वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
शस्त्र, शास्त्र आणि पाणी हे घेणार्याच्या पात्रतेनुसार गुण आणि दोष उत्पन्न करतात. म्हणून शिकणार्याची बुद्धी शुद्ध करून घ्यावी असे वचन आहे.
खरंच आहे. ब्लेडने पोट फाडू पण शकतो आणि पोटाचे ऑपरशनपण करू शकतो. ब्लेड कुणाच्या हातात आहे, त्यावर परिणाम अवलंबून असतो.
शास्त्रदेखील तसेच युक्तीने वापरावे लागते. कायदा हा लवचिक असावा. नियम हा पाळण्यासाठी असावा, ठरवून उपास करताना कधीतरी चुकुन, जुन्या सवयीमुळे उपासाला न चालणारा पदार्थ पटकन तोंडात गेला, म्हणून फार मोठे आभाळ कोसळणार नाही, की कोणी फाशी देणार नाही, जिथे चुक लक्षात आली तिथून देवाची क्षमा मागून, पुढे उपास सुरू ठेवावा.
आपण सोयीस्कर अर्थ काढून, "नाहीतरी आता उपवास मोडलाच आहे, तर आता वडा भजी ऊसळ मिसळ पण खाऊन घेऊया." असा विचार करणे चुकीचे ठरेल.
उपास कोणासाठी करायचा आहे ? देवासाठी की देहासाठी ?
खाण्यासाठी की देण्यासाठी ? आणि असे केलेले उपवास काही फलदायी होत नाहीत.
उपवास करायचा असेल तर एक विशिष्ट मानसिकता बनवावी लागते. मनाला संयमात ठेवावे लागते, मोहाचा त्याग करावाच लागतो.
जी गोष्ट किंवा वस्तु सोडल्याशिवाय ती मला हितकर होणार नाही, हे आपल्या मनाला आधी पटले पाहिजे.
म्हणजे वैद्याने सांगितलेले पथ्यपालन करणे, हा देखील एक उपासच झाला ना !
ज्याचा हव्यास संपत नाही ते सुख ! आणि सुख जिथे संपते तिथे समाधान सुरू होते, हे जर खरे असेल तर उपास म्हणजे उपभोग घेण्याच्या मानसिकतेतून (यालाच माया असेही म्हणतात) बाहेर येणे. प्रपंचात राहून परमार्थाचा विचार करणे म्हणजे उपवास.
समर्थ म्हणतात,
आपण खातो अन्नासी
अन्न खाते आपणासी ।
सर्व काळ मानसी,
चिंतातुर ।।
आज संकष्टी आहे, पण रविवार बुधवार पण आहे, आता काय धरावे की संकष्टी सोडावी असा प्रश्न जरी मनात निर्माण झाला, तरी अशी कष्टाने केलेली संकष्टी कशी पावणार ? त्याने समाधान कसे मिळणार ?
उपासाला सात्विक अन्न खावे.
नेमकं सात्विक म्हणजे काय ?
जरूर असेल तेव्हाच आणि तेवढेच अन्न खाणे म्हणजे सात्विक होय. मुख्य म्हणजे प्रत्येक घासाला भगवंताची (शास्त्रीची वा वैद्याची सुद्धा ) आठवण राहिली पाहिजे.
नाम घेता ग्रासोग्रासी
तो जेविता राहिला,
उपवासी, असं तुकाराम महाराज पण सांगतातच !
आपल्या प्रकृतीचा विचार न करता, भुकेचा ( अग्निबलाचा ) विचार न करता, आजारांचा विचार न करता, स्वतःच्या मनाने ठरवून केलेला उपास हा फक्त अशक्तपणाच आणतो.
प.पू. गोंदवलेकर महाराज म्हणतात, प्रापंचिक गोष्टींकरीता उपास ही गोष्टच मला मान्य नाही.
आपल्या मनामध्ये काहीतरी मिळावे म्हणून कितीही उपासासारखे कष्ट केलेत तरी, ते पाहून लोक फसतील, पण भगवंत फसणार नाही.
महाराज म्हणतात,
उपासना करा.
उपास ना करा.
गणिताचा प्रश्न पाहिल्यावर थिजल्यासारखे होते. काय करू काही सुचतच नाही!!! हा माझाच नव्हे,अनेकांचा अनुभव आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना सुरू कुठे करावं हा प्रश्न असतो, तर तितक्याच विद्यार्थ्यांना समीकरण मांडणे अवघड जाते. म्हणून स्ट्रेटजी उपयोगी ठरते. त्यावरचा उपाय – ‘स्ट्रॅटजि’ – ‘रणनीती’. पहिले काय करावं हे सुचावं लागत नाही, माहित असते आणि ते केले के कोंडी फुटते … पुढची वाट दिसू लागते …
दर वर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्ष च्या चतुर्थीस करवा चौथ व्रत असते. परंपरेनुसार हिंदी भाषीय विवाहित महिला यादिवशी पहाटेच स्नान करून शिव शंकराला व सूर्याला जल अर्घ्य देवून सकाळ ते रात्री चंद्र दर्शनापर्यंत उपाशी राहून आपल्या पतीच्या लांब आयुष्यासाठी चंद्र देवतेस प्रार्थना करतात. भारतात मुख्यत्वे राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात, हरियाना, हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब या राज्यांमध्ये हे पारंपारिक व्रत विवाहित महिला दरवर्षी करतात.
मुलांनी आणि इतरांनी सुद्धा सारं काही खायला हवं . आयुर्वेदात सांगितले आहे की नित्यनेमाने गोड , आंबट , तिखट , खारट , तुरट आणि कडू या सर्व चवीचे पदार्थ खायला हवेत . आहार आहेच तितका महत्त्वाचा . म्हटलंच आहे –
ब्लॅकबेरी हा मोबाईल ईमेल व स्मार्टफोन यांचे एकत्रीकरण करून बनवलेला एक फोन आहे. कॅनडातील रीसर्च इन मोशन या कंपनीने १९९९ मध्ये ८५० हा ब्लॅकबेरी पहिल्यांदा तयार केला, पण तेव्हा त्याचे स्वरूप संदेशाची देवाणघेवाण करणाऱ्या पेजरसारखे होते.
जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे चौवीस
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा
नित्यं हिताहारविहारसेवी
समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
दाता समः सत्यपरः क्षमावान
आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।
शिरा ताणून बोलू नये
"अरे मला ऐकायला येतंय, उगाच शिरा ताणून बोलू नये. डोके दुखायला लागेल. गळ्याच्या शिरा किती फुगतायत बघ." ही आईची नेहेमीचीच शिरा ताणून ओरड सुरू असते.
शिरा ताणून बोलायची सवय वाईटच. आपण मोठ्या आवाजात बोललो म्हणजे आपण खरं बोलतोय, किंवा दुसऱ्याला ते पटतंय, असं वाटणं, हा निव्वळ भ्रम आहे.
बोलताना मनावरचा संयम वाणीमधे दिसला पाहिजे. मनातील रागादि रिपु वाणीतून प्रकट होता नये. तावातावाने बोलल्यामुळे डोक्यातील सर्व सूक्ष्म इंद्रिये ताणाखाली येतात. अनावश्यक दाब तयार होतो. जो दाब बोलून गेल्यानंतरदेखील काम करीत राहातो. असं वारंवार झालं तर नुकसान होणारच !
उगाच वाद ओढवू नये
म्हणजे आ बैल मुझे मार. समोरचा स्वभावाने कसा आहे, हे आपल्याला जर नीट कळलेले असेल तर, त्याच्याशी कसे बोलावे, त्याच्याशी कसे वागावे, याचा विवेक करता यायला हवा. जेवढे शब्द जपून वापरता येतील, तेवढे जपून वापरावेत, नाहीतर अर्थाचे अनर्थ होतात. संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या नावाखाली एक काव्य वाॅटसपवर प्रसारीत होत आहे, शब्द तासून बोलावा.वगैरे... खरं आहे ते !
बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून मग शांतपणे बोलावे.
पण गरज असेल तेव्हा न बोलणे हा अवगुण देखील आहे. काहीवेळा आपल्या बोलण्यातील धार दाखवून पण द्यायला लागते. समर्थ म्हणतात,
ठकासी पाहिजे ठक
खटनटासी खटनट
हुंब्यासी हुंबा
लावूनी द्यावा.
आपण कोणाशी वाद करायला जाऊ नये, पण वाद करायला कोणी आलाच तर शिंगावर घेण्याची तयारी पण हवी.
आई नेहेमी सांगते. शाळेत "उगाच" भांडू नकोस. त्या वाक्याचा अर्थ आता कळतोय. जर भांडायची वेळ येईल, तेव्हा उगाच गप्प पण बसू नकोस. असंही तिला सांगायचं असतं.
वाद घालण्याची पण एक कला असते. आयुर्वेद महाविद्यालयात पदार्थविज्ञान या विषयात, "तंत्रयुक्ती" नावाचा एक प्रकार शिकायला मिळतो. याचा नीट अभ्यास केला तर, आपले म्हणणे समोरच्या व्यक्तींना समजावून सांगता येते. आयुर्वेद महाविद्यालयात शिकत असताना पदार्थविज्ञान हा खरंतर "ऑप्शनला" टाकलेला विषय. हे असले विषय कशाला घेतले सिलॅबसमधे य्यार ! असं म्हणून या विषयाची जागा त्याला दाखवून दिलेली असते, पण पुढे व्यवहारात रुग्णाला आपले म्हणणे समजून सांगायला, पदार्थविज्ञान हाच विषय काम करतो, हे आता लक्षात येतेय.
काही गोष्टींचे महत्त्व कळण्यासाठी, काही काळ जाणं आवश्यक असतं. असंही आई म्हणायची, तेही खरंच आहे म्हणा !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
१३.०८.२०१७
पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण करून आजकाल लोकं हाताऐवजी चमच्याने जेवतात. आणि या प्रकारे जेवताना स्वत:ला श्रेष्ठ समजतात. मात्र आपल्या संस्कृतीमध्ये हाताने जेवण्याची पद्धत असून त्यामागे काही वैज्ञानिक कारणंदेखील आहेत. आयुर्वेदाप्रमाणे आमचे शरीर पंचतत्त्वांनी निर्मित झाले असून हाताच्या प्रत्येक बोटाच्या अग्रभागी एका तत्त्वाचे अस्तित्व आहे.
अंगठा- अग्नी
तर्जनी- वायू
मध्यमा- आकाश
अनामिका- पृथ्वी
कनिष्का- पाणी
जेव्हा आपण हाताने जेवतो तेव्हा पाची बोटांना आपसात जोडून तोंडात घास भरतो, याने पंचतत्त्वांचा समतोल होत असून शरीराला मिळणारं अन्न ऊर्जा देणारं असतं. हाताने जेवल्याने आमचा मेंदू आमच्या पोटाला अन्नग्रहण करण्याचा इशारा देतो ज्याने पचन क्रिया सुधारते.
हाताने जेवताना आमचं सर्व लक्ष खाण्यावर केंद्रित असल्याने शरीराला मिळणारी पोषकता वाढते.
याव्यतिरिक्त हाताने जेवण केल्याने तोंड भाजण्याचा धोकाही कमी होतो. कारण अन्नाला स्पर्श केल्याने पदार्थ अतिशय गरम तर नाही याचा अंदाज येतो.
आरोग्यदूत व्हॉटसअॅप ग्रुपवरुन
आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपल्यासाठी अपयशाचा अर्थ आजच्यापेक्षा वेगळा होता. जेव्हा तुम्ही सायकल चालवायला शिकत होता तेव्हा तुम्ही पडलात, बऱ्याचवेळा पडलात. कदाचित तुमचे गुडघे फुटले असतील, रडला असाल पण तुम्ही परत उठलात. पुन्हा पेडल मारायला सुरुवात केली आणि काही काळातच तुम्ही अशी सायकल चालवू लागता की जशी तुम्ही ती गोष्ट बऱ्याच आधीपासून करत आहात.
श्री विनायक स्वरुपात ओळखली जाणारी मूर्ती व्कांगताम प्रांतात मि-सोअन येथील एका मंदिरात मिळाली. ती ७ व्या – ८व्या शतकातील असावी. तिची दिसण्यातील भव्यता, प्रौढता अगदी अद्वितीयच आहे. मूर्ती उभी असून चार हात आहेत.
आपणास माहिती आहेच ना कोणत्याही स्पर्धात्मक खेळात जय व पराजय ह्यातील अंतर अगदीच नगण्य असते. ....छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास महत्वाच्या मुख्य गोष्टींमधे फरक जाणवतो. ....आहाराच्या शास्त्राकडे लक्क्ष्य देणे कोणत्याही खेळात निर्णायक ठरू शकते. ....तुमच्या कामगिरीत स्पर्धात्मक आव्हाने झेलण्यास आहार शास्त्र महत्वाची भूमिका बजावते
दर वर्षी 5 मे हा जागतिक धावपटू (Athletic) दिन म्हणून साजरा केला जातो. आव्हान टिकवून धरण्यासाठी फिटनेस, स्टॅमिना आणि चांगले प्रशिक्षण धावपटूंसाठी अत्यंत महत्वाचे आहे. खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी तुमची कामगिरी खालावू शकतात. पण तुम्ही खाण्या पिण्याच्या सवयीची योग्य ती काळजी घेतल्यास तुमची कामगिरी उंचावण्यासाठी ते मोलाची मदत करतात
प्रत्येक खेळात आहाराचे/खाण्याचं एक वेगळेच तंत्र आहे आणि हे खाण्या चे तंत्र तुम्हीं व्यायाम किती काळ करता ह्या वर अवलंबून असते. जर व्यायाम हा 45 मिनीटांपेक्षा जास्त असल्यास तुम्हाला तुमच्या खाण्या पिण्याकडे लक्ष्य देणे गरजेचे असते. खेळामुळे येणारा थकवा कमी करण्यासाठी आहार आणि पाणी महत्वाची भूमिका बजावतात. जितका खुराक योग्य व चांगला तितका तुमचा परफॉर्मन्स चांगला तसेच तुमचा फिटनेस आणि skills जास्तीतजास्त उंची वर नेऊन ठेवण्यात ते मोलाची मदत करतात पण खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी तुमचा खेळ तर बिघडतोच पण तुमचा शारिरीक दुखापतीचा संभवही वाढतो, वजनावरही त्याचा परिणाम होतो. एवढेच नव्हे तर खेळामुळे गेलेली एनर्जी परत मिळवण्यातही कमतरता येते.
खेळाडूना अन्नघटकांची आणि द्रवपदार्थांची गरज ही त्याच वयाच्या इतर व्यक्तींपेक्षा जास्त असते. योग्य वेळी योग्य अन्नघटक घेणे (nutrient timing) हे अत्यंत महत्वाचे आहे ज्याचा असर तुमच्या परफॉर्मन्स वर होतो. खेळापुर्वी खेळामध्ये आणि खेळानंतर योग्य अन्नघटकांचे सेवन केल्यास तुमच्या परफॉर्मन्स ची पातळी उंचावण्यासाठी ते मोलाची मदत करतात
धावपटूंसाठी कोणकोणते अन्नघटक महत्वाचे
Fluid (द्रवपदार्थ) - शरीरातील फक्त 2% पाण्याची पातळी खालावली तर तुमचा परफॉर्मन्स 15 ते 30% पर्यंत कमी होऊ शकतो म्हणून fluids वर लक्ष द्या
एनर्जी - तुमचं वजन योग्य राखण्य एवढेच एनर्जी चे सेवन करावे. 45 मिनीटांपेक्षा व्यायाम जास्त असल्यास तुम्हाला एनर्जी व इलेकट्रोलाईट घेणे आवश्यक असते
कारबोहैड्रेट - carbohydrate = sports performance. कोणत्या प्रकारचे कारबोहैड्रेट किती प्रमाणात घ्यावयाचे हे तुमच्या व्यायामाच्या प्रकारावर, व्यायाम करण्याची वेळ, तुमचे सध्या चे वजन, आणि ते तुम्ही कोणत्या वेळी घेता ह्या वर अवलंबून असते.
फॅट - व्यायाम करताना किंवा खेळामध्ये तळकट आणि अति तेलाच्या पदार्थांचे सेवन त्रासदायक ठरू शकते ज्यामुळे तुमचा परफॉर्मन्स कमी होऊ शकतो. पण हीच फॅट तुम्ही योग्य प्रकारची, योग्य वेळी योग्य प्रमाणात घेतली तर तुमची कामगिरी उंचावण्यासाठी ते मदतीचा हात देऊ शकतात तसेच तुमचे आरोग्य ही सुधारण्यास ही ते उपयोगी पडतील.
कॅल्शियम - मुली, तरूण स्त्री धावपटूंसाठी जास्तीच्या ट्रेनिंगमुळे मासिकपाळीसाठी आवश्यक असणाऱ्या हार्मोन्स तयार होण्याचे प्रमाण कमी होते ज्यामुळे त्याचा मासिकपाळी वर परिणाम होतो, तसेच वेळेच्या आधी irreversible osteoporosis होऊ शकतो. तर पुरुष धावपटूंमध्ये testosterone ची कमतरता झाल्यामुळे osteoporosis होऊ शकतो.
लोह (iron) - अती शारीरिक व्यायामामुळे लोह ह्या खनिजाची कमतरता होऊ शकते आणि कमतकमतरतेमुळे रक्तक्षय (अनिमीया)चा धोका निर्माण होऊ शकतो
मॅग्नेशियम - मॅग्नेशियमच्या तातपुरत्या कमतरतेमुळे थकायला लवकर होण, मळमळणे, तसेच muscle cramps चा धोका वाढू शकतो तर क्राॅनीक कमतरतेमुळे रक्तक्षय आणि ओस्टीओपोरोसिसचा धोका वाढतो.
पोटॅशियम - थकवा, muscle cramps कमी करण्यासाठी मदत करतात
Selenium - रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि फ्री रेडिकल चा धोका कमी करण्यास मदत करतात
सोडियम - घामाद्वारे शरीरातील सोडियम चे प्रमाण कमी होते. रक्तातील सोडियम चे प्रमाण कमी होते ज्यामुळे muscle cramps चा धोका वाढतो. 5 तासापेक्षा जास्त व्यायाम केल्यास आणि तो उष्ण हवामानात केल्यास रक्तातील सोडियम ची पातळी खूप कमी होऊ शकते जी जीवनाला घातक ठरू शकते
Zinc - स्नायूंच्या नुतनिकरणासाठी आणि अन्नातील उर्जेचा शरीराला आवश्यक असणाऱ्या उर्जेत रुपांतरीत करण्यासाठी आवश्यक आणि कमतरतेमुळे रोग प्रतिकारक शक्ती कमी होते ज्यामुळे छोटे मोठे आजार होऊ शकतात
Copyright © 2025 | Marathisrushti