वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
होमिओपॅथीमध्ये रुग्णाच्या सर्व शारीरिक लक्षणांचा अतिशय सूक्ष्मरित्या अभ्यास केला जातो. मानसिक लक्षणांना विशेष महत्त्व दिले जाते. रुग्णाचा पूर्व इतिहास, कौटुंबिक इतिहास, अनुवंशिकता याचबरोर रुग्ण इतिहास, रुग्ण संवाद याला खूप महत्त्व दिले जाते व या सर्वांचा अभ्यास करून रुग्णाची औषधे निश्चि्त केली जातात.
सामान्य माणसाला दैनंदिन जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रमुख गरजा म्हणजे अन्न, वस्त्र, पाणी आणि निवारा. परंतू जगाच्या पाठीवर झपाटयाने वाढणार्या लोकसंख्येकडे पाहता त्या भविष्यात पुर्या करणे किंवा मिळणे/मिळविणे कुठल्याही देशातील शासनकर्त्याला दुरापास्त होणार आहेत.
शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना ‘सरकारचे जावई’ म्हणण्याचा एकेकाळी रिवाज होता. कदाचित, सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारे अधिकार आणि दिल्या जाणाऱ्या सोयी-सुविधा पाहून मत्सराने हा शब्दप्रयोग रूढ झाला असावा! काहीही असो..पण एक गोष्ट मात्र काबुल करावी लागेल कि शासकीय कर्मचाऱ्यांना सरकार कायम जावयासारखी वागणूक देत आलं आहे.
“विच्छा माझी पुरी करा” या नाटकाने ही विचारसरणी बदलण्याचं फार मोठं कार्य करत लोकनाट्य शहरी पांढरपेशी समाजापर्यंत पोहोचवले.कुठलीही कला जितकी आत्यंतिक लोकल असते, तितकेच तिला ग्लोबल अपील असते कारण ती जनसामान्यांच्या संवेदनांशी नाते सांगते. हीच गोष्ट पुन:पुन्हा कराव्याश्या वाटण्या-या “विच्छा माझी पुरी करा”या नाटकाने सिद्ध केली आहे.
1972 चा दुष्काळ आठवतोय,
माणशी अर्धा लिटर रॉकेल, ते ही डिझेल मिश्रित, त्याचासाठी सुद्धा सकाळ पासून रांगा, घरात जेवढी माणसे तेवढे सगळे वेगवेगळ्या दुकानापुढे उभे रहायचो !
पण सुदैवाने तेव्हा टीव्ही नव्हता,
त्यामुळे देशात शांतता होती !
रेशन दुकानदाराकडून महिन्याचे सामान घेतले तरच रेशनची दोनशे ग्रॅम साखर, लाल गहू, मिलो, हे मिळणार अशी अवस्था होती.
पण सुदैवाने तेव्हा टीव्ही नव्हता,
त्यामुळे देशात शांतता होती !
गॅससाठी नवीन नंबर लावायचा तर दोन तीन वर्षे वेटिंग असायचे, गॅस कनेक्शन साठी सुद्धा पाच पाच तास लाईन मध्ये उभे असायचो आपण,
पण सुदैवाने तेव्हा टीव्ही नव्हता,
त्यामुळे देशात शांतता होती.
एवढंच काय, शासकीय दूध योजनेतील दुधाची बाटली घेऊन सकाळीच रांगेत उभे रहायचो, मग तिथली भांडणं, शिवाय त्यासाठीचे कार्ड काढायला ऑफिसमध्ये रांग लावायचो,
पण सुदैवाने तेव्हा टीव्ही नव्हता,
त्यामुळे देशात शांतता होती.
सार्वजनिक नळावर रांग, सरकारी दवाखान्यात रांग, कास्ट सर्टिफिकेटसाठी रांग, std बूथ बाहेर रांग, कॉलेजला ऍडमिशन फॉर्म मिळवण्यासाठी रांग.... ही रांगेच्या आठवणींची रांग कितीही लांबू शकेल,
पण हे सर्व होतं तेव्हा ही टीव्ही चॅनेल्स नव्हती,
त्यामुळे देशात खरंच शांतता होती !
आजही, दूरदर्शन सोडून इतर चॅनेल्स एक दिवस बंद ठेवा,
तुम्हाला लक्षात येईल,
देशात खरंच शांतता आहे !
-- संजीव सुळे
१९६८ मध्ये परत तो अँशेस साठी परत सिलेक्ट झाला तो इंग्लंडच्या संघाविरुद्ध त्यावेळी ऑस्ट्रेलिया इंग्लंडच्या टूरवर गेली होते तेथे त्याने ३४.६६ च्या सरासरीने १२ विकेट्स घेतल्या. १९६९-७०मध्ये त्याच्या हाताची किंमत इतकी वाढली की त्याचा हाताचा १०, ००० ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा विमा काढण्यात आला.
श्री मुदगल पुराणाने वर्णिलेल्या अष्टविनायकांची मूळ स्थाने भारताच्या आठ दिशेला आठ आहेत. विशेष म्हणजे श्रीक्षेत्र मोरगाव येथे मोरयाच्या मंदिरात आठ दिशांना या आठ विनायकांच्या मूर्ती स्थापित आहेत. भगवान श्रीमयुरेश्वर यांच्या पूजनानंतर पूर्वेकडून अनुक्रमे भगवान श्री वक्रतुंड, श्री एकदंत, श्री महोदर, श्री गजानन, श्री लंबोदर, श्री विकट,श्री विघ्नराज आणि श्री धूम्रवर्ण अशा या आठ विनायकांची पूजन करायचे असते. वेगळ्या शब्दात एकाच मंदिरात संपूर्ण भारताची यात्रा करण्याची सुविधा आहे श्रीक्षेत्र मोरगाव.
असे ज्ञान झाले की माणूस व्यापक होतो. त्याला सर्व जग समान दिसू लागते. साधकाच्या या अवस्थेला समब्रह्म असे म्हणतात. येथे व्यापकतेचा विचार असल्याने यालाच विष्णुब्रह्म असे म्हणतात.
मराठी सत्ता भारतव्यापी झाली ती १८व्या शतकात. याच शतकात बाजीराव, सदाशिवराव भाऊ व महादजी शिंदे यांनी दिल्लीला धडक दिली. या तीन पुरुषांच्या दिल्लीविषयक कामगिरीचे विश्लेषण करण्यापूर्वी आपण १८व्या शतकातील मराठी सत्तेचा थोडासा मागोवा घेऊ या.
सगळयाच निवृत्तीधारकांसं निवृत्ती नंतर काही दिवस व महिने बरे वाटते कारण रोजच्या धकाधकीच्या घाईगर्दी व लोटालोटीचा ट्रेनचा प्रवास सरलेला असतो. मुख्य म्हणजे मस्टर नसते त्यात पुरूषांना सकाळी आरामात ऊठता येते त्यामुळे वेळ बरा जातो. काही जणांची नोकरी व्यवसायात मिळणारी चिरीमीरी बंद झाल्याने आर्थिक तंगी असते. कुटुंबाची आर्थिक ओढाताण व्यसनं व नसत्या गरजा पैशा विना कशा पुर्या करायच्या हे प्रश्न मनात सतावत असतात. तसेच मानाची खुर्ची व पद नसल्याने सगळी कामे स्वतःहून करणे क्रमप्राप्त असते आणि हेच कुठेतरी खटकतं म्हणून निवृत्ती नको असते. निवृत्तीपासूनच निवृत्त असा पृथ्वीतलावर एकच अपवाद असेल तो म्हणजे राजकारणी !
Copyright © 2025 | Marathisrushti