वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
श्री गंगामाई तूं माते । पावन करिसी सर्वाते ।।
धुवूनी काढसी पापाते । तुझ्या स्पर्शाने ।। १।।
जया होई गंगास्नान । जाईल तो उध्दरुन ।
गंगादेवी पतीत पावन । किर्ति असे तुझी ।।२।।
कहानी ऐका गंगेची । पृथ्वीवरी अवतरण्याची ।।
पराकाष्ठा केली प्रयत्नाची । भगीरथाने ।।३।।
समुद्राचे झाले मंथन । अमृत निघाले त्यांतून ।।
विष्णु कुंभ हाती घेऊन ब्रम्हास दिले ।।४।।
जेव्हां राक्षस मातले । कुंभ घेण्या येवूं लागले ।।
ब्रह्मास कठिण वाटले । त्या क्षणी ।।५।।
विष्णूंनी केला उपदेश । पार्वती बहिण गंगेस ।।
आणूनी तिजला स्वर्गास । अमृत शिंपावे ।।६।।
गंगा होईल आमृतमय । कुंभाची मग भिती न रहाय ।।
पावन करित ती जाय । स्वर्गातील सर्वाते ।।७।।
आमृतमय गंगा झाली । स्वग्रातुन वाहु लागली ।
सर्व देवता संतुष्ट झाली । तिच्या आगमनाने ।।८।।
सुर्यवंशी राजा भगिरथ । करु लागला तप अविरत ।
सामर्थ्य चालले वाढत । तयाचे ।।९।।
तपाची शक्ती महान । तयापुढे नमती सर्वजण ।।
परमेश्वरही देती मान । तपवस्वी पुढे ।।१०।।
तपाच्या लहरी ऊठती । स्वर्गात त्या जाऊं लागती ।।
गंगेच्या चरणीं आदळती । एका मागुनी एक ।।११।।
तप शक्तीच्या लहरी । गंगेस बैचैन करी ।।
धावत गेली श्री हरी । तयासी पुसण्या ।।१२।।
भगीरथाचे तप कठिण । शक्ती त्याची होत महान ।।
सर्वासाठी ते आव्हान । इच्छा सत्वरी पूरवावी ।।१३।।
प्रसन्न झाली गंगादेवी । भगीरथासी दर्शन देई ।।
तुजवर मी प्रसन्न होई । माग वर म्हणाली ।।१४।।
हे माझें गंगाआई । पृथ्वीवरी तूं येई ।।
पातकासी दिलासा देई । ह्या भूमीवर ।।१५।।
भगीरथाची पाहता भक्ती । येण्यासाठी मान्य करिती ।।
सोडून देई स्वर्गाती । पृथ्वीवरी येण्या ।।१६।।
नारद आले स्वर्गातूनी । भगीरथा आशीर्वाद देऊनी ।।
गंगेस रोकती तत्क्षणी । पृथ्वीवरी उडी घेण्या ।।१७।।
हास्य वदन करुनी । दोघांना सागंती समजावूनी ।।
परिणाम उडी घेण्यानी । गंगामाईच्या ।।१८।।
प्रंचड प्रवाह गंगेला । सहन न होई पृथ्वीला ।।
दुभंगुनी जाई पाताळाला । महान शक्ती मुळें ।।१९।।
उपाय एक तयावरी । जर शिव झेलील शिरावरी ।।
नंतर उतरसी पृथ्वीवरी । भार हलका होईल ।।२०।।
प्रसन्न करावे शिवासी । वर मागावा त्यासी ।।
मदत करावी गंगेसी । पृथ्वीवरी येण्याते ।।२१।।
भगीरथ प्रयत्न महान । तपश्चर्या केली कठिण ।।
शिवासी केले प्रसन्न । वर मागुनी घेती ।।२२।।
गंगेची महान शक्ती । पृथ्वी माते न पेलती ।।
घ्यावे तू शिरावरती । उडी घेत समयी।।२३।।
गंगेने उडी घेतली । गंगेने शिरावर झेली ।।
गंगा जटेत सामावली । शिवशक्ति मुळें ।।२४।।
उतरुन प्रथम शिव जटेंत । प्रवाह केला खंडित ।।
नंतर पृथ्वीवरी उतरुनी । वाहु लागली गंगा ।।२५।।
एक द्रूश्य आगळे । गंगेने पृथ्वी प्रदाप्रिले ।।
जमुनी देव सगळे । सोहळा बघती ।।२६।।
स्वर्गातील अमृत । गंगेच्या रुपात ।।
पृथ्वी वरुन वहात । जावू लागले ।।२७।।
पृथ्वीवरील पातक धुतले । तिला पावन केले ।।
पाप नाशिननी संबोधिले । गंगामाईसी ।।२८।।
डॉ.भगवान नागापूरकर
१०- ३०१०८३
( दशहरा म्हणजे दहापापे हरण करणारी. हे गंगानदीचे नांव आहे. ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेपासून ज्येष्ठ शुद्ध दशमी पर्यंत गंगेचे पूजन, अर्चन, गंगास्तूति वाचन, गंगा स्तोत्र पठण, गंगा स्नान, जलपान, गंगावतरणाच्या इतिहासाचे वाचन या पैकी शक्य असेल ते करुन दशहरा उत्सव साजरा करावा )
डॉ. रिमा वीस दिवसानंतर आज पुन्हा क्लिनिकला आली तेव्हा किती वेगळी दिसत होती. एक वेगळाच तजेला तिच्यात दिसत होता. एक वेगळाच उत्साह दिसत होता. त्याच्याआधी पाच-सहा महिने खूपच व्यग्र गेले होते. सतत पेशंट्स बघणे, कधी या क्लिनिक तर कधी त्या क्लिनिकनला जाऊन.
एकेकाळी विद्वान व्यक्तीमत्वासाठी जगात प्रसिध्द असणारा आणि देश-विदेशातील लोकांचीज्ञानाची भूक क्षमविणारा आपला भारत देश आज स्वत:च अज्ञानात आणि अंधारात खिचपतपडलेला आहे. तक्षशिला, नालंदा, काशी, पैठण अशी विश्व प्रसिध्द ज्ञानाची विद्यापीठे असणाराआपला भारत देश आज ईतराकडे ज्ञानाची भिक मागतो आहे, या पेक्षा आपल्या देशाचे दुसरे कोणते दुर्दैव असावे ? पण आपली एवढी दुर्दशा का व्हावी ? काआपल्याला लोकांसमोर हात पसरायची वेळ यावी ? याचा अजूनही कोणी फारसा गांर्भियाने विचारकेलेला नाही किंवा करत नाही. याचे फार आश्चर्य वाटते. जगाला दिव्य ज्ञान देणारे आपण आजइतके दुबळे व षंढ झालो आहोत की, आपण कोण होतो ? कोण आहोत ? याचे जरा सुध्दा भानराहिलेले नाही. हा आपल्या भारत मातेचा अपमान आहे. तिच्या गौरवपुर्ण वारशाचा खुन आहे. हेआपल्याला लक्षात का बरे येत नाही. आपला उज्ज्वल इतिहास वाचून का बरे आपला स्वाभिमानजागृत होत नाही.
युवास्सत: साधु युवाध्यापक: ।
आशिष्ठो दृढिष्ठो बलिष्ठ: ॥
उपनिषदात म्हटले आहे की, युवक हा साधु म्हणजे सरळ मनाचा, नविन विचार श्रेणीचा,शिक्षक, निष्कपटी, खिलाडू-वृत्तीचा, गर्व न करणारा, दृढनिश्चयी, अभ्यासू आणि बलवान असावाकिंवा असतो. परंतु खेदाने म्हणावे लागते की, आज वरीलपैकी एक ही गुण स्पष्टपणे युवकातआढळून येत नाही. यामुळे आज युवावर्ग दिशाहिन झाला आहे. समाजात युवकांचे स्थान घसरतआहे. आज युवक म्हणजे व्यसनांचा व विकृत्तीचा पुतळा आणि वासनेचा अंगार अशी ओळखबनली आहे. आज समाज घटक त्यातही विशेष म्हणजे महिला वर्ग युवकाकडे दुषित व संशयीनजरेने पाहात आहे.
युवा वर्गाची होणारी ही दशा थांबवून त्यांना दिशा देण्यासाठी, युवकांत वरील श्लोकातीलसदगुणांची पुर्नस्थापना करण्यासाठी आज आध्यात्माची अत्यंत आवश्यकता आहे. कारण युवा वर्गआपली संस्कृती व संस्कार यापासून भरकटला आहे, यामुळेच त्याला ही अवस्था प्राप्त झाली आहे.त्याला आपल्या कर्तव्याचा विसर पडला आहे. हे सर्व पाश्चिमात्य संस्कृतीचे विपरित परीणामआहेत. यातून युवकांना बाहेर काढण्यासाठी आध्यात्माशिवाय पर्याय नाही. फक्त आध्यात्मातूनचयुवकांत मनाची सरलता निर्माण करून, विकार व वासनेचा सर्वनाश करता येईल. मग आपोआपत्यांच्यात आत्मविश्वास, स्वाभिमान, ध्येयनिष्ठा हे गुण प्रकट होतील. यातून मग युवकांना सक्षमबनवून देशाला सर्वश्रेष्ठ बनवणे शक्य होईल. परंतु यासाठी दृढ निश्चय महत्वाचा आहे, जो फक्तआध्यात्मातूनच युवकांत निर्माण होऊ शकतो. म्हणून युवकांनी आध्यात्मात समरस व्हावे. कारणशारीरीक आजार हे बाह्य औषधोपचाराने बरे होतात, मात्र मनातील नैराश्य, न्युनगंड, विकृत्ती यांनादूर करण्यासाठी आपल्याला आध्यात्मालाच जवळ करावे लागेल.
बऱ्याच लोकांना वाटतं की, जवळ पैसा असला म्हणजे सर्व काही मिळते, मात्र जगात सर्वचगोष्टी पैशाने मिळत नाहीत. पैसा हा कधिही सुख, समाधान देऊ शकत नाही. तर त्याने फक्त लोभवाढत जातो. याचा अर्थ पैसा आवश्यक नाही असा नाही, पैसा ही सुध्दा पाहिजे आहे, पण तो फक्तआवश्यक गरजा भागविण्यापुरताच. पैशाचा अतिरेक नसावा. पैशाचा लोभ हा माणसातीलमाणुसकी व घराचे घरपण नष्ट करतो. याने लाखों कूटुंबांना उध्वस्त केले आहे. हा धनाचा लोभफक्त आध्यात्मातूनच नष्ट होतो. केवळ आध्यात्म हेच षडविकारातून बाहेर काढू शकते. आध्यात्महेच मनुष्याला शांत, संयमी, समाधानी बनवू शकते. ज्याने माणूस संकट दूर करायला, त्यालाध्यैर्याने तोंड द्यायला शिकतो. आध्यात्माने सर्वाविषयी ममत्व, प्रेमभावना वाढिस लागते.आध्यात्मानेच मनुष्य खंबीर बनून अन्यायाविरोधात लढा द्यायला उभा राहतो. थोडक्यात सांगायचेम्हणजे ज्या गोष्टी जीवन जगण्यासाठी खुप आवश्यक आहेत, अशा गोष्टी आपल्याला फक्तआध्यात्मातूनच मिळू शकतात. यासाठी आपण बाहेर कितीही पैसा खर्च केला तरी काही उपयोगनाही. पण आध्यात्म आपल्याला या सर्व गोष्टी मुक्तहस्ताने व विनामुल्यपणे देते.
म्हणून युवकांनी कोणत्याही एका आध्यात्मिक मार्गाचा अंगिकार करावा. ज्यातून स्वत:चा वपर्यायाने देशाचा सर्वतोपरी विकास व प्रगती साधेल. आध्यात्माचा सहवासच आपल्याला एकआदर्श नागरीक बनवेल. एक कर्तव्यशील व्यक्ती बनवेल. आध्यात्मच आपल्या विचारात प्रगल्भताआणेल. आपल्या मनगटात हत्तीचे बळ, सिंहाची शुरता आणि गरूडासारखी उंच भरारी घेण्याचीक्षमता केवळ आध्यात्मानेच शक्य आहे.
परंतु आध्यात्मिक मार्गाची निवड करताना युवकांनी योग्य ती दक्षता घेणे महत्वाचे आहे.जसा योग्य शिक्षक विद्यार्थ्याचे भविष्य घडवतो, तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शकच आपल्याआयुष्याला योग्य वळण लाऊ शकतो. म्हणून योग्य आध्यात्मिक मार्गाची निवड करावी जेणेकरूननंतर पश्चाताप करण्याची वेळ येऊ नये. आज या मतलबी जगात भामट्या, भोंदु बुवा-बाबांचीआणि फसव्या किंवा स्वार्थी लोकांची, आणि त्यांनी चालवलेल्या आध्यात्मिक लुटींच्या दुकानांचीकाही कमी नाही. सगळी कडे त्यांचाच सुळसुळाट झाला आहे. तेव्हा अशा तथाकथित बुवा-बाबा,स्वामी, महाराजांपासून सावधान !
अलिकडे चांगल्या मराठी विषयांच्या चित्रपटांची निर्मिती होय, सर्वार्थाने आधुनिक तंत्राचा वापर जरुन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न अनेकनिर्माते आणि प्रॉडक्शन हाऊसेस करत असताना, दुसरीकडे प्रेक्षक ही मराठी चित्रपट पहाण्यासाठी थिएटर्सकडे आकृष्ट होताना दिसत आहेत तात्पर्य, चांगल्या मार्केटिंगचा परिणाम आता मराठी बॉक्स ऑफिस वर पहायला मिळतो आहे.
इंग्लंडच्या गरटूड बेल या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची ओळख आपण स्वतःला कशी करून द्यावी, असा प्रश्न मला पडतो. जगप्रवासी, राजकारणपटू, मानववंशशास्त्रज्ञ, कवयित्री, भाषातज्ज्ञ, गिर्यारोहक, फोटोग्राफर आणि ‘लॉरेन्स ऑफ अरेबियन’ची म्हणजे टी.ई. लॉरेन्स याची हितचिंतक आणि त्याला वैचारिक बळ व दिशा देणारी त्याची मैत्रीणही ती होती!
दुपारी बारा वाजल्यानंतर जहाजावरुन कंपनीला नून रिपोर्ट पाठवला जातो. मागील चोवीस तासात जहाजावर वापरलेले इंधन ,पाणी आणि जहाजाने कापलेले अंतर अशा बऱ्याच गोष्टींची माहिती कंपनीला दिली जाते. दुपारी दोन वाजता चीफ इंजिनियर ने शिप्स ऑफिस मधून खाली इंजिन कंट्रोल रूम मध्ये फोन केला.
२०१६ - १७ आणि २०१७ - १८ या लागोपाठच्या दोन वर्षांच्या अर्थसन्कल्पात केंद्रीय अर्थमंत्र्यांनी , म्हणजेच पर्यायाने मोदी सरकारने , काही सरकारी मालकिच्या कंपन्यांची आपल्या देशाच्या शेअर - बाजारात नोंदणी करण्याचा ( Stock Exchange Listing )मनोदय व्यक्त केला आहे . त्यासाठी घोषणा झालेल्या कंपन्यां आणि एकंदरीतच ही प्रक्रिया हे प्रकरण जरा शांतपणे आणि सविस्तरपणे लक्षात घेण्याजोगे आहे.
मुळातच , शब्द - प्रयोग " नोंदणी " ( Listing ) असा आहे . निर्गुन्तवनुकिकरण ( Disinvestments ) असा नाहीये ; तसेच ते IPO असंही नाहीये आणि Strategic Sale असंही नाहीये हे आवर्जून लक्षात घेण्याजोगी गोष्ट आहे . अगदी मा . श्री . नरेंद्र मोदी आधी तेरा वर्षे गुजरात सारख्या प्रगत राज्याचे मुख्यमंत्री होते तेन्व्हाही आणि आता मे २०१४ पासून आपल्या देशाचे पंतप्रधान असतानाही सरकारी क्षेत्रातील कंपन्या खाजगी क्षेत्राला विकण्यावर त्यांचा भर नव्हता आणि नाही . होता होईल तो अशा कंपन्यांची कामगिरी सुधारण्यावर , आहे त्या पेक्षाही जास्तच सामर्थ्यशाली करण्यावर त्यांचा भर असतो . या प्रक्रियेत खाजगी क्षेत्र आणि गुंतवणूकदार यांना सहभागी करून घेण्यास त्यांची हरकत नसते ; पण त्यांची मालकी सरकारकडे ठेवण्याकडेच त्यांचा कल असतो . ही भूमिका पुढे नेणारा असाच मनोदय अलिकडच्या दोन्ही केंद्रीय अर्थसन्कल्पात दिसतो .
हे सुतोवाच Listing असं आहे . त्यामुळे सरकारी मालकी आणि सर्वसामान्य जनतेचा सहभाग या दोन्ही गोष्टी एकाचवेळेस सहजशक्य होणार आहेत . निदान होऊ शकतील . त्यामुळे अशा बाबतीत होणारा सोयीस्कर राजकीय विरोधही टळेल आणि निधी - उभारणीही होईल . आजमितिला यावर्षीच्या तीन कंपन्या ( IRCTC , IRFC , IRCON )आणि गेल्या वर्षीच्या अर्थसन्कल्पात असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातल्या सर्वसाधारण विमा स्वरूपाच्या चार कंपन्या ( जनरल इन्शुरेन्स , ओरिएंटेल इन्शुरेन्स , युनाइटेड इन्शुरेन्स आणि न्यू इंडिया इन्शुरेन्स ) या सातही कंपन्यांच्या शेअर्सची आपल्या देशाच्या शेअर - बाजारात नोंदणी करण्याचा मनोदय या दोन अर्थसन्कल्पात व्यक्त करण्यात आला आहे . त्यापैकी गेल्या वर्षीच्या प्रस्तावावर अजून तरी काही हालचाल , पुढील कारवाई अजूनही सुरू झालेली नाही . पण ती आता लवकरच आणि वेगाने करण्यात येईल असे यंदाच्या अर्थसन्कल्पिय भाषणात सांगण्यात आले आहे . यंदाच्या अर्थसन्कल्पाबाबत तर संसदेत अजून चर्चाही सुरू झालेली नाही . अशावेळी हा प्रस्ताव योग्य तर्हेने समजून घेतला तर . . . .
आजमितिला या सातही कंपन्या , अगदी पूर्णपणे , अगदी शंभर टक्के , सरकारी मालकिच्या आहेत . त्याच्या एकूण एक शेअर सर्टिफिकेटसवर आपल्या देशाच्या माननीय राष्ट्रपतिम्चे नाव आहे . अशा पद्धतिच्या सरकारी कंपन्यांच्या शेअर्स ची नोंदणी शेअर - बाजारात करण्यासाठी प्रचलित नियमांनुसार अगदी मोजक्या प्रमाणातले शेअर्स दुसऱ्या एखाद्या संस्थेच्या नावावर करूनही ही प्रक्रिया सुरू होऊ शकते . त्यानंतर शेअर - बाजारात रीतसर उलाढाल होत खाजगी व्यक्ति अथवा /आणि संस्था यांना ते शेअर्स मिळू शकतील . यातूनच या शेअर्सचे बाजार - भावही ठरतींल आणि किचकट प्रक्रियात्मक विलंब ही टळेल .
या प्रस्तावांचे हे एकमेव वैशिष्ठ्य नाही . यासाठी केलेली कंपन्यांची निवड ही दाद देण्याजोगी आहे .
यंदाच्या अर्थसन्कल्पातील अशा प्रस्तावातील एक कंपनी आहे IRCTC . निश्चलननिकरन ( DEMONITISATION ) च्या निर्णयानंतरच्या पहिल्याच अर्थान्कल्पात अशा प्रस्तावाबाबत IRCTC असणे हे मोठे सूचक , प्रातिनिधिक आहे . कारण DEMONITISATION चा जुळा भाऊ असा धोरणात्मक निर्णय म्हणजे रोकड - विरहीत अर्थव्यवस्थेकडे वाटचाल . अशा व्यवहार - पद्धतिचे अगदी निश्चलननिकरनाच्या निर्णयांच्याही आधीपासूनचे ठळक उदाहरण म्हणजे IRCTC . कारण या कंपनीच्या व्यवहारांमधे तिच्या कारभाराच्या सुरवातीपासूनच रोकड पैशात बिल चूकते करण्याची मुभा मिळतच नाही . ते सदैव एलेक्ट्रॉनिक पद्धतीनेच द्यावे लागते .त्यामुळे व्यवहारात पैसे न मिळण्याचे कारण जन्मालाच येत नाही . अशा अर्थाने या पद्धतीचा IRCTC ही कंपनी BRAND AMBASADOR ठरेल . आता शेअर - बाजारातील नोंदणीने त्याची द्रुश्यमयता ( VISIBILITY ) एका वेगळ्या तर्हेने वाढेल . मुळातच ही कंपनी आणि त्याचे सर्विस पोर्तल सर्वद्न्यात आहे . ना त्याला वयाचे बंधन आहे , ना भौगोलिक घटकांचे . ना त्याला वेळेचे बंधन आहे ; ना वाहतूक क्षेत्राचे . तसे पाहता हे पोर्तल आहे रेल्वेचे . पण त्यावर रेल्वेच्या बरोबरीने विमान आणि बस चेही तिकीट काढता येते . अगदी HOTEL ही बुक करता येते . अशा अर्थाने ते मोदी सरकारच्या CONSOLIDATION च्या धोरणाचेही प्रातिनिधिकरीत्या उदाहरण आहे . त्याव्यतिरिक्त IRCTC दर दिवशी लक्षावधी व्यवहारांचा भार लीलया सोसत असते हे लक्षात घेतले तर मोदी सरकारच्या DIGITAL INDIA चेही झळाळत उदाहरण ठरेल . या सर्वच गोष्टींचा विचार करता IRCTC च्या शेअर्सची शेअर - बाजारातील नोंदणी लाभान्श ( DIVIDEND ) आणि भांडवल - व्रुद्धी ( CAPITAL APPRECIATION ) या दोन्ही निकन्शान्वर भागधारकाना कीती लाभदायक ठरू शकते हे जरूर विचारात घेण्याजोगी बाब आहे . अशा नोंदणी नंतर सरकारच मोठा आणि महत्वाचा भागधारक असणार आहे हा पैलूही इथे तितकाच महत्वाचा आहे .
याचं अर्थसन्कल्पातील याच मालिकेतील दुसरी कंपनी म्हणजे IRFC . सर्वसामान्य भारतीय नागरिकांना ही कंपनी तशी अपरिचित . निदान IRCTC इतकी तर नक्कीच माहीत नाहीँ . पण वित्तीय क्षेत्रात कार्यरत असनार्याना हे नाव सरावाचे आहे . विशेषतः ट्रस्ट , मोठ्या ग्रुहनिर्माण कंपन्या , ग्रुहसन्कुले , बँका , पतसंस्थां , वित्तसन्स्था यांना त्यांच्याजवळच्या पैशान्ची ज्यात गुंतवणूक करता येते अशा " ELIGIBLE SECURITIES " च्या यादितले NHAI व MHADA यांच्या पाठोपाठचे सदाबहार नाव म्हणजे IRFC . आजमितिला ही कंपनी प्रामुख्याने त्यांच्या कर्जरोख्यान्साथि प्रसिद्ध आहे . हा " ELIGIBLE SECURITY " चा शिक्का मिरवत आता या कंपनीचे समभाग ( शेअर्स ) एका अनोख्या " विश्वासार्ह्यता " च्या परिवेशासकट शेअर - बाजारात पदार्पण करतील . हे नवोदित तसेच जाणकार गुंतवणूकदारान्साठी चांगली संधी ठरू शकते . या माध्यमातून रेल्वेच्या प्रकल्पांच्या वित्त - पुरवठ्याचे चित्र चांगल्या अर्थाने बदलू शकते .
या मालिकेतील यंदाच्या अर्थसन्कल्पातील तिसरी कंपनी म्हणजे IRCON . रेल्वेच्या उत्पादन क्षेत्राशी निगडीत अशी संस्था . MAKE IN INDIA ची प्रक्रिया पुढे नेनारा असा निर्णय .
या तीन कंपन्यांची अशी निवड करनार्यान्च्या कल्पकतेला मनापासून दाद द्यावी लागेल . त्याची वेळ , त्याची संगती सगळेच अनोखे आहे . या तिन्ही कंपन्या जरी रेल्वे शी संबंधीत असल्या तरी त्या तीन वेगवेगळ्या प्रकारच्या कामकाजात आहेत . कारण IRCTC एक सर्विस पोर्तल , IRFC ही एक वित्तीय कंपनी तर IRCON ही एक उत्पादन क्षेत्रातील कंपनी . ही सांगड आवर्जून लक्षात घेण्याजोगी आहे .
तसाच विचार करत असताना खरं म्हणजे गेल्या वर्षीच्या अर्थसन्कल्पात उल्लेख असूनही , आजपर्यंत त्याबाबत काहीच पुढील कार्यवाही झालेली नसल्यामुळे , या वर्षात ती पूर्ण करण्याचे सांगण्यात येत आहे , अशी गोष्ट म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील चार कंपन्यांच्या समभागान्ची ( आपल्या मराठीत सांगायचे तर शेअर्स ची ) शेअर - बाजारात नोंदणी . पुन्हा ही निवड उल्लेखनीय आहे . कारण मुळातच विमा म्हणजेच इन्शुरेन्स हा प्रकार , आणि त्यातही सर्वसाधारण विमा म्हणजेच जनरल इन्शुरन्स , हा प्रकार हवा त्या प्रमाणात आणि हवा त्या अर्थाने आपल्या देशात रुजलेला नाही . शेअर - बाजारातील नोंदणीने त्याची द्रुश्यमयता VISIBILITY वाढेल असाही त्यामागील विचार असावा . पुन्हा हा विचार आर्थिक द्रुश्त्याही आतबतात्यांचा नाही . कारण सर्वसाधारण विमा हा तरलता ( LIQUIDITY ) , नफा मिळवणयाची क्षमता ( PROFITABILITY ) या निकषांवर पूर्णपणे उतरणारा आहे . कारण अशी विमा पॉलिसी ही एका वर्षासाठीच असते . ती घटना घडो , अथवा न घडो , ही पॉलिसी दरवर्षी घ्यावीच लागते . गेल्या शंभर - सव्वाशे वर्षांचा सर्वसाधारण विमा क्षेत्राचा जागतिक इतिहास असं सांगतो की जर वर्षभरात अशा शंभर पॉलिसी दिल्या तर संबंधित वर्षात फक्त दोन पॉलिसी मधे अशी नुकसान - भरपाई द्यावी लागते . म्हणजे यांतील उत्पन्न आणि नफा याचा आणि त्याचा नोंदणी नंतर बाजारात या शेअर्सचे बाजारभाव ठरण्यात कीती सकारात्मक परिणाम होऊ शकतो याचा अंदाज सहज बांधता येईल .
याबाबतच्या निर्णयांतून मिळणारा एक महत्वाचा संकेत हा आहे की येणाऱ्या काळातील आपल्या देशाचे अर्थकारणाचा पोत , बाज आणि नूर वेगळा असेल . ( हा एक स्वतंत्र लेख - मालेचा , पुस्तकाचा , व्याख्यान - मालेचा विषय आहे . )
या न्यायाने गेल्या वर्षी सर्वसाधारण विमा क्षेत्रातील कंपन्या , यंदा रेल्वेशी संबंधित कंपन्या या मालिकेत येणाऱ्या काळात आयुर्विमा महामंडळ , पोस्ट यान्चीही शेअर - बाजारात नोंदणी होऊ शकते .
आणि म्हणूनच १ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी २०१७ या १५ दिवसांत मी केलेल्या माझ्या २५ भाषणात यंदाच्या अर्थसन्कल्पाचे वर्णन असं केले आहे की " या अर्थसन्कल्पाने २०१७ - १८ या वर्षात मला काय दिले हे महत्वाचे नसून २०१७ या सालापासून आपल्या देशाचे अर्थकारण कसे असेल याबाबत हा अर्थसंकल्प काय संकेत देतो हे जास्त महत्वाचे आहे " .
याबाबत मला फक्त एकच प्रश्न आहे की जर हे माझ्यासारख्या अतिशय सर्वसामान्य माणसाला हे जाणवते , तर मग अर्थसन्कल्पाच्या या आगळ्या - वेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण पैलू बाबत एरवी इतके बोलणारे सरकारी पक्षाचे प्रवक्ते आणि परिवारातील ज्येष्ठ - श्रेष्ठ , सर्वगामी पत्रकार याबाबत का बोलत नाहीत ? असे असेल की पक्ष - प्रवक्ते सध्या सुरू असलेल्या निवडणुक प्रचाराच्या रण - धुमाळींत , तर ज्येष्ठ - श्रेष्ठ पत्रकार महापालिकेच्या निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यायचा हे ठरवण्यात व्यस्त असावेत.
असो.
-चंद्रशेखर टिळक
१५ फेब्रुवारी २०१७ .
एमेल : tilakc@nsdl.co.in
माणसामाणसांच्या नात्यातून कुटुंब बनते, तर नात्यांपलीकडील भावनांतून परिवार घडतो. परिवार उमजायला भावनांची गरज असते. कुटुंब आणि परिवार यातील परस्पर भिन्नता, पूरकता विषद करणारा, व्यास क्रिएशन्स द्वारा प्रकाशित “चैत्र पालवी” या नियतकालिकाच्या “सावरकर परिवार विशेषांक” मध्ये डॉ. अनुराधा कुलकर्णी यांनी लिहिलेला लेख
भारतीय गुंतवणुकदारांना म्युच्युअल फंड व आयुर्विमा क्षेत्रातील युलीप हे गुंतवणुकीचे दोन पर्याय उपलब्ध होऊन बरीच वर्षे होऊन गेली आहेत. छोट्या छोट्या रकमांपासून गुंतवणुक करण्याची सोय, चार वेगवेगळ्या प्रकारच्या फंडांमधे गुंतवणुक करण्याची सुविधा, चक्रवाढ पद्धतीने मिळणारा परतावा व लवचिकता या मुळे म्युच्युअल फंडांच्या योजना मोठ्या प्रमाणावर लोकप्रीय झाल्या.
एप्रिल महिन्याचा पहिला दिवस. ह्या दिवशी गमतीने एखाद्यास बनविण्याची प्रथा पाश्चिमात्य राष्ट्रांत प्रामुख्याने दिसून येते. बनलेल्या व्यक्तीस ‘एप्रिल फूल’ म्हणण्याचा प्रघात आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti