(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सर्वात मोठ्ठे कन्फुजन….

    किती आहे भुजबळांची मालमत्ता?

    - नाशिक भुजबळ फार्म - 5 कोटी
    - राम बंगला, नाशिक - दीड कोटी (समीर भुजबळ)
    - गणेश बंगला, नाशिक - 1 कोटी
    - 3 एकर जमीन, नाशिक - 25 कोटी
    - भुजबळ पॅलेस - 60 कोटी
    - ठाण्यात पारसिक बंगला - पाच कोटी
    - सुखदा बंगला - 6 कोटी
    - येवला ऑफिस आणि बंगला - 10 कोटी (पंकज)
    - मनमाड येथील जमीन - 10 कोटी
    - दिंडोरीतील द्राक्ष मळा - पाच कोटी (पंकज)
    - माणेक महल, चर्चगेट - पाच कोटी (पंकज)
    - माहिममधील फ्लॅट - पाच कोटी
    - नवी मुंबईतील घर आणि दुकान - पाच कोटी
    - 30 एकर जमीन - 600 कोटी
    - पेंटिंग आणि परदेशी आर्ट पीस - 100 कोटी
    - जुहूच्या वसुंधरा सोसायटीत दोन फ्लॅट - 40 कोटी
    - 60 किलो सोने - 18 कोटी
    - हिरे - 10 कोटी
    - वाहने - रेंज रोव्हर 2 कोटी, बीएमडब्ल्यू 7 सीरिज सव्वा कोटी, लॅण्ड क्रूझर 50 लाख, मर्सीडीज टू 1 कोटी
    - आर्मस्ट्रॉंग एनर्जी - 200 कोटी
    - नाशिकचा पॉवर प्लॅंट - 25 कोटी
    - नाशिक शिलापूर येथे जमीन - 30 कोटी
    - गिरणा शुगर मिल - 30 कोटी
    - आर्मस्ट्रॉंगच्या इन्फ्रास्ट्रक्‍चरच्या नावाने 250 एकर जमीन - 100 कोटी
    - भुजबळ वाईन्स - 155 कोटी
    - नाशिकची कन्सल्टिंग कंपनी - 10 कोटी
    - मुंबईतील दादर येथे इन्फ्रा कंपनी - 35 कोटी
    - देविशा इन्फ्रा, नवी मुंबई - 600 कोटी
    - "बलु सर्कल'च्या नावाने गुंतवणूक - 600 कोटी
    - भावेश बिल्डर - 50 कोटी
    - परवेश कन्स्ट्रक्‍शन - सांताक्रूझ निवासस्थान, वांद्रे येथे हाफिज महल, लोणावळा येथे बंगला व हेलीपॅड आणि नाशिक येथे निवासी इमारत - 330 कोटी
    - आर्मस्ट्रॉंग प्युअर वॉटर - 35 कोटी
    - नाशिक एमआयडीसीत जय इलेक्‍ट्रॉनिक्‍स प्रा. लि. - 25 कोटी
    - माझगाव येथे राबरेक्‍स इंडस्ट्री - 25 कोटी
    - पनवेल येथे सुवी रबर प्रा. लि. साठी शेड - 2 कोटी
    - बाभूळगाव- येवला येथे 105 एकर जमीन - 25 कोटी
    - वांद्रे येथील फ्लॅट - 5 कोटी
    - भुजबळ वाईन्सच्या नावाने उज्जैन येथे 350 एकर जमीन - 60 कोटी

    हि सर्व दादरला रस्त्यावर भाजी विकून मिळवलेली संपत्ती आहे, असेही त्यांनी जाहीर करावे.

    भुजबळ "निर्दोष" (!!) सूटण्या आधी आख्या महाराष्ट्राला हे कळु दे...

    -- मकरंद

  • दसरा, कोजागिरी आणि आपले स्वास्थ्य

    दसरा आणि कोजागिरी पौर्णिमा हे अश्विन महिन्यातील महत्वाचे दिवस. आयुर्वेदाच्या दृष्टीनेही हे दिवस किंवा सण तसेच महत्वाचे आहेत कारण त्यांचा आपल्या स्वास्थ्याच्या दृष्टीने महत्वाचा संबंध आहे.

    भाद्रपद महिन्यात गणपतीची धावपळ आटोपते आणि मध्ये १५ दिवस गेले की नवरात्र सुरु होतं .हा बदल होताना वातावरणही बदलत असतं ,पाऊस कमी होऊन हळूहळू परतीचा रस्ता धरतो आणि पिवळेधमक ऊन पडायला सुरुवात होते ,वातावरणात उष्णता जाणवू लागते ज्याला आजच्या आधुनिक भाषेत " ऑक्टोबर हिट" असे म्हणतो.दुपारच्या वेळात चांगलाच उन्हाचा तडाखा वाटायला लागतो .

    हे बदल आपल्या शरीरातही काही मोठे बदल घडवून आणतात.पावसाळ्यात पाऊस पडू लागला की नवीन पाणी पचायला तर जड असतेच पण अम्लविपाकी असते म्हणजे शरीरात आंबटपणा वाढवणारे असते ,तसेच दमट ,थंड अशा पावसाळी हवेचा परिणाम म्हणून शरीरात पित्त दोष वाढू व साठू लागतो .पुढे पाऊस थांबून ऊन पडले की ह्या साठलेल्या पित्ताचा प्रकोप होतो म्हणजेच उद्रेक होतो आणि काही विशेष लक्षणे दिसू लागतात .

    छातीत जळजळ होणे ,घशात आंबट पाणी येणे,मळमळ होणे ,उलटी होणे ,डोके दुखणे ,अंगावर पित्ताच्या गाठी उठणे ,नाकातून रक्त येणे ,नागीण,डोळे तसेच तळहात ,तळपाय यांची आग होणे ,उष्ण मूत्रप्रवृत्ती होणे ,अंगावर कुठेतरी बेंड उठणे असे अनेक उष्णतेशी निगडीत व्याधी अचानक डोके वर काढतात .
    आयुर्वेद हे शास्त्र केवळ आजार बरे करणारे शास्त्र नाही तर आजार होऊच नयेत म्हणूनही ते फार महत्वाचे काम करते ज्याला आजच्या भाषेत " Preventive Aspect " म्हटले जाते.हे बदल नैसर्गिकपणे घडणारच आहेत पण त्यामुळे आपले स्वास्थ्य बिघडू नये म्हणून या दिवसात काय खावे ,प्यावे ,काय पथ्य पाळावे ,कोणती शरीरशुद्धी करावी की जेणेकरून आपले आरोग्य अबाधित राहील या विषयी आयुर्वेद मार्गदर्शन करतो.

    वाढलेले पित्त शरीराबाहेर काढून टाकावे म्हणजे व्याधी निर्माणच होणार नाहीत,ह्या साठी या दिवसात म्हणजेच "शरद" ऋतूत विरेचन ही पित्ताची शुद्धि करणारी ,जुलाबावाटे दोष शरीराबाहेर काढून टाकणारी पंचकर्मातील क्रिया करून घ्यावी.

    त्याचप्रमाणे रक्तातील दोष ,उष्णता निघून जावी आणि नवीन रक्त तयार व्हावे या दृष्टीने " रक्तमोक्षण " ही शुद्धीक्रियाही वैद्यांच्या सल्ल्याने जरुर करून घ्यावी.यामध्ये ठराविक प्रमाणात रक्त शिरेवाटे बाहेर काढून टाकले जाते.

    खाण्यात पित्तशामक पदार्थांचा वापर करावा ,गोड किंवा मधुर रसाचे पदार्थ अधिक असावे .त्यामुळे दूध ,तूप यांचा वापर नियमित करावा.त्यासाठीच दसऱ्याच्या दिवशी आपल्याकडे श्रीखंड ,बासुंदी असे पक्वान्न करायची पद्धत आहे जी अतिशय शास्त्रीय आहे.याच हेतूने कोजागिरी पौर्णिमेला चंद्राच्या शीतल प्रकाशात आटीव दूध थंड करून पिण्याची पद्धत आहे.या पूर्वापार चालत आलेल्या परंपरांचा आपण आदर करायला हवा कारण त्यात शास्त्रीयता लपलेली आहे .उगीचच fad म्हणून एखादी गोष्ट मुद्दाम बदलायचा प्रयत्न करू नये कारण त्यात आपलेच नुकसान आहे .हल्ली कोजागिरीला भेळ आणि दूध किंवा पावभाजी आणि दूध असे काहीतरी चमत्कारिक combination खायची पद्धत रूढ झाली आहे जे विरुद्धान्न आहे.भेळ बनवताना आपण चिंच ,tomato अश्या आंबट पदार्थांचा वापर करतो आणि पावभाजी बनवताना त्यात भरपूर tomato ,लिंबू वापरतो,या नंतर गोड दूध पिण्याने ते सगळेच अम्लगुणाचे होते ,जणू नासतेच आणि मग जळजळ होऊ लागते .त्यामुळे या वर्षी आपल्याकडून अशी काही चूक होणार नाही याची आपण नक्की दक्षता घेऊया.

    फळे खाताना डाळिंब नक्की असूद्या .पुढे लक्ष्मीपूजनालाही याच हेतूने सगळ्या पित्तशामक वस्तूंचा वापर सांगितला आहे .साळीच्या लाह्या,डाळिंब आणि बत्तासे !! त्या सगळ्या गोष्टीचा नक्की वापर करूया आणि आपणच आपले स्वास्थ्य रक्षण करूया .

    -- वैद्य राजश्री कुलकर्णी
    M.D. (आयुर्वेद)

    -- `आरोग्यदूत' WhatsApp ग्रुपवरुन

  • पिंगपाँग डिप्लोमसीची ५२ वर्षे

    १९७० च्या दशकात चीन आणि अमेरिकेमधील संघर्ष कमी करण्यात मोलाची भूमिका चीनचे टेबल टेनिस टेनिसपटू ‘जुआंग डुंग’ यांनी बजावली होती. त्यांनी घेतलेल्या पावले ‘पिंग पोंग डिप्लोमसी’ म्हणून ओळखली जाते. १९७१ मध्ये जपान माढेल नगोया मध्ये झालेल्या विश्व चैंपियनशिप स्पर्धेच्या दरम्यान अमेरिकी खेळाडू ग्लेन कान यांची बस सुटली तेव्हा चीनच्या टीमने त्यांना आपल्या बसने त्यांना मैदानात पोहचवले होते. पुढे झालेल्या सामन्यात जुआंग डुंग यांनी अमेरिकन क्रीडापटू ग्लेन कान यांना एक सिल्कचे पेंटिंग भेट केले होते. आपल्या दुभाषीच्या मदतीने जुआंग डुंग यांनी ग्लेन कान यांना सांगितले अमेरिकी सरकारचे चीनच्या सोबत दोस्तीचे संबध नाहीत पण अमेरिकन लोक चिनी लोकांचे मित्र आहेत. मी तुम्हाला ही फ्रेम चिनी लोकांच्या कडून दोस्ती खुण म्हणून देत आहे. जेव्हा या दोघांच्या भेटीची बातमी पेपर मध्ये आल्यावर चीनचे नेते माओत्से तुंग यांनी विदेश मंत्रालयाला आदेश दिला की अमेरिकी टीमला चीन बोलवा.

  • जागतिक इडली दिवस

    इडलीचा जेव्हा विषय येतो तेव्हाअप्रत्यक्षपणे साऊथचे म्हणजे दक्षिण भारताचे नाव समोर येते. पण असे म्हणतात इडली इंडोनेशियातून भारतात आलेली आहे. इडलीला खूप जूना इतिहास आहे. पाक शास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांच्या मते ८०० ते १२०० इ.पूर्वमध्ये भारतात इडली आली आहे. ‘इडली’ शब्दा ची निर्मिती ‘इडलीग’ यापासून झाली होती. याचा उल्लेख ‘कन्नड’ साहित्यात आढळतो.

  • आहाररहस्य १

    जसा देश जसा वेश तसे खावे… जशी प्रकृती जशी पचनशक्ती तसे पचवावे…

  • सुलम ( सूक्ष्म, लघु व मध्यम ) उद्योग : कॉर्पोरेट जगाचे बँकर्स

    सुलम उद्योजक संघटनांनी पाठ पुरावा करून नोंदणी व बिलावर नोंदणी क्रमांक जाहीर करणे बंधनकारक करून घेतल्यास, ही पळवाट ताबडतोब बंद होईल.कारण देयक सुलम उद्योगाचे असल्याचे माहित नव्हते असे कंपन्यांना म्हणता येणार नाही.असे झाल्या खेरीज कोर्पोरेत जगाच्या बेमुदत – बिनव्याजी- थकबाकी च्या फेर्यातून सुलम उद्योगाची सुटका होणार नाही.

  • आजचा विषय – ताडगोळा

    उन्हाळा कडक जाणवू लागला आहे पारा दिवसागणिक वाढू लागला आहे. कडकडीत उन्हामुळे लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्व जण तहानेने व्याकुळलेले असताना तहान भागवण्यासाठी बहुतेकांची पावले सहजपणे शीतपेयांच्या दुकानांकडे वळू लागत आहेत. याशिवाय नारळपाणी, कलिंगड इत्यादी तहान भागवण्यासाठी पारंपरिक उपायही योजले जात आहेत. या उष्म्यामध्ये तहान भागवण्यासाठी तसेच शरीराला थंडावा देण्यासाठी ताडगोळे खरेदी करण्यालाही अधिक पसंती आहे. कोकणातून येणारे ताडगोळे बाजारात जागोजागी दिसू लागले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात उष्णतेचा तडाखा शरीरातील उर्जा कमी करतो. अशावेळेस आहारातून, फळांमधून, भाज्यांमधून शरीरात पाण्याचा आणि उर्जेचे समतोल राखण्यासाठी प्रयत्नपूर्वक काळजी घेणे आवश्यक आहे. शहाळ्याचं गोड पाणी आणि पातळ मलई जशी आपल्याला रिफ्रेश करते. तसेच भारतीय किनारपट्टीवर ‘ताडगोळा’ हे फळ या दिवसात मुबलक प्रमाणात आढळते. लिचीप्रमाणे आवरण असणारे पारदर्शक आणि पाणीदार लहानसे फळ म्हणजे ताडगोळा. पाल्म किंवा ताडाच्या झाडाला येणारं फळ म्हणजे ताडगोळा हे होय. याचं शास्त्रीय नाव बोरासस फ्लॅबिलिफर असं आहे. याला फ़ॅन पाम असेही म्हणतात. हे फळ महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. समुद्रकिनारी प्रामुख्याने लागवड होते. बंगालमध्ये ‘ताल’, तेलगूमध्ये ‘ताती मुंजलू’, तामिळमध्ये ‘नुन्गू’, इंग्रजीमध्ये ‘आइस अॅ्पल’ तर हिंदीमध्ये ‘तारी’ या नावाने ओळखलं जातं. आशिया, न्यु गिनी आणि आफ़्रिकेतही हा आढळतो. याच्या पानाचे अनेक उपयोग होतात. पंखे, चटया, ताट्या वगैरे करण्यासाठी उपयोग होतो. पुर्वापार याची लागवड केली जातेय, कंबोडियाच्या जगप्रसिद्ध अंगकोर मंदिरसमुहाच्या परिसरात या झाडांची लागवड केली आहे. भुर्जपत्र करण्यासाठी याच्या पानांचा उपयोग होतो. ही पाने हळद आणि मिठाच्या पाण्यात उकळुन वाळवतात. मग त्याना दगडाने पॉलिश केले जाते. अनेक जुने ग्रंथ या पानांवर लिहिलेले आढळतात. तामिळनाडु मधे अनेक जणांचे भविष्य असे लिहुन ठेवलेले आहे. लोक तिथे हौसेने ते वाचायला जातात. आणि ती व्यक्ति तिथे कधी येणार आहे तेही, त्या पत्रांवर लिहुन ठेवलेले आहे. याच्या पानाच्या दांड्यांचा कुंपणासाठी उपयोग होतो. या पासुनच जाडसर काथा निघतो आणि त्याचा ब्रश वगैरे करता येतो, झाडाचे लाकुडही मजबुत असते आणि घरबांधणीत त्याचा उपयोग होतो. या झाडापासुन ताडी मिळते, ती आंबवुन मादक पेय करतात. याही झाडापासुन नीरेसारखे पेय मिळते. ते आटवुन गुळही करता येतो, तो गुळ उसापासुन केलेल्या गुळापेक्षा चवदार लागतो. आपल्यापेक्षा तामिळनाडुमधे या झाडाचा खाण्यासाठी जास्त उपयोग होतो. या झाडाचे कोंब, कोवळी रोपे खातात. तसेच झाडाच्या टोकाशी एक मऊ गर तयार होतो, तोही खातात. या झाडाची पानं सदाबहार हिरवीगार आणि आकाराने मोठी असतात. ताडगोळे हे अतिशय मऊ, रसदार असून त्यावर जाड साल असते. ही साल काढणं म्हणजे कंटाळवाणं काम असतं. सालीचा रंग पिवळसर केशरी असून आतील गराचा रंग करडा किंवा पांढरा असतो. चवीला गोड असून प्रकृतीने थंड असणारं हे फळ आहे. पाणीदार फळ असून ते कापायची गरज भासत नाही. या फळाची प्रवृत्ती थंड असून हे फळ उन्हाळ्यात खाणं आरोग्याच्या दृष्टीने चांगलं आहे. यात खनिज, लोह, पोटॅशिअम, फॉस्फरस आणि ए, बी, सी या जीवनसत्त्वांचा भरपूर साठा आहे. त्यामुळे एकंदरीतच शरीराला अतिशय उपयुक्त ठरतं. ताडगोळा हे चवीला गोडसर असते.

    ताडगोळ्याचे आरोग्यदायी फायदे

    ताडगोळा थंड स्वरूपाचा असल्याने शरीरात थंडावा निर्माण करण्यास मदत करतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या उष्णतेचा या दिवसात त्रास होण्यापासून बचाव होण्यास मदत होते.
    ताडगोळ्यामध्ये सोडीयम,पोटॅशियम यासारख्या मायक्रोन्युट्रीअंट्सचे प्रमाण मुबलक प्रमाणात आढळते. यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाईट्स आणि पाण्याचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. यामुळे उन्हाळ्यात जाणवणारा डीहायड्रेशन आणि उष्माघाताचा त्रास कमी होतो. परिणामी थकवा जाणवत नाही. यात भरपूर प्रमाणात पोटॅशिअम आणि फायबरचा साठा असतो. हे फळ तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखण्याचं काम करतं, त्याचबरोबर शरीराचं तापमान नियंत्रित राहतं. उन्हाळ्याच्या दिवसांत या फळाचे आवर्जून सेवन करावे. उष्णतेमुळे होणारी पोटातली जळजळ कमी होण्यास मदत होते. उन्हामुळे लहान मुलांना किंवा मोठय़ा माणसांनाही त्वचेवर पुरळ किंवा अॅयलर्जी होते. ताडगोळ्यांचा गर पुरळ आलेल्या ठिकाणी लावल्यास लवकर आराम पडतो. उन्हाळ्याच्या दिवसांत हे फळ आवर्जून खावं, कारण या दिवसांत काही जणांना उन्हाळे लागतात, ही जळजळ कमी होते. हे फळ या दिवसांत फ्रीजमध्ये साठवून ठेवावं. बाहेर ठेवल्यास हे लवकर खराब होतं. त्यामुळे त्याची साल न काढता फ्रीजमध्ये साठवून ठेवल्यास दीर्घकाळ टिकतं. सुट्टीच्या दिवसांत मुलं अधिक वेळ घराबाहेर असतात, अशा वेळी त्यांना हे फळ खाऊन मगच बाहेर पडायला सांगावं. ताडगोळ्याचा फेसपॅकही अतिशय उत्तम होतो. यासाठी चंदनाची साल उगाळून घ्यावी. त्यात थोडं नारळपाणी आणि ताजा ताडगोळा कुस्करून घालावा. याची चांगली पेस्ट तयार करून ती चेह-याला लावावी. फ्रेश वाटतं आणि उन्हामुळे रापलेली त्वचा उजळते. किडणीच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असून शरीराला नको असलेली द्रव्यं याच्या सेवनाने बाहेर फेकली जातात. याच्या सेवनाने बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. कांजण्या आलेल्या रुग्णांनी हे फळ खावं म्हणजे कांजण्यांमुळे अंगाला येणारी खाज कमी होते. शरीरातील साखरेची पातळी संतुलित राहते. याचं सेवन केल्यावर अधिक भूक लागत नाही, त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.

    ताडगोळ्याचे घरगुती उपयोग

    उष्णतेमुळे लघवी जळजळ होत असेल तर कोवळा ताडगोळा खडीसाखर घालून खावा.
    डोळ्यांची आग होत असल्यास ताडगोळा त्याच्याच पाण्यात वाटून तो लेप पापण्यांवर लावावा.
    गळू पिकत नसल्यास जून ताडगोळा वाटून त्यात हळद घालून गरम करावा व त्या गळूवर बांधावा.
    ज्या व्यक्तींना शरीरात वात वाढल्याने संडासला घट्ट होत असेल अथवा साफ होत नसेल तर जेवणापुर्वी व जेवणानंतर काही वेळाने १ ताडगोळा खावा. अंगामध्ये उष्णता वाढणे,हातापायांची आग होणे,पोटात आग होणे ह्यात ताडगोळा खाण्याने फायदा होतो. ताडगोळा अतिमात्रेत खाल्ल्याने सर्दी,खोकला,जुलाब होतात.

    सीताफळ – ताडगोळा मूस कस्टर्ड

    साहित्य. :५०० ग्रॅम सीताफळ आइस्क्रीम, २०० ग्रॅ. ताडगोळे (बारीक तुकडे केलेले), ४० ग्रॅम जिलेटिन पावडर, ५०० मिली दूध, १०० ग्रॅम साखर, २ अंडी, २ चमचे व्हॅनिला इसेन्स.

    कृती. : एका भांडय़ात साखर, अंडी, व्हॅनिला टाकून मिक्स करावे. जिलेटिन पावडर अर्धा कप पाणी घेऊन त्यात भिजत ठेवावी. सीताफळ आइस्क्रीम मेल्ट करून घ्यावे. एका भांडय़ात दूध घेऊन गॅसवर उकळत ठेवावे. एक उकळी आल्यानंतर लगेच काढून साखर व अंडी त्या मिश्रणात घालून मिक्स करावे. त्यातच लगेच भिजवलेली जिलेटिन पावडर टाकावी. सर्व नीट मिक्स करून गाळून घ्यावे. त्यात आइस्क्रीम व ताडगोळ्याचे तुकडे टाकून काचेच्या भांडय़ात ओतून फ्रीजमध्ये ४ ते ५ तास ठेवावे. व्यवस्थित सेट झाल्यावर थंड सव्‍‌र्ह करावे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • जागतिक वारसा सप्ताह

    कोरीव मंदिरे, लेणी, तेथील दगडात कोरलेली शिल्पे आणि त्यांचे सौदर्य यांचा अभ्यास भारतीय विद्या या शाखेत केला जातो. निसर्ग आणि मानव हे एकमेकांच्या साह्चार्याने राहतात त्यामुळे वन्य जीव, पशु आणि पक्षी, निसर्गातील वैविध्य यांची काळजी घेणे यासातही अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्याने यांचे महत्व अविवाद्य आहे.

  • वर्षा ऋतु – गर्भसंस्कार…. एक दृष्टीकोन

    वर्षा ऋतु-

    निरुक्ति- वर्षणं वृट विष | वर्षनम् अत्र अस्ति अंश आद्यश्च टाप=वर्षा:|
    मास- श्रावण, भाद्रपद
    इंग्रजी- जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर
    रास- सिंह
    ऋतुलक्षण- वर्षा हा विसर्गकाळातील ऋतु आहे.
    “आदानग्लानवपुषाअग्नि: सन्नो sऽ पि सीदति |
    वर्षासु दोषैः इष्यन्ति तेऽम्बुलम्बाम्बुरेम्बरे ||
    सतुषारेण मरुता सहसा शीतलेन च |
    भूबाष्पेणाम्लेपायेन मलिनेन च वारिणा ||
    वन्हिनैव च मन्देन तोष्विन्यन्योन्वइषिषु |
    भजेत् साधारणं सर्व उष्णं तेजपनं च यत् ||”
    वा. सु. ३

    अग्नि- शिशिरादि इतर तीन विसर्ग काळातील ऋतुंच्या उष्णतेच्या योगाने शरीर निःसत्व होऊन त्यांचा अग्नि मंद झालेला असतो. अशा वेळी वर्षाऋतूत दोषांचा प्रकोप होतो व अग्नि अधिकच मंद होतो.
    दोषावास्था- वर्षा ऋतूत बल व अग्नि क्षीण झाल्याने पित्ताचा संचय होण्यास सुरुवात होते.
    रस- वर्षा ऋतुत अम्ल रसाची वृद्धि होते.

    वर्षा ऋतुतील दोषस्थितीचा जननेंद्रियावर होणारा परिणाम-
    प्रजनन संस्थेतील सर्व अवयव हे अपान क्षेत्रात येतात. वर्षा ऋतूत वातप्रकोप होत असतो. सृष्टीतील शैत्याधिक व अम्लविपाकी जल यामुळे वात पित्त कफ ह्या तीनही दोषांवर त्याचा अधिक परिणाम होतो. सृष्टीतील क्लेदाधिक्यामुळे स्थानिक (जनेनेंद्रियांवर) जिवाणु विषाणूजन्य विकार उदा. Candidiasis, Trichomonas, इ. अनेक विकार होतात.
    स्त्रियांच्या अनुषंगाने विचार केल्यास
    “ न हि वातादृते योनि नारीणां संप्रदुष्यति ||”
    च. चि. ३०

    अनियमित रजस्त्राव, नष्टार्तव, अल्परजस्राव ३ विकार हे वाढतात. स्थानिक विकारांमध्ये आर्द्रतेमुळे व शैत्यामुळे योनिकण्डु, मुत्रादाह, श्वेतस्त्राव ३ विकार संभवतात. अम्लविपाकी जलामुळे पित्तसंचय होतो व पित्ताच्या आश्रयाने असणाऱ्या रक्त धातूची दुष्टी होते. त्यामुळे त्याचा परिणाम रजावर होतो.
    पुरुष- अग्नि व बलं क्षीण झाल्याने मैथुन सामर्थ्य कमी होतो
    वर्षा ऋतु-मैथुन कालावधि-
    आचार्य सुश्रुत व वाग्भटांच्या नुसार १५ दिवसांच्या अंतराने मैथुन करावे व चरकानुसार वर्षा ऋतुत व्यवाय वर्ज्य करावा असे वर्णन आढळते.
    वर्षाऋतू व गर्भाधान-
    “ उद्मन्थ दिवास्वप्न अवश्यायं नदीजलम |
    व्यायाम आतपं चैव व्यवायं चात्र वर्जयेत् ||”
    आचार्य चरक व सुश्रूतांनी वर्षा ऋतुमध्ये मैथुन वर्ज्य करावे असे म्हटले आहे याचा एक अर्थ असाही होऊ शकतो की, वर्षाऋतुमध्ये आचार्यांना गर्भाधान अपेक्षित नाही.
    गर्भोत्पत्तीस आवश्यक घटक-
    आचार्य सुश्रूतांनी खालील चार घटकांचा उल्लेख केला आहे.
    “ध्रुवं चतुर्णां सानिध्यात गर्भा स्यात् विधीपूर्वकः |
    ऋतु क्षेत्र अम्बु बिजाणां सामग्र्यात अंकुरो यथा ||”
    “शुध्दे गर्भाशये मार्गे रक्ते शुक्रे ऽ निले हृदी |
    वीर्यवंत सुतं सुते.... ||”
    अ.हृ.शा १/१८.

    वरील सर्व श्लोकांचा विचार केला असता शारीरिक व मानसिक दृष्टीने निरोगी असणाऱ्या स्त्री व पुरुषाने संपूर्ण वीर्यात आयु प्राप्त झाल्यानंतर पुत्रप्राप्तीसाठी मैथुन कर्म करावे असे वर्णन आढळते.
    वरील प्रत्येक घटकाचा वर्षा ऋतुच्या अनुषंगाने विचार करूया-

    ऋतु-
    वर्षा ऋतुमध्ये वातप्रकोप असतो. त्यामुळे अनियमित रजःस्राव, अल्प रजःस्राव, कष्टार्तव हे विकार दिसून येतात. गर्भात्पत्तीसाठी नियमित ऋतु चक्र असणे गरजेचे आहे.

    क्षेत्र-
    आचार्य वाग्भटांच्या श्लोकांनुसार त्यांनी शुद्ध गर्भाशय व प्राकृत अनिल (अपान वायू) यांचाही गर्भसंभव सामग्रीमध्ये विचार केला आहे. पुरुष व स्त्री जननेंद्रिय अपान वायूच्या क्षेत्रात येतात. वर्षा ऋतुतील वातप्रकोप हा क्षेत्रदुष्टीसाठी व विकृत संतान उत्पत्ती साठी कारणीभूत ठरतो. तसेच सृष्टीतील शैत्य व आर्द्रतेच्या परिणामामुळे स्थानिक व्याधि निर्माण होऊ शकतात.

    अम्बु (आहार पाकोत्पन्न रस)-
    गर्भधारणा झाल्यानंतर गर्भाचे पोषण हे मातेकडून होत असते. गर्भधारणेवेळी असणाऱ्या मानसिक व शारिरीक स्थितींचाही गर्भावर परिणाम होत असतो. ह्याच अनुषंगाने आचार्य चरकांनी विमान स्थानामध्ये प्रकृतीचे वर्णन करताना मातु आहार, विहार, प्रकृति, काल, गर्भाशय प्रकृती असे वर्णन केले आहे.
    वर्षाऋतु अग्निमांद्य असल्याने गर्भधारणा झाल्यास अग्नि अधिक मंद होऊ शकतो व गर्भाच्या पोषणावर त्याचा परिणाम होऊ शकतो. तसेच गर्भोपघातकार भावांचा विचार केला असता मातेने वातप्रकोपक आहारविहार केल्यास विकृत संतान उत्पत्ती होण्याची दाट शक्यता असते.

    बीज-
    उत्तम गर्भ प्राप्तीसाठी अदुष्ट शुक्र शोणिताची आवश्यकता असते. वर्षा ऋतूमध्ये जल अम्ल विपाकी असते. त्यामुळे पित्ताचा क्षय व रक्त दुष्टी होऊ शकते. सुश्रुतांनी ‘रक्तंलक्षम् आर्तवं गर्भाकृत् च’ असे आर्तवाचे वर्णन केले आहे. त्यामुळे प्राकृत बीजनिर्मितीवर वर्षा ऋतुचा प्रभाव होऊ शकतो.
    अदुष्ट शुक्रबीजाचा विचार केला असता मैथुन सामर्थ्य व प्राकृत शुक्रनिर्मिती ही देहबलावर अवलंबून असते. त्यामुळे वर्षा ऋतुत देहबल कमी असल्याने त्याचा परिणाम शुक्रधातूच्या उत्पत्तीवर होतो.
    वर्षा ऋतुत गर्भधारणा झाल्यास पुढे येणाऱ्या शरदातील पित्त प्रकोपामुळे गर्भपात, गर्भस्त्राव होऊ शकतात.
    जन्मणाऱ्या बालकाच्या प्रकृतीवर व स्वास्थ्यावर वात दोषाधिक्य दिसू शकते. वरील सर्व गोष्टींचा विचार केला असता आचार्यांनी वर्षा ऋतूत व्यवाय वर्ज्य का सांगितला याची मीमांसा ध्यानात येते.
    आयुर्वेदाच्या दृष्टीने गर्भोत्पादन हे शुक्राचे श्रेष्ठ कर्म आहे व व्यवायाचे प्रमुख उद्देश ‘प्रजोत्पादन” असल्याने वर्षा ऋतूत व्यवाय वर्ज्य म्हणजेच गर्भधारणा न होऊ देणे हे आयुर्वेदीय संहिताकारांना अपेक्षित असावे.

    गर्भिणी व विशिष्ट आहाररस इच्छा-
    ज्याप्रमाणे वर्षाऋतुमध्ये निसर्गात वनस्पतींचा निर्मिती होत असते. त्याप्रमाणे गर्भिणी मध्ये गर्भाची नवनिर्मिती होत असते.

    वर्षाऋतुमध्ये सृष्टीची स्थिती-
    ‘ आद्भिः अम्लविपाकाभिः ओशाधीभिः समीरणाः |’ अशी असते. म्हणजेच अम्ल रसाची निर्मिती होते. याचप्रकारे गर्भिणीला अम्ल रसेच्छा होते.

    वर्षा ऋतु-
    पथ्यकर आहार-
    पुराण शाली, लाल षष्टिक, गहू, भाजलेले धान्य, पुराण जव, कुलत्थ, मूग, उडीद, जीरक, हिंग, काळे मिरे, जडवळ, माठ, कोथिंबीर, पुदिना, भेंडी, लसूण, कांदा, सुंठ, सुरण, कद्दू, बोर, ताक, दूध, उकळलेले पाणी (श्रृतशीत जल), सैंधव मीठ, मधु, निंबू, अजा मांस, दाडिम, अंगुर, गरम जेवण.

    पथ्यकर विहार-
    चंदन, खस आदि चूर्णाचा अभ्यंग, स्वच्छ, कोरडे व लघु (हलके) रंगाचे कपडे घालणे, कोरड्या जागेवर बसणे, नेहमी पादत्राणे घालणे.

    अपथ्य आहार-
    बाजरी, मका, नवीन तांदूळ, मसूर, हरभरा (अरहर), तुरीची डाळ, हिरवा वाटाणा, पालक, मेथी, कारली, फुलकोबी, बटाटा, काकडी, सिंगाडा, टरबुज, कवठ, म्हशीचे दूध, पनीर, श्रीखंड, मिठाई, थंड जल, नदी आणि विहिरीचे पाणी, शुष्क मांस, मासे, तळलेले पदार्थ, न झाकलेले पदार्थ, शिळे पदार्थ.

    अपथ्य विहार-
    दिवास्वाप, अधिक परिश्रम, अत्याधिक व्यायाम, प्रवात सेवन.
    वर्षा ऋतु - योगासने
    वर्षा ऋतूत मनुष्याचे शारीरिक बल अत्यंत कमी असते आणि वात-पित्ताची दुष्टी असते. त्यामुळे शरीरास लाभदायक व दोष दुष्टी निवारक योगासने असावीत.

    वर्षा ऋतूत उपयुक्त योगासने -
    1. पद्मासन 2. वज्रासन 3. हलासन 4. ताडासन 5. बद्धकोनासन 6. भुजंगासन 7. वृक्षासन 8. धनुरासन 9. सर्वांगासन

    डॉ. सुभाष मार्लेवार
    आयुर्वेद वाचस्पति,
    सहयोगी प्राध्यापक, स्त्रीरोग व प्रसूतीतंत्र विभाग
    पोदार मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल
    वरळी, मुंबई – ४०० ०१८
    भ्रमणध्वनी +917738086299
    Email – subhashmarlewar@gmail.com

  • अभिमान चित्रपटाची ४८ वर्षे

    आजच्या दिवशी १९७३ साली अभिमान चित्रपट प्रदर्शीत झाला याला आज ४८ वर्षे झाली.

    हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक उल्लेखनीय चित्रपटांपैकी एक मानल्या जाणाऱ्या काही चित्रपटांपैकी एक म्हणजे, १९७३ साली प्रदर्शित झालेला चित्रपट 'अभिमान' होय.
    सांगितिक बहर असलेल्या या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी मूख्य भूमिका साकारल्या होत्या. हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात बिंदू, असरानी यांसारख्या कलाकारांनीही उल्लेखनीय व्यक्तीरेखा साकारल्या होत्या.

    दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांच्या कारकिर्दीतील लक्षणीय चित्रपटांमध्ये अनेक सिनेरसिकांनी 'अभिमान' या चित्रपटालाही पसंती दिली होती. 'अभिमान' चित्रपटाच्या लोकप्रियतेचे आणखी जमेची बाजू म्हणजे चित्रपटाचे संगीत. एस. डी. बर्मन यांच्या संगीताने परिपूर्ण अशा या चित्रपटातील गाण्यांनाही सिने व संगीत रसिकांनी फार पसंत केले होते.

    चित्रपटाचे कथानकच मुळात संगीतावर आधारलेले असल्यामुळे आजही 'अभिमान'ची गाणी तितकीच लोकप्रिय आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठीत गीतकार मजरुह सुलतानपुरी यांच्या लेखणीने शब्दबद्ध केलेली ही सुमधुर गीते लता मंगेशकर, मोहम्मद रफी, किशोर कुमार या नामवंत आणि पट्टीच्या गायकांनी गायली होती. 'तेरे मेरे मिलन की ये रैना', 'पिया बिना' या गाण्यांसह चित्रपटातील इतर सर्वच गीते आणि अमिताभ व जया यांच्या जोडीने साकारलेल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते.

    'अभिमान' मध्ये साकारलेल्या भूमिकेसाठी अभिनेत्री जया बच्चन यांना 'फिल्मफेअर'तर्फे 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री' हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.

    संजीव वेलणकर, पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    अभिमान चित्रपटाची गाणी
    https://www.dailymotion.com/video/x3gknt8