(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • पहला गिरमिटिया

    महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक कांदबरी पहला गिरमिटिया सुप्रसिद हिंदी साहित्यकार श्री गिरिराज किशोर यांनी लिहिली आहे. ऐतिहासिक कांदबरी लिहिताना भूतकाळातील घटना, प्रसंग, वास्तु, शहर, देश व तत्कालीन सामाजिक स्थितीचा अभ्यास करावा लागतो. या साठी लेखकाने दक्षिण अफ्रिकेचा दौरा केला आहे. दक्षिण अफ्रिकेतील महात्मा गांधीच्या आठवणीवर आधारित ही एक सामाजिक राजकीय कांदबरी आहे.

  • भंडारदरा धरण, अकोले अहमदनगर

    इतिहास - समृध्दी आणणाऱ्या आपल्या धरणांचा - भंडारदरा धरण, अकोले अहमदनगर.....

    शेंडी गावाच्या उशाशी उभ्या असलेल्या दोन टेकड्या काळ्या पत्थरात बांधलेल्या भिंतीना जोडल्या गेल्या आणि अनंत काळापासून वाहणारा अमृतवाहिनी प्रवरेचा अवखळ प्रवाह सह्यागिरीच्या कुशीत विसावला... अन भंडारदरा धरणाचा जन्म झाला. तेव्हापासून आजपर्यंत सह्यागिरीच्या पर्वत माथ्यावर धो- धो कोसळणा-या पावसाचे पाणी भंडारदरा धरण आपल्या पोटात घेत आहे.
    निसर्गशिल्पांचे देखणे कोंदण लाभलेल्या भांडारद-याचे पाणी जसे शेतात खेळू लागले, तशी समृद्धीची बेट फुलली. सहकारी साखर कारखानदारी उद्योगधंद्याची भरभराट झाली. वर्षेनुवर्षे दुष्काळानं गांजलेल्या भूमिपुत्राच्या उदासवाण्या जीवनात या धरणाच्या पाण्यानं चैतन्याचे रंग भरले ते असे....

    उत्तर रतनगडाच्या माथ्यावरील रत्नाबाईच्या गुहेत प्रवरा नदी उगम पावते. पुढे शेंडी गावाजवळ बांधलेल्या दगडी भिंतीमुळे भंडारद-याचा हा प्रचंड जलाशय तयार झालेला आहे. अतिशय राकट आणि डोंगराळ भागातील हा जलाशय समुद्र सपाटीपासून २४०० फुट उंचीवर आहे. त्यामुळे देशातील काही मोजक्या, खूप उंचीवरील जलाशयांमध्ये याची गणना होते. त्याच्या निर्मितीपासून आजवरची वाटचालही मोठी रंजक राहिली आहे. .....

    दुष्काळी भागास पाणी देण्याच्या दृष्टीने एकोणिसाव्या शतकाच्या आरंभापासून पावले टाकायला सुरुवात झाली होती. १९०२ च्या सिंचन आयोगाने प्रवरा खो-यात धरण बांधण्या्च्या गरजेवर भर दिला होता. प्रवरा नदीवरील ओझर येथे सन १८९९ मध्ये बांधलेला बंधारा त्या दिशेने उचललेले पहिले पाऊल म्हणावे लागेल. या बंधा-यातून बारमाही पाणी पुरविणे शक्य व्हावे, यासाठी म्हाळादेवी (ता. अकोले ) येथे मातीचे धरण बांधण्याचा प्रस्ताव होता. काही कारणांनी हा प्रस्ताव बारगळला. सर्वेक्षणानंतर शेंडीजवळील दोन टेकड्याजवळ जागा निश्चित करण्यात आली. ९ ऑगस्ट १९०७ रोजी भंडारदरा धरणाला तत्कालीन सरकारची मान्यता मिळाली. धरणाच्या बांधकामास प्रत्यक्ष प्रारंभ झाला तो एप्रिल १९१० मध्ये. तत्कालीन चीफ इंजिनिअर ऑर्थर हिल यावेळी आवर्जून उपस्थित होते. पाण्याखाली बुडालेली एकूण जमीन होती २२ हजार ९०० एकर. जमिनीच्या संपादनासाठी विशेष अधिकारी नेमण्यात आला. धरणाच्या बांधकामासाठी स्वतंत्र उपविभागाची निर्मिती करण्यात आली. धरणासाठी आवश्यक यंत्रसामग्री व इतर साहित्य घोटी रेल्वेस्थानकावर उतरविले जाई. तेथून सध्याच्या घोटी - कोल्हार मार्गावरून पोचवण्यासाठी पेंडशेत चिंचोडी ते भंडारदरा असा ४ मैलाचा नवीन रस्ता तयार केला गेला. धरणाच्या दगडी बांधकामास आवश्यक दगड मिळवण्यासाठी परिसरातच दगडी खाणींच्या जागा निश्चित करण्यात आल्या. हळूहळू जसजसे धरणाचे काम पुढे जाऊ लागले. तसा भंडारद-याचा शांत परिसर गजबजून गेला. अधिकारी, मजूर यांची निवासस्थाने उभी राहिली. निसर्गाच्या कुशीत भौतिक जगापासून कोसो योजने दूर असलेल्या या भागात दूरध्वनी, टपाल, दवाखाने अशा मुलभूत सोयी सुविधा आल्या. त्यावेळच्या लोकांना याचे केवढे कुतूहल वाटत होते.

    भंडारदरा धरणाच्या भिंतीच्या बांधकामाचे वैशिष्ट्य म्हणजे हे संपूर्ण काम दगड आणि चुन्यात करण्यात आले. वाळू उपलब्ध नसल्याने दगडांचा चूरा वाळू म्हणून वापरण्यात आला. थोडे थिडके नव्हे तब्बल १ कोटी २६ लाख ४ हजार १४० घनफूट बांधकाम करावयाचे होते. जसजसे बांधकाम उंची गाठत होते, तसे पाणी अडविण्यास सुरुवात झाली. नोव्हेंबर १९२० मध्ये धरणात २०० फुट उंचीपर्यंत पाणी साठवले होते. त्याच वर्षी सर्वप्रथम धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात झाली. बांधकामाने पुढे चांगलाच वेग घेतला होता. नियोजनाप्रमाणे भिंतीची उंची २५० फुटापर्यंत बांधण्याचे ठरले होते. पुढे त्यात बदल केला गेला. ही उंची २० फुटांनी वाढवून २७० फुट करण्यात आली. भिंतीत एकूण चार मो-या असून,त्या अनुक्रमे ७० फुट, १२० फुट, १७० फुट व २२० फुट अशा अंतरावर आहे. या मो-यांचे अर्धा फुट जाडीचे व्यास ३ फुट पाईप आणि त्यांच्या नियंत्रणासाठी आवश्यक झडपा खास इंग्लंडमधून आणण्यात आल्या. ७१.२८ मीटर भिंतीच्या तळाची रुंदी असून, माथ्यावरील रुंदी ७ मीटर आहे.

    जून १९२६ मध्ये धरणाच्या दगडी भिंतीचे काम पूर्ण झाले. त्यासाठी खर्च झाला होता १ कोटी ५० लाख ८३ हजार ४५१ रुपये. ६५० फुट रुंदीचा सांडवा दक्षिण बाजूला ठेवण्यात आला. याच वर्षी धरणात पूर्ण क्षमतेने पाणी साठविण्यास सुरुवात झाली. पावसाळा आला. शिखर स्वामिनी कळसुबाई अलंग, कुलंग, मदन यासह शिंदोळ्या, रतनगड या सह्यागिरीच्या पर्वत माथ्यावर कोसळणा-या पावसांच्या सरीमुळे अवतीर्ण झालेले ओढे - नाले कवेत घेऊन प्रवरामाई पहिल्यांदाच काळ्या पाषाणाच्या भिंतीमुळे सह्यागिरीच्या डोंगरद-यांच्या कुशीत विसावली होती. १० डिसेंबर १९२६ रोजी तत्कालीन गव्हर्नर सर लेस्ली ओर्मी विल्सन यांच्या हस्ते धरणाचे औपचारिक उदघाटन झाले. सर्वेक्षणापासून बांधकामात महत्त्वाची भूमिका पार पडलेले तत्कालीन कार्यकारी अभियंता ऑर्थर हिल याचेच नाव धरणाच्या जलाशयाला देण्यात आले. परंतु जवळच असलेल्या भंडारदरा या खेड्याच्या नावावरून धरणास भंडारदरा धरण असेच नाव पडले. मात्र असे असले तरी कागदोपत्री आजही हे धरण विल्सन यांच्याच नावाने ओळखले जाते. या धरणाने उत्तर नगर जिल्ह्याचे चित्रच पालटले.साठवलेले पाणी नियोजन करून लाभक्षेत्रावरील जमिनीला कालव्यांद्वारे मिळू लागले. दुष्काळाने गांजलेल्या भूमिपुत्रांच्या जीवनाला हिरवे वळण मिळाले. ओसाड - उजाड जागेवर हिरवीगार पिके मोठ्या डौलान डोलू लागली. समृद्धी आली. साखर कारखाने उभे राहिले. उद्योग सुरु झाले. उत्तर नगर जिल्ह्याचा कायापालट झाला. पण सारे कसे व्यवस्थित सुरु असतानाच १९६९ च्या सप्टेंबर महिन्यात धरणाच्या भिंतीला तडे गेले. काळजीचे वातावरण सर्वत्र पसरले. तंत्रज्ञानी जीव धोक्यात घालून अहोरात्र खपून या आणीबाणीच्या प्रसंगाला तोंड दिले.

    भंडारदरा जागेचा धरणाच्या दृष्टीने शोध १९०३ मध्ये ऑर्थर हिल या इंग्रज अभियंत्याने लावला. त्यानंतरचे सर्वेक्षण सहाय्यक अभियंता एच. ओ.बी.पुली यांनी कार्यकारी अभियंता एच. ओ.बी.शौब्रीज यांच्या मार्गदर्शनाखाली केले. पुढे धरण बांधण्याच्या कामास १९१० साली तत्कालीन चीफ इंजिनियर ऑर्थर हिल यांच्या हस्ते सुरु झाले. भंडारदरा हे त्याकाळचे भारतातील सर्वात उंच धरण म्हणून ओळखले जाते. ते चुना, वाळू यांच्या मिश्रणातून बांधण्यात आले. पुढे त्याला आधुनिक तंत्रज्ञानाने आधार देण्यात आला. धरणाचे काम १९२६ साली पूर्ण झाले. त्याच वर्षी १० डिसेंबर १९२६ रोजी गवर्नर लेस्ली वेलस्ली यांच्या हस्ते धरणाचे उदघाटन करण्यात आले. धरणाला त्याकाळी विल्सन डॅम तर धरणाच्या पाणीसाठ्याला ऑर्थर लेक यांचे नाव देण्यात आले. धरणाच्या २०० फुटावरील व्हॉल्व्हद्वारे पाणी नदीपात्रात सोडले असता ते खडकावरून खळखळ वाहत नदीपात्रात झेपावते. त्यावेळी ते दृश्य एखाद्या भव्य छत्रीसारखे दिसते. म्हणून या धबधब्याला अंब्रेला फॉल असे म्हणतात. छत्रीच्या आकाराचे पाणी नदीपात्रात झेपावते तेव्हा पर्यटक भान हरपून ते दृश्य पाहत असतात. धबधब्यातून उडणारे असंख्य तुषार पर्यटकांना चिंब भिजवून टाकतात. पावसाळ्यात अतिरिक्त पाणी जेव्हा स्पील वे मधून सोडले जाते तेव्हा ते पाणी प्रचंड वेगाने वाहत जाते. ते दृश्य नक्कीच अनेक वर्ष डोळ्यांसमोर तरळत राहते.

    अधिकृत नाव : भंडारदरा. विल्सन डॅम / ऑर्थर लेक
    अडवलेली नदि: प्रवरा
    स्थान : शेंडी.
    सरासरी वार्षिक पाऊस : ३२२० मिलिमीटर.
    उंची : ५०७ मीटर.
    रुंदी : (तळाशी) ८२.२९.
    बांधकाम सुरू: १९१०.
    उद्घाटन दिनांक: १९२६.
    बांधकाम खर्च: १,१३,९०,०६०
    क्षमता : 11 टीएमसी
    भौगोलिक माहिती: निर्देशांक १९.५४८२, ७३.७५७० गुणक: १९.५४८२, ७३.७५७०.
    दरवाजे: प्रकार : S - आकार लांबी : १९८.१० मी.
    सर्वोच्च विसर्ग : १५१४.९९ घनमीटर / सेकंद संख्या व आकार : २, ( १२.५ X ७.९२ मी).
    पाणीसाठा: क्षेत्रफळ : १५.५४ वर्ग कि.मी.
    क्षमता : ३१२.५९५ दशलक्ष घनमीटर वापरण्यायोग्य
    क्षमता : ३०४.१० दशलक्ष घनमीटर
    ओलिताखालील क्षेत्र : १५५५ हेक्टर.
    कालवा: डावा कालवा लांबी : ७७ कि.मी. क्षमता : २६.३६ घनमीटर / सेकंद
    ओलिताखालील क्षेत्र : ५९६२५ हेक्टर
    ओलिताखालील शेतजमीन : ४००९० हेक्टर.
    उजवा कालवा: लांबी : ४५ कि.मी. क्षमता : ६.८२ घनमीटर / सेकंद
    ओलिताखालील क्षेत्र : २९८६६ हेक्टर
    ओलिताखालील शेतजमीन : २३६५० हेक्टर.
    वीज उत्पादन: टप्पा १
    जलप्रपाताची उंची : ६५ मी
    जास्तीतजास्त विसर्ग : १९.२६ क्यूमेक्स
    निर्मीती क्षमता : १० मेगावॅट
    विद्युत जनित्र : १ X १० मेगावॅट.
    टप्पा २
    जलप्रपाताची उंची :
    ५० मी जास्तीतजास्त विसर्ग : ७७ क्यूमेक्स
    निर्मीती क्षमता : ३४ मेगावॅट विद्युत जनित्र x:
    १ X ३४ मेगावॅट
    धरणाची माहिती :
    बांधण्याचा प्रकार : दगडी बांधकाम उंची :
    ८२.२९ मी (सर्वोच्च) लांबी : ५०७ मी.

  • कॉटन ग्रीन..’

    मुंबईची हार्बर रेल्वे लाईन पश्चिम व मध्य रेल्वेवर राहणाऱ्या मुंबईच्या पांढरपेशा समाजाच्या दृष्टिनं काहीशी दुर्लक्षितच..या हार्बर लाईन मुळे आपल्याला दाना-पाण्याची रसद मिळत असते याची जाणीव फार थोड्या मुंबईकरांना असते.

  • गौरीदशकम् – १०

    आशापाशक्लेशविनाशं विदधानां
    पादाम्भोजध्यानपराणां पुरुषाणाम् ।
    ईशामीशार्धाङ्गहरां तामभिरामां
    गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे ॥ १०॥

    भगवंताचे, भगवतीचे सगळ्यात मोठे वैभव म्हणजे भक्तवत्सलत्व. आपल्या भक्तांच्या सकल मनोकामना पूर्ण करणे हे जणू देवतांचे सर्वाधिक प्रिय कार्य. आई जगदंबेच्या या शरणागतवत्सल स्वरूपाचे वर्णन करतांना भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,

    आशापाशक्लेशविनाशं विदधानां
    पादाम्भोजध्यानपराणां पुरुषाणाम् ।

    पादांभोज म्हणजे चरणकमलांचे, ध्यान करण्यात परायण असणाऱ्या पुरुष म्हणजे जीवांच्या आशारूपी पाशाचा विनाशक करणारी.

    भगवंताच्या चरणी भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. त्याच्याही पलीकडे जात आचार्यश्री म्हणतात, आई जगदंबेची कृपा झाली की भक्तांना कोणत्या आशाच उरत नाही.

    आशा हा माणसाला पडलेला असा अजब पाश आहे की ज्याने जखडलेला धावत राहतो आणि यातून सुटलेला शांत बसून राहतो.

    आई जगदंबेच्या चरणकमलांचे ध्यान करणारे जे भक्त असतात, त्यांचे असे आशा पाश जगदंबा खंडित करते. हे पाश गेले की त्यांना सुख शांती प्राप्त होते. आई त्यांना मुक्ती प्रदान करते.

    ईशामीशा- ईश म्हणजे स्वामी. संपूर्ण विश्वाचे स्वामी भगवान शंकर. त्यामुळे त्यांना ईश असे म्हणतात. त्या ईशांची देखील ईशा. अर्थात त्यांचीही स्वामिनी. त्यांच्यावरही जिची सत्ता चालते अशी.

    अर्धाङ्गहरां- त्यांच्या अर्ध्या अंगाला अर्थात अस्तित्वाला व्यापून असणाऱ्या,

    तामभिरामां- त्या आत्यंतिक आकर्षक असणाऱ्या,

    गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे- कमलाप्रमाणे नेत्र असणाऱ्या त्या आई जगदंबा गौरीचे मी स्मरण करतो.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • छंद नाण्यांचा…

    मी सर्वप्रथम ‘नाण्यांचा इतिहास’ अभ्यासला आणि मला नाण्याविषयी मौलिक माहिती मिळत गेली. प्राचीन भारतीय साहित्यात बृह्दारण्यक, उपनिषद, अग्निपुराण, मस्यपुराण, मनुस्मृती इत्यादी प्राचीन ग्रंथात सुवर्ण, द्रम, कार्षापण, निष्क, कृष्णल, रूप्य ही नाणीवाचक नावे आढळतात.

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग बावीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक पाच

    पहिलं पचल्याशिवाय दुसरं आत टाकू नका.

    मिक्सरमधून नारळ वाटून घ्यायचा आहे, पहिला आत टाकलेला नारळ बाहेर काढायच्या आधीच दुसरा नारळ वाटण्यासाठी आत टाकावा का ?
    नाही ना !

    तसंच आपल्या पचनाचं देखील आहे. खाल्लेलं पचायच्या आधीच दुसरं आत टाकू नका. दुसरं आत टाकलेलं पचणार तर नाहीच, पण पहिलं आत टाकलेलं देखील खराब होईल.

    हं. मी "दर दोन तासाने खावे" असा जो प्रचार होतोय, त्यासाठी काय दृष्टीकोन असावा तेच सांगतोय.

    पहिलं खाल्लेलं पचलेलं नाही, तोपर्यंत वरून पुनः पचनासाठी माल आत पाठवला जातोय.

    गाई गुरांची गोष्ट वेगळी, त्यांना जसं मिळेल तिथून, जेवढा मिळेल तेवढा चारा, भसाभस खाऊन एका कप्प्यात अर्धवट खाल्लेला चारा साठवता येतो. आणि नंतर सुरक्षित जागी येऊन अर्धवट खाऊन साठवलेला चारा पुनः तोंडात आणून, निवांत, निर्धास्त, स अवकाश, सावकाश रवंथ करीत पचन करायचे असते. दिवसभर खा, खा, केलं तरी, रात्रभर खाल्लेलं पचवायला वेळ देतात. पचवायच्या वेळी परत परत खाणे नाही. त्यामुळे या प्राण्यांना सहसा गॅस प्राॅब्लेम कधी होत नाहीत.

    पण मानव प्राण्याची बातच वेगळी !

    भूक लागेल तेव्हा घरात डबे भरलेले आहेत. बाहेर जावं तेव्हा खिसे भरलेले आहेत. दर दोन तासानी खा खा खात रहायचं. पण पचवायला मात्र वेळ अजिबात द्यायचा नाही. वर "डाॅक्टरनीच सांगितलंय" असं म्हणायला मोकळे! कारण काय तर, अॅसिडीटी वाढू नये म्हणून, अल्सर होऊ नये म्हणून.....

    असं करून कसं चालेल ?
    आपणाला त्याने बुद्धी दिलेली आहे. तिचा सुयोग्य वापर करून घ्यायला पाहिजे. आपणाला, गाईगुरांसारखं खाल्लेलं अन्न परत बाहेर तर काढता येत नाही. परत परत अन्न बाहेर काढता येणार नाही. जे काही पचन करायचं ते एकदाच.

    सतत खात राहिल्याने पचन पूर्ण होत नाही, आधीचं खाल्लेलं पचलेलं नाही, आणि पुनः वरून सतत अतिरिक्त कामाचा ताण ! तोपर्यंत आधीचं पेंडींग काम आणखी काम वाढवलेलं असतं. मग एक ना धड भाराभर चिंध्या !

    म्हणजे कसं होतंय ना, मे महिन्याच्या सुटीतील पाहुण्याची सरबराई काही संपत नाही, सासरची माणसे घरातून बाहेर पडेपर्यंत, ह्यांच्या मित्राचं टोळकं येतं. माहेरची माणसे येऊन थडकतात. कुणाला काय काय हवं. सगळ्यांची उठाबस नीट व्हायला हवी. शिवाय पाहुण्यांच्या समोर आपली हौस मौज काय करायची असते ती वेगळीच. नवऱ्याची मदत मिळवायची तर त्याच्या वेगळ्याच तऱ्हा ! अश्शी धांदल उडते ना ! मग चिडचिड होते.

    बरं हे पाहुणे वेगवेगळ्या वेळी, जरा दमानं आले, तर थोडं बरं असतं. सगळे एकदम आले तर दम निघतो ! एका एका पावण्याची ऊठाबस करणं सोपं असतं. प्रत्येकाकडे लक्ष देता येतं. पण सगळ्यांचा एकत्र कल्ला म्हणजे म फारच होतं.....

    ......तसंच पोटाचं पण होतं.
    आता चटपटीत पावभाजी आत आली आहे, तोपर्यंत थंडगार आईस्क्रीमचा गोळा वरून खाली पडतो. आता कुठे पावभाजीचं प्रकरण संपवतेय, तोपर्यंत दुसरं प्रकरण पुढ्यात. त्याची व्यवस्था लावायच्या आत फणस आंबे जांभळं राडा करतात. पुनः जेवण वेगळंच ! सरबत पन्हे असंही अधे मधे होतं.
    या प्रत्येक पाहुण्याच्या तऱ्हा वेगळ्या !
    घरातल्या पाहुण्यांची उठाबस करणं एकवेळ सोपं. कोणीतरी माणूस हाताखाली ठेवता येतो, वाटलंच तर हाॅटेलही आहे. पण पोटाकडे असे पर्याय नाहीतच !

    एकदाच काय ते होऊन जाऊदे, पण नाही.
    एकट्या पोटानं काय काय आणि किती किती करायचं ना !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.
    01.05.2017

  • हिंदू धर्मातील प्राचीन व पौराणिक वृक्ष – भाग ७ – पारिजात

    पारिजातकाचे झाड हे शोभेचे झाड म्हणून बगीचा तसेच घराच्या आवारात लावले जाते. गावात बहुतांश लोकांच्या अंगणात पारिजातचे झाड असतेच. पारिजात झाडाच्या आसपासचे वातावरण अतिशय प्रसन्न असते. पारिजातकाचे फूल हे पश्चिम बंगाल या राज्याचे राज्यफूल आहे.

  • एक संकट असेही – ब्ल्यु व्हेल

    गेले कित्येक दिवस ब्ल्यु व्हेलची माहिती गोळा करायचा प्रयत्न करतोय, परंतु हाती ठोस असे काही लागेना. काल (१ मे २०१७ रोजी ) युरोपियन पोलीसांनी ब्ल्यु व्हेलवर अधिकृत बंदी घातली आणि सोशल मिडीयातून बरीच इन्फो लिक झाली... आणि ब्ल्यु व्हेलचा खतरनाक थरकाप समोर आला. हा तुम्हाला आत्महत्या करायला लावणारा व भाग पाडणारा एक आॅनलाईन गेम आहे. याचे मायाजाल इतके स्ट्राॅंग आहे की प्रसंगी स्वतंत्रपणे खेळणार्‍या दुसर्‍या व्यक्तीला समाविष्ट करुन आत्मघात करायला लावणारा हा खेळ खेळला जातोय. हा खेळ खेळायला उद्युक्त होणारा वयोगट आहे १२ ते ५२. हा गेम पुर्णतः आॅनलाईन असल्याने तुमच्या गॅजेटवर त्याचा पुरावा सापडत नाही. ठराविक कालावधीनंतर त्या फाईल्स डिलीटच नव्हे तर गायब होतात. ह्या गेममधे एकंदर पन्नास टास्क दिले जातात. पन्नास टास्क पार पाडताना, एक लेवल पुर्ण झाली कि हातावर एखाद्या चाकूने किंवा अणकुचिदार वस्तूने मार्क करुन घ्यायचा ज्यामुळे किंचित का होईना रक्त येईल. तुम्ही पहिल्याच टास्क आणि लेव्हल मधे इतके संमोहित किंवा हिप्नोटाईज झालेले असता कि सातत्याने त्या गेमचाच विचार करत रहाता. तुमच्या रोजच्या व्यवहारांवर मात्र कसलीच बाधा येत नाही. असे एकंदर पन्नास टास्क पुर्ण करायला हा गेम भाग पाडतो...आणि पन्नासावा टास्क आत्महत्या..! सोप्यात सोपी आत्महत्या कशी करावी याबद्दल इथे ट्रेनिंगही दिले जाते व उदाहरण म्हणून व्हीडीओ द्वारा पटवूनही दिले जाते. हातावर मनगटाच्या खाली फोरआर्मसवर केलेल्या खुणानी व्हेल माशाची आकृती तयार करायला सांगितली जाते.तुम्ही एवढे संमोहित होता कि तुम्ही त्यांच्या सुचना सहजगत्या पाळू लागता आणि नकळतपणे त्यांच्या आधीन होता. काही लेव्हल्स पार पाडताच तुमच्या घरी जी व्यक्ती ब्ल्यु व्हेल खेळंत असेल त्याच्या आवडीच्या वस्तु येउ लागतात. मुख्य म्हणजे खेळणार्‍या व्यक्तीच्या त्या रोजच्या वापरातल्या वस्तु असल्याने त्याबद्दल पालकांना आणि मित्रानाही पुसटशी शंका देखिल येत नाही. खेळणार्‍या व्यक्तीच्या अकाउंटला पैसे जमा होत रहातात. त्रयस्थ व्यक्तीला हे पैसे टास्क पूर्ण केल्याबद्दलचे आहेत हे कळल्यावर विश्वास बसेल असा हा गेम आहे. या गेमची रचना इतकी जबरदस्त आहे कि सर्वसामान्य लोक, त्या व्यक्तीचे मित्र व नातेवाइक कुठलाही विरोध न करता त्याला प्रोत्साहित करत रहातात...आणि अशा रितीने ब्ल्यु व्हेल गेम खेळणारी व्यक्ती ५० टास्क नंतर आत्महत्या करते, ज्याचे कारण फक्त आणि फक्त गेमला आणि त्या व्यक्तीलाच माहित असते. रशियात गेल्या काही महिन्यातच १५० च्या आसपास आत्महत्या घडून आल्यात. वयोगट आहे १२ ते ५२. आता हे लोण युरोपमार्गे भारतात येतंय. भारतात नेटच्या आहारी जाण्याचे प्रमाण भयंकर आहे. तरुण मुलांमधे तर खुपच..! यावर विनंती एकच कि मुलांच्या सर्फिंगबाबत प्रचंड सतर्क रहाण्याची वेळ येउन ठेपलीय. अर्थात यावर रेमिडी ही ज्याची त्यानेच शोधायचीय..!

    -- भाकु

  • पुण्ण्याची गणना करू नका ! 

    सकाळी पंधरा मिनिटात पूजा करून टाकतात आणि दिवसभर मौजमजा. संचितातले पुण्य भसाभस संपत जाते. काही पापही हातून घडत असते. पण मनात सतत अहंकार असतो की मी सकाळी पूजा केली आहे. एक हजार रुपये पगारावर उत्तम संसार होऊ शकतो का?

  • ऐ ज़िंदगी गले लगा ले

    या वाढदिवसाच्या कार्यक्रमात त्यांची पत्नी पद्मा वाडकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. यासोबतच शोचे अँकर कुमार, स्टुडिओ रीफ्यूलचे सीईओ इंडिया चॅप्टर सचिन तैलंग आणि सीईओ दुबई चॅप्टर रमन छिब्बर देखील या वेळी उपस्थित होते.