर्यटन विकास महामंडळाच्या गळ्यात टाकण्याचे सूतोवाच काहीजणांकडून सुरुही झाले.
माथेरानच्या राणीला कायमचे बंद करण्याच्या सूचनेत एक मोठी खेळी असण्याचाही संशय घ्यायला जागा आहे. सध्यातरी माथेरानच्या डोंगरावर कॉंक्रिट बांधकामे आली नाहीत. पायथ्याशी नेरळ गावात आणि आसपास बंगले आणि सेकंड होमचा सुळसुळाट झालाय. आता तर दररोज मुंबईला ये-जा करण्यासाठीही नेरळ सोयिस्कर असल्याच्या जाहिराती केल्या जात आहेत.
मुंबई-पुण्यातल्या मंडळींना आता “सेकंड होम” साठी वेगवेगळ्या ठिकाणांचा पर्याय उपलब्ध झालाय. यातही नेरळ, कर्जत वगैरे परिसरात घरे किंवा बंगले बांधू इच्छिणार्यांची संख्या मोठी आहे. एरवी बाजारात मंदी आल्याची बोंब मारणारे लोक अशी सेकंड होम घेण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करतात. बिल्डर्सही त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जाहिराती करतात.
मुंबईत हिरवाई राहिली नाही म्हणून मुंबईबाहेरच्या ठिकाणी ती शोधण्याच्या हव्यासात हा सगळा पसारा मुंबइबाहेर हलतोय. लवकरच तो नेरळ पार करुन वरवर चढायला सुरुवात करेल. या सिमेंटच्या जंगलांनी माथेरानचा श्वास गुदमरायला लागेल. माथेरानच्या या हिरवाईत नवी कॉक्रिट जंगले उभी रहातील.
आत्ताच काही दूरदृष्टीच्या पॉवरबाज नेतेमंडळींनी या डोंगरावरच्या जागा विकत घेऊन ठेवल्या असतील. कुणाला इथे नव्या “लवासा”चा साक्षात्कार होईल. माथेरानच्या डोंगराच्या कुशीत नव्या गृहप्रकल्पांचे प्लॅन बनतील आणि ते पासही होतील. पर्यावरणाचे नियम धुडकावले जातील. कॉक्रिटची जंगले उभी रहातील... त्यात धनिक गुजराती-मारवाडी रहायला येतील... माथेरानचे मूळ रहिवासी त्यांच्याकडे कामाला लागतील....
माथेरानची राणी बंद झाल्यावर रस्ते मोठे करावे लागतील. त्यासाठी नवी कंत्राटे निघतील. त्या रस्त्यावरील वाहतूक वाढेल. नवा रस्ता बनला की टोलची दुकाने सुरु होईल. वाहतूकीची साधने वाढवावी लागतील त्यामुळे टोलची आवक वाढेल.
एक हिलस्टेशन बरबाद झालं तर काय झालं? आमच्या सात पिढ्यांची कमाई तर होईल?
याच विषयावरील “लोकसत्ता”मधील एक लेख वाचा ...
-- निनाद अरविंद प्रधान
नूतन भारतीय हिंदी सिनेमातील एक आघाडीची नायिका, जन्म ४ जून १९३६. वडील कुमारसेन समर्थ आणि आई शोभना समर्थ, चित्रपट कलेशी जोडलेले. वयाच्या १३ व्या वर्षी तिने ‘हमारी बेटी’ या सिनेमामधून नायिका म्हणून पदार्पण केले. विशेष म्हणजे ह्या सिनेमाची निर्मिती तिच्या आई, शोभना समर्थ यांनी खास तिच्या साठीच केली होती. तिने अभिनय केलेला ‘हम लोग’ हा सिनेमा तिला तिच्या आई वडिलांनी बघू दिला नाही.
सी. टी. अॅन्जियोग्राफीत जर कॉरोनरी धमनीत अडथळा दिसला तर पारंपरिक अॅन्जियोग्राफी करावीच लागते. पारंपरिक अॅन्जियोग्राफी ही ‘गोल्ड स्टॅण्डर्ड’ तपासणी समजली जाते. या तपासणीसाठी एक दिवस हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागते.
Copyright © 2025 | Marathisrushti