वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
दादर पश्चिमेस “प्रारंभ” या इमारतीत, १९६७ रोजी सुरेश चाळकर या गृहस्थाने परिसरातील होतकरु तरुणांसह, सामाजिक बांधिलकी आणि एकोपाच्या भावनेनं “बाळ गोपाळ सार्वजनिक गणेश मंडळाची” स्थापना केली;
भारतीय संस्कृतीत पुरातन काळापासून बाहुली-बाहुला खेळला जातोय. त्याचे दाखले आपल्या पाणिनी, ज्ञानेश्वरी आणि दासबोधात वाचायला मिळतात.
पाकिस्तानात सत्ता कुणाचीही असो, पंतप्रधान किंवा राष्ट्रपती कुणीही असो, खरी सत्ता तर लष्कराचीच असते. पाकिस्तानी राष्ट्रपती किंवा पंतप्रधानापेक्षा पाक लष्कराचा सेनापती अधिक शक्तिशाली असतो. सध्या पाकिस्तानात निवडणुकांचे वातावरण आहे त्यामुळेच खरी राजवट कुणाची हा प्रश्न उद्भवला. निवडणुकीत जिंकून कुणीही येवो, सत्ता तर लष्कराचीच असणार आहे. तहिरुल कादरीसुध्दा दहा दिवसांतच गप्प झाले. पाकिस्तानमधील सर्वोच्च न्यायालयाने काही निर्णय जाहीर केले.
शब्दाची किंमत ठेवावी वा असावी. पण आज ह्या घोर कलियुगामध्ये शब्दाची काही किंमत नाही. शपथ, वचन, प्रतिज्ञा.. हे शब्द नाहीसे होऊन गेले आहेत. संबंधामध्ये दुरावा येण्याचे हे एक कारण आहे की मनुष्य जस बोलतो तस वागत नाही. कधी कधी विचार येतो की ‘ का बरं एखादा व्यक्ति असं करत असेल?’ काही कारण नसताना ही आज मनुष्याला खोटं बोलावं लागते.
खरे वैभव ते, जे इतरांना वैभवसंपन्न करते. खरे श्रेष्ठत्व ते जे इतरांना श्रेष्ठत्व प्रदान करते. त्याच प्रमाणे खरे सौंदर्य ते जे इतरांना सौंदर्य प्रदान करते. आई जगदंबेच्या अशा सौंदर्याचे वर्णन करताना आचार्यश्री प्रथम तिच्या स्नानासाठी केलेल्या तयारीचे वर्णन करीत आहेत.
पोपट पकडण्याची एक खास पद्धत आहे. एका आडव्या टांगलेल्या दोरीत बऱ्याच नळ्या ओवलेल्या असतात. या प्रत्येक नळीला पोपटाला आकर्षित करेल असे काहीतरी खाद्य चिकटवलेले असते. जेव्हा पोपट नळीवर बसतो, तेव्हा त्याच्या वजनाने नळी गोल फिरते व पोपट उलटा लटकतो. उलटे लटकताच पोपट स्वाभाविकपणे पायात नळी गच्च पकडतो. ही अवस्था पोपटाने कधीच अनुभवलेली नसते. नळी सोडली की आपण पडू, असेच त्याला वाटत राहते. खरे तर नळी सोडल्यानंतर पडू लागताच पंखांचा वापर करून एक गिरकी घेऊन तो सहज उडू शकणार असतो. पण हे "ज्ञान' त्याला होत नाही व तो नळी अधिकच गच्च पकडून लटकलेला राहतो व पकडणाऱ्याच्या हाती पडतो. याला भयसापळा असे म्हणता येईल.
जेव्हा आपला पोपट झाला आहे असे वाटते व तरीही आपण त्या परिस्थितीतून सुटूच शकत नाही, तेव्हा आपण कशाला भीत आहोत ते नेमके पाहावे. "हा आधार गेला तर,' अशी भीती असते तेव्हा. जर काही काळ निराधार व्हायची तयारी दाखवली, तर आपणही उडून जाऊ शकत असतो. पडायची शक्यता ज्याला जराही नको वाटते, तो उडू शकत नाही..!
माकडे पकडायचीदेखील एक खास पद्धत आहे. एक मडके मातीत पुरून ठेवतात. मडक्यात एक फळ असते माकड ते फळ काढण्यासाठी मडक्यात हात घालते. मडक्याचे तोंड हे अगदी नेमक्या आकाराचे बनविलेले असते; असे की फळ सोडून दिले तर माकडाचा हात बाहेर निघू शकेल; पण फळासकट हात बाहेर काढायला जावे, तर हाताचा आकार वाढल्याने हात अडकेल. माकडाच्याने फळ सोडवतही नाही आणि त्यामुळे हात बाहेर काढता येत नाही. निर्णय न घेता येण्याच्या या "अवस्थे'त माकड मनाने अडकते व शरीराने मडक्यापाशी. या सापळ्याला मोहसापळा असे म्हणता येईल.
आपले ज्या परिस्थितीत "माकड' झाले असेल, तीत असे काय आहे की ज्याचा मोह आपल्याच्याने सोडवत नाहीये, हे जर बघता आले तर कदाचित ती गमावणूक वाटते तेवढी मोलाची नसेलसुद्धा! थोडेसे सोडून देऊन संपूर्ण सुटता आले तर वाईट काय? निदान या मर्यादित अर्थाने "फलत्याग' नक्कीच मुक्तिदायक नाही काय?
पोपटानं एकदा तरी आधार सोडून पाहावा. माकडानं एकदा तरी फळ सोडून पाहावं, हे जमायला अवघड नसतं. पटायलाच अवघड असतं.
भयसापळा, मोहसापळा हे माणसाच्या मनातूनच तयार झालेले असतात. त्यामुळे त्यातून बाहेर पडणे अवघड नसते; पण सुटकेचा हा मार्ग सोपा असला तरी पटायला अवघड असतो.
-- डॉ. विकास आमटे..
हि दोन्हीही उदाहरणे ज्ञानेश्वर माउलींनी ज्ञानेश्वरीत दिलेली आहेत छान मेसेज आला म्हणून पाठवला
-- संकलन : अशोक साने
फेसबुक, WhatsApp यासारख्या माध्यमातून दररोज येणारे चांगले लेख तुमच्यासाठी शेअर करतो..
प्रकाशन दिनांक :- 30/05/2004
भारताच्या गरिबीचे तुणतुणे आम्ही भारतवासी नेहमीच वाजवतो. इतर पुढारलेल्या देशातसुद्धा भारताच्या गरिबीची नेहमीच कुचेष्टा होते. परंतु गरिबी निश्चित करण्याची जी मानके आहेत त्याचा विचार केला तर भारताची गरिबी वेगळ्या अर्थाने श्रीमंत ठरते.
जीवाचा चार अवस्थांचा विचार शास्त्रात मांडलेला आहे. त्या चार अवस्थेत आपले वर्तन कसे असावे हेच या श्लोकाच्या निमित्ताने आचार्य श्री वर्णन करीत आहेत. ते म्हणतात…
एकोणिसावं शतक सुरू झालं त्यासुमारास अमेरिकेचे स्थूल मानाने तीन विभाग होते. एक म्हणजे पूर्व किनारपट्टी, जी पूर्णपणे प्रस्थापित आणि बहुतांशी सुरक्षित होती, दुसरा म्हणजे ऍपेलेशियन पर्वतराजीपासून पश्चिमेला मिसीसीपी नदीपर्यंतचा प्रदेश, जो गेल्या शे – सव्वाशे वर्षांतल्या धाडसी लोकांच्या मोहीमांमुळे परिचित होऊ लागला होता आणि तिसरा म्हणजे मिसीसीपीच्या पलीकडचा प्रचंड मोठा असा (गोर्या लोकांना) पूर्णपणे अनभिज्ञ असा प्रदेश. १८०३ साली राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन यांनी फ्रेंच्यांशी करार करून (लुईसीयाना प्रदेशाचा खरेदी करार) हा मिसीसीपीच्या पलीकडचा ८२८,००० चौरस मैलांचा प्रदेश विकत घेतला. या एका घटनेने, एका फटक्यात अमेरिकेचा विस्तार दुपटीने वाढला.
या धाडसी लोकांमधे बीव्हरच्या केसाळ कातड्याचा धंदा करणारे खूप होते. बीव्हर हा पाण्यात किंवा काठावर रहाणारा मुंगुसासारखा प्राणी आहे. त्याची झुपकेदार शेपटी आणि केसाळ कातड्याच्या टोप्या युरोपात फार प्रचलित होत्या. बीव्हरला पकडण्यासाठी थंडीचा मोसम फलदायी ठरायचा. ह्या मोसमात बीव्हर चिखल, काटक्या गोळा करून आपली पाण्यातली घरं तयार करतात. हे लोक पाणथळी जागी फिरून बीव्हरची अशी घरं धुंडाळून काढायचे. मग संध्याकाळच्या उतरत्या उन्हात या बीव्हरच्या घराच्या आसपास हे लोक सापळे लावायचे आणि मग भल्या पहाटे, उजाडायच्या आधीच त्या जागी परतून सापळ्यात अडकलेले बीव्हर पकडून मारायचे. जागच्या जागीच त्यांची कातडी सोलून काढली जायची. बीव्हरच्या गुबगुबीत शेपट्या खरपूस भाजून त्यावर ताव मारला जायचा. कडाक्याच्या थंडीचे थोडे महिने आणि जून ते सप्टेंबर या उन्हाळ्याच्या महिन्यात (जेंव्हा बीव्हरच्या कातडीची फर कमी व्हायची) तेंव्हा ही बीव्हरची शिकार बंद असायची.
जूनमधे, जमवलेल्या कातड्यांचा गठ्ठा घेऊन हे लोक एखाद्या साधारण मोठ्या ठिकाणी एकत्र यायचे. या अशा ठिकाणी आठवडाभर जत्रेसारखेच वातावरण असायचे. शहरांतून येतांना व्यापारी आपल्या बरोबर अनेक वस्तू घेऊन यायचे. मग हे फासेपारधी आपल्या जवळच्या बीव्हरच्या वाळवलेल्या कातड्यांच्या बदल्यात या दैनंदिन गरजेच्या वस्तू विकत घ्यायचे. हा आठवड्याभराचा काळ भरपूर दारू ढोसण्यात, जुगार खेळण्यात आणि एकंदरीत मौजमजा करण्यात जायचा. ह्या फासेपारध्यांच्या एकाकी आणि खडतर आयुष्यात हेच थोडे दिवस इतर मनुष्यप्राण्यांच्या सहवासात आणि मौजमजा करण्यात जायचे.
एकोणिसाव्या शतकाच्या पहिल्या तीन-चार दशकांपर्यंत पश्चिमेचा बराचसा भूभाग धांडोळला गेला होता. रॉकी पर्वतराजी, सिएरा नेवाडाचे वाळवंट, मिसुरी, स्नेक, कोलोरॅडो नद्यांच्या शाखा, उपशाखा छोट्या छोट्या बोटीमधून पालथ्या घातल्या गेल्या होत्या. ग्रॅंड कॅनयनचे भव्य दिव्य रूप, अफाट पसरलेल्या ग्रेट प्लेन्सवरचे लाखालाखांचे कळप, निसर्गाने मुक्तहस्ताने उधळलेले वरदान गोर्या लोकांच्या डोळ्यांपुढे हळूहळू उलगडत जात होते. वेगवेगळ्या इंडीयन जमातींची जान पहेचान होत होती. हळू हळू या धाडसी गोर्या लोकांनी चोखाळलेल्या बिकट वाटांच्या वहीवाटा होऊ लागल्या. दिवसेंदिवस पश्चिमेकडे सरकणार्या लोकांचा लोंढा वाढू लागला. एकेकाळच्या अनभिज्ञ, अज्ञात प्रदेशात, प्रस्थापित वस्ती होऊ लागली. या शिकारी, फासेपारधी, डोंगरदर्या पालथं घालणार्या आणि अज्ञाताचा वेध घेण्याच्या ध्यासापायी संकटांना कवळू पाहणार्या धाडसी लोकांचं अद्भूत, अनोखं विश्व नाहीसं होऊ लागलं. १८४८ साली कॅलिफोर्नियात सोनं सापडल्यापासून तर या पश्चिमेकडच्या प्रस्थानाला पूर आला. १८६९ साली रेल्वेमार्ग पश्चिमेला पॅसिफिक महासागरापर्यंत पोहोचला. एकेकाळी पायी किंवा घोडागाड्या, बैलगाड्यांतून होणारा पश्चिमेकडचा खडतर प्रवास आता सुकर आणि सुलभ होऊ लागला. पूर्व किनारपट्टीपासून पश्चिमकिनारपट्टीपर्यंतचा हा खंडप्राय देश रेल्वेमार्गाच्या माध्यमातून जवळ आला आणि अमेरिकेच्या जीवनातला आधुनिकतेचा एक नवा अध्याय सुरू झाला.
क्रमशः ....
-- डॉ. संजीव चौबळ
हा एक महत्त्वाचा व नेहमी आढळणारा मनगटाजवळील विकार आहे. या सांध्याच्या पुढील भागात रेडीयस आणि त्यापुढील कार्पल हाडाच्या सान्निध्यात निसर्गाने एक मोठा बोगदा तयार केलेला आहे. यातून मीडियन चेता आपल्या बाहुतून हातात प्रवेश करते. हिच्या बाजूने बोट हलविणारे अनेक कंडार (टेन्डन) ही जातात.
Copyright © 2025 | Marathisrushti