वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
वापर चांगल्या कार्यासाठी झाला तर खूप फायदा आहे परंतु बर्याच जणांना आजूनही मोबाईल फोन वरून बोलतांना भान राहत नाही आणि इतरांना त्याचा त्रास होतो. बहुतेक वेळा सार्वजनिक ठिकाणी बोलतांना सावकाश व मुद्याचेच बोलावे हे लक्षात न राहिल्याने त्याचे सार्वजनिक भाषण होते व नाकोत्या (गुप्त) गोष्टी सगळ्यांना समजतात आणि त्याचा गुंड फायदा घेतात मग पास्तावला होते
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रांसमध्ये आयोजित “जी-7’च्या बैठकीत आणि रशियाच्या दौऱ्यात ज्या पद्धतीने प्रगत देशांना भारताच्या बाजूने केले; त्यामुळे पाकिस्तानची कोंडी झाली आहे. अमेरिकेच्या विरोधानंतरही रशियासोबत मिसाइलचा करार केला आणि यानंतरही भारत-अमेरिका संबंधांवर परिणाम झाला नाही, याचे श्रेय मुत्सद्यीगिरीला जाते !
भगवान श्रीगणेशांच्या निवास लोकांला ‘श्रीस्वानंदलोक’ असे म्हणतात. तेथे भगवान गणेश आपल्या सहस्रदल कमळावर विराजमान असतात. त्यांच्या सेवेसाठी अष्ट महानायिका सुसज्ज असतात.
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.
पीडीपीचे सरकार आल्यापासून फुटीरतावाद्यांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. कारण, देशाच्या विरोधात युद्ध पुकारणारा फुटीरतावादी मसरत आलम याच्या सुटकेनंतर आता मुख्यमंत्री सईद यांनी आशिक हुसेन फक्तू या फुटीर नेत्याला सोडण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री सईद यांनी आपल्या पदाची शपथ घेतल्यानंतर लगेच जी भीषण वक्तव्ये केली आहेत ती धक्कादायक आहेत.
गन्धसारघनसारचारुनवनागवल्लिरसवासिनीं
सान्ध्यरागमधुराधराभरणसुन्दराननशुचिस्मिताम् ।
मन्थरायतविलोचनाममलबालचन्द्रकृतशेखरीं
इन्दिरारमणसोदरीं मनसि भावयामि परदेवताम् ॥ २॥
आई जगदंबेच्या दिव्य शृंगाराचे वर्णन करताना भगवान जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
गन्धसार- अर्थात मलय पर्वतावर निर्माण होणारे उत्तम चंदन.
घनसार- म्हणजे कापूर,
चारुनवनागवल्लि- सुंदर कोवळ्या विड्याच्या पानांचा,
रसवासिनीं - रस धारण करणाऱ्या,
आचार्य श्री येथे बाह्य आणि अंतर्गत अशा दोन्ही शृंगारांचा विचार करीत आहेत.
चंदनाचा लेप हा बाह्य शृंगार आहे. तर विडा खाणे हा अंतर्गत शृंगार. पूर्ण भोजन झाल्यानंतर तांबूल ग्रहण हे अंतर्गत तृप्तीचे प्रतीक.
यातील कापूर दोन्हीकडे वापरला जातो. चंदना सोबत लेपा मध्ये आणि विड्या सोबत खाण्यासाठी.
अशा अंतर्बाह्य रसांना धारण करणाऱ्या, परमरसपूर्ण असणाऱ्या,
सान्ध्यराग- संध्याकाळी सूर्यास्त समयी पसरलेल्या रंगाप्रमाणे असणाऱ्या,
मधुराधराभरण- अत्यंत मधुर अर्थात आकर्षक असणाऱ्या म्हणजे ओठांचे आभूषण असणाऱ्या धारण करणाऱ्या,
सुन्दरानन- सुंदरतम मुखकमल असणाऱ्या,
शुचिस्मिताम् - अतीव पवित्र हास्य असणाऱ्या,
मन्थर- आत्मतृप्त अवस्थेत किंचित मिटलेल्या स्वरूपातील मंद,
आयत- लांब,
विलोचनाम्- नेत्र असणाऱ्या
अमल- अत्यंत स्वच्छ, बालचंद्र- चंद्राची कोर,
कृतशेखरीं- मस्तकावर धारण करणाऱ्या,
इन्दिरा- देवी लक्ष्मी
रमण- तिचे रमन म्हणजे भगवान श्री विष्णू.
सोदरीं - त्यांची भगिनी असणाऱ्या,
मनसि भावयामि परदेवताम् - परमदेवता आई जगदंबेचे मी मनाने ध्यान करतो.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
“जय जय राम कृष्ण हरी” जपत-जपत श्री संत नामदेवांची संत मंडळी खूप मोठ्या उत्साहाने एकदा जंगल पार करीत होती. हा प्रवास सुरू असतानाच वाटेमध्ये त्यांना महादेवांचे एक भव्य मंदिर दिसते. सर्वांची उत्कट इच्छा होते की, आपण सर्वांनी मंदिरामध्ये जाऊन परमेश्वराचे दर्शन घ्यावे.
गुजरातमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये पाच महापालिकांमध्ये भाजपला दोन तृतियांश मिळाले तर एका महानगरपालिकेत स्पष्ट बहुमत मिळाले. त्यात 80 टक्के मते भाजपच्या पारड्यात पडली तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतरांना 20 टक्के मतांवरच समाधान मानावे लागले. भाजपच्या या विजयाचे श्रेय मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना जात असून गुजरातमध्ये राजकारणाचेच मोदीकरण झाल्याचे पहायला मिळत आहे.
अमरनाथ यात्रेकरुंवर झालेल्या हल्ल्यावरून मला, का कोण जाणे, पण यामिन उद्दौला अब्दुल कासिम महमूद इब्न सबुक्तगीन उर्फ गझनीच्या महमूदाने सोमनाथावर केलेल्या हल्ल्याची आठवण होते.
जानेवारी २०२१ मध्ये माझे हे पुस्तक प्रकाशित झाले. गुलज़ारच्या १६ चित्रपटांवर मी २०१८ साली चेहेरे-पुस्तिकेवर लिहिलेल्या पोस्ट्स चा हा संग्रह आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti