वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
ह्या भाजीच्या बाबतीत तशा आपल्या प्रत्येकाच्याच भावना तशा मिश्र कारण हि तसेच आहे म्हणा हि भाजी आपल्या राष्ट्रात तयार होणारी भाजी नसून इंग्रजांनी आपल्या सोबत हिला येताना आणली होती.तशी हि भाजी काही वाईट नाही हं त्याच्या गो-या सायबा सारखी.हो अगदी तुम्ही हिला गच्चीत एखाद्या मोठ्या कुंडीत लावले तरी चांगली किचन गार्डनींगची हौस पुरी करता येईल तुम्हाला.
ह्या कोबीची फुले दिसतात भारी देखणी व चवीला देखील सुरेख लागतात.अगदी सुकी भाजी,भजी,कोशिंबीर,लोणचे सगळेच छान लागते ह्या भाजी पासून बनविलेले.मी तर अगदी झुणका व पराठे सुद्धा बनवून खाते ह्याचे मस्त लागतात.अगदी कांदा नसताना कांदे पोहे खाणे जरा जड जाते ना मग काय कोबी घाला कांद्याच्या बदली व पहा कसे झकास लागतात पोहे ते.
जसा ह्या भाजीचा वापर स्वयंपाकात होतो तसाच घरगुती उपचारात देखील आपण हि भाजी वापरू शकतो.पण प्रथम तिचे गुण पाहूयात.कोबी हा चोवीस गोड थंड व शरीरातील कफ व पित्त हे दोष कमी करणारा असून वात दोष वाढवितो.
आता ह्याचे औषधी उपयोग पाहूयात:
१)थकवा जाणवणे,दम लागणे,तोंडास कोरड पडणे,छातीत जळजळ ह्या ५० ग्राम कोबी पाणी न घालता कुकर मध्ये वांफवा व त्याचा रस काढा नंतर त्यात १ चमचा मध व १/२ चमचा जिरेपूड घालून सुर्योदयाच्या वेळी तो रस प्यावा व तासभर काही खाऊ नये.ह्या प्रयोगाने ह्रदयात बळ मिळते.
२)पोट बिघडणे,शौचास भसर होणे,छातीत आग होणे,तोंडास पाणी सुटणे,वजन कमी होणे ह्या तक्रारीकडे १/२ कप कोबी रस+ १ चमचा मध+ १ चमचा गाजर रस हे मिश्रण जेवणा सह थोडे थोडे प्यावे.
३)थंडीत त्वचा रूक्ष होणे,फुटणे,खाजते ह्यात कोबीचा रस व कोथिंबीर रस एकत्र करून त्वचेवर लावावा.
४)लघ्वीची आग होणे,लघ्वी थोडी थोडी होणे,कंबर दुखणे ह्यात १ ग्लास कोबीरस +धणे पूड १ चमचा + २ चमचे खडीसाखर २-३ वेळा विभागून घ्यावे.
५)हिरड्यांतून पू रक्त येत असल्यास कोबीचा रस तोंडात धरून गुळण्या कराव्या व नंतर गाल व हिरड्यांना तीळ तेल लावावे.
कोबी खायचा अतिरेक केल्यास पोटात वात धरू शकतो.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
इमारत बांधकामात हल्ली आरएमसी या संज्ञेचा वापर ऐकू येतो. आरएमसी म्हणजे रेडी मिक्स्ड कॉक्रिट. १० वर्षात या | काँक्रिटचा वापर खूप वाढला आहे. त्यापूर्वी सगळीकडे आणि अजूनही खूप ठिकाणी कॉक्रिटचे मिश्रण छोटया मिक्सरमध्ये बांधकामाचे जागीच बनवले जाते. यासाठी खडी, रेतीचे ढीग आणि सिमेंटच्या गोणींची थप्पीही मिक्सरजवळ लावावी लागते. मग खडी, रेती, सिमेंट मिक्सरच्या खालच्या डब्यात (हॉपर) भरले जाते व सगळे सुके मिश्रण फिरत्या मिक्सरमध्ये ओतले जाते.
विश्वाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लयाचे एकमेव कारण अशा स्वरूपात आपल्या उपास्य देवतेची आराधना केली जाते.
परवा भुवनेश्वरला एका कंपनीत एक चित्तवेधक बोर्ड पाहिला – नैसर्गिक संसाधनांचा वापर करा, कारण ती मुबलक आणि बव्हंशी फुकट असतात. त्या बोर्डवर चित्र होते सूर्याचे आणि दोरीवर वाळत टाकलेल्या कपड्यांचे! मोठ्ठा संदेश.
भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला महाराष्ट्रात व देशातही गणपतीची स्थापना होते. प्रत्येक घरात प्रथेप्रमाणे गणपतीची प्राणप्रतिष्ठापणा केली जाते दहा दिवसांनंतर विसर्जन होते. चतुर्थीनंतर गणेशाची माता पार्वती-म्हणजेच गौरी चे त्यापाठोपाठ आगमन होत आहे.
पश्चिम महाराष्ट्रात गौरी-गणपती, तर मराठवाड्यात महालक्ष्मी असे म्हणतात. महालक्ष्मीचा हा सण तीन दिवस असतो व तो घरोघर साजरा केला जातो. खडय़ाची, कलशाची, मुखवटय़ाची अशा विविध रुपात तिची पूजा केली जाते. श्रावण महिन्यात प्रतिष्ठापना पेलेली ज्येष्ठा व भाद्रपद महिन्यात तिच्या शेजारी बसविण्यात येणारी कनिष्ठा अशा दोघींची जोडीने पूजा होईल. पहिल्या दिवशी आगमन, दुस-या दिवशी गौरी भोजन व तिसर्याज दिवशी म्हणजेच भाद्रपद शुक्ल अष्टमीला या गौरी -महालक्ष्मीचे विसर्जन करण्यात येते. या निमित्ताने गौरी रेखाटन कलाही विकसित झाली आहे. मातीच्या सुगडावर पिवडी व चुना यांचा वापर करून गौरीचे मुख रेखाटले जाते तर त्या सभोवती शंख, चक्र, पद्म, गदा, हस्त, गाय वासरु, तुळशी वृंदावन, स्वस्तिक, गौरीची पावले अशी प्रतिक चिन्हेही रेखाटली जातात. गुरवारी गौरीचे आगमन होईल. शुक्रवारी गौरीच्या जेवणाचा थाट असेल तर शनिवारी गणपतीसोबत गौरीला निरोप दिला जाईल.
कुटुंबाला एकत्र आणणाऱ्या या गौरीच्या आगमनाची उत्सुकता लहानथोर सर्वानाच असते. मग काय गौरीचं आवाहन, तिची पूजा ते तिच्यासाठी केली जाणारी सजावट, तिचं नटणं, थटणं, पंचपक्वानांचा केला जाणारा बेत आणि गौरीसाठी जागविलेल्या रात्री असं खूप काही गौरी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे. गौरीपूजनाला पहिल्या दिवशी शेपूची भाजी व भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. दुसऱ्या दिवशी महालक्ष्मी पूजन असून सवाष्ण जेवायला घालतात. हा इथला मुख्य समारंभ असतो. त्यानंतर आरती करून पुरणपोळीचा बेत असतो.काही ठिकाणी गौरीच्या नैवेद्याला घावन घाटले करण्याची पद्धत आहे. आणि तिसऱ्या दिवशी पानावर दहीभात व कानवल्याचा नवेद्य देऊन गौरींचं विसर्जन केलं जातं.
अल्बर्ट आइनस्टाइन..... एका महान भौतिक शास्त्रज्ञ , ज्याच्या सापेक्षवादाच्या सिद्धांता मुळे आपल्या विश्वासंबंधीच्या कल्पनेमध्ये अतिशय अमुलाग्र आणि क्रांतिकारक बदल झाला.
अल्बर्ट आइनस्टाइन यांचा जन्म शुक्रवार १४ मार्च १८७९ या दिवशी दक्षिण जर्मनीतील उल्म या संपन्न गावात झाला.हर्मान आणि त्यांची पत्नी पौलिन यांचा हा पहिला मुलगा .त्याच्या डोक्याचा आकार जर वेगळा होता. इतर मुलांच्या मानाने बोलायला उशीरा लागल्याने त्याच्या आईला तो मतीमंद असावा अशी भीती वाटत असे.इतर मुलांबरोबर खेळ खेळल्यावर मी दमतो अशी तो तक्रार त्याच्या आई जवळ करीत असे.तो खूप शांत आणि एकांत प्रिय होता.मस्ती करण्यापेक्षा वाचन आणि संगीत ऐकणे हा त्याचा छंद होता.अल्बर्ट नेहमी धीरगंभीर पण निश्चयी स्वभावाचा होता.अतिशय एकाग्रतेने तो पत्याचा बंगला बनवीत असे. पण लहानपणी तो शांत असला तरी सहनशील नव्हता .५ वर्षाचा असताना त्याने रागाच्या भरात त्याच्या शिक्षिकेला खुर्ची फेकून मारली होती .या घटनेचा त्याच्या मनावर खोल परीणाम झाला आणि निश्चय पूर्वक तो विवेकी बनला.
अल्बर्ट याचे त्याची बहिण माजा आणि त्याच्या आई वडिलांवर खूप प्रेम होते .आई वडिलांना आणि बहिणीला त्याने कधीही अंतर दिले नाही.अल्बर्ट ची आई बुद्धिमान होती.वडील अभियंते होते.अल्बर्ट चा भाऊ जेकब आणि त्याच्या वडिलांचा एक कारखाना होता.
अल्बर्ट च्या वडिलांनी लहानपणी त्याला एक होकायंत्र दिले होते. होका यंत्राची सुई नेहमी उत्तर दक्षिण दिशाच दाखवते हे लक्षात आल्यावर त्याला खूप कुतूहल वाटले .तो या घटनेने इतका उत्तेजित झाला कि त्याच्या अंगाला कंप सुटला . त्यावेळी तो जेमतेम ६ वर्षाचा होता.त्याला ते सर्व गूढ वाटले आणि गूढ शक्तीची उकल करण्याचा ध्यास त्याने घेतला.
काही वर्षांनी गणितातील संख्यांच्या बाबतीत सुद्धा काही तरी गूढ आहे असे त्याला वाटू लागले.गणित आणि विज्ञान याचे आकर्षण वाढले आणि अंधार कसा पडतो ? सूर्याचे किरण कशाचे बनलेले आहेत ? या सारख्या प्रश्नांची उत्तरे तो शोधण्याचा प्रयत्न करू लागला.या संबंधी प्रश्न विचारून तो त्याच्या वडील आणि काकांना भंडावून सोडत असे.अल्बर्ट शाळेतल्या इतर मुलांबरोबर रमत नसे पण अभ्यासात तो खूप हुशार होता.त्याचा वर्गात नेहमी १ ला नंबर येत असे.
वयाच्या १० व्या वर्षात अल्बर्ट स्वतःच गणित शिकू लागला.शाळेचा ठरलेला गृहपाठ झाला कि अल्बर्ट गणितातील कोडी सोडवत बसत असे.
जर्मन कायद्या प्रमाणे अल्बर्ट ला घरच्या घरी धर्म शास्त्राचे शिक्षण मिळाले.आइनस्टाइन कुटुंब ज्यू धर्माचे होते.घरी धार्मिक आचार विचार काटेकोरपणे पाळले जात .परंतु ज्या परमेश्वरावर विश्वास ठेव असे त्याचे शिक्षक नेहमी सांगत त्या परमेश्वरावरील त्याचा विश्वास वयाच्या १२ व्या वर्षीच पूर्ण पणे उडाला .पण निसर्गातील आश्चर्यकारक घटनांकडे तो मोठ्या कुतूहलानी पाहत असे.
या दरम्यान अल्बर्ट च्या आई वडिलांनी कारखान्यात खोट आल्याने म्युनिच मधील आपला व्यवसाय गुंडाळला आणि ते इटलीला गेले.अल्बर्ट शिक्षण पूर्ण करण्यासाठी जर्मनीतच राहिला.परंतु वयाच्या १७ व्या वर्षी लष्करात भरती व्हावे लागेल म्हणून त्याने जर्मनी सोडली आणि तो आपल्या आई वडिलांकडे इटलीला गेला.अल्बर्टला युद्ध , रक्तपात ,हिंसा हे अत्यंत पाप आहे असे वाटे. त्याच्या मनात दुस-याला मारणा-या लोकांबद्दल घृणा उत्पन्न झाली.
अल्बर्ट पदवीधर झाल्यावर नोकरी शोधत होता.जवळ जवळ वर्षभर त्याला नोकरी मिळाली नाही.शेवटी एका शाळेत त्यास शिक्षकाची हंगामी नोकरी मिळाली.त्याला ती नोकरी प्रथम आवडली नव्हती पण नंतर त्याला शिक्षकी पेशा आवडू लागला.अध्यापन करताना त्याने आपले संशोधनाचे कार्य सुरु ठेवले.अल्बर्ट च्या विज्ञान विषयाच्या कल्पना भन्नाट असायच्या . तो नियतकालीकांतून लेख लिहायचा.१९०१ मध्ये त्याने झुरिच विद्यापिठात पी एच डी साठी पाठवलेला प्रबंध झुरिच विद्यापीठाने नाकारला.अल्बर्ट निराश झाला पण ऐन वेळी त्याच्या मदतीला त्याचा जिवलग मित्र मार्सेल ग्रोसमान धावून आला.त्याचे वडील स्वित्झेर्लंड मधील बडे प्रस्थ होते.त्यांनी बर्न शहरातील आपल्या मित्राकडे अल्बर्ट ची शिफारस केली.ते संशोधनाच्या पेटंट देणा-या कार्यालयाचे प्रमुख होते.१९०२ मध्ये अल्बर्ट ला त्या संस्थेत नोकरी मिळाली.स्विस संशोधकांनी पेटंट मिळवण्यासाठी केलेल्या अर्जाची नोंदणी आणि छाननी हि संस्था करीत असे.या संस्थेत अल्बर्ट तंत्र विषयक तज्ज्ञ तिसरा वर्ग ( कनिष्ठ )म्हणून नोकरीला लागला.या कार्यालयात अल्बर्ट आइनस्टाइन यांस तंत्रविषयक सल्लागार (दुसरा वर्ग ) अशी पदोन्नती मिळाली.ते काम करताना त्याला स्वतःचे संशोधन करण्यासाठी खूप वेळ मिळू लागला.
याच अल्बर्ट आइनस्टाइन याने नंतरच्या काळात जे सिद्धांत मांडले त्या सिद्धांताने संपूर्ण जगाचे लक्ष त्याने वेधून घेतले .
E = mc²
उर्जा =वस्तुमान गुणिले प्रकाशाच्या वेगाचा वर्ग हे अल्बर्ट आइनस्टाइन यांचे जग प्रसिद्ध सूत्र .यात कोणतीही गोष्ट प्रकाशाच्या वेगा पेक्षा ज्यास्त वेगाने जात नाही.... हे या सूत्राने स्पष्ट पणे दाखवून दिले .अल्बर्ट आइनस्टाइन यांनी न्युटनचा निरपेक्ष काळाचा सिद्धांत मोडीत काढलाच पण प्रत्तेक व्यक्तीगणित काळ व्यय वेगळा असतो आणि ती व्यक्ती किती जलद अथवा मंद गतीने हालचाल करीत आहे यावर काळव्यय किती होणार ते अवलंबून असते.उदाहरणार्थ --जवळ जवळ प्रकाशाच्या वेगाने प्रवास करणा-या यानात बसून काही अंतराळवीर अवकाशात गेले तर त्या अंतराळवीरांच्या दृष्टीने ,त्यांचा काळव्यय पृथ्वीवर मागे राहिलेल्या माणसांपेक्षा कमी गतीने होईल .अर्थात नेहमीच्या गतीने जाणा-या माणसांसाठी न्युटनचा नियमही लागू पडतो.काही वस्तू प्रकाशाच्या वेगा इतपत वेगाने जावू लागल्या तर त्या आहेत त्या पेक्षा मोठ्या भासतील आणि त्यांच्या वस्तुमाना मध्ये प्रचंड वाढ होईल असे आइनस्टाइन यांनी प्रतिपादन करून गणिताच्या आधारे ते सिद्ध केले.
संत ज्ञानेश्वर यांना जसे धर्ममार्तंड लोकांचा विरोध सहन करावा लागला तसाच अल्बर्ट आइनस्टाइन यांना तो सहन करावा लागला.त्यांचा हा नवा सिद्धांत मान्य करणे तत्कालीन शास्त्रज्ञ समूहाला खूप अवघड होते आणि त्यांचे सिद्धांत चटकन समजतही नसत.
अणु बॉम्ब चा स्फोट ......!
अणु भंजन करून खूप मोठी संघटक शक्ति मुक्त होईल याची जाणीव आइनस्टाइन यांनी जगाला करून दिली.आधुनिक याने, अंतराळातील होणारे प्रयोग याचे खरे जनक आइनस्टाइन हे आहेत हे संपूर्ण जगाने मान्य केले.Run away reaction हि रसायन शास्त्रातील स्फोट घडवणा-या प्रक्रियेला आइनस्टाइन यांच्या मुळे चालना मिळाली.प्रचंड वेगाने याने पृथ्वीचा तळ सोडण्यासाठी आणि पृथ्वीचे आवरण फोडून अवकाशात झेप घेण्यासाठी लागणा-या उर्जेचे , वेळेचे आणि गतीचे गणित आइनस्टाइन यांच्या सिद्धांताने सुटले . आज त्याचीच गोड फळे आपण चाखत आहोत.
हिटलर आणि आइनस्टाइन --
जर्मनी हि श्रेष्ठ आर्य वंशाच्या लोकांची भूमी असून ज्यू , जिप्सी ,किवा अन्य कोणत्याही धर्माच्या लोकांना जर्मनीत राहता येणार नाही असा फतवा हिटलर ने काढला .अनेक ज्यू लोकांनी तेथून पळ काढला तर अनेक भूमिगत झाले.या नाझी वादाशी मुकाबला करण्यासाठी अल्बर्ट आइनस्टाइन याने आपले सारे वैज्ञानिक ज्ञान वापरले.१९३९ साली त्यांनी अमेरिकेच्या रूझवेल्ट या अध्यक्षांना पत्र लिहिले .अणुशक्तीवर आधारित शस्त्रे तयार करणे शक्य आहे हे त्यांनी रूझवेल्ट यांना सांगितले.१९४१ साली रूझवेल्ट यांनी त्यांच्या सरकारी शास्त्रज्ञ समूहाला अणू बॉम्ब तयार करण्यास सांगितले.१९४३ साली आइनस्टाइन यांची अतिशय उच्च दर्जाच्या स्फोटक विषयक सल्लागार समितीचा प्रमुख म्हणून अमेरिकेने नेमणूक केली . जर्मनांना अणु बॉम्ब तयार करता येणार नाही याची पुसटशी जरी कल्पना मला असती तरी अणु बॉम्ब तयार करा असे मी अमेरिकेला सुचवले नसते असे निराश उद्गार आइनस्टाइन यांनी नंतर काढले होते.
खरे तर आइनस्टाइन हे शांततेचे भोक्ते होते.त्यांना रक्तपात आवडत नसे म्हणूनच २ -या महायुद्धा नंतर आइनस्टाइन यांनी ज्या देशांनी अणू अस्त्र बनवली होती त्या त्या देशांनी ती नष्ट करावीत या साठी आइनस्टाइन यांनी जोरदार मोहीम उभारली.आपण एक अतिशय विनाश करणारी शक्ती मोकळी केली याचे शल्य जन्मभर आइनस्टाइन यांना होते . अणुशक्तीचा उपयोग विध्वंस करण्यासाठी न करता शांतते साठी आणि लोकांच्या दैनंदिन व्यवहारात जगाच्या भल्या साठी करावा असे त्यांचे मत होते. त्यांच्यातला ' विवेक ' आपण लोकांच्या हातात हे काय ज्ञान देवून बसलो याची खंत करीत असे.अणू शक्तीच्या दुष्परिणामाची जाणीव त्यांना झाली होती. जगाची हानी टाळण्यासाठी हे नवे तंत्रज्ञान अतिशय कडक नियंत्रणा खाली ठेवले पाहिजे असा इशारा त्यांनी सर्व जगाला त्याच वेळी दिला होता.१८ एप्रिल १९५५ रोजी आइनस्टाइन यांची प्राण ज्योत मालवली. आइनस्टाइन यांचा मेंदू त्याच्या मृत्यू नंतर प्रिन्स्टन हॉस्पिटल च्या पथौलॉजी च्या पयोग शाळेत परीक्षण करण्यासाठी जतन केला गेला.त्याच्या मेंदूच्या डाव्या आणि उजव्या भागाचे नमुने तपासले गेले त्यात अनेक आश्चर्य कारक गोष्ठी उघड झाल्या. आइनस्टाइन यांच्या मेंदू बाबत स्वतंत्र लेख लिहिता येईल .आजवर त्यांच्या मेंदूवर १००००० हून अधिक शास्त्रीय लेख वैज्ञानिकांनी प्रसिद्ध केले आहेत .अजूनही त्यावर संशोधन सुरु आहे.
संत ज्ञानेश्वर आणि अन्य देशातील थोर शास्त्रज्ञ यांच्या काही समान दुवे आहेत परंतु त्यांच्यात काही मुलभूत फरक सुद्धा आहे. या लेखमालेच्या शेवटी मी तो लिहिणार आहे.
-- चिंतामणी कारखानीस -
पूर्वी प्रत्येक घरातून श्री रामरक्षा संध्याकाळी म्हंटली जायची . कधी कधी वडीलधारी मंडळी सोप्यावर संध्याकाळी फे-या मारत आणि रामरक्षा मोठ्या आवाजात म्हणत. ती ऐकत असताना लहान मुलांची आपोआप पाठ होत असे.
संध्याकाळी रामरक्षा स्तोत्र म्हणणे हे हिंदू घर असल्याची एक खूण होती.घराचा सुसंस्कृतपणा या स्तोत्रावरून ओळखला जायचा.संध्याकाळी तुळशी वृंदावना जवळ दिवा लावणे.घरात देवाजवळ दिवा लावणे . शुभंकरोती कल्याणं ....म्हणणे आणि त्या नंतर रामरक्षा हे नित्योपचार असायचे .
रामरक्षा अत्यंत गुणकारी असून घरात सौख्य , आरोग्य , आणि ऐश्वर्य प्रदान करणारे स्तोत्र आहे. मार्कंडेय ऋषींनी रचलेल्या महामृत्युंजय मंत्रा मध्ये जी ताकद आहे तेव्हडीच ताकद या स्तोत्रात आहे.ज्या घरात हे स्तोत्र लहान मुलांना शिकवले जाते त्या घरात सदैव नितीमत्ता आणि त्यातून येणारे धैर्य घरातील लोकांमध्ये वास करून असते .हल्ली मुले रामरक्षा म्हणत नाहीत . ती पुन्हा परत म्हणणे सुरु करणे हि काळाची गरज आहे.सोबत एक यु ट्यूब ची लिंक दिलेली आहे. रामरक्षा कशी म्हणावी हे ती लिंक उघडल्यावर कळेल !!!
श्री राम ....
https://www.youtube.com/watch?v=TIbijIE0Om4
--चिंतामणी कारखानीस
एका ओळखीच्या मराठी कुटुंबाच्या घरी गेलो असतांना त्यांचा गोड लहान मुलगा दिसला. त्याला जवळ घेऊन थोडी मस्ती करतांना त्याला त्याच्या वर्गातील एखादी गोष्ट सांगण्यास सांगितले … लगेच त्याच्या “मम्मीने” मागून त्या मुलाला सुचना केली “टेल स्टोरी इन इंग्लिश” …..
पूर्वीच्या काळात चार आण्याला आगपेटी मिळायची. अजूनही ती मिळते पण आता तिचा वापर फारसा होत नाही, कारण घरोघरी गॅस पेटवण्यासाठी आपण गॅस लायटरचा वापर करतो.
खडकांची झीज होऊन माती तयार होते. ठिसळ गहू-ज्वारीचे पीठ दळायला दहा अश्वशक्तीची चक्की लागते. मग पाषाणहृदयी, वज्रतुल्य, कठीण खडकांची माती करायला निसर्गाला किती बळ आणि वेळ खर्च करावा लागत असेल? अशा महत्प्रयासाने तयार झालेल्या संपत्तीला मातीमोल ठरविणारे हे कोण असे पंचांगपंडित?
Copyright © 2025 | Marathisrushti