वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आकाशवाणीवरून पहिल्यांदा बातम्या प्रसारित झाल्या त्या घटनेला ९७ वर्षे पूर्ण झाली त्या निमित्ताने भारतीय प्रसारण दिवस साजरा केला जातो.
संगणक वापरणाऱ्यांच्या तोंडी, ‘व्हायरस’ हा शब्द नेहमीच ऐकू येतो. आपल्या संगणकाला विविध प्रकारे आजारी पाडणारे हे व्हायरस म्हणजे काय, संगणकावर त्यांचा परिणाम काय होतो, त्यांची कार्यपद्धती कशी असते, त्यांचे निर्मूलन कसे केले जाते, इत्यादी बाबींचा ऊहापोह करणारा हा लेख…
आंजर्ले गाव रत्नागिरी जिल्हयात समुद्रकाठी उत्तर अक्षांश “१७-४२ वर आणि पूर्व रेखांश ७३-८” वर वसले आहे. आंजर्ल्यास येण्यासाठी मुंबई-आंबेत-मंडणगड-कांदिवली-आंजर्ले असा रस्ता आहे.या रस्त्याला थेट मंदिरापर्यंत पोहचणारा जोड रस्ता आहे. पुणे कोल्हापूर, कराड ही गांवे दापोलीला महामार्गाने जोडलेली आहेत. दापोली-आसूद-आंजर्ले असा दुसरा मार्ग आहे.
जगातील आश्चर्यांची माध्यमांत नेहमीच चर्चा होत असते. मागे एकदा एका संस्थेने जगातील सात आश्चर्यांची निवड करण्यासाठी विश्वव्यापी जनमत नोंदणी अभियानदेखील राबविले होते. आपला ताजमहालदेखील त्या स्पर्धेत होता, अर्थात नंतर तो एकूण प्रकारच अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाले; परंतु लोकांची उत्सुकता चाळविण्यात ती मोहीम नक्कीच यशस्वी झाली होती.
श्रीमत्सुन्दरनायकीं भयहरां ज्ञानप्रदां निर्मलां
श्यामाभां कमलासनार्चितपदां नारायणस्यानुजाम् ।
वीणावेणुमृदङ्गवाद्यरसिकां नानाविधामम्बिकां
मीनाक्षीं प्रणतोऽस्मि संततमहं कारुण्यवारांनिधिम् ॥ ४॥
श्रीमत्सुन्दरनायकीं- मदुराई येथे असणाऱ्या मीनाक्षी मंदिरामध्ये भगवान श्रीशंकरांचे श्रीनटराज स्वरूप विद्यमान आहे. या स्वरूपाला तेथे श्री सुंदरेश्वर असे म्हणतात. त्या श्रीमान भगवान सुंदरेश्वरांची नायिका देवी श्री मीनाक्षी श्रीमत्सुन्दरनायकी स्वरूपात वंदिली जाते.
भयहरां - भक्तांच्या भीतीचे हरण करणारी. सगळ्यात मोठी भीती असते मृत्यूची. आई जगदंबेच्या कृपेने मोक्ष प्राप्त होत असल्याने ही भीतीच नष्ट होते.
ज्ञानप्रदां- या मोक्षाला कारण असणारे आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान प्रदान करणारी.
निर्मलां- शुद्ध चैतन्यस्वरूपिणी, माया मल विरहित अशी.
श्यामाभां- आपल्या अत्यंत तेजस्वी सावळ्या वर्णाने आकर्षक दिसणारी. कमलासनार्चितपदां- कमळावर बसणाऱ्या भगवान ब्रह्मदेवांनी चरणकमलांची उपासना केली आहे अशी. नारायणस्यानुजाम् - भगवान श्री नारायण अर्थात श्री विष्णूंची लहान भगिनी.
वीणावेणुमृदङ्गवाद्यरसिकां- वीणा, वेणू म्हणजे बासरी आणि मृदंग इत्यादी वाद्यांच्या ध्वनींचा रसिकत्वाने आस्वाद घेणारी.
यात वीणा हे तंतुवाद्य, बासरी हे वातवाद्य तर मृदंग हे चर्मवाद्य. अर्थात या तीनही प्रकारांमुळे परिपूर्ण होणारे संगीत.
नानाविधामम्बिकां- अनेक रुपांमध्ये नटून विश्व निर्माण करणाऱ्या,
मीनाक्षीं प्रणतोऽस्मि संततमहं कारुण्यवारांनिधिम् - कारुण्याचा जणू काही महासागर असणाऱ्या आई जगदंबा मीनाक्षीला मी सतत वंदन करतो.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
ब्रँचमधे स्टाफ तसा पुरेसा होता. जवळजवळ सगळेच अनुभवी. अपवाद फक्त रिसिव्हिंग कॅश काऊंटरवरची सुजाता बोबडे. नुकतीच जॉईन झालेली. त्यामुळे कामाची फारशी माहिती नाही आणि त्यामुळे आत्मविश्वासाचाही अभाव. अर्थात हेडकॅशिअर श्री सुहास गर्दे नियमांवर बोट ठेवून काम न करता तिला स्वतःचे काम सांभाळून मदत करायचे म्हणून रोजचं रुटीन व्यवस्थित सुरू होतं एवढंच. एरवी सुजाताच्या वर्क-कॉलिटी बद्दल मी फारसा समाधानी नव्हतो.
साधारणतः १९९७ च्या सुमारास माझी एका मोठया कारखान्याच्या प्रमुखपदी बदली करण्यात आली. तो कारखाना इलेक्ट्रिक बल्ब आणि ट्यूब लाईट याची निर्मिती करत असे. कारखाना वर्षाचे सर्व ३६५ दिवस दिवसरात्र चालू असे. हा कारखाना कळवा – बेलापूर औद्योदिक पट्टयात [industrial belt] होता.
विझडेन एशियाच्या माहितीप्रमाणे ते पाहिले ‘ कमर्शियल ब्रॅण्ड्स ‘ असणारे खेळाडू होते.
An Apple A Day Keeps Doctor Away अशी एक इंग्रजी म्हण आहे त्यात कितपत तथ्य आहे हे ती म्हण निर्मात्यालाच ठाऊक असेल कदाचित.सफरचंद तसे प्रत्येकाचे आवडीचे फळ.ह्याचे अॅप्पलपाय,अॅप्पल जॅम,अॅप्पल चटणी,लोणचे,ज्यूस असे अनेक प्रकार खायला व प्यायला मिळतात.आणी ते रूचकर देखील लागतात.
असे हे सफरचंद आपण किरकोळ शारीरिक तक्रारींमध्ये सुद्धा वापरू शकतो.हे थंड प्रदेशात पिकणारे फळ असून ह्याचा वृक्ष असतो व सफरचंद कच्चे असताना हिरवे व पिकल्यावर लालासह गुलाबी होते.
पिकलेले सफरचंद हे गोड थंड पित्त व कफ दोष कमी करणारे व वातकर असते.चला आता ह्याचे उपयोग पाहूयात.
१)पचन शक्ती कमी होऊन भूक मंदावली असल्यास सफरचंद वाफवून त्यावर मिरपुड व सैंधव मीठ लावून खावे.
२)शौचास पातळ होत असेल अथवा आव पडत असेल तर पिकलेले सफरचंद चांगले चावून खावे.
३)सफरचंद गरम पाण्या १० -१५ मिनिटे भिजत ठेऊन त्याची साल काढुन ते बारीक वाटून घ्यावे नंतर त्यात सफरचंदाच्याच वजना इतके मध घालावे व पुन्हा घोटावे मग त्या वेलची,केशर,गुलाबकळी,गुलाबपाणी,जायपत्री,भीमसेनी कापूर घालून ते चांगले घोटावे.ह्याला मधुचंद म्हणतात ह्याचे सेवन अशक्तपणा मध्ये करावे तसेच ह्याने हृदयाला बळ मिळते.मधुचंद सेवन करताना मासे,दही,तळलेले पदार्थ खाऊ नयेत.
४)अति मांसहारी व तिखट पदार्थ खाल्ल्यावर छातीत जळजळ होणे,पित्ताचा त्रास होणे ह्यात सफरचंद खावे.
सफरचंद खायचा अतिरेक केल्यास बद्धकोष्ठाचा त्रास होऊ शकतो.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
भगवान महावीर यांनी सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी जगाला शांती, अहिंसा आणि बंधुभावाची शिकवण दिली. ती शिकवण आजही संपूर्ण मानवजातीला मार्गदर्शक आहे. भगवान महावीर हे जैन धर्माचे २४ वे आणि शेवटचे तीर्थंकर होते. चिंतनशील विचारवंत म्हणून ते ओळखले जात.
Copyright © 2025 | Marathisrushti