(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • अमेरिकन सैन्याची अफगाणिस्तानमधून माघार आणि त्याचा भारतावर परिणाम

    अमेरिकन सैन्याची अफगाणिस्तानमधून माघार आणि त्याचा भारतावर परिणाम

    अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानात तैनात असलेल्या आपल्या फौजा मागे घेण्याची केलेली घोषणा भारताएवढीच त्या क्षेत्रातील अन्य देशांची चिंता वाढविणारी आहे. सध्या त्या क्षेत्रात अमेरिकेचे १४ हजार सैनिक आहेत आणि त्यापैकी निम्मे लोक माघारी बोलाविण्याची ट्रम्प यांची तयारी आहे.

  • ब्रॅंड-नामा

    तुम्हाला कधी एखाद्या ब्रॅंडचा उगम कसा झाला असेल असा प्रश्न पडलाय का? सगळं काही ब्रॅंडेड वापरण्याच्या या दिवसात जागतिक कंपन्यांबरोबरच भारतातल्या कंपन्याच्या ब्रॅंडसविषयी जाणून घेतानाच आपण बघणार आहोत मराठी माणसाच्या काही कंपन्यांच्या ब्रॅंडसविषयीही… फक्त “ब्रॅंड-नामा” या नव्या कोर्‍या सदरामध्ये….

  • कर्जमाफी कशाची,लुटलेले परत करा!

    मोहन धारियांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या कर्जमुत्त*ीसाठी नुकतेच आंदोलन करण्यात आले. कोरडवाहू अल्पभूधारक शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुत्त*ी मिळावी, ही या आंदोलनातील एक ठळक मागणी होती. इतरही काही मागण्या होत्या आणि त्या सगळ्या मागण्यांचा उद्देश एकच होता, तो म्हणजे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात होत असलेल्या दुर्दैवी आत्महत्या रोखणे.

  • पाकिस्तानमधला प्रवेश

    पाकिस्तानमधला प्रवेश

    अमेरिकेत पुन्हा जायला मिळेल न मिळेल, पण पाकिस्तानात पुन्हा जायला मिळालं तर मला ते आवडेल, असं मी पहिल्यांदा पाकिस्तानात जाऊन आलो तेव्हा म्हणालो होतो. त्यानंतर मी दोनदा पाकिस्तानात गेलो. गेलो हेही स्वप्न आणि परत आलो तेही स्वप्नच कारण एकाहून एक प्रसंगच जिवावर बेतणारे होते. पाकिस्तानातून परतलो हे सत्य, अगदी निखळ सत्य. अन्यथा पाकिस्ताननामा लिहायला माझी लेखणी शाबूत राहिली नसती.

  • डभईची लढाई (भाग एक)

    बडोद्याच्या इतिहासात डभोईच्या युद्धाला एक खास महत्व आहे. हें युद्ध इ.स. १ एप्रिल १७३१ ला, म्हणजे २८० वर्षांपूर्वी लढलें गेलें. बडोद्याच्या ५०० वर्षांच्या कालखंडाच्या साधारण मध्यावरील हें युद्ध आहे.

  • वनशंकरी प्रातःस्मरण स्तोत्रम् – मराठी अर्थासह  

    वनशंकरी (बनशंकरी) किंवा शाकंभरी (शाकंबरी) ही देवी महाराष्ट्रात व कर्नाटकात अनेकांची कुलस्वामिनी म्हणून प्रसिद्ध आहे. बनशंकरी हे  दुर्गेचेच एक नाव असून ती वनवासिनी आहे. देवी भागवतातील कथेनुसार दुष्काळातही जनांना अन्न व भाजीपाला पुरवून पोषण केल्याने तिला शाकंबरी असे नाव पडले. दुर्गम नामक दैत्याचा तिने नाश केल्याने तिला दुर्गा असेही म्हटले जाते.  

  • गोमुत्र 

    सहज आणि मोफत उपलब्ध असणारे गोमुत्र. आपण फक्त त्याचा वापर धार्मिक विधी करिता वापरतो. आज औषध म्हणून गोमुत्राचा कसा उपयोग होतो ते अभ्यासू या.

    गोमूत्राने जखमा फार लवकर धनुर्वात न होता बऱ्यां होतात.
    चमच्याभर गोमूत्रामधे 2 थेंब मोहरी तेल मिसळून नाकात टाकल्याने बंद नाक त्वरित मोकळे होते. श्वास घेणं सहज होते.

    गोमूत्रात थोड़े गाईचे तूप व् कापुर मिसळून, कपड़ा ओला करून छातीवर ठेवल्याने कफ वितळून मोकळा होतो.
    सायटिका, गुढ़गे, कोपर, पोटर्या, मांसपेशींमधे दुखणे, सूज आल्यावर गोमूत्रापेक्षा मोठे दूसरे औषध नाही.

    संधिवात, हाडं ठिसुळ होणं, रुमेटिका फिव्हर आणि अर्थरायटिसमधे सर्व औषधे निष्फळ होतात.

    80 प्रकारच्या वातरोगांमधे गोमूत्र एकमात्र औषध आहे. यासाठी आर्धाकप गोमूत्रात 2 ग्रॅम शुद्ध शिलाजीत, 1 चमचा सुंठचूर्ण, शुद्ध गुग्गुल अथवा महायोगराज गुग्गुलच्या 2 गोळ्या मिसळून पाजावे.

    शौचाला साफ़ न होणे हे सर्व रोगांना निमन्त्रण देते. गोमूत्र लघवी व् शौच, मलावरोध दोघांना मोकळे करते. अशा वेळेला गोमूत्र दोन्ही वेळा 50-50 मिली घ्यावे.

    गोमूत्रात एरंडतेल 1 चमचा मिसळून दिल्याने जुलाब साफ़ होतात.

    लहान मुलांना शौचचा त्रास असल्यास २ चमचे गोमूत्रात १ चमचे मध मिसळून पाजावे.

    गाइच्या दुधात 2 चमचे तूप मिसळून पाजल्याने गर्भावती महिलांना मलारोध होत नाही.

    डायबिटिसमधे गोमूत्र फार उपयुक्त आहे. गोमूत्र डायबिटीस कंट्रोलमधे ठेवते.

    यकृतरोग, काविळ, जॉण्डिस या रोगांमधे गोमूत्र व् पुनर्नवा मंडूर घ्यावे.

    एलोव्हेराच्या 30 मिली रसात 50 मिली गोमूत्र मिसळून पिल्याने पचनसंस्थेचे सर्व अवयव रोग मुक्त होतात.

    2 ग्रॅम ओवाचूर्ण अथवा जायफळ वाटून गोमूत्रात मिसळून पाजल्याने पोटाचे दुखणे, मुरडा, आव, भूक न लागणे ठीक होते.

    मुळव्याधींच्या कोणत्याही तक्रारीमधे 50 ते 100 मिली गोमूत्र पिल्याने फायदाच् होतो.
    खरुज, एक्झिमा, पांढरेडाग, कुष्ठरोग यामधे गोमूत्रात 2 वेळा गुळवेलीचा रस मिसळून पिल्याने त्वरित फायदा होतो.

    त्वचेवर बटमोगर्याच्या तेलात गोमूत्र मिसळून मालीश करावे.

    हार्टविकारामधे गोमूत्र पिल्याने रक्तातील गुठळया होत नाहीत. हायब्लड प्रेशर व् लोब्लड प्रेशरमधे गोमूत्रातील लैक्टोज जबरदस्त परिणाम करतं. हृदयरोगात गोमूत्र उत्तम टॉनिक आहे.

    गोमूत्र शिरा व् धमन्यामधे कोलेस्टेरोल साठू देत नाही.

    किडनी काम करत नसेल तर गोमूत्र घ्या.

    प्रोस्टेट ग्रन्थी वाढलेली असेल तर गोमूत्र घ्या. किडनी व् प्रोस्टेट ग्रन्थिंचे कार्य गोमूत्र सुधारते.

    गोमूत्रासारखे दूसरे कुठलीही औषध नाही, लहान मुलांपासून वृद्धांपर्यन्त कोणत्याही रोगां शिवाय नियमित घेऊ शकता.
    गोमूत्र नेहमी 8 पदरी कॉटनच्या कापडाने गाळून घ्यावे. गोमूत्रात मध घालून ठेवल्याने टिकून रहते. 1 ते 2 महीन्याने व्यायला येणाऱ्या अथवा विल्या नंतर 1 महीने घेऊ नका. आजारी गाईचे गोमूत्र घेऊ नका. गोमुत्र हे फक्त देशी गाईचेच वापरा.

    सगळे उपाय एकत्र करू नयेत.

    -- डॉ. गौरी पाटील
    निसर्गोपचार तज्ञ
    9820584716

  • अंतराळातून… संपूर्ण सूर्यदर्शन

    सूर्यावर घडणार्‍या लहान-मोठ्या घटना पृथ्वीवर चुंबकीय वादळांसारखे परिणाम घडून आणतात. या घडामोडींचं स्वरूप विध्वंसात्मकही असू शकतं. या घडामोडींचं विश्लेषण अधिक तपशीलवार करता येण्यासाठी आपल्याकडे सूर्याचं त्रिमितीय चित्र असण्याची आवश्यकता आहे. एखादी सौरज्वाला उफाळली तर त्या सौरज्वालेचा विस्तार केवढा आहे, तिचा उफाळ किती व कोणत्या दिशेने आहे, सौरज्वालेतून किती प्रमाणात, कोणत्या दिशेने पदार्थ बाहेर उत्सर्जित केले गेले आहेत, ही सर्व माहिती अधिक वस्तुनिष्ठ स्वरूपात आपल्याला अशा त्रिमितीय चित्रावरून मिळू शकते. पृथ्वीवरील दुर्बिणींतून, तसंच अंतराळातील सोहोसारख्या यानांकडून सूर्याच्या पृष्ठभागाची छायाचित्रं सतत टिपली जात असतात.

  • ताण – तणावांचे विषाणू

    ताण -तणाव हे आपले पूर्वापार साथीदार आहेत. पिढ्यानपिढ्या ही भावना आपली सांगाती आहे. त्यांच्याशी जसे जमेल तसे जुळवून घेणे हळूहळू अंगवळणी पडते आहे. मात्र ताण -तणाव आता अधिक गंभीर, रौद्ररूप धारण करीत आहेत. आता ते वयोगटांवर अवलंबून नाही की आर्थिक परिस्थितीशी ताण -तणावांना काही देणे -घेणे नाही. ही समस्या आता विश्वव्यापी बनली आहे त्यामुळे त्यावर आता सर्वंकष लसीची गरज कधी नव्हे ते निर्माण झाली आहे.

  • जबाबदारीच्या हजार वाटा..

    समाजात वावरत असताना नेहमी म्हटल जात की, जसा पैशाकडे पैसा जातो आणि वाढतो, तशी जबाबदारी घेणाऱ्याकडे जबाबदारी जाते आणि वाढते. अशा वेळी तिचं ‘ओझं’ वाटतं. वेळप्रसंगी ‘एखादी जबाबदारी घेणं’ ही ‘क्रेडिटेबल गोष्ट’ वाटायला लागते, तर कधी ‘जबाबदारी घेण्याचं कौतुक होतं’ म्हणून जबाबदारी घ्यायला आवडते.