वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
औषध म्हणजे कडू. हे लहान मुलांनापण माहिती आहे. औषध लागू पडते, ते त्याच्या अंगभूत गुणांमुळे.
त्याची चव, त्याचे गुण, त्याची मात्रा, त्याची कार्यकारी शक्ती, त्याचा पोटात गेल्यावर होणारा परिणाम, त्याचे विभिन्न अवयवांवर होणारे वैयक्तिक किंवा एकत्रित परिणाम, त्याचा प्रभाव, त्यामुळे आतमधे होणारे भौतिक अथवा रासायनिक किंवा भावनिक बदल या सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो. शिवाय औषध देत असताना वैद्याने रूग्णांशी काही वेळा गोड आंबट कडू बोलत, आपली शक्ती औषधांमधे मिसळायची असते. औषधाबद्दल विश्वास वाढवायचा असतो. तरच ते औषध विशिष्ट ठिकाणी जाऊन विशिष्ट काम करते. असे आयुर्वेद मानतो. त्यामुळे एखादे औषध प्रत्येकावर तोच, तसाच परिणाम दाखवेल असे नाही.
जसे पॅरासिटामोल हे औषध समजा आयुर्वेदीय मानले तर त्याची गोळी कडू चवीची असते. आणि सिरप गोड चवीचे असते. आयुर्वेदानुसार गोड चव कफ वाढवते. त्यात लहान मुलांचे वय हे कफाला वाढवणारे असते. म्हणजे लहान मुलांना हे औषध वापरायचे झाले तर सिरपपेक्षा गोळी वापरावी, जी चवीला कडू आहे. कडू चव वात पित्ताला वाढवते. पण लहान मुलांचे कफाचे वय हे पित्ताला विरोध करणारे असल्यामुळे त्यांना फायदाच होईल. असे मत माझे मित्र संगमेश्वर स्थित वैद्य अजित जोग म्हणायचे.
आयुर्वेदाचे हेच वैशिष्ट्य आहे फक्त जीभेला गोड लागावे एवढाच त्या गोड किंवा कडू चवीचा उद्देश नसून वय आणि प्रकृतीचाही संबंध चवीशी येतो. फार खोलात जाऊन विचार करू नका. सहज आठवलं ते लिहिलं.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
25.11.2016
भारताचा जगविख्यात फलंदाज (सलामीवीर) सुनील मनोहर गावस्कर यांनी तीस वर्षांपूर्वी पाकिस्तान विरुद्ध खेळतांना आजच्या दिवशी म्हणजेच "०७ मार्च १९८७"रोजी अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर आपल्या कसोटी क्रिकेट करकिर्दीतील १०००० (दहा हजार) धावा पूर्ण केल्या.
अशी अजोड कामगिरी करणारा सुनील गावस्कर हा क्रिकेट विश्वातील पहिला महान फलंदाज ठरला.
पाकिस्तान विरुद्धच्या या सामन्यात सुनील छप्पन धावांवर खेळत असतांना 'एजाज फकी' च्या गोलंदाजीवर स्लीप मधे बॉल ढकलुन एक धाव काढली आणि समोर(नॉनस्ट्राइकरएंड वर) उभ्या असलेल्या किरण मोरेनी धावत जाउन सुनीलचं अभिनंदन केलं. एक क्षण सुनीलला समजलच नाही की आपलं शतक झालं नाही तरी हा इतका खुश का झाला आहे. पण किरणनी जेव्हा सांगितलं की तुम्ही दहा हजार धावा पूर्ण केल्या आहेत तेव्हा मात्र सुनील आपला आनंद लपवु शकला नाही. संपूर्ण भारतात आनंदाचं उधाण आलं. कारण साऱ्या भारतीयांचं स्वप्न सुनीलनी प्रत्यक्षात उतरवलं होतं. अनेक ठिकाणी पेढे/मिठाई वाटुन लोकांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करुन दिली, जणु काही स्वत:च्याच घरात काही खास घडलं होतं. याला कारण सुनील गावस्कर - तो होताच मुळी सर्वांचा लाडका.
सुनीलच्या या दैदीप्यमान कामगिरीमुळे भारताचा क्रिकेट जगतात दबदबा निर्माण झाला. भारतीय क्रिकेट आणि खेळाडु याबद्दल क्रिकेट खेळणाऱ्या देशातील रसिक आदराने पाहु लागले कारण सुनीलनी आपल्या थक्क करणाऱ्या कामगिरीमुळे भारतीय क्रिकेट एका वेगळ्याच उंचीवर नेउन ठेवलं होतं.
अशा या महान फलंदाजाचं आपण सारे मिळून कौतुक करुया!!!

जीवनात येणार्र्या घटनांना समस्या न समजता संधी म्हणून सामोरे जा, आत्महत्या हा समस्यांवर उपाय नाही असे कळकळीचे आवाहन वैभवीश्रीजी यांनी शेतकरी बंधूंना केले.
अकोलखेड येथे संत गाडगे बाबा पुण्यतिथी निमित्त आयोजित श्रीमद् भागवत कथेमध्ये वैभवीश्रीजी बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, तणाव हा मनाच्या स्तरावर आहे आणि आपण मात्र शरीराला शिक्षा देतोय. देह संपतो पण मन आणि चेतना मात्र मुक्ती साठी तडफडत राहते. मरण्यासारख्या इतक्या मोठ्या गोष्टीला सामोरे जाऊ शकतो तर बाकीच्या घटना किती छोट्याशा आहेत. प्रत्येकाच्या जीवनात समस्या तर आहेतच आणि प्रत्येक समस्या वेळेनुसार निघूनही जातात. त्यावर आत्महत्या हा उपाय नाही. सोबत एक चिट्ठी ठेवा, “आजपर्यंत अनेक समस्या आल्या आणि गेल्या, हीपण निघून जाईल. मी एकटा नाही, माझ्यासोबत भगवान श्रीकृष्ण आहेत.” भगवान श्रीकृष्णाचे जीवन ही पूर्ण संघर्षामध्येच गेले, पण त्यांनी सुद्धा प्रत्येक समस्येचे रुपांतर संधी आणि शेवटी उत्सवामध्ये केले. कदाचित संघर्षामध्येच ते अधिक शांत, प्रसन्न आणि दूरदृष्टीने जगले. म्हणूनच त्यांना पूर्णपुरूष म्हटले जाते. ज्या लोकांनी यशाचे शिखर गाठले त्यांनी सुद्धा प्रत्येक समस्येमध्ये संधीच पाहिली. एक वडील आपल्या मुलाला लहानपणापासून सांभाळतात आणि त्या मुलाने अचानक जर त्याच्या जीवनाचा शेवट अश्या पद्धतीने केला तर त्या वडिलांना कसे वाटेल ? त्यांना आवडेल का? मग त्या परमेश्वराला पण कसे आवडेल कि त्याची ही मुल आपले जीवन आत्महत्या करून संपवतात…!
सर्वांनी एकत्र येऊन समस्यांवर उपाय ही शोधता येतील, असे आवाहन वैभवीश्रीजी यांनी केले.
Read Online on Deshonnati: http://deshonnati.digitaledition.in/c/4074440
निरोगी आरोग्यासाठी शरीराच्या स्वच्छतेसोबत हातांची आणि हातासोबत नखांची विशेष स्वच्छता करणे गरजेचे आहे. नखांमध्ये साचणार्या घाणीमुळे अनेक आजार होऊ शकतात. नखातील मळ अन्नपदार्थाच्याद्वारे आपल्या शरीरात जाऊन त्याचे आपल्याला अपाय होतात. यासाठी नखे नियमित स्वच्छ करावीत. नखांची अवाजवी वाढ ही आज-काल फॅशन मानली जात असली तरी ती आरोग्यासाठी धोकादायक आहे. यासाठी वाढलेली नखे लगेचच काढावीत. हात धुताना नखांची चांगली स्वच्छता करावी. जेवण्यापूर्वी किंवा कोणताही खाद्यपदार्थ हातात घेण्यापूर्वी हात नखांपासून स्वच्छ धुवावेत. नखंवर कोणतेही पॉलिशिंग रंग, चकमक आदी आर्टिफिशल्स शक्यतो वापरू नयेत. पोटाचे व आतड्याचे आजार इन्फेक्शन आदींपासून बचाव होतो.
हसरा चेहरा सगळ्यांनाच प्रसन्न करतो, पण त्याबरोबर हसणाऱ्या व्यक्तीच्या दंतपंक्तीचे दर्शनही घडवत असतो. दातांवर जर डाग असतील तर एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. बोलताना, हसताना दात दिसतील हा विचार सतत अशा व्यक्तींना त्रास देत असतो आणि मग दात शुभ्र करण्यासाठी प्रयत्न सुरू होतात.
खरंतर दातांचा रंग नैसर्गिकरीत्या पांढरा शुभ्र नसतो, तो हलका पिवळसर किंवा राखाडी असतो. दंतवल्क (एनॅमल) पारदर्शक असते, दंतवल्काच्या आत दंतिन असते, या दंतिनचा रेंग आपल्याला दिसत असतो. हा रंग बदलण्यास शरीरातील अंतर्गत तसेच बाह्य गोष्टी कारणीभूत असतात. दंतवल्कास तडे पडले तर अन्नपदार्थातील रंग दातांमध्ये शोषले जाऊन दातांना त्यांचा रंग येतो. चहा, कॉफी, मद्य, फळांचे रस, तंबाखूचे सेवन यांमुळेसुद्धा दातांचा रंग बदलतो. वयोमानानुसार दातांच्या रंगात फरक पडतो. जसे वय वाढते तसे दंतिनचा रंग गडद पिवळा होतो. दुधाच्या दातांवरील आवरण तसेच
(दंतवल्क) पारदर्शक नसते त्यामुळे दुधाचे दात पांढरे शुभ्र दिसतात. जर दात किडले तर दातांवर काळे डाग पडतात. काही आजारांमुळे टेट्रासायक्लिनसारख्या प्रतिजैविकांच्या सेवनांमुळे दातांचा रंग बदलतो.
नैसर्गिकरीत्या दात शुभ्र नसले तरी प्रत्येकाला पांढरे शुभ्र दात हवे असतात. दात शुभ्र करणाऱ्या अनेक टूथपेस्ट उपलब्ध आहेत. या टूथपेस्टमधे दातांवरील डाग नाहीसे हायड्रोजन करण्यासाठी पेरॉक्साइडचा वापर विरंजक द्रव्य (ब्लीचिंग एजंट) म्हणून केला जातो. हायड्रोजन पेरॉक्साइड सूक्ष्मजीवविरोधकही आहे. हायड्रोजन पेरॉक्साइडबरोबर कार्बामाइड पेरॉक्साइडचा वापर काही टूथपेस्टमधे केला जातो. याशिवाय सोडिअम बायकार्बोनेट, पॉलीव्हिनाइल पायरोलीडन, सोडियम ट्रायपॉलीफॉस्फेट, पॅपिन हे नैसर्गिक एन्झाइम ही रसायने टूथपेस्टमध्ये वापरली जातात.
खरंतर सीलिका, कॅल्शियम कार्बोनेट ही अपघर्षके दंतवल्कावरील डाग दूर करतात आणि त्यानंतर दात शुभ्र करणारी रसायने आपले कार्य करतात. दातांवर डाग पडू नये म्हणून दातांची स्वच्छता नियमित ठेवणे आवश्यक आहे.
साउथ आफ्रिका हा तसा 1st दर्जाचा देश मानला जातो. त्यामुळे, इथल्या सुविधा ह्या बहुतांशी उत्तम दर्जाच्या किंवा त्याच्या आसपास असतात. आता तुलना करायची झाल्यास, कमतरता नक्कीच आहे, जसे रविवार संध्याकाळी बाहेर जेवायला जायचे म्हणजे कर्मकठीण!! त्यामानाने आपली मुंबई कशी दिवसाचे २४ तास खिलवायला तयार असते
साठोत्तरी समीक्षाप्रवाहात साहित्यप्रकारांचा, अनेकविध जाणिवांचा विकास झाल्यामुळे समीक्षाविचारांचे काही ठळक प्रवाह दिसून येतात. जीवनवादी, कलावादी, आदर्श मूल्यांवर आधारलेला, नैतिक मूल्यांचा, सत्य, शिव व सौंदर्याचा पुरस्कार करणारी समीक्षापद्धती मागे पडली आणि साम्यवादी, ऐतिहासिक, मानसशास्त्रीय, अस्तित्ववादी, ग्रामीण, दलित, प्रतीकवादी, आदिवासी, स्त्रीवादी, चरित्रात्मक व आदिबंधात्मक समीक्षाविचारांचा प्रवाह खळखळू लागला.
‘मे’ महिन्यामध्ये जन्म झालेल्या व्यक्ती ह्या महत्त्वाकांक्षी, उत्कट व उत्साही असल्याचे मानले जाते. ‘मे’ महिन्यामध्ये जन्मलेल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठसा उमटवलेल्या अश्याच काही प्रमुख जागतिक क्रिकेटवीरांवर तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव नोंदवलेल्या लक्षणीय भारतीय / मराठी क्रिकेटपटूंवर दृष्टिक्षेप टाकूया.
कुटुंबव्यवस्था हे भारताचे बलस्थान आहे. आपल्या संस्कृतीमध्ये जे जे काही चांगले, पवित्र, उदात्त आहे ते सर्व स्त्रियांच्या सहभागानेच साध्य झाले आहे. सांस्कृतिक मूल्यांची जोपासना स्त्रियांनीच जास्त प्रमाणात केली. भारतीय स्त्रीकडे पाहिले की अष्टभुजा देवीची आठवण झाल्याशिवाय रहात नाही.
दरिद्रोऽस्म्यभद्रोऽस्मि भग्नोऽस्मि दूये
विषण्णोऽस्मि सन्नोऽस्मि खिन्नोऽस्मि चाहम् |
भवान्प्राणिनामंतरात्मासि शंभो
ममाधिं न वेत्सि प्रभो रक्ष मां त्वम् ‖ १६ ‖
भगवान दयासिंधू आहेतच मात्र व्यवहारात देखील ज्याप्रमाणे एखादे बालक त्याची असहाय्यता प्रगट करत नाही जोपर्यंत त्याची आई सुद्धा त्याला उचलून घेत नाही, त्याच प्रमाणे भगवान देखील सहजासहजी दया करीत नाहीत. याच भूमिकेतून आचार्य स्वतःच्या अगतिकतेला भगवान श्री शंकरांच्या समोर सांगत आहेत. ते म्हणतात,
दरिद्रोऽस्मि- मी दरिद्री आहे. आपल्या दये शिवाय माझ्याजवळ काहीही नाही.
अभद्रोऽस्मि- मी अभद्र आहे. अनेक अमंगल विचारांनी माझे मन युक्त आहे.
भग्नोऽस्मि - मी भग्न आहे. आयुष्यातील इतका सगळा चांगला काळ सत्कर्मा मध्ये न लावल्याने, हाती फार काही उरले नाही म्हणून आतून दुभंगलो आहे.
दूये- मी दु:खी आहे. हे भगवंता तू मला दिव्य मानवी जीवन दिले. पण मी ते कृतार्थ केले नाही याचे दुःख आहे.
विषण्णोऽस्मि- मी विषण्ण आहे. ही संधी गमावल्याची विषण्णता आहे.
सन्नोऽस्मि- मी सुन्न झालो आहे. काय करावे ते मला कळत नाही आहे.
खिन्नोऽस्मि चाहम् - मी खिन्न आलो आहे.
आता माझा उद्धार कसा होईल? या विचाराने माझी बुद्धी कुंठित झाली आहे.
आपल्या सगळ्यांच्या वतीने आपली अवस्था मांडतांना आचार्यश्री ही भूमिका मांडत आहेत.
अर्थात असे असले तरी,
भवान्प्राणिनामंतरात्मासि शंभो- हे भगवान हो आपण सर्व प्राण्यांचे अंतरात्मा आहात.
ममाधिं न वेत्सि- मग माझे हे अगतिकतेचे दुःख आपल्याला कसे कळणार नाही?
प्रभो रक्ष मां त्वम् - हे प्रभो! आपण माझे रक्षण करा.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
Copyright © 2025 | Marathisrushti