वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आज दिनांक १६ ऑक्टोबर. आज संपूर्ण जगात ” वैश्विक अन्न दिन ” साजरा केला जातो. आजच्या दिवसाला एक गोष्ट आपण ठरवूया की १) अन्न वाया घालवायचं नाही. २) जेवढं अन्नदान शक्य आहे तेवढं नक्कीच करु. लक्षात घ्या की, अन्नदान हे सर्व दानांमध्ये श्रेष्ठ आहे.
प्रास्ताविक :
आजचें युग हें विज्ञानयुग आहे. आतां विज्ञानाच्या भिंगातून जुन्या संकल्पनांचें विश्लेषण होतें आहे. आपणही आतां विज्ञानाच्या कसोटीवर गणपतीचा विचार करणार आहोत.
गजाननाच्या सर्वमान्य रूपातील मुख्य घटक कोणते, तें सर्वप्रथम पाहू या. ते आहेत –
• हत्तीचें मस्तक ; म्हणजेच हत्तीसारखी सोंड व हत्तीप्रमाणे सुपासारखे कान
• हत्तीसारखा मोठा, पण एकच दात (सुळा, tusk) ; (एकदंत)
• स्थूल शरीर, विशाल उदर
• मूषक हें वाहन.
या घटकांचा विचार आपण पुढे करणारच आहोत.
‘गणांचा अधिपति’ याच अर्थाने गणेशाचा ऋग्वेदामधे उल्लेख आहे. ‘गणानां त्वा गणपतिम् हवामहे’ ही ती सुप्रसिद्ध ऋचा. ऋग्वेदकाळापासूनच, गजानन हा गणनायक आहे, गणाधिपती आहे, असें म्हटलें गेलेलें आहे. कृष्णयजुर्वेदात गणपतीला ‘दंती’ (म्हणजे, सुळा, tusk असलेला), ‘हस्तीमुख’ व ‘वक्रतुंड’ (वाकडी सोंड असलेला) असा उल्लेख केलेला आहे. महाभारताचा लेखनिक गणेश आहे, अशी आख्यायिका आहे. गणेश पुराण तर गणपतीशीच संबंधित आहे. ‘श्रीगणपतिअथर्वशीर्ष’ या स्तोत्रात गजाननाच्या, ‘गणपति, एकदंत, वक्रतुंड, शूर्पकर्ण, लंबोदर’, वगैरे नावांचा उल्लेख आहे, व ‘गँ गणपतये नम:’ असा मंत्रही आहे. अथर्वशीर्ष हें अथर्ववेदाचा एक भाग आहे, असे मानले जातें. अथर्वशीर्ष स्वत:ला एक उपनिषद म्हणवते. गजानन हा गणाधिपति आहे, म्हणूनच आपण गणपतीचे पूजन प्रत्येक विधीच्या आरंभी करतो. थोडक्यात काय, तर ऋग्वेदकालापासून आपल्याला गणपती आढळतो.
ऋग्वेदाचा काळ हा एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे. परंतु, पुढे जाण्यापूर्वी आपण, आपल्या विषयाच्या अनुषंगानें ऋग्वेदकालाचा थोडासा आढावा घेऊ या, म्हणजे गणपतीची संकल्पना किती जुनी आहे, याचा अंदाज येईल. ऋग्वेदाचा काळ इ.स.पू. १५०० असा, १९व्या शतकातल्या पाश्चिमात्य विद्वानांनी मानलेला आहे, व आजही काही भारतीय विद्वानांची त्याला मान्यता आहे. ‘दि आर्यन डिबेट’ या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या पुस्तकात विविध जुन्यानव्या विद्वानांच्या लेखांचे संकलन आहे, व त्यांत तो काल, इ.स.पू. १५००, इ.स.पू. २०००, इ.स.पू. २२०० असा वेगवेगळा मांडलेला आहे. काही अन्य भारतीय विद्वान ऋग्वेद त्याहून खूप प्राचीन आहे, असे मानतात, व भारतीय परंपराही तसेंच मानते. नक्षत्रतारकापुंजांच्या स्थितीबद्दलची कालक्रमणाच्या संदर्भातील गणिती समीकरणें मांडून, लोकमान्य टिळकांनी तो काळ इ.स.पू. ४५०० असा सप्रमाण दाखवून दिलेला आहे. ‘ऋग्वेदाचा मराठी शास्त्रीय अनुवाद’ या ग्रंथाचे लेखक डॉ. भीमराव सदाशिव कुलकर्णी यांनी त्यांच्या प्रस्तावनेत उल्लेख केलेला आहे की, वेगवेगळ्या विद्वानांनी तो काळ इ.स.पू. २००० पेक्षा जुना मानला आहे; तर काहीं विद्वानांनी तो त्याहून बराच प्राचीन, अगदी इ.स.पू. २५००० पर्यंत नेलेला आहे. आपण जरी ऋग्वेदाचा काळ इ.स.पू. ४५०० किंवा अगदी इ.स.पू. २००० मानला, तरीही हा काल, अति-प्राचीन, इतिहासपूर्वकालच आहे.
ऋग्वेदीय कालापासून तत्कालीन ‘वैदिक-संस्कृत’ भाषकांचे ( ही भाषा, आर्ष-संस्कृत, छांदस्, देववाणी, देवी-वाक् इत्यादी नांवांनीही ओळखली जाते) व ‘द्रविडियन’ (पुरातकालीन तमिळ?) भाषाभाषकांचे संबंध होते, व कदाचित एकात्म्यही होते, असा अभ्यासकांनी निष्कर्ष काढलेला आहे. (द्रविडीय भाषा आज आपल्याला दक्षिण भारत, व उत्तर भारताचा काही विशिष्ट भाग येथे आढळतात. बलुचिस्तानमधील काही जमातीसुद्धा ब्राहुई नांवाची द्रविडीय भाषा बोलतात!). म्हणून आपण दाक्षिणात्य भाषांमधेही डोकावून पाहू या. तमिळमधे गणेशाला ‘पिल्ले’ व ‘पिल्लइयार’ अशीही नामें आहेत. द्रविडीय (दाक्षिणात्य) भाषांमधे ‘पल्लू’, ‘पेल्ला’, ‘पेल्ल’ म्हणजे, दात किंवा हत्तीचा सुळा . म्हणजे, द्रविडीय भाषांमधेसुद्धा गणेशाचा संबध हत्तीशी जोडलेला आहे.
या सर्व विश्लेषणावरून, असे समजायला हरकत नाहीं की संस्कृत, आर्ष-संस्कृत तसेंच द्रविडीय, या सर्व भाषा-भाषक जनांमधे शतकानुशतकें वर उल्लेखलेले गणेशाचे रूप प्रचलित आहे. याचाच अर्थ असा की, गेली किमान ३५००-४५०० वर्षें तरी, किंवा त्याहूनही बर्याच आधीपासून, म्हणजेच इतिहासपूर्व अतिपुरातनकालापासून, गणपतीचें हें रूप भारतात सर्वमान्य आहे. (हें रूप लिखित स्वरूपात किंवा शिल्पांच्या स्वरूपात, वेदोपनिषदांनंतरच्या काळात दिसलेले असले तरी, ती मौखिक परंपरा त्याहून खूपच प्राचीन असली पाहिजे, याबद्दल कसलाही संदेह असू नये. अशी सर्वमान्य मौखिक परंपरा असल्याशिवाय, तें रूप लिखित स्वरूपात व शिल्पांमधे येणेच शक्य नाहीं). तेव्हां, गजाननाचें असें रूप सर्व जनांनी इतकी शतकें-सहस्त्रकें मानण्यामागे काहींतरी ‘लॉजिकल’ कारण नक्कीच असलेंच पाहिजे. मिथकें बाजूला सारून, तर्काधारानें यामागील विज्ञानाधारित स्पष्टीकरण शोधतां येतें कां, व तें काय असू शकेल, याचा विचार आपण करणार आहोत.
भारतीय देवच नव्हे, तर ग्रीको-रोमन संस्कृतीमधील देवही माणसाप्रमाणे वागतात; त्याचें कारण काय असावें ? एरिक फॉन डेनिकेन, चार्लस् बर्लिटझ् वगैरें लेखकांनी या विषयावर बराच अभ्यास व लिखाण केलेलें आहे. (पहा : डिनिकेन यांचे, ‘चॅरिएटस् ऑफ दि गॉडस्?’ हें पुस्तक, व बर्लिटझ् याचें ‘मिस्टरीज् फ्रॉम फॉरगॉटन् वर्ल्डस्’ हें पुस्तक ). डेनिकेन यांच्या लिखाणातील मूळ सिद्धांत असा आहे की, पृथ्वीवर अवतरलेले ‘देव’ म्हणजे परग्रहावरून आलेले अवकाशप्रवासी (अंतराळयात्री) होत. या सिद्धांताच्या पुष्ट्यर्थ त्यांनी, जगभरातल्या विभिन्न देशांमधील व विविध संस्कृतींमधील, भिन्नभिन्न कालखंडांतील, अनेक उदाहरणें प्रस्तुत केलेली आहेत. परंतु, त्यांच्या यादीत, रामायणातील पुष्पक विमान व महाभारतातील ब्रह्मास्त्र यांखेरीज अन्य भारतीय संदर्भ सहसा नसतात. अर्थातच, याचें एकमात्र कारण हेंच आहे की, त्यांनी भारतीय संस्कृतीचा पुरेसा अभ्यास केलेला नाहीं. परंतु, आपण आपल्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीचा वापर करून त्या अंगानें विचार केला तर, आपल्याला त्याप्रकारची भारतीय परंपरेतील अनेक उदाहरणें सापडतात. अन्य उदाहरणांविषयी पुन्हां केव्हांतरी चर्चा करू. तूर्तास, आपण गजाननाचा त्या दृष्टीकोनातून विचार करू या.
[ कृपया नोंद घ्यावी की, यानंतरच्या सर्व विवरणात ठिकठिकाणी, हल्ली प्रचलित असलेल्या व सर्वज्ञात असलेल्या इंग्रजी संज्ञांचा वापर केलेला आहे. या सर्व संकल्पनाच आधुनिक आहेत. त्यामुळे अशा शब्दांना भारतीय भाषांमधे प्रतिशब्द असतातच असे नाहीं; किंवा निर्माण केलेले असल्यास, ते रुळलेले नसतात, आपल्या रोजच्या बोलण्यात ते येत नाहींत.]
-- सुभाष स. नाईक.
मुंबई.
M - 9869002126.
राजकीय पक्षांकडून ‘राम’ नामाचा जप सुरु झाला कि निवडणूक आली, हे आता लोकांना माहीत झालेले आहे. श्रीरामाचे नाव घेऊन देशातील बहुसंख्य हिंदूं मतांचे भावनात्मक ध्रुवीकरण करता येते, याची जाण राजकारण्यांना असल्याने प्रत्येक निवडणुकीत ‘राममंदीर’ हा काही राजकीय पक्षांच्या ठेवणीतील मुद्दा राहिला. निवडणुका आल्या कि ‘बनायेंगे मंदिर’ चा नारा द्यायचा. आणि निवडणुका झाल्या कि तांत्रिक मुद्द्यांचा कीस पाडून त्याला बगल द्यायची. हे राजकारण अनेक वर्षांपासून देशात केल्या जातेय.
हिंदीत 'शिक्षा' चा अर्थ शिक्षण.
आणि शिक्षा शब्दाचा मराठी अर्थ काय? हे सांगण्याची अजिबात गरज नाही. कारण अनेक पालकांनी त्यांच्या लहानपणी 'शिक्षा' या शब्दाच्या अनेक अर्थछटा अनुभवल्या आहेत, चाखल्या आहेत, गिळल्या आहेत, अंगावर मिरवल्या आहेत आणि कपड्याखाली लपवल्या पण आहेत. आणि मग उगाच परंपरा खंडित होऊ नये म्हणून याच कल्पक पालकांनी शिक्षेत काळानुरुप बदल करुन त्या आपल्याच मुलांपर्यंत ताकदिने पोहोचविल्या आहेत.
मुलांशी गप्पा मारताना शिक्षेचे विविध प्रकार कळले तेव्हा अचंबितच झालो. शास्त्रीय संगीतात ज्याप्रमाणे घराणी आहेत त्याप्रमाणेच या शिक्षा प्रकारात तीन मुख्य घराणी आहेत. त्या त्या घराण्याप्रमाणे शिक्षेचे राग,ठुमरी,टप्पा,ख्याल किंवा फ्युजन असे स्पेशलाइज्ड प्रकार आहेत. 'घर,शाळा आणि क्लास' ही शिक्षेची मुख्य उगमस्थाने किंवा घराणी!!
संजानाची निबंधाची वही वाचत असताना,जाणवलं की, तिने नवीन निबंध अत्यंत खराब अक्षरात लिहिला आहे.
माझी उत्सुकता चाळवली.
अचानक अक्षर खराब होण्याचं कारण काय असावं? तिने फक्त निबंधच खराब अक्षरात लिहिलाय की तिचे एकंदर अक्षर लेखनच खराब होउ लागले आहे?
सहज म्हणून तिच्या वर्गात गेलो. संजानाच्या इतर वह्या चाळल्या. मला धक्काच बसला! गेल्या दोन दिवसांपासूनच तिचं अक्षर खराब होऊ लागलं आहे.
मुलांना भेटायला ऑफिसमधे बोलावलं तर मुलांवर दडपण येतं, म्हणून मुलांशी गप्पा मारण्यासाठी शाळेत एक 'गप्पा कोपरा' आहे.
संजाना जेव्हा गप्पा मारायला आली तेव्हा ती हातातल्या रुमालाशी सतत चाळे करत होती. तो रुमाल खिशात ठेवायला तिला खूणेनेच सांगितलं. तर तिने दोन्ही हातच खिशात घातले.
प्रचंड बेचैन होती ती! मला थोडाफार अंदाज आला होता. तरी खात्री करण्यासाठी म्हणून तिला प्यायला पाणी दिलं.
तिच्या उजव्या हाताची तीन बोटं सुजली होती. तिला कुणीतरी शारीरिक शिक्षा तरी केली होती किंवा तिच्या बोटांना अपघात झाला असावा.
तिचा उजवा हात हातात घेत तिला विचारलं तर.... एव्हढावेळ थोपवून ठेवलेला बांध फुटला व एक नवीनच गोष्ट समोर आली.
संजानाच्या आईने तिला शिक्षा केली होती.
पट्टीने तिच्या हातावर मारताना,पट्टी आडवी न ठेवता ती उभी ठेवण्याची विशेष काळजी घेतली होती. म्हणजे पट्टीचे फटके जरी कमी मारले तरी मुलीला इजा मात्र अधिक होईल,हा त्यामागचा उदात्त हेतू होता.
संजानाशी बोलताना आणखीन एक नवीन गोष्ट समजली.
आईने शिक्षा केली म्हणून संजानाला आईचा अजिबात राग आला नव्हता. किंबहुना शिक्षा नेमक्या कुठल्या कारणास्तव झाली हे सुध्दा तिला नीटसं आठवत नव्हतं. तरीपण तिचं हुंदके देणं थांबलं नव्हतं. तिला खूप भरून आलं होतं. दाटून आलं होतं. तिला काहीतरी वेगळंच सांगायचं होतं. आम्ही बोलत बोलत ऑफिसमधे गेलो.
संजाना रिलॅक्स झाली,हळूवारपणे बोलू लागली...... त्यातूनच मला एक अनोखा साक्षात्कार झाला. आपली चूक झाल्याची संजानाला जाणिव होती.
पण शिक्षेच्या अलिकडची आई व शिक्षेच्या पलीकडची आई याबाबत तिचा फार गोंधळ झाला होता. शिक्षा करणारी आई तिला मान्य होती. किंवा असं म्हणता येईल की,'शिक्षा करणाऱ्या आईला ती समजून घेऊ शकत होती.' संजानाला शिक्षा केल्यानंतर तिच्या आईत झालेला बदल तिला उमजत नव्हता,म्हणून ती व्यथित झाली होती.
शारीरिक शिक्षा केल्याने मुलांच्या फक्त शरीरालाच इजा होते असा कृपया गैरसमज करुन घेऊ नका. आणि त्यामुळेच मुले सुधारतात असा महागैरमज तर कधीही करुन घेऊ नका.
शारीरिक शिक्षेमुळे मुलांच्या मनाला, त्यांच्या भावविश्वाला जबर धक्का बसतो. वरुन न दिसणारी पण त्यांच्या अंतर्मनाला होणारी जखम दिवस रात्र भळभळत राहाते. आणि ही ठसठस ते कुणाला मोकळेपणाने सांगू पण शकत नाहीत. शारीरिक शिक्षेमुळे आपलं मूल कायमचं दुखावलं जातं,याचं भान शिक्षा करणाऱ्या मोठ्या माणसांना येतच नाही!
संजाना म्हणाली,'मी कधी रस्त्यातून चालताना पायाला ठेच लागली, किंवा खेळताना पाय मुरगळला तर आई माझी किती काळजी घेते. माझ्या पायाला मालीश करते. लागलं असेल तर औषध लावते. अशावेळी घरातली माझी कामंसुध्दा तीच करते.
पण हीच आई जेव्हा मला शिक्षा करते, मला उभ्या पट्टीने मारते आणि त्यानंतर जणूकाही काही झालेच नाही अशाप्रकारे कामाला लागते.
मला किती लागलंय? मला किती दुखतंय? याचा विचारसुध्दा तिच्या मनात येत नाही! मला जवळ घेऊन माझ्या सुजलेल्या हातावरून ती हात सुध्दा फिरवत नाही!
मला ठेच लागल्यावर जवळ घेणारी आणि स्वत:च शिक्षा करुन मला दूर ढकलणारी, यातली खरी आई कोणती?
का वागते आई असं?
संजानाचा प्रश्न काही अगदीच चुकीचा नाही. आणि याचा अर्थ मुलांना काही शिक्षाच करु नये असा ही नव्हे.
जर सगळेच उपाय थकले असतील तर आपला राग व्यक्त करण्यासाठी एखादी थप्पड मारणे इतपत समजणे शक्य आहे. पण मुलांना शिस्त लावण्यासाठी किंवा त्यांनी एखादी चूक पुन्हा करू नये म्हणून त्यांना काठीने मारणे,चटके देणे अशा शारीरिक इजा करणाऱ्या शिक्षा करणे हे सर्वार्थाने गैर आहे.
जबर शिक्षा करुन जर मुले सुधारली असती तर शाळा बंद करुन व्यायामशाळाच सुरु केल्या असत्या की सर्वांनी!
------------------------------------------------------------------------------------------
पालकांसाठी गृहपाठ :
'दोन तडाखे दिल्याशिवाय हा काही सुधारणार नाही' असं जेव्हा मनात येईल त्या संघर्ष क्षणी स्वत:चाच चेहरा आरशात पाहा; आणि मनातले 'ते वाक्य' जरा जोरात म्हणा.
पाहा चमत्कार होतो की नाही?
मुलांना शारीरिक शिक्षा करणारे पालक हे मनाने कमकुवत असतात.
आपले पालक असे असावेत असं समझदार पालकांच्या मुलांना कधीच वाटत नाही.
तुमच्या मुलांना काय वाटतं ते मला कळवाल?
तुमच्या 'सुशिक्षित पत्रांची' मी वाट पाहात आहे.
------------------------------------------------------------------------------------------------
-- राजीव तांबे
प्रकाशन दिनांक :- 20/03/2005
बहुसंख्यकांची इच्छा प्रमाण मानणे हेच लोकशाहीचे मूलभूत बीज आहे. संसद, विधिमंडळ, मंत्री, खासदार, आमदार या सगळ्या लोकशाही वृक्षाच्या शाखा- उपशाखा मूळ बीजाच्या पोषणातूनच फुलत गेल्या, फळत गेल्या. परंतु दुर्दैवाने या बाह्य विस्ताराच्या कौतुकात मूळ बीजाकडे कायम दुलर्क्ष होत आले.
मोबाईलच्या टीव्ही च्या जमान्यात रेडिओला तसे महत्व कमी कमी होत गेले असले तरी एकेकाळी हाच आपला सखा होता. मनोरंजनापासून माहिती देण्यापर्यंत सर्व कामासाठी ह्या सख्यावर अवलंबुन राहायचे. आज अनेकजणांना त्याच्या आठवणी असणारे अजूनही काही दुर्गम भागात रेडिओ शिवाय आणखी मनोरंजनाचे माध्यम नाही. शिवाय श्रीभागात देखील आवर्जून रेडिओ ऐकणारे आहेत.
संपुर्ण रामायण वाचताना आपणास रामायणातील विविध व्यक्ती अगदी सुग्रीव, वाली, अंगद, नल,नील ही वानरसेना ईतकेच काय समुद्रावर सेतू बांधताना मदत करणारी खारोटी, जटायू पक्षी या प्रत्येकाला महत्व दिल्याचे दिसून येते. मात्र रामायण वाचताना कोठेच लक्ष्मण पत्नी ऊर्मिला या व्यक्तीला फारसे महत्व दल्याचे आढळत नाही.त्यामुळे ती कोणाच्याही लक्षात रहात नाही.
ओवा आपण सर्वच जणांच्या परिचयाचा.तसेच भारतातील प्रत्येक स्वयंपाकघरात ह्याला एक वेगळे आणी महत्त्वाचे स्थान आहे.ओव्याचा वापर हा जेवणामध्ये फोडणीला,भजी बनवताना,ओव्याची कढी,अशा माफक पदार्थांमध्ये हा वापरला जातो.पण खरोखरच ओव्यामुळे त्या पदार्थांना एक वेगळी छान चव त्या पदार्थाला येते.तसेच ब-याच मंडळींना ह्याचे घरगुती औषधी प्रयोग माहीत देखील असणार.
ओव्याचे लहान क्षूप असते आणी त्याला लागलेली ही बारीक फळे असतात.ओवा चवीला तिखट कडवट असतो आणी उष्ण असतो.हा शरीरातील वात आणी कफ दोष कमी करतो पण पित्त वाढवितो.म्हणूनच पित्ताचा त्रास तसेच एॅसीडीटी मुळव्याधीचा त्रास असणा-यांनी ह्याचा वापर करू नये त्याचप्रमाणे उन्हाळयात ह्याचा वापर करू नये.
१)अजीर्ण आणी पोटदूखीचा त्रास होत असल्यास १ टीस्पून ओवा खाऊन त्यावर एक घोट गरम पाणी प्यावे.
२)जंतांचा त्रास वारंवार होत असल्यास विड्याच्या पाना सोबत ओवा खावा ही तक्रार लगेच कमी होते.
३)खोकला येत असल्यास ओवा आणी खडीसाखर हे मिश्रण विड्याच्या पानासोबत खावे.
४)पावसाळयात मधुमेह असणा-या व्यक्तींना वारंवार लघवी होते अशा वेळी १ चमचा ओवा + ४ चमचे बेलाच्या पानांचा रस हे मिश्रण दिवसातून एकदा घ्यावे.
५)४ चमचे ओवा + २ चमचे एरंडेल तेल तव्यावर परतून घ्या व त्याच्या पुरचुंडीने सांधेदुखी,मुरगळणे,मुकामार लागला असल्यास त्या भागावर शेकावे.
-- वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
गुरुतत्त्व मासिकाचा ऑक्टोबर महिन्याचा अंक हा सद्गुरु श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर यांच्या जीवनचरीत्रावर आहे. महाराजांचे जीवन हे अलौकीक आहे. आपल्याला वाचनातुन लक्षात येईलच. गुरुतत्त्वाचे हे ३० वे पूष्प महाराजांच्या चरणी समर्पीत करीत आहे.
श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर यांचे व्यावहारिक नाव दत्तोपंत होते. वडिलांचे नाव रामचंद्रपंत व मातोश्रींचे गोदाक्का उर्फ सीताबाई. श्री पंतमहाराजांचा जन्म श्रावण वद्य ८ शके १७७७ म्हणजे दि. ३/९/१८५५ रोजी रोहिणी या नक्षत्रावर, बेळगाव जिल्ह्यातील दड्डी गावी झाला. हा गाव घटप्रभा नदीच्या तीरावर, सुरम्य वनश्रीच्या मधे वसलेला असून दत्ता पंतांच्या आयुष्याचा बराच काळ या गावांशी निगडीत आहे. दत्तांपंतांचे वडिल हे बेळगावनजीक बाळेकुंद्री या गावच्या कुलकर्णी घराण्यापैकी होत. दत्तोपंतांचे प्राथमिक शिक्षण दड्डी येथे झाले. माध्यमिक शिक्षण बेळगाला झाले. घरची गरिबी असल्यामुळे अत्यंत कष्टात त्यांना आपले शिक्षण पूर्ण केले.
श्री महाराजांचे सांसारिक जीवन म्हणजे प्रवृत्ती व निवृत्तींचा संगम होता. घर सदैव अतिथी व शिष्यांनी भरलेले असे. जवळ जवळ बावीस वर्षे त्यांनी बेळगाव येथील मिशन हायस्कूलात शिक्षकाचे काम केले. व त्याहून अधिकच अध्यात्म-विद्यादानाचे कार्य केले. त्यांचे बंधू पाच होते. त्यांना महाराजांनी शिक्षण देऊन पुढे आणले. व त्यांच्या भरभराटीतच स्वत:चे समाधन मानले. त्यांना एक मुलगा व मुलगी अशी दोन अपत्ये झाली. पण ती फार काळ लाभली नाहीत. महाराज्यांच्या मातोश्रींचे आजोबा अंबाजीपंत हे एक महान गृहस्थाश्रमी सत्पुरुष होऊन गेले. श्रीनृसिंहवाडीत अनुष्ठानरस बसणाऱ्या मंडळींना दड्डीस जाऊन अंबाजीपंताचे दर्शन घ्या म्हणजे तुमचे काम होईल. असा दृष्टांत होत असे. त्यांचे चिरंजीव नरसिंहपंत हे ही सात्त्विक आचारसंपन्न पण अत्यंत व्यवहारदक्ष व करारी होते. ते अंबाजी पंतांच्या हयातीतच वारल्यामुळे त्यांच्या तीन मुली व मुलगा श्रीपाद यांचा भार त्यांचेवरच पडला पण श्रीपादपंत दहा वर्षाचे असतानाच अंबाजीपंतांनी देह ठेवला. त्याचे आतच आपल्या तिन्ही नातींची लग्ने त्यांनी उरकली होती. महराजांचे पाळण्यातील नाव “श्रीकृष्ण" असे ठेवले होते. पुढे दृष्टांत होऊन “दत्तात्रय” असे दुसरे नाव ठेवण्यात आले. वडीलमाणसे त्याला प्रेमाने “दत्तू" म्हणून हाक मारीत. घरात प्रथम जन्मास आलेले अपत्य म्हणून दत्तूवर सर्वांचे विशेष प्रेम जडले.
बालपणीच, दड्डीचे जंगल, नदी, डोंगर व निसर्गाशोभा यांचा दत्तूचे मनावर फार अनुकूल परिणाम झाला असला पाहिजे, दत्तूचा वर्गात पहिला नंबर असे, कधीही कसलीही चूक न करणारा, खेळकर, मनमिळाऊ व आज्ञाधारक असा त्याचा विद्यार्थीदशेत लौकिक होता. इकडे श्रीपादपंतांनी त्यांचेकडून कर्म व उपासनेचे कडक आवरण करून घ्यावयाचे, अक्षर वळविण्यासाठसुध्दा “विदुरनीती" अशी प्रकरणे शिकवायचे. त्यांच्या फुरसतीच्या वेळी त्याला आपल्या हाताखाली घ्यावयाचे, याप्रमाणेच चोख गृहशिक्षणातून पार पडून तो इंग्रजी शिक्षणासाठी बेळगावास इ. स. १८७२ साली जाऊन राहिला. क्रमाने एकेक बंधू आपले प्राथमिक शिक्षण दड्डीस संपताच बेळगावास दत्तूच्या बिऱ्हाडी जाऊन राहू लागले. बेळगावास इंग्रजी शिक्षण चालू असताना पंताचा मावसभाऊ गणू मारीहाळास आपल्या गावी रहात होता. हे गाव बाळेकुंद्रीच्या पूर्वेस ४/५ मैलांवर आहे. तेथून एक मैल पूर्वेस कर्डेगुद्दी हे गाव आहे. त्या ठिकाणी श्रीबालमुकुंदाची स्वारी पार्शवाडहून येऊन राहिली होती. त्यांचे मूळचे नाव बाळाजी अनंत कुलकर्णी असे होते. ते परमार्थातील असामान्य योग्यातेचे तपस्वी व महायोगी असून परमहंस पदवीस पोचलेले होते. त्यांचा अनुग्रह पंताचे मावस भाऊ गणपतराव यांजवर होऊन त्यांनी दत्तूस त्यांचे दर्शनास येण्याबद्दल पत्र धाडले. त्यास दत्तूने उत्तर पाठविले ते असे की, "बाह्मणांना गायत्रीमंत्र व उपदेश याविना अन्य मंत्राची अगर गुरुची आवश्यकता काय? तू आपला उद्योग सोडून कोण भोंदू, बैराग्याचे नादी लागला आहेस. ताबडतोब शध्दीवर ये व आपल्या प्रपंचाकडे लक्ष दे हे दत्तूचे उत्तर बाळाप्पास समजताच त्यांनी " हे पत्र लिहिणाऱ्याला धक्का पोचून तो लवकरच मरतो बघ" असे उद्गार गणू व इतर शिष्यमंडळींपुढे काढले. ते ऐकून गणू रडू लागल्याचे पाहून बाळप्पा हसून म्हणाले की “तो इकडे येईलच. त्यानंतर पुढे काय होत ते पहा." त्यावेळी दत्तू दड्डीस होता. त्याला एकाएकी विषमज्वर येऊ लागला व त्यातच सान्निपात झाला. त्या भ्रमात "बाळप्पा, बाळप्पा” असे तो बडबडु लागला.
घरची सर्व मंडळी घाबरली व त्यांनी देवास नवस मागितला की, दत्तू बरा होताच त्याला बाळप्पांकडे पाठवून देऊ. या दुखण्यातून कृपा करून त्याला बरा कर. दत्तूस लवकरच आराम पडला व त्यानंतर त्याची व बाळप्पांची गाठ पडून त्यांची त्याजवर पूर्ण कृपा झाली.
श्रीबालमुकुंदाचा अनुग्रह होताच दत्तूचा पुनर्जन्म होऊन तो श्रीपंत बनला, त्यांचा सहवास पंतांना फार तर दोन-तीन वर्षे लाभला असेल पण तेवढ्या अवधीत इंग्रजी शाळेतील अभ्यास चोख करून बेळगाव येथील आपल्या प्रपंच खर्चासाठी मदत म्हणून काही शिकवाण्या धरून व बालमुकुंदाच्या कृपाछत्राखाली गुरुगृहीचे खेळ खेळताच त्यांनी सर्व प्रकारची योगसिध्दी मिळविली ही अत्यंत नवलाची गोष्ट होय. कर्डेगुद्दीपासून ४/५ मैल पूर्वेस देसनूर येथे श्रीबालमुकुंदाचे वास्तव्य काही काल असताना येथील एका देवालयात ते योगाभ्यासा साठी बसत असत. ती जागा अद्याप दाखविली जाते. कर्डेगुद्दीच्या डोंगरावर अय्यन फडी या देवस्थानासन्निधही त्यांचेकडून बाळप्पांनी तप करविले. एकदा तीन दिवस अहोरात्र अखंड गुरुध्यान करीत बसण्याची व बिलकूल निद्रावश न होण्याची श्रीबालमुकुंदांनी आपल्या शिष्यमंडळींना आज्ञा केली. त्यात कोणी जेवताना झोपले तर कोणी स्नान करताना गुंगी येऊन खाली पडले. एकटे पंत तेवढे अखेरपर्यंत टिकून राहिले इ. स. १८५५ ते १८७७ अखेर, एवढाच काल काय तो बाळप्पांचा सहवास मिळाला. शके १७९९ च्या कार्तिक महिन्यात बाळप्पांचा श्रीशैल्ययात्रेस जाण्याचा निश्चय ठरला. त्यांचे अगोदर थोडे दिवस त्यांनी पंतांना गुरुमार्ग चालविण्याची आज्ञा केली होती. महाराजांनी त्याबाबत पुष्कळ आढेवेढे घेतले. पण बाप्पांनी निक्षून सांगितले की, “हे काम तुला केलेच पाहिजे, त्यासाठीच तर तुझा जन्म आहे. अपात्रता वगैरे तुझी काही सबब चालणर नाही. तुला माझे पूर्ण वरदान आहे!" महाराजांनी ती आज्ञा स्वीकारणे भाग पडले. व श्रीबालमुकुंद ठरल्याप्रमाणे श्रीशैल्याकडे निघून गेले. ते पुन्हा काही परत आले नाहीत. यावेळी पंत मॅट्रीकची परीक्षा पास झाले नव्हते. परंतु अशा सर्व प्रकारे अडचणीत असताना त्यांचेवर गुरुमार्ग चालविण्याचा भार पडला. त्यावेळी त्यांचे वय फक्त २२/२३ वर्षाचे असेल. बाळप्पाच्या आज्ञेप्रमाणे गुरुबंधूंना सहजमार्गदर्शन करणे व गुरुमार्ग चालविणे हेच तेव्हापासून त्यांचे आयुष्यातील सर्वश्रेष्ठ कर्तव्य होऊन बसले.
सन १८८० च्या नोव्हेंबरमध्ये पंत मॅट्रिकची परीक्षा पास झाले. पुढील वर्षीच आपला बंधू गोपाळ व मामेबुधू नाना यांना इंग्रजी शिकवण्याकरिता बेळगावास आणून ठेविले व आपण शाळामास्तरची नोकरी पत्करली आणि कसाबसा बेळगाव येथील संसार चालवू लागले. त्या स्वरूपात त्यांचेकडून अखंड सद्गुरुसेवाच घडली. प्रत्येक बाबतीत इतरांना आदर्शभूत असा निष्काम कर्मयोग त्यांनी आचरून दाखविला. क्रमाने एकेक बंधु व आप्तेष्टांची मुले व गरीब विद्यार्थी त्यांचेकडे शिक्षणासाठी येऊन राहू लागले. त्या सर्वांवर कडक नजर ठेवून, त्यांचेकडून उत्तम अभ्यास व नीतिनियमांचे परिपालन कटाक्षाने करविले. अखेरपर्यंत त्यांनी उत्तम शिक्षक असे नाव मिळविले. संसार व परमार्थ या दोन्ही बाबतीत त्यांनी अनेकांना अनेक बाबतीत साहय्य दिले. इतके असून कधीही ते द्रव्यास शिवले नाहीत. पगार हाती येताच ते आपल्या बंधूपैकी जो व्यवस्थापक असेल त्याचे हवाली करणे, हा त्यांचा प्रघात असे. शाळेतून येताच ते आपल्या कोचावर बसून, वेदांचे ग्रंथाचे वाचन, चर्चा व मुमुक्षूजनांचे समाधान करणे यात निमग्न असत. सकाळ संध्याकाळा नियमाने भजनपूजन व येणाऱ्या जाणाऱ्याचे अतिथ्य घडत असे.
सन १८९७ ते १९०३ पर्यंत दरसाल बेळगावात प्लेगने कहर करून सोडायचा. प्रेत टाकून लोक पळून जात होते. अशा वेळी पंतबंधूनी प्रेतवाहकाचे कामी पुढाकार घ्यावयाचा. सुट्टीत परगावी उड्डीकडे वगैरे गेल्यावेळी पाणी वाहून आणण्याचे काम अनायासे होईल म्हणून लग्नकार्य करण्याच्या लोकांनी यांच्या येण्याची वाट पाहत बसण्याचे कारण यांचेबरोबर भक्तमेळा असावयाचा व तो केव्हाही परोपकारी असणारच, असा अनुभव असे पंतांचे बंधू, कोणी वकील, कोणी मन्सफ, कोणी चिटणीस, कोणी प्रांतसाहेब वगैरे हुद्यापर्यंत चढले तरी त्यांनी आपापल्या परी सदाचार व परोपकाराचा लौकिक वाढविला.
मार्गदर्शन: - भक्तियोग, राजयोग व ज्ञानयोग हे त्यांच्या नखशिखांत भरले असून तदनुसार आचरण त्यांनी आपल्या भक्तांकडून घडविण्याचा सतत प्रयत्न केला. योगसाधना व मुद्रा लावणे हे ज्यांना करावेसे वाटे त्यांचेकडून करवीत असत. वेदांतचर्चा व इतरांचे शंकासमाधान ते निरलसपणे करीत. तथापि त्यांचा कटाक्ष भक्तियुक्त कर्ममार्गावरच असे. वर्षातून त्यांच्या दड्डीतेक तीन खेपा व्हावयाच्या. त्या त्या वेळी दड्डीच्या जंगलात नदीकाठी व गावातील दत्तमंदिरात त्यांचे भजन टिपऱ्या खेळणे वगैरे पारमार्थिक खेळ अव्याहत चालत. तयांतही मंडळी धन्य होतच पण प्रेक्षकजनही देहभान विसरून भक्तिप्रेमाने अत्यंत सुखवत. सन १८८३ पासून वृत्ती योग्याभ्यासावरून भक्तिकडे वळली. मन भजनात रंगू लागले. सहज काव्य-स्फुर्ति होऊ लागली. त्यांचे काव्य नानाविध रसांनी व भावनानी ओथंबलेले आणि त्याबरोबर तत्त्वज्ञानाने रसरसलेले असे आहे. सन १८८३ पासून १८८५ चा काल संचार, प्रबोधन वसंप्रदाय प्रचार यात महाराजांनी घालविला व शिष्यशाखा जोडली. भजन-पुजन, अध्यात्म चर्चा व हसत-खेळत उपदेश हा त्यांचा नेहमीचा कार्यक्रम यात बालमुकुंदाचे स्मरण व पुनर्भेटीची तळमळ ही सतत अनुस्यूत होती.
सन १८८५ अखेर अंतर्मुख अवस्थेत त्यांना बाळप्पांचे निर्माण झाल्याचे कळून आले व जबाबदारीची जाणीव तीव्र झाली. त्यांनी बालमुकुंदांच्या पादुका स्थापन केल्या. गुरुद्वादशी, दत्तजयंती, गुरुप्रतिपदा यांसारखे उत्सव चालू केले. सन १८८९ पर्यंतच्या काळात अशा रीतीने पंथ-प्रचारकार्याला चालना दिली. त्या वर्षाअखेर एक दत्तमंदिर बांधण्याचे कार्य त्यांनी पुर्ण केले.
पुष्कळ वेळा तिसऱ्या घातीत भजन करीत असताना त्यांचे देहभान नष्ट होऊन
त्यांच्या सवंगड्याची पंचाईत होई. ज्यांनी त्यात भाग घेऊन नाचत असत व तीच
अवस्था त्यांच्या सवंगडयंची होई. ज्यांनी त्यात भाग घेतला असेल अगर नुसते पाहिले असेल, ते धन्य होत.
सन १९०६ पासून श्रीक्षेत्र बाळेगुंद्री येथे दरसाल जे पूर्णपणे वाणलेली असत. अहंकारावर त्यांचा प्रहार झाला नाही असे एकही पद आढळावयाचे नाही व तो शिष्यांचे ठायी निर्मूलन करणारा पंतांसारखाच समर्थ सद्गुरु प्राप्त होणे कठीण आहे. हे स्वानुभवाने व कृतकृत्येने मला म्हणावेसे वाटते. सद्गुरु कसा असावा.
सद्गुरु तोचि करावा । वेदोदित अनुभवी असावा ।। धृ ॥
शिष्याची जो न घे सेवा । उपदेशिता मानी देवा ।। १ ।।
गुरुत्वाचा अभिमान नाही । बोधी धरी नम्रभावा ।। २ ।।
साधन शीण न लावी दासा । अभयवचने पंतबंधु कै. गोपाळरावजी हे हुक्केरीस मामलेदार असताना फिरतीवर एका तल्लख घोड्यावर बसून गेले असता, घोड्यावरून खाली पडता पडता साहजिकपणे “दत्ता, दत्ता” असे त्यांचे तोंडून शब्द बाहेर पडले. तोच इकडे पंतांना ती तार पोचली व त्यांचे दर्शन गोपाळरावांस होऊन आलेले संकट निभावले. विद्यार्थी दशेत अनेक चमत्कार घडलेले पाहिले आहेत. पण आपण कोणी अलौकिक पुरुष आहोत अशी भावना शिष्यांच्या ठिकाणी ते वसू देत नसत. आम्हा सुशिक्षित म्हणविणाऱ्या मंडळींना ते सांगत की, निसर्गात अनैसर्गिक काही असणेच शक्य नाही. त्याचे समोर कोणीही आला तरी त्याचे विचार त्यांना अवगत होऊन भाषणाचे ओघात, त्याच्या शंकांचे निरसन होऊन जाई हा तर रोजचाच अनुभव असे.
त्यांचे खेळ मुख्यत्वे शिष्यांच्या अंतःकरणातील द्वैतबुध्दी व तज्जनित भीती घालविण्याकरता व त्यांना यथेच्छ प्रेमसुख मिळावे म्हणून खेळले जात शिष्य होणारा इसम कोणत्याही जातीचा, धर्माचा पावून धन्य झलेले आहेत. शिष्यांकडून त्यांनी प्रेमाशिवाय अन्य कशचीही इच्छा केली नाही. त्यांना त्यांची आज्ञा फक्त “सद्गुरुभक्ती, बंधूप्रीती व अखंड शांती” ही ठेवण्याबद्दल असे. कुळधर्म, कुलाचार व सद्वर्तन न पाळणाऱ्यांची त्यांनी कधीही गय केली नाही.
श्रीपंतांच्या सद्गुरुभक्तीचे पूर्ण वर्णन करणे अशक्य आहे. असा प्रेमळ गुरुभक्त सहसा पाहावयास मिळत नाही. श्रीदत्त प्रेमलहरी कोणतेही पद उघडावे, त्यांत गुरुभक्तीचा गौरव झाला नाही असे व्हावयाचे नाही.
हृत्कमलकर्णिकेमाजर | सद्गुरु बैसविला || पेमानंदे तो पुजिला || धृ ।।
अहपणचे अर्घ्य देतां । अधिष्ठानी शोभला । भावातीत गुरु लाभला ।। १ ।।
प्रेमामृतस्नान घालिता। आंत बाहेर भिजला ।।भक्तभजनी पेमे सजाला ।। २ ।।
आत्मार्पण नैवेद्याने। दत्त तृप्त जाहला । नित्य भजनी डुलू लागला ।। ३ ।।
श्रीपंत अत्यंत प्रेमळ म्हणून काही त्यांनी गुरुआज्ञा भंग करणाऱ्यांची किंवा नीतिबाह्य वर्तन करणाऱ्यांची कधीही गय केली नाही. स्वकर्तव्यात कोणी चुकले असे पाहताच ते लगेच “हुशार!” म्हणून गंभीर सावधगिरी देत. गुरुआज्ञेविरुध्द वागणाऱ्यास ते सहसा क्षमा करीत नसत. ते देवासमोर आसनावर बसत तेव्हा किंवा उत्सवासाठी खोलीतून बाहेर पडत तेव्हा ते माझे आप्त किंवा स्वकीय नव्हेत तर साक्षात श्रीदत्तमूर्ती आहेत असा सर्वांना बरेच वेळा भास होई नामांकित शास्त्री किंवा पंडित त्यांच्याशी वेदान्त चर्चा करण्याकरिता, केव्हा केव्हा येत असत. त्यांच्या शंका किंवा भिन्न मते, पंत आसनस्थ असताना त्यांना पाहताक्षणीच नाहीशा होत ते पंतांची क्षमा मागत. याप्रमाणे ते “मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास! कठीण वज्रास भेदु ऐसे।" या तुकारामांच्या उक्तीप्रमाणे अक्षरशः होते.
पंतांचे सांसारिक जीवन म्हणजे प्रवृत्ती व निवृत्तींचा संगम होता. घर सदैव अतिथी व शिष्यांनी भरलेले असे. जवळ जवळ बावीस वर्षे त्यांनी बेळगाव येथील मिशन हायस्कूलात शिक्षकाचे काम केले. व त्याहून अधिकच आध्यात्म - विद्यादानाचे कार्य केले. त्यांचे बंधू पाच. त्यांना पंतांनी शिक्षण देऊन पुढे आणले. व त्यांच्या भरभराटीसच स्वतःचे समाधान मानले. त्यांना एक मुलगा व गुलगी अशी दोन अपत्ये झाली. पण ती फार काळ लाभली नाहीत.
इ. स. १९०३ पासून पंतांची प्रकृती ठीक राहिनाशी झाली. त्यांनी शिक्षकीपेशाचा राजीनामा देऊन, अखंड अवधूत चरण सेवेला भरपूर सवड काढली व ते भजन प्रवचनात रंगून राहू लागले. गुरुबद्दल नितांत प्रेम हे त्यांचे एकमेव सुत्र. गुरु भक्तीने ते बेभान होत असत. पंतांची भक्ती प्रमस्वरूप व स्वरूपानुसंधान करणारी होती. त्यांनी ज्ञानभक्तीचे महत्त्व गायिले आहे.
ती. सौ. यमनाक्का दि. ८ मार्च १९०४ रोजी निवर्तली! त्यानंतर दीड वर्षानी श्रीपंतांनी इहलोकीची आपलीही यात्रा संपविली. आपले अवतारकार्य संपले, आता आपण लवकरच जाणार असे ते आप्त स्वकियांजवळ, यमनाक्काचे निधनानंतर १-२ वेळा म्हणाले होते. मुलगी अंबी, फार लहान होती म्हणून तिचेकरिता वर्ष दीड वर्ष राहिले असावेत. आपल्या प्रिय पत्नीस त्यांनी जो बालमुकुंदाचा सुंदर थाटविला होता त्याची निरवानिरव जणूचालली होती. अनेक ठिकाणचे अनेक भक्त येऊन गेले. आता वेदांतचर्चा ओसरून तिची जागा मधून मधून होणाऱ्या “शिवाय नम ॐ शिवाय नम:” या घोषाने घेतली जात होती. नित्याप्रमाणे घरी सर्व व्यवहार व नियमित भजनपूजन ही सर्व चालत पण पंतांची एकांतप्रियता वाढत जाऊन त्यांनी आतील आपली खोलीच धरली. रोज भजनाचे वेळी आपल्या बाहेरील कोचावर येऊन बसत.
बाळाप्पांना पंतांच्या रुपाने आपला अवधूत संप्रदाय चालविणारा अधिकारी मिळाला. त्यांनी पंतांच्याकडून योगाभ्यास योगाभ्यास करवून योजनेप्रमाणे ज्ञानदान केले. पंतांचा संपूर्ण निवृत्तीकडे कल दिसून येताच बाबहप्पांनी त्यांना परोपरीने उपदेश करून प्रवृत्तीचा व निवृत्तीचा समन्वय पटवून देऊन, त्या सांप्रदायिक भूमिकेवर पंतांना स्थिर केले. बाळप्पांना, पंत "बालमुकुंद” किंवा “बालावधूत" असे आपल्या साहित्यात संबोधितात.
पंतांचे निर्याण: - अश्विन वद्य ३ शके १८२७ हा पंतांच्या ऐहिक जीवनातील शेवटचा दिवस. त्या दिवशी आप्त-स्वकीयांच्या सान्निध्यांत ॐ नमः शिवाय चा गजर करीत त्यांनी आपला देह ठेवला. पंतांची समाधी “बाळेकुंद्री” येथे आहे. या स्थानाला आता क्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तो गाव आता पत-बाळेकुंद्री म्हणून ओळखला जातो. पंतांच्या पुण्यातिथीनिमित्त दरसाल तीन दिवस उत्सव होतो व मोठी यात्रा जमते. हे स्थान आम्रवृक्षांच्या गर्दछायेत अत्यंत रम्य असे आहे. पंतांचे तत्त्वज्ञान संपूर्ण अद्वैतवादी, प्रवृत्ती - निवृत्तीचा समन्वय घालणारे असे आहे. त्यांनी प्रथम योगाभ्यास पुष्कळच केला पण भक्तीची ओढ अनावर ठरून, अवधूतमार्गातील साधनेत पराभक्तीची भर घातली.
पंतांचे वाडमय बरेच आहे. ते पद्यमय व गद्यमयही असून “श्रीदत्तपेमलहरी" या पुष्प- मालेतून प्रसिध्द झाले आहे. त्यात मानवी जवीनाचे ध्येय, तत्प्रीत्यर्थ साधना, भोगावा व त्यागाचा समनवय, अशा बोधप्रद विषयांचे सुगम विवरण वाचावयास मिळते. त्यांचे पद्य-वाडमय म्हणजे भक्तिरसाची प्रेमगंगा! त्यातील नादमाधुर्य अवर्णनीय आहे, अशा रीतीने का फेडित पापताप ! पोसवीत तीरींचे पादप । समुद्रा जाय आप ।। पंतांनी आपली जीवनगंगा सद्गुरूंच्या विशाल प्रेमोदधीत विलीन केली. पंत महाराज म्हणत, "भक्तांचे दुःखच माझे दुःख ः भक्तांचे सुखच माझे सुख. पाहिले ते कर, पण मला विसरू नको. तुझ्या योगक्षेमचा भार मजवर घालून निश्चित राहा. तुझे सर्वस्वाची काळजी मला ओह. परमर्थसिध्दर्थ विनाकारण कष्ट नको. निष्काम भजनी रम. ज्यास त्याचेप्रमाणे वागत जा. मोक्ष - पंथ ध्वज उभारू नको. बसल्या ठिकाणी सर्वकाही प्रवृत्ती निवृत्ती वैभव पुरवून देतो."
श्रीपंत महाराजांनी भक्तांसाठी घालून दिलेले दहा नियम: -
१) सामाजिक नीतिविरुध्द आचार कदापि करू नये.
२) देशाचार, कुळाचार, वर्णाश्रमधर्म बिनचूक चालवीत जावे.
३) कोणत्याही प्रकारचे व्यसन करु नये.
४) भक्तीची कास सोडू नये.
५) सच्छास्त्रश्रवण सत्संग ही अवश्य साधावी.
६) मनाविकार प्रबळ करण्याची सर्व साधने टाकावी.
७) केव्हाहि स्वानुभवसिध्द गोष्टींवर विशेष लक्ष असावे.
८) कोणाचीही भक्ती खंडू नये.
९) निर्गुण-सगुण-ऐक्य-भावाने भजनक्रम चालवावा.
१०) सावधगिरीने समर्थ-वाचनांचा अनुभव घडी घडी पदरी घेत, शांत चित्ताने समर्थचरणी लक्ष ठेवून सहजानंदात रमत असावे.
-– श्री संतोष शामराव जोशी
साभार – गुरुतत्व मासिक, वर्ष ३ रे, अंक ६ वा, (अंक ३०)
दक्षिण भारताच्या नकाशावर नजर फिरवलीत की मनात एकच राज्य उभं राहतं – तमिळनाडू. देवालयांचा दिमाखदार वैभव, हजारो वर्षांची संस्कृती, शिल्प-कलेतून दिसणारा इतिहास, चवीने भरलेली पारंपरिक भोजन संस्कृती आणि निसर्गाच्या कुशीत जपून ठेवलेली रम्य हिल स्टेशन्स… या सर्वांचा अद्भुत संगम म्हणजे तामिळनाडू. हे राज्य अनुभवताना जाणवतं – येथे प्रत्येक दगड, प्रत्येक नदी, प्रत्येक मंदिर आणि प्रत्येक सण यामागे एक कथा आहे, एक परंपरा आहे आणि एक अद्वितीय अध्यात्मिक ऊर्जा आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti