(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • गुलज़ार समजून घेताना…

    जानेवारी २०२१ मध्ये माझे हे पुस्तक प्रकाशित झाले. गुलज़ारच्या १६ चित्रपटांवर मी २०१८ साली चेहेरे-पुस्तिकेवर लिहिलेल्या पोस्ट्स चा हा संग्रह आहे.

  • निरंजन – भाग ४४ – दंगले देऊळ संतध्यानात

    “जय जय राम कृष्ण हरी” जपत-जपत श्री संत नामदेवांची संत मंडळी खूप मोठ्या उत्साहाने एकदा जंगल पार करीत होती. हा प्रवास सुरू असतानाच वाटेमध्ये त्यांना महादेवांचे एक भव्य मंदिर दिसते. सर्वांची उत्कट इच्छा होते की, आपण सर्वांनी मंदिरामध्ये जाऊन परमेश्वराचे दर्शन घ्यावे.

  • अमेरिकेतील थॅंक्सगिव्हींग सेल – भाग ३

    आमच्यासारखंच आणखीन एक कुटुंब, गुर्जरांच्या घरी येऊन डेरे दाखल झालं होतं. माधवराव आणि नलिनीबाई देशमुख हे साधारण पन्नास पंचावन्नच्या आसपासचं जोडपं आणि नितीन व निकीता ही त्यांची मुलं. देशमुख कुटुंबदेखील आमच्यासारखंच नवशिकं! त्यांचा देखील हा थॅंक्सगिव्हींगचा पहिलाच सेल. गुर्जरांनी तीन चार वर्ष अमेरिकेत काढली असल्यामुळे ते अनुभवी झाले होते. त्यामुळे ओघानेच नेतृत्वाची जबाबदारी अनुपमाकडे आली. “प्लॅनिंग पक्कं पाहिजे” तिने अनुभवाचे बोल ऐकवले.

    आम्ही सगळेजण fliers बघण्यात गर्क झालो होतो. मोठमोठया स्टोअर्सचे तर सात आठ पानी fliers होते. त्यात चपलांपासून लॅपटॉप पर्यंत आणि बार्बी डॉल पासून बेडरूम मधल्या फर्निचर पर्यंत, सार्‍या गोष्टींच्या रंगीबेरंगी आकर्षक जाहिराती होत्या. काय बघू आणि काय नको ते समजेनासं झालं होतं. शेवटी मी चक्क एका कागदावर वेगवेगळ्या स्टोअर्सची यादी केली, त्यांच्यापुढे ते ऑफर करत असलेल्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या DVD – VCR players ची मॉडेल्स, त्यांच्या किंमती, त्या प्रत्येकाचा rebate, rebate वजा करता येणारी रक्कम असं एक मोठं कोष्टक तयार केलं. एक दीड तासाची मेहनत झाली पण निदान काय घ्यायचं आहे, हे तरी नक्की झालं.

    गुर्जरांच्या दिवाणखान्याला एखाद्या युद्धकालीन नियंत्रण कक्षाचे (war office) स्वरूप आले होते. वर्तमानपत्रांचा आणि fliers चा पसारा, त्यात आपल्याला हवे असलेले नेमके पान शोधण्यासाठी प्रत्येकाची चाललेली धडपड, आरडा ओरडा, कॅलक्युलेटरवर किंमती व rebates चे कॅलक्युलेशन, असा सगळा गोंधळ चालला होता. “अगं बाई, तू कॅलक्युलेशन करू नकोस. चुकीचं कॅलक्युलेशन करशील आणि आपण भलतंच मॉडेल घेऊन येऊ”. “एवढं काही येता जाता माझं मॅथेमॅटिक्स काढायला नकोय” असे खटकेबाज प्रेमळ संवाद सुरू होते.

    तासा दीडतासाच्या धुमश्चक्री नंतर, आमचे DVD – VCR player चे मॉडेल ठरले. कोणत्या स्टोअर मधून, कोणते मॉडेल, किती किंमतीला, वगैरे तपशील पक्के झाले. एवढयात अनुपमाने गुगली टाकला, “तुम्ही DVD –VCR player चे एकत्रित मॉडेल बघताय मग दोघांची वेगवेगळी मॉडेल्स का बघत नाही? ” झालं! परत मारामारी सुरू ! मग मी DVD players ची मॉडेल्स आणि मृणालने VCR players ची मॉडेल्स बघायला सुरुवात केली. पण शेवटी हा खटाटोप कामी आला. कारण DVD players आणि VCR players वेगवेगळे घेतले तर त्यांची किंमत DVD-VCR players च्या मॉडेल्स पेक्षा कमी होती. प्रत्यक्ष युद्धावर जाण्यापूर्वीच आपली व्यूह रचना यशस्वी होतेय हे बघून आम्हाला आनंदाच्या उकळ्या फुटल्या.

    देशमुख कुटुंब मात्र अजूनही भांबावलेलंच होतं. नक्की काय घ्यावं याचा त्यांचा विचार काही पक्का होत नव्हता, आणि आता तर एवढया जाहिराती आणि fliers पाहून ते आणखीनच चक्रावून गेले होते. “बघा बघा जरा त्यांच्याकडे, शिका काही तरी व्यवस्थितपणा ” नलिनीबाई माधवरावांना बोलल्या. “अगं त्यांचं काय, ते ठरवूनच आले होते DVD-VCR player घ्यायचं म्हणून, इथे येऊन त्यांना फक्त मॉडेल निवडायचं होतं. तुझं कुठे काय घ्यायचंय ते ठरतंय काय? पन्नास गोष्टीत जीव अडकलेला तुझा ”. शेवटी बर्‍याच हाणामारीनंतर देशमुख कुटुंबाची देखील यादी तयार झाली.

    रात्री जेवणं झाल्यावर पुढच्या मोर्चेबांधणीला सुरुवात झाली. पहिल्यांदा कोण कोण जाणार हे ठरवायला हवं होतं. श्रीयुत गुर्जरांना एवढया पहाटे थंडीत कुडकुडत खरेदीला जाण्यात इंटरेस्ट नव्हता म्हणून आणि आमचा मुलगा सिद्धार्थ लहान म्हणून, त्या दोघांनी घरीच झोपून रहायचं असं ठरवलं. मग किती गाडया न्यायच्या आणि कोण कोणाबरोबर कोणाच्या गाडीतून कुठे जाणार याचं प्लॅनिंग सुरू झालं. नशीबाने दुकानं एकमेकांपासून फार लांब लांब नव्हती. परंतु विकत घ्यायच्या वस्तू बर्‍याच होत्या आणि त्या वेगवेगळ्या दुकानांतून घ्यायच्या होत्या. त्यामुळे कोणी किती वाजतां कोणत्या दुकानाच्या रांगेत उभे रहायचं, तिथलं शॉपिंग संपलं की पुढे कुठच्या दुकानात जायचं वगैरे बारकावे भरपूर होते.

    “आपण बाबांना एका दुकानाच्या रांगेत उभं करू आणि आपण पुढच्या दुकानात जाऊ” देशमुखांच्या कन्येनं सुचवून बघितलं. “तुझ्या बाबांना आणि एकटं ? झालं कल्याण! त्यांना ख्रिसमस येईपर्यंत एक देखील वस्तू मिळायची नाही. नुसते गोल गोल फिरत राहतील दुकानभर.” नलिनीबाईंनी तो प्रस्ताव तात्काळ हाणून पाडला. मग मी, माधवराव आणि त्यांचा मुलगा, आम्ही एकत्र एके ठिकाणी जावे आणि सर्व बायकांनी एका ठिकाणी जावे, असा एक विचार पुढे आला. पण तीन चार जणांनी एकाच रांगेत उभं राहण्यापेक्षा वेगवेगळ्या ठिकाणी उभं राहणं अधिक शहाणपणाचं आहे असं अनुपमाचं मत पडलं. अर्थात तिच्या मताला अनुभवाचं वजन असल्यामुळे ते लगेच मान्यही झालं. शेवटी मी आणि माधवराव एके ठिकाणी आणि बाकी सर्वजण दुसर्‍या दोन ठिकाणी विखरून उभं राहण्याचा प्लॅन सर्वांनुमते संमत झाला.

    – डॉ. संजीव चौबळ

  • अमेरिकेतील वन्यप्राणी जीवन – भाग १

    ग्रामीण, निमग्रामीण भागातल्या लोकांचा आणि निसर्गाचा जवळचा संबंध असावा यात काही नवल नाही. या निसर्गाच्या सान्निध्यातूनच पाळीव तसंच वन्य पशु-पक्षी जगत हे या जीवनाचं एक महत्वाचा घटक बनून गेलेले असतं. कृषीउद्योग आणि पशु संवर्धन हे एकमेकांशी निगडीत असल्यामुळे, ग्रामीण जगतामधे पशु संवर्धनाला मानाचं स्थान असावं हे उघडच आहे. परंतु एकंदरीतच अमेरिकन जीवन प्रणालीमधे निसर्गाला आणि त्या अनुशंगाने पशु पक्षांच्या संवर्धनाला खूपच महत्व आहे. या संवर्धित नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग कॅंपिंग, हायकिंग, हंटिंग, फिशिंग अशा विविध छंदांसाठी करून घेऊन, लक्षावधी अमेरिकन्स आपलं जीवन निसर्गाच्या सान्निध्यात व्यतीत करून समृद्ध करून घेत असतात.

    या लोकांचं शिकार, मासेमारी आणि एकंदरीतच वन्यप्राणी जीवनासंबंधित छंदांचं (फोटोग्राफी, वन्यप्राणी अवलोकन वगैरे) वेड किती जबरदस्त आहे याची कल्पना २००६ च्या एका अहवालावरून येते. त्या साली ८७.५ दशलक्ष अमेरिकन्सनी या छंदापायी १२,२०० कोटी (१२२ बिलीयन) डॉलर्स खर्च केले. यापैकी ३० दशलक्ष लोकांनी आपला मासेमारीचा शौक पुरा केला, १२.५ दशलक्ष लोकांनी आपली शिकारीची हौस भागवून घेतली तर ७१.१ दशलक्ष लोकांनी वन्यप्राणी जीवनाचं अवलोकन, फोटोग्राफी असले छंद पुरे करून घेतले.

    शिकारीच्या आकारमानानुसार अमेरिकेतल्या शिकारीचे तीन प्रकार होतात.

    मोठ्या प्राण्य़ांची शिकार – यात मुख्यत: हरीण, एल्क (आपल्याकडच्या बारशिंग्यासारखं हरीण), अस्वल आणि जंगली टर्कीचा समावेश होतो. यात हरणांची शिकार करणारे १०.१ दशलक्ष, आणि टर्कीची शिकार करणारे २.६ दशलक्ष हे संख्येने सर्वाधिक.

    लहान प्राण्यांची शिकार – यात ससे, खारी, फेसंट्स (जंगली कोंबड्या) आणि क्वेल (छोट्या रानकोंबड्यांचा प्रकार) हे मुख्यत्वे येतात.

    स्थलांतरित पक्षांची शिकार – यात प्रामुख्याने ऋतुमानानुसार स्थलांतर करणार्‍या बदकं, गीज, कबुतर अशा पक्षांचा समावेश होतो.

    गावाकडल्या बर्‍याच लोकांसाठी शिकार हा निव्वळ एक छंद न रहाता दैनंदिन जीवनाचा एक महत्वाचा भागच असतो. गावातल्या फार्मस्‌वर जावं तर बंदुका म्हणजे आयुष्याचा एक घटकच वाटायला लागतात. जनावरांच्या गोठ्याच्या दरवाज्याआड, गॅरेजमधे, पिक-अप ट्रकच्या मागच्या अंगाला, बंदुका कायमच पडलेल्या असतात. उभ्या पिकात घुसणारी हरणं, शेळ्या-मेंढ्या किंवा वासरांनाच ठार करणारे कायोटी किंवा क्वचित लांडगे, परसदारात येऊन घरातल्या कुत्र्या मांजरांवर हल्ले करणारी अस्वलं किंवा बागेतल्या भाजी पाल्याची नासधूस करणारे ससे किंवा रकून्स बघितले की या बंदुकांचा उपयोग ठायी ठायी कसा होत असेल, हे जाणवल्याशिवाय रहात नाही. उगाच नाही आज अमेरिकेत २५० दशलक्ष बंदुका आहेत.

    या सार्‍या शिकार, मासेमारी आणि एकंदरीतच वन्यजीवनाच्या सान्निध्याच्या ओढीचं मूळ, सतराव्या- अठराव्या शतकातील, अमेरिकेचा गोर्‍या लोकांना अनभिज्ञ असा अफाट विस्तार धुंडाळून, हा खंडप्राय देश पायतळी घालणार्‍या धाडशी बहाद्दरांमधे सापडतं.

    क्रमशः ....

    -- डॉ. संजीव चौबळ

  • आजचा विषय – ताडगोळा

    उन्हाळा कडक जाणवू लागला आहे पारा दिवसागणिक वाढू लागला आहे. कडकडीत उन्हामुळे लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्व जण तहानेने व्याकुळलेले असताना तहान भागवण्यासाठी बहुतेकांची पावले सहजपणे शीतपेयांच्या दुकानांकडे वळू लागत आहेत. याशिवाय नारळपाणी, कलिंगड इत्यादी तहान भागवण्यासाठी पारंपरिक उपायही योजले जात आहेत. या उष्म्यामध्ये तहान भागवण्यासाठी तसेच शरीराला थंडावा देण्यासाठी ताडगोळे खरेदी करण्यालाही अधिक पसंती आहे. कोकणातून येणारे ताडगोळे बाजारात जागोजागी दिसू लागले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात उष्णतेचा तडाखा शरीरातील उर्जा कमी करतो. अशावेळेस आहारातून, फळांमधून, भाज्यांमधून शरीरात पाण्याचा आणि उर्जेचे समतोल राखण्यासाठी प्रयत्नपूर्वक काळजी घेणे आवश्यक आहे. शहाळ्याचं गोड पाणी आणि पातळ मलई जशी आपल्याला रिफ्रेश करते. तसेच भारतीय किनारपट्टीवर ‘ताडगोळा’ हे फळ या दिवसात मुबलक प्रमाणात आढळते. लिचीप्रमाणे आवरण असणारे पारदर्शक आणि पाणीदार लहानसे फळ म्हणजे ताडगोळा. पाल्म किंवा ताडाच्या झाडाला येणारं फळ म्हणजे ताडगोळा हे होय. याचं शास्त्रीय नाव बोरासस फ्लॅबिलिफर असं आहे. याला फ़ॅन पाम असेही म्हणतात. हे फळ महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. समुद्रकिनारी प्रामुख्याने लागवड होते. बंगालमध्ये ‘ताल’, तेलगूमध्ये ‘ताती मुंजलू’, तामिळमध्ये ‘नुन्गू’, इंग्रजीमध्ये ‘आइस अॅ्पल’ तर हिंदीमध्ये ‘तारी’ या नावाने ओळखलं जातं. आशिया, न्यु गिनी आणि आफ़्रिकेतही हा आढळतो. याच्या पानाचे अनेक उपयोग होतात. पंखे, चटया, ताट्या वगैरे करण्यासाठी उपयोग होतो. पुर्वापार याची लागवड केली जातेय, कंबोडियाच्या जगप्रसिद्ध अंगकोर मंदिरसमुहाच्या परिसरात या झाडांची लागवड केली आहे. भुर्जपत्र करण्यासाठी याच्या पानांचा उपयोग होतो. ही पाने हळद आणि मिठाच्या पाण्यात उकळुन वाळवतात. मग त्याना दगडाने पॉलिश केले जाते. अनेक जुने ग्रंथ या पानांवर लिहिलेले आढळतात. तामिळनाडु मधे अनेक जणांचे भविष्य असे लिहुन ठेवलेले आहे. लोक तिथे हौसेने ते वाचायला जातात. आणि ती व्यक्ति तिथे कधी येणार आहे तेही, त्या पत्रांवर लिहुन ठेवलेले आहे. याच्या पानाच्या दांड्यांचा कुंपणासाठी उपयोग होतो. या पासुनच जाडसर काथा निघतो आणि त्याचा ब्रश वगैरे करता येतो, झाडाचे लाकुडही मजबुत असते आणि घरबांधणीत त्याचा उपयोग होतो. या झाडापासुन ताडी मिळते, ती आंबवुन मादक पेय करतात. याही झाडापासुन नीरेसारखे पेय मिळते. ते आटवुन गुळही करता येतो, तो गुळ उसापासुन केलेल्या गुळापेक्षा चवदार लागतो. आपल्यापेक्षा तामिळनाडुमधे या झाडाचा खाण्यासाठी जास्त उपयोग होतो. या झाडाचे कोंब, कोवळी रोपे खातात. तसेच झाडाच्या टोकाशी एक मऊ गर तयार होतो, तोही खातात. या झाडाची पानं सदाबहार हिरवीगार आणि आकाराने मोठी असतात. ताडगोळे हे अतिशय मऊ, रसदार असून त्यावर जाड साल असते. ही साल काढणं म्हणजे कंटाळवाणं काम असतं. सालीचा रंग पिवळसर केशरी असून आतील गराचा रंग करडा किंवा पांढरा असतो. चवीला गोड असून प्रकृतीने थंड असणारं हे फळ आहे. पाणीदार फळ असून ते कापायची गरज भासत नाही. या फळाची प्रवृत्ती थंड असून हे फळ उन्हाळ्यात खाणं आरोग्याच्या दृष्टीने चांगलं आहे. यात खनिज, लोह, पोटॅशिअम, फॉस्फरस आणि ए, बी, सी या जीवनसत्त्वांचा भरपूर साठा आहे. त्यामुळे एकंदरीतच शरीराला अतिशय उपयुक्त ठरतं. ताडगोळा हे चवीला गोडसर असते.

    ताडगोळ्याचे आरोग्यदायी फायदे

    ताडगोळा थंड स्वरूपाचा असल्याने शरीरात थंडावा निर्माण करण्यास मदत करतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या उष्णतेचा या दिवसात त्रास होण्यापासून बचाव होण्यास मदत होते.
    ताडगोळ्यामध्ये सोडीयम,पोटॅशियम यासारख्या मायक्रोन्युट्रीअंट्सचे प्रमाण मुबलक प्रमाणात आढळते. यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाईट्स आणि पाण्याचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. यामुळे उन्हाळ्यात जाणवणारा डीहायड्रेशन आणि उष्माघाताचा त्रास कमी होतो. परिणामी थकवा जाणवत नाही. यात भरपूर प्रमाणात पोटॅशिअम आणि फायबरचा साठा असतो. हे फळ तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखण्याचं काम करतं, त्याचबरोबर शरीराचं तापमान नियंत्रित राहतं. उन्हाळ्याच्या दिवसांत या फळाचे आवर्जून सेवन करावे. उष्णतेमुळे होणारी पोटातली जळजळ कमी होण्यास मदत होते. उन्हामुळे लहान मुलांना किंवा मोठय़ा माणसांनाही त्वचेवर पुरळ किंवा अॅयलर्जी होते. ताडगोळ्यांचा गर पुरळ आलेल्या ठिकाणी लावल्यास लवकर आराम पडतो. उन्हाळ्याच्या दिवसांत हे फळ आवर्जून खावं, कारण या दिवसांत काही जणांना उन्हाळे लागतात, ही जळजळ कमी होते. हे फळ या दिवसांत फ्रीजमध्ये साठवून ठेवावं. बाहेर ठेवल्यास हे लवकर खराब होतं. त्यामुळे त्याची साल न काढता फ्रीजमध्ये साठवून ठेवल्यास दीर्घकाळ टिकतं. सुट्टीच्या दिवसांत मुलं अधिक वेळ घराबाहेर असतात, अशा वेळी त्यांना हे फळ खाऊन मगच बाहेर पडायला सांगावं. ताडगोळ्याचा फेसपॅकही अतिशय उत्तम होतो. यासाठी चंदनाची साल उगाळून घ्यावी. त्यात थोडं नारळपाणी आणि ताजा ताडगोळा कुस्करून घालावा. याची चांगली पेस्ट तयार करून ती चेह-याला लावावी. फ्रेश वाटतं आणि उन्हामुळे रापलेली त्वचा उजळते. किडणीच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असून शरीराला नको असलेली द्रव्यं याच्या सेवनाने बाहेर फेकली जातात. याच्या सेवनाने बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. कांजण्या आलेल्या रुग्णांनी हे फळ खावं म्हणजे कांजण्यांमुळे अंगाला येणारी खाज कमी होते. शरीरातील साखरेची पातळी संतुलित राहते. याचं सेवन केल्यावर अधिक भूक लागत नाही, त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.

    ताडगोळ्याचे घरगुती उपयोग

    उष्णतेमुळे लघवी जळजळ होत असेल तर कोवळा ताडगोळा खडीसाखर घालून खावा.
    डोळ्यांची आग होत असल्यास ताडगोळा त्याच्याच पाण्यात वाटून तो लेप पापण्यांवर लावावा.
    गळू पिकत नसल्यास जून ताडगोळा वाटून त्यात हळद घालून गरम करावा व त्या गळूवर बांधावा.
    ज्या व्यक्तींना शरीरात वात वाढल्याने संडासला घट्ट होत असेल अथवा साफ होत नसेल तर जेवणापुर्वी व जेवणानंतर काही वेळाने १ ताडगोळा खावा. अंगामध्ये उष्णता वाढणे,हातापायांची आग होणे,पोटात आग होणे ह्यात ताडगोळा खाण्याने फायदा होतो. ताडगोळा अतिमात्रेत खाल्ल्याने सर्दी,खोकला,जुलाब होतात.

    सीताफळ – ताडगोळा मूस कस्टर्ड

    साहित्य. :५०० ग्रॅम सीताफळ आइस्क्रीम, २०० ग्रॅ. ताडगोळे (बारीक तुकडे केलेले), ४० ग्रॅम जिलेटिन पावडर, ५०० मिली दूध, १०० ग्रॅम साखर, २ अंडी, २ चमचे व्हॅनिला इसेन्स.

    कृती. : एका भांडय़ात साखर, अंडी, व्हॅनिला टाकून मिक्स करावे. जिलेटिन पावडर अर्धा कप पाणी घेऊन त्यात भिजत ठेवावी. सीताफळ आइस्क्रीम मेल्ट करून घ्यावे. एका भांडय़ात दूध घेऊन गॅसवर उकळत ठेवावे. एक उकळी आल्यानंतर लगेच काढून साखर व अंडी त्या मिश्रणात घालून मिक्स करावे. त्यातच लगेच भिजवलेली जिलेटिन पावडर टाकावी. सर्व नीट मिक्स करून गाळून घ्यावे. त्यात आइस्क्रीम व ताडगोळ्याचे तुकडे टाकून काचेच्या भांडय़ात ओतून फ्रीजमध्ये ४ ते ५ तास ठेवावे. व्यवस्थित सेट झाल्यावर थंड सव्‍‌र्ह करावे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • गुणकारी जास्वंद

    १) काही जणांना केसांना तेल लावायला आवडत नाही. त्यांनी जास्वंदाची १० ते १५ फुलं लोखंडाच्या कढईत थोड्या पाण्यात भिजवावीत. रात्री ते पाणी चांगला अर्क निघेपर्यंत उकळून घ्यावं. सकाळी उठल्यावर तो अर्क केसांना लावा. एकातासाने फक्त पाण्याने केस धुऊन टाकावेत. यामुळे केसांना चांगली चमक येते.

    २) हेड मसाजसाठी जे तेल वापरत असाल त्यात, उदाहणार्थ तिळाच्या अथवा खोबरेल तेलात पाच ते सहा जास्वंदाची फुलं टाकावी. हे तेल कोमट करून कापूस किंवा बोटांऐवजी जास्वंदीच्या फुलांनी केसांच्या मुळांना चोळलं तर केसांची मुळं मजबूत होतात.

    ३) भरपूर जास्वंदाची फुलं, दोन आवळे, थोडी शिकेकाई आणि दोन रिठे पाण्यात टाकून ते मिश्रण व्यवस्थित उकळवून ठेवा. केसांसाठी हेअरवॉश म्हणून वापरता येईल. हा हेअरवॉश रोज वापरला तरी चालेल.

    ४) मोड आलेली मेथी, कोरफड चिक, जास्वंदाची फुलं एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक वाटावी. हा पॅक केसांना लावावा. याने केसांना नैसगिर्क चमक येते.

    ५) जास्वंदीची फुलं, कोरफडीची पानं, ५० मिलि राईचं तेल आणि ५० मिलि तिळाचं तेल एकत्र गरम करून ठेवावं. शक्यतो काचेच्या बाटलीत हे तेल भरून ठेवून वापरावं. आठवड्यातून दोनदा तरी हे तेल केसांना लावावं.

    ६) बाजारात मिळणारं जास्वंद तेलही खूप गुणकारी असतं. फक्त पाणी घालून ते थोडं पातळ करून लावा.

    ७) जास्वंद जेलचा अरोमा थेरपीच्या तेलांमध्येही खूप उपयोग होतो. पण तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय ते वापरू नये.

    ८) ब्राह्मी, माका, नागरमोथा, जांभळं आणि जास्वंदीची फुलं एकत्र उकळवून त्याचं पाणी काचेच्या बाटलीत भरून ठेवावं आणि हेअर वॉटर म्हणून वापरावं.

    ९) मेंदी कालवताना ताक, जास्वंद तेल आणि मंडूर पावडर एकत्र भिजवावी. हे मिश्रण लावल्यामुळे केसांना नैसगिर्क रंग येतो.

    १०) जास्वंद जेलमध्ये शिकेकाई, रिठा, कचूर सुगंधी, संत्र्याची साल आणि मुलतानी माती एकत्र करून त्याचा लेप केसांना लावावा.

  • टाकीचे घाव सोसल्या शिवाय ‘देव’ पण येत नाही

    ‌खरं तर दगडातून एखाद्या विशिष्ट देवतेची मूर्ति बनवावयाची असेल तर दगडाला छन्नी आणि हातोड्याच्या सहाय्याने भरपूर घाव सोसावे लागतातच. बनवणाऱ्या मुर्तीकाराला,तो कितीही मोठा कलाकार असू देत,पण आपण देवतेची मूर्ती बनवत आहोत हे माहीत असूनही तो त्या दगडावर घाव घालतोच ना?

  • आयुष्याची प्रश्नपत्रिका…

    आपल्या प्रत्येकाचे आयुष्य म्हणजे शेवटच्या क्षणापर्यन्त सोडवायची एक प्रश्नपत्रिका असते.या प्रश्नपत्रिकेसाठी अमुक एक विशिष्ठ असा विषय नसतो वा कसल्याही स्वरूपाचा अभ्यासक्रम आखलेला नसतो.प्रत्येकाची प्रश्नपत्रिका जरी वेगवेगळी असली तरी काही असे प्रश्न असतात कि ते एकमेकांच्या मदतीने सोडवावे लागतात..आणि तशी आपल्याला मोकळीकही दिलेली असते..काही काळाची मर्यादा घालून.आपण तेवढ्या निर्धारित वेळेत सोबत्यांच्या साथीने त्या प्रश्नांना सामोरे जायचे असते.काही प्रश्नांसाठी आपल्यापुढे कुणाची बौद्धिक मदत ..तर कुणाची शारिरीक मदत ..आर्थिक..भावनिक घ्यावी लागते..असे पर्याय निवडण्याला प्रत्येकाला संधी मिळत असते.आपले पर्याय आपणच निवडायचे असतात आणि ते निवडताना आपण ही जी मदत घेत असतो तिचे योगदान हे केवळ आपल्याला उत्तरांच्या उद्दिष्ठाप्रत न्यावयासाठी आहे हे विसरायचे नाही..हे पर्याय आपली उत्तरे करण्याचा कधीच यत्न नसावा..कारण एकतर तशी मुभा आपल्याला नसते..आणि कुणी अट्टाहासाने जर तसा दांडगावा केला तर ती उत्तरपत्रिका त्याच्या नावाची समजली जात नाही.आणि आयुष्याची प्रश्नपत्रिका सोडविण्यास सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ठ ठामपणे प्रत्येकाने स्वत:ला बजावायची ती ही कि आपली प्रश्नपत्रिका आपली आपण प्रामाणिकपणे सोडवायची..आपल्यावर कुणाची देखरेख आहे किंवा नाही याचा कानोसा घेण्यात अनमोल वेळ वाया न घालविता प्रश्न सोडवीत रहायचे..आपली उत्तरे कुणा दुसऱ्याच्या हाती कधीही परीक्षणासाठी ..मूल्यांकनासाठी अजिबात सोपवायची नाहीत..आपला गृहपाठ इतका जोमदार असायला हवा की आपणच आपल्या उत्तरांचे परीक्षण..मुल्यांकन करावयास सिद्ध असायला हवे..आणि कुठे काही चुकीचे वा अपुरे उत्तर आढळल्यास आपणच पुन्हा नव्याने ते लिहायला शिकले पाहिजे...आपण रोज झोपताना आपल्या उत्तरांबद्दल समाधानी नि संतुष्ठ असणं आणि आपल्या नजरेनं आपल्याला जोखताना ताठ मानेने वावरणं ही आपली जगण्याकडे पहाण्याची दृष्ठी असली पाहिजे.
    आणखी एक गोष्ठ ठाम ध्यानात ठेवायची ती ही कि या प्रश्नपत्रिकेत येणारे सारेच्या सारे प्रश्न सोडविणे अनिर्वार्य असते..वेळकाढूपणा करून प्रश्नांना बगल देता येत नाही..टाळता तर अजिबात येत नाही.आणि आपापली प्रश्नपत्रिका आटोपल्यानंतर आपल्याला उगाचच कुणासाठी रेंगाळता येत नाही..प्रत्येक प्रश्नाला असणारे गुण आपणाला कधीच दिसत नाहीत..आणि त्याही पुढे एकच प्रश्न जरी आजूबाजूच्या सहकाऱ्याच्या प्रश्नपत्रिकेत दिसला तरी प्रत्येकाच्या प्रश्नपत्रिकेत त्याला असणारे गुण कधीच समान नसतात..तेव्हा आपली उत्तरे लिहताना शेजारी_पाजारी बघणे म्हणजे केवळ वेळेचा अपव्यय ठरतो.

    या प्रश्नपत्रिकेत बरोबर लिहलेल्या उत्तरांना भरघोस गुण असतात..आणि त्या गुणांची सावली आयुष्यभर आपल्याला आणि आपल्या सोबतीला येणाऱ्या तथाकथित अपयशी म्हणून उल्लेख होणाऱ्या सगळ्या सोबत्यांना लाभत असते..आणि आपल्या चुकलेल्या उत्तरांना पुन्हा पुन्हा नव्याने लिहायची संधी प्रत्येकाला मिळत असते..आपण एकच करायचे असते कि कुठलाही मानपान ..आढेवेढे न घेता..यतकिंचितही अपराधीपणा न मानता..न्यूनगंड न जोपासता प्रसन्न मनाने चुकलेली उत्तरे लिहित जावे..आणि ही अशी उत्तरे सवयीने लिहिण्याचा नियम नसावा..तर ती सहजतेने लिहिली जावीत..एकदा आपल्याला आपल्या चुकलेल्या उत्तरांना समजावून ..सांभाळून घ्यायला जमू लागले की मग आपल्यामध्ये दुसऱ्याच्या चुकलेल्या उत्तरांची खिल्ली उडविण्याची वृत्ती मूळ धरणार नाही..
    आता इथला प्रत्येकजण ज्याची त्याची प्रश्नपत्रिका पूर्ण लिहूनच बाहेर पडत असला तरी बहुतांशी लोक ही परीक्षा देताना परीक्षेचा उद्देश..प्रयोजन..आपल्याला परीक्षेस बसण्याची मिळालेली संधी..आपल्याला परीक्षा देण्यासाठी कराव्या लागणाऱ्या अभ्यासासाठी जन्मजात मिळालेली विचार..भावना हि आयुधे ..आपली काबिलीयत..हुनर..ईश्वरी अनुग्रह..अभिषेक या सगळ्याकडे पाठ फिरवून बसत उत्तरे लिहित असतात..आयुष्याचे जगणे सार्थकी होणे म्हणजे संपूर्ण प्रश्नपत्रिका लिहून झाल्यावर मिळणारा कौल नसतो...आणि सत्य हे की असा कौल स्वत:च्या डोळ्यांनी पाहायचे भाग्य कुणालाही लाभलेले नाही..वा लाभत नसते..तर जगण्याचे सार्थक ..कुणी त्यास मोक्ष म्हणतात .. तो हा कि उत्तरे लिहताना प्रत्येक प्रश्नाशी आपला जुडलेला भाव..त्याच्याशी झालेला समागम आणि शेवटी उत्तर लिहून झाल्यावर अलवार..अवचित ..अनावधानाने ओठातून निसटणारी शीळ..बस्स याशिवाय आयुष्यात काहीही मिळवायचे नसते..हा प्रत्येक टप्प्यावर आपले नाव घेत ..शोधत शोधत आलेला आनंद जेव्हा आपण भेटल्यावर गळ्यात गळा घालून बिलगतो नि आपल्या खांद्यावर त्याचे आनंदाश्रू ओघळतात ..हा क्षण म्हणजे स्वर्गसुख नव्हे तर साक्षात इन्द्रपदच होय...आपल्यावर होत असलेल्या आसवांच्या अभिषेकात भिजून चिंब होताना आसवांच्या लहान_मोठ्या वर्गवारीकडे अजिबात ध्यान देऊ नये..कुणी आपल्याला तसे करण्यास भरीस पडत असला तरी त्याकडे कानाडोळा करावा..आनंदाचे मूल्य झोपडीपासून राजवाड्यापर्यंत वस्तुमानासारखे एकच असते..आपण आपल्या परीने ज्या गुरुत्वाकर्षणाचा चष्मा लावून त्या आनंदाकडे बघत असतो त्यानुसार आनंदाचे वजन बदलत असते..वस्तुमान नाही..हे जगण्याचे प्रमेय ही आपली आयुष्याची स्टेटस लाईन असावी.

    आता हे कागदावरचं प्रश्नपत्रिका सोडविण्याचे मार्गदर्शन कितीही सोप्पं..नि सहजशक्य वाटत असलं तरी प्रत्यक्ष प्रश्न समोर उभे ठाकल्यावर उत्तरे डोळ्याच्या आवाक्यात दिसत असली तरी कागदावर उतरवताना हात कापू लागतात...या अनुभवातून आपल बेडा यशस्वी बाहेर पाडावयाचा असेल तर आपणच आपल्या पाठीशी ठामपणे उभे रहायचा सराव अभ्यासाने अंगी बाळगून असावे. आपल्या प्रश्नपत्रिकेतील अवघड ..कठीण..प्रश्नांना सहजतेने स्वीकारावे .आपल्या बुद्धीवर ..चातुर्यावर ..क्षमतेवर आपण पूर्णपणे विश्वास ठेवायला हवा.किंबहुना त्याकडे बघूनच आपल्या प्रश्नपत्रिकेत अवघड ..कठीण प्रश्न आलेत या बद्दल खुशाल रहावे. आपल्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न ज्या ईश्वरी संकेतानुसार आलेले आहेत तोच ईश्वरी अंश आपल्यात आहे हे का जर जाणलं तर आपल्याला कृतार्थ जीवन जगणे सुलभ होऊन जाते..आणि शेवटी ज्यांचा ईश्वरावर..नियतीवर विश्वास..श्रद्धा नाही त्यांच्यासाठी..त्यानाही प्रश्नपत्रिका लागू आहे ..सर्व प्रश्न अनिर्वार्य आहेत..भले त्यांना त्यांच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्ना _मागील ईश्वरी संकेत कबूल नसेल तरी निसर्गाचे नियम साऱ्या सृष्टीला बंधनकारक आहेत ..सहजीवनाचे जगणे मान्य केल्यावर एकमेकाच्या उन्हा_सावलीत इच्छा असो वा नसो विसावा घ्यावाच लागणार हे ही त्यांना नाकारता येणार नाही..आता या साऱ्या नियमबद्ध नैसर्गिक सृष्टीतील श्वास_उ:श्वास यालाच कुणी ईश्वर म्हणू लागतो..आता याला मानणे आणि न मानणे याचा काही प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांच्या स्वरूपावर परिणाम होत नसतो..मात्र उत्तरे लिहताना असणारी अदब मात्र जरूर बेमिसाल असते तिचा रंग आणि नूर काहीसा आगळा असतो..

    रजनीकान्त

  • शिवधनुष्य प्रशासकीय सुधारणांचे

    आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणावरुन राज्य मानवी हक्क आयोगाचे सदस्य के. लाला यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपवला. त्यानंतर राज्यात मोठे प्रशासकीय फेरबदल होणार असल्याचे संकेत मिळाले. वास्तविक प्रशासकीय सुधारणा ही केवळ निवड-नियुक्ती या पुरती मर्यादित बाब नाही. त्यासाठी अनेक गोष्टींचा विविध पातळ्यांवर विचार करावा लागेल. तरच हे शिवधनुष्य पेलणे शक्य होईल.

  • आयुका आणि चार्ल्स कोरिया

    जगप्रसिद्ध वास्तुरचनाकार चार्ल्स कोरिया यांचे अलीकडेच निधन झाले. आयुका या विख्यात संस्थेची वास्तू ही चार्ल्स कोरिया यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आली. या निमित्ताने आयुकाचे संस्थापक-संचालक प्रा. जयंत नारळीकर यांचा चार्ल्स कोरिया यांच्याशी निकटचा संबंध आला प्रा. नारळीकरांनी लेखणीबद्ध केलेल्या, चार्ल्स कोरिया यांच्या या काही आठवणी.