(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • जागतिक कुस्ती दिवस

    कुस्तीची वा मल्लयुध्दाची पूर्वपीठिका फार प्राचीन आहे. भरतात वैदिक वाङ्मयात तसेच रामायण, महाभारत आदी ग्रंथातील मल्लविद्येचा उल्लेख अनेक ठिकाणी येतो. रामायणात राम, लक्ष्मण व सीता वनवासात असताना किशकिंधा नगरीत आले. रामाच्या प्रोत्साहनाने वाली आणि सुग्रीव यांच्यामध्ये मल्लयुध्द होऊन सुग्रीवने वालीचा पाडाव केला. महाभारतातील वर्णनुसार कृष्ण, बलीराम व भीम हे मल्लविद्येत प्रविण होते, हे त्यांनी केलेल्या महायुध्दांतील पराक्रमावरून दिसून येते.

  • माका अर्थात भृंगराज

    ।।गणधिपाय नम: भृंगराजपत्रं समर्पयामि।।

    भृंगराज ह्यालाच मराठी मध्ये माका असे ही म्हटले जाते. अहं आपण खातो तो मका नव्हे बरं का!हा माका आहे माका. ह्याचे बहुवर्षायू अर्थात बरीच वर्षे जाणारे क्षुप असते.

    औषधी करिता उपयुक्त म्हणून ह्याचे पंचांग व बीज वापरले जाते. हा चवीला कडू, तिखट, उष्ण असतो व जड आणी रूक्ष देखील असतो. शरीरातील कफ व वात दोषांचे हा शमन करतो.

    आता ह्याच माक्याचा उपयोग आपण कुठल्या शारीरिक तक्रारींमध्ये करू शकतो ते पाहुयात :

    जखम झाली असल्यास किंवा जखमेचा व्रण राहिला असल्यास, तसेच सुजेवर माक्याचा लेप लावला जातो.

    केसांवर तर ह्याचा खास उपयोग होतो केस गळणे, कोंडा ह्यात माका सिध्द तेल डोक्यावर लावतात. तर केस काळे भोर होण्यास पाने वाटून लेप लावतात. आपण सर्वांना महाभृंगराज तेल माहीतीचे असेलच ह्यात हा माकाच तर असतो.

    केस व हाडांचा आयुर्वेदा मध्ये जवळचा संबंध आहे. केस हा अस्थिधातूचा मल मानला जातो. त्यामुळे जर माका केस बळकट करतो तर त्याचे कार्य हे आपल्या हाडांची बळकटी करायला देखील होणारच ना!

    माका हा यकृत, प्लिहा ह्या अवयवांचे कार्य सुधारतो त्यामुळे रक्ताची कमतरता, भुक न लागणे, अजीर्ण, ह्यात ह्याचा चांगला उपयोग होतो.

    त्वचा रोगात ज्या मध्ये स्त्राव येतो जसे गजकर्ण, इसब, ह्यात देखील ह्याच्या सेवनाने लाभ होतो.

    ज्यांची दृष्टी क्षीण आहे त्यांनी ह्याचे नियमीत सेवन केल्यास दृष्टी सुधारते. त्यामुळेच ह्याला नेत्र्य असे म्हटले आहे.

    माक्याचे बीज हे वाजीकर आहे अर्थात कामशक्ती वाढविते.

    असा हा माका आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवू शकतो.

    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर,
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९६०६९९७०४

  • जाहीरात

    बंगलोरच्या ज्या जर्मन मल्टिनॅशनल कंपनीत मी काम करत होतो त्या कंपनीला कधी वर्तमानपत्रांत जाहीराती देण्याची पाळी आली नव्हती. त्याला कारणही तसेच होते. भारतातील ‘ऍटो ऍन्सिलरी सेक्टर’ मधील ही सर्वात मोठी आणि दिग्गज कंपनी होती. डीझेल आणि पेट्रोल इंजीनसाठी लागणारे महत्वाचे भाग बनवणारी ही कंपनी होती. या कंपनीची उत्पादने वापरल्याशिवाय डिझेल आणि पेट्रोल इंजिनांचे प्रॉडक्शन करणे शक्यच नव्हते. त्यामूळे भारतातले सगळे इंजीन मॅन्युफॅक्चरर्स या कंपनीचे ओ.इ. कस्टमर होते. या मध्ये ऍटोमोबाईल सेक्टरमधील कंपन्या मोठ्या प्रमाणावर होत्या. या प्रकारची उत्पादने बनवणारी ही भारतातील एकमेव कंपनी असल्यामूळे या कंपनीची जवळ जवळ मोनॉपली होती. या कंपनीला स्पर्धक होते. नाही असे नाही. पण ते फारच किरकोळ स्वरुपातले होते. कंपनीचे बंगलोर आणि नाशीक या दोन ठिकाणी कारखाने होते. दोन्ही कारखाने अत्याधुनीक होते. कंपनीची प्रॉडक्ट्स नुसतीच हाय टेक नव्हती तर हाय प्रिसिजन पण होती. कंपनीची जी उत्पादने इंजीनवर बसवण्यात येत त्यांना पण सर्वीस लागे. या साठी कंनीनीने भारतात 100 डिलर्स आणि सर्वीस स्टेशन्सचे जाळे उभे केले होते. तसेच या प्रकारची सर्वीस देणारी अनेक खासगी सर्वीस स्टेशन्स पण होती. यांना कंनीचे स्पेअर पार्ट मोठ्या प्रमाणावर लागत. त्यामूळे कंपनीचा स्पेअर पार्टचा धंदा पण मोठ्या प्रमाणावर होता. जसजसे इंजिनांचे आणि वाहनांचे उत्पादन वाढत होते तसतसे कंपनीच्या उत्पादनांची मागणी वाढतच चालली होती. अनेक वेळेला कंपनीच्या मालाचे शॉर्टेज असायचे. थोडक्यात कंपनी जे बनवत होती ते आपोआप विकले जात होते. ते सुद्धा कंपनीला हव्या असलेल्या किंमतीमध्ये विकले जात होते. कंपनिची 4 झोनल आणि 8 एरिया ऑफिसेस होती. यांच्यातर्फे कंपनीचे व्यवहार उत्तम चालू होते. अशी ही परिस्थिती अनेक वर्षे होती. मग कंपनीला जाहीरातबाजी करण्याची गरजच काय?

    पण 1980 च्या सुमारास परिस्थिती बदलली! कंपनीच्या बंगलोरच्या कारखान्यात कामगारांचा संप झाला. हा संप दिर्घकाळ, म्हणजे जवळ जवळ 2 महीने टिकला. या संपामूळे कंपनीचे प्रॉडक्शन बोंबलले. याचा मोठा फटका कंपनीच्या ग्राहकांना बसू लागला. ऍटोमोबाईल सेक्टरला याचा सर्वात मोठा फटका बसला. ट्रक, बसेच, कार्स आणि टू व्हिलर गाड्यांच्या उत्पादनावर याचा मोठा परिणाम झाला आणि गाड्यांचे उत्पादन गडगडले. त्याचप्रमाणे ज्या गाड्या रस्त्यावर धावत होत्या त्यांच्या सर्व्हिसींगला कंपनीचे पार्ट मिळेनासे झाल्याने या गाड्या पण बंद पडू लागल्या. याचा मोठा फटका रोड ट्रान्सपोर्ट इंडस्ट्रीला बसला. थोडक्यात देशाच्या इकॉनॉमिलाच याचा मोठा फटका बसु लागला. अगदी लोकभेमध्ये चर्चा होण्यापर्यंत हे प्रकरण ताणले गेले. संप मिटवण्याचे कंपनीचे हर तर्हेलचे प्रयत्न चालूच होते पण त्याला म्हणावे तसे यश येत नव्हते. संपाच्या या काळात कंनीचे जे ओ. ई. कस्टमर्स होते त्यांचा कंपनीवरचा विश्वास कमी होऊ लागला आणि त्यांनी पर्यायी व्यवस्था शोधायचा मार्ग स्विकारायला सुरवात केली. काही जणांनी ही उत्पादने आयात करायला सुरवात केली. कंपनीचे जे किरकोळ स्पर्धक होते त्यांचे चांगलेच फावले आणि त्यांच्या उत्पादनांची हातोहात विक्री होऊ लागली. कंपनीचे नकली किंवा डुप्लिकेट पार्ट बनवणार्यांानी वाहत्या गंगेत हात धुऊन घ्यायला सुरवात केली. असे अनेक नकली मालाचे उत्पादक दिल्लीला होते. पण याहीपेक्षा अजून एक मोठा ‘थ्रेट’ कंपनीसाठी निर्माण झाला. भारतातील एका प्रसिद्ध उद्योग समुहाने यात उडी घेतली. या कंपनीसारखीच उत्पादने बनवणारा कारखाना सुरू केला. जोरदार मार्केटिंगच्या जोरावर कंपनीचे अनेक ग्राहक आपल्याकडे खेचून घेतले आणि कंपनीपुढे मोठे आव्हान उभे केले. कंपनीच्या मार्केट शेअरवर याचा परिणाम होऊन कंपनीचा मार्केट शेअर हळू हळू घसरू लागला.

    दोन महिन्यांच्या अथक परिश्रामाने हा संप एकदाचा मिटला आणि कंपनीचे उत्पादन परत पूर्वीसारखे सुरु झाले. या काळात कंपनीचे जे आर्थिक नुकसान झाले होते त्या पलीकडे जाऊन कंपनीसाठी तीन आव्हाने निर्माण झाली होती. पहीले आव्हान म्हणजे कंपनीच्या कामगारांच्या मनात कंपनी विषयी जिव्हाळा निर्माण करणे, दुसरे आव्हान कंपनीच्या ओ. ई. कस्टमर्सच्या मनात कंपनीविषयीचा विश्वास परत जागृत करणे आणि तिसरे आव्हान म्हणजे बाजारातील कंपनीची घसरलेली पत आणि प्रतिष्ठा परत मिळवणे.

    मी स्पेअर पार्ट मार्केटिंगमध्ये काम करत असल्यामूळे माझा संबंध तिसर्यार आव्हानाशी आला. मार्केटमधील घसरलेली कंपनीची पत आणि प्रतिष्ठा परत कशी मिळवायची या वर चर्चा सुरू झाली. अनेक उपायांचा विचार करण्यात आला. कंपनीचा नवीन आलेला कॉम्पिटिटर दिवसेंदीवस शिरजोर बनत चालला होता. त्याला आवर घालण्यासाठी मार्केटमधील कंपनीची इमेज शक्य तेवढ्या लवकर सुधारणे आवश्यक होते. अनेक उपायांचा विचार केल्यावर कंपनीने वर्तमानपत्रांतील जाहीरातींच्या माध्यमातून कंपनीची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करायचे ठरवले. जाहीराती मुख्यतः दोन प्रकारच्या असाता. एक जाहीरात ही उत्पादनांविषयी किंवा वस्तुंविषयी असते. त्याला ‘प्रॉडक्ट ऍड’ म्हणतात. तर दुसरी जाहीरात ही कंपनीविषयी असते. त्याला ‘कॉर्पोरेट ऍड’ असे म्हणतात. कंपनीने प्रॉडक्ट ऍड आणि कॉर्पोरेट ऍड यांचे मिश्रण करून जाहीराती टाकायचे ठरवले. अशा प्रकारच्या जाहीराती त्या वेळी कोणी टाकत नव्हते, त्या मूळे हा एक नवीन प्रयोगच होता.

    अशा प्रकारच्या ‘ऍड कॅम्पेन’ साठी सक्षम ऍड एजन्सी असावी असे कंपनीला वाटले. त्यासाठी कंपनीने भारतातील त्या वेळच्या चार प्रमुख ऍड एजन्सिजना प्रेझेन्टेशनसाठी बोलावले. ऍड एजन्सीचे प्रेझेन्टेशन हा काय प्रकार असतो याचा मला अनुभव घ्यायची संधी मिळाली. या प्रेझेन्टेशन मधून भारातततील एक प्रसिद्ध आणि आघाडीची ऍड एजन्सी निवडली गेली. यामूळे ऍड एजेन्सीबरोबर काम करण्याचा भरपूर अनुभव मला मिळणार होता.

    त्यानंतर मग प्रत्यक्ष जाहीरातीवर काम सुरू झाले. आधी जाहीरातीचा आकार काय असावा यावर चर्चा सुरू झाली. कंपनीच्या दृष्टीने या जाहीराती महत्वाच्या असल्यामूळे लोकांचे लक्ष लगेच त्याकडे जावे यासाठी काय काय करता येईल यावर विचार विनिमय सुरू झाला. जाहीरातींचा आकार हा ‘कॉलम सेंटिमीटर’ तसेच ‘फुल पेज, हाफ पेज, क्वार्टर पेज’ या भाषेत ठरतो. क्वार्टर पेज (म्हणजे वर्तमानपत्राचे एक चतुर्थौंश पान) हा जाहीरतीचा आकार ठरला. क्वार्टर पेज आकाराचीच पण दोन कॉलम रुंदी असलेली उंच कॉलमसारखी जाहीरात अधीक आकर्षक होईल असे ऍड एजन्सीचे म्हणणे पडले म्हणून तो साईज फायनलाइज करण्यात आला. वर्तमानपत्राच्या कुठल्या पानावर जाहीरात टाकल्याने ती लोकांचे लक्ष वेधून घेते यावर पण बरीच चर्चा झाली. वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावरची जाहीरात सर्वात महाग असते, जस जसे आतल्या पानांकडे जाल तस तसे जाहीरातींचे दर कमी कमी होत जातात असे कळले. दुसर्याआ किंवा तिसर्यात पानावर टाकलेली जाहीरात लवकर लक्ष वेधुन घेते असे एका सर्व्हेमधील पाहणीत आढळून आल्याचे सांगण्यात आले. त्यामूळे वर्तमान पत्राच्या दुसर्याम पानावर जाहीराती टाकायचे ठरले. एकुण तीन जाहीराती टाकायच्या, त्यातील दोन जाहीराती प्रॉडक्ट संबंधी (एक डिझेल इंजिन वाल्यांसाठी तर एक पेट्रोल इंजिन वाल्यांसाठी) तर एक जाहीरात कॉर्पोरेट प्रकारची टाकायचे ठरले.

    जाहीरातीचा साइझ ठरला. कुठल्या पानावर जाहीरात टाकायची हे ठरले. आता महत्वाचा भाग होता तो म्हणजे जाहीरातीचा मजकुर ठरवणे, याला कॉपी असे म्हणतात. कारण जाहीरातीमध्ये ‘कॉपी’ ला फार महत्व असते. आपल्याला नेमके काय सांगायचे आहे हे आधी ठरवावे लागते मगच कॉपी तयार होते. यावर बरीच चर्चा चर्विटचरण झाले. ऍड एजन्सीने कॉपीची एकुण 32 सॅम्पल्स सादर केली. अर्थातच मूळ कॉपी इंग्लीशमध्ये होती. यावर बरीच चर्चा चर्वीटचरण होऊन तीन कॉपीज फायनलाइज करण्यात आल्या. आधी फक्त इंग्रजी भाषेत आणि भारतातील प्रमुख इंग्रजी वर्तमान पत्रातून जाहीराती देण्याचे ठरले. मग हिन्दी आणि महत्वाच्या प्रादेशीक भाषांमधुन पण जाहीराती देणे आवश्यक आहे असे ठरले. त्यामूळे इंग्रजीबरोबर हिन्दी, तामीळ, तेलगु, मल्याळम, कानडी, मराठी, गुजराती, गुरुमुखी, बंगाली, ओरीया आणि आसामी भाषांमधून पण जाहीराती टाकायचे ठरले. यात पुढे उर्दु भाषा पण ऍड झाली. ज्या इंग्लीश कॉपी अप्रुव्ह केल्या होत्या त्याचीच निरनिराळ्या भाषांमध्ये भाषांतर करण्याचे ठरले. यासाठी ऍड एजन्सीने मुंबईतील एका प्रसिद्ध लॅन्वेज ब्युरोची नेमणूक केली. भाषांतरे योग्य झाली आहेत की नाही हे तपासण्यासाठी कंपनीने वेगळा मार्ग निवडला. कंपनीतील ज्या कर्मचार्यां ची मात्तृभाषा कानडी किंवा बंगाली आहे त्यांचेकडे ती भाषांतरे तपासण्यासाठी देण्यात आली. त्यावेळी बंगलोरला मराठी आणि हिन्दी भाषा येणारा मी एकमेव माणुस होतो. त्यामूळे हिन्दी आणि मराठी भाषांतरे माझ्याकडे आली. मराठी भाषांतराची तर बोंबच होती. त्यात बर्यारच सुधारणा कराव्या लागल्या. हिन्दी भाषांतर मात्र अप्रतीम झाले होते. नंतर मला कळले की हे भाषांतर गुलशन नंदा या हिन्दीमधील ज्येष्ट कादंबरीकाराने केले होते. गुलशन नंदा यांच्या हिन्दी कादंबर्याध त्या वेळी फार लोकप्रिय होत्या. त्यांच्या अनेक कादंबर्यांतवर चित्रपट पण निघाले. त्यावेळी त्यांच्या कादंबरीवर आधारलेला राजेश खन्ना आणि आशा पारेख यांचा ‘कटी पतंग’ हा सिनेमा तुफान गाजला होता. यासाठी गुलशनबाबूंनी भरपूर फी उकळली पण भाषांतर मात्र अप्रतीम करून दिले. उर्दु भाषांतर सुद्धा हिंन्दी सिनेजगततील एका प्रसिद्ध कवीने करुन दिले होते.

    कॉपी ठरल्यानंतर महत्वाचा भाग असतो तो म्हणजे लेआऊट. थोडक्यात जाहीरात कशी दिसेल याची मांडणी. आधी जाहीरातीमध्ये कंपनीची प्रॉडक्ट दाखवायची नाहीत, फक्त लोगो दाखवायचा असे ठरले. पण मग नंतर कंपनीच्या प्रॉडक्ट ऍडमध्ये डिझेल इंजीन आणि पेट्रोल इंजीनसाठी लागणारी प्रॉडक्स दाखवावी असे ठरले. आधी जाहीरातीमध्ये माणसाचे चित्र नव्हते. पण जाहीरातीला काहीतरी मानवी चेहेरा असावा असे ठरले. यासाठी आधी काही मॉडेल्स आणि चित्रपट तारकांचा विचार झाला. पण मग कंपनीतीलच एखादा कर्मचारी असावा असे ठरले. उत्तम पर्सनॅलिटी असलेला एक कर्मचारी कंपनीच्या मुंबई ऑफीसमध्ये होताच. त्याची मॉडेल म्हणून निवड झाली. लेआउटची आर्ट वर्क येउ लागली आणि लेआउट पण फायनलाइज होऊ लागले.

    कोणत्या वर्तमानपत्रात जाहीराती टाकायच्या आणि त्यांचे टाईमटेबल काय असावे यावर चर्चा सुरू झाली. रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी जाहीरातींचे दर जास्त असतात. त्यामूळे रविवारच्या सुट्टीच्या अलिकडचा दिवस म्हणजे शनिवार, नंतरचा दिवस म्हणजे सोमवार आणि आठवड्याचा मधला दिवस म्हणून गुरुवार हे दिवस ठरले. दोन जाहीरातींमध्ये 15 दिवसांचे अंतर असावे असे ठरले. टाईम्स ऑफ इंडीया, इंडियन एक्सप्रेस, इकॉनॉमिक टाईम्स, हिन्दू, अमृत बझार पत्रीका या इंग्रजीमधील आघाडीच्या वृत्तपत्रांसह एकूण 54 वर्तमानपत्रे निवडण्यात आली. यांमध्ये मराठीतील सकाळ, लोकसत्ता, तरुण भारत आणि पुढारी ही प्रमुख वर्तमानपत्रे होती. (त्या वेळी महाराष्ट्र टाईम्स बहुतकरून नसावा) या वर्तमानपत्रात जाहीराती कोणकोणत्या तरखांना प्रसिद्ध होणार हे वेळापत्रक त्याचप्रमाणे जाहीरात प्रसिद्ध झाल्यावर त्या वर्तमानप्तराचे तीन अंक बंगलोरला पाठवायचे ऍड एजेन्सीने मान्य केले.

    अशा रितीने ऍड कॅम्पेन दणक्यात सुरू झाले. ठरल्याप्रमाणे कंपनीच्या जाहीराती छापून येऊ लागल्या. जाहीराती छापून आलेल्या अंकांचे गठ्ठे च्या गठ्ठे बंगलोरला येऊ लागले. पेपर मध्ये छापून आलेल्या जाहीराती बघून सगळ्यांचे डोळे सुखावू लागले. फिल्डमधून पण जाहिरातींना उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. ऍड कॅम्पेन सक्सेसफुल झाला आहे असा फिडबॅक येऊ लागला. कंपनीने जाहीरातींसाठी जी मेहेनत घेतली होती आणि भरपूर पैसे खर्च केले होते (त्या वेळी या सर्व कँमेनचा खर्च 17 लाख रुपयांच्या घरात गेला होता. त्यावेळचे 17 लाख म्हणजे आत्ताचे 2 कोटी 93 लाख) ते सत्कारणी लागले असे वाटत होते.

    या जाहीरातबाजीच्या काळात एक गंमतीदार घटना घडली. मी विमानाने बंगलोरहून दिल्लीला निघालो होतो. मला विमानात त्या दिवसाचा टाईम्स ऑफ इंडियाचा अंक मिळाला होता. तो अंक चाळत असताना त्या अंकाच्या दुसर्यां पानावर छापून आलेल्या आमच्या कंपनीच्या जाहीरातीकडे माझे लक्ष गेले. थोड्याच वेळात सुटा बुटातले एक गृहस्थ माझ्या शेजारी येऊन बसले. त्यांनी पण टाईम्सचा अंक चाळायला सुरवात केली. माझ्या कंपनीच्या जाहीरातीवरून त्यांनी दोन तीन वेळा तरी नजर फिरवली असेल. थोड्या वेळाने मला त्यांनी त्यांचा परीचय करू दिला. भारतातील एका प्रसिद्ध वाहन निर्मिती करणार्या् कंपनीचे ते उच्च अधीकारी असल्याचे मला कळले. त्यांनी मला त्यांचे कार्ड पण दिले ते मी शर्टाच्या खिशात ठेवले. मी मग माझा परिचय करून दिला. माझ्या कंपनीचे नाव ऐकताच ते लगेच म्हणाले, ‘तुमच्या कंपनीबद्धल मी नुकतेच काहीतरी वाचले आहे!’
    ‘काय वाचलेत?’ मी कुतुहलाने विचारले.
    ‘नक्की आठवत नाही पण काहीतरी वाचले एवढे मात्र खरे. कदाचीत एखादी बातमी असेल’ ते म्हणाले.
    ‘साधारणपणे केव्हा वाचलेत?’ मी विचारले.
    ‘नक्की आठवत नाही! झाले असतील दोन तीन दिवस!’ ते म्हणाले.
    मला जरा आश्चर्यच वाटले. मी त्यांचे व्हिजिटिंग कार्ड नीट बघीतले आणि उडालोच. ते त्यांच्या कंपनीचे मार्केटिंग डायरेक्टर होते आणि त्यांना काही वेळापूर्वी बघीतलेली आमच्या कंपनीची जाहीरात आठवत नव्हती. तर इतरांची काय कथा?
    मी त्यांना जेव्हा सांगीतले की त्यांनी आमच्या कंपनीविषयी थोड्या वेळापूर्वी या विमानातच वाचले आहे आणि जेव्हा मी त्यांना टाईम्समधली ऍड दाखवली तेव्हा ते जोरात हसले आणि म्हणाले, ‘ आम्ही सुद्धा पूर्वी अशा जाहीराती देत होतो. पण त्याचा काही फारसा उपयोग होत नाही असे लक्षात आल्यावर जाहीराती देणे बंद केले.’ मला काही त्यांचे म्हणणे फारसे पटले नाही तेव्हा त्यांनी मला विचारले, ‘टाईम्समध्ये तुमच्या कंपनीव्यतिरिक्त इतर अनेक जाहीराती आहेत. यातील किती जाहीराती तुमच्या लक्षात आहेत?’ खरोखरच एकही जाहिरात माझ्या लक्षात नव्हती. ‘आपण आपल्या मनाच्या समाधानासाठी जाहीराती टाकत असतो आणि ऍड एजन्सीजना धनवान करत असतो. कारण कुठलिही ऍड एजन्सी घ्या. ती न्युज पेपर ऍड कॅम्पेनच सजेस्ट करत असते. कारण यातच त्यांचा फायदा असतो.’ ते म्हणाले.
    ‘म्हणजे तुम्ही ऍड टाकत नाही?’ मी वाचारले.
    ‘आम्ही आता पॅटर्न बदलला आहे. आम्ही लोकल डिलरला ऍड टाकायला सांगतो आणि त्याचा खर्च आम्ही उचलतो. यामूळे एकतर ऍड परिणामकारक होतात आणि खर्च पण वाचतो!’ ते म्हणाले.

    बंगलोरच्या आमच्या मिटींगमध्ये मी हा किस्सा सांगीतला. पुढे कंपनीने पण तो ऍड कॉम्पेन आवरता घेतला. त्यानंतर या कंपनीने कधी पेपरमध्ये ऍड टाकल्याचे मी तरी पाहीले नाही.

    एकुण जाहीरातबाजी करण्यासाठी किती मेहेनत घ्यावी लागते याची थोडी तरी कल्पना यावी यासाठी मी हा प्रपंच मांडला. तसेच हे एक खर्चीक माध्यम आहे. असे असुनही आज वर्तमानपत्रे, मासीके, टी.व्ही., रेडियो यांच्या माध्यमातून आपल्यावर जाहीरातींचा पाऊस पडत असतो. काही वर्तमानपत्रे तर केवळ जाहीरातींवरच चालतात असे मला आढळून आले आहे. पुण्याचा ‘सकाळ’ हे याचे उत्तम उदाहरण आहे. मी हल्ली पुण्याच्या सकाळचा उल्लेख ‘सकाळ म्हणजे जाहीरतींचा सुकाळ’ असाच करत असतो. अनेक टीव्ही चॅनल तर निव्वळ जाहीरातीवर चालतात. अनेक कंपन्या या जाहीरातींसाठी कोट्यावधी रुपये खर्च करत असतात पण याचा किती उपयोग होतो? एकतर पेपरमध्ये छापून आलेल्या जाहीराती लक्षात रहात नाहीत. टी.व्ही. वरच्या जाहीरातीच्यावेळी अनेक जण टी.व्ही. म्युट करतात. तीच गोष्ट रेडियोवरच्या जाहीरातींची आहे. आता तर जाहीरातींचे तंत्र बदलत चालले आहे. इंटरनेट जाहीरातींचे युग सुरू झाले आहे. यांमध्ये केवळ जाहीरात पाहिल्याबद्दल पैसे मिळण्याची सोय आहे. अमेरिकेतील वर्तमान पत्रांमध्ये तसेच टी. व्ही. वर जाहीराती फार कमी असतात. तेथील वर्तमानपत्रे जाहीरातींची वेगळी सप्लिमेन्ट काढतात जे लोक जपून ठेवतात. टी. व्ही. वर सुद्धा जाहीरातींचा म्हणून वेगळा प्रोग्रॅम असतो. आपल्याकडे अजून हा प्रकार सुरू झाला नाही. काही दिवसांनी या पेपर आणि टी. व्ही. वाल्यांना जाहीराती मिळणे बंद होईल. मग हे लोक काय करतील?

    असो! जाहीरातींना किती महत्व द्यायचे. जाहीरातींच्या या जंगलात स्वतःला किती बुडवायचे आणि आपले आयुष्य किती जाहीरातमय करून टाकायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे.

    तुम्हाला काय वाटते?
    उल्हास हरी जोशी
    मोः-9226846631

    28 May 2017

  • आधुनिक अमेरिकन शेती व पशुसंवर्धन – भाग ४

    अमेरिकन शेतीउत्पादनाचा पशुसंवर्धन हा अविभाज्य घटक आहे. याची चार मुख्य अंगे म्हणजे – बीफ (गोमांस) उत्पादन, दुग्धउत्पादन, वराहपालन आणि कुक्कुटपालन.

    अमेरिकन आहारातल्या प्रथिन (protein) घटकांचा विचार केला तर त्यात अव्वल नंबरावर आहे बीफ (गोमांस). अमेरिकन लोकांचे स्टेक आणि हॅंबर्गर्सचे वेड तर काही विचारायलाच नको. त्यामुळे बीफ उत्पादनासाठी विशिष्ट प्रजातीच्या गाई गुरांचं संगोपन, हा अमेरिकन शेतीमधला सर्वात मोठा घटक असावा यात काही नवल नाही. २००० सालच्या सर्वेक्षणानुसार, अमेरिकेतील एकूण फार्म्सपैकी तब्बल ३१% फार्म्स हे बीफ संगोपन करणारे आहेत. बीफ संगोपनाचा हा उद्योग (industry), १० लाखांहून अधिक घटक फार्म्स आणि रॅंचेसचा मिळून झालेला आहे. या बीफ फार्म्सचे वैशिष्ट्य म्हणजे, या १० लाख फार्म्सपैकी तब्बल ९७% फार्म्स हे घरगुती स्वरूपाचे आणि छोटेखानी आहेत. यापैकी बहुतेक (७९% ) फार्म्सवर, ५० किंवा त्याहून कमी जनावरे असतात. अर्थात भारतीय संदर्भात असे फार्म्स मोठे समजले जात असले, तरी अमेरिकन फार्म्सच्या तुलनेत त्यांना छोटेच म्हणायला हवे. नवरा बायको, वडील मुलगा, भाऊ भाऊ, अशा घरगुती साच्यांमधे हे फार्म्स चालवले जातात. बीफ फार्म्सची ही कौटुंबिक पार्श्वभूमी खूप जुनी आहे आणि बहुतेक फार्म्स हे पिढ्यान पिढ्या एकेका घराण्यात चालत आलेले असतात.

    २००९ साली अमेरिकेमधे सुमारे ९४.५ दशलक्ष (94.5 million) बीफ गाई गुरे होती. २००८ साली ३४.४ दशलक्ष बीफ जनावरांची रवानगी कत्तलखान्यात करण्यात आली आणि त्यापासून २६.६ अब्ज पाउंड्स (26.6 billion pounds) एवढ्या गोमांसाचे उत्पादन करण्यात आले. २००८ साली अमेरिकन ग्राहकांनी बीफवर ७६ अब्ज डॉलर्स खर्च केले. त्यासाली अमेरिकन माणसांनी दरडोई ५९.९ पाउंड बीफ खाल्ले तर ५९.२ पाउंड चिकन !

    १९६० साली ३.९ दशलक्ष बीफ फार्म्स १८३ दशलक्ष लोकसंख्येला बीफ पुरवठा करत होते, तर २००७ साली २.२ दशलक्ष फार्म्स सुमारे ३०० दशलक्ष लोकसंख्येला बीफ पुरवत होते. म्हणजेच या ४७ वर्षांत, बीफ फार्म्सची संख्या १.७ दशलक्षांनी घटली, परंतु याच कालावधीमधे अमेरिकन लोकसंख्या मात्र ६४% वाढली. १९६० च्या दशकामधे बीफ फार्म्सचे सरासरी आकारमान २९७ एकर्स होते, ते वाढत वाढत २००७ साली ४१८ एकर्स एवढे झाले होते. बीफ फार्म्सच्या वाढणार्‍या आकारमानाबरोबरच, पशुसंगोपन, पशुआहारशास्त्र यांतील वैज्ञानिक प्रगतीमुळे, बीफ जनावरांची उत्पादन क्षमता वाढून ती अधिकाधिक धष्टपुष्ट होऊ लागली आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर १९९० च्या दशकात, एका बीफ जनावरापासून सरासरी ४०० पाउंड बीफ मिळत होतं, तर २००८ साली, एका बीफ जनावरापासून ६३७ पाउंड बीफ मिळू लागलं आहे.

    -- डॉ. संजीव चौबळ

  • ज्ञात अज्ञात पंढरपूर १ – चंद्रभागा मंदिर

    पंढरी क्षेत्राची नगर परिक्रमा करताना चंद्रभागा घाटावर चढून वर आले कि सुमारे ५० टाळकरी उभारतील एवढ्या दगडी सपाचे पश्चिम बाजूस पुर्वाभिमुख असलेले हे छोटे खानी पण सुंदर दगडी उत्तर पेशवाई थाटाचे मंदिर दिसते. शिखराची मोड तोड झालेली, भिंतींचा अन् शिखराचाही रंग उडालेला असे हे दुर्लक्षित अज्ञात मंदिर. मात्र दुर्दैवाने याची कुणाला माहितीच नाही. गावकऱ्याना हे मंदिर चंद्रभागेचे आहे हे ज्ञात नाही तर महाराष्ट्र अन् परराज्यातील गावोगावातून भक्तांना काय कळणार?

  • न्याय झाला, पण..!

    मानवी क्रौर्याची परिसमा ओलांडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणातील तिन्ही दोषींना आज न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. कोपर्डी घटनेतील घृणास्पद विकृती आणि विक्षिप्तपणा बघितला तर या प्रकरणात फाशीशिवाय दुसरी शिक्षा योग्य नव्हती. अत्यंत निर्घृणपणे पीडित तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. कोपर्डी अत्याचार प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला. कोपर्डीतील पिढीतला न्याय मिळावा यासाठी लाखो करोडो जनसंख्येचे महामोर्चे निघाले. दोषींना फासावर लटकविण्याची मागणी सर्व स्तरातून करण्यात आली. जणआक्रोशाचा प्रचंड दबाव असल्याने सरकारलाही हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा लागला. विशेष सरकारी वकील ऍड. उज्वल निकम यांची वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी सबळ पुरवा नसल्याने दोषींना फासावर लटकविण्याची न्यायालयीन लढाई तशी सोपी नव्हती. परंतु, ऍड. उज्वल निकम यांनी परिस्थतीतीजन्य पुराव्याच्या आधारावर मजबूतपणे युक्तिवाद केला. परिणामी तिन्ही दोषींना फाशीची शिक्षा अहमदनगर न्यायालयाने सुनावली आहे. यामुळे कोपर्डीच्या पीडितेला न्याय मिळाला असं म्हणता येईल. परंतु, निकाल झाला असला तरी हा न्याय अजून अपूर्ण आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आदेशावर दोषी अजूनही उच्च न्यायालयात अपील करू शकतात. त्यानंतरही शिक्षा प्रलंबित ठेवण्यासाठी अनेक उपाय दोषींकडे आहेत. त्यामुळे, कोपर्डी घटनेतील आरोपी ज्या दिवशी फासावर लटकविल्या जातील तेंव्हाच पीडितेला पूर्णतः न्याय मिळेल.
    'मनुष्यप्राणी' असा शब्द उच्चारून माणूस देखील एक प्राणीच असल्याचे नेहमी उद्युक्त केल्या जाते. मात्र मनुष्य हा प्राणी विचारशील, समाजशील असल्याने त्याच्याकडून माणूसपण जपले जाण्याची अपेक्षा केल्या गेली आहे. नैतिकता सभ्यता सद्सदविवेकबुद्धी असे सद्गुण जपत माणूस रानटी अवस्थेतून आजच्या संगणकयुगापर्यंत वाटचाल करत असल्याचे म्हटले जाते, शिवाय माणसाने आज वैचारिक सुसंस्कृतपणाचा एक नवा टप्पा गाठल्याच्या गप्पाही मारल्या जातात. परंतु माणसाचा मूळ रानटी स्वभाव आजही कायम असून त्याच्या स्वभावातील रानटीपणा विकृत होत असल्याचे अवतीभवती सातत्याने घडणाऱ्या घटनांवरून जाणवत राहते. कोपर्डीच्या घटनेत जो अमानुषपणा या नराधमांनी केला तो प्राण्यातील रानटीपणालाही लाजवणारा होता. एखाद्या बलात्काराच्या घटनेचे वर्णन करू नये. पण या प्रकारातील विक्षिप्तपणा अत्यंत घृणास्पद होता. नराधमाने मुलीचे हात-पाय तोडले. ओठांचा चावून चोथा केला होता. केस उपटले होते. तिला प्रचंड वेदना देऊन एका निष्पाप अल्पवयीन मुलीची नृशंस हत्या केली. नरभक्षक प्राण्याला जसं गोळ्या घालून ठार मारल्या जातं तसेच या माणसातील जनावरांना तात्कळ गोळ्या घालून यमसदनी पाठविल्या जावं, अशा उद्विग्न प्रतिक्रिया त्यावेळी उमटल्या होत्या. परंतु आपल्या न्यायव्यवस्थेचं तत्व जनावरणांनाही मारण्याची परवनगी देत नसल्याने दोषींच्या विरोधात ट्रायल सुरु झाली. आणि आज अखेर या प्रकरणात न्याय आला. न्यायलायाच्या निकालाने समाजमन निश्चितच सुखावले आहे. कोपर्डी पीडितेला न्याय मिळाल्याची भावना व्यक केल्या जातेय. दोषींना फासावर लटकविण्याचा निर्णय देऊन न्यायालयाने फक्त पीडितेला न्याय दिला नाही तर या घटनेनंतर आक्रोश करणाऱ्या संपूर्ण महराष्ट्रातील जनतेच्या दुःखावर मलमपट्टी केली आहे. मात्र जखम अजून पूर्ण बरी झालेली नाही. दोषींना फासावर लटकविण्यासाठी अजून संघर्ष करावा लागणार आहे. शिवाय यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठीच्या उपयांवरही मंथन करावे लागणार आहे.
    कोपर्डीसारख्या अमानवीय बलत्कारच्या घटनेत 'न्याय झाला' एवढाच शब्द वापरून हा विषय संपणार नाही तर अनेक गंभीर मुद्दे यासोबत जुडलेले आहेत. शिक्षेची सुनावणी आणि अंलबजावणीत लागणाऱ्या मोठ्या कालावधीमुळे शिक्षेविषयी जनमानसातील धाक आणि विश्वासर्हतेचा प्रश्न जसा समोर येतो तसाच महिलांच्या सुरक्षेतेचा प्रश्नही अजेंड्यावर घ्यावा लागेल. कोपर्डीत एका निष्पाप मुलीचा बळी गेल्यानंतर अवघ्या महाराष्ट्रात जणक्षोभ उसळला होता. कोपर्डीच्या पीडितेला न्याय देण्याची मागणी ज्यावेळी करण्यात येत होती. त्याच्या मागे अशी घटना पुन्हा घडू नये, अशी अपेक्षाही व्यक्त केल्या जात होती . आज कोपर्डीच्या प्रकरणात न्याय झाला, न्यायालयाने त्यांचे काम चोख बजावले. थोड्या उशिराने का होईना दोषी फासावर लटकविल्या जातील, आणि पीडितेला पूर्ण न्याय मिळेल. मात्र लोकांची अपेक्षा अजून पूर्ण झालेली नाही. कोपर्डी सारख्या दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आता पुढाकार घ्यावा लागणार आहे. कोपर्डी घटनेच्या निकालाने अशा विकृत प्रवृत्तीवर जरब बसेल, असं ठामपणे म्हणता येणार नाही. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर देशात कायदे बदलले जागरूकता झाली. तरी कोपर्डीची घटना घडली. यानंतरही बलात्काराचे गुन्हे घडतच आहे. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी कायद्यासोबत मानसिकता ही बदलावी लागणार आहे. समाजातील पुरुषसत्ताक व्यवस्था आणि स्त्री विषयीचा भोगवादी दृष्टिकोन हेचं अशा विकृतींना जन्म देते. बलात्काराच्या विकृत विचारांचा जन्म मेंदूतून होतो, त्यामुळे उपचारही मेंदूवरच करावे लागतील.
    विकृत आणि मुजोर मानसिकेतला भयभीत करून अशा कृत्यांपासून परावृत्त करण्यासाठी कोठारातील कोठार शिक्षा देण्याची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. मात्र न्यायप्रक्रियेतील विलंब या उद्देशाला काही प्रमाणत हरताळ फसतो.सत्र न्यायालयाने दोषीला फाशीची शिक्षा दिल्यापासून उच्च ते सर्वोच्च न्यायालय आणि नंतर राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज या प्रवासात दोषीला सवलती तर मिळतात शिवाय शिक्षा अंलबजावणीत उशीर होतो. अर्थात, प्रोसिजर आवश्यक आहेच परंतु या प्रक्रयेलाही काही कालमर्यादा असावी. सत्र न्यायालयाच्या निकालावर उच्च न्यायालयात अपील, नंतर सर्वोच्च न्यायालयाने फाशी सारखी शिक्षा कायम ठेवल्यानंतर तरी अंलबजावणीत विलंब होऊ नये. दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरणातच फाशीची शिक्षा सुनावण्यात येते. संपूर्ण गुन्हेगारी मानसिकतेवर जरब बसावा यासाठी हा निर्णय घेतला जातो. त्यामुळे किमान हा हेतू सफल होण्यासाठी तरी अशा खटल्यांमध्ये कालमर्यादा ठरवनियात यावी. आज कोपर्डी घटनेतील निकाल लागला आहे. दोषींना फाशीची शिक्षा देऊन न्यायालयाने मुजोर प्रवृत्तीला जरब बसविण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले, यात शंका नाही. परंतु कोपर्डीच्या दोषींना फासावर लटकावयला १२ वर्ष लागणार असतील तर कायदाचा धाक कसा निर्माण होईल. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर देशभारतील कायदे बदलण्यात आले होते, या धर्तीवर फाशीच्या शिक्षेअमलबजावणी संदर्भात कालमर्यदा निर्धारित करून त्यानुसार कोपर्डीतील आरोपीना फासावर लटकविल्या गेले तर कोपर्डीच्या पीडितेला खरा न्याय मिळेल..!!

    - ऍड. हरिदास उंबरकर,
    बुलडाणा
    मो. 9763469184

  • अद्यावत तंत्रज्ञानाचे विनाशकारी दुष्परिणाम

    एटीएम मधून डेंग्यू आणि मलेरियाचे लार्व्हा नोटांसोबत बाहेर येत असल्याचे, भारताच्या राजधानी दिल्ली व परिसरातील झालेल्या सर्वेक्षणात सिध्द झाले आहे.दिल्ली व परिसरात “राष्ट्रीय संक्रामक रोग नियंत्रण विभागाने” ५०० एटीएम यंत्रांचे सर्व्हेक्षण केल्यानंतर हे धक्कादायक सत्य उघडकीस आले.

  • गौरी लंकेश आणि आपण न्यायाधिश

    पत्रकार गौरी लंकेश यांच्या खुनावरून उभ्या देशात दोन गट पडले आहेत. एक गट खुनाचं समर्थन करतो आहे, तर दुसरा गट तेवढ्याच टोकाचा निषेध. खुन, मग तो कुणाचाही असो, तो निषेधार्हच असतो. कुणाच्याच खुनाचं समर्थन करता येत नाही.

  • याला जीवन ऐसे नाव भाग ३८

    पाण्याची प्रशंसता भाग तीन

    जेणाच्या सुरवातीला पाणी पिऊ नये. कृशता येते.
    जेवणानंतर लगेचच पिऊ नये. स्थूलत्व वाढते.
    जेवताना पाणी पिणे हे सर्वथा योग्य आहे. त्याने प्रकृती साम्यावस्थेत राहाते. सातही धातुंचे पोषण उत्तम रितीने होते.

    कसे ? आम्ही तर आजपर्यंत ऐकले आहे, जेवताना पाणी पिऊ नये, भूक मरते म्हणे. सगळंच चुकीचं चाललेलं आहे. पाश्चात्य संस्कृतीची झापडं लावल्यामुळे विचारांची किती भेसळ झाली आहे पाहा.

    नारळ वाटण्यापूर्वी पाणी घातले तरी रस येत नाही. आणि नंतर पाणी घातले तरी रस नीट निघत नाही. नारळ वाटता वाटता जर त्यात पाणी घातले तरच रस चांगला निघतो ना ! हे वाटप पाट्या वरवंट्यावर असू देत किंवा मिक्सरमधे !

    असेच व्यवहारात देखील दिसते.
    जेवता जेवता अन्नामधे लाळ चांगली मिसळली तर पचनही चांगले होते. तोंडात लाळ नीट निर्माण होण्यासाठी घोटभर पाणी घोळवले की उत्तम काम होते.

    पण नियम पाळायचे तर नीट ओळखून पाळावेत. जेवताना पाणी प्यायचे ते सुद्धा गरजेनुसार थोडे थोडे लागेल तसे प्यावे. उगाच नियम करून अमुकच लीटर पाणी हवे, असं अजिबात नको.

    मग आमची जेवतानाची पाणी पिण्याची परंपरा मोडली कधी आणि कोणी कशी ?
    हे शोधून काढणे जरा कठीण आहे. पण जे बदल झालेत, ते याच डोळ्यादेखत झालेत, हे नक्की आहे.

    जेवताना पाणी पिण्याचा आणखी एक फायदा म्हणजे चवीचवीनं जेवता येतं. तिखट खाऊन झालं की नंतर गोड पदार्थ खायचा असेल तर दोन्ही चवींच्यामधे, चव नसलेलं पाणी घेतलं की दोन्ही चवीतला फरक नीट कळतो. नाहीतर प्रत्येक चव नीट कळत नाही. एक गोड पदार्थ खाल्ल्यानंतर लगेचच दुसरं गोड खाल्लं तर, दुसऱ्या गोड पदार्थाची चव कमी गोड लागते, हे पण व्यवहारात आपण बघतोच. मधे पाणी प्यायले तर नंतरच्या पदार्थाची चव आणि लज्जत आणखीनच वाढते.

    जे काही पाणी प्यायचे आहे ते जेवतानाच प्यावे. पाणी पिताना सावकाश प्यावे. लाळ मिसळून प्यावे. तहान लागली तर जरूर प्यावे. पण मुद्दाम जेवणापूर्वी , जेवणानंतर लगेच पिणे, नियम करून पिणे चुक आहे, हे लक्षात ठेवावे.

    पाणी पिण्याचा किंवा माझ्या उत्तम प्रकृतीसाठी कोणताही बदल मी आजपासून करेन, असा संकल्प केला तर तो उत्साह दोन तीन दिवस टिकतो, नंतर पहिला विरोध होतो, तो आपल्याच घरातून ! स्वयंपाकघरातून फक्त एक सूचना येते, आणि आपले प्रामाणिक संकल्प कुठल्याकुठे उडून जातात. बदल आपल्यात हवा असेल आपल्यालाच बदलायला हवे ना !

    तीळगुळ घ्या आणि 'तुम्ही' गोडगोड बोला, असा उपदेश आज सगळेच करतील. जे बदलायचे ते तुम्ही. 'मी' बदलणार नाही, असंच ठरवून तीळगुळ दिला की नंतर आपण शब्दात अडकायला आणि दुसऱ्याने शब्दात पकडायला नको.
    जर मनापासून बदलायचं असेल तर असं म्हणा,
    "तीळगुळ घ्या, 'मी' गोड बोलेन." असं वचन देतोय मी ! कारण बदल मला माझ्यात करायला हवाय.

    वैद्य सुविनय दामले,
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    14.01.2017

  • गुढी पाडवा आणि शोभायात्रा नव्हे, ‘हिन्दू नववर्ष स्वागत यात्रा’

    नववर्ष स्वागताच्या या यात्रेला ‘शोभायात्रा’ असं शोभेचं ‘दिखावू’ नांव देऊन उगाच आपली शोभा करून घेऊ नका. या ऐवजी या यात्रेला ‘हिन्दू नववर्ष स्वागत यात्रा’ असं खणखणीत नांव द्या.