वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
ह्रीं ह्रीमिति प्रतिदिनं जपतां तवाख्यां
किं नाम दुर्लभमिह त्रिपुराधिवासॆ ।
मालाकिरीटमदवारणमाननीया
तान् सॆवतॆ वसुमती स्वयमॆव लक्ष्मीः ॥ ११ ॥
आई जगदंबेच्या कृपा प्रसादाचे वैभव सांगतांना आचार्य श्री पुढे म्हणतात,
ह्रीं ह्रीमिति - ह्रीं, ह्रीं अशा स्वरूपात,
प्रतिदिनं - नित्यनियमाने, अनवरत.
जपतां तवाख्यां- तुझे नाव जपले असताना.
अर्थात ही आई जगदंबे जो रोज तुझ्या नावाचा असा जप करतो त्याला. यातील प्रतिदिन हा शब्द फार महत्त्वाचा आहे.
सामान्यतः लोक भगवंताचे नाव त्याच वेळी घेतात ज्या वेळी त्यांच्यावर काहीतरी संकट येते. अशा तात्कालिक भक्तांना भगवान पावत नाही असे नाही. पण त्याचे आवडते भक्त तेच असतात जे प्रतिदिन भजन करतात. संकटाचा मागमूस नसतानादेखील भगवंताचे नामस्मरण करतात.
अशा भक्तांचे भाग्य सांगताना आचार्य म्हणतात,
किं नाम दुर्लभमिह त्रिपुराधिवासॆ- हे त्रिपुराधिवासिनी ! तुझ्या अशा भक्तांना या जगात दुर्लभ असे काय आहे? अर्थात त्यांना सर्व काही सहजतेने प्राप्त होते.
काय काय प्राप्त होते? याची एक झलक दाखवताना आचार्य श्री म्हणतात,
माला- मोत्यांच्या माळा, अर्थात सर्व प्रकारची रत्ने,
किरीट- मुकुट अर्थात साम्राज्य.
मदवारण- मदोमत्त हत्ती. संपत्तीचे हे सगळ्यात मोठे प्रतीक वर्णिले आहे. दारात झुलणारा असा हत्ती अफाट श्रीमंतालाच परवडू शकतो.
माननीया- या सगळ्याने सन्मानित झालेली,
तान् सॆवतॆ वसुमती स्वयमॆव लक्ष्मीः- अशी देवी लक्ष्मी त्यांना स्वतःहून प्राप्त होते.
वर वर्णन केलेले सर्व वैभव देवी लक्ष्मीचे असले तरी अशी लक्ष्मी मिळाली की हे सर्व त्याला आपोआपच मिळते.
दुसरी फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी देवी लक्ष्मी म्हणजे वैभव त्याला स्वतःहून प्राप्त होते. त्यासाठी तो काहीही प्रयत्न करीत नाही.
भक्त केवळ आई जगदंबेची उपासना करतो. त्याला या सर्व गोष्टी आई स्वतःहून देते. हे आचार्य कथन मोठे मर्म पूर्ण आहे.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
April 22, 2020
दरवर्षी १८ मार्च हा दिवस ‘जागतिक निद्रा दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी निद्रेविषयी आजारांची जनजागृती करण्यात येते. झोप न लागणे हा आजार आहे, याविषयी सामान्य जनता अनभिज्ञच आहे. त्यामुळे झोप न येणाऱ्या एकूण व्यक्तींपैकी फक्त एकचतुर्थांश व्यक्तीच झोप येत नसल्यामुळे डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेतात. सर्व शारीरिक क्रियांप्रमाणेच झोप ही क्रियादेखील अत्यंत महत्त्वाची आहे. झोपेमुळे शरीराचे कार्य चांगल्या पद्धतीने होण्यास मदत होते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने ६ ते ९ तास झोपणे आवश्यक असल्याचे अनेक मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर सांगतात. स्लीप हायजिन’ पाळणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. प्रत्येक मानवी शरीरात घड्याळ (बायोलॉजिकल क्लॉक) असते. हे घड्याळ सूर्योदय आणि सूर्यास्ताप्रमाणे सुरू असते. त्यामुळे सूर्योदयापूर्वी उठणे आणि सूर्यास्त झाल्यावर झोपणे ही शरीराची शिस्त आहे. त्यामुळे सकाळपासून सायंकाळपर्यंत शरीर विशिष्ट रसायने तयार करीत असते. त्यामुळे व्यक्ती जागी राहू शकते. सूर्यास्तानंतर शरीरातील विशिष्ट रसायने कमी झाल्याने झोप येऊ लागते. पण, कृत्रिम प्रकाशामुळे रात्री उशिरापर्यंत जागण्याची सवय स्वत:च शरीराला लावल्याने अन्य आजारांना निमंत्रण मिळू शकते. रसायन प्रक्रिया बिघडल्याने शरीरावर परिणाम होत असतो. काही महिन्यांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने शांत, पूर्ण वेळ, चांगली झोप हा मूलभूत अधिकार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे झोपेकडे योग्य लक्ष द्यावे, असे तज्ज्ञांचे मत आहे.
हल्ली व्हॉट्सअप, फेसबुकसह विविध समाजमाध्यमांनी तरुणांसह सर्वच वयोगटातील नागरिकांना आपल्या कवेत घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत ही माध्यमे सोबत बाळगल्याने रात्रीच्या झोपेवर त्याचा दुष्परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे. रात्री उशिरा झोपणे, सकाळी उशिरा उठणे, झोप अपुरी झाली तर दिवसभर आळसावणे, असे हे चक्र सलग पाच ते सात वर्षे राहिल्यास मधुमेह, रक्तदाबासह विविध आजाराचा गंभीर धोका ‘आ’ वासून आपल्यासमोर उभा राहणार हे एका अभ्यासातून पुढे आले आहे. प्रत्येक माणसाला रात्री किमान ८ तासांची गुणात्मक झोप आवश्यक असते. अशी झोप मिळाली नाही तर मधुमेह, रक्तदाब, यासह कर्करोगासारखे बरेच आजार जडण्याची शक्यता असल्याचे विविध अभ्यासातून पुढे आले आहे. जगभरात ३५ ते ४५ टक्के नागरिकांना निद्रानाशाचा आजार आहे. आपल्या झोपेच्या चार अवस्था असतात.
त्यात रेम अवस्था महत्त्वाची असून १, २, ३ आणि रेम या चारही अवस्थेचे चक्र ९० मिनिटांचे असते. एक व्यक्ती सरासरी ६ तास झोपली तर तिच्या झोपेची चार चक्र पूर्ण होतात. रेम अवस्थेत मेंदूतल्या पेशी उत्तेजित होतात. या अवस्थेत जिथे गरज आहे, तिथल्या भागात मेंदूची दुरुस्ती होते, परंतु हल्ली रात्री तरुण पिढीमध्ये व्हॉट्सअप, फेसबुकसह समाज माध्यमांचा वापर वाढला असून त्यामुळे त्यांच्या झोपेवर विपरीत परिणाम होत आहे. भारतात मध्यरात्री १२ ते ३ वाजेपर्यंत सर्वात जास्त गाढ झोपेची वेळ असते. यावेळी मेंदूत मिलॅटोनीम हार्मोन्सचे प्रमाण वाढते. या हार्मोन्समुळे झोप येते. या मिलॅटोनीमचा संबंध सूर्याशी असतो. सूर्यास्त झाल्यावर हे हार्मोन्स मेंदूत सक्रिय होतात, परंतु रात्री व्हॉट्सअप, फेसबुकचा जास्त वापर करणाऱ्यांमध्ये हे हार्मोन्स तयार होण्याचे प्रमाण मंदावलेले असते. साहजिकच अशा व्यक्तींमध्ये हळूहळू निद्रानाशाचा आजार बळावू लागतो आणि हेच चक्र सातत्याने पाच ते सात वर्षे सुरू राहिल्यास रक्तदाब, हृदय, कर्करोगासह सगळेच आजार बळकावण्याचा धोकाही वाढतो. शालेय विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक स्पर्धा वाढली आहे. त्यांच्या शाळा, शिकवण्या याबरोबरच वाढलेल्या अभ्यासक्रमांमुळे त्यांची जीवनशैलीही बदलली आहे. तेव्हा या मुलांमध्ये निद्रानाशाचा आजार लहानपणीच सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
झोपेची सायकल म्हणजे?
झोपेच्या चार अवस्था असतात. त्यात रेम अवस्था महत्त्वाची असते. १,२,३ आणि रेम अशा ४ अवस्थांची एक सायकल होते. ही सायकल ९० मिनिटांची असते. पहिल्या ३ अवस्था ७० मिनिटांच्या आणि रेमची अवस्था वीस मिनिटांची असते. एक व्यक्ती जर सरासरी ६ तास झोपेल तर ४ सायकल पूर्ण होतात. रेम अवस्थेत मेंदूतल्या पेशी चार्ज होतात. जिथे गरज आहे, तिथल्या भागात या अवस्थेत मेंदू दुरुस्ती करतो. ही तंदुरुस्तीची नैसर्गिक प्रक्रिया खंडित होते. त्यामुळे आजार बळावततात, असे झोपेचे वैद्यकशास्त्र म्हणते. प्रत्येकाने किमान आठ तासांची आणि वयाची पन्नासी गाठलेल्यांनी किमान साडेसात तासांची झोप घेणे महत्त्वाचे आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
March 18, 2017
१. चिन्ता चिता समानाऽस्ति बिन्दुमात्रविशेषतः |
सजीवं दहते चिन्ता निर्जीवं दहते चिता ||
अर्थ :
चिन्ता आणि चिता सारखी आहे फरक फक्त अनुस्वाराचा. चिन्ता (काळजी) जिवंत माणसाला जाळते तर चिता जीव निघून गेल्यावर (मृताला) जाळते. हे संस्कृत सुभाषित फारच प्रसिद्ध आहे.
२. नष्टं द्रव्यं लभ्यते कष्टसाध्यम्, नष्टा विद्या लभ्यतेऽभ्यासयुक्ता |
नष्टारोग्यं सूपचारैः सुसाध्यम् नष्टा वेला या गता सा गतैव ||
अर्थ :
(खूप) कष्ट करून गेलेली संपत्ति मिळवता येते. (विसरल्यामुळे) गेलेली विद्या अभ्यास करून (पुन्हा) मिळवता येते. तब्बेत खराब झाली तर चांगले उपचार करून ति सुधारता येते. पण वेळ (वाया) घालवला तर तो गेला तो गेलाच. (वेळ वाया घालवण टाळावं). वेळेचे महत्व वर्णन केले आहे. गेलेली वेळ किती मौल्यवान असते कारण ती परत येत नाही.
३. श्व:कार्यमद्य कुर्वीत पूर्वांण्हे चापराण्हिकम् |
न हि प्रतीक्षते मृत्युः कृतमस्य न वा कृतम् ||
अर्थ :
उद्या करायचे काम आज करावे आणि दुपारनंतर करायचे काम सकाळीच करावे. कारण ह्या माणसाचे काम झाले आहे किंवा नाही याची मृत्यु वाट पाहत नाही.
कबीराचा दोहा पण हेच सांगतो. कल करे सो आज कर, आज करे सो अब, क्षणमे प्रलय होगा, बहुरी करेगा कब?
४. त्वयि मेऽनन्यविषया मतिर्मधुतेऽसकृत् |
रतिमुद्वहताद्धा गङ्गेवोघमुदन्वति || कुन्ती भागवत १ स्कंध ८ अध्याय
अर्थ :
हे मधू राक्षसाचा वध करणाऱ्या श्रीकृष्णा, गंगेचा प्रवाह ज्याप्रमाणे (न थांबता, सतत) समुद्राकडे झेप घेतो त्याप्रमाणे तुझ्याविषयी माझ्या मनात एकान्तिक (दुसरा कुठलाही विचार न येता फक्त तुझेच चिंतन एवढा एकच) विचार येवो. देवाची भक्ती करतांना खूप तल्लीन व एकरूप होऊन करावी लागते तरच देव तुम्हाला पावतो. म्हणूनच मीरादेवीस श्रीकृष्ण भेटला.
५. भारतं पञ्चमो वेदः सुपुत्रः सप्तमो रसः |
दाता पञ्चदशं रत्नं जामातो दशमो ग्रहः ||
अर्थ :
महाभारत हे पाचवा वेद (वेदा इतका पवित्र) आहे. चांगला मुलगा सातवा रस आहे. (अन्नातल्या षड्रसांप्रमाणे सुख देतो). उदार मनुष्य हे पंधरावे रत्नच आहे. जावई नऊ ग्रहांप्रमाणे दहावा ग्रहच आहे. (मंगळ, शनी वगैरे ग्रहांप्रमाणे त्रास देऊ शकतो.)
हा पण एक प्रसिद्ध श्लोक आहे.
६. मृदोः परिभवो नित्यं वैरं तीक्ष्णस्य नित्यशः |
उत्स्रृज्य तद्द्वयं तस्मान्मध्यां वृत्तिं समाश्रयेत् ||
अर्थ : (फार) मऊपणाने वागलं तर नेहमी अपमान होतो. खूप तापटपणा केला तर (सगळ्यांशी) भांडणं होतात. म्हणून या दोन्ही गोष्टी सोडून (माणसाने) मध्यममार्ग स्वीकारावा हे उत्तम.
७. नारिकेलसमाकाराः दृश्यन्तेऽपि हि सज्जनाः |
अन्ये बदरिकाकाराः बहिरेव मनोहराः ||
अर्थ:
सज्जन (नुसत) पाहिल्यावर नारळासारखे (खडबडीत; कडक; कठोर असावेत असे दिसते); पण नारळात ज्याप्रमाणे गोड पाणी; स्वादिष्ट खोबर असतं तसे ते असतात. दुसरे (दुर्जन) बाहेरूनच फक्त बोराप्रमाणे आकर्षक असतात. (पण अनुभव चांगला येत नाही.) पण आतून दुष्टच असतात.
८. नभो भूषा पूषा कमलवनभूषा
मधुकरो वचोभूषा सत्यं वरविभवभूषा वितरणम् |
मनोभूषा मैत्री मधुसमयभूषा मनसिजः
सदोभूषा सूक्तिः सकलगुणभूषा च विनयः ||
अर्थ:
सूर्य हा आकाशाचा अलंकार आहे. कमळांच्या बागेला भुंगा शोभा आणतो. खरं बोलण्याने वाणी शोभून दिसते. अधिक संपत्ती दान करण्याने सुंदर दिसते. मैत्री हा मनाचा अलंकार आहे. वसंतऋतु मध्ये मदनाचा अस्तित्व शोभून दिसते. सभेमध्ये चांगल वक्तृत्व शोभून दिसते. (तर) नम्रता सर्व गुणांना खुलवते.
९. खलः सर्षपमात्राणि परच्छिद्राणि पश्यति |
आत्मनो बिल्वमात्राणि पश्यन्नपि न पश्यति ||
अर्थ:
दुष्ट माणसाला दुसऱ्याच वैगुण्य मोहोरी एवढ असलं तरी डोळ्यावर येत, पण स्वतः मधे मात्र बेलफळाएवढा (मोठा) दोष दिसत असून सुद्धा तो न दिसल्याप्रमाणे वागतो. अशाच अर्थाची मराठीत म्हण आहे. दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते पण स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही.
१०. रिपुशेषं व्याधिशेषं चाग्निशेषं तथैव च |
पुनः पुनः प्रवर्धन्ते तस्माच्छेषं न कारयेत् ।।
अर्थ:
शत्रू, रोग आणि अग्नि या तिघांचा अल्पसा भाग जरी शिल्लक राहिला तरी ते पुनः वाढतात . म्हणून शत्रुचा नाश करताना, रोगावर उपाय करताना आणि अग्नि विझवताना तो किंचितही शिल्लक राहणार नाही असे बघावे. महाराणा प्रताप याने महंमद घोरीला युद्धामद्ध्ये हरवून बारा वेळा जीवदान दिले पण घोरीनेच त्याला शेवटी ठार केले.
११. अयं निजः परोवेति गणना लघुचेतसाम।
उदार चरिता नाम तु वसुधैव कुटुंबकम ।।
अर्थ:
हे माझे, हे दुसऱ्याचे असे असा विचार छोट्या मनाचे लोक करतात. विशाल मनाचे लोक हि पृथ्वी आपले कुटुंब आहे असा विचार करतात.
१२. उद्यमं सक्षमं धैर्यं बुद्धिः शक्तिः पराक्रमः।
षडेते यत वर्तन्ते तत्र देवः सहायकृत। ।
अर्थ:
प्रयास, साहस, धैर्य, बुद्धि , शक्ति तथा पराक्रम देखील साहाय्य करतात. ज्याच्याकडे हे सहा गुण आहेत त्याला देव देखील साहाय्य करतात.
१३. धर्म एव हतो हन्ति धर्मो रक्षति रक्षितः।
तस्माद् धर्मं न त्यजामि मा नो धर्मो हतोऽवधीत् ॥
मनुस्मृति ८. १५
धर्म एव हतो हन्ति धर्मो रक्षति रक्षितः ।
तस्माद्धर्मो न हन्तव्यो मा नो धर्मो हतोऽवधीत् ॥
महाभारत ३.११४.१३१
एकाच अर्थ असणारे हि सुभाषिते वेगवेगळ्या ठिकाणी उद्धृत झाली आहेत.
अर्थ:
(ज्याचा) धर्म नष्ट झाला (तोही) संपून जाईल, जो धर्माचे रक्षण करतो त्याचे धर्म रक्षण करतो. म्हणून मी धर्माचा त्याग करणार नाही किंवा धर्माला नष्ट करणार नाही, कुणीही नष्ट करू नये. तसे केले तर मीच नष्ट होईन, तोच नष्ट होईल.
१४. उपसर्गेऽन्यचक्रे च दुर्भिक्षे च भयावहे।
असाधुजनसंपर्के यः पलायेत् स जीवति ॥
चाणक्यनीतिदर्पण अ. ३.१९
अर्थ: जो माणूस नैसर्गिक आपत्ती, परक्याचा हल्ला, भयानक दुष्काळ, दुष्टांची संगति अशापासून दूर पळून जातो तो जीवंत राहतो. अशा वेळी स्वतःचा जीव वाचवणेच सर्वात जास्त महत्वाचे असते. हिंदी मधल्या म्हणी प्रमाणे सिर सलामत तो पगडी पचास।
१५. विद्याभ्यासो विचारश्च समयोरेव शोभते।
विवाहश्च विवादश्च समयोरेव शोभते ॥
सुभाषितरत्नभण्डागार -सुधर्मादिनपत्रिका
अर्थ: समान (पातळीवरील) लोकांनी एकत्र विद्या शिकणे आणि विचारविनिमय करणे बरे दिसते, त्याप्रमाणेच समान लोकांमध्येच विवाह आणि वादविवाद होणे चांगले असते.
१६. गुणी गुणं वेत्ति न वेत्ति निर्गुणो
बली बलं वेत्ति न वेत्ति निर्बल:।
पिको वसन्तस्य गुणं न वायस:
करी च सिंहस्य बलं न मूषक: ॥
अर्थ: गुणी पुरुषच दुसऱ्याचे गुण ओळखू शकतो. गुणहीन पुरुष ते ओळखू शकत नाहीत. बलवान पुरुषच दुसऱ्याचे बळ (शक्ती) ओळखतो. बलहीन पुरुष हे करू शकत नाही. वसन्त ऋतु आला हे कोकिळा ओळखते, कावळा नाही. वाघाची शक्ती हत्तीचं जाणतो, उंदीर नाही.
१७. कन्या वरयते रुपं
माता वित्तं पिता श्रुतम्
बान्धवा: कुलमिच्छन्ति
मिष्टान्नमितरेजना:
अर्थ: विवाहाच्या वेळी कन्येला (वधूला) सुंदर पती पाहिजे असतो. तिच्या आईला सधन जावई पाहिजे असतो. तिच्या वडिलांना विद्वान जावई पाहिजे असतो, तसेच तिच्या नातेवाईकांना चांगले खानदान पाहिजे असते. परंतु बाकी लोक लग्नात केलेल्या फक्त मिष्टान्ना करता येतात.
१८. अश्वस्य भूषणं वेगो मत्तं स्याद गजभूषणम्।
चातुर्यं भूषणं नार्या उद्योगो नरभूषणम्॥
अर्थ: घोड्याचा वेग हि त्याची ओळख आहे, मस्त चाल हे हत्तीचे आभूषण आहे, चातुर्य हा स्त्रीचा अलंकार आहे व सदा उद्द्योगी राहणे हे विद्वान पुरुषाचे लक्षण आहे.
१९. वॄत्तं यत्नेन संरक्ष्येद् वित्तमेति च याति च।
अक्षीणो वित्तत: क्षीणो वॄत्ततस्तु हतो हत:॥
अर्थ:
आपल्या चारित्र्याचे रक्षण सदैव केले पाहिजे. कारण सदाचारी माणसाच्या साठी चरित्र हेच सर्वस्व असते. पैसा( धन) येते व जाते. गेलेला पैसे परत मिळवता येतो, नष्ट झालेले चारित्र्य पुन्हा मिळवता येत नाही. ती व्यक्ती समाजात तोंड दाखवायच्या लायकीची राहत नाही. मेलेल्या माणसा सारखी त्याची स्थिती असते.
२०. दिवसेनैव तत् कुर्याद् येन रात्रौ सुखं वसेत्।
यावज्जीवं च तत्कुर्याद् येन प्रेत्य सुखं वसेत्॥
अर्थ: मनुष्याला दिवसभर असे (चांगले) काम केले पाहिजे कि तो रात्रभर सुखाने झोपू शकेल. आणि जिवात जीव असे पर्यंत सत्कृत्य केले पाहिजे कि मेल्या नंतर सुद्धा तो सुद्धा सुखी राहील.
२१. आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम्।
सर्व देव नमस्कार: केशवं प्रति गच्छति ॥
अर्थ: जसे आकाशातून पडलेले पाणी कसेही (ओढा, नदी, इत्यादी ) मार्गे शेवटी समुद्राला जाऊन मिळते, तसे कोठल्याही देवतेला केलेला नमस्कार एकाच परमेश्वरास मिळतो.
२२. मूर्खस्य पञ्च चिह्नानि गर्वो दुर्वचनं मुखे।
हठी चैव विषादी च परोक्तं नैव मन्यते॥
अर्थ: मूर्ख लोकांचे पाच गुणधर्म असतात. ते अहंकारी असतात, त्यांच्या तोंडात कायम वाईट शब्द असतात, ते जिद्दी असतात , दुसऱ्या लोकांचे अजिबात ऐकत नाहीत व नेहमी वाईट चेहरा करून बसतात.
२३. अष्टौ गुणा पुरुषं दीपयंति प्रज्ञा सुशीलत्वदमौ श्रुतं च।
पराक्रमश्चबहुभाषिता च दानं यथाशक्ति कृतज्ञता च॥
अर्थ: आठ गुण पुरुषांना शोभतात – बुद्धि, सुन्दर चरित्र, आत्म-नियंत्रण, शास्त्र-अध्ययन, साहस, मितभाषिता, यथाशक्ति दान आणी कृतज्ञता.
२४. क्षमा बलमशक्तानाम् शक्तानाम् भूषणम् क्षमा।
क्षमा वशीकृते लोके क्षमयाः किम् न सिद्ध्यति॥
अर्थ: क्षमा निर्बल लोकांची शक्ती आहे, क्षमा बलवान लोकांचे आभूषण आहे. ह्या जगास क्षमेनेच वश केले आहे. क्षमेमुळे कोणती गोष्ट्य प्राप्त होत नाही? (सर्व गोष्टी प्राप्त होतात).
२५. अश्वं नैव गजं नैव व्याघ्रम नैव च नैव च।
अजापुत्रं बलिं दद्यात् देवो दुर्बलघातकः ।।
अर्थ: (यज्ञा मद्धे) अश्व नाही, हत्तीही नाही, व्याघ्र तर नाहीच नाही पण गरीब बोकडाचा (अजापुत्र) मात्र बळी दिला जातो. देव सुद्धा दुर्बलांना घातक असतात.
आजकालच्या काळात मोठे मोठे करोडो रुपयांचे घोटाळे होतात. पण त्यात बळी कोण जातो?
त्याच्या वरचा हा नवीन श्लोक :
सेक्रेटरी नैव,चेअरमन नैव, मिनिस्टर नैवे च नैवे च ।
कनिष्ठ लिपिकः बली दद्ध्यात, सी आर दुर्बल घातकः ।।
अर्थ: (घोटाळ्यात) सेक्रेटरी नाही, चेअरमन, मिनिस्टर तर नाहीच नाही,
बिचारा कनिष्ठ बाबू चा बळी जातो कारण त्याचा गुप्त अहवाल (सी आर) खराब केला जातो.
-- डॉ. दिलीप कुलकर्णी
मोबा: ९८८१२०४९०४
दिनांक: २३.०४. २०२३
June 5, 2023
डाळींबाच्या द्राक्ष्यांप्रमाणे लालचुटूक ओठ अशी उपमा सुंदर स्त्रीयांच्या ओठांना दिली जाते.खरोखरच हे डाळींबाचे दाणे जणू काही रूबीच्या रत्नाप्रमाणेच दिसतात.ह्या दाण्यांचा रस पिण्यासाठी वापरतात तसेच मुंबई दाबेली मध्ये चव यायला हे डाळींब दाणे घातले जातात.
काही म्हणा पण हे डाळींब जसे सुरेख लागते तसेच ते खाल्ल्यावर शरीरात तरतरी येते.ह्या डाळींबाचे १०-१५ फुट उंच वृक्ष असतो जो मध्यम आकाराचा असतो.ह्याची फुले नारंगी लाल रंगांची असतात तर फळे गोल लालसर व टपोरे दाणे युक्त असतात.
ह्याचे गोड फळ हे थंड व त्रिदोष शामक असून गोड आंबट चवीचे फळ हे किंचीत पित्तकर असते तर आंबट फळ हे कफवातनाशक असून पित्तकर असते.
चला आता ह्याचे औषधी उपयोग पाहूया:
१)लहान मुलांना होणाऱ्या जुलाबात फळाची साल पाण्यात उगाळून मधासह त्याचे चाटण द्यावे.
२)पित्ताचा त्रास,आंबट ढेकर,जळजळ ह्यात १/२ डाळींब रस+१ चमचा खडीसाखर घ्यावी.
३)तापामध्ये तहान लागत असल्यास थोड्या थोड्या वेळाने डाळींबाचा रस प्यावा.
४)डाळींबाची साल सुकवून त्याची पूड करावी व त्याने दात घासावे ह्याने दात व हिरड्या बळकट होतात,रक्त स्त्राव होत असल्यास कमी होतो.
५)घसा बसणे,दुखणे,टाॅन्सील्स वाढणे ह्यात डाळींबाच्या ताज्या सालीचा काढा+चिमूटभर हळद घालून गुळण्या कराव्यात.
डाळींब अतिप्रमाणात खाल्ल्यास जुलाब,सर्दी असे त्रास होऊ शकतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
December 18, 2016
माहितीचे प्रपात दूरदर्शन, वृत्तपत्रे,यू-ट्यूब, आंतरजाल आणि अशा अनेक समाजमाध्यमांकडून आपल्यावर बदाबदा कोसळत आहेत. हे उपयुक्त आहे की घातक -एकदा शांतपणे आणि आत्ताच ठरवायची वेळ आलेली आहे.
August 15, 2022
जेन गुडाल (Jane Goodall) या लंडनवासी तरुणीने आफ्रिकेच्या जंगलात जाऊन तेथील चिंपाझी माकडांचे दीर्घकाळ जवळून निरीक्षण केले. काही चिंपाझींशी तिने मैत्री केली. त्यांची बारशी करून त्यांना तिने नावे ठेवली. त्यांच्या जीवनाचा शास्त्रीय पद्धतीने त्यांच्या सहवासात राहून तिने अभ्यास केला. आपल्या निरीक्षणांनी मानववंशशास्त्रात कायमस्वरुपाची मोलाची भर घातली.
April 6, 2023
आई न होणे हा स्त्रीच्या आयुष्यात किती दु:खद असते हे फक्त ती स्त्रीच जाणू शकते. स्त्रीला मुल नको होण्याची कारणे वेगवेगळी आहेत त्यातील एक म्हणजे पीसीओज् (poly cystic ovary syndrome) ज्यात मासिकपाळी रेग्युलर येत नाही.
September हा महिना पीसिओज अवेअरनेस म्हणून साजरा केला गेला. त्याचे ऒचित्य साधून हा लेख लिहित आहे.
पीसीओज् स्त्रीला गर्भ निरोधक गोळ्या दिल्यास किंवा जीवनशैलीत बदल केल्यास त्याचा फरटीलीटी वर काय परिणाम होतो हे ह्या संशोधाकांनी तपासण्याचे ठरवले. सध्या अशा पीसीओज स्त्रीयांना मासिकपाळी रेग्युलर होण्यासाठी गर्भ निरोधक गोळ्या दिल्या जातात. थोडक्या कालावधीसाठी ह्या गोळ्या दिल्यास त्या फरटीलीटी वाढवतात असे आधीचे प्रयोग दाखवतात. पीसीओज स्त्रीने वजन कमी केल्यास आणि व्यायाम केल्यास अशा स्त्रीया गरोदर राहण्याचा शक्यता बळावते असे नवीन शोध प्रबंधात आढळले आहे.
ह्या प्रयोगात त्यांनी १८ ते ४० ह्या वयोगटातील १४९ स्थूल किंवा लठ्ठ स्त्री, जिला पीसीओज् चा त्रास आहे अशाच स्त्रीयांची निवड केली. ह्या सर्व स्त्रीयांना ३ गटात विभागले. काही स्त्रीयांना गर्भ निरोधक गोळ्या दिल्या तर काहीजणीना जीवनशैलीत बदल करण्यास सांगितले तर उरलेल्या स्त्रीयांना दोन्ही गोष्टी करण्यास सांगितले व हे जसे सांगितले आहे तसेच ते ४ महिन्यांसाठी चालू ठेवण्यास सांगितले. आहार, व्यायाम आणि वजन कमी करण्यासाठीची औषधे ह्या सर्वांचा समावेश जीवनशैलीत बदल ह्या सदरात केला होता.
४ महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यावर प्रत्येक सहभागी स्त्रीला पुढील ४ महीने औषधे देऊन ओव्ह्यूलेशन सायकलस येतील असे बघितले.
शोध प्रबंधात असे आढळले की गर्भ निरोधक गोळ्या दिलेल्या ४९ स्त्रीयांपैकी फक्त ५ स्त्रीयांनी अपत्य प्राप्तीचा आनंद अनुभवला तर दोन्ही गोष्टी करणार्या ५० स्त्रीयांपैकी फक्त १२ स्त्रियांनी अपत्य प्राप्तिचा आनंद अनुभवला. पण सर्वात अधिक म्हणजे जीवनशैलीत बदल करणार्या ५० पैकी १३ स्त्रियांनी अपत्य प्राप्तीचा आनंद मिळाला.
ह्या शोध प्रबंधावरून असेच दिसते की गर्भ राहण्याचा आधी जर वजन कमी झाले तसेच ह्या स्त्रियांनी व्यायाम केलास अशा स्त्रीयांची मेटाबॉलिक व प्रजनन क्षमता सुधारते. स्थूल व लठ्ठ पीसीओज् स्त्रीने प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी नुसत्या गर्भ निरोधक गोळ्या घेण्याऐवजी फरटीलीटी सुधारण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे त्यांना जास्त लाभदायक ठरेल
हा शोध Journal of Clinical Endocrinology & Metabolism 2015 मध्ये प्रसिद्ध झाला आहे.
October 7, 2015
जेव्हा आपण फिरण्यासाठी बाहेर पडतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं असतं ते चांगल्या ठिकाणी राहणं. आज इंटरनेटच्या माध्यमामुळे Hotels Reservation करणं अत्यंत सोपं झालंय. पण आजही अनेक पर्यटक स्वत: Hotel Rooms त्याचं location पाहिल्याशिवाय बुकिंग्ज करत नाही. जे पर्यटक Tour Operators बरोबर प्रवास करतात त्यांची सगळी सोय त्या कंपनीतर्फे केली जाते.
May 25, 2023
शरीराचं तापमान वाढतं ते या यंत्रणेला विविध मार्गांनी संदेश मिळतात म्हणून. जंतूजन्य आजारात शरीरात जंतूंच्या अस्तित्वामुळं आणि लढाईमुळं जे काही रासायनिक बदल होतात, त्यामुळे या संस्थेला तापमान वाढवण्याचे संदेश मिळतात व तपमान वाढवलं जाते.
या वाढवलेल्या तापमान जंतूंच्या शरीरातल्या अनेक रासायनिक क्रिया बंद पडतात व त्याचा परिणाम म्हणून ते अर्धमेले होतात किंवा वाढू शकत नाहीत.
यासाठी शरीराला येणारा ताप हा उपयुक्तच समजला पाहिजे. मात्र हे तापमान असंच वाढत गेलं तर आपल्याच शरीराला त्याचा त्रास होऊ लागतो आणि कधी कधी मेंदूला हे तापमान सहन न झाल्यानं झटके येतात. यालाच ‘तापातले झटके’ असे म्हणतात. काही मुलांमध्ये एखाद्या आजारात पटकन् ताप वाढण्याची ठेवण असते तर काही मुलांची तापमान योग्य राखण्याची यंत्रणा चांगली काम करत रहाते, म्हणून ताप वाढत नाही. दोन्ही गोष्टी फारशा चांगल्या नाहीत. पहिल्या बाबतीत मुलाला तापाचा प्रत्यक्ष त्रास होतो. तर दुसऱ्यात, आजार नक्की कोणता हे चटकन् समजून न आल्यानं त्याचा अप्रत्यक्षपणे त्रासच होतो. म्हणूनच माफक प्रमाणात ताप येणं दोन्ही दृष्टीनं चांगलं असतं असं समजायला हरकत नाही. तापाच्या तीव्रतेवर आजाराची तिव्रता ठरत नसते. मला खूप रडल्यानं ताप येतो ही चूकीची समजूत आहे. बाळ ताप आल्यामुळं खूप रडतं आणि नंतर ते आपल्या लक्षात येतं.
ताप हा आपल्या शरीराचा मित्रच आहे.
ताप हे अनेक आजारांचं प्राथमिक लक्षण असतं. याउलट कितीतरी गंभीर आजारांत ताप फार चढलेला दिसत नाही, तरीही ते प्राणघातक असू शकतात. मात्र जास्त ताप चढलेलं मूल ताप असतांना तरी जास्त गंभीर रीतीनं आजारी असल्यासारखं दिसतं. म्हणून आजाराचं खरं स्वरूप मुलाचा ताप उतरवल्यानंतरच पहावं.
ताप येणा-या मुलाचा हा ताप कशामुळं येतोय हे शोधण्याचा प्रयत्न करावा. त्याच्या प्रत्येक अवयव संस्थेचं काम व्यवस्थित होतंय ना हे पहावं. तसंच तापाच्या जोडीला काही अवयव किंवा संस्थेच्या बिघाडाची लक्षणं दिसताहेत का हे पहावं. उदा. सर्दी खोकला - श्वास मार्ग, फुफ्फुसं यांचा बिघाड दाखवतात. तर उलटी जुलाब पोट, आतडी लिव्हर यांच्यातला बिघाड सुचवतात आणि लघवीचा त्रास मुत्रमार्गाचा बिघाड. बाळाचा दैनंदिन कार्यक्रम कसा आहे त्यावरून म्हणजे, त्याचं खाणं, पिणं, शू चं प्रमाण, उलटी इ. गोष्टींवरूनही आजाराचा गंभीरपणा दिसतो.
ताप कसा मोजावा?
हातानं कपाळ किंवा पोटाचं तापमान पाहणं हे अगदी प्राथमिक तपासणं झालं. पण याने आपण तापाचा एक साधा अंदाज मांडू शकतो. ताप खरं तर शरीराच्या आतल्या भागातला मोजायला हवा. शी च्या जागी थर्मामीटर घालून किंवा तोंडात जिभेखाली धरून. मुलं खूप कपडयात गुंडाळल्यानं गरम लागतात, तर उघडी ठेवल्यास गार पडलेली असतात म्हणून आतून तपमान मोजणंच योग्य.
जी मुलं थर्मामीटर चावण्याची शक्यता असते त्यांच्यात शक्यतो शीच्या जागेचं तापमान मोजावं. सर्वच मुलांचा ताप अशा तऱ्हेने मोजायची जरूरी नाही पण वरून ताप लागत नाही तरीही मूल मलूल वाटतंय अशी अवस्था असेल तर मुलाला ताप आहे की नाही हे नक्की करण्यासाठी असा ताप पहाणं आवश्यक आहे. इतर वेळी काखेत घाम नसल्यास काखेतलं किंवा मोठया मुलांचं काही गार किंवा गरम न खाता पिता तोंडातलं तापमान मोजावं. थर्मामीटर १ पूर्ण मिनिट जागेवर धरून ठेवावा लागतो. तो त्वचेला निट लागून राहिला नाही तर तापमान नोंदीत चूक होते आणि १ पूर्ण मिनिट मुलांच्या काखेत थर्मामीटर धरून ठेवणं अवघड जातं म्हणून मुलांचा ताप मोजणं अवघड वाटतं. म्हणून मुलांचा ताप मोजणं हे कौशल्याचं काम आहे.
त्वचेपेक्षा काखेतलं आणि काखेपेक्षा आतल्या भागाचं तापमान १-१ डिग्रीनं जास्त असतं.
तापातले झटके:
मेंदूला एकदम वाढणारा जास्त ताप सहन न झाल्यानं झटके येतात. पूढे हळू हळू मेंदू जस जसा वाढतो तसतशी त्यात हे तपमानाचे बदल पचवायची शक्ती येऊन मग असे तापातले झटके येणं बंद होतं. हे झटके येण्याचं नेहमीचं वय म्हणजे ६ महिन्यापासून ते ६ वर्षांपर्यंत. एखाद्या कुटुंबांत हे प्रमाण अनुवंशिकही दिसतं या झटक्यांनंतर मुलाला मोठेपणी फिटस् किंवा एपिलेप्सी असा आजार राहू शकेल का, याची काळजी पालकांना लागलेली असते. मुलाला फक्त तापातच झटके आले असतील आणि घरात फिटस् मुळं त्याच्या बुध्दीवर किंवा वाढीवर कोणताच विपरित परिणाम होणार नसतो हे समजावून घेतलं तर आई वडिलांच्या मनातली भीती आणि काळजी आपोआप कमी होईल.
मुलाला तापात झटका आला तर काय करावं?
सर्वप्रथम त्याला सुरक्षित ठिकाणी निजवून शरीराला इजा होत नाही ना बघवं. लाळ येत असेल तर पुसावी. थोडयाच सेकंदात किंवा मिनिटात झटका थांबतो. त्याची वाट पहावी. झटका थांबत असतांना श्वास नीट होतोय ना हे पहावं. मूल काळं निळं पडलं असेल तर आता रंग झपाटयानं बदलून गुलाबी होतोय ना हे पहावं. शुध्दीवर येतोय ना, हे पहावं, आणि मग अंग पाण्यानं पुसत ताप उररवायला सुरूवात करावी.
थोडयाच वेळात मूल हालचाल करू लागतं. कण्हू लागतं किंवा रडू लागतं. हीच तो शुध्दीवर येत असल्याची खूण आहे. अशावेळी त्याला चिमटा काढला तर ते दुखल्याचं त्याच्या चेहऱ्यावर दिसतं, म्हणजेच त्याला आता समजू लागलंय असं आपल्याला समजतं. हा वेळ मोजायचा प्रयत्न करावा. या सर्वाची नीट नोंद घेऊन सर्व अचूक माहिती डॉक्टरांना देण्याचा प्रयत्न करावा. या माहितीचा डॉक्टरांना उपचारांसाठी उपयोग होतो.
अशा मुलांना ताप न उतरवल्यास पुन्हा झटका येण्याची शक्यता असते. म्हणून ताप औषधांनी, इंजेक्शननी , अंग पुसून कसाही पण जलद उतरवावा. स्पजिंग करतांना शरीराचा जेवढा भाग मिळेल तितका कोमट काटामोड पाण्यानं पुसून आपोआप कोरडा होवून द्यावा. त्यामुळं शरीरातील उष्णता हे पाणी वाळवायला वापरली गेल्यानं तपमान उतरायला मदत होते.
ताप उतरवण्यासाठी बर्फाचं पाणी वापरू नये. कोमट पाणी वापरावे.
या कामासाठी बर्फाचं पाणी वापरू नये. त्याचा उपयोग कमी होतो आणि त्याचा त्रास झाल्यानं मूलही पुसू देत नाही. तसंच नुसत्या कपाळावर घडया ठेवण्यापेक्षा सर्व अंगाचा पृष्ठभाग वापरला तर ताप झटकन् उतरतो. या दोन गोष्टी लक्षात ठेवाव्यात. पुसत रहाण्याचं काम १५ ते २० मिनिटं केलं म्हणजेच ताप उतरतो. म्हणून एकदा पुसून थांबू नये.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
January 6, 2017
साधारणत: सुट्ट्यांचे दिवस जवळ यायला लागले की टुर्स आणि ट्रॅव्हल्सच्या ऑफिसेसमध्ये गर्दी वाढू लागते. आणि अर्थातच सुनियोजित ट्रॅव्हल ऑपरेटरकडे आपला कल जातो.
January 14, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti