वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
जम्मू-काश्मीरमधील लष्कर हटवण्याची मागणी पाकिस्तानने वारंवार केलेली आहे. पाकिस्तानला काश्मीरमध्ये धुडगूस घालायचा आहे, परंतु जोपर्यंत तिथे लष्कर आहे तोपर्यंत त्यांना काही करता येत नाही. त्यामुळे ज्या-ज्या वेळी भारत आणि पाकिस्तान यांच्यात चर्चा झाली त्या प्रत्येक वेळी पाकिस्तानच्या नेत्यांनी काश्मीरमधील लष्कर हटवण्याची मागणी पुढे केली.
।। सुराग्रजाय नम: देवदारूपत्रं समर्पयामि।।
हिमालयात अथवा अतिशीत वातावरणात अतिशय उंच वाढणारा हा वृक्ष आहे.हा कोनाकृती वृक्ष असून त्वचा उभ्या रेषा युक्त असून आडव्या दिशेने फाटलेली असते.पाने हिरवी,लांब,निमुळती,टोकदार ३-५ वर्षे टिकतात.फुले हिरवट पिवळी,गुच्छ युक्त स्त्री व पुरुष बीज एकाच वृक्षावर उगवते.फळ १०-१२ सेंमी लांब,८-१० सेंमी रूंद पिकल्यावर काळ्या रंगाचे व आत १ सेंमी लांबीचे त्रिकोण भुरकट रंगाचे बी असते.हे वृक्ष ६०० वर्षे जगते.
ह्याचे उपयुक्तांग आहे काण्डसार व तेल.
आता आपण ह्याचे गुणधर्म पाहुयात:
ह्याची चव कडू असून हे उष्ण गुणाचे असते तसेच हल्का व स्निग्ध असतो.हा कफवात नाशक व पित्तकर असतो.
आता आपण ह्याचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:
१)देवदार व्रणातील स्त्राव व दुर्गंध नष्ट करायला उपयोगी आहे.
२)देवदारूचा लेप पोटावर लावला असता अडलेला वात पुढे सरतो.
३)आंत्रातील कृमी नष्ट करायला देवदारू उपयुक्त आहे.
४)सुजेवर देवदारूचा लेप फायदेशीर ठरतो.
५)दमा,सर्दी,खोकला ह्यात देवदारूचा चांगला उपयोग होतो.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर,
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
हेमंत पेंडसेंना “अभिषेकी” हे आडनांव दस्तुरखुद्द शौनक अभिषेकींनी काल बहाल केलं. त्याआधी विद्याताई अभिषेकी पडद्यावरील क्लिप मधून म्हणाल्या- “यांचा (अभिषेकी बुवांचा) भास होतो, हेमंतच्या गायकीत”.
३ जानेवारी ते १९ फेब्रुवारी असा कॉर्पोरेट विश्वातील दौरा केल्यावर एक आठवडा कुटुंबियांसमवेत विश्रांतीचा घालवून आता महिन्याभरासाठी शैक्षणिक जबाबदारी घेऊन परत घराबाहेर पडलोय. प
आज १७ एप्रिल. जागतिक हेमोफिलिया दिवस.
हिमोफेलिया हा रक्ताचा आजार समजला जातो. शरीरात रक्त गोठण्यासाठी तेरा घटक असतात. ‘हिमोफेलिया’च्या पेशंटमध्ये आठ क्रमांकाचा घटक कमी असेल तर ‘हिमोफेलिया ए’ नावाचा आजार होतो. नऊ क्रमांकाच्या घटकाची कमतरता असल्यास ‘हिमोफेलिया बी’ आणि अकरा क्रमाकांचा घटक नसल्यास ‘हिमोफेलिया सी’ असे आजार होतात. हिमोफिलिया हा दुर्मीळ आजार असून, तो ०.०१ टक्के लोकांमध्ये आढळून येतो. या रुग्णांच्या शरीरात रक्ताची गुठळी (क्लॉटिंग) तयार होत नाही. यामुळे जखम झाल्यानंतर तेथून सातत्याने रक्तस्त्राव होत राहतो. उपचार करूनही हा रक्तस्त्राव थांबत नाही. अखेर शरीरातील रक्ताचे प्रमाण लक्षणीयरित्या घटल्याने त्या रुग्णाचा मृत्यू ओढावतो. जगभरात आज जे काही मोजके आजार आहेत ज्यावर उपचार सापडलेला नाही त्यात हिमोफिलियाचा समावेश होतो. जगभरात हीमोफीलिया आजार या आजाराने त्रस्त लोकांची संख्या जवळपास ५०,००० आहे.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
कासवांच्या सातही प्रमुख प्रजाती सध्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. म्हणूनच त्या प्राणिसंवर्धन आणि संरक्षण कायद्याच्या परिघात येतात. समुद्री कासवांना पकडणे बेकायदेशीर आहे.
रोटी आणि चपाती यांच्यात आणखी काही फरक आहेत.
भाकरीचे पीठ भिजवताना त्यात तेल घालावे लागत नाही कारण ते हाताला चिकटतंच नाही.
जिथे चिकटपणा जास्त तिथे चिकटपणा कमी करण्यासाठी आपण तेल वापरत असतो.
चपातीचे पीठ (म्हणजे कणिक) मळताना, मात्र त्यात तेल घालावे लागते. म्हणजे ते हाताला चिकटत नाही. तेल घालून देखील कणिक हाताला चिकटतेच. एवढा चिकटपणा या गव्हामधे आहे.
हा चिकटपणा येण्याचे कारण ?
त्यातील ग्लुटेनीन नावाचे द्रव्य. अतिशय चिकट असते.
आणि हे ग्लुटेनीन जसे हाताला चिकटते तसे आतड्यांनाही चिकटून बसते. केवळ आपणच चिकटते असे नाही तर, मागून येणाऱ्या चांगल्या अन्नालापण चिकटवते. मग ट्रॅफीकजाम होणारच !
एक गाडी अडकली की मागून येणारी सर्व वाहाने सुस्थितीत जरी असली तरी, काहीही हालचाल करू शकत नाही. जैसै थे पोझिशनमधे राहातात. अगदी तसेच होते, या ग्लुटेनीनच्या चिकटपणामुळे. म्हणजेच गव्हामुळे !
आतड्याला चिकटलेला हा ग्लुटेनीनचा भाग मागून येणाऱ्या सकस अन्नाला पण पुढे जाऊ देत नाही. म्हणजे आपण स्वतःही गडबड करतो, आणि दुसऱ्यालाही चांगले काम करू देत नाही.
या सर्व दुर्गुणांमुळे आज पाश्चात्य देशात ग्लुटेन फ्री डाएट ही संकल्पना जोर धरत आहे. त्यांच्या कुत्र्यांना देखील ग्लुटेन फ्री बिस्कीटस बनवू लागले आहेत.
दिवाळीसाठी सुद्धा ग्लुटेन फ्री बिस्कीट खायची ? अशा आशयाची एक जाहीरात आपणदेखील सध्या टीव्हीवर पाहात आहोतच.
बहुतेक पाश्चात्य देश हे थंड हवामानाचे आहेत, त्यांच्याकडे ऊत्पादीत होणाऱ्या पिकांमधे गहू हे मुख्य पिक आहे. हवामान गव्हासाठी पोषक आहे. साहाजिकच उत्पादन जास्त येते.
करायचे काय एवढ्या धान्याचे ?
मुळात लोकसंख्या कमी. मग खाऊन खाणार तरी किती ? उरलेला गहू पशुधनाचे पोषण करण्यासाठी, मांस आणि चरबी वाढवण्यासाठी वापरला जातो, अगदी धान्याची दारू, त्याच्या पीठाची दारू, कुजुन फुकट गेलेल्या गव्हाची दारू इ.इ. अनेक प्रकारची व्हिस्की ब्रॅण्डी रम असे उत्पादन करून देखील गहू उरतो.
त्यांच्या देशातील सरकारला त्यांच्या आरोग्याची खूप काळजी असल्याने ग्लुटेन फ्री डाएटची संकल्पना रूजली. आणि उरलेला गहू, शाकाहारी बहुलोकसंख्या असलेल्या आणि लोकांवर नियंत्रण नसलेल्या, देशात खपवायला सुरवात केली. जनतेची काळजी नसलेल्या सरकारला विदेशी प्रशिक्षण दिल्यावर ते सरकार नमते घेते, असा पुर्वानुभव असल्याने अशा देशात सरकारी वरदहस्ताने गहू प्रमोशन मोहीम सुरू झाली. त्यामुळे आमचे माजी कृषीमंत्री यांनी, शेतकऱ्यांनी शेती सोडून मद्य निर्मिती करावी, असा सल्ला दिल्याचे आपणाला स्मरत असेलच.
आणि.......
घरच्या उत्पादीत तांदुळाऐवजी विकतचा गहू आणून खाण्याला आम्ही भारतीय स्वतःला धन्य समजू लागलो.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
25.10.2016
प्रचंड कष्ट घेऊन एखादा उद्योजक यशस्वी होतो. त्याच्या जबाबदाऱ्या वाढत जातात. संपन्नता येते खरी, पण तणावाची छुपी पावले त्रास देऊ लागतात. सुरुवातीचे ध्येय असते उत्कृष्ट उत्पादन करण्याचे.
रेल्वे-कामगार संघटना पहिल्या महायुद्धाच्या आधीच्या काळामध्ये म्हणजे १९०० ते १९१४ पर्यंत अस्तित्वातच नव्हत्या.
तत्पूर्वी, काही प्रांतांतील रेल्वे-कामगार व वरिष्ठ अधिकारी यांच्यात भांडणं, मारामाऱ्या होत. काहींचे तर मृत्यूही झाले होते, पण कामगारांचे हक्क मागणारी, त्यासाठी भांडणारी कोणतीही संघटना स्थापन झालेली नव्हती. त्या काळानुसार रेल्वे कामगारांचा पगार अतिशय कमी होता. संघर्ष होतच होता. त्यांतून मार्ग काढण्याकरता, कामगारांचं संघटित बळ तयार होण्याच्या दृष्टीने १९१८ सालानंतर भारतातील विविध रेल्वे-विभागांत कामगार संघटना स्थापण्यास सुरुवात झाली. पुढे १९२२ साली 'ऑल इंडिया रेल्वेमन्स फेडरेशन'ची स्थापना झाली. तिच्यात १२ ते १५ विविध रेल्वे संघटनांचा समावेश होता, व जवळजवळ २ लाख कर्मचारी सभासद होते. १९२२ सालापासून ते १९४७ सालापर्यंत विविध प्रदेशांत रेल्वेचे ४८ संप झाले होते. त्यांतले काही एक दिवसाचे, तर काही महिनाभर चालले होते. बंगाल प्रांतातील लिलूहा येथील रेल्वे डबेबांधणी कारखान्यातील कर्मचाऱ्यांचा संप इतका चिघळला, की त्याचं रूपांतर हावरा स्टेशनमधील भीषण दंगलीत झालं. त्यावेळी अंदाजे २१ लाख रुपयांचं नुकसान झालं होतं. मागण्या मान्य झाल्याने संपकाऱ्यांना नंतर बऱ्याच सुविधा मिळाल्या, पगारवाढ व प्रॉव्हिडंड फंड योजना सुरू झाली.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर (१९४७ ते १९५०) रेल्वे हे एक स्वतंत्र खातं झालं. त्याकरता निराळं अंदाजपत्रक, व रेल्वेसाठी वेगळ्या मंत्र्याची नेमणूक झाली. भारतातील सर्व विभाग 'इंडियन रेल्वे' या एक छताखाली आले. १९५१ मध्ये ९. २५ लाख रेल्वे कर्मचारी होते. दर ४०० भारतीयांमागे १ व १०० कुटुंबांमधून १ व्यक्ती रेल्वेच्या आधारानं आपलं पोट भरत होती. कर्मचाऱ्यांना आरोग्य सुविधा मिळू लागल्या. अनेक हॉस्पिटल्समध्ये उपचार करवण्याच्या सोयी त्यांच्यासाठी उपलब्ध झाल्या. रेल्वेकर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी रेल्वेतर्फे शाळा उभारल्या गेल्या. उच्च शिक्षणासाठी देशात व परदेशांत जाण्यासाठी शिष्यवृत्ती देण्याची सुरुवात झाली. विविध खेळांकरता अद्ययावत सोयी करण्यात आल्या.
सन १९७२ पासून रेल्वे कामगारांत असंतोष खदखदत होता. त्याचं रूपांतर सन १९७४ च्या मे महिन्यातल्या अखिल भारतीय रेल्वेकर्मचाऱ्यांच्या अभूतपूर्व संपात झालं. या संपाचं नेतृत्व श्री. जॉर्ज फर्नांडिस यांच्याकडे होतं. तीन आठवडे चाललेल्या या संपामुळे भारतातील संपूर्ण रेल्वे वाहतूकयंत्रणा ठप्प झाली. ५०,००० कामगारांना अटक झाली. ५,९०० बदली-कामगारांना काढून टाकण्यात आलं. त्यात चार कर्मचारी मरण पावले. जगामधील रेल्वेचा गाजलेला संप म्हणून याची नोंद घेतली गेली, या संपात १७ लाख कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. इंदिरा गांधी सरकारनं बरीच दडपशाही करून तो चिरडून टाकला होता. पुढे १९७५ सालात अणीबाणी लागू होण्याला हा संपही कारणीभूत होता. १९७७ च्या निवडणुकीतील काँग्रेसच्या अभूतपूर्व पराभवाचे एक कारण हा संपही होता. पुढे निवडून आलेल्या जनता पार्टी सरकारने रेल्वेसंघटनेच्या बऱ्याच मागण्या मान्य केल्या. या सर्व घटनांची सखोल माहिती देणारं 'रेल्वे स्ट्राईक ऑफ इंडिया १९७४' या नावाचं पुस्तक प्रसिद्ध झालं.
२००० ते २०१४ या काळात मुंबईच्या लोकल मोटारमनचे अनेक वेळा आकस्मिक संप झाले. त्यातील मे २०१० मध्ये पश्चिम रेल्वे लोकल मार्गावरील मोटरमननी चर्चगेट येथे संध्याकाळी ४ ते रात्री १० पर्यंत चालवलेल्या संपात लक्षावधी लोकांचे हाल झाले; त्यावेळी झालेल्या खोळंबलेल्या प्रवाशांच्या प्रचंड गर्दीमुळे काही प्रवासी मरणही पावले.
अशा अपवादात्मक घटना वगळता गेल्या १० ते १५ वर्षांत रेल्वे कामगार संघटना व सरकार यांच्यामधले संबंध सलोख्याचे राहिले व त्यामुळे रेल्वे प्रगतीच्या मार्गावर धावत आहे.
-डॉ. अविनाश वैद्य
जसा भूतकाळ आहे, भविष्यकाळ आहे तसा वर्तमानकाळ नाही. काळ क्षणाने मोजला जात असेल तर तो दुसर्या क्षणी उरत नाही, त्या क्षणाला परत आणता येत नाही. पुढचे क्षण ह्या क्षणी दिसत नाहीत. मग ‘चालू क्षण’ म्हणजेच वर्तमानकाळ का? तसे असेल तर ‘वर्तमानकाळ’ क्षणभंगूर आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti