वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
शेतकर्यांना न्याय देणारी, इतर समाज घटकांसोबतच त्याचाही बरोबरीने विचार करणारी आणि संवैधानिक आधार असलेली यंत्रणा उभी होणे काळाची गरज आहे. हे होत नाही तोपर्यंत या देशाचे दारिद्र्य संपणार नाही. आणि शेतकर्यांचे रस्त्यावर उतरणे बंद होणार नाही.
दिवसभराच्या दगदगीने शिणून अंग अंथरुणावर टाकले. तेव्हा वाटलं, लौकिकार्थाने आपला संसार पूर्ण तर झालाय. पण अजून आपली ह्या प्रपंचाच्या जोखडातून सुटका मात्र नाही. आजही मुलगा, सून, नातवंड, नवरा कशातून मोकळीक नाही. आपण स्वतःसाठी कधी जगलोच नाही. ते काही नाही. आता सोडवून घ्यायचं सगळ्यातून स्वतःला तिच्या मनात एक अभिनव कल्पना आली.
आज नरकचतुर्दशी. या दिवशी अंगाला तेल-उटणे लावून मग अंघोळ करण्याची पद्धत आहे. यालाच 'पहिली अंघोळ' असंही म्हटलं जातं. 'पहिली' अंघोळ असं म्हणण्यामागे काय कारण असेल बरं? कारण असं आहे की; या दिवसापासून रोज नित्यनेमाने अभ्यंग करायचा आहे. याकरता 'पहिली'. आपण मात्र वर्षातला पहिला आणि शेवटचा अभ्यंग एकाच दिवशी करत असतो!!
अभ्यंग:
संपूर्ण अंगाला कोमट तेल लावणे म्हणजे अभ्यंग. हा अभ्यंग दररोज नित्यनेमाने करावा असे आयुर्वेद सांगतो. निरोगी व्यक्तींनी दैनंदिन वापरासाठी तिळाचे तेल कोमट करून वापरावे. संपूर्ण शरीराला वरून खालच्या दिशेने तेल लावून जिरवावे. तेल वापरताना कंजूसपणा करू नये. चांगला थपथपून 'तेल्या मारुती' करावा. सुमारे दहा मिनिटांत सर्वांगाला तेल लावून होते.
नियमित अभ्यंग केल्याने त्वचा उत्तम राहते, अकाली वळ्या-सुरकुत्या पडण्यासारखे त्रास होत नाहीत, श्रमहरण होऊन ताजेतवाने वाटते, झोप उत्तम लागते आणि शरीराला पुष्टी प्राप्त होते. विशेषतः डोके, कान आणि तळपाय यांना अभ्यंग आवर्जून करावा. तळपायांना अभ्यंग केल्याने दृष्टी उत्तम राहते.
अभ्यंग कोणी टाळावा?
कफाचे विकार असणारे, स्थूल, अजीर्ण झालेले वा भूक नीट लागत नाही असे तसेच नुकतेच पंचकर्म झाले आहे अशा व्यक्तींनी अभ्यंग करू नये असे आयुर्वेद सांगतो.
अभ्यंगानंतर व्यायाम करावा असेही आयुर्वेदाला अपेक्षित आहे. केवळ आरामात अंग चोपडून घेऊन ऐषाराम करणे हा आयुर्वेदाचा उद्देश नाही. व्यायाम हा आयुर्वेदानुसार 'निराग्नि स्वेद' असून अभ्यंगात जिरवलेले तेल त्वचेत अधिक मुरण्यासाठी; तसेच घाम येऊन शरीरातील मेदाचा क्षय होण्यास त्याचा उपयोग होतो. आजही कित्येक आखाड्यांत हीच पद्धत अवलंबली जाते हेही लक्षात घेण्यासारखे आहे.
उद्वर्तन:
उद्वर्तन म्हणजे उटणे लावणे. त्रिफळा, नागरमोथा, कचोर वगैरे विविध आयुर्वेदात वर्णन केलेल्या वनस्पतींच्या चूर्णांच्या मिश्रणातून उटणे बनते. उटणे बनवताना आपल्या वैद्यांचा सल्ला अवश्य घ्या. ते तुमच्या प्रकृतीनुसार योग्य मार्गदर्शन करतील. बाजारातून तयार उटणे विकत घेताना त्याचा दर्जा अवश्य लक्षात घ्या. उगाच २-५ रुपयांची उटण्याची पाकिटे घेऊन किती स्वस्त मिळालं यावर खूष होण्याऐवजी त्यात नेमकं काय घातलं असेल याचा विचार करा!!
उटणे लावताना घालून वरच्या दिशेने लावावे. या उटण्यामुळे आधी लावलेल्या तेलाचा बराचसा स्निग्धांश शोषला जातो. त्याचप्रमाणे विशेष करून मेदाचा नाश होतो. स्थूल व्यक्तींनी तेल न लावताच केवळ कोरडे उटणे लावावे. उटणे लावल्याने त्वचेचे आरोग्य उत्तम राहते; तसेच कफ आणि मेदाचा नाश होतो.
आयुर्वेदोक्त अभ्यंग आणि उद्वर्तन यांचा अनुभव घेऊन त्यांनंतर गरम पाण्याने स्नान करून आजच्या दिवसाची सुरुवात करा आणि येणाऱ्या हेमंत व शिशिर या दोन्ही ऋतूंत सर्व दिवसांची अशीच सुरुवात करून आपले आरोग्य उत्तम राखा!!
© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
लेखक : शैलेश सो. महाजन (आम्ही साहित्यिक ग्रुप) : मानवाने, आपल्या कमाईचा काही ठराविक एक भाग. ईश्र्वराच्या साक्षीने म्हणजेच परमेश्वराच्या समोर देवाला नैवेद्य म्हणून अर्पण करून, इदम् न मम . या उक्तप्रमाणे इतरांना वाटून टाकणे. यालाच खाऱ्या अर्थाने प्रसाद म्हणतात.
साउथ आफ्रिका हा देश, तसे पहिले गेल्यास, आफ्रिका खंडातील युरोप!! हवा बरीचशी युरोपप्रमाणे थंडगार असते. अगदी, उन्हाळी दिवस(सध्या इथे उन्हाळा सुरु आहे!!) आले तरी देखील, मुंबईप्रमाणे, घामाने अंग उकडून गेले आहे, असा प्रकार फारसा किंवा अजिबात होत नाही.
फ्रान्सच्या बंदरात हेवी फ्युएल ऑईल लोड करून आम्ही जिब्राल्टरला आलो होतो. अर्धा कार्गो डिस्चार्ज करून जिब्राल्टरच्या सामुद्र धुनीच्या पलीकडील किनाऱ्यावर स्युटा नावाचे बंदर आहे, उरलेला अर्धा कार्गो डिस्चार्ज करण्यासाठी जहाज तिकडे निघाले आणि तासाभरातच तिथे पोचले. कार्गो डिस्चार्ज करून पुन्हा निघायला मध्यरात्र होणार होती.
खरा प्रश्न आहे तो, सचिन व सुनील यांच्या स्टेटमेंटस् च्या योग्यायोग्यतेचा. परंतु, पत्रकार ( किंवा, भूतपूर्व पत्रकार) आशुतोष यानें विनाकरण त्याला वेगळाच रंग देऊन आक्रस्ताळेपणा केला. तसा तो आक्रस्ताळाच आहे. पत्रकार म्हणून तो एका टी.व्ही. चॅनेलशी संबंधित होता, आणि मुलाखती घेत असे, तेव्हांही त्याची पत्रकारिता आक्रस्ताळीच होती . नंतर आम आदमी पार्टीचा स्पोक्समन म्हणून तो मुलाखती देत असे, तेव्हांही तो आक्रस्ताळाच होता. त्यामुळे कालच्या चर्चेत तो एक सहभागी पाहुणा म्हणून आक्रस्ताळेपणानें बोलला तर त्याचें नवल वाटायला नको.
श्री गुरुपौर्णिमेनिमित्त श्री गुरुचरित्रासहित अनेक खास इ-पुस्तके आपल्यासाठी.
या गीताची पाच कडवी असून ती म्हणण्यास वेळ लागतो, यामुळे केवळ पहिलेच कडवे संबंध भारतात म्हटले जाते. पाचही कडव्यांच्या राष्ट्रगीताचे संकलन भारतीय संस्कृतिकोश खंड-८ यामध्ये प्रामुख्याने आढळते.
पुणे हे एके काळचं विद्येचं माहेरघर. त्या काळात सर्वत्र विद्वता नांदत होती. शहरातील मुख्य पेठांमध्ये, डेक्कनला व कॅम्पमध्ये पुस्तकांची मोठी दुकाने दिमाखात उभी होती. या ज्ञानमंदिरांना मी अनेकदा भेटी दिलेल्या आहेत.
Copyright © 2025 | Marathisrushti