वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
वारंवार कोसळू पाहाणाऱ्या लोकशाहीच्या सर्कशीच्या तंबूची शेवटची मदार आता न्यायववस्थेच्या चौथ्या खांबावरच आहे. या खाबाचं काही आलवेल नसलं, तरी तो अजून इतर तिन खांबांयेवढा पूर्ण सडलेला नाही, हे दाखवून देण्याची हिच वेळ आहे..!!

ह्याचे उपयुक्तांग पाने व फुले असून हे चवीला कडू,तुरट,गोड असते.तसेच हे थंड गुणाचे व जड व रूक्ष असते.हे त्रिदोष शामक असून वात व पित्तनाशक आहे.
रंग चिकित्सेत पूर्वाभाद्रपदा या नक्षत्र विषयी आपण माहिती घेऊ. नक्षत्र मालेतील २५ वीनक्षत्र जागा पूर्वाभाद्रपदा ची आहे. या नक्षत्राचे आकाशात नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात रात्री नऊ ते अकरा या वेळेत दर्शन होते. डोक्यावर दिसते आपल्या या नक्षत्राचे पहिले तीन चरण कुंभ राशीत आहेत तर पुढील एक चरण मीन राशीत आहे. म्हणजे कुंभ आणि मीन या दोन्ही राशींसाठी शीतरंग योजलेले आहेत.
28रविवार, ऑक्टोबर 2007
छोट्या पडद्यावर एक जाहिरात नेहमीच झळकत असते. त्या जाहिरातीचे स्लोगन अतिशय आकर्षक आहे. ‘भांडण चांगल्यासाठी असेल तर भांडण चांगलेच आहे’, अशा आशयाचे ते स्लोगन आहे.
मला नेहमी असं वाटायचं की जाम पैसा आला म्हणजे मनुष्य श्रीमंत होतो...
नंतर नंतर माझ्या लक्षात आलं पैसा आला की तो "पैसेवाला" नक्की होतो पण "श्रीमंत" होतोच असं नाहीये...
श्रीमंत या शब्दाची व्याख्या खुप मोठी आहे. वेदांमध्ये जी "श्री" नावाची देवता आहे ती लक्ष्मीपेक्षा थोडी निराळी आहे...
श्री या संज्ञेत पैसा,यश, सौंदर्य, श्रेष्ठत्व, अधिकार, प्रतिष्ठा, उद्योगशीलता, सुस्वभावीपणा वगैरे वगैरे अनेक गोष्टी त्यात अनुस्युत आहेत...
फक्त पैसा नव्हे. हे लक्षात आल्यावर मी आसपासच्या काही मंडळींचं निरिक्षण केलं आणि माझ्या लक्षात आलं की खरोखरंच यार पैसेवाला आणि श्रीमंत या दोन अत्यंत निरनिराळ्या कन्सेप्ट्स आहेत...
गंमत म्हणजे प्रत्येक श्रीमंत हा पैसेवाला होताच पण प्रत्येक पैसेवाला हा श्रीमंत नव्हता...
अनेक पैसेवाले असे आहेत की ज्यांना पैशाची "फिकीर नाही"...
अलोट आणि मुबलक पैसा आल्यावर त्या पैशाला शिस्तीचं वळण न लावल्यामुळे तो पैसा घरात लाथेलोटेसारखा असला तरी त्याला नियोजन नाही...
बेफिकीरी, व्यसनाधिनता, उधळपट्टी, वागणूकीत अहंकार, बेशिस्त अनेक पैसेवाल्यांकडे पदोपदी दिसली मला...
सगळीकडे झगमगाट होता पण त्या झगमगाटामागे दिखावा आणि माज होता...
"मी किती महागाची स्कॉच पितो बघ" हे सांगण्यामागे ब्रॅन्डच्या कौतुकापेक्षा, पैशाच्या लेबलला जास्त व्हॅल्यु होती...
ही खरेदी आणि बेफिकीरी घरातल्या इंटॆरिअरपासुन लहानशा खरेदीपर्यंत जिथेतिथे दिसते...
सुसंस्कृतपणा खुप कमी पैशेवाल्यांकडे आहे. मुलं काय शिकतायत? यापेक्षा सगळ्यात भारी इंटरनॅशनल स्कूलमध्ये घातलंय याचंच वारेमाप कौतुक...
वाचनसंस्कृती, अभ्यासूपणा, विचारशीलता, सुसंस्कृतपणा याचा जिथेतिथे अभाव दिसत होता...
पण याउलट माझ्या परिचयातील कित्येक श्रीमंत मंडळी ही खुपच निराळी आहेत.
कुणाकडे स्वच्छतेची प्रचंड आवड तर कुणाकडे नेटकं आणि सुबक इंटेरिअर (अजिबात झकपक नाही), कुणाला पुस्तकांचं कलेक्शन करुन त्याची सुबक लायब्ररी करण्याचा छंद तर कुणाला Antic मूर्त्या आणि चित्रं जमवायचा छंद...
कुणाला समाजसेवेची आवड तर कुणाला शेतीची हौस. आणि गंमत म्हणजे सर्व श्रीमंत हे अतिशय Down to earth आणि सुसंस्कृत विचारांचे आहेत...
प्रत्येकाने संपत्तीचं उत्तम, Long Term नियोजन केलेलं आहे. रितसर कागदपत्रे, त्यांच्या फायली तयार आहेत. सरकारी करांचा भरणा व्यवस्थित केलेला असतो. कुठेही कसलाही Show Off नाही आणि बडेजाव तर त्याहून नाही...
स्वत: केलेल्या समाजसेवेचं कौतुक तर अजिबात नाही.
कोट्याधीशाकडच्या पार्ट्यांसोबत गरीबाकडच्या सत्यनारायणालाही आवर्जुन जातात.. कुठेही कसलाही भेदभाव नाही, Attitude तर औषधालाही नाही...
उत्तम मोजकं आणि छान खाणं, भरपूर व्यायाम, सौंदर्याची निगा, मोजके पण सिलेक्टेड दागिने, अदबशीर बोलणं, वागणं... म्हणजे वेदातल्या "श्री" या संकल्पनेला अनुरुप असं परिपूर्ण श्रीमंत व्यक्तिमत्व ते हेच हो...
आणि मग माझ्या लक्षात आलं की एकतर भरपूर मेहनत करुन, कष्ट करुन, उद्योग करुन किंवा मग लांड्यालबाड्या करुन, वाडवडीलार्जित जमिनी विकून "पैसेवाला" होता येणं कुणालाही सहज शक्य आहे पण "श्रीमंत" होणं हे एक कष्टसाध्य पण छान व सुंदर "मिशन" आहे...
पैसेवाल्यांना श्रीमंत होणं अशक्य आहे असं मी अजिबात म्हणणार नाही.
तो एक प्रवास आहे, विचारपुर्वक करण्याचा... तो करायलाच हवा. तुमचं पैसेवालं असणं हे सगळ्यांच्या दृष्टीने जितकं हास्यास्पद आहे तितकंच श्रीमंत होणं कौतुकास्पद आहे हे लक्षात घ्या...
तुम्ही खूप श्रीमंत व्हावे ही ईश्वरचरणी प्रार्थना...!!!
जय हो...!!!
हा लेख मी लिहीलेला नसून माझ्या वाचनात आला व आवडला म्हणुन पोस्ट करत आहे.
वसंत कानेटकर यांनी ‘मूल नसलेले दाम्पत्य’ हा गंभीर सामाजिक विषय अतिशय वेगळ्या पद्धतीने हाताळला होता. विषय गंभीर असला तरी त्याची मांडणी हलक्याफुलक्या पद्धतीने करण्यात आली होती. नाटक हलकेफुलके, गाणी असणारे असले तरी त्याचा मूळ विषय प्रेक्षकांपर्यंत सुंदर पणे पोहोचला. श्रीकांत मोघे व मा कल्पना देशपांडे हे मुख्य कलाकार होते.
विमानप्रवास आता सामान्य माणसाच्या आवाक्यात आला आहे. विमानात बसण्याची पूर्वतयारी म्हणजे तारीख ठरवून तिकीट काढणे अशी बहुतेकांची समजूत असते. ‘मला विमान चालवायचे नाही. त्याच्या संबंधातील तांत्रिक गोष्टींचा मला काय उपयोग?’ असा प्रश्न रास्त आहे. पण यामागील विज्ञानासंदर्भात एक प्रश्न विचारून फक्त सुरुवात तर करून बघा? भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, अभियांत्रिकी, भूगोल वगैरे बाबतीतील कुतुहल वाढत जाईल. जसजशी उत्तरे मिळतील तसतसे प्रश्न वाढतील. करूया सुरुवात? ‘विमानप्रवास सुरक्षित आहे का?’ हा काहींचा पहिला प्रश्न असू शकतो.
एकोणिसाव्या शतकात अमेरिकेत आफ्रिकेतील कृष्णवर्णीयांना किंवा निग्रोंना गुलाम म्हणून विकत घेऊन राबविण्याची कुप्रसिद्ध समाजपद्धती होती.
कोणाही थोरामोठ्यांना वाकून नमस्कार केला की; 'शतायुषी व्हा' असे आशीर्वाद कानावर पडत असतात. दीर्घायुची आस नसलेला मनुष्य विरळाच. आपल्याकडे चार युगे सांगितली असून प्रत्येक युगात १/४ आयुर्मानाचा ऱ्हास होतो असे आयुर्वेद सांगतो. हा ह्रास होत होत; कलियुगात १०० वर्षे ही सरासरी आयुर्मानाची परिभाषा आहे. मात्र प्रत्यक्षात आपल्या देशात काय परिस्थिती आहे?
भारत सरकारच्या जनगणना विभागाने जाहीर केलेल्या अभ्यासानुसार सरासरी ६० वर्षे हे आम्हा भारतीयांचे आयुर्मान आहे. राज्यवार अभ्यासल्यास हे आयुर्मान केरळ या राज्यात सर्वाधिक म्हणजे सरासरी ७४.९ वर्षे इतके आहे. केरळ; ज्याला God's own country असंही म्हटलं जातं....हे राज्य आयुर्मानाच्या आणि एकंदरीत आरोग्याच्या बाबतीत आजवर कायम आघाडीवर राहिलं आहे. यामागची कारणंदेखील महत्वाची आहेत. शिक्षणाचे अधिक प्रमाण, दरडोई उत्पन्न उत्तम असणे आणि चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा ही काही प्रमुख कारणं. मात्र या सगळ्यांच्या पलिकडे असलेले आणि हे सर्वकाही व्यापून उरलेले आणखी एक महत्वाचे कारण आहे. ते म्हणजे 'आयुर्वेद'.
आयुर्वेदाच्या क्षेत्रात पंचकर्म हा शब्द ऐकला-वाचला की दुसरा जो शब्द लगेच आपल्या मनात येतो तो म्हणजे केरळ! केरळाने छोट्या छोट्या गोष्टींत आयुर्वेद जपला आहे. भगवान परशुरामांनी निर्माण केलेली गौरवशाली अष्टवैद्य परंपरा जपली ती याच राज्याने. आपल्याकडे 'आजीबाईचा बटवा' असतो तसाच केरळात 'उट्टमूली' असतात. उट्टमूलीमध्ये एखाद्या रोगावरील एक किंवा फारतर दोन वनस्पतींचे मिश्रण वापरण्याची पद्धत आहे. आपल्याकडचा 'आजीबाईचा बटवा' हा आज भरकटत जाऊन जणूकाही घरगुती औषधे म्हणजेच आयुर्वेद अशा पायरीवर जाऊन पोहचला आहे. उट्टमूलीमध्ये मात्र आयुर्वेदातील सिद्धांतांवर आधारित एकल द्रव्य चिकित्साच प्रामुख्याने दिसते. सहस्रयोग वा चिकित्सामंजिरी यांसारखे वैशिष्ट्यपूर्ण आयुर्वेदीय ग्रन्थ जन्मले ते याच देवभूमीत. संस्कृत भाषेव्यतिरिक्त अन्य कुठल्या भाषेतील ग्रन्थ असूनही अत्यंत अभ्यासपूर्ण असल्याने आयुर्वेदाच्या महत्वाच्या संहिता/ निघण्टु ग्रंथांच्या मांदियाळीत या मल्याळम् ग्रंथांना आदराचे स्थान आहे. असे अन्य उदाहरण विरळाच.
दैनंदिन आयुष्यातही केरळाने आयुर्वेद आजही जपलाय. कळरीपायट्टपासून ते अगदी रोजच्या खाण्यासोबत घेतल्या जाणाऱ्या 'चुक्कु वेल्लम्' किंवा 'पथीमुकम् वेल्लम्' पर्यंत मल्याळी बांधव आयुर्वेद 'जगत' असतात. (या दोन्हीवर स्वतंत्रपणे लिहीनच; तूर्त वेल्लम् म्हणजे पाणी; आणि हे दोन्ही प्रकार म्हणजे आयुर्वेदीय औषधींनी सिद्ध केलेले पाणी इतकेच लक्षात ठेवलेत तरी पुरे. असे पाणी केरळात जेवणासह घेण्याची प्रथा आहे.)
सुश्रुतसंहितेत स्पष्टपणे म्हटले आहे;
'आयुरस्मिन् विद्यते, अनेन वाऽऽयुर्विन्दन्ति इत्यायुर्वेदः।' (वेदोत्पत्त्यध्याये।)
अर्थात्; ज्यात आयु आहे किंवा ज्यामुळे आयुर्प्राप्ती होते तो म्हणजे आयुर्वेद. केरळ हे त्याचं जितं जागतं उदाहरण आहे. आम्ही वैद्यगण आमच्या ग्रंथाबाबत 'पोथीनिष्ठ' आहोत असे काहीजण कुत्सितपणे म्हणत असतात. हो; आम्ही पोथीनिष्ठच आहोत. कारण; त्या ग्रंथांतील शब्दन् शब्द आम्हाला प्रत्यक्षात अवतरलेले सतत दिसतात. हा सूर्य हा जयद्रथ!!
© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
https://gharoghariaayurvedblog.wordpress.com/2016/10/30/आयुष्मान-केरळ/
आठवड्यापासून जरा जास्तीच दुखतंय, अनवाणी तर चालता येतच नाही, पण स्पंजची गादी असलेल्या चपला वापरल्या तरी त्रास होतोय, सकाळी उठल्यावर तर तळपायाची वेदना मस्तकात जाते. पायाला विश्रांती दिली की बरं वाटतं. परंतु सारखं बसून कसं चालायचं? एकीकडे वजन कमी करायला, फिरायला जायला हवं, पण फिरलं तर टाच दुखते, कसं व्हायचं? टाचांचा एक्स रे केला, त्यामध्ये दोन्ही टाचांना असलेले टोकं स्पष्ट दिसत होती. सुरुवातीला हाडांच्या डॉक्टरांनी गोळ्या दिल्या, पण त्याचा हवा तसा परिणाम होत नाही.
आपल्या तळव्याची रचना
पायाच्या तळव्याची टाच, चवडा, बोटे व टाच आणि चवड्याला जोडणारी कमान असे चार मुख्य भाग असतात. तळव्याची ही कमान ‘प्लांटर फेशिया’ नावाच्या अस्थिबंधनापासून बनलेली असते. चालण्याच्या क्रियेमध्ये आपल्या वजनाच्या वीसपट वजन टाचेवर पडत असते. या भाराचे योग्य विस्थापन करून तो पेलण्याचे काम ‘प्लांटर फेशिया’ हे अस्थिबंधन, तळव्याची चरबीची गादी व स्नायू यांच्या मदतीने वर्षानुवर्षे बेमालूमपणे करत असते. त्यामुळे कालांतराने पावलाच्या गादीची थोडीफार झीज होते. याशिवाय काही कारणांनी उदा. वजन जास्त असणे, अनियमित किंवा सुटीच्या दिवशी व्यायाम करणे, सांधे दुखी, मणक्याचे विकार असणे इत्यादीमुळे पावलाच्या भार पेलण्याच्या व्यवस्थेवर अतिरिक्त ताण पडतो. त्यामुळे अस्थिबंधन दुखावले जाते. आणि तळवे विशेषत: टाचदुखीला सुरुवात होते. सकाळी प्रथम उठताना या दुखण्याची तीव्रता अधिक असते. चालायला सुरुवात केल्यावर हळूहळू कमी होते. ज्या व्यक्तींना सतत उभे राहण्याचे काम असते. अशा व्यक्ती उदा. वाहतूक पोलिस, व्यावसायिक, कंडक्टर, ड्रायव्हर, या व्यक्तींना हा त्रास जास्त असतो. जास्त वेळ उभं राहिलं, टणक पृष्ठभागावरून चाललं तर त्रास परत वाढतो. विश्रांती घेत असताना पायावरचा भार निघून गेल्याने टाचदुखी थांबते, पण उभं राहिल्यावर दुखते. अस्थिबंधन ताणले जाऊन त्रास पुन्हा उद्भवतो. काही वेळेसहे दुखणे ताणले जाऊन त्रास पुन्हा उद्भवतो. दुखणे इतके तीव्र असते की, दैनंदिन काम करणे मुश्कील होते.
उपाय यासाठी उपाय म्हणून शक्य तेवढी विश्रांती घ्यावी. पाय सरळ व थोडा उंच करून ठेवावा. बर्फाचा शेक घ्यावा. स्पंजची गादी असलेली पादत्राणे वापरावीत. यामुळे तात्पुरते दुखणे कमी होते. परंतु दीर्घकालीन उपचार म्हणून होमिओपॅथी औषधांचा करावा. यामुळे पूर्णत: त्रास नाहीसा होतो. तेव्हा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. काही पेशंटच्या प्रकृतीवरून व शारीरिक हालचालीच्या अभ्यासावरून खालील होमिओपॅथिक औषध उपयुक्त ठरतात. जसे - सिलेशिया, र्हवस टॉक्स, पल्सेटीला, रुटा, चेलिडोनियम, ग्लोनाइन,फास्फरस, ब्रायोनिया, कलेकेरिया, बेलाडोना अशा अनेक औषधींचा उपयोगलाभदायक ठरतो. पेशंटनी आपला औषधोपचार तज्ज्ञ होमिओपॅथी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच सुरू करावा. कारण प्रत्येक पेशंटची प्रकृती, शारीरिक हालचाल व लक्षणांवरून पोटेंसी व प्रमाण, डोस ठरवण्यात येतो. योग्य उपचाराद्वारे हा त्रास पूर्णत: नाहीसा होतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- डॉ. कपिल वानखेडे.
Copyright © 2025 | Marathisrushti