वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

हा २०-३०मीटर उंच वृक्ष आहे.ह्याची त्वचा गडद तपकिरी रंगाची व खडबडीत असून हिरड्याचे लाकूड अत्यंत कठिण व घट्ट असते.ह्याची पाने ७-२० सेंमी लांब व ५-१० सेंमी रूंद व टोकदार असून पत्र शिरांच्या ६-८जोड्या असतात.फुले २.५-५ सेंमी लांब असून फळ २.५-५ सेंमी लांब व अण्डाकार असते आत कठिण मगज असतो व पृष्ठभागावर पाच पन्हाळी सारख्या उभ्या रेषा असतात.फळ कच्चे असता हिरवे व पिकल्यावर धुरकट पिवळे असते.प्रत्येक फळात एक कठिण बी असते.
हरितकीचे उपयुक्तांग आहे फळ.ह्याची चव लवण अर्थात खारट सोडुन पाच हि चवी असलेली असते व प्रमुख चव तुरट असते.हरडा उष्ण गुणाचा असतो व हल्का,कोरडा असून त्रिदोषनाशक असतो.
चला आता आपण ह्याचे काही औषधी उपयोग पाहुयात:
१)जखम झाली असता ती हरड्याच्या काढ्याने धुवून साफ करतात.
२)बाळ हरडे चावून खाल्ल्याने भुक वाढते.
३)कफज अर्शामध्ये हरितकी हि गुळ व ताका सोबत देतात.
४)हरड्याचे चुर्ण मनुका व खडीसाखर सह देतात ह्याने अम्लपित्तामध्ये फायदा होतो.
५)हरडा दुषित कफ व मेद यांचा नाश करून बुद्धि व इंद्रियांचा जडपणा घालवून मेध्य कार्य करतो.
६)हरडा डोळ्यांच्या आरोग्यास देखील हितकर आहे.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
भगवंताच्या सर्वव्यापी स्वरूपाचे वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात….
महाराजांची जयंती कधी साजरी करावी हा वादाचा मुद्दा होताच कामा नये. मला तर वाटतं महाराजांची जयंती रोज साजरी करावी. ती मनातल्या मनात साजरी करावी. अशी रोज साजरी केलेली शिवजयंती उत्सवी नसावी, तर वागणुकीतून असावी. महाराजांनी घालून दिलेल्या आदर्शावर आपण आधुनिक काळात वागतोय की नाही, याचं भान ठेवून आपलं दररोजचं वागणं असलं, की मग ही शिवजयंती रोजच्या रोज साजरी होईल..महाराजांच्या नांवाला आणि इभ्रतीला धक्का लागेल असं आपलं वागणं असता कामा नये याची दक्षता प्रत्येकाने घेतली, क मग वेगळी शिवजयंती साजरी करण्याची गरजच भासणार नाही..
न्यूटनच्या वर्गात त्याच्या व्यतिरिक्त अजूनही ५० विद्यार्थी होते!!
आईन्स्टाईनचा वर्गही काही रिकामा नव्हता!!
बाबासाहेब तर वर्गाबाहेर बसून नुसतंच ऐकायचे!!
यांच्या मास्तरांनी सगळ्या वर्गाला एकसारखेच ज्ञान दिले होते!!
मग त्यांच्यातले हे एकएकटेच एवढे का शिकले?
तुकोबा ज्ञानोबा तर शाळेतच गेले नव्हते!!
शिवबांनी युद्धनीती कुठल्या मास्तर कडे शिकली होती?
तेंडुलकरच्या मास्तरांनी किती सेंच्युरी मारल्या होत्या?
आंबेडकरांच्या मास्तरांना किती घटना लिहिण्याचा अनुभव होता?
हे सगळेच शिकले कारण त्यांना शिकायचे होते!!
मास्तरांचे क्वालिफिकेशन त्यांच्या दृष्टीने गौण होते!!
सिलॅबसचे बंधन त्यांनी स्वतःस घातले नव्हते!!
आम्ही त्यांना देव मानून मोकळे होतो आणि आमचेच हात बांधून ठेवतो!!
आमच्या अपयशाचे खापर आमच्याच मास्तरांच्या अज्ञानावर फोडून मोकळे होतो!!
भरपूर फी घेणाऱ्यांना ज्ञानी म्हणतो आणि त्यांचे खाजगी क्लास लावतो!!
पण माझे शिक्षण त्यांच्या ज्ञाना मध्ये नाही हे सोईस्कर विसरतो!!
पैसे देऊन प्रयत्न विकत घेण्याचा विनोद आम्ही करतो, आमच्या मनालाच आम्ही फसवत राहतो!!
माकडांचे उड्या मारण्याचे क्लासेस कुणी बघितले आहेत का?
कि बदकांचे पोहण्याचे क्लासेस कुठे चालू आहेत का?
वाघिणीच्या शिकारीच्या क्लासेसच्या ऍडमिशन्स फुल झाल्याच्या बघितल्या आहेत का?
लंगड्या माकडीणीची पोरं उड्या मारायला शिकलीच नाहीत असं कुठं झालंय का?
आंधळ्या वाघिणीची मुलं कंद मुळं खाऊन राहिलेली कुणी पाहिलीत का?
निसर्गामध्ये कुणीच कुणाला शिकवत नसतो, ज्याची त्याची गरज म्हणून जो तो शिकत असतो!!
प्रयत्न आणि अनुभव हाच ज्याचा त्याचा मास्तर असतो!!
शिक्षक फक्त आपले भरकटलेपण दाखवितो, यशाचा मार्ग आपला आपणच शोधायचा असतो!!
आकाशा खालचं सगळं जग हाच ज्याचा त्याचा सिलॅबस असतो!!
शिक्षकांचा दर्जा शिक्षणाचा दर्जा शाळेचा दर्जा कॉलेजचा दर्जा ह्या सगळ्याला दोष दिला जातो कारण माझ्या प्रयत्नांचा दर्जा खूपच खालावलेला असतो!!
तिखट पदार्थात सर्वात जास्त वापरला जाणारा पदार्थ म्हणजे मिरची. कोशिंबीरी लोणच्या पासून ते सर्व भाज्या आणि फक्त मिरचीच्या ठेच्यापर्यत आपला ठसका दाखवणारी ही मिरची, तिखट पदार्थात आपले स्थान अबाधित राखून आहे.
अति सर्वत्र वर्ज्ययेत, या न्यायाने प्रदेश विचार करून, मिरचीचा वापर युक्तीने करावा. काही जण मिरच्या चराचरा चावून खातात, त्यांना भविष्यात काही गंभीर आजारांना सामोरे जावे लागण्याची शक्यता असते.
सुकी लाल मिरची आणि हिरवी ओली मिरची यामधे तुलना करायची झाल्यास सुकी लाल मिरची त्यातल्या त्यात बरी म्हणावी. कढी, पिठले, डाळ तडका इ. पदार्थांना लाल मिरचीशिवाय शोभा नाही.
आणि कोशिंबीर, कांदेपोहे, सोलकढी, आमटी या मधे हिरव्या मिरचीचा वास, काही खास असतो.
पण या हिरव्या मिरचीची साल किंवा बी आतड्यांना जर चिकटून राहिली तर तिथे व्रण म्हणजे जखम होण्याची शक्यता असते. म्हणजेच ही साल किंवा बी पोटात जाताना अगदी बारीक होऊन गेली तर धोका तेवढा नाही.
यासाठी युक्ती काय करावी ?
एकतर या हिरव्या मिरचीचे तुकडे करून वापरण्याऐवजी, ती फोडणीमधे अख्खीच वापरावी. म्हणजे त्याचा खास वासपण येईल आणि खाताना ती बाजूला काढून पण ठेवता येईल. किंवा याची सरळ पेस्ट म्हणजे चटणी करून ती वापरावी. कमी पुरते. बी आणि साल पण चिकटून रहाण्याची शक्यता कमी ! ( फोडणीमधे अख्खी वापरताना पुढचे टोक जरा मोडावे, नाहीतर गरम तेलात ती फुटते, आणि गरम तेल उडते. सावधान ! )
ज्यांना तिखट तर हवेच आहे, पण हिरव्या मिरचीने त्रास होतो, त्यांनी जिथे शक्य आहे तिथे लाल मिरची वापरावी. ही मिरची पूर्णपणे पिकल्यानंतर वाळवून ठेवलेली असते. त्यामुळे पचायला हलकी किंवा त्रास द्यायला हिरवीपेक्षा सहनशील असते.
लाल मिरचीची पावडर तर सहजपणे सर्व ठिकाणी वापरली जाते. रंग येण्यापासून, चव वाढवणे आणि सजावटीपर्यंत ही लाल मिरची उपयोगी ठरते.
मिरचीच्या सालीचे गुण बघितले तर एक महत्वाचा गुण लक्षात येतो, तो म्हणजे ती कफाच्या विरोधी गुणाची आहे. चिकटपणा कमी करणारी आहे, रक्तातील चिकटपणा पण कमी करणारी आहे. रक्तातील चिकटपणा म्हणजे आजच्या भाषेत, कोलेस्टेरॉल !
आणि मिरचीची बी, याच्या बरोबर विरूद्ध गुणाची म्हणजे मधुर रसाची ! साठवणीची मिरचीपूड करताना, त्यातील बीया काढून टाकल्या तर ती मिरचीपूड टिकते. नाहीतर मधुर रसाची असल्याने, बीयांना किड लागण्याची शक्यता जास्ती असते.
म्हणून तर प्रमेहात आणि स्थौल्यात मिरचीची बी वर्ज्य सांगितली आहे.... इति कै. विद्याताई जळूकर मॅडम.
पोपट मिरच्या खातो, पण साल नाही खात. फक्त गोड बीयाच खातो.
तिखट खाण्यात पण एक मजा असते. भाजी, उसळ आणि आमटी या तिखट पदार्था व्यतिरिक्त आणखी काही विशिष्ट तिखट पदार्थ आपल्या खाण्यात असतात. जे तिखट असतातच, पण त्यांची काही खास तिखट चव हेच त्यांचे वैशिष्ट्य असते. जसे पावभाजी, पाणीपुरी, भेळ, भजी, बटाटेवडे, आणि त्याच्याबरोबरची ओली सुकी तिखट चटणी.
हे पदार्थ म्हणजे अगदी जानी दुश्मन नाहीत, पण ते डाव्या बाजुलाच वाढलेले आहेत, हे विसरूनही चालणार नाही.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
17.11.2016
क्षमा आपल्याला तेव्हाच मिळते, जेव्हा आपल्या मध्ये आपल्याकडून झालेल्या चुकीबद्दल पश्चातापाची भावना असते.
गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुध्द पंचमीस स्त्रिया हे व्रत करतात .
आपल्या श्रेष्ठ ऋषीच्या सत्विकतेला , त्यांच्या अंगी असलेल्या उदात्त गुणांना विनम्रतेने अभिवादन करून त्यांचे पूजन करण्याचे हे व्रत आहे . त्यामुळे समाजातील सर्व घटकांनी हे व्रत अंगीकारून वैदिक , तत्वज्ञान , वैदिक धर्म आणि वैदिक संस्कृती ज्यांनी निर्माण केली त्या ज्ञान निष्ठांना , कर्म योग्यांना आणि तपोनिधींना या दिवशी व्रतस्थपणे आदरांजली वाहायला हवी. हे व्रत म्हणजे कश्यप, अत्री , भारद्वाज , विश्वामित्र , गौतम , जमदग्नी आणि वसिष्ठ या थोर सप्तर्षीची व अरुंधतीची पूजा आहे . उपवास करून केवळ हाताने पिकवलेली कंदमुळेच या दिवशी खावयाची असतात .
हे व्रत सात वर्षे सलग करावे असे शास्त्र सांगते . हि पूजा शुचितेचीअसल्याने आपल्या देहिक , मानसिक व बौद्धिक आचरणाच्या पातळीवरील अशुचीमुळे निर्माण झालेले कौटुंबिक व सामाजिक दोष या व्रतामुळे दूर होतात असे मानले जाते.
ऋषीपंचमीला केल्या जाणार्या खास भाजीची कृती पहा...
संजीव वेलणकर, पुणे
९४२२३०१७३३
ॲक्रिलोनायट्रिल ब्युटाडाइन स्टायरिन या मिश्र प्लास्टिकचा शोध १९४८ साली यामध्ये असलेल्या लागला. अॅक्रिलोनायट्रीलमुळे त्याला उच्च ताण सहन करण्याची शक्ती, रसायनांना विरोध करण्याची शक्ती व उष्णतेला टिकून राहण्याची शक्ती हे गुणधर्म प्राप्त झाले. यामध्ये आलेल्या ब्युटाडाइन या रबरामुळे त्याची आघात सहन करण्याची शक्ती व मजबुती वाढली व स्टायरिन या घटकद्रव्यामुळे प्लास्टिक अधिक चकचकीत दिसते आणि त्यापासून वस्तू बनवणे सोपे झाले.
हिवताप एक अत्यंत जुनाट रोग जो सबंध भारतामध्ये पसरलेला आहे. भारतापासून ते थेट आशिया खंडातही तो मोठ्या प्रमाणात दिसून येतो. एवढेच नव्हे तर चीन, युरोपमध्येही मलेरियाचा प्रभाव जास्त आहे. अनेक देशात मलेरियाला औषध सापडत नव्हते. अनेक शास्त्रज्ञांनी बरेच फिरून मलेरियाचा शोध लावण्याकरीता प्रयत्न केले. तसेच साधारण १७व्या शतकात पेरू या देशात एक झाडाचे साल सापडले. यावर प्रक्रिया करताना साल पाण्यात उकळून त्याचा रस पिण्याकरिता रोग्याला दिल्यास नक्कीच आराम वाटतो.
हे बहुवर्षायू क्षूप असते. हि भाजी चवीला गोड,तिखट,भूक वाढविणारी व उष्ण असते.हि भाजी शरिरातील वात व कफ दोष कमी करते व पित्त दोष वाढविते.
हि भाजी जेवणात तर वापरतात तशीच ती घरगुती औषध उपचारात देखील वापरली जाते.
आता हिचे औषधी उपयोग पाहूया.
१)सर्दी झाल्यास करडईच्या कोवळ्या पाल्याची भाजी द्यावी.
२)ह्या भाजीचा पोटीस सुजेवर बांधल्यास सुज व वेदना कमी होतात.
३)मोठ्या व्यक्तिंना क्रुमीचा त्रास झाल्यास करडईची भाजी करडईच्याच तेलात शिजवून खावी.
४)लघ्वी चिकट व गढूळ होणे ह्यात करडईच्या पानांचा रस २ चमचे+धणे पूड १ चमचा हे मिश्रण रोज सकाळी ८ दिवस घ्यावे.
५)घशात चिकट कफ येणे व तोंडात चिकट लाळ तयार होणे ह्या तक्रारीवर करडईची कोवळी पाने चावून त्याचा रस थुंकावा.
हि भाजी जास्त खाल्ल्यास डोळ्यांचे विकार,रक्तदोष व पित्ताचे विकार होतात.
-- वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Copyright © 2025 | Marathisrushti