मोबाईल !

वापर चांगल्या कार्यासाठी झाला तर खूप फायदा आहे परंतु बर्याच जणांना आजूनही मोबाईल फोन वरून बोलतांना भान राहत नाही आणि इतरांना त्याचा त्रास होतो. बहुतेक वेळा सार्वजनिक ठिकाणी बोलतांना सावकाश व मुद्याचेच बोलावे हे लक्षात न राहिल्याने त्याचे सार्वजनिक भाषण होते व नाकोत्या (गुप्त) गोष्टी सगळ्यांना समजतात आणि त्याचा गुंड फायदा घेतात मग पास्तावला होते



|| हरी ॐ ||

मोबाईल !

खरा एखादाच कॉल,

बाकी “मिस” कॉल !

होती गंमत नवीन तेंव्हा
होता,

आता असतो कोणाच्याही हाता !

होते प्रदूषण ठणठणा
बोलल्याने,

टाळतात प्रदूषण गुलुगुलू
बोलण्याने !

गुलुगुलू बोलण्याचे होते
राजकारण,

अनर्थ होतो विनाकारण !

बोलताना भान आम्हां नसते,

ठेवायचे असते कोणाला कळते !

मोबाईलने जग झाले सोबती,

प्रदूषणाच्या “लहरी” आमच्या
सोबती !

कळत असत पण वळत नसतं,

असच आमच रोज असतं !!

जगदीश पटवर्धन, वझिरा,
बोरिवली (प)

— जगदीश पटवर्धन

Author