वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाइल मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले एपीजे अब्दुल कलाम यांचा २०१० मध्ये संयुक्त राष्ट्राने त्यांचा सन्मान करत त्यांचा ७९ वा वाढदिवस हा जागतिक विद्यार्थी दिन म्हणून जाहीर केला होता.
नित्यः शुद्धो निष्कल एको जगदीशः
साक्षी यस्याः सर्गविधौ संहरणे च ।
विश्वत्राणक्रीडनलोलां शिवपत्नीं
गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे ॥ ६॥
निर्गुण निराकार परब्रह्माची मूलशक्ती आदिमाया जगदंबा हीच सर्व कार्यामागे असलेले मूळचैतन्य आहे. हे स्पष्ट करताना आचार्य श्री प्रथम चरणात परब्रह्माचे वर्णन करीत आहेत. त्या परमात्म्या बद्दल ते म्हणतात,
नित्यः - परमात्मा नित्य आहे. अर्थात भूत, वर्तमान व भविष्य काळात तो आहेच आहे. शास्त्रात अशा तत्वालाच नित्य असे म्हणतात. जे काळानुसार निर्माण होते आणि नष्ट होते त्याला अनित्य म्हणतात. याच दृष्टीने सर्व जग अनित्य आहे. एकटा परमात्मा नित्य आहे.
शुद्धो- त्यात कोणत्याही पद्धतीने मायेचा लवलेश नाही. मायेच्या गुणांनी अशुद्धता येते. मायापती त्या गुणांच्या अतीत असतो. त्यामुळे त्याला शुद्ध म्हणतात.
निष्कल - त्यामध्ये कोणत्याही कला अर्थात बदल होत नाही. कमी किंवा अधिक होणे याला कला असे म्हणतात. परमात्मा परिपूर्ण आहे तो कमी किंवा अधिक होत नाही.
एको- एकमेवाद्वितीय. त्याचा सन्मान दुसरा कोणीच नसतो.
जगदीशः - या संपूर्ण विश्वाचा संचालक.
असा जो परमात्मा, तो
साक्षी यस्याः सर्गविधौ संहरणे च - जिच्या निर्मिती, विलयाचा साक्षी असतो अशी.
परमात्मा पुरुष केवळ साक्षी स्वरूपात अधिष्ठान असतो. तो स्वत: काहीच करत नाही. आदिमाया प्रकृतीच सर्व क्रीडा करते. परमात्मा तिच्या त्या क्रीडेचा साक्षी रूपात आस्वाद घेतो. त्याची योगमाया रूप ही आदिशक्ती असणाऱ्या,
विश्वत्राणक्रीडनलोलां- या सर्व विश्वाच्या पालनाची क्रीडा करीत असणाऱ्या,
शिवपत्नीं- शांत स्थाणू अशा स्वरूपातील भगवान शंकरांची पत्नी असणाऱ्या,
गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे - कमलाप्रमाणे नेत्र असणाऱ्या आई जगदंबा गौरीचे मी स्तवन करतो.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
मणिपूरमध्ये संयुक्त नागा परिषदेकडून ५२ दिवसांपासून आर्थिक नाकेबंदी सुरू असून, २३/१२/२०१६ ला कामजोंग जिल्ह्यातील तीन सरकारी कार्यालयांना आग लावण्यात आली.मणिपूरमधील आर्थिक नाकाबंदीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा, अशी मागणी राज्यसभा सदस्य आणि पाच वेळा विश्वविजेत्या ठरलेल्या बॉक्सर मेरी कोम यांनी केली आहे. मणिपूरमध्ये सुरू असलेल्या नाकाबंदीमुळे जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे.
शिवराय आणि रामदास स्वामी यांचे प्रत्यक्ष सान्निध्यात राहिलेल्या हनुमंत स्वामी याची बखर उपलब्ध आहे. त्या बखरीत असा उल्लेख आहे कि समर्थ सज्जन गडावर (परळीचा किल्ला )वास्तव्याला असताना त्यांनी कल्याण स्वामी यांना दासबोधाची प्रत शिवरायांना भेट देण्यास सांगितले होते.सुदैवाने बखरीतील लिहिलेल्या या घटनेला शिव चरित्रकार पाठींबा देतात.छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला दक्षिण दिग्विजय आटोपताच प्रताप गडावर श्री भवानीच्या दर्शना साठी गेले होते.त्या पूर्वी त्यांनी सज्जन गडावर समर्थांची भेट घेतली होती.सज्जन गडावर या शिव -समर्थ भेटीची वेळ वैशाख शुद्ध २ शके १६०० अर्थात १३ एप्रिल १६७८ अशी आहे.समर्थ श्रावण महिन्यात शिवथर घळीतून सज्जन गडावर वास्तव्याला आले.शिवथर घळ ते सज्जन गड हा पायी मार्ग असा आहे-----शिवथर घळ --कुम्भे शिवथर --ढालकाठी--कांगोरी किल्ला--महादेवाचा मुरा--नरवीर तानाजी मालुसरे यांचे जन्म गाव उमरठ--महाबळेश्वर मठ--तापोळा --बामणोली--शेंबडी वाघाली--नवरणवारीची खिंड --जुमडी--जळकेवाडी--वाघापूर सड्याचा उत्तर भाग --मोरवाडी --मोर घळ परसावडे --पांगरी --परळी --सज्जनगड.या पैकी तापोळा ते वाघरी हा मार्ग कोयनेच्या धरणात बुडालेला आहे.त्या ठिकाणी नौकेने प्रवास करावा लागतो.
मोरघळीच्या माथ्यावरून सज्जन गडाचे विलोभनीय दृश्य दिसते त्यामुळे शिवरायांनी मुक्कामासाठी कोणता किल्ला हवा असे समर्थांना विचारताच समर्थांनी परळीचा किल्ला देणे असे सांगितले.
शिवरायांचे बंधू व्यंकोजी राजे भोसले यांनी तंजावरच्या नायक राजांचा पराभव केला आणि दक्षिणेला मराठा साम्राज्य स्थापन केले.व्यंकोजी महाराजांनी समर्थ शिष्य भीमस्वामी यांना तंजावर मध्ये समर्थांचा मठ स्थापन करण्यासाठी जागा दिली.त्या ठिकाणी समर्थांचा मठ निर्माण झाला.व्यंकोजी राजांनी तारो गोपाल या नावाच्या अत्यंत धार्मिक अशा कारकुनास अनेक धार्मिक ग्रंथांच्या नकली करण्याची आज्ञा केली त्यात दासबोधाची प्रत सरस्वती महाल या ग्रंथालयात अजूनही जशीच्या तशी जतन केली आहे.अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे भोसल्यांचे सध्याचे वंशज जे तंजावरला राहतात त्यांच्या देवघरात आज तागायत दासबोध आहे आणि तो सोनेरी अक्षरांनी लिहिलेला असून त्याची दररोज पूजा होते.
शिवरायांच्या वंशाजापैकी नागपूरकर भोसले हे देखील समर्थांना पुज्य मानत होते. त्यांच्या देवघरात समर्थांची पंच धातूची मूर्ती आहे .त्या मूर्तीची दररोज पूजा होते.सातारा गादीचे वंशज सुद्धा दरवर्षी "गुरु गादी" म्हणून न चुकता सज्जन गडावर जातात आणि समर्थांच्या समाधि समोर डोके टेकवून या महान राष्ट्र संता समोर नतमस्तक होतात.
सदर लेखातील हा भाग हा नागपूरच्या म.रा. जोशी या संत साहित्य अभ्यासक यांच्या दासबोधाच्या प्रस्थावानेतून साभार घेतला आहे.श्री जोशी यांनी दासबोधाच्या १५० हस्त लिखित प्रतींचा अभ्यास केलेला असून त्यांनी 'दत्तात्रय स्वामी ' या नावाची प्रत प्रसिद्ध केली आहे.श्री जोशी यांनी संपादित केलेल्या ज्ञानेश्वर आणि तुकारामांची गाथा सुद्धा संपादित करून प्रसिद्ध केलेली आहे. संत तुकाराम आणि समर्थ यांचा जीवन कालखंड एकच आहे.आणि ज्या ज्या ठिकाणी दासबोधाचा अभ्यास होतो त्या त्या ठिकाणी ज्ञानेश्वर आणि तुकारामंची गाथा सुद्धा अभ्यासली जाते.त्यामुळे समर्थांचे मठ हे संत साहित्याची विद्यापिठेच आहेत .
--चिंतामणी कारखानीस
आज भारतीय संघ टॉप ला आहे. हा झाला वर्तमान काळ परंतु नेहमी चर्चा होत असते ती १९८३ च्या वर्ल्ड कपची . परत आपल्या संघाकडे वर्ल्ड कप येण्याची चिन्हे दिसत आहेत . १९८३ च्या वर्ल्ड कपचा कप्तान होता कपिल देव.
बाल्ये दुःखातिरेको मललुलितवपुः स्तन्यपाने पिपासा
नो शक्तश्चेन्द्रियेभ्यो भवगुणजनिता जन्तवो मां तुदन्ति ।
नानारोगादिदुःखाद्रुदनपरवशः शड्करं ना स्मरामि
क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥२॥
पूर्वजन्मीच्या कर्मांच्या फलवशात गर्भवास प्राप्त झाला. आरंभीच्या श्लोकात त्याचे वर्णन केल्यानंतर आचार्यश्री पुढे म्हणतात की जन्म प्राप्त झाल्यानंतर देखील ही दुःख परंपरा सुटली नाही.
शैशवावस्थेतील दुःखांचा विचार मांडताना आचार्यश्री म्हणतात,
बाल्ये दुःखातिरेको - बालपणात मला अनेक दुःखदायक गोष्टींचा सामना करावा लागला. मललुलितवपुः- माझे शरीर मलाने व्याप्त होते. स्वतःचे मलमूत्र देखील स्वच्छ करता येत नव्हते. मी त्यातच लोळत होतो. आजूबाजूला इतर घाण असली तरी त्यातच लोळावे लागत होते. सरकण्याची देखील क्षमता नव्हती.
स्तन्यपाने पिपासा - सातत्याने स्तनपानाची तृष्णा जागृत होत होती. अर्थात तहान भुकेच्या वेदना त्रस्त करीत होत्या.
नो शक्तश्चेन्द्रियेभ्यो- शरीराच्या अवयवांची मध्ये कोणत्याच प्रकारची शक्ती नव्हती. सर्वच बाबतीत पराधीनतेचे दुःख होते. भवगुणजनिता
जन्तवो मां तुदन्ति -
या संसारात जन्माला येणारे विविध जीव-जंतू मला तोडत होते. डास मुंग्या चावत होत्या. त्यांना हाकलण्याचीदेखील ताकद नव्हती.
नानारोगादिदुःखाद्रुदनपरवशः - नानाविध रोगांनी आणि दुःखांनी परवश झालेला मी केवळ रडत होतो.
शड्करं ना स्मरामि- हे भगवान शंकराच्या वेळी मला आपले स्मरण देखील करता येत नव्हते.
क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो - हे भगवान महादेव शंभो शंकरा माझ्या अपराधांना क्षमा करा.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
आपण आहार का घेतो ?
…..शरीराचं नीट योग्य पोषण होण्यासाठी.
कशासाठी व्हायला हवे पुष्टीपोषण ?
…..शरीरातील धातूंची क्षमता वाढण्यासाठी.
कशाला हवी धारणक्षमता ?
……निरोगी रहाण्यासाठी
या आणि यापुढच्या श्लोकांमध्ये भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज भगवान श्रीहरीच्या भुवयांचे वर्णन करीत आहेत. त्या अत्यंत नयनमनोहर असणाऱ्या आणि हृदय आल्हादक अशा पद्धतीच्या हालचाल करणाऱ्या भुवयांचे वैभव सांगताना आचार्य श्री म्हणतात,
एकाच छताखाली राहणारी ,रक्ताचे नाते असणारी मंडळी एकमेकांना “परिचित “असतीलच असे नाही. सध्याच्या काळात तर हे ठळकपणे अधोरेखित होतंय. एक नितांतसुंदर ,कॊटुंबिक ,अभिनयसंपन्न चित्रपट म्हणजे “परिचय ” ! यात रूढार्थाने प्रेमकहाणी नाही ,खलनायक नाही , रक्त वगैरे चुकूनही नाही (नाही म्हणायला आजारी संजीवकुमार खोकतो ,तेव्हा रक्ताचे डाग दिसतात.) अढी ,गैरसमज ,अहंकार यामुळे निरगाठी पडलेली नातेवाईक मंडळी येथे अपरिहार्यपणे (आणि सुरुवातीलातरी मनाविरुद्ध ) एकत्र राहात असतात. त्यांचाही नियतीमुळे नाईलाज झालेला असतो.
नादे नारदतुम्बुराद्यविनुते नादान्तनादात्मिके
नित्ये नीललतात्मिके निरुपमे नीवारशूकोपमे ।
कान्ते कामकले कदम्बनिलये कामेश्वराङ्कस्थिते
मद्विद्ये मदभीष्टकल्पलतिके मां पाहि मीनाम्बिके ॥ ६ ॥
आई जगदंबेच्या वैभवाचे नवनवीन पैलू उलगडून दाखवताना जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
नादे- नाद अर्थात ओंकार स्वरूप असलेली. नारदतुम्बुराद्यविनुते- नारद, तुबरू इ. देवर्षी, गंधर्व इत्यादींच्याद्वारे वंदन केल्या गेलेली.
नादान्तनादात्मिके- शास्त्रांमध्ये ओंकाराला नाद असे म्हणतात. त्यामध्ये अ,ऊ आणि म अशा तीन मात्र आहेत. त्यातही शेवटी म् चा जो नाद घुमत राहतो त्या अर्ध्या मात्रेला नादान्तनाद असे म्हणतात. ती त्रिगुणातीत निर्गुण स्वरूप असणारी अर्धमात्रा हे जिचे स्वरूप आहे अशी.
नित्ये - भूत वर्तमान आणि भविष्य या तीनही काळात अविचल असणाऱ्या तत्वाला शास्त्रात नित्य असे म्हणतात. अशी नित्य स्वरूप असणारी.
नीललतात्मिके- नीलकमलाच्या लते प्रमाणे नाजुक असणारी.
निरुपमे- जिला कोणत्याच प्रकारची उपमा देता येत नाही अशी. अनुपमेय. एकमेवाद्वितीय.
नीवारशूकोपमे - निवार म्हणजे भगरीच्या दांड्या प्रमाणे असणारी.
वर आचार्य म्हणतात आई जगदंबा निरुपम आहे. तर ताबडतोब एक उपमा देतात. हे अजब नाही का ?तर नाही. त्या उपमेतून देखील आई जगदंबेचे स्वयंसिद्धत्वच मांडलेले आहे.
भगर हे कोणत्याही प्रयत्नाशिवाय येणारे धान्य. अर्थात जिला कोणी निर्माण करत नाही अशी.
साधू संत महंत अधिकाधिक काळ भगरच भक्षण करतात. अर्थात अशा सगळ्यांच्या उदरभरणाची काळजी घेणारी.
कान्ते- अतीव प्रिय.
कामकले- सर्व इच्छांचा स्वरूपाची. कदम्बनिलये- कदंब वनात निवास करणारी. कामेश्वराङ्कस्थिते- कामेश्वर भगवान शंकरांच्या मांडीवर बसलेली.
मद्विद्ये- माझ्या ज्ञानस्वरूप असणारी. मदभीष्टकल्पलतिके- माझ्या सर्व कामना पूर्ण करणाऱ्या कल्पनेप्रमाणे असणाऱ्या,
मां पाहि मीनाम्बिके - ही आई जगदंबे मीनाक्षी माझे रक्षण कर.
- प्रा. स्वानंद गजानन पुंड
Copyright © 2025 | Marathisrushti