(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • क्रांतिसूर्य स्वातंत्र्यवीर सावरकर समजून घेताना : भाग २

    खरा इतिहास आणि क्रांतिकारकांचं हौतात्म्य , इतिहासकारांनी जसंच्या तसं मांडायला हवं होतं .पण खऱ्या इतिहासाचा अभ्यास करताना लक्षात आलं की पुढच्या पिढीला स्वातंत्र्यलढ्याचा दैदिप्यमान इतिहास कळू नये अशीच व्यवस्था केली गेली आहे . खऱ्या खोट्याची भेसळ करून उत्तुंग व्यक्तिरेखांना हिणकस ठरवलं जात आहे . परकीय आक्रमकांना नायक ठरवण्याची घाई झाली आहे .

  • आत्मनिर्भरता

    परदेशात मुलांनी सेटल होणं, कायमचं अंतरणं या गोष्टी महाराष्ट्रातील आई-वडिलांना नवीन नाहीत. चावून चोथा झालेले हे विषय आहेत आणि तरीही पुन्हा पुन्हा कोणाच्या तरी बाबतीत किंवा कधी कधी आपल्याच बाबतीत येणारा हा अनुभव आहे.

  • आंंतरराष्ट्रीय खास लहान मुलींसाठीच असलेला दिवस

    आंंतरराष्ट्रीय खास लहान मुलींसाठीच असलेला दिवस

    ११ ऑक्टोबर २०१२! या दिवशी युनायटेड नेशन्स मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर जगभरातील मुलींकरिता  `मुलींच्या दिना’ची सुरुवात करण्यात आली. या दिनाची पार्श्वभूमी मुलींना आंतरराष्ट्रीय पातळीवर येणार्‍या अनेक प्रकारच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविणे ही आहे. हा दिन जगभरात साजरा होण्यासाठी व या दिनाची सुरुवात होण्यासाठी जगभरात कार्यरत असलेली प्लॅन नामक स्वयंसेवी संंस्थेने पुढाकार घेतला. या दिवसाला जगभरात साजरा करण्याची सुरुवात प्लॅन आंतरराष्ट्रीय संस्थेच्या ” मी मुलगी आहे ” या मोहिमेने झाली.

  • विदर्भ !!!!

    अतिशय हृदयस्पर्शी कविता आहे हि !! मी विदर्भात खूप फिरलो आहे .कित्तेक एकर जमिनीचा मालक सुद्धा वीज आणि पाणी नसल्याने विपन्न अवस्थेत आहे.शेतात विहीर आहे पण विहिरीवर बसवलेल्या पंपावर विजेची जोडणी मिळत नाही. ज्यांच्या कडे पंपाला विजेची जोडणी आहे त्यांना वीज मिळण्यासाठी रात्रभर शेतात जागे राहावे लागते.रात्री फक्त ३ तास पंप चालतो ते सुद्धा मध्य रात्रीनंतर कधीतरी . वीज चालू करण्याची वेळ अनेक वेळा बदलतात.शेतकरी हतबल झाला आहे.जमिनीचा कस चांगला आहे पण सर्व निसर्गाच्या लहरीवर आवलंबून . सर्वच राजकीय पक्षांचे हे अपयश आहे . सरकार लक्ष देत नाही.ठेकेदार ,व्यापारी लुबाडतात.बियाणे सुद्धा बोगस आणि भेसळ असलेले विकले जातेय. जे काय उत्पन्न मिळतंय त्याला भाव मिळत नाही. कधी कधी एकरी ५००० सुद्धा पदरात पडत नाहीत.अस्मानी आणि सुलतानी या दोन्ही संकटांनी विदर्भातील शेतकरी गांजला आहे.हि कविता त्याच परिस्थितीची परिणीती आहे.

    जयश्री खाडीलकर पांडे यांनी फेसबुकवर २ जानेवारी २०१६ रोजी पोस्ट केलेली ही कविता वाचाच !

    "चाल दोस्ता तुला "विदर्भ" दाखवतो "

    चाल दोस्ता तुला "विदर्भ" दाखवतो
    काळ्या आईच्या पोटात खुडलेला कोवळा गर्भ दाखवतो
    चाल दोस्ता तुला "विदर्भ" दाखवतो ।।11।।

    कोरडा डोळा , कोरडी विहीर
    कोरड्या राजकारण्यांचे ,कोरडे संदर्भ दाखवतो
    "चाल दोस्ता तुला "विदर्भ" दाखवतो " ।।2।।

    वावरात शेतकऱ्याची सत्ता नाही,
    विहिरीत पाण्याचा पत्ता नाही,
    पाच वर्षा पासुन, कनेक्शन साठी केलेला अर्ज दाखवतो
    "चाल दोस्ता तुला "विदर्भ" दाखवतो " ।।3।।

    या वर्षी वावरात, पिकांची शाळाच नाही डवरली,
    कि निसर्गानं वावराची, फी च नाही भरली,
    अनुपस्थित पिकांचा, सुनसान वर्ग दाखवतो
    "चाल दोस्ता तुला "विदर्भ" दाखवतो " ।।4।।

    बिजवाई घेतली तं,खताची असते उधारी
    पोराला शिकोलं तं ,पोरगी राह्यते कोरी
    दुःखाचा तं उकळा रोज ,सुख वर्ज्य दाखवतो
    "चाल दोस्ता तुला "विदर्भ" दाखवतो " ।।5।।

    असे उसने आयुष्य जगण्याचा, फायदा तरी काय,
    एंड्रिन च्या दुकानाकडे , आपोआप वळतात मग पाय,
    जहर खाण्यासाठीही ,काढलेलं कर्ज दाखवतो
    चाल दोस्ता तुला "विदर्भ" दाखवतो ।।6।।

    योजना नको सांत्वन नको ,नकोच करू हाऊस
    देवा तू फक्त वेळेवर, पाडत जा पाऊस
    माझ्या डोळ्यात लपवलेला मग, निसर्ग दाखवतो
    "चाल दोस्ता तुला "विदर्भ" दाखवतो " ।।7।।

    -- चिंतामणी कारखानीस

  • बोल मेरे साथिया (ललकार)

    १९७२ च्या भुसावळमध्ये अमरदीप टॉकीज ला प्रीमियर रिलीज झालेला हा चित्रपट (खरं तर युद्धपट!) सकाळी सहापासूनचे शो! धर्मेंद्र,राजेंद्र आणि माला सिन्हा ! अवचित हे गाणं भेटलं आणि भिडलं. ” जितनी सागर की गहराई , जितनी अंबर की उंचाई ” अशी प्रेमाची ग्वाही देणारं !

  • नसलं तरी दाखवता आलं पाहिजे

    गंम्मत म्हणजे मलाही याचंच आश्चर्य वाटलं. मी महिन्यातून पाच वेळा केस कापतो. एका वेळेस ८० रुपये लागतात. या हिशोबाने महिन्याचे झाले ४०० रुपये. भरघोस जावळ असणारांच्या हेयर श्टायलीलाही महिनाभराचे इतके पैसे लागत नसणार..! मला आश्चर्य वाटलं ते हेच.

  • आज १८ मार्च – जागतिक निद्रा दिवस

    आज १८ मार्च – जागतिक निद्रा दिवस

    दरवर्षी १८ मार्च हा दिवस ‘जागतिक निद्रा दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी निद्रेविषयी आजारांची जनजागृती करण्यात येते. झोप न लागणे हा आजार आहे, याविषयी सामान्य जनता अनभिज्ञच आहे. त्यामुळे झोप न येणाऱ्या एकूण व्यक्तींपैकी फक्त एकचतुर्थांश व्यक्तीच झोप येत नसल्यामुळे डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेतात. सर्व शारीरिक क्रियांप्रमाणेच झोप ही क्रियादेखील अत्यंत महत्त्वाची आहे. झोपेमुळे शरीराचे कार्य चांगल्या पद्धतीने होण्यास मदत होते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने ६ ते ९ तास झोपणे आवश्यक असल्याचे अनेक मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर सांगतात. स्लीप हायजिन’ पाळणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. प्रत्येक मानवी शरीरात घड्याळ (बायोलॉजिकल क्लॉक) असते. हे घड्याळ सूर्योदय आणि सूर्यास्ताप्रमाणे सुरू असते. त्यामुळे सूर्योदयापूर्वी उठणे आणि सूर्यास्त झाल्यावर झोपणे ही शरीराची शिस्त आहे. त्यामुळे सकाळपासून सायंकाळपर्यंत शरीर विशिष्ट रसायने तयार करीत असते. त्यामुळे व्यक्ती जागी राहू शकते. सूर्यास्तानंतर शरीरातील विशिष्ट रसायने कमी झाल्याने झोप येऊ लागते. पण, कृत्रिम प्रकाशामुळे रात्री उशिरापर्यंत जागण्याची सवय स्वत:च शरीराला लावल्याने अन्य आजारांना निमंत्रण मिळू शकते. रसायन प्रक्रिया बिघडल्याने शरीरावर परिणाम होत असतो. काही महिन्यांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने शांत, पूर्ण वेळ, चांगली झोप हा मूलभूत अधिकार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे झोपेकडे योग्य लक्ष द्यावे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

    हल्ली व्हॉट्सअप, फेसबुकसह विविध समाजमाध्यमांनी तरुणांसह सर्वच वयोगटातील नागरिकांना आपल्या कवेत घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत ही माध्यमे सोबत बाळगल्याने रात्रीच्या झोपेवर त्याचा दुष्परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे. रात्री उशिरा झोपणे, सकाळी उशिरा उठणे, झोप अपुरी झाली तर दिवसभर आळसावणे, असे हे चक्र सलग पाच ते सात वर्षे राहिल्यास मधुमेह, रक्तदाबासह विविध आजाराचा गंभीर धोका ‘आ’ वासून आपल्यासमोर उभा राहणार हे एका अभ्यासातून पुढे आले आहे. प्रत्येक माणसाला रात्री किमान ८ तासांची गुणात्मक झोप आवश्यक असते. अशी झोप मिळाली नाही तर मधुमेह, रक्तदाब, यासह कर्करोगासारखे बरेच आजार जडण्याची शक्यता असल्याचे विविध अभ्यासातून पुढे आले आहे. जगभरात ३५ ते ४५ टक्के नागरिकांना निद्रानाशाचा आजार आहे. आपल्या झोपेच्या चार अवस्था असतात.

    त्यात रेम अवस्था महत्त्वाची असून १, २, ३ आणि रेम या चारही अवस्थेचे चक्र ९० मिनिटांचे असते. एक व्यक्ती सरासरी ६ तास झोपली तर तिच्या झोपेची चार चक्र पूर्ण होतात. रेम अवस्थेत मेंदूतल्या पेशी उत्तेजित होतात. या अवस्थेत जिथे गरज आहे, तिथल्या भागात मेंदूची दुरुस्ती होते, परंतु हल्ली रात्री तरुण पिढीमध्ये व्हॉट्सअप, फेसबुकसह समाज माध्यमांचा वापर वाढला असून त्यामुळे त्यांच्या झोपेवर विपरीत परिणाम होत आहे. भारतात मध्यरात्री १२ ते ३ वाजेपर्यंत सर्वात जास्त गाढ झोपेची वेळ असते. यावेळी मेंदूत मिलॅटोनीम हार्मोन्सचे प्रमाण वाढते. या हार्मोन्समुळे झोप येते. या मिलॅटोनीमचा संबंध सूर्याशी असतो. सूर्यास्त झाल्यावर हे हार्मोन्स मेंदूत सक्रिय होतात, परंतु रात्री व्हॉट्सअप, फेसबुकचा जास्त वापर करणाऱ्यांमध्ये हे हार्मोन्स तयार होण्याचे प्रमाण मंदावलेले असते. साहजिकच अशा व्यक्तींमध्ये हळूहळू निद्रानाशाचा आजार बळावू लागतो आणि हेच चक्र सातत्याने पाच ते सात वर्षे सुरू राहिल्यास रक्तदाब, हृदय, कर्करोगासह सगळेच आजार बळकावण्याचा धोकाही वाढतो. शालेय विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक स्पर्धा वाढली आहे. त्यांच्या शाळा, शिकवण्या याबरोबरच वाढलेल्या अभ्यासक्रमांमुळे त्यांची जीवनशैलीही बदलली आहे. तेव्हा या मुलांमध्ये निद्रानाशाचा आजार लहानपणीच सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

    झोपेची सायकल म्हणजे?

    झोपेच्या चार अवस्था असतात. त्यात रेम अवस्था महत्त्वाची असते. १,२,३ आणि रेम अशा ४ अवस्थांची एक सायकल होते. ही सायकल ९० मिनिटांची असते. पहिल्या ३ अवस्था ७० मिनिटांच्या आणि रेमची अवस्था वीस मिनिटांची असते. एक व्यक्ती जर सरासरी ६ तास झोपेल तर ४ सायकल पूर्ण होतात. रेम अवस्थेत मेंदूतल्या पेशी चार्ज होतात. जिथे गरज आहे, तिथल्या भागात या अवस्थेत मेंदू दुरुस्ती करतो. ही तंदुरुस्तीची नैसर्गिक प्रक्रिया खंडित होते. त्यामुळे आजार बळावततात, असे झोपेचे वैद्यकशास्त्र म्हणते. प्रत्येकाने किमान आठ तासांची आणि वयाची पन्नासी गाठलेल्यांनी किमान साडेसात तासांची झोप घेणे महत्त्वाचे आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • धनुर्धारी एकलव्य

    धन्य तो एकलव्य, जीवन ज्याचे दिव्य
    इतिहास घडवी भव्य, कौरव पांडवा संगे ।।१।।

    साधा होता भिल्ल, शरीर संपदा मल्ल
    धनुर्विदेचे शल्य, त्याच्या अंगी होते ।।२।।

    जन्मता धनुर्धारी, बनोनी शिकारी
    हिंस्र जनावरे मारी, अचूक नेम मारूनी ।।३।।

    पाहोनी भक्ष्य, होवूनी दक्ष
    देवूनी लक्ष, शिकार करी ।।४।।

    गुरूच्या होता शोधात, तीच त्याची खंत
    पूर्णता नसे ज्ञानात, गुरूविना ।।५।।

    शोधता आला आश्रमी, कौरव पांडवाचे मुक्कामी
    प्रसन्न झाला चित्ती ।।६।।

    गुरू द्रोणाचार्य, महान ते आचार्य
    अद्वितीय त्यांचे कार्य, महाभारतामध्ये ।।७।।

    कौरव पांडवाचे गुरू, धनुर्विद्येत तरबेज करू
    कुणी न त्यांचे हात धरू, ही इच्छा द्रोणाची ।।८।।

    कौरव पांडव मेळाव्यांत, बसता द्रोण मध्यभागांत
    एकलव्य येई तेथ, अभिवादन करी गुरुला ।।९।।

    इच्छा प्रदर्शिली विद्येची, धनुर्धारी बनण्याची
    द्रोणास गुरू करण्याची, एकलव्याने ।।१०।।

    बघूनी एकलव्याची स्फूर्ती, द्रोणास हर्ष होती
    कौतुके आशिर्वाद देती, गुरू द्रोणाचार्य ।।११।।

    विद्या माझी क्षत्रियासी, परी तू भिल्ल असशी
    कसे शिकवू मी तुजसी, द्रोण विचारी ।।१२।।

    गुरुचरणा खालची माती, एकलव्य घेई हाती
    हाच माझा गुरू असती, आशिर्वाद मागी द्रोणासी ।।१३।।

    मानूनी गुरू द्रोणा, घेवूनी त्यांची प्रेरणा
    जाई निघोनी वना, एकलव्य ।।१४।।

    घेवूनी चरणाखालील माती, बनवी तयाची द्रोण मूर्ती
    गुरू त्या प्रतीमे समजती, शिष्य होई एकलव्य ।।१५।।

    नमन करूनी द्रोण प्रतिमेला, धनुर्विद्येचा सराव केला
    मेहनत तो घेवू लागला, रात्रंदिनी ।।१६।।

    करूनी गुरूचे चिंतन, एकाग्र करूनी मन
    धनुर्विद्येचे ज्ञान, घेवू लागला ।।१७।।

    गुरू समजोनी मूर्तीचे ठायी, धनूर्विद्येचे ज्ञान घेई
    शिष्याचे प्रतीक होई, ह्या जगामध्ये ।।१८।।

    नसता गुरू समोरी, ज्ञान संपादन करी
    हीच असामान्यता खरी, एकलव्याची ।।१९।।

    एकाग्र चित्तेचे फळ, हेच यशाचे बळ
    समजोनी घ्यावे सकळ, विद्यार्थी जन हो ।।२०।।

    कौरवा पांडवा संगे, द्रोण जाता त्याच मार्गे
    अघटीत घटना होई गे, एकलव्याच्या वनांत ।।२१।।

    गुरू मूर्ती समोरील चिंतनात, एकलव्याच्या एकाग्रतेत
    अडथळा उत्पन्न होत, श्वानाच्या भूंकण्याने ।।२२।।

    कौरव पांडवांची शिकारी कुत्री, भूंकू लागली एकलव्या वरती
    थांबविण्या त्यांच्या भुंकण्याती, बाण सोडला त्यांचे वर ।।२३।।

    अचूक वेध साधला, इजा न करी श्वानाला
    बंद करी भूंकण्याला, मुखी बाण रोवूनी ।।२४।।

    विस्मयीत झाले द्रोण, बघूनी त्याचे अचूक बाण
    गुरू असावा ह्यांचा कोण, प्रश्न मनी पडला ।।२५।।

    वंदन केले द्रोण चरणी, तुम्हीच माझे गुरू असूनी
    विद्या शिकवली तव मूर्तीनी, चिंतन करिता तुमचे ।।२६।।

    एकलव्याची वेध शक्ती, अर्जुनाहून सरस ठरती
    मात करील त्याचे वरती, एकाग्रता शक्तीमुळे ।।२७।।

    एकाग्रता हीच शक्ती, एकलव्याने जाणली युक्ती
    करूनी गुरू मूर्तीवर भक्ती, साध्य केली धनुर्विद्या ।।२८।।

    जर वाढेल हे तपसाधन, एकलव्य बनेल महान
    धनुर्विद्येतील अजिंक्यपद, प्राप्त होईल त्यासी ।।२९।।

    जाणता हे मर्म, विचार करी अधर्म
    ‘विद्येस बाधा’ हे कर्म, शोधू लागले द्रोण ।।३०।।

    प्रसन्न आहे तूज विद्येवरी, माझे आशिर्वाद तुझेवरी,
    परी तू गुरूदक्षिणा घ्यावी, खरी इच्छा करीती द्रोण ।।३१।।

    उजवा अंगठा छाटूनी, गुरू दक्षिणा समजोनी
    करावी तो मज अर्पूनी, द्रोण बोले ।।३२।।

    निकामी झाला हात जाणून, अर्पण करी धनुष्य बाण
    वंदन करुन गुरुद्रोण, एकलव्य गेला निघूनी ।।३३।।

    एकलव्याची एकाग्रता महान, नियतीसी नव्हते मान्य
    कर्ण अर्जूनासी मात करून, महाभारत बदलले असते ।।३४।।

    एकलव्याचे जीवन, चमकती विज नभातून
    एकाग्र चित्तेचे उदाहरण, देई करूनी जगाते ।।३५।।

    शुभ भवतू

    डॉ. भगवान नागापूरकर
    ५५८ – १६११८३

  • सौभाग्यलेणं – नथ

    “नथ” हा एक पारंपारिक दागिना होय. महाराष्ट्रात हा अलंकार जास्त वापरला जातो.

  • नैवेद्य भाग ४

    गणेशजींना जसे मोदक आवडतात, तसे भगवान भोलेनाथना दूध आणि बेल आवडते. नागोबाला लाह्या, देवीला पुरणपोळी हे वैशिष्ट्याचे नैवेद्य.

    भोलेनाथ जरी भोळे असले तरी उग्रसंतापी आहेत. जरा मनाविरूद्ध झालं की तांडवच सुरू. म्हणजे लगेचच पित्त वाढण्याचा प्रकार. मन बिघडले तरी तळपायाची आग लगेच मस्तकात जाणार ! थोडक्यात आजच्या भाषेत "यांचा ना क्षणात रक्तदाब वाढतो" आता बरे आहेत, तर पुढच्या क्षणाला काय होईल याचा नेम नाही, असे शंकर प्रत्येक घरात, प्रत्येक पार्वतीच्या वाट्याला आलेले असतात. (काही घरातील शंकर पार्वती अपवाद सोडून) अशा शंकररावांसाठी बेल हे ऊत्तम औषध आहे. मन बिघडल्यामुळे होणाऱ्या पित्ताचा दाह कमी होण्यासाठी बेलाची पाने हे छान औषध आहे.

    भोलेनाथांची पिंडी बेलाच्या पानांनी याच कारणासाठी झाकून ठेवतात. रेडीएशनमुळे होणारे उपद्रव कमी होण्यासाठी देखील बेल काम करेल.

    कारण एक अभ्यास असा सांगतो, की जिथे शंकरांची जागृत ज्योतीर्लिंगे आहेत, तिथे खाली अणुसाठे असण्याची शक्यता आहे. ते झाकण्यासाठी पिंडाकार डोम !!! जगामधे जिथे जिथे अणुभट्ट्या आहेत, तिथे तिथे पिंडीच्या आकारासारखे छत असते. (/ डोम असतात.)
    हे त्याच्यातील साम्य.

    महत्वाचे आहे ते म्हणजे पित्ताचा दाह कमी करणे.
    आजचे संशोधन हेच सांगतेय की बेलपत्राचा वापर रक्तदाब कमी करण्यासाठी केला जातोय.

    यासाठी बेलाची चार पाने एक कप थंड पाण्यामधे सात आठ तास भिजवून ( आयुर्वेदीय परीभाषेत हिम करून ) ते पाणी पिण्यासाठी वापरावे. असे तीन महिने केल्याने रक्तदाब नियंत्रणात रहातो. असा अनुभव आहे.

    तसेच पित्तशमनाचे काम दुधाचा अभिषेक पण करतो. नागोबालादेखील दुधाचा नैवेद्य दाखवला जातो. प्रत्यक्षात नागोबा दूध पित नाही, हे काय पूर्वजांना माहीत नव्हते ? नागोबाच्या लाह्या या उत्तम शोषक गुणाच्या आहेत. न पचलेले अतिरिक्त पाणी, आमसदृश्य विष शोषून घ्यायला लाह्याएवढे दुसरे चांगले औषध नाही.

    प्रतिकपूजेमधे हे सर्व गृहीत धरलेले आहे.

    देवाला वाहिलेली सर्वप्रकारची पाने फुले या पण औषधीच आहेत. या पानाफुलांनी, देवाला केलेल्या दुधाचा किंवा पाण्याच्या अभिषेकाने, हे पाणी किंवा दूध न रहाता, तीर्थ बनते. यातही या पानाफुलांचा औषधी अर्क उतरलेला असतो. म्हणजे हा तीर्थ प्रसाद औषधच झाले ना ?
    आणि हा तीर्थ प्रसाद दररोज घ्यायचा. मग वेगवेगळ्या औषधांची गरज भासेल ?

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.
    10.09.2016