(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • राधानगरी-दाजीपूर परिसर … सह्याद्री

    राधानगरी-दाजीपूर परिसर … सह्याद्री …. कोल्हापूर-फोंडा (तळकोकण) रस्ता.

  • मेक बिलीव्ह – बरंच भ्रामक, किंचित खरं !

    चित्रपटाच्या पांढऱ्या पडद्यावर दिसणारे सगळे खरे आणि म्हणून भावनांना अपील करणारे असते या वयातून मी गेलोय.

  • मधुमेह टाळता येतो

    आहार आणि व्यायाम यांच्या साह्याने मधुमेह नियंत्रणात ठेवता येतो.

    कोणताही आजार हा होण्यापेक्षा जर टाळता आला तर? किंवा त्याचा प्रतबंध करता आला तर? मधुमेह हा आजार म्हणजे नुसतेच रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त होते असे नव्हे, तर हा आजार व्यक्तीचे शरीर पोखरून, चुंबकासारखे कार्य करतो व विविध आजारांना निमंत्रित करतो. उदा.- उच्च रक्तदाब, हृदयरोग, मूत्रपिंडाचे रोग, न बरी होणारी जखम (Gangrene) इ. या आजाराची भीती बाळगण्यापेक्षा आणि तो आपणास होऊन शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामाची वाट पाहण्यापेक्षा त्याचा प्रतिबंध केला तर?

    होय, शास्त्रीयदृष्ट्या हे सिद्ध झाले आहे, की तुम्ही मधुमेह टाळू शकता किंवा त्याचा प्रतिबंध करू शकता.

    प्रतिबंध कसा करता येईल, हे पाहण्याआधी आपण मधुमेह होण्याची शक्यता कोणाकोणास आहे हे विचारात घेऊ.

    आपल्या कुटुंबात मधुमेहाचा रुग्ण आहे. उदा.- आपली आई किंवा वडील किंवा दोघेही अथवा आपल्या कमरेचा घेर ८० सें.मी. (महिला) किंवा ९० सें.मी. (पुरुष) पेक्षा जास्त आहे. अथवा आपल्या व्यवसायाचे स्वरूप बैठ्या पद्धतीचे आहे अथवा आपले वय वर्षे ३५ पेक्षा जास्त आहे. असे असल्यास त्या व्यक्तीस मधुमेह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा व्यक्तींनी स्वतःहून तपासणी करून घेऊन वैद्यकीय सल्ला घ्यावा.

    भविष्यात मधुमेह होण्याची शक्यता असणाऱ्या व्यक्तींनी रक्तातील साखरेचे प्रमाण तपासून पाहण्यापेक्षा, शरीर साखरेचा भार (लोड) सहन करू शकते किंवा नाही, हे पाहणे महत्त्वाचे आहे (Glucose Tolerance Test) - जेणेकरून ती व्यक्ती मधुमेही (Diabetic)आहे की मधुमेहाच्या पूर्वस्थितीत (Pre-diabetic)आहे हे जाणता येते. मधुमेहाच्या पूर्वस्थितीतील (Pre-diabetic) व्यक्तींनी नियंत्रित आहार व नियमित व्यायाम (Life Style Modification) -केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास व पूर्ववत येण्यासही मदत होते व मधुमेहाचा प्रतिबंध होतो.

    आहार व व्यायाम हे दोन्ही मधुमेहाच्या उपचारासाठीचे व प्रतबंधात्मक उपायासाठीचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. नियंत्रित आहार म्हणजे काय? महाराष्ट्रीय मध्यमवर्गाचा आहार समतोल असला, तरी नियंत्रित नसतो. त्यास नियंत्रित करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. दिवसाचा पूर्ण आहार हा चार भागांत विभागून (सकाळचा नाश्ताी, दुपारचे जेवण, संध्याकाळी नाश्ता व रात्रीचे जेवण) घेतला पाहिजे.

    आहाराच्या चारही भागांपैकी कोणताही भाग कमी केला अथवा टाळला जाऊ नये. बाह्य पदार्थाचे (fast food उदा.- पिझ्झा, बर्गर, वडा-पाव इ.) सेवन टाळावे. खाद्यतेलाचे सेवन मर्यादित स्वरूपात व मिश्रण करून केले पाहिजे. हिरव्या पालेभाज्या, काकडी, टोमॅटो इत्यादीचा वापर जास्त प्रमाणात करावा.

    रात्रीचे जेवण व झोप यामध्ये किमान २-३ तासांचे अंतर असावे. अतिसेवन व कडकडीत उपवास- दोन्हीही टाळावे. आहारामुळे मिळालेल्या ऊर्जेचा (calories) योग्य वापर हा नियमित व्यायामामुळे होतो. व्यायाम सुरू करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा. घरकाम, बागकाम, कार्यालयीन काम यामध्ये खर्च होणाऱ्या ऊर्जेपेक्षा कितीतरी जास्त ऊर्जा खर्च करणे गरजेचे असते. भरभर चालणे, पोहणे, योगासने, मैदानी खेळ (वैद्यकीय सल्ल्यानंतर) या प्रकारांनी हे साध्य होऊ शकते. नियमित व्यायाम हा दिवसातून ३०-४५ मिनिटे व आठवड्यातून कमीत कमी पाच वेळा करायला हवा.

    नियंत्रित आहार व नियमित व्यायामाचे फायदे- वजन नियंत्रित राहते, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते, उच्च रक्तदाबाचा त्रास कमी होतो, रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते. गुडघेदुखीचा त्रास कमी होतो, बद्धकोष्ठाचा त्रास कमी होतो. नियंत्रित आहार व नियमित व्यायाम या जीवनशैली बदलामुळे (Life-style modification) मधुमेहाचा प्रतिबंध होऊ शकतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात जीवनशैली बदलणे अवघड आहे, पण अशक्यमप्राय नाही. जीवनशैली बदलरूपी लसीने मधुमेहाचा प्रतिबंध करता येतो. दुर्दैवाने कोणत्याही औषधीनिर्मिती कंपनीला ही लस बनवता येत नाही, म्हणून ही लस आजच सर्वांनी स्वतःहून घेतली पाहिजे व मधुमेह झाल्यानंतर त्याच्याशी लढा देण्यापेक्षा मधुमेह होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक लढा दिला पाहिजे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    डॉ. अभिजित मुगळीकर,

  • श्री मीनाक्षीस्तोत्रम् – ४

    ब्रह्मेशाच्युतगीयमानचरिते प्रेतासनान्तस्थिते
    पाशोदङ्कुशचापबाणकलिते बालेन्दुचूडाञ्चिते ।
    बाले बालकुरङ्गलोलनयने बालार्ककोट्युज्ज्वले
    मुद्राराधितदैवते मुनिसुते मां पाहि मीनाम्बिके ॥ ४ ॥

    आई जगदंबेच्या दिव्य वैभवाचे वर्णन करतांना भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
    ब्रह्मेशाच्युतगीयमानचरिते - ब्रह्म म्हणजे श्रीब्रह्मदेव, ईश म्हणजे श्रीशंकर तथा अच्युत म्हणजे श्रीविष्णू यांच्याद्वारे अखंड जिच्या चरित्राचे गायन केल्या जाते अशी.

    प्रेतासनान्तस्थिते- भगवान महाकाल निश्चल स्वरूपात स्थिर रहात असल्याने त्यांना प्रेत म्हणतात. त्या महाकालाला आसन करून त्यावर बसणारी.

    पाशोदङ्कुशचापबाणकलिते- पाश म्हणजे दोरी, उद्ङ्कुश म्हणजे वरच्या बाजूला टोक असलेला अंकुश, चाप म्हणजे धनुष्य आणि बाण अशी आयुष्य हातात धारण करणारी.

    बालेन्दुचूडाञ्चिते- बाल इंदू म्हणजे चंद्राची कोर. चुडा अर्थात केसांचा वरचा भाग. च्या मस्तकावर चंद्रकोर धारण केल्याने अतिव सुंदर दिसणारी.

    बाले- काय अंभाल स्वरूपात निरागस दिसणारी. बालकुरङ्गलोलनयने- कुरंग म्हणजे हरिण. बालक कुरंग म्हणजे हरणाचे पिल्लू. त्याच्या नेत्राप्रमाणे चंचल नेत्र असणारी. सामान्य हरणाचे नेत्र देखील चंचल असतात. लहान बालक कधी चंचल असल्याने त्याचे नेत्र तर जास्तच चंचल असतात, हा भाव. बालार्ककोट्युज्ज्वले- कोट्यावधी बालार्क अर्थात उगवत्या सूर्याप्रमाणे तेजपुंज असणारी.

    मुद्राराधितदैवते- उपासनेमध्ये हाताच्या बोटांच्या ज्या विविध रचना केल्या जातात त्यांना मुद्रा असे म्हणतात. या मुद्रांमध्ये जगदंबेच्या उपासनेत देवी मुद्रा ,योनी मुद्रा इ.चा प्रयोग केला जातो. त्या मुद्रांच्या द्वारे जिची उपासना होते अशी.

    मुनिसुते- विविध ऋषी-मुनींनी उपासना केल्यानंतर वरदान स्वरूपात आई जगदंबेने त्यांच्या आश्रमामध्ये अवतार धारण केल्याच्या अनेकानेक कथा देवीभागवत, मार्कंडेयपुराण इत्यादी ग्रंथात आलेल्या आहेत. या अवतारांच्या सापेक्ष रीतीने आई जगदंबेला मुनिसुता असे म्हटले आहे. तिला प्रार्थना आहे की,

    मां पाहि मीनाम्बिके- ही आई जगदंबे मीनाक्षी माझे रक्षण कर.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • श्री स्वामी समर्थ

    श्री गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा. श्री स्वामी समर्थांमध्ये या तिन्ही रूपांचा समावेश होतो. खरंतर स्वामींकडे तुम्ही ज्या भावनेने पाहता तेच रूप तुम्हाला त्यांच्यात दिसेल म्हणूनच स्वामींच्या काही मठांमध्ये आपल्याला त्यांची स्त्री देवतेच्या रूपातली आदिशक्ती मूर्ती प्रतिमा दृष्टीस पडते. निदान ते रूप पाहून तरी आपण त्या शक्तीचा आदर केला पाहिजे.

  • रेल्वे ट्रॅक (लोखंडी सडक)

    रेल्वेची चाकं व्यवस्थितपणे, विनासायास फिरत जातील अशा 'दोन समांतर रेषेत असलेल्या; कठीण, तरीही गुळगुळीत अशा; सलग व लांबच लांब लोखंडी पट्टया' म्हणजे रेल्वेचा 'ट्रॅक.' तो व्यवस्थित व सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक धोकादायक अडचणींवर मात करावी लागते आणि तो बनविण्यासाठी कल्पनेबाहेर खर्च येतो. आजच्या जमान्यात रेल्वेची बांधणी ही बाब अतिशय सहजपणे गृहीत धरली जाते, त्यामुळे त्याकडे आवर्जून फारसं लक्षही दिलं जात नाही; पण, १५० वर्षांपूर्वी भारतात या लोखंडी सडका उभारण्यास सुरुवात झाली तेव्हा मात्र बहुसंख्य लोकांचे डोळे विस्फारले गेले होते. प्रथम हा काहीतरी भुताटकीचा प्रकार आहे असा जनसमज होता. 'डब्यांची गाडी या सडकेवरून जाताना बाजूच्या घरांवर कोसळेल' या भीतीने त्याविरुद्ध अनेक तक्रारी नोंदविल्या गेल्या होत्या. या गैरसमजांचं निराकरण करणं हे एक मोठं कामच होऊन बसलं होतं व याकरता सरकारकडे अनेक शिष्टमंडळं कैफियत मांडण्यासाठी गेली होती.

    लोखंडी सडकांआधी, म्हणजेच रेल्वेयुग येण्याच्या आधी रोमन राज्यात लाकडी फळ्यांचा रुळांसारखा वापर करून, जड सामान एका गावातून दुसऱ्या गावात हलविलं जात असे. १५ व्या शतकात युरोपमध्ये लाकडी अथवा दगडी किंवा विटांच्या समांतर पट्ट्यांवरून घोडे, गाढवं जोडलेल्या छोट्या गाडीचे डबे खेचून नेले जात असत. त्यांना 'ट्रेनवेज्' किंवा 'वॅगनवेज्' असे म्हणत. १७ व्या शतकापासून या लाकडी व इतर मार्गाऐवजी लोखंडी पट्ट्या वापरण्यास सुरुवात झाली होती.

    हे रूळ जमिनीला घट्टपणे धरून राहावेत याकरता अनेक प्रयोग करण्यात आले. या प्रयोगांदरम्यान खूप समस्यांना तोंड द्यावं लागलं. नंतर त्यावर बरंच संशोधन झालं व सुरळीत वाहतुकीसाठी आवश्यक अशा लोखंडी सडका तयार झाल्या. मात्र आजही त्यात सुधारणा होतच आहेत.

    भारतीय रेल्वेबांधणीत, रुळांच्या मध्यात ठरावीक अंतरावर रुळांना काटकोनात राहतील अशा लाकडी फळ्या (Sleepers) बसविण्यात आल्या. रशियन रेल्वेमार्गावर तेथील रुळांच्या खालच्या बाजूस रुळांबरोबर पुढे जाणारे स्लीपर्स आहेत. भारतात ते लाकडाचे, ओतीव लोखंडाचे किंवा सिमेंटचे आहेत. रुळांच्या बाजूंनी टाकलेल्या खडीमुळे ज्याला Ballast म्हणतात त्या खडी व स्लीपर्सच्या आधारानं रूळ जमिनीला घट्ट पकडून राहतात. रेल्वेरुळांच्या लोखंडात मँगेनिज धातूचं प्रमाण जास्त असल्यानं त्यांना बळकटी येते.

    जुन्या पद्धतीचे रूळ 'बुल-हेडेड' असत, तर सध्या नेहमीचे वापरात असलेले रूळ ‘फ्लॅट फोटेड' या प्रकारात मोडतात.

    साधारणपणे मुख्य मार्गावर रुळाची लांबी ४२ फूट, तर बाजूनं येणाऱ्या उपमार्गावरील रुळाची लांबी ३० फूट असते. ज्या लोखंडी पट्टीने दोन रूळ एकमेकांना जोडले जातात तिला फिशप्लेट म्हणतात. या फिशप्लेटस् रुळाच्या आतील व बाहेरील अशा रीतीने दोन्ही बाजूंना फिशबोल्ट्सने पक्क्या केलेल्या असतात. त्याकरता खास छिद्रांची सोय असते. दोन रुळांच्या जोडणीदरम्यान मध्यात थोडी मोकळी जागा सोडलेली असते, कारण तीव्र उन्हाळ्यात व थंडीत रूळ प्रसरण किंवा आकुंचन पावतात. घातपातीकृत्यात याच फिशप्लेट्स काढून आजही गाडी घसरवली जाते. आजकाल बऱ्याच ठिकाणी रूळ एकमेकांना वेल्डिंग करून जोडले जातात. विशेषत: नदी व खोऱ्यांमधील मोठमोठे पूल, तसंच घाटातील, अवघड वळणांच्या जागी ही काळजी घेतली जाते.

    भारतामध्ये रुळांसाठी तीन प्रकारच्या गेज पद्धती आहेत. दोन समांतर रुळांमधील अंतरानुसार ती पद्धत ओळखली जाते. ब्रॉड गेज रुळांमधील अंतर ५ फूट ६ इंच, मीटर गेजचे ३ फूट ३ इंच व नॅरो गेजमध्ये हेच अंतर २ फूट ५ इंच आहे. जगातील प्रत्येक देशात रुळांमधील ही अंतरं वेगवेगळी असतात. सन १९५० मध्ये भारतातील या तीन प्रकारच्या गेज पद्धतीप्रमाणे रुळांच्या लांबीचे आकडे पुढीलप्रमाणे होते.

    • ब्रॉड गेज - १६,००० मैल
    • मीटर गेज- १३,००० मैल
    • नॅरो गेज - ३,००० मैल

    रुळांचं वजनाचं कोष्टक हे त्या रुळाच्या लांबीच्या प्रमाणात ठरवलं जातं. एक यार्ड (तीन फूट) लांबीसाठी ब्रॉड गेजच्या रुळाचं वजन ९० पौंड, तर मीटर गेजसाठी तेवढ्याच लांबीसाठी ते वजन ५० ते ६० पौंड असतं.

    या सर्व रेल्वेमार्गांची सतत देखरेख करण्याचं काम गुंतागुंतीचं असतं. उदाहरणार्थ, स्लीपर्स सारखे बदलणं, सांध्यांच्या फिशप्लेटस्चं तेलपाणी पाहणं, खडी बदलणं हे काम करत असताना रुळाला कुठे तडा गेल्याचं आढळून आल्यास गँगमन धोक्याचा सिग्नल देतो. आजकाल मोबाईलमार्फत एस.एम.एस. करून धोक्याची बरोबर जागा कळविली जाते. आता ‘वायरलेस सेन्सर सिक्युरिटी सिस्टिम'च्या मदतीनं रुळांना पडलेले तडे शोधले जातात.

    सुरुवातीला ताशी २० कि.मी. वेगाने जाणाऱ्या गाड्यांच्या रेल्वेमार्गांवर आता ताशी १६० कि.मी. वेगाने जाण्याची क्षमता असलेल्या गाड्या जाऊ शकतील या दृष्टीने रुळांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

    जगभरातील सर्व देशांतील रेल्वेमार्गांची एकूण लांबी ७.७० लाख मैल आहे, म्हणजे आपल्या पृथ्वीला तीस प्रदक्षिणा घालता येतील इतकी अवाढव्य रुळांमधील अंतर सांगणारं कोष्टक

    नॅरो मेज-२ फूट

    नॅरो गेज - २ फूट ५ इंच

    मीटर गेज - ३ फूट ३/ इंच

    स्टॅन्डर्ड गेज - ४ फूट ५/, इंच

    ब्रॉड गेज - ५ फूट ६ इंच

    आहे. तसंच, जगभरात रेल्वेगाड्या ६२०० दक्षलक्ष मैल धावतात. हे अंतर सूर्यापासून प्लेटो या ग्रहापर्यंत असणाऱ्या अंतराच्या तोडीचं आहे.

    औद्योगिक व आर्थिक क्रांतीचा अभूतपूर्व मिलाफ जगभरच्या या रेल्वे रुळांनी घडविला आहे आणि त्यातही जगामधील सर्वांत प्रभावी औद्योगिक संकुल म्हणून भारतीय रेल्वेनं अग्रस्थानी जे मानाचं स्थान पटकावलं आहे, ते तर आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पदच आहे.

    -डॉ. अविनाश वैद्य

  • शिक्षणाच्या बाजारीकरणावर शिक्कामोर्तब ?

    शिक्षण क्षेत्रात खासगीकरणाचा शिरकाव झाल्यानंतर काही मोजक्या शिक्षण संस्थांनी व्रतस्थाप्रमाणे विद्यादानाचे पावित्र्य सांभाळले. मात्र बहुतांश शिक्षण संस्था म्हणजे पदव्या मिळवून देणाऱ्या ‘फॅक्टऱ्या’ बनल्या. के.जी. ते पी.जी. चे रेट फिक्‍स करून एकादं प्रोडक्ट विकावं तसं त्यांनी शिक्षण विकायला सुरवात केली. याचे दुष्परिणाम म्हणजे, पाण्यासारखा पैसा ओतून पदव्या मिळवाव्या लागत असल्याने पदवी घेऊन फक्त पैसे कमविण्याचाच विचार बहुतांश विद्यार्थी करतात. त्यामुळे, शाळा म्हणजे ज्ञानाचे भांडार असलेले मंदिर असते. विद्या हे दान आहे, ती काही विकण्यासाठी ठेवलेली वस्तू नाही, असा युक्तिवाद केला जात असला तरी, शिक्षणाचा बाजार भरवला गेलाय, हे वास्तव आहे.

  • त्या दिवशी महासागरात नौका बुडाली!

    तो सप्टेंबर दहा २०११  चा शनिवार होता.  प्रवासी दारेसालाम बंदरातून रात्री ठीक बारा वाजता प्रवासाला निघाले पेम्बा बेटाकडे .

  • मुंबईतील ग्रॅट मेडीकल कॉलेजचा वर्धापनदिन

    मेडिकल कॉलेज सर जे.जे. हॉस्पिटलच्या आवारात भायखळा येथे आहे. रुग्णालयाची अंथरूण क्षमता २८४४ बेड आहे आणि महाराष्ट्र व मध्य भारतातील सर्व भागातून वार्षिक रूग्ण १,२००,००० रूग्ण इथे येतात.

  • माणुसकीचे विकृतीकरण

    हा नाथपंथी डवरी गोसावी समाज अतिशय मवाळ आहे.. गावोगावी फिरून भिक्षुकी करून पोटाची खळगी भरणे एवढाच उद्योग त्यांना ठाऊक.. शिक्षणाच्या बाबतीतहि मागास असलेला हा समाज आधुनिकतेच्या मुख्य प्रवाहापासुन बरेच अंतर लांब आहे.. त्यामुळे या समाजाचे एकिकरन तर लांबच परंतु या समाजाचा कधिहि आपल्या मागण्यांसाठी कुठला मोर्चा अथवा समाजास हानी पोहचेल असे कार्य घडत नाहि..