वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
१९७० : चेंडूला फार मोठी फिरक न देता लेगस्पिनरने ६०० बळी मिळविणे आहे खरे पण या दिवशी जन्मलेल्या अनिल कुंबळेने ते खरे करून दाखविलेले आहे. केवळ दिशेवरील नियंत्रण आणि उसळीमुळे जम्बो खूप चांगला गोलंदाज ठरला.
October 12, 2010
मागच्या पिढीतील ताई-भाऊ, काकू-बापू आणि आमच्या आई-वडिलांचे आदर्श संस्कार आमच्या सर्व बहीण भावंडांवर झालेले. रोज रात्री आम्ही सर्वजण बसून ‘रामरक्षा’ म्हटली. ‘मानसिक शांती’ हीच जमेची बाजू. माझे माहेर गिरगावांत आंग्रेवाडीत. तिथे आम्ही लहान असताना गाववाले विष्णू साठे, रघू आगाशे वगैरे मंडळी तासनतास येत व गप्पा मारीत. ती अशी कां येत असत? हयाच उत्तर कोकणात आल्यावर त्यांची बाजूचीच घरे पाहून मिळालं. कोकणातून मुंबईत आल्यावरसुद्धा एकमेकांना भेटण्याची ओढ आणि आपलेपणा.
December 20, 2020
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दुरवस्थेला, सातत्याने होत असलेल्या त्यांच्या आत्महत्यांना अनेक बाबी जबाबदार आहेत. परंतु शासनाचे चुकीचे धोरण ही त्यामधील मुख्य बाब म्हणावी लागेल. शेती आणि शेतीशी संबंधित बाबींच्याच बाबतीत शासनाचे धोरण चुकत आहे, असे नसून शेतीशी थेट संबंधित नसलेल्या अनेक बाबींच्या संदर्भातही शासनाचे चुकीचे धोरण प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या शेतकऱ्यांच्या दुरवस्थेला कारणीभूत ठरत आहे.
November 2, 2008
महाराष्ट्राचा गौरव करणारी अनेक गीते अनेक कवींनी लिहिलेली आहेत. यातली काही निवडक महाराष्ट्र गीते या मालिकेत सादर करत आहोत. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी लिहिलेलं हे एक महाराष्ट्रगीत.
April 7, 2016
१९६३ : कालपरवा द ग्रेट इंडीयन लाफ्टर चॅलेंजमध्ये विनोद पूर्ण होण्याआधीच हसणार्या नवजोतसिंग सिद्धूचा जन्म. त्याच्या उमेदीच्या काळात सिद्धूने जगभरातील फिरकीपटूंची झोप उडविली होती.
१९७८ : भारताच्या पहिल्या कसोटी त्रिशतकवीराचा जन्म. कारकिर्दीच्या सुरुवातीसच ज्याची सचिन तेंडुलकरशी तुलना केली गेली तो वीरेंद्र सेहवाग दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पदार्पणातच शतक ठोकून प्रकाशात आला.
October 18, 2010
गहू हा अत्यंत पौष्टिक आहार आहे. कफकर आहे. थंड हवेत तयार होणारा आणि त्याच थंड हवेत पचण्यायोग्य असा आहे.जर गहू पचला नाही, तर तो उत्तम कफवर्धक, उत्तम आमनिर्मिती करणारा, अत्यंत चिकट, अश्या अवगुणांचा आहे.
August 24, 2017
मालवणच्या आशिष झाट्येने NEET मध्ये राज्यात प्रथम क्रमांक आणि देशात एकोणिसावा क्रमांक पटकावल्याची बातमी मनाला उभारी देऊन गेली. AIIMS दिल्ली सारख्या भारतातील सर्वोत्तम कॉलेज मध्ये शिकण्याचा पर्याय आता त्याच्यापुढे आहे. केईम किंवा AIIMS ची निवड मी करेन असे त्याने टाइम्स ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले आहे. आशिष ने सिंधुदुर्गाच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये एक नवीन बेंचमार्क निर्माण केलाय.
October 20, 2020
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.
August 31, 2018
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक आठ
धान्य किमान एक वर्ष जुने वापरावे-भाग तीन
सगळं पटतंय हो, पण अहो इथे शहरात आम्हाला बसायला काय उभं रहायला पण जागा नाही, एवढी धान्य कुठे वाळवत बसायची ? शहरात प्लॅस्टिकच्या डब्यांना पर्यायच नाही हो ! गवत कुठून आणणार आणि मुडी कोण वळणार !
जरा प्रॅक्टीकल आयुर्वेद सांगता येणार नाही का ? असा प्रश्न विचारणाऱ्यांसाठी आजचा लेख.
धान्य टिकवण्यासाठी धान्यातील पाणी कमी करणे आणि त्यासाठी धान्यातील उष्णता वाढवणं महत्त्वाचे !
जर वाळवणं जमत नसेल तर धान्य भाजून ठेवावे. चुलीवर अथवा गॅसवर पण चालेल. पण मंद विस्तवावर शेकत शेकत भाजून घ्यावे. आणि आपोआपच थंड होऊ द्यावे.
भाजण्यासाठी पूर्वी मातीचे खापर वापरत असत. लोखंडी कढई असल्यास उत्तम. त्यात वाळू तापवून भाजल्यास अति उत्तम. वाळूमधे धान्य भाजून ठेवले तर सर्व धान्य एकाच वेळी चारही बाजूने नीट व्यवस्थित भाजले जाते. आणि टिकते. आताचे निर्लेप वगैरे, लेप असेपर्यंत कदाचित ठीक पण जरा ओरखडा आला तर विषासमान.
भाजून झाल्यावर वाळूमिश्रीत धान्यातील वाळू चाळणीने चाळून बाजूला काढली जाते.
भाजल्यानंतर पूर्ण थंड झाल्याशिवाय मात्र धान्य भरून ठेवू नये. भरताना डबा मात्र प्लॅस्टीकचा नको. टीन म्हणजे पत्र्याचा चालेल. स्वस्त मिळतो आणि चकचकीत दिसतो, म्हणून अॅल्युमिनियम पण नको.
काही औषधे सूर्याच्या थेट उष्णतेत वाळवून, संग्रहीत केली जातात, तर काही छायाशुष्क केली जातात. तर काही अति नाजुक छायाशुष्क करताना म्हणजे सावलीत वाळवताना देखील वर आच्छादन घातले जाते. म्हणजे त्या द्रव्यातील रस, गुण, स्वभाव, परिणाम इ. जसे हवेत तसे मिळू शकतात. अर्थात धान्य टिकवणे आणि औषध टिकवणे यासाठी पद्धतीमधे थोडा फरक पडतो, हे पण लक्षात घ्यावे.
सूर्याचे काम घरातील अग्नि करतो. अर्थात तेथे पाहिजे जातीचे, जेनु काम तेनु थाय, असे म्हणतात. सूर्य जे करेल ते इतर कोणीही करू शकणार नाही.
जे न देखे रवि, ते देखे कवि. म्हणजे जे सूर्य पाहू शकणार नाही, ते म्हणे कवि पाहू शकतो. कवि, पणती या अलंकारीक भाषा साहित्यामधे ठीक वाटतात, पण व्यवहारात सूर्याला पर्याय सूर्यच !
कांदा लसूण यासारख्या अन्नाला टिकवायचे असल्यास वाळवायची पद्धत वेगळी. तिथे इतर काही कामाचे नाही. थेट पडणारी सूर्यकिरणेच त्याला आवश्यक! तर कमळाच्या पाकळ्या किंवा केशर, गुलाब संरक्षित करायचे असल्यास झाकण घालून सावलीत वाळवावे लागेल.
धान्य टिकवण्यासाठी भारतात आणखी काही प्रतिनिधी द्रव्य वापरतात. ज्या द्रव्यांना सूर्यापासून निर्माण होणारी पर्यायी नावे आहेत, ती सर्व द्रव्ये (यापैकी एक ) धान्याच्या राशीत ठेवली तरी धान्य टिकून राहते. जसे बिब्बा, तिरफळे, हळकुंड, कढीपत्ता, लवंग, इ. तीक्ष्ण गंधी, उष्ण स्वभावी द्रव्ये वापरली जातात. काही ठिकाणी एरंडेल तेलासारखी द्रव्ये पण रक्षकाचे काम करतात.
काही ओली द्रव्ये सुरक्षित ठेवायची असल्यास तूप तेल मध यांचाही वापर करतात. आसव अरीष्ट टिकवायची असतील तर विशिष्ट लाकडांचे ड्रम बांधून घ्यावे लागतात. प्लॅस्टिकच्या ड्रममधे नाही. या ड्रमना आतून तूप, मध लावून घ्यायचे असते. औषधी द्रव्यांच्या धुरांनी तो ड्रम किंवा बरणी निर्जंतुक करायची असते. हे आमचे आपले आयुर्वेदीय शास्त्र ! (आताही फ्युमिगेशनच करतात की हो ! )
लोणची टिकवायची असतील तर फोडींच्यावर तेलाचा थर आला पाहिजे. हे पण एक शास्त्र आहे. ते घरातील आजीला, आईला माहिती होते. ते सुनेपर्यंत पोचले पाहिजे. एका पिढीतील हे ज्ञान पुढच्या पिढीला परंपरेने समजावून सांगणे, त्यातील गुण आणि दोष ओळखणे आणि त्यात स्वतःची वैज्ञानिक शुद्ध बुद्धी वापरणे महत्त्वाचे !
यालाच तर पिढीजात परंपरा म्हणतात. ज्या अनेक वर्षे एकत्र कुटुंब पद्धतीमुळे भारतात टिकून आहेत. आणि या अश्या पारंपारिक गोष्टी शिकण्यासाठी सुद्धा, पाश्चात्य तज्ञ भारतात येतात. आणि शिकून जातात. आणि परत येऊन आम्हालाच आंग्ल भाषेत शिकवतात !
मेकाॅलेने तेच केले आणि आम्ही भुललो !!
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
15.05.2017
May 15, 2017
मराठी चित्रपटांशी संबंधित वाद सोडवून धोरणात्मक निर्णयांसाठी शासन स्तरावर एक समिती स्थापन करण्याची घोषणा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केली.
August 24, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti